Tumgik
#इंडिया एक्सप्रेस डॉट कॉम
infoscope · 2 years
Text
निक जोनास ने टाइप 1 मधुमेह का पता चलने से पहले दिखाए गए 4 लक्षण साझा किए।
निक जोनास ने टाइप 1 मधुमेह का पता चलने से पहले दिखाए गए 4 लक्षण साझा किए।
गायक निक जोनास, जिन्हें 2005 में 13 साल की उम्र में टाइप 1 मधुमेह का निदान किया गया था, ने मधुमेह का निदान होने से पहले अपने शरीर को चार लक्षण दिखाना शुरू कर दिया था। 30 वर्षीय ने इंस्टाग्राम पर पोस्ट किया अत्यधिक प्यास, जल्दी पेशाब आनाउनके अनुसार वजन कम होना और चिड़चिड़ापन टाइप 1 डायबिटीज के सामान्य लक्षणों के रूप में पहचाना जा सकता है। “मेरे पास चार संकेत थे कि मुझे टाइप 1 मधुमेह है: अत्यधिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ajitnehrano0haryana · 5 years
Link
via AcchiNews.com अच्छी न्यूज़ डॉट कॉम
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****  पात्र तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवून मतदान करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन  राज्यातल्या पर्यटन वृध्दीसाठी उडान उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांची तरतूद  मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. व्यंकटेश काब्दे यांची बहुमतानं निवड आणि  सायना नेहवाल इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची विजेती घोषीत **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्र तरूणांना मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून काल देशवासियांशी संवाद साधतांना त्यांनी मताधिकार प्राप्त करणं, हा नागरिकाच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं सांगितलं. २१व्या शतकात जन्मलेल्या युवकांसाठी मतदानाची ही पहिलीच संधी असून, त्यांनी देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, युवकांना येत्या निवडणुकीत मतदानाचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘कलामसॅट’ या उप���्रहाचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतल्या विजेत्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. देशात सर्वत्र ‘स्वच्छ शौचालय’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले. सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांनी आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी परीक्षांसाठी पंतप्रधानांनी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस, संत रविदास यांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं. कर्नाटकातल्या तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधानांनी, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येत्या ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. यानिमित्त नागरिकांनी दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन त्यांनी केलं. **** उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचं आवाहन केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. स्वातंत्र्य सैनिक तसंच इतर नेत्यांचा त्याग, शौर्य आणि योगदान यांचा शिक्षणात महत्त्वाचा घटक म्हणून समावेश करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. शिक्षणबाह्य कार्यक्रम घेऊन विद्यापीठ परिसरातलं वातावरण विकृत करु नये यावर जोर देत चारित्र्यसंपन्न माणूस घडवणं हा शिक्षणाचा धर्म असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. **** अयोध्येतल्या राम जन्मभूमी- बाबरी मस्जिद मालकी वादाच्या प्रकरणावर उद्या २९ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणीची नवीन तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. **** केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज सरकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली सध्या उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्यानं अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बँकांची बुडीत कर्जं आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. **** संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार करण्यात येणाऱ्या आणि सर्वाधिक वेगानं धावणाऱ्या दिल्ली वाराणसी रेल्वे गाडीला ‘वंदे -भारत’ अस नांव दिलं जाणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. १६ यान असलेली ही रेल्वे गाडी चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आली असून, भारतीय अभियंत्यांनी दीड वर्षांत या रेल्वेची निर्मिती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या नव्या रेल्वे गाडीचा शुभारंभ करणार आहेत. **** भारतीय रेल्वेतर्फे येत्या चौ��ा एप्रिलपासून ‘समानता एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी नागपूर इथून सुरु केली जाणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तथागत गौतम बुद्धांशी संबंधित स्थळांना भेटी देणारी ही विशेष पर्यटन रेल्वे असणार आहे. दहा रात्री- अकरा दिवसांचा हा प्रवास असेल. **** राज्यातल्या पर्यटन वृध्दीसाठी उडान उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आयोजित विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी काल ते बोलत होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या विमानतळांचा या योजनेत समावेश केल्याचं त्यांनी जाहीर केलं. कोकणात किनाऱ्यांवर लवकरच समुद्रावर विमान उड्डाण आणि उतरवण्याची सुविधा सुरु होणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. रेल्वे आणि विमान सेवेद्वारे कोकणात पर्यटनाला चालना मिळेल, आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असं ते म्हणाले. **** केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभं आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सुरक्षा कवच मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अटल आरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतूनही गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांवर सुमारे तेवीसशे आजारांवर उपचार होत असल्याचं त्यांनी सांगितलं. **** भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज जालना इथं बैठक होणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातले भाजपचे मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कृषी आणि राज्यकीय ठरावांसह बारा विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आणखी एका आरोपीला दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल औरंगाबाद इथं न्यायालयासमोर हजर केलं, न्यायालयानं त्याला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या आरोपीला एटीएसनं परवा शनिवारी मुंब्रा इथून ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून संगणकीय साहित्य जप्त करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यातच एटीएसनं, राज्यात एका अल्पवयीन आरोपीसह दहा जणांना अटक केली होती. **** मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नांदेड इथले सामाजिक कार्यकर्ते, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची बहुमतानं निवड झाली. काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत परिषदेचे मावळते अध्यक्ष विधीज्ञ प्रदीप देशमुख यांनी अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार शरद अदवंत यांच्यासह अनेक उमेदवारांनी माघार घेतली, मात्र, औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष गोपीनाथ वाघ यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे दुपारनंतर मतदान घेण्यात आले. मराठवाडाभरातून आलेल्या ८७ सदस्यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केलं. त्यात डॉ. काब्दे यांना ६० मतं मिळाल्यानं, ते विजयी झाले. डॉ. काब्दे यांनी यापूर्वीही परिषदेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. **** लातूर महानगरपालिकेनं अतिक्रमणात हटवलेल्या फेरीवाल्यांना जागा देण्याबाबतचं धोरण तत्काळ जाहीर करावं, असं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर शहरातल्या १२ शौचालयांचं लोकार्पण, रस्ते कामाचं भूमिपूजन, सामाजिक सभागृह उद्घाटन तसंच गंजगोलाई सुशोभीकरण आदी कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते. महानगरपालिकेनं त्वरित सर्वसाधारण सभा घेऊन, वर्षानुवर्षे लातूर शहरात राहणाऱ्या, मात्र आजपर्यंत जागा नावावर न झालेल्या सुमारे तीन हजार कुटुंबांना पुढच्या दहा दिवसांत कबाले वाटप करावेत, असं निलंगेकर म्हणाले. **** प्राचार्य ना.य.डोळे स्मृती पुरस्कार अभिनेते-सामाजिक कार्यकर्ते अतुल कुलकर्णी यांना काल प्रदान करण्यात आला. लातूर जिल्ह्याच्या उदगीर इथं आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुध्द जाधव यांच्या हस्ते कुलकर्णी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. **** भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. काल झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सायनाची प्रतिस्पर्धी स्पेनच्या कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिनं स्पर्धेतून माघार घेतली. मरिन ही उत्तम प्रतिस्पर्धी असून, दुखापतीमुळे तिनं माघार घेणं दुर्देवी असल्याचं सायनानं म्हटलं आहे. **** भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज माऊंट मौंगानुई इथं थोड्याच वेळात सुरू होणार आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे. **** नाटकाच्या माध्यमातून बदलणारा काळ आणि या बदलत्या काळात मुलांच्या मनात सुरु असलेली घुसमट, तसंच त्यांचा ताण रंगमंचावर व्यक्त व्हायला हवा, असं मत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. गिरीश सहदेव यांनी व्यक्त केलं. लातूर इथं काल सोळाव्या राज्य बाल नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. लहान मुलांच्या विषयांकडे दिग्दर्शक, नाट्य लेखकांनी गांभीर्यानं पहायला हवं, असं सांगतानाच त्यांनी मुलांना आनंदासाठी नाटकांकडे वळा, असा सल्लाही दिला. **** औरंगाबाद इथं एक ते चार फेब्रुवारी दरम्यान पाचवं राज्यस्तरीय महा अॅग्रो कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे समन्वयक वसंत देशमुख यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहीती दिली. पैठण रसत्यावर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ***** ***
0 notes
infoscope · 2 years
Text
दीया मिर्जा को 'मेरी नन्ही धरती के साथ जमने' में मजा आता है। जानिए प्रकृति में समय बिताने के कई फायदों के बारे में
दीया मिर्जा को ‘मेरी नन्ही धरती के साथ जमने’ में मजा आता है। जानिए प्रकृति में समय बिताने के कई फायदों के बारे में
यह बिना कहे चला जाता है कि दीया मिर्जा प्रकृति और इसके कई लाभों और उपचार शक्तियों के बारे में बेहद भावुक हैं। वह अपनी दिनचर्या को साझा करने के लिए बार-बार सोशल मीडिया का उपयोग करती है, यह सुनिश्चित करती है कि वह प्रकृति में समय बिता रही है। इसी तरह, पूर्व मिस एशिया पैसिफिक (2000) विजेता ने हाल ही में इंस्टाग्राम पर ‘ग्राउंड विद माई लिटिल अर्थलिंग’ शीर्षक से कुछ तस्वीरें पोस्ट की हैं।जमीनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
infoscope · 2 years
Text
नींद की कमी न केवल शरीर के लिए हानिकारक है, बल्कि इससे दृष्टि हानि भी हो सकती है। ऐसे।
नींद की कमी न केवल शरीर के लिए हानिकारक है, बल्कि इससे दृष्टि हानि भी हो सकती है। ऐसे।
अनियमित सोने का तरीका एक नए अध्ययन में पाया गया कि यह न केवल शरीर के लिए हानिकारक था क्योंकि यह ग्लूकोमा के विकास और प्रगति से जुड़ा था, बल्कि एक अध्ययन में प्रकाशित हुआ था। बीजे ओपन जर्नल ने नींद के व्यवहार और ग्लूकोमा के बीच संबंध का विश्लेषण किया। 2006 और 2010 के बीच 40 से 69 वर्ष की आयु के 4,000 से अधिक लोगों के यूके बायोबैंक डेटा के आधार पर एक कोहोर्ट अध्ययन में निम्नलिखित निदानों का अध्ययन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
infoscope · 2 years
Text
क्या एक हल्का कोरोना भी रक्त के थक्के, हृदय संबंधी समस्याओं का कारण बन सकता है?
क्या एक हल्का कोरोना भी रक्त के थक्के, हृदय संबंधी समस्याओं का कारण बन सकता है?
नए सबूत बताते हैं कि शिरापरक थ्रोम्बेम्बोलिज्म या खून का थक्का — लक्षण जो किसी व्यक्ति की नसों में शुरू होते हैं और हृदय, फेफड़े और शरीर के अन्य भागों में फैल जाते हैं, उनके हल्के लक्षणों वाले लोगों द्वारा अनुभव किए जाने की संभावना अधिक होती है। कोविड19। कि ज्यादा शोध करना, में प्रकाशित ब्रिटिश मेडिकल जर्नलउन्होंने पाया कि हल्के कोरोनावायरस वाले रोगियों, जिन्हें अस्पताल में भर्ती नहीं के रूप में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
infoscope · 2 years
Text
क्या गर्भवती महिलाओं को पुश-अप्स करना चाहिए?
क्या गर्भवती महिलाओं को पुश-अप्स करना चाहिए?
पुश-अप्स, ऊपरी शरीर का एक बुनियादी व्यायाम, अक्सर सभी के लिए अनुशंसित होता है और इसे सुरक्षित माना जाता है। लेकिन क्या बारे में गर्भवती महिला? क्या मांओं को भी पुश-अप्स करना चाहिए? क्या मुझे पुश-अप्स करना चाहिए और अपने आप को तब तक नीचे करना चाहिए जब तक कि मेरी छाती फर्श पर न लग जाए? इस सवाल का जवाब देने वाली प्रसवपूर्व और प्रसवोत्तर कोच विंती माहेश्वरी ने इंस्टाग्राम पर साझा किया, “गर्भावस्था के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
infoscope · 2 years
Text
जब द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया के अभिनेता जॉर्ज हेनले को नेक्रोटाइज़िंग फासिसाइटिस का पता चला था: 'एक दुर्लभ और गंभीर संक्रमण'
जब द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया के अभिनेता जॉर्ज हेनले को नेक्रोटाइज़िंग फासिसाइटिस का पता चला था: ‘एक दुर्लभ और गंभीर संक्रमण’
नार्निया का इतिहास अभिनेता जॉर्ज हेनले ने हाल ही में नेक्रोटाइज़िंग फासिसाइटिस से पीड़ित होने की बात स्वीकार की, एक “दुर्लभ और गंभीर संक्रमण” जिसने “मेरी जान ले ली और मेरे पूरे शरीर को बहुत नुकसान पहुँचाया।” 27 वर्षीय ने अपनी आपबीती साझा की और इंस्टाग्राम पर पोस्ट किया: “जब मैं 18 साल की थी, तब मुझे कॉलेज में छह सप्ताह में नेक्रोटाइज़िंग फासिसाइटिस का पता चला था। महामारी इसने लगभग मेरी जान ले ली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
infoscope · 2 years
Text
यहाँ रिफाइंड चीनी के लिए एक स्वस्थ मीठा विकल्प अवश्य देखना चाहिए।
यहाँ रिफाइंड चीनी के लिए एक स्वस्थ मीठा विकल्प अवश्य देखना चाहिए।
जब आपके आस-पास हर कोई आपकी मिताई का आनंद ले रहा हो, तो मिठाई से दूर रहने में कोई मज़ा नहीं है।हालाँकि, कुछ तरीके हैं जिनसे आप अपने मीठे दाँत को मीठा रखते हुए संतुष्ट कर सकते हैं। स्वस्थ और संतुलन। डॉ. दीक्सा भावसार सावलिया ने इंस्टाग्राम पर रिफाइंड चीनी के कुछ विकल्प साझा किए और आपको यह सूची प्रदान करना चाहते हैं। दिनांक इस पौष्टिक, शीतल और स्फूर्तिदायक फल से अधिक मिठाई को कुछ भी संतुष्ट नहीं…
View On WordPress
0 notes
infoscope · 2 years
Text
बैक्टीरिया को नाम देने का एक नया तरीका: वैज्ञानिक प्रगति के लिए धन्यवाद, 300 साल पुरानी प्रणाली को संशोधित किया गया
बैक्टीरिया को नाम देने का एक नया तरीका: वैज्ञानिक प्रगति के लिए धन्यवाद, 300 साल पुरानी प्रणाली को संशोधित किया गया
लगभग 300 साल पहले स्वीडन वनस्पति-विज्ञानिक कार्ल लिनिअस ने बाइनरी सिस्टम के रूप में जाना जाने वाला बनाकर विज्ञान के इतिहास में अपना स्थान सुरक्षित कर लिया। वर्ष 1737 था, और पौधों और पौधों की विविधता के कारण, जानवर दुनिया के विभिन्न हिस्सों से प्रकृतिवादी खोजकर्ताओं द्वारा एकत्रित, लिनिअस ने इस सामग्री को व्यवस्थित रूप से वर्गीकृत और समूहबद्ध करने के लिए एक तार्किक प्रणाली विकसित करने की आवश्यकता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
infoscope · 2 years
Text
मायोसिटिस, एक ऑटोइम्यून बीमारी क्या है जिसका निदान सामंथा रूथ प्रभु ने किया था?
मायोसिटिस, एक ऑटोइम्यून बीमारी क्या है जिसका निदान सामंथा रूथ प्रभु ने किया था?
सामंथा रूथ प्रभु ने खुलासा किया है कि उन्हें एक ऑटोइम्यून बीमारी का पता चला है। ड्राइववे में आने के बाद सबसे पहले मैं इसे साझा करना चाहता था, लेकिन उन्होंने कहा, “मैं जितना चाहता था उससे थोड़ा अधिक समय ले रहा हूं।” एक मदद करें अभिनेता ने हाथ में आईवी ड्रिप के साथ इंस्टाग्राम पर एक तस्वीर साझा की। वह अपनी नई फिल्म पोस्ट करने के बाद मिले प्यार के लिए आभार व्यक्त करती हैं। यशोदाके लिए ट्रेलर जारी…
View On WordPress
0 notes
infoscope · 2 years
Text
मिथक या तथ्य: गर्भनिरोधक गोलियों से वजन बढ़ता है
मिथक या तथ्य: गर्भनिरोधक गोलियों से वजन बढ़ता है
आसपास कई गलतफहमियों के बीच गर्भनिरोधक विकल्प लेने वाली महिला गर्भनिरोधक गर्भावस्था में देरी के लिए वजन बढ़ने की प्रवृत्ति होती है। लेकिन, क्या कोई सच्चाई है? इस विषय पर पिछले कुछ अध्ययनों से पता चला है कि वजन बढ़ना वास्तविक वजन बढ़ने के कारण नहीं हो सकता है, बल्कि शरीर में द्रव प्रतिधारण के कारण होने वाला एक अस्थायी दुष्प्रभाव हो सकता है। इंडिया एक्सप्रेस डॉट कॉम मैं इसके बारे में और समझाने के…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद असलेल्या १२४ व्या घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी  यवतमाळ इथं सुरू असलेल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप  पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणीसाठी शंभर रुपये देणगी शुल्क आकारण्याचा निर्णय  ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ३४ धावांनी पराभव आणि  खेलो इंडिया स्पर्धेत एकूण ११६ पदकं जिंकत महाराष्ट्राचं वर्चस्व कायम ***** आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद असलेल्या १२४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकाला आता कायद्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. लोकसभेत ३२३ जणांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ आणि तीन खासदारांनी विरोधात तर राज्यसभेत १६५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर ७ जणांनी विरोधात मतदान केलं. या कायद्यातल्या तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि शासकीय नोकरीत दहा टक्के जागा राखीव असतील. **** पारदर्शी व्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरु असून, गेल्या चार वर्षात विकास कामांना गती मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसनं शेतकऱ्यांचा मतपेटी म्हणून वापर केला, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना, भाजप सरकारनं सामाजिक समानतेबरोबरच आर्थिक समानताही आणल्याचं नमूद केलं. देशाच्या सुरक्षेला, महिला सक्षमीकरणाला सरकारनं प्राधान्य दिल्याचं सांगतानाच गेल्या चार वर्षात दहशतवाद, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचंही ते म्हणाले. **** भारताची धोरणं ही व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीनं पुरक असल्यानंच संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल २५ व्या भागिदारी शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. उदारीकरण - खाजगीकरण - जागतिकीकरण ही सध्याची महत्वाची सूत्र असून, त्यामुळे जग अधिक जवळ आलं आहे, असं ते म्हणाले. **** मतदानाच्या आधी ४८ तास निवडणूक प्रचार आणि डिजिटल माध्यमांच्या उपयोगावर प्रतिबंध लावण्याबाबत विचार क��ण्यासाठी निवडणूक आयोगानं नियुक्त केलेल्या समितीनं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. डिजिटल माध्यमाच्या प्रभावामुळे मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद करणं अवघड होत असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेवर दुष्परिणाम होत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. कायद्याच्या उपाययोजनांबरोबरच सर्व राजकीय पक्ष, तसंच निवडणुकीसंबंधित इतर घटकांनीही सातत्यानं प्रयत्न करुन यावर उपाययोजना करण्या��ी गरज आयोगानं व्यक्त केली. **** यवतमाळ इथं सुरू असलेल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. या संमेलनात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. संमेलनात काल, “माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची?” तसंच “कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का” या विषयावर परिसंवाद घेण्यात आले. याशिवाय काल आयोजित वऱ्हाडी बोली कवी संमेलनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करताना शंभर रुपये देणगी शुल्क आकारलं जाणार आहे. आतापर्यंत ही सुविधा मोफत होती. या नव्या देणगी आकारणीमुळे मंदिर समितीला वर्षाला १५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. वर्षभरात सुमारे १५ लाख भाविक ऑनलाईन नोंदणी करून दर्शनाचा लाभ घेतात. मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भाविकांना सुलभ आणि तत्पर दर्शन, महाप्रसाद आणि राहण्याची सुविधा माफक दरात उपलब्ध करुन देणं शक्य होणार आहे. मात्र, मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या गैरहजेरीत सहअध्यक्षांनी हा निर्णय घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांनी घडवलेल्या सुरूंग स्फोटात वीरमरण आलेले पुण्याचे मेजर शशीधरन नायर यांचं पार्थिव काल पुण्यात आणण्यात आलं. घोरपडी इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली. नायर यांनी आपल्या ११ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक धाडसी मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. आज सकाळी दहा वाजता पुणे इथं नायर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. **** राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती काल सर्वत्र साजरी करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी, तर परभणी महानगरपालिकेत महापौर मीना वरपुडकर यांनी, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. पाथरी तालुक्यातल्या तुरा इथं जिजाऊ जयंतीनिमित्त महिला बचट गट मेळावा घेण्यात आला तर जालना इथं जिजाऊ जयंतीनिमित्त दुचाकी फेरी काढण्यात आली. लातूर जिल्ह्यात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. उस्मानाबाद इथं जिजाऊ आणि विवेकांनद यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५३ जणांनी रक्तदान केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठींबा दिल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. या नगरसेवकांनी पक्षादेशाचा भंग केल्यानं ही कारवाई केल्याचं या आदेशात म्हटलं आहे. **** हैदराबाद प्रांताचा समग्र इतिहास लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे यांनी म्हटलं आहे. लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन च्या वतीनं औरंगाबाद इथं काल आयोजित हैदराबाद मुक्तीची संघर्षमय गाथा, या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या सह अनेकांनी हैदराबाद प्रांताच्या इतिहास लेखनाचा प्रयत्न केला, मात्र ते कार्य पूर्ण होऊ शकलं नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. **** भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ३४ धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं भारतासमोर २८९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. रोहीत शर्माच्या १३३ धावांच्या खेळीनंतरही भारतीय संघ निर्धारित षटकात नऊ बाद २५४ धावांच करू शकला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडी घेतली आहे. **** पुणे इथे सुरू असलेल्या खेलो इंडिया या युवा स्पर्धेत महाराष्ट्रानं ४१ सुवर्ण , ३३ रौप्य आणि ४२ कांस्य पदकांसह एकूण ११६ पदकं जिंकत आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. काल या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरण आणि जिम्नॅस्टिक या प्रकारात प्रत्येकी चार सुवर्णपदकं पटकावली. दिल्लीचा संघ एकूण ८३ पदकांसह दुसऱ्या तर हरियाणाचा संघ एकूण ९० पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. **** राज्यभरात काल महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र महास्वच्छता फेऱ्या काढण्यात आल्या. लातूरमध्ये सरस्वती विद्यालयातून निघालेल्या महास्वच्छता फेरीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन इटणकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. शाळांनी मूल्यशिक्षणासोबतच स्वच्छतेचं महत्त्व सांगण्याचं आवाहन त्यांनी केलं. औरंगाबाद शहरातही अशाच स्वरूपाची महारॅली काढण्यात आली. जालना इथं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महास्वच्छता अभियान प्रभात फेरीचा शुभारंभ केला. स्वच्छता अभियान घरापुरतं मर्यादीत न ठेवता त्याला व्यापक स्वरुप देण्याची गरज खोतकर यांनी व्यक्त केली. नांदेड इथं काल महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा उत्सव साजरा करण्यात आला. शहरातल्या गुजराती शाळेपासून निघालेल्या स्वच्छता फेरीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. **** धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी आज धर्माबाद ते नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते मनमाड दरम्यान ही गाडी निर्धारित वेळेनुसार धावणार आहे. मनमाडहून धर्माबादकडे येणारी गाडी चार तास दहा मिनीटं उशीरा धावत असल्यामुळे, ती नांदेड ते धर्माबाद दरम्यान रद्द करावी लागत असल्याचं, दक्षिण मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं सांगितलं आहे. ***** ***
0 notes
ajitnehrano0haryana · 6 years
Link
via AcchiNews.com अच्छी न्यूज़ डॉट कॉम
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 September 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि. ****  स्वच्छता ही सेवा या अभियानाला आजपासून देशभरात सुरूवात  गणपती मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणारा डीजे लावल्याबद्दल लातूर इथं गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल; डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास उच्च न्यायालयाची बंदी कायम  जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निर्मलदादा ग्यानाणी यांचं निधन आणि  ‘अशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत प्रारंभ **** स्वच्छता ही सेवा या देशव्याूपी अभियानाचा आजपासून शुभारंभ होत आहे. पंतप्रधान नरेन्द्रद मोदी नवी दिल्लीात दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून या पंधरा दिवसाच्या अभियानाचं उदघाटन करतील. दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाचा उद्देश्यन राष्ट्रशपिता महात्मा गांधी याचं स्व च्छ भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे आणि लोक चळवळीला प्रोत्साहन देणं हा आहे. पंतप्रधान मोदी देशातल्या अठरा ठिकाणच्या लोकांशी यावेळी चर्चा करणार आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थी, सैनिक, आध्यायत्मिक नेते, दुग्धथ आणि कृषी सहकार संघांचे सदस्य, पत्रकार, स्थानिक प्रशासनातले अधिकारी, रेल्वे कर्मचारी स्वसयं-सहायता गट आदींचा समावेश आहे. तत्पूर्वी, काल आपल्या ट्विटरवरच्या व्हिडीओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी ही चळवळ, महात्माो गांधी यांना श्रद्धांजलि अर्पित करण्याचं योग्य माध्यम असल्याचं सांगितलं. लोकांनी या चळवळीत सहभागी होऊन ‘स्वरच्छ भारता’साठीच्या प्रयत्नांना मजबूत करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या अभियानानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. **** कुष्ठ रुग्णांच्या पुनर्वसनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं, केंद्र तसंच राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी केले आहेत. या रुग्णांना आरक्षण तसंच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांना अपंग प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कुष्ठरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकार पुरेशी पावलं उचलत नसल्याची तक्रार एका याचिकेतून करण्यात आली आहे, या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं काल हे निर्देश दिले. पूर्णपणे बरा होणाऱ्या या आजाराच्या निर्मूलनासंदर्भात उदासीन दृष्टीकोनाबद्दल, न्यायालयानं नापसंती व्यक्त केली. **** अंध व्यक्तींना मतदानाचा हक्क स्वतंत्रपणे बजावता यावा यासाठी ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत, नॅब या राष्ट्रीय दृष्टीहीन संघटनेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा, असं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. नॅबच्या वतीनं काल मुंबईत आयोजित ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. दृष्टिहीन व्यक्तींना डिजिटल इंडिया अंतर्गत रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी, नॅबनं पुढाकार घ्यावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली. **** देशभरात काल हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध साहित्यिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राजभाषा कीर्ती आणि गौरव पुरस्कार प्रदान केले. इंग्रजीच्या प्रभावातून दूर होऊन, राजभाषा हिंदीला प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं. शासकीय कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी इंग्रजीचा अट्टहास सोडून, जनसामान्यांच्या भाषेत संवाद साधावा, असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावेळी केलेल्या भाषणात, हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असल्याचं नमूद केलं. **** लातूर इथं गणपती आगमनाच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणारा डीजे लावल्याबद्दल राजा गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉल्बी, अन्य साहित्य आणि टेम्पो असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं. कोल्हापूर इथंही आगमनावेळी सार्वजनिक ध्वनिप्रदूषण कायद्याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही मंडळांविरूद्ध कारवाई करण्यात आली. यातून डॉल्बी सिस्टीम, ट्रॅक्टर, ट्रॉली असा सुमारे ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसंच विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १० लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला आहे. ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं न्यायालया��ं म्हटलं आहे. मात्र याविषयी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद इथल्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. येत्या २१ सप्टेंबरपर्यंत नायडू यांना अटक करून, न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश, न्यायालयानं पोलिस प्रशासनाला दिले आहेत. सुमारे आठ वर्षांपूर्वी २०१० मध्ये आंध्रप्रदेश विधानसभेतले विरोधी पक्षनेते असलेले नायडू यांनी, महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्रप्रदेश सीमेवर नांदेड जिल्ह्यातल्या बाभळी बंधाऱ्यावर आंदोलन केल्याप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. **** केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सहकार चळवळ संपवून मुठभर भांडवलशहांना मोठं करायच आहे. असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं केला. रेणा सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन २५०० रुपये ऊस दर दिल्याबद्दल कारखान्याचे संस्थापक दिलीपराव देशमुख यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सोयाबीन, तूर, कापूस आणि दुधाला योग्य भाव मिळत नाही असं सांगून शेतकऱ्यांना संपावर जाण्यास भाग पाडणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे असं पाटील यांनी पुढं नमूद केलं **** केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या नऊ आणि २२ तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांची नोंदणी, आरोग्य तपासणी, आणि विविध चाचण्या केल्या जात आहेत. या योजनेच्या लाभार्थी शितल देशमुख आपला अनुभव सांगतांना म्हणाल्या --- माझ नाव शितल सुदीप देशमुख. राहणार पोहनेर. आठ आठवड्याच्यानंतर मी आशा ताईकडे गेले. त्यांनी मला हॉस्पीटल मध्ये आणून माझं रजिस्ट्रशन केले. व मला सर्व माहिती सांगितली. प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला चेकींग केल जात. सिस्टर आणि डॉक्टर स्वतः चेक करतात, गोळ्या औषध देतात. एच.बी.चेकींग, वजन हे सर्व चेकिंग करतात. रोज चौरस आहारा बद्दल माहिती सांगितली जाते. त्यामध्ये पालेभाज्या, कडधान्य खायला सांगितलं जात. रक्त वाढवण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. डिलेव्हरी बद्दल माहिती सांगितली जाते. **** उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना कार्यालयातल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी काल निलंबित करण्यात आलं. महिलेनं तक्रार नोंदवल्यानंतर जगताप यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर जगताप यांना अटक करण्यात आली. न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्यामुळे शासनानं त्यांना निलंबित केलं आहे. **** जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निर्मलदादा ठाकुरदास ग्यानाणी यांचं काल रात्री औरंगाबाद इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. शहरातल्या मुकुल मंदिर शाळेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. कराची इथं जन्मलेले निर्मलदादा फाळणीच्या काळात भारतात स्थलांतरीत झाले. १९७१ मध्ये स्काउट गाइडच्या चळवळीनिमित्त ते मराठवाड्यात आले. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. त्यांना गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा स्काउट जीवन गौरव आणि भारतीय शिक्षण मंडळ मुंबई यांच्या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आज सकाळी ८ ते ९ या वेळेत त्यांच पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुकुल मंदिर शाळेच्या आवारात ठेवण्यात येणार आहे. त्यांनी मरणोत्तर देहदान केलं आहे. **** ‘अशिया चषक अजिंक्यपद या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत प्रारंभ होत आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात आज उदघाटनाचा सामना होईल. भारताचा पहिला सामना येत्या मंगळवारी हाँगकाँगसोबत होणार आहे. **** प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेतंर्गत यावर्षी ठिबक आणि तुषार सिंचनासाठी नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना १९ कोटी ५४ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्याचा लाभ सात हजार शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असं नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी म्हटल आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. **** नाशिक- मुंबई रेल्वे मार्गावर काल कसाराजवळ, रेल्वेची रुळ देखभाल दुरुस्ती गाडी घसरल्यामुळे, या मार्गावरची वाहतुक विस्कळीत झाली होती. यामुळे जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस मनमाडपर्यंतच गेली तर तपोवन एक्सप्रेस पुणे मार्ग नांदेडला आली. दरम्यान, धर्माबाद – मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे. तर हैद्राबाद रेल्वे स्थानक इथं सिग्नल दुरूस्तीच्या कामानिमित्त ट्रफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे आज पूर्णा-हैद्राबाद, हैद्राबाद-औरंगाबाद आणि हैद्राबाद – परभणी या प्रवाशी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date- 04 May 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ४ मे २०१७ सकाळी ६.५० ****
• हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी करणं गुन्हा ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • शेतकऱ्यांकडच्या उर्वरीत तुरीच्या खरेदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा • मुंबईचा आयकर आयुक्त आणि नांदेडच्या वैद्यकीय अधीक्षकाला लाच घेतांना अटक आणि • लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पाऊस **** हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी करणं गुन्हा ठरणार असून त्यासाठी राज्य सरकार कायदा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत गट शेतीच्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात गट शेतीला चालना मिळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणाला या बैठकीत अंतिम स्वरुप देण्यात आलं. या धोरणाचा प्रस्ताव मंत्��ीमंडळासमोर मांडण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. ऊसाचं क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी व्याज सवलत योजनेलाही बैठकीत अंतिम स्वरुप देण्यात आलं. गटशेतीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीला अनेक ज्येष्ठ मंत्री आणि सनदी अधिकारी उपस्थित होते. **** शेतकऱ्यांकडची उर्वरीत तुरीची खरेदी राज्य सरकार का करत नाही, अशी विचारणा काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं केली. शेतकऱ्यांकडून सर्व तूर खरेदी करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका, अन्नदाता शेतकरी संघटनेनं दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान काल ही विचारणा उच्च न्यायालयानं केली. देशात एकंदरीत किती तुरीची आवश्यकता आहे, त्यापैकी किती तुरीचं उत्पादन झालं आहे, तूट भरून काढण्यासाठी शासन तूर आयात करणार आहे का, मग तूर आयात करण्या ऐवजी शेतकऱ्यांची तूर सरकार का खरेदी करंत नाही, असंही न्यायालयानं मुख्य सरकारी विधीज्ञांना काल विचारलं. या याचिकेची सुनावणी आजही होणार आहे. **** दरम्यान, जालना जिल्ह्यातल्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर तुरीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्याचे निर्देश, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातली तूर शेतकऱ्यांच्या नावांवर विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे निर्देश लोणीकर यांनी यावेळी दिले. **** सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून साकारत असून या पुस्तकांच्या गावाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कथा, कादंबरी, बालसाहित्य, स्त्रीसाहित्य, संतसाहित्य, चरित्रं अशा एकूण पंचवीस साहित्यप्रकारांची पंधरा हजारांहून जास्त पुस्तकं या गावात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातली घरं, मंदिरं, शाळा, लॉजेस अशा पंचवीस ठिकाणी ही पुस्तकं ठेवलेली आहेत. राज्यशासनाच्या आवाहनाला या गावानं दिलेल्या प्रतिसादामुळे, पुस्तकांचं गाव, ही शासनाची कल्पना प्रत्यक्षात आली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी साहित्य महोत्सवासह इतर अनेक साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, यांनी दिली आहे. **** बँकांच्या बुडीत कर्जविषयक अध्यादेशाला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. सध्या बँकांचं थकित कर्ज सहा लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक असून या कर्जाच्या वसुलीसाठी बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असल्याचं  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. **** ६४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते ‘के विश्वनाथ’ यांना चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च सन्मान ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अभिनेता अक्षयकुमार याला ‘रुस्तुम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तर नीरजा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासह अनेक मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. ‘कासव’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचं ‘सुवर्णकमळ’ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांना तर ‘दशक्रिया’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचं ‘रजत कमळ’ प्रदान करण्यात आलं. ‘व्हँटिलेटर’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश म्हापुसकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पुनर्ध्वनिमुद्रण, तसंच सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचे पुरस्कारही व्हँटिलेटर या चित्रपटाला प्रदान करण्यात आले. दशक्रिया चित्रपटाच्या संहिता लेखनासाठी संजय पाटील यांना, मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, ‘सायकल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभुषा पुरस्कार, ‘आबा ऐकताय ना’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मुंबईचे आयकर आयुक्त बी. बी. राजेंद्र प्रसाद, एस्सार उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप मित्तल आणि अन्य चार अधिकाऱ्यांना, एका मोठ्या उद्योग समुहा कडून, १९ लाख ३४ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं, काल अटक केली. आयकर आयुक्त राजेंद्र प्रसाद यानं अपीलात एका खासगी विश्वस्त निधीच्या बाजूने निकाल देण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर साहेबराव लोमटे यांच्यासह तीन जणांना अडीच हजार रुपयांची लाच घेताना काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. औषधौपचाराच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. गुन्ह्यातल्या तपासामध्ये आरोपीला मदत करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रेल्वे सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल मोगल सिफल बेग बाबू बेग याला काल औरंगाबाद रेल्वे स्थानक परीसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. **** राज्यात काल काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह तासभर अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे अनेक झाडं मोडून पडली. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. सातारा जिल्ह्यातल्या कराड आणि पाटण तालुक्यातही जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. लातूर,औसा परिसरातही रिमझीम पाऊस झाला. उस्मानाबादसह जळकोट, नळदुर्ग परीसर तसंच उमरगा, तुळजापूर आणि भूम तालुक्यात काल मेघगर्जनेसह मोठा पाऊस झाला. उमरगा तालुक्यात येणेगुर इथं अंगावर वीज पडल्यामुळे एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. या अवकाळी पावसामुळे, जिल्ह्यातल्या आंबा, द्रांक्ष तसंच मका या पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मराठवाड्यातल्या काही भागात गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता मुंबईतल्या प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्रानं वर्तवली आहे. **** सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' किताब मिळवलेल्या जळगावच्या विजय चौधरी यांना विशेष बाब म्हणून राज्य पोलिस दलात उपअधिक्षक या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौधरी यांना काल नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. **** डिजिटल इंडिया अंतर्गत ई- फेरफार प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात सुरू असून, या योजने अंतर्गत महाराष्ट्र दिनापासून संगणकीकृत सात बाराचं चावडी वाचन केलं जात आहे. त्यानुसार, नागरिकांनी येत्या पंधरा मे पर्यंत आपला सात बारा अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन बीड जिल्हा प्रशासनानं केलं आहे. **** मुंबई- लातूर एक्सप्रेस बिदरपर्यंत विस्तारीत करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आज उस्मानाबाद जिल्हा बंद पाळण्याचा निर्णय विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत काल घेण्यात आला. याच मागणीसाठी आज उदगीर इथंही बंद पाळण्यात येणार असल्याचं  ��ेल्वे संघर्ष समितीनं सांगितलं आहे. ****
0 notes