#कामाचा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार-नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्याची ग्वाही • छत्रपती संभाजीनगर इथं ‘घाटी रुग्णालया’च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं अर्थ मंत्री अजित पवार यांचं आश्वासन • औद्योगिक जमिनीसाठी बिगरशेतीची आवश्यकता नाही, तसंच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय • विघनवाडी ते बीड रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी-बीडवासियांची रेल्वेची इच्छा सुफळ आणि • ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८२ पदकांची कमाई
मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा निर्धार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. पश्चिम वाहिनी नद्यांचं सुमारे ५३ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणाऱ्या नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले… ‘‘महाराष्ट्रातले जे चार नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला, आणि त्याचे आपण सर्व��क्षणाचे टेंडरदेखील काढले. मला हा विश्वास आहे, की आता येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू. आणि हे त्रेपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. आपण हा निर्धार केला, की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपण दुष्काळ पाहू द्यायचा नाही. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल.’’
मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोफत मिळणारी ही वीज राज्य सरकारला तीन रुपये प्रतियुनीट दराने मिळणार आहे, पुढची पाच वर्ष वीजेचे दर कमी करून, घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना याचा लाभ दिला जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं, ‘‘मागच्या काळामध्ये दरवर्षी आपण नऊ टक्के भाववाढ केली. पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या पाच वर्षाचे आपले वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. आणि सांगताना मला आनंद होतो, पुढचे पाचही वर्ष दरवर्षी वीजेचे भाव आम्ही कमी करत जाणार आहे. घरगुती वीजेचे भाव आणि औद्योगिक वीजेचे भावदेखील.’’
संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही देत, जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवत, बीडची वैभवशाली ओळख जगासमोर आणण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. खो- खो विश्वचषक स्पर्धेतल्या विजेत्या संघातले खेळाडू प्रतिक वाईकर, प्रियांका इंगळे, राम कश्यप, सुयश गरगटे, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड आणि प्रशिक्षक प्राची वाईकर, शिरीन गोडबोले यांचा यावेळी सत्कार झाला. आष्टी तालुक्यात सावरगाव इथं मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतनाा ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, जिल्ह्याचा २०२५-२६ या वर्षाचा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून, प्राप्त निधीचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठी करावा, असे निर्देश पवार यांनी दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मितीसंद���्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं आणि जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जेसंदर्भात प्रस्तावाचा समावेश करावा, अशी सूचना पवार यांनी यावेळी सगळ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना केली. लातूर शहरातल्या गंजगोलाई या ऐतिहासिक वैभवाच्या ठिकाणाला जोडणारे रस्ते आणि परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अधिकाऱ्यांनी या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. जिल्ह्यात येऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक पाहता येत्या पाच वर्षात शहराची लोकसंख्या वाढणार असून, त्यादृष्टीनं निर्माण करण्याच्या पायाभूत सुविधा आणि अन्य आवश्यकतांसाठी वाढीव नियोजन करण्यात आलं असल्याचं, तसंच जिल्ह्यातली ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याचं सांगत, पालकमंत्री शिरसाट यांनी नागरी सुविधा विकासासाठी वाढीव निधी मिळावा, अशी मागणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेडमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड इथल्या श्री हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराला देखील शिंदे भेट देणार आहेत.
औद्योगिक जमिनीसाठी बिगरशेती - एनए ची आवश्यकता असणार नाही, तसंच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. याकरता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार असल्याचं, याबाबत जारी पत्रकात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता - इज ऑफ डुईंग बिझनेस या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी "कॅरी ऑन योजना" लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एकसमानता ठेवावी, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कॅरी ऑन योजना सुरू करण्याची सूचना पाटील यांनी केली.
केंद्र सरकारतर्फे कालपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात आली आहे. ‘जल लाये, धनधान्य’ अशी ��ा यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही य���त्रा येत्या ६० ते ९० दिवसांत २६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या सहा हजार ६७३ ग्रामपंचायतींना, देशभरातल्या ८०५ प्रकल्पांची माहिती देईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन, चा भाग असलेल्या या यात्रेचा उद्देश, जलसंधारण आणि मातीच्या नापिक होण्याबद्दल जनजागृती करणं, हा आहे.
बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या रेल्वेमार्गाची जलदगती चाचणी काल झाली. अहिल्यानगर ते बीड या २६१ किलोमीटर अंतराच्या रेल्वेसेवेची बीडवासियांची गेल्या तीन दशकापासून मागणी होती, अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं, मात्र आता बीड जिल्ह्याची या रेल्वे सेवेची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर झाले असून, नांदेडच्या टायनी एंजल्स स्कूल या संस्थेच्या ’प्लॉट नं. शून्य’, या नाटकानं पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेडच्याच शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेच्या ‘आभाळ’ या नाटकाचा द्वितीय, परभणीच्या गोपाला फाऊंडेशन या संस्थेच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाचा तृतीय, तर मंठा इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या ‘लपंडाव’ या नाटकाचा चौथा क्रमांक आला आहे. ही चारही नाटकं अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकून कर्नाटक पहिल्या, सेना दल दुसर्या तर महाराष्ट्र तिसर्या स्थानावर आहे.
पुरुष क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
छत्रपती संभाजीनगर इथं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या चैतन्य तुपे या सात वर्षीय मुलाची पोलिसांनी काल सुटका केली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री चैतन्य हा वडील सुनिल तुपे यांच्यासोबत खेळत असताना त्याचं अपहरण झालं होतं.
परभणी जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला वीस ते पंचवीस दिवसांची मुदतवाढ द्यावी, या मागणीचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. ही मुदतवाढ न मिळाल्यास आंदोलनाचा ��शारा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला आहे.
सर्व माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता, वीरपिता आणि अवलंबित, यांनी सैनिक कल्याण विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन या विभागानं केलं आहे. तसंच याआधी दाखल केलेले अर्ज आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आणून द्याव्यात, असंही कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३४
एखाद्या प्रखर दिव्याच्या झोताने डोळे दिपून जावेत तसे केदार व एकनाथ अनंतच्या त्या प्रश्नाने थिजल्यागत स्तब्ध झाले! पण लौकरच त्यांतून स्वत:ला सावरीत, भानावर येऊन केदार म्हणाला, "हे असं कांही करतां येईल असं आमच्या मनांत कधी आलंच नाहीं, काका!" एव्हांना एकनाथलाही वस्तुस्थितीची जाणीव झाली होती. केदारला दुजोरा देत तो म्हणाला, "खरंच काका, असा कांही पर्याय आम्हांला सुचलाच नाही!" "अरे, रोजच्या रामरगाड्यांत असं घडणं अगदी स्वाभाविक आहे!", अनंत त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी समजावीत म्हणाला, "तुमचा दिवसभराचा सगळा वेळ एवढा कामांत जातो की वेगळा विचार करण्यासाठी हवी ती स्वस्थता तुम्हांला मिळतच नाही! बरं मालकीचा स्टाॅल असल्याने हक्काच्या साप्ताहिक सुट्टीलाही वाव नाही!" "एवढंच नाहींये, अनंतराव!" सबनीस कौतुकाने म्हणाले, "गेल्या कांही महिन्यांत एकत्र काम करण्याची या दोघांना एवढी संवय झाली आहे, की आपण स्वतंत्रपणे, एकेकट्याने काम करूं शकतो हे ते पार विसरून गेले आहेत!" "नाही दिनकरराव;-स्टाॅलच्या कामाचा भार एवढा जास्त आहे की दोघांपैकी कुणालाही एकट्याने स्टाॅल पूर्ण वेळ सांभाळणे शक्य होणार नाही!" अनंत हंसून म्हणाला,"पण एखादा मदतनीस जोडीला घेऊन कामाची विभागणी केली तर दोघेही आळीपाळीने थोडी विश्रांती घेऊन, स्टाॅल सुरु ठेवण्याची वेळ पाहिजे तेवढी वाढवूं शकतील!"
त्या दोघांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असलेल्या केदार-एकनाथनी संमतीदर्शक मान हलवली! तथापि कांही क्षणांनी किंचित घुटमळत केदारने विचारलं, "काका, तुम्ही म्हणतां तसा मदतनीस घरांतूनच मिळाला तर?--" "तर मग सोन्याहून पिवळं! एक तर घरचं माणूस विश्वासाचं असेल आणि मदतनीसाला द्यावा लागणारा मोबदला तुमच्या घरांतच राहील! पण घरांतून मदत करण्यासारखं कुणी आहे कां?" "मी आणि एकनाथने मिळून चहा-नाश्ता स्टाॅल सुरु केल्यावर सुरवातीला माझी आईच म्हणाली होती की 'मी घरांत नुसती बसून असत��, त्याऐवजी तुम्हां पोरांना निदान निदान भांडी-कुंडी धुवायला मदत करीन मी! एरवी एका बाजुला बसून सर्वांवर नुुसतं लक्ष ठेवीन!' केदार सांगू लागला, "पण चहा-नाश्त्याच्या स्टाॅलवर बायका कुठेच आढळत नाहीत म्हणून मीच मना केलं!" "तुझ्या आईचं खरंच कौतुक केलं पाहिजे, केदार! तुम्हां पोरांचे कष्ट व्हावेत यासाठी तिची केवढी धडपड होती!" अनंत मनापासून म्हणाला, "केदार, चहा-नाश्त्याच्या स्टाॅलवर काम करणाऱ्या बायका सहसा दिसत नाहींत हे तुझं निरीक्षण खरं असलं तरी समजा उद्यां तुझी आई खरोखरच तुमच्या स्टाॅलवर बसूं लागली तर ते 'केदारनाथ स्टाॅल'चं वैशिष्ट्य नाहीं कां ठरणार?" " म्हणजे?" अनंतचा पवित्रा बघून गोंधळलेल्या केदारने साशंक मनाने विचारलं "तुमच्या मतें आईने आमच्या स्टाॅलवर काम करावं?" "मी विचारतो, कां नाहीं?" अनंत ठाम स्वरांत म्हणाला "केदार, आज नोकरी वा व्यवसायात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने वावरतात!मग पुरुषांप्रमाणे कामावर जातां-येतांना त्यांनाही निवांतपणे एखाद्या जागी बसून चहाचे चार घोट घ्यावे वा चटकन कांही खावं असं वाटत नसेल कां? पण तरीही गल्लोगल्ली असलेल्या चहा-नाश्ता स्टाॅल्सवर स्त्रिया अभावानेच कां आढळतात?"
यावर कांही उत्तर न सुचल्यामुळे केदार आणि एकनाथ गप्पच राहिले! कांही क्षणांनी अनंत पुन्हा बोलूं लागला, " कुठल्याही बऱ्यापैकी हाॅटेलमधे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असेल, पण त्या असतात! -- आणि केवळ पुरुषांसोबत नव्हे तर स्वतंत्रपणे एकट्या वा कधी ग्रुपमधेही आढळतात! पण मग चहा-नाश्ता स्टाॅल्सवर हवं ते सगळं माफक दरांत आणि झटपट उपलब्ध असूनही स्त्रिया फारशा कांं आढळत नाहींत?" अनंतचा रोख लक्षांत येऊन सबनीस उत्तरले, " अनंतरावांच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, केदार आणि एकनाथ! चहा आणि नाश्त्याच्या स्टाॅल्सवर सर्वत्र केवळ पुरुषांचीच सतत वर्दळ असतांना तरुण मुली वा स्त्रियांना तिथे यावंसं कसं वाटेल? बरं, त्यांच्यासाठी ना कुठेही स्वतंत्र व्यवस्था वा आडोसा असतो! अशा परिस्थिती केदार, तुमच्या स्टाॅलवर तुझ्या आईसारखी मध्यमवयीन बाई येऊन नुसती बसूं लागली तरी तेथील एकुण वातावरणांत किती फरक पडेल याचा विचार करा!" " सबनीसकाकांनी माझ्या बोलण्याचा आशय किती अचूक ओळखला आहे बघा!" अनंत सस्मित म्हणाला, "जोडीला आहे त्याच जागेत एका बाजूला छोटं बांकडं वा दोन खुर्च्या टाकून त्यांवर 'फक्त स्त्रियांसाठी राखीव' असे स्टिकर्स लावलेत तर काय घडूं शकेल याचीही कल्पना करा!" अनंत आणि सबनीसांच्या एकुण बोलण्याने केदार आणि एकनाथ थक्क झाले होते! केदार अक्षरश: हात जोडून म्हणाला, " स्त्री ग्र���हकांना स्टाॅलकडे खेचून घेण्याची कल्पना खरंंच गंभीरपणे विचार करण्यासारखी आहे!" " मलासुद्धा ती खुप आवडली आहे!" एकनाथ उत्साहाने म्हणाला, "मीही याबाबत घरुन काही कुमक मिळेल का बघतो!" मनगटावरील घड्याळाकडे लक्ष गेल्यावर पटकन् उठत अनंत म्हणाला, " दिनकरराव, अहो किती वाजले बघितलंत कां? केदार आणि एकनाथ, तुम्हांला दोघांनाही तुमच्या घरून हवी तेवढी कुमक नक्की मिळेल;-- पण अधिक उशीर केला तर आम्हां दोघांना घरी काय भोगावं लागेल याचाही विचार करा!"
२३ मार्च २०२३
0 notes
bandya-mama · 2 months ago
Text
Bandya : काका लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजे.
लग्न करू का नको?
काका : लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे.
जीवनात नुसता आनंद काय कामाचा.
😇😇😇😅😅😅🤣🤣🤣😃😃😃
0 notes
pradip-madgaonkar · 2 months ago
Text
Pradip : काका लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजे.
लग्न करू का नको?
काका : लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे.
जीवनात नुसता आनंद काय कामाचा.
😇😇😇😅😅😅🤣🤣🤣😃😃😃
0 notes
digiyogi · 3 months ago
Text
Hand Core Cutter✨कामाचा दर्जा वाढवा! जबरदस्त हँड कोअर कटरसह तुमचं काम सोपं करा. ...... 1️⃣ सुशितो मॉल: आपल्या सर्व टूल्सचे एकच ठिकाण! 🛠️🔧🔨 हँड टूल्स 🔨, पॉवर टूल्स ⚡, सेफ्टी टूल्स 🦺 आणि कृषी उपकरणे 🚜 आम्ही सर्व काही एकाच छताखाली आणले आहे. चेन सॉ ⛓️, ड्रिल मशीन,Core cutter, चेन पुली 🏗️, गार्डनिंग टूल्स 🌱, मंकी क्रेन 🐒🏗️ आणि बरेच काही! कमी बजेटमध्ये उत्तम गुणवत्तेची साधने शोधत आहात? 💰✨ चिंता करू नका, सुशितो मॉलमध्ये या आणि आपल्या गरजा पूर्ण करा. 😊👍
सुशितो मॉल 😊👍 📱9423258000 📱8484963040
#handcorecutter#corecutter#SushitoMall#ToolsForAll#QualityTools#AffordableTools#powertools#handtools#Maharashtra
Tumblr media
instagram
0 notes
yntstore · 3 months ago
Text
Best Custom T-Shirt Service for Personal and Business
Tumblr media
आजकालच्या व्यावसायिक जगात, प्रत्येक व्यवसायाला त्यांची ओळख आणि ब्रँड मूल्य वाढवण्याची आवश्यकता असते.त्या व्यवसायासाठी सानुकूल टी-शर्ट्स ( customise T-shirts ) हे एक उत्तम साधन ठरू शकतात. ठाणे आणि मुंबईतील विविध व्यवसायांसाठी कस्टम टी-शर्ट्स कसे उपयुक्त ठरू शकतात, हे  आपण या लेखात पाहूया.
1. व्यवसायांसाठी सानुकूल टी-शर्ट्सची गरज : 
संस्थेची ओळख:
टी-शर्ट्स तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे एक प्रभावी साधन ठरतात. तुमच्या ब्रँडचा लोगो, अथवा संदेश असलेले टी-शर्ट्स सहजपणे डोळ्यात भरतात किंवा एखाद्याचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे ग्राहकांच्या मनात तुमची तुमच्या कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
ब्रँडिंग:
टी-शर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या टीमची एकसंधता दर्शवू शकता. एकाच डिझाइनमध्ये टीम सदस्य एकत्र दिसल्याने, ते एक सकारात्मक आणि व्यावसायिक संदेश प्रसारित करतात. हे एक प्रकारे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि व्यावसायिक मूल्य (Brand value) देखील वाढवते.
बजेट-फ्रेंडली मार्केटिंग:
कस्टम टी-शर्ट्स हे बजेट-फ्रेंडली मार्केटिंग साधन आहेत. पारंपारिक विज्ञापन आणि प्रमोशनच्या तुलनेत, एकदाच टी-शर्ट बनवून तुम्ही दीर्घकाळचा प्रचार करू शकता. टी-शर्ट्स एक सोपे , क���फायतशीर, आणि दीर्घकालीन प्रचाराचे साधन आहेत.
2. आमच्या टी-शर्ट्स��े प्रकार आणि वैशिष्ट्ये
कॉटन टी-शर्ट्स: 
Tumblr media
210 GSM आणि 260 GSM पोलो टी-शर्ट्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ. तुमच्या व्यवसायासाठी सुसंगत, आरामदायक आणि प्रीमियम टी-शर्ट्स.
ड्रायफिट टी-शर्ट्स: 
हलके आणि घाम शोषून घेणारे.
Tumblr media
राऊंड नेक टी-शर्ट्स:
Tumblr media
3. रंगांमधील निवड
ब्रँडच्या रंगाला प्राधान्य: 
तुमच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारे टी-शर्ट्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंग तुमच्या ब्रँडच्या थीमला प्रकट करतात आणि तुम्हाला ग्राहकांच्या मनावर चांगली छाप सोडण्यास मदत करतात.
रंग उपलब्धता:
टी-शर्ट्स विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत: लाल, निळा, पांढरा, काळा आणि इतर विविध शेड्स. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अनुरूप योग्य रंग निवडू शकता. या मध्ये २० पेक्षा जास्त रंगसंगती उपलब्ध आहेत. 
Tumblr media
4. प्रिंटिंग व एम्ब्रॉयडरी सेवा
प्रिंटिंगचे प्रकार:
स्क्रीन प्रिंटिंग:
मोठ्या ऑर्डरसाठी उत्तम, स्वस्त आणि टिकाऊ. मोठ्या प्रमाणात ब्रँडेड टी-शर्ट्स तयार करणे शक्य आहे.
2. डिटीफ प्रिंटिंग : 
विविध रंगसंगती तसेच मोठया व छोट्या कमी संख्येच्या ऑर्डरसाठी उपयुक्त आहे . स्वस्त आणि टिकाऊ असल्याने ह्या पद्धतीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो. 
Tumblr media
3. व्हिनाइल प्रिंटिंग:
Tumblr media
4. एम्ब्रॉयडरी:
कॉर्पोरेट टी-शर्ट्ससाठी आकर्षक आणि टिकाऊ लोगो डिझाइन. या तंत्रा मध्ये ( Technology ) एम्ब्रॉयडरी  (भरतकाम किंवा धाग्यांची डिझाईन) वापर केल्याने लोगो (Subject) खुप मोठ्या कालावधी पर्यंत टिकुन राहतो .
Tumblr media
5. ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि फायदे
मोठ्या ऑर्डरवर सवलत:
मोठ्या ऑर्डर्ससाठी खास ऑफर्स आणि सवलती. व्यवसायांच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
वेळेवर डिलिव्हरी:
ठाणे आणि मुंबईतील व्यवसायांसाठी जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा. आम्ही वेळेवर तुमची ऑर्डर डिलिव्हर करू.
6. टी-शर्ट्स कसे वापरता येतील?
कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म:
टी-शर्ट्स आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक आदर्श युनिफॉर्म ठरू शकतात. यामुळे व्यावसायिक ओळख निर्माण होईल.
इव्हेंट आणि प्रमोशन्स:
प्रदर्शन, रोड शो, किंवा फेस्टिव्हल्ससाठी कस्टम टी-शर्ट्स उत्तम पर्याय आहेत. हे तुमच्या ब्रँडला लोकांच्या नजरेत आणण्यास मदत करतात.
कस्टम गिफ्ट्स:
कर्मचारी किंवा ग्राहकांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स म्हणून तुम्ही कस्टम टी-शर्ट्स देऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय त्यांना लक्षात राहील आणि व्यवसाय वृद्धी मध्ये मदत होईल.
7. आमची विश्वासार्हता आणि अनुभव
कामाचा दांडगा अनुभव : 
आम्हाला कस्टम टी-शर्ट्सच्या क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव आहे. हे आम्ही अनेक व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देऊन सिद्ध केले आहे.
समाधानी ग्राहक:
आमच्याकडे अनेक समाधानी ग्राहक आहेत आणि ते पुन्हा आमच्याकडे येत  (Repeat orders) आहेत. आम्ही त्यांना उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
8. थेट संपर्क करा
ठिकाण:
तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आपण आम्हाला संपर्क करू शकता. 
गुगल मॅप पुढील प्रमाणे: https://maps.app.goo.gl/BrM1k6SLkX87GTsV9
ऑनलाइन सेवा:
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा फोनद्वारे ऑर्डर देण्यासाठी पुढील नावावर क्लिक करु शकता YNT STORE
फोन नंबर: 7738180909
इमेल आयडी: [email protected]
कस्टम टी-शर्ट्स वापरून तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करा आणि तुमच्या ब्रँडला एक नवा आयाम द्या. आजच आमच्याशी संपर्क साधा! YNT STORE 
0 notes
dakshadev · 4 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
४कोटी २७ लक्ष्याच्या विकास कामाचा भूमिपूजन शुभारंभ आज टाकळीभान मध्ये झाला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
जनतेच्या सेवेसाठी आणि विकासाच्या वचनपूर्तीसाठी आमदार साहेब सदैव तत्पर.
0 notes
imranjalna · 9 months ago
Text
सदृढ आरोग्य पुन्हा मिळवायचे असेल तर योग हा एकमेव मार्ग - डॉ.काळवणे
जालन्यातील चार ठिकाणी निःशुल्क योग केंद्र सुरू  मधुमेह रोग निवारण योग शिबिरही घेणार Yoga is the only way to regain good health – Dr. Kalwane जालना(प्रतिनीधी)कामाचा प्रचंड व्याप आणि गतिमान जीवन शैलीमुळे माणूस आपले माणूस आपले सदृढ आरोग्य हरवत चालला आहे.त्याला परत मिळवण्याचा मार्ग हा फक्त योग असल्याचे प्रतिपादन भारतीय योग संस्थानचे महाराष्ट्र उपप्रांतप्रधान डॉ.उत्तम काळवणे यांनी येथे बोलतांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 9 months ago
Text
0 notes
shrikrishna-jug · 10 months ago
Text
मानवी शरीर ही एक कलाकृती आहे.
काल मला अनपेक्षित, कामाचा बोजा खांद्यावरून खाली उतरावा लागला होता.त्यात मेहनत होती, कल्पकता होती आणि जबाबदारी ही होती.थकून भागून घरी आल्यावरप्रथम जर कां काय मनात आलं असेल तर ते थंड-गरम पाण्याची आंघोळ करण्यासाठी शॉवर घेणं.घामाने भिजलेले कपडे पटकन उतरून मी आंघोळीच्या खोलीत धावत गेल��.तुमच्यापैकी किमान एकाने हे वाचवं असं माझ्या मनात येऊन, शॉवर घेत असताना जे विचार माझ्या मनात आले ते मी माझ्या वहित…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र यांनी आज प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याला भेट देऊन त्रिवेणी संगम घाटावर पवित्र स्नान केलं. त्रिवेणी संगमावर पोचण्यासाठी पंतप्रधानांनी यमुना नदी��ून बोटीने प्रवास केला, त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधानांनी गंगा, यमुना आणि सरस्वाती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पूजा केली. महाकुंभातल्या साधुसंतांच्या ते भेटी घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही आज महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं.
भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालनं, त्रिवेणी संगमावरच्या या भव्य सोहळ्यात उपस्थित राहता येणं ही भाग्याची गोष्ट असून, अशा प्रकारचा आध्यात्मिक सोहळा जगात भारताशिवाय इतरत्र कोठेही होत नाही, असं मत व्यक्त केलं आहे.
****
आकाशवाणीचे वयोवृद्ध वृत्तनिवेदक वेंकटरामन यांच काल रात्री चेन्नई इथं निधन झालं, ते एकशे दोन वर्षांचे होते. वेंकटरामन यांनी पंधरा ऑगस्ट १९४७ च्या सकाळी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्याचं वृत्त प्रसारित केलं होतं. वेंकटरामन चौसष्ट वर्ष आकाशवाणीशी जोडलेले राहिले.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे एकोणीस पूर्णांक पंचाण्णव टक्क��� मतदान झाल्याचं वृत्त आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहीर करतील.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन, तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा सत्कारही फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या रेल्वेमार्गाची जलदगती चाचणी आज होणार आहे. आज सकाळी विघनवाडी ते नवगण राजुरी रेल्वे चाचणीची खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पालव�� इथं पाहणी केली. अहिल्यानगर ते बीड या २६१ किलोमीटर अंतराच्या रेल्वेसाठी बीडवासियांचा गेल्या तीन दशकापासून संघर्ष सुरू असून, अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं, मात्र आता बीड जिल्ह्याची या रेल्वेमार्गाची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या ११ तारखेपासून, तर दहावीची परिक्षा २१ तारखेपासून सुरु होत आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे.
नांदेड जिल्ह्यात दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तसंच तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
****
तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ, येत्या तेरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती, महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ‘शो मॅन-राज कपूर’ ही यंदाच्या या महोत्सवाची संकल्पना आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे तसंच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पिफ डिस्टींग्विशिंग अवॉर्ड या लक्षवेधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. महोत्सवात विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा होणार असून जगभरातले नावाजलेले चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
****
समाज कल्याण विभाग आणि नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचं उद्घाटन काल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यातल्या एकूण ५५ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून, पारंपारिक लोककला, नृत्य, गायन यासह विविध कलाप्रकार सादर केले.
****
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : २७
" नाहीं हं, शुभदा! तूं आतां जेवढा आव आणते आहेस, तेवढ्या सहजपणे काही तूं सुरवातीला हे सगळं स्वीकारलं नव्हतंस!" शुभदाच्या लटक्या आविर्भावाचा निषेध करीत, अनंत सबनीसांकडे वळून म्हणाला, "अहो, तिची तक्रार होती की 'इतकी वर्षं पहांटे ५ ३० वाजतां उठून स्वत: चहा करण्याची तुमची हौस अजून भागली नाहीं कां?' एवढंच नाहीं;-- तर तिने मला सरळ धमकीही दिली होती की 'नसेल भागली तर तुम्ही खुशाल चहा करून पीत जा! पण मी कांही आतां रोज इतक्या लौकर उठणार नाही! माझा चहा करून ठेवलात, तर मी उठल्यावर गरम करून घेईन;-- नाहीं केलात तर मी माझ्यापुरता करून घेईन'!" "तुम्हीच सांगा रजनीवहिनी, नवरा रिटायर झाल्यावर इतक्या वर्षांचा कामाचा ससेमिरा जरा कमी होऊन थोडा आराम मिळेल असं बायकोला वाटणं चूक आहे कां? त्यामुळे म��� तसं म्हटलं आणि यांनी ते निमूटपणे मान्य केलं! उगीच वितंडवाद न घालतां यांनी आपला रोजचा दिनक्रम चालूं ठेवला! माझ्यासाठी कोरा चहा काढून ठेवून, चहा प्यायल्यावर पूर्वीप्रमाणे फिरायलाही जाऊं लागले! पण १५-२० दिवस गेल्यावर असं एकटीने चहा प्यायचा मलाच कंटाळा येऊं लागला! पूर्वी रोज सकाळी ना, चहा पितांना आमचा दिवसभराचा आराखडा ठरायचा! अगदी नाश्त्याला काय करायचं वा भाजी काय करायची इथपासून ते कांही वेगळा विचार सुचला तर त्याविषयी एकमेकांना सांगण्यापर्यंत! हा रोज सकाळी होणारा संवाद थांबल्याने कांहीतरी हरवल्याची हुरहूर मला लागली आणि एक दिवस मी चक्क शरणागती पत्करली! गुपचूप यांच्या मागोमाग उठून मुखमार्जन केलं आणि कीचनमधे जाऊन सरळ सांगून टाकलं की 'आजपासून तुमच्याबरोबर मीही चहा घेईन!' "
"व्वा, अनंतराव! तुम्ही संयम राखून, कुठलाही वाद न घालतां मोठीच बाजी मारली की!" सबनीस कौतुकाने उद्गारले. "बाजी वगैरे कांही नाही हो! मी हे सगळं माझ्या आई-वडीलांकडून शिकलो! त्या दोघांना मी कधीही वाद घालतांना पाहिलं नाही! माझे वडील शीघ्रकोपी, तर आई अतिशय चोखंदळ! अशी दोन माणसं एकत्र आल्यावर त्यांच्यात मतभिन्नता असणारच;-- पण आई नेहमी म्हणायची की 'ही चाळीची वस्ती! इथे भिंतींनाही कान आहेत! आपण भांडून वा वाद घालून लोकांना कशाला तमाशा दाखवायचा?' त्यापेक्षा स्वत:ला योग्य वाटतं ते दोघंही निमुटपणे करीत रहायची! अशा प्रकारे वागल्यास थोडा वेळ जास्त लागतो, पण ज्याचं चुकतं, ते त्याला आपोआप कळून येतंच! आणि उगीच शब्दाला शब्द वाढून मनं दुखावली न गेल्याने आपली चूक कबुल करण्याचा समजुतदारपणाही अंगी येतो!" "माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो, की अनेकदां आपली चूक कळून आल्यावरही ती कबूल करणं खुप कठीण होतं!" सबनीस मोकळेपणाने म्हणाले, "टोकाचे वाद घालतांना अकारण इतकी कटुता निर्माण झाले��ी असते, की आपण चुक कबूल केल्यावर, बायको मोठ्या मनाने माफ करील आणि पुन: पूर्ववत् हंसत-खेळत बोलूं लागेल याची मला खात्री नसते!" " पूर्वी मुलं लहान होती तेव्हा कसं, निदान त्यांच्या आडून वा त्यांच्या मार्फत माफी मागण्याची सोय होती!" रजनीवहिनी चिडवीत म्हणाल्या, "पण आतां मुलं मोठी होऊन दूर गेल्याने तीही संधी मिळत नाहीं!"
" वहिनी, तुम्ही अशा प्रकारे बोलताय् की नेहमी जणूं दिनकररावांवरच ही पाळी येते!" अनंतने मिस्कीलपणे संधी साधली. " नाही, नाही;-- अगदी तसंच नाहीं!", रजनीवहिनींनी घाईघाईने खुलासा केला, " पण एवढं मात्र खरं की मी निष्कारण वितंडवाद घालीत नाही! आपलं चुकतंय् असं जाणवलं की लगेच माघार घेते!" "खरं सांगते आहे, रजनी!", सबनीस म्हणाले," ती चटकन् यशस्वी माघार घेत असल्याने माझ्यासारखी कोंडी होण्याची पाळी तिच्यावर सहसा येत नाहीं! पण अनंतराव आणि शुभदावहिनी, सहज गप्पांच्या ओघांत तुमच्याकडून, वादविवाद टाळून मतभेद दूर करायचा सोप्पा मार्ग समजला त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच!!" पत्नीला निघण्याची खुण करीत ते पुढे म्हणाले, "घरीं आम्ही दोघेच असल्याने नवीन फ्लॅट निवडतांना, जसा शेजार मिळावा अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाल्याची खात्रीही तुमच्याबरोबर आज पहिल्या फटक्यातच रंगलेल्या मनमोकळ्या गप्पांमुळे झाली आहे! तुम्हांला पत्ते खेळायची आवड असेल तर पुढची बैठक, तुम्हांला वेळ असेल तेव्हां आमच्या घरी पत्ते खेळत रंगवूंया असं सुचवीत आहे!" "अरे वा! तुम्हांलाही पत्ते खेळायची आवड आहे तर!" अनंत उत्साहाने म्हणाला,"आमचा १०-१२ जणांचा ग्रुप आहे! सवडीनुसार आम्ही दुपारी एकत्र जमून रमी खेळतो. तुमची इच्छा असेल तर, पुढचा खेळ ठरेल तेव्हां तुम्हींही सोबत या! तुमच्या तेवढ्याच अधिक ओळखी होतील आणि आमच्या ग्रुपलाही २ नवीन मेंबर्स मिळतील!"
१२ जानेवारी २०२३
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
youtube
सोमाणी गार्डन सुशोभीकरण आणि संगित कारंजे बसवण्याच्या कामाचा शुभारंभ..
0 notes
sanjay-ronghe-things · 1 year ago
Text
जीव रंगला तुझ्यात
व्याप किती कामाचा कसा रंगेल जीव ।बघूनच माझ्याकडेयेईल कुणासही कीव । खोटे कशास बोलूजीव रंगला तुझ्यात ।वेळ पडतो अपुरादिसेल तुज माझ्यात । तुझ्या आणि माझ्यातभाव भावनांचा खेळ ।सांगेल तुज मी सारेमिळू दे थोडा वेळ ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 1 year ago
Text
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याहस्ते चार हुतात्मा पुतळा परिसरातील सुशोभिकरणाचे लोकार्पण
सोलापूर, दिनांक 14 – सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाचे  कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्रीकिसन सारडा,हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा अ.कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/gramsevak-chaturbhuj-taking-a-bribe-of-1-lakh-bribe-taken-in-connection-with-jaljivan-work/
0 notes