#करण्याचे
Explore tagged Tumblr posts
Text

. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्��ार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रका�� दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋष���ंनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Text
भद्रावतीत दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

*रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांचे रक्तदान*.
तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- तालुका व शहर काँग्रेस भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर- वनी- आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रथम जयंती निमित्त शहरात दि 4 रोज मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे ,प्रफुल चटकी, चंद्रकांत खारकर ,माजी नगराध्यक्ष सरिता सूर, रेखा कुटेमाटे, जयश्री दातारकर ,प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, लक्ष्मी पारखी, विनोद वानखेडे तसेच रोटरी क्लब च्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद कोषाध्यक्ष सुधीर पारधी ,विवेक आकोजवार युवराज धानोरकार ,अब्बास अजानी हनुमान घोटेकार विक्रांत बिसेन आदींची उपस्थिती होती.
सकाळी 9.30 वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर शहरातील घूटकाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 147 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले त्यानंतर शहरातील गरीब नागरिकांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता 236 मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमृनी सहकार्य केले, यात डॉ. नितीन टिपले, अमोल रामटेके, अर्पणा रामटेके, सोनी मेश्राम, अभिलाष कुकडे, अक्षय जिद्देलवार, हर्षिता भारती, विजयालक्ष्मी बोबडे, रोशन पाटील आदींचा सहभाग होता.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व युवकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळातील अपघातांचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता वाढलेली असून विशेषता तरुणांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, तन्नू शेख, आकाश ढवस ,गोरु थेम ,अनूप गेडाम निखिल राऊत, सुधीर मुळेवार ,राजृ डोंगे, अशोक येरगुडे ,राकेश दोन्तावार, सुयोग धानोरकर, प्रतीक धानोरकर, अक्षय बोडे, चंदु दानव, प्रदीप घागी, महेश मोरे, नयन जांभुळे ,ईश्वर धांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
छत्तीसगढ मधल्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शास्त्रसाठा जप्त करण्यात आला. दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून शोधमोहिम राबवण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
मेक इन इंडिया सुरु झाल्यापासून २०२३-२४ या वर्षात भारतानं एक लाख २७ हजार कोटी रुपये किंमतीच्या संरक्षण सामग्रीचं उत्पादन केलं असून, स्वदेशी संरक्षण उत्पादनाचा हा आजवरचा उच्चांक आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या मूल्यात २०१४-१५ मधल्या ४६ हजार ४२९ कोटीवरुन १७४ टक्क्यांची वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
देशातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आय आय टी दिल्लीच्या दोन विद्यार्थ्यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. या कृती दलाने देशभरातल्या शिक्षण संस्थांना भेटी देऊन येत्या चार महिन्यांत अंतरिम अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२०वा भाग असेल.
मुंबईत येत्या एक ते चार मे दरम्यान होणाऱ्या वेव्ह्ज या शिखर परिषदेच्या निमित्ताने वेव्ज बाजार हा कायमस्वरूपी ऑनलाईन मंच सुरु करण्यात येणार असून, देशातल्या आशय निर्मात्यांसाठी जागतिक स्तरावर आदानप्रदान करण सोपं होणार आहे. क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ह्ज २०२५ अंतर्गत नागपूरमध्ये वेव्ह्ज ॲनिमे आणि मँगा अर्थात व्हॅम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव कृष्णा खोरे विकास महामंडळात करण्याबाबतची तरतूद असणारं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर झालं. महामार्गांचं संरेखन झाल्यानंतर भूसंपादनासाठीच्या एका वर्षाचा कालावधी वाढवून दोन वर्षांचा करण्यासाठीचं महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक, तसंच महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक देखील सभागृहानं मंजूर केलं. ऑनलाइन शुल्क भरून आता ई -मुद्रांक प्रमाणपत्र घरबसल्या मिळवता येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
राज्याचं शालेय शिक्षण धोरण राबवताना मराठी भाषेचा सन्मान आणि स्थान अधिक उंचावण्यावर कटाक्षाने भर देण्यात येईल, अशी ग्वाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधानसभेत दिली. या संदर्भात झालेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प असल्याचं भुसे यांनी सांगितलं.
एसटी महामंडळातल्या तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यानं आघाडी घेत पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. नाशिक जिल्हा चार लाख ५० हजार ६४० ओळख क्रमांक देऊन दुसऱ्या क्रमांकावर, तर पुणे जिल्हा चार लाख ३४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्याच्या वि��िध भागात उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत. सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. राज्यात २१ मार्चपर्यंत उष्माघाताचे २१ रुग्ण आढळून आले आहेत.
नागपूर इथं झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी १८ पदकं पटकावली. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या जवळपास १५ दिव्यांग विशेष शाळांमधल्या ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधे आज पाचव्या दिवशी पॉवरलिफ्टर्स आणि नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सुमन देवींनी ५५ किलो वजनी गटात, पुरूष ५९ किलो वजनी गटात गुलफाम अहमदने, सीमा राणीने ६१ किलो वजनी गटात, जॉबी मॅथ्यूने ६५ किलो वजनी गटात, तर नेमबाज निहाल सिंगने मिश्र २५ मीटर पिस्तूल एसएच१ प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.
0 notes
Text
Airtel, Jio आणि Vodafone ने स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले Airtel, Jio and Vodafone
Airtel, Jio and Vodafone जर तुम्ही दरमहा महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे त्रस्त आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक ठरू शकते. अलीकडेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने काही नवीन नियम लागू केले आहेत ज्यांच्या अंतर्गत टेलिकॉम कंपन्यांना लहान आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स लाँच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन यांनी २०२५ साठी काही विशेष प्लॅन्स सादर…
0 notes
Text


शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम लालवंडी येथे संपन्न...
शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरे शास्त्रज्ञाने देत त्यांच्या शंकांचे समाधान करता यावे, या उद्देशाने केव्हीकेनी सुरू केलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आज लालवंडी गावात करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी माती परीक्षण, फळबाग लागवड, पोक्रा योजना, हळद लागवड, जनावरांचे आजार व उत्तम दुग्धव्यवसायासाठी करावयाच्या विविध योजना, गांडूळखत निर्मिती इत्यादी संबंधित महत्वपूर्ण प्रश्न विचारले, आणि त्यांच्या शंका शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन दूर केल्या. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेण्यासाठी केव्हीकेने एक कॅम्प आमच्या गावी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. याचा उद्देश फक्त शंका समाधान करणे नसून, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे व समग्रपणे मिळवून देणे आहे. तसेच, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी केव्हीके आणि शेतकरी यांच्यातील सुसंवाद अधिक सुदृढ करण्याचे ध्येय आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. कपिल इंगळे, डॉ संतोष चव्हाण, डॉ कृष्णा आंभुरे, डॉ निहाल मुल्ला, डॉ प्रवीण चव्हाण व गावचे सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालाजी चंदापुरे व प्रभुदास उडतेवार व सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. # #farmer #farmers #farmerscientist #farming #शेतकरी #शास्त्रज्ञ #सुसंवाद
1 note
·
View note
Text
बुऱ्हाणनगर येथील अतिक्रमण कारवाई वादग्रस्त , उपविभागीय अधिकाऱ्यासह सर्वांची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथील अंबिका देवीच्या मंदिरासमोरील अंबिका सांस्कृतिक भवन येथील जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्व नोटीस न बजावता सत्तेच्या बळाचा वापर करत जमीनदोस्त केले या प्रकरणाची राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक विभागाचे आयुक्त श्री प्रवीण गेडाम यांना स्वतः चौकशी करून अहवाल शासनास सादर करावा असे आदेश दिले आहेत. ॲड. अभिषेक भगत यांनी याबाबत माहिती दिली असून ,…
0 notes
Text
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर, दि. 6: दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणारे पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही योजना दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 10 फेब्रुवारी 2025 दुपारी 12.00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती दिव्यांग वित्त विकास…
0 notes
Text
61. अनिश्चित मनासाठी निश्चितता
गीतेतील तिसरा अध्याय हा कर्मयोगाचा आहे जो श्लोक 2.71 चा विस्तार आहे. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की 'निर्मम' आणि 'निरहंकार' हे शाश्वत स्थिती प्राप्त करण्याचे मार्ग आहेत.
अर्जुनाने शंका उपस्थित केली की, जर तू बुद्धिमत्ता श्रेष्ठ मानतोस, तर मला युद्धाच्या भयंकर कार्यात का गुंतवतेस (3.1). मला गोंधळात टाकणारे भाषण न करता ��ाझ्या कल्याणासाठी काय चांगले आहे ते तुम्ही मला निश्चितपणे सांगा (3.2).
विभागणी नेहमीच तर्कहीन आणि आवेगपूर्ण निर्णय घेते कारण ते सत्यावर आधारित नसते. म्हणून श्रीकृष्ण ने विभागणी सोडण्याचा सल्ला दिला (2.50). अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला युद्धात आपल्या नातेवाईकांना मारण्यात काही फायदा दिसत नाही (1.31). पुढे, तो त्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक औचित्य सादर करतो. वर्तमानाचा प्रश्नही चांगल्या आकलनाच्या शोधापेक्षा त्याच न्याय्यतेचा भाग वाटतो.
आमची परिस्थिती अर्जुनपेक्षा वेगळी नाही कारण आम्ही भानावर येण्याआधीच धर्म, जात, कौटुंबिक स्थिती, राष्ट्रीयत्व, लिंग इत्यादींच्या आधारावर आमची ओळख निर्माण झाली होती आणि आयुष्यभर आम्ही ते सार्थ ठरवण्यासाठी धडपडत राहतो.
दुसरे म्हणजे, अर्जुन श्रीकृष्णाकडून निश्चिततेची अपेक्षा करतो. जरी नश्वरता हा या भौतिक जगाचा मार्ग असला तरी आपण सर्वजण निश्चिततेची वाट पाहत आहोत कारण ते आपल्याला सांत्वन देते. तर्कशुद्ध निर्णयासाठी पुरावे गोळा करणे आवश्यक आहे, ज्यासाठी प्रतीक्षा आणि संयम आवश्यक आहे. या कारणास्तव आम्ही त्वरीत वर्गीकरणाकडे जातो.
परंतु निश्चितता स्वतःच्या जीवनातील अनुभवातून येते आणि ती कष्टाने मिळवावी लागते. या मार्गावर आपण सर्वांनीच चालावे कारण हा अनुभव पुस्तकातून किंवा इतरांकडून घेता येत नाही. हे कार किंवा सायकल चालवण्यासारखे आहे, ज्याचा प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव आहे.
0 notes
Text
'सेंद्रिय शेती' कशी करावी?
सेंद्रिय शेती कशी करावी? – एक संपूर्ण मार्गदर्शक सेंद्रिय शेती ही आधुनिक काळातील एक शाश्वत व निसर्गस्नेही शेती पद्धत आहे. रासायनिक खतांपासून मुक्त, नैसर्गिक घटकांचा उपयोग करून पीक उत्पादन करणारी सेंद्रिय शेती आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके किंवा कोणतेही कृत्रिम घटक न वापरता केली जाणारी नैसर्गिक शेती. यात प्रामुख्याने कंपोस्ट, गोमूत्र, गांडूळ खत, शेणखत, तसेच जैविक कीटकनाशके यांचा उपयोग केला जातो.
सेंद्रिय शेती करण्याचे महत्त्व आरोग्यासाठी फायदेशीर: सेंद्रिय पिकांमध्ये पोषणमूल्ये अधिक असतात. मातीचे आरोग्य राखते: सेंद्रिय घटकांमुळे मातीतील सजीव घटक जिवंत राहतात. पर्यावरणपूरक: जलप्रदूषण आणि मातीचे नुकसान टाळते. कमी खर्च: रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक पर्याय स्वस्त व सहज उपलब्ध होतात.
सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती
जमिनीची निवड आणि तयारी सेंद्रिय शेतीसाठी भुसभुशीत, सेंद्रिय घटकांनी समृद्ध जमीन आवश्यक आहे. कंपोस्ट किंवा शेणखत जमिनीत म��सळून मातीची सुपीकता वाढवावी. जमीन नांगरून योग्य प्रकारे सजीव अन्नद्रव्ये तयार करावीत.
सेंद्रिय खतांचा वापर शेणखत: नैसर्गिकरित्या कुजवलेले शेणखत जमिनीत टाकल्याने पीक निरोगी राहते. गांडूळ खत: गांडुळांद्वारे तयार होणारे खत मातीला पोषक बनवते. कंपोस्ट खत: घरातील व शेतीतील जैविक कचऱ्यापासून बनवलेले खत पीकवाढीस उपयुक्त आहे.
जैविक कीटक नियंत्रण कीड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी गोमूत्र, दशपर्णी अर्क, निम तेल, हळद आणि सेंद्रिय मिश्रणे वापरावीत. पीक संरक्षणासाठी झाडांवर नैसर्गिक फवारणी करावी.
आंतरपीक पद्धती एकाच शेतात दोन किंवा अधिक प्रकारची पिके एकत्र लावून मातीतील पोषणमूल्ये टिकवून ठेवता येतात. उदा. भाजीपाला व कडधान्ये एकत्र लावणे.
पाण्याचा काटकसरीने वापर ठिबक सिंचन व सेंद्रिय मलमूळ पद्धती वापरून पाण्याची बचत करावी. मातीला ओलावा टिकवण्यासाठी झाडांच्या मुळाशी सेंद्रिय कचरा टाकावा. सेंद्रिय शेतीचे फायदे मातीतील पोषणमूल्ये वाढतात. पिकांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते. पाण्याचा वापर कमी होतो. ग्राहकांना रसायनमुक्त व उच्च पोषणमूल्य असलेले अन्न मिळते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो. उत्कृष्ट सेंद्रिय शेतीसाठी काही टिप्स जैविक खते वेळच्या वेळी वापरा. आंतरपीक पद्धतीने मातीचे आरोग्य जपा. नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करून पिकांचे संरक्षण करा. गादीवाफा तंत्राचा उपयोग करून उत्पादन वाढवा. शेवटची महत्त्वाची गोष्ट सेंद्रिय शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नाही, तर एक जीवनशैली आहे. आरोग्यदायी अन्न, मातीचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
सेंद्रिय शेतीचा स्वीकार करा आणि निसर्गासोबत सुसंवाद साधत शाश्वत विकासाकडे वाटचाल करा!
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४८
मोबाईलवर आलेला काॅल मनोरमाचा आहे हे बघितल्यावर तो घेत शुभदाने चेष्टेच्या सूरांत विचारलं, "भर दुपारी जरा विश्रांती घ्यायचं सोडून फोन कसले करतेस ग?" "तुझ्या विश्रांतीमधे खोडा घातला असेल तर माफ कर;-- पण तुला वेळ असेल तर भेंटायचं होतं म्हणून विचारायला फोन केला होता! पण माझ्यासोबत आणखीही कुणीतरी असेल!" "मी मोकळीच आहे;-- त्यामुळे केव्हांही भेटूं शकतो! पण अशी कोड्यांत बोलूं नको! तुझ्यासोबत कोण येणार आहे ते सरळ सांगून टाक!" "सुहासिनी!" आश्चर्याच्या धक्क्यातून स्वत:ला सांवरीत शुभदा म्हणाली, " खरं सांगतेस? पण डाॅक्टरांनी मॅडमना बाहेर पडायची परवानगी कशी काय दिली?" "डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच सुहासिनीला घडल्या प्रकारातून लौकरांत लौकर बाहेर काढायचे प्रयत्न चालले आहेत! म्हणून तुला मुद्दाम सांगायला फोन केला की तिच्याशी गप्पा मारतांना गेल्या शुक्रवारी जे घडलं त्याचा विषयही काढायचा नाहीं! जणूं कांही घडलंच नाहीं अशा प्रकारे वागायचं-बोलायचं! अशक्तपणामुळे ती घेरी येऊन पडली आणि तिला लागलं असं तिच्या मनावर ठसवायचे हे प्रयत्न आहेत!" मनोरमाच्या विस्तृत खुलाशाने समाधान न होऊन शुभदाने शंका विचारली, "पण आपण कितीही सांगीतलं तरी मॅडमना हे पटेल कां? आणि त्यांनी लिहून ठेवलेली ती चिठ्ठी?" "ती चिठ्ठी भाऊसाहेबांनी फाडून नाहींशी केली आहे! सुहासिनीने चिठ्ठीचा विषय काढला तर 'पॅरॅलिसिसचा झटका येतां येतां आपण मुश्किलीने वाचलो' याच्या घबराटीतून जवळजवळ ३ महिने अंथरूण धरल्याने तुला नाहीं ते भास होत आहेत' असं सांगायचं ठरलं आहे! तिच्या वांट्याला आलेल्या सक्तीच्या एकटेपणावर उपाय म्हणून तिला चार माणसांत घेऊन जायला सुरुवात केली आहे! काल संध्याकाळी सारसबागेत गणपतीचे दर्शन घेऊन, तिथेच थोडा वेळ बसून आम्ही चौघेजण मग जरा चेंज म्हणून बाहेर हाॅटेलमधे जेवायला गेलो होतो!" "तुमचे हे प्रयत्न यशस्वी ठरावेत असंच मलाही वाटतं!" शुभदा म्हणाली, "बरं, तुम्ही येणार आहांत तर कांही खायला करून ठेवूं कां?" 'अजिबात नाही! आम्ही अचानक आलो असं भासवायचं आहे ना! तुझ्याकडे जायचं आहे हे अजून सुहासिनीलाही सांगितलेलं नाहीं! आम्ही आल्यावर बघूं;--- गप्पांच्या ओघांत तिलाच विचारून काय जमेल ते कर!" "किती वेळांत याल?" "आपला हा काॅल संपला की मी लगेच सुहासिनीकडे जाणार आहे! त्यामुळे तिच्याकडून तुझ्या घरी येईपर्यंत एकुण तासभर तरी लागेल!"
अनंत घरी परत आला तेव्हां संध्याकाळी ७ वाजूून गेले होते. तो फ्रेश होऊन कीचनमधे येऊन बसला तशी त्याच्या पुढे गरमागरम चहाचा कप ठेवीत शुभदा म्हणाली, "बाहेर कांही खाऊन आला असाल तर किती भूक आहे ते सांगा. मी त्याप्रमाणे जेवणाची तयारी करीन." "असा कसा मी बाहेर कांही खाऊन येईन?" अनंत डोळे मिचकावीत म्हणाला, "सप्रेमॅडमसाठी तूं खास कांहीतरी बनवलं असशील त्याला मग उचित न्याय कोण देणार? मला तर आता सणसणून भूक लागली आहे!" "म्हणजे त्या येणार आहेत हे तुम्हांला ठाऊक होतं?" चकीत होऊन शुभदाने विचारलं, "मग मला कां सांगीतलं नाहीं?" "नाहीं,नाहीं! जेवण झाल्यावर मी मनोहरपंतांबरोबर 'स्वयंसिद्ध'च्या कामासाठी बाहेर पडलो, तेव्हां मला कांहीच कल्पना नव्हती. पण वाटेमधे त्यांनी आज मनोरमावहिनी आपल्या घरीं सप्रेमॅडमना कशासाठी घेऊन येणार आहेत ते मला सविस्तर सांगीतलं! कित्येक महिन्यांनी तुम्ही भेटला असाल ना? आतां कशी आहे त्यांची तब्ये��?" "जयू परत गेल्यावर मध्यंतरी २ वेळां कांंही कारणा-निमित्ताने आमची ओझरती भेट झाली होती;-- पण मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी हवा तो वेळ मात्र आजच मिळाला! मोठ्या शर्थीने परतवून लावलेल्या, आकस्मिक पॅरॅलिसिसच्या झटक्याच्या चालण्या-बोलण्यांत आढळणाऱ्या पुसट खुणा वगळतां त्यांची तब्येत चांगली वाटली! मुख्य म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न झालाच नाहीं असं चित्र उभं करण्याचे सर्वांचे आटोकाट प्रयत्न यशस्वी होताहेत असं खात्रीन�� जाणवलं!" "ते कसं काय?" "अहो, मॅडम नेहमींच्या मोकळेपणाने सर्व चालूं घडामोडींबद्दल खेळीमेळीने भाष्य करीत होत्या! जयूने मागच्या भेटीनंतर त्यांच्याशी संपर्क ठेवला असल्याचंही त्यांच्या बोलण्यात आलं! पण अलीकडे दीर्घ आजारपणामुळे त्यांनाच उत्तरादाखल मेल पाठवतां आली नाही म्हणाल्या! त्यामुळे तिच्या सध्यांच्या हालहवालीची त्यांनी खुप आपुलकीने चौकशी केली! त्या अजूनही जयूचा उल्लेख प्रेमाने 'बबली' असाच करतात बरं कां!" "अरे वा! कांही म्हण, पण आपल्या जयूवर खरंच जीव आहे त्यांचा!" कौतुकाने मान डोलावीत अनंत म्हणाला, "जयूला त्यांच्या अलीकडच्या आजारपणाबद्दल माहीत नसणार! आतां तिचा फोन येईल तेव्हां तिला थोडक्यांत कल्पना दे, म्हणजे ती संपर्क साधेल! जमलं तर सरप्राईज म्हणून मॅडमना व्हिडिओ काॅल कर असं सांगायला हवं जयूला" "खरंच, 'बबलीचा काॅल आला!' म्हणून किती हरखून जातील मॅडम!" मनोमन कल्पनाचित्र रंगवीत शुभदा उत्साहाने म्हणाली, "नक्की सुचवूंया आपण जयूला मॅडमना व्हिडिओ काॅल करण्याबद्दल! पण मला आतां सांगताहांत, त्याची आठवण करून द्यायचं तुम्हीही लक्षांत ठेवा! नाहींतर जयूचा फोन आला की बाकी सगळं बोलतांना, तिला 'मॅडमना व्हिडिओ काॅल कर' असं सांगायचं नेमकं राहून जायचं!" "मनोहरपंतांच्या म्हणण्यानुसार डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत खुद्द भाऊसाहेबही आधी साशंक होते! पण बायकोच्या तब्येतीमधे झपाट्याने झालेली सुधारणा पाहून त्यांचाही उत्साह आतां दुणावला आहे! विशेषत: घडल्या प्रकाराबाबत गिरीश आणि शिरीष कसे वागतील, या भीतीचं दडपण, त्या दोघांना वकीलसाहेबांनी दिलेल्या जमालगोट्यामुळे पुरतं नाहींसं झाल्याने ते आतां आम्हां सर्व मित्रमंडळींशी खुप मोकळेपणाने बोलूं लागले आहेत!!"
२० जुलै २०२३
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 March 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २५ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
• महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर • हास्य कलाकार कुणाल कामराविरोधात एफआयआर; तोडफोड प्रकरणी ११ जणांना अटक • विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु; उपाध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक • इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक • विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन सर्वत्र साजरा आणि • खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाची चमकदार कामगिरी
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत काल एकमतानं मंजूर झाला. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मांडलेल्या या ठरावाला सर्वांनी पाठिंबा दिला. हा पुरस्कार देताना त्यांचा महात्मा, हा सन्मान कमी होऊ नये, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. महात्मा ही लोकमान्यता आहे तर भारतरत्न ही राजमान्यता आहे, त्यामुळे महात्मा, हा सन्मान कुठेही कमी होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हास्य कलाकार कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचं, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिलं. संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं, तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं स्पष्ट सांगत, कामरा यांनी माफी मागावी, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले.. बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, कुणाल कामरा याचे बॅंक व्यवहार तपासले जातील आणि त्याच्या मागे कोण आहे याचा शोध घेतला जाईल, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं वाटत नसल्याचं, म्हटलं आहे. नागपूर दंगलीतल्या नुकसान भरपाईप्रमाणेच, कामराच्या स्टुडिओ तोडफोड प्रकरणात संबंधितांकडून भरपाई वसूल केली पाहिजे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कुणाल कामरा याच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या ४० शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. शिवसेना कार्यकर्ता राहुल कनाल सह ११ जणांना पोलिसांनी तोडफोड प्रकरणी अटक केली आहे.
विधानसभेत काल अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. राज्यात जाती धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. जयंत पाटील, नाना पटोले यांनीही विविध मुद्यांवर सरकारवर टीका केली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून टीका केली.
विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या निवडणुकीसाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज सादर करता येतील, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणी नियमानुसार योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन नार्वेकर यांनी दिलं.
सातबाऱ्यात असलेली मृतांची नावं हटवून त्यावर वारसांची नावं घालण्याची मोहीम येत्या एक एप्रिल पासून सुरू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. वारसांची नोंदणी करताना succession certificate आवश्यक नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
शून्य ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचं शासनाचं कोणतंही धोरण नसल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. गुणवत्ता पूर्ण तसंच दर्जेदार शिक्षणासाठी शाळा दत्तक योजना राबवण्यात येत असल्याचं, भोयर यांनी सांगितलं.
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या वसतीगृहा��साठी पंधराशे कोटी रुपये निधीची तरतूद केल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. वसतीगृहातली प्रवेश प्रक्रिया समाजकल्याण आयुक्तामार्फत राबवली जाईल असं शिरसाट यांनी सांगितलं.
राज्यात वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी ‘महापारेषण’च्या विविध मंजूर प्रकल्पांची कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल यासंदर्भात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनद्वारे धमकी देणारा तसंच शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. ११ मार्च रोजी अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती, तेव्हापासून तो फरार होता.
नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या महिला संघानं चमकदार कामगिरी केली. अॅथलेटिक्समध्ये नागपूरच्या अकुताई उल-भगत तसंच भाग्यश्री जाधव यांनी, तर पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतिमा भोंडे यांनी सुवर्ण पदक जिंकलं. पुरूषांच्या गटात पॅरा पावर लिफ्टिंग मध्ये विक्रम अधिकारी यानं कांस्यपदक जिंकलं. या स्पर्धेत महाराष्ट्र आत्तापर्यंत १४ सुवर्णपदकांसह, एकूण ३६ पदकं जिंकत पाचव्या स्थानावर आहे. यात १३ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही, कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान पवार यांनी, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा.रं. बोराडे तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे दिवंगत महासचिव मधुकर मुळे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.
परभणी इथल्या वसंतराव ना��क मराठवाडा कृषी विद्यापीठातली रिक्त पदं येत्या तीन महिन्यात भरले जातील, असं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सांगितलं. आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यासंदर्भात कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध सुधारित करावयाची कार्यवाही जलद गतीने सुरू असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.
जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस काल पाळण्यात आला. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्ध व्हा, प्रयत्न करा आणि परिणाम मिळवा’ अशी यंदाच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयात टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा पार पडला. जिल्ह्यातल्या ३०४ ग्रामपंचायतींना कांस्यपदक, तर सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना 'महात्मा गांधी रौप्य सन्मान' प्रदान करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात टीबीमुक्त ३४ ग्राम पंचायतींना रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते सरपंच, आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
लातूर इथं क्षयरोग निर्मुलनाबाबत पथनाट्य, जनजागृती फेरी, आदी कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी, जास्तीत जास्त ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त करण्याबाबत योग्य उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या.
नांदेड जिल्ह्यात टीबीमुक्त ६७ ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन गौरवण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते महात्मा गांधी स्मृतिचिन्ह तसंच प्रशस्तीपत्रं प्रदान करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात कृत्रीम बुद्धिमत्ता-एआयच्या मदतीनं क्षयरोग रुग्णांचं निदान करण्यात येत आहे. डॉक्टर अभय बंग यांच्या, सर्च, या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मॉ दंतेश्वरी रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं वर्षभरात ८८ क्षयरुग्णांचं निदान करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर स्त्री रोग संघटनेच्या वतीने काल घेण्यात आलेल्या वंध्यत्व निवारण नवीन उपचार प्रणाली विषयावरील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत डॉ.वसुधा जाजू, डॉ.भालचंद्र मॅडम, डॉ. शोभराणी कर्पे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम बहुविधाच्या संचालक स्नेहलता दत्ता यांचं काल निधन झालं, त्या ८४ वर्षांच्या होत्या. एमजीएम महागामीच्या संचालक गुरु पार्वती दत्ता यांच्या त्या मातोश्री होत.
बीड जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाला जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी म���न्यता दिली आहे. या अर्थसंकल्पात एकूण महसुली जमा रुपये १६ कोटी १३ लाख रुपये तर १५ कोटी २१ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.
हवामान राज्यात काल सर्वात जास्त ४० पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान सोलापूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव इथं ३७ अंश सेल्सियस, परभणी इथं ३८ अंश तर बीड इथं ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, काल सोलापूर इथं जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
0 notes
Text
Best Custom T-Shirt Service for Personal and Business

आजकालच्या व्यावसायिक जगात, प्रत्येक व्यवसायाला त्यांची ओळख आणि ब्रँड मूल्य वाढवण्याची आवश्यकता असते.त्या व्यवसायासाठी सानुकूल टी-शर्ट्स ( customise T-shirts ) हे एक उत्तम साधन ठरू शकतात. ठाणे आणि मुंबईतील विविध व्यवसायांसाठी कस्टम टी-शर्ट्स कसे उपयुक्त ठरू शकतात, हे आपण या लेखात पाहूया.
1. व्यवसायांसाठी सानुकूल टी-शर्ट्सची गरज :
संस्थेची ओळख:
टी-शर्ट्स तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे एक प्रभावी साधन ठरतात. तुमच्या ब्रँडचा लोगो, अथवा संदेश असलेले टी-शर्ट्स सहजपणे डोळ्यात भरतात किंवा एखाद्याचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे ग्राहकांच्या मनात तुमची तुमच्या कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
ब्रँडिंग:
टी-शर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या टीमची एकसंधता दर्शवू शकता. एकाच डिझाइनमध्ये टीम सदस्य एकत्र दिसल्याने, ते एक सकारात्मक आणि व्यावसायिक संदेश प्रसारित करतात. हे एक प्रकारे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि व्यावसायिक मूल्य (Brand value) देखील वाढवते.
बजेट-फ्रेंडली मार्केटिंग:
कस्टम टी-शर्ट्स हे बजेट-फ्रेंडली मार्केटिंग साधन आहेत. पारंपारिक विज्ञापन आणि प्रमोशनच्या तुलनेत, एकदाच टी-शर्ट बनवून तुम्ही दीर्घकाळचा प्रचार करू शकता. टी-शर्ट्स एक सोपे , किफायतशीर, आणि दीर्घकालीन प्रचाराचे साधन आहेत.
2. आमच्या टी-शर्ट्सचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
कॉटन टी-शर्ट्स:

210 GSM आणि 260 GSM पोलो टी-शर्ट्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ. तुमच्या व्यवसायासाठी सुसंगत, आरामदायक आणि प्रीमियम टी-शर्ट्स.
ड्रायफिट टी-शर्ट्स:
हलके आणि घाम शोषून घेणारे.

राऊंड नेक टी-शर्ट्स:

3. रंगांमधील निवड
ब्रँडच्या रंगाला प्राधान्य:
तुमच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारे टी-शर्ट्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंग तुमच्या ब्रँडच्या थीमला प्रकट करतात ��णि तुम्हाला ग्राहकांच्या मनावर चांगली छाप सोडण्यास मदत करतात.
रंग उपलब्धता:
टी-शर्ट्स विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत: लाल, निळा, पांढरा, काळा आणि इतर विविध शेड्स. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अनुरूप योग्य रंग निवडू शकता. या मध्ये २० पेक्षा जास्त रंगसंगती उपलब्ध आहेत.

4. प्रिंटिंग व एम्ब्रॉयडरी सेवा
प्रिंटिंगचे प्रकार:
स्क्रीन प्रिंटिंग:
मोठ्या ऑर्डरसाठी उत्तम, स्वस्त आणि टिकाऊ. मोठ्या प्रमाणात ब्रँडेड टी-शर्ट्स तयार करणे शक्य आहे.
2. डिटीफ प्रिंटिंग :
विविध रंगसंगती तसेच मोठया व छोट्या कमी संख्येच्या ऑर्डरसाठी उपयुक्त आहे . स्वस्त आणि टिकाऊ असल्याने ह्या पद्धतीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो.

3. व्हिनाइल प्रिंटिंग:

4. एम्ब्रॉयडरी:
कॉर्पोरेट टी-शर्ट्ससाठी आकर्षक आणि टिकाऊ लोगो डिझाइन. या तंत्रा मध्ये ( Technology ) एम्ब्रॉयडरी (भरतकाम किंवा धाग्यांची डिझाईन) वापर केल्याने लोगो (Subject) खुप मोठ्या कालावधी पर्यंत टिकुन राहतो .

5. ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि फायदे
मोठ्या ऑर्डरवर सवलत:
मोठ्या ऑर्डर्ससाठी खास ऑफर्स आणि सवलती. व्यवसायांच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
वेळेवर डिलिव्हरी:
ठाणे आणि मुंबईतील व्यवसायांसाठी जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा. आम्ही वेळेवर तुमची ऑर्डर डिलिव्हर करू.
6. टी-शर्ट्स कसे वापरता येतील?
कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म:
टी-शर्ट्स आपल्या कर्मचार्यांसाठी एक आदर्श युनिफॉर्म ठरू शकतात. यामुळे व्यावसायिक ओळख निर्माण होईल.
इव्हेंट आणि प्रमोशन्स:
प्रदर्शन, रोड शो, किंवा फेस्टिव्हल्ससाठी कस्टम टी-शर्ट्स उत्तम पर्याय आहेत. हे तुमच्या ब्रँडला लोकांच्या नजरेत आण��्यास मदत करतात.
कस्टम गिफ्ट्स:
कर्मचारी किंवा ग्राहकांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स म्हणून तुम्ही कस्टम टी-शर्ट्स देऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय त्यांना लक्षात राहील आणि व्यवसाय वृद्धी मध्ये मदत होईल.
7. आमची विश्वासार्हता आणि अनुभव
कामाचा दांडगा अनुभव :
आम्हाला कस्टम टी-शर्ट्सच्या क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव आहे. हे आम्ही अनेक व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देऊन सिद्ध केले आहे.
समाधानी ग्राहक:
आमच्याकडे अनेक समाधानी ग्राहक आहेत आणि ते पुन्हा आमच्याकडे येत (Repeat orders) आहेत. आम्ही त्यांना उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
8. थेट संपर्क करा
ठिकाण:
तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आपण आम्हाला संपर्क करू शकता.
गुगल मॅप पुढील प्रमाणे: https://maps.app.goo.gl/BrM1k6SLkX87GTsV9
ऑनलाइन सेवा:
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा फोनद्वारे ऑर्डर देण्यासाठी पुढील नावावर क्लिक करु शकता YNT STORE
फोन नंबर: 7738180909
इमेल आयडी: [email protected]
कस्टम टी-शर्ट्स वापरून तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करा आणि तुमच्या ब्रँडला एक नवा आयाम द्या. आजच आमच्याशी संपर्क साधा! YNT STORE
0 notes
Text
Tron: Ares - सिनेमाच्या भविष्यातील एक झलक
चित्रपटाची ओळख: Tron: Ares हा एक आगामी विज्ञान कथा चित्रपट आहे जो प्रेक्षकांना दृष्यदृष्ट्या आश्चर्यकारक डिजिटल जगात विसर्जित करण्याचे वचन देतो. आयकॉनिक Tron फ्रँचायझीमधील तिसरा हप्ता म्हणून, या चित्रपटाची मालिकेच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहे. हे त्याच्या पूर्ववर्तींचा वारसा पुढे चालू ठेवेल, ओळख, वास्तविकता आणि भौतिक आणि डिजिटल क्षेत्रांमधील अस्पष्ट रेषा शोधत राहील. हा चित्रपट प्रेक्षकांना एका…

View On WordPress
0 notes