#आयडिया
Explore tagged Tumblr posts
Text
ll वानप्रस्थ ll : २
"अहो, ब्रेकफास्टसाठी या" अशी शुभदाची हाक ऐकून किचनमधे येऊन डायनिंगटेबलपाशी बसत अनंत म्हणाला, "सकाळी रोजच्याच वेळेवर चहा केला म्हणून तक्रार केलीस;--पण तूं सुद्धा रोजच्या सुमारासच ब्रेकफास्ट बनवलास की!" "हो, ना!" शुभदा काहीशी नाखुषीच्या स्वरात म्हणाली,"चहा पिऊन झाल्यावर नकळत नेहमींच्या संवयीनुसार ब्रेकफास्ट तयार करण्याकडेच वळले! तुम्ही म्हणतां तेच खरं! गेली कांही वर्षं हाडीमांसी खिळलेल्या संवयी सहजासहजी वा आपोआप बदलणार नाहींत!प्रयत्नपूर्वक बदलाव्या लागतील!!"
"मग आतां एक करुं या कां? हे पोहे थोडे गरम करून डब्यांत भर. ते सोबत घेऊन आपण मॉर्निंग वाॅकसाठी जवळच्या बागेत जाऊंया? त्यानिमित्त तुझंही थोडं चालणं होईल. त्यानंतर मग आपण बागेमधेच बसून पोहे खाऊ आणि परत येतांना चौकांतल्या टपरीवर एक चहा दोघांत घेऊं! "हो,हो!" शुभदा उत्साहानं म्हणाली, "आतां रोज सकाळी चहा झाला की थोडं चालायला बाहेर पडुंयाच! परत आल्यावर मी नाश्त्यासाठी काहीतरी तयार करीपर्यंत तुम्ही तुमचा योगाभ्यास आटपा!"
"ठरलं तर मग! उद्यांपासून पहिला चहा झाला की शक्यतों रोज मॉर्निंग वाॅकला जायचं! मात्र परतल्यावर नाश्त्यासाठी रोज मी काहीतरी बनवीन! अग मी रिटायर झाल्यामुळे तुलाही थोडा आराम मिळायला हवा!" शुभदा हंसतच पण निश्चयी आवाजात म्हणाली, " नाही हं! तुम्ही माझ्या कीचनमधे चहाखेरीज इतर कसलीही लुडबूड अजिबात करायची नाही! रोज घड्याळामागे धावण्याची तारांबळ थांबणं हा माझ्यासाठी मोठा आरामच आहे! तेव्हां कीचनमधे लुडबूड करण्यापेक्षा तुमच्या हातून राहिलेल्या कामांकडे बघा!" अनंत काहीसा ��िचारात पडल्याचं बघून शुभदा पुढे म्हणाली, "उदाहरणार्थ हल्ली नातेवाईक, मित्र वा शेजाऱ्यांकडे आपलं जाणं-येणं खुप कमी झालं आहे!"
"गुड आयडिया,शुभा! फॅमिली भिशीमुळे तुम्ही नियमित भेंटतां;-- पण मी पमाताईला खुप दिवसांत भेटलो नाहीं! आज संध्याकाळी तिच्याकडेच जाऊयां!"
२१ जुलै २०२२
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ११ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनला आजपासून प्रारंभ-देशभरातल्या ८६ हजाराहून अधिक संघांचा सहभाग • आगामी शैक्षणिक वर्षापासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा, फक्त संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्यात येणार • राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरुद्ध विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव • मस्साजोगच्या माजी सरपंच हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद-एसटी बसची जाळपोळ आणि • बांग्लादेशातील हिंदू अत्याचारांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचं राज्यभरात आंदोलन
सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनला आजपासून प्रारंभ होत आहे. देशभरात ५१ केंद्रांवर होत असलेल्या या स्पर्धेत ८६ हजाराहून अधिक संघ सहभागी होत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्याचं उद्घाटन करतील. यात महाराष्ट्राल्या मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या केंद्रांचाही समावेश आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यंदाच्या हॅकेथॉनमध्ये संस्था स्तरावर दीडशे टक्के वाढ नोंदवली गेली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या जी एन सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या प्राध्यापक सीमा रवींद्र बाजी यांनी या स्पर्धेबाबत माहिती दिली… ‘‘अतिशय चांगल्या प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे. आणि या स्पर्धेमधनं अतिशय छान छान उत्कृष्ट आयडिया प्रेझेंट झालेले आहेत आणि या सर्वांमुळे विद्यार्थ्यांना छान फायदा झालेला आहे तो असा की आज जगामध्ये ज्या समस्या आहेत, त्यांचं निराकरण करण्यासाठी एक सक्षम विचार करायचा असतो. र्त्यांची फिजीबीलीटी चेक करायची असते. विद्यार्थ्यांना या स्पर्धेमुळे ही फिजीबीलीटी चेक करण्यासाठी लागणारं जे नॉलेज आहे जो कॉन्फिडन्स आहे, तो या स्पर्धेमुळे मुलांना मिळतो.’’ सीमा बाजी यांच्यासह इतर तज्ज्ञांनी या स्पर्धेबाबत ��िलेली माहिती, आमच्या केंद्रावरून आज सकाळी दहा वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकता येणार आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा, फक्त सी बी टी अर्थात संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षेसाठी निवडलेले विषयच या परीक्षेत घेण्याचं बंधन असणार नाही. पूर्वी ३७ विषयांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या, आता ६३ विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून, विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त पाच विषयांची निवड करता येईल. पूर्वी विद्यार्थ्यांना ६ विषयांची निवड करता येत होती.
सायबर गुन्हेगारी आणि हवामान बदल ही मानवाधिकारासमोरची नवी आव्हानं असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुंबई राजभवनात राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या २०२४ स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिनानिमित्त विधीज्ञ अभय टाकसाळ यांचं व्याख्यान झालं. प्रत्येक माणसाने अन्य माणसांच्या हक्कांची जोपासना करणं, या कर्तव्याबद्दलची जाणीव वृद्धिंगत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलतांना, मानवी हक्कांच्या जोपासनेच्या कर्तव्याचं पालन आ��ल्या घरापासून करण्याचं आवाहन केलं.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित विरोधी आघाडीने अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देतांना, विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारुन सभापती पक्षपात करत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, सभागृहाच्या मर्यादेचं पालन केलं जावं, तसंच जनतेच्या मताचा आदर राखून काम करण्याचं आवाहन केलं.
राज्य विधानसभा निवडणुकीत व्हिव्हीपॅट पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं तंतोतंत पालन केल्याचं, निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीवेळी २८८ मतदारसंघातल्या १ हजार ४४० व्हिव्हीपॅट युनिटची मोजणी करण्यात आली. यावेळी व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्रातली एकूण मतं, यामध्ये कुठलीही तफावत आढळून आली नाही, असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट क���ण्यात आलं आहे.
दरम्यान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर बंदी घालून आगामी सगळ्या निवडणुक��� मतपत्रिकेद्वारे घेण्याच्या मागणीसाठी काल रत्नागिरी इथून काँग्रेस पक्षानं स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी इथं काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत इव्हीएमची मिरवणूक काढण्यात आली. ईव्हीएमला विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांच्या भूमिकेवर यावेळी टीका करण्यात आली.
माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचं काल बेंगळुरू इथं त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्रिमडळात परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलेले कृष्णा यांनी २००४ ते २००८ दरम्यान महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
केज इथं घडलेल्या हत्या प्रकरणाचे काल तीव्र पडसाद उमटले. संबंधित मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाने एसटीची एक बस पेटवून दिली, तर दुसऱ्या बसवर दगडफेक केली. या दुर्घटनेत कोणीही प्रवासी जखमी झाला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. केज तालुक्यातल्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाल्याचं परवा निदर्शनास आलं होतं, या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी प्रत्येकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केलं आहे.
बांग्लादेशातल्या हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारांच्या निषेधार्थ काल जागतिक मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीनं राज्यभरात मोर्चे काढून निदर्शनं करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हिंदू संघटनांच्या सदस्यांसह भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. नांदेड शहरासह जिल्ह्यात किनवट, मुखेडसह अनेक तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. जालना इथंही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्ह्याधिकारी डॉ. श्रीकृष्ण पां��ाळ यांना तर जिल्ह्यात सर्वच तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. परभ���ी इथंही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सकल हिंदूचा चांगला प्रतिसाद मिळाला. हिंगोलीतही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बांगलादेशचा ध्वज आणि मोहम्मद युनूस यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर यांच्यासह नागरिक आणि विविध पक्षातले पदाधिकारी उपस्थित होते. लातूर शहरात गांधी चौक इथं करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात, विद्यार्थी, महिलांसहित सर्वच वयोगटातले नागरिक आणि अनेक हिंदू संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यातही हिंदू समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. अंबाजोगाई इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करून, राष्ट्रपतींच्या नावे असलेलं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. धाराशिव इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शहरातल्या विविध सामाजिक संघटना तसंच सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
परभणी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरच्या संविधान प्रतिमेची काचेची पेटी काल एका माथेफिरूने फोडल्याचा प्रकार निदर्शनास आला. सदर व्यक्तीस अटक करण्यात आली असून, नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे… ‘‘त्या इसमाला आम्ही तात्काळ अटक केली आहे. तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की, आपण कुठलीही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये. सदर ठिकाणी मी स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.’’
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात काल सकाळी अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. अंबासाखर कारखान्याजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. कारमधील सर्व प्रवासी लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातले रहिवासी असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत काल लातूर इथल्या वसंतराव काळे होमिओपॅथीक महाविद्यालय आणि रुग्णालयात आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते नि:क्षय वाहनास हिरवा झेंडा दाखवून क्षयरुग्ण शोध मोहीमेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी क्षयरोगाची लक्षणे, निदान आणि उपचार याबाबत पथनाट्य सादर केलं.
थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी लातूर महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत काल झोन ए मध्ये दोन गाळे सील करण्यात आले, तर काही नळ जोडण्या ख��डित करण्यात आल्या. बी झोनमध्ये एका मालमत्तेवर कारवाई करताच संबंधिताने दोन लाख ८१ हजार २९ रुपयांचा धनादेश जमा केला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम सुरू केली. पाच मालमत्तांवर काल कारवाई करण्यात आली, यापैकी तीन मालमत्ता धारकांनी तत्काळ थकबाकीचे धनादेश जमा केल्याचं वृत्त आहे.
0 notes
Text
जब हम पहाड़ों में थे, तब तुमने यह फ़िल्म देखने के लिए कहा था। तुम्हारे ही कहने पर अप्रैल में ‘परफ़ेक्ट डेज़’ देखी थी और वह इतनी मेरे हिसाब की फ़िल्म थी कि उसके बाद कई दिनों तक कुछ देखने का जी नहीं किया। ‘परफ़ेक्ट डेज़’ के धीमेपन में जीने का सुख इतना गाढ़ा था कि उसके बाद कुछ अच्छा भी देखती, तो उसकी नरमी पर खरोंच पड़ती। तो एमएलटीआर और उस्ताद मेंहदी हसन का कुछ पुराना गाया सुनती रह गई, कुछ ट्रैवल शोज़ देखती रह गई।
इस बीच कोई फ़िल्म या कोई सीरीज़ नहीं देखी, एकाध किसी सीरीज़ के टुकड़े आँखों से गुज़रे भी तो आँखों को चोट लगी। मुझे नहीं पता ‘पंचायत’ क्या है, हल्ला सुना काफ़ी। हालाँकि पीछे कई दिनों से तुम्हारी यह रेकमन्डेशन मेरे भीतर गूँज रही थी, फिर भी मैं टालती रही।
अब बारिश के दिन आने को हैं, तो मैंने थोड़ी हिम्मत जुटाई। देख गई आज यह सादी-सी दिल को भली लगने वाली फ़िल्म।यूँ तो फ़िल्म तेज़ चल रही थी, लेकिन अंदर ही अंदर बहुत धीमी भी। जैसे आप कार तेज़ ड्राइव कर रहे हों और अंदर फ़रीदा ख़ानम की आवाज़ में ग़ज़ल चल रही हो - मोहब्बत करने वाले कम न होंगे, तेरी महफ़िल में लेकिन हम न होंगे..
तो ये चौबीस बरस का छोकरा, जो चालीस बरस की औरत के प्रेम में पड़ गया है और सचमुच प्रेम में पड़ गया है, यह समझता क्या है ख़ुद को, इस कमबख़्त को ही सारी आशिक़ी आती है ? इसकी निर्दोषता पर थोड़ा रोना आया, इतने प्योर एक्सप्रेशन्स थे, अभिनय जैसा नहीं लग रहा था, सच्चा लग रहा था।
अक्सर मैं सोचती हूँ कि कल को इस दुनिया में ब्लैकहोल के भी सारे भेद खुल जाएँगे लेकिन फिर भी कोई साइंसदान या फ़लसफ़ी या नज़्म-निगार प्रेम की टोह न ले पाएगा। प्रेम कितना विचित्र होता है, हम बिल्कुल नहीं समझ पाते कि कब प्रेम हो गया और वह घड़ी-वड़ी को बंद करके एकदम से हो जाता है ! प्रेम कैसे बिल्कुल जादू की तरह आता है और हर एक शै को अपने वश में कर लेता है, आप एकदम अवश हो जाते हैं। क्या इस दुनिया में कोई ऐसा हो सकता है, जिसे कभी प्रेम ने न छुआ हो ? मेरे ख़याल से यह सबसे अधिक लोकतांत्रिक मामला है, और दुर्लभ भी ! आता तो सब तक है, पर ठहरता नहीं, उड़ जाता है। जैसे इत्र की शीशी खुलने पर कुछ देर तक इत्र महकता रहता है, फिर उड़ जाता है।
कितना तरल है यह लड़का हेज़ और ��ितनी ठोस स्त्री है सोल, कितना हवा में उड़ने जैसा है इनका प्यार, मगर हवा में उड़ाने जैसा बिलकुल नहीं। दुनियावी ज़िम्मेदारियों के बीच प्रेम कभी आड़े नहीं आता, उल्टे उन्हें थोड़ा आसान बनाता है। हालात की वजह से अलग होना ही पड़ जाए तो सबसे सुंदर होता है वह अलगाव, जिसमें दोनों प्रेमी एक दूसरे को प्रेम करते हों, अलग होने के बाद भी। और फिर पता चलता है कि अलग तो कभी हुए ही नहीं थे, हो ही नहीं सकते थे।
इस फ़िल्म को देखते हुए बहुत सारी उन बातों पर लौटती रही, जो पीछे के दिनों में हमने कभी वीरान जगहों पर, तो कभी जंगल के बीचोंबीच, तो कभी नदी किनारे बैठ कर कीं। इस फ़िल्म को देखते हुए मैं उस नदी तक बार-बार लौटती रही, जिसका पानी अब खारा हो चुका है।
कितना कुछ तुमसे कहती हूँ, कविता में लिख जाती हूँ पर जैसे ही कोई नाज़ुक-सी चीज़ छू जाती है, जी करता है प्रेम पर अपना सब लिखा-पढ़ा ख़ारिज कर दूँ और ज़ोर से चिल्ला कर कहूँ - मैं कुछ नहीं जानती इस बारे में ! यह मेरी कल्पना से ज़्यादा जादुई है, बड़ा है, सुंदर है, घातक है, मारक है !
एक बार मुझसे किसी ने कहा था कि प्रेम करना कोई पुण्य करना नहीं है, जो किया ही जाए। मुझे लगता है पुण्य करना भले न हो, किसी पुण्य का फल ज़रूर होता होगा। वर्ना इतनी क़ीमती, इतनी बड़ी शै कैसे किसी पर मेहरबान हो जाती ?
लो ! तुम्हें पाती लिखते-लिखते बारिश भी शुरू हो गई ! क्या बारिशें सचमुच प्रेमियों की एक हिचकी का जवाब होती हैं ?
_____________________
मनु को पत्र
‘द आयडिया ऑफ़ यू’ के बारे में
0 notes
Text
'२०१९ च्या राष्ट्रपती राजवटीची आयडिया शरद पवारांनीच दिली'
https://bharatlive.news/?p=157761 '२०१९ च्या राष्ट्रपती राजवटीची आयडिया शरद पवारांनीच दिली'
मुंबई; ...
0 notes
Text
बिना त्याग किए सफलता हासिल नहीं होतीःडा. सचिन गुप्ता
संस्कृति दीक्षा आरंभ-2023
संस्कृति विश्वविद्यालय में नवीन सत्र के शुभारंभ पर आयोजित दो दिवसीय समारोह ‘दीक्षारंभ-23’ के पहले दिन विश्वविद्यालय के कुलाधिपति डा. सचिन गुप्ता ने विश्वविद्यालय के नवीन सत्र के विद्यार्थियों में ऊर्जा का संचार करते हुए कहा कि बिना त्याग किए सफलता हासिल नहीं हो सकती। सफलता की परिभाषा लक्ष्य के आधार पर अलग-अलग हो सकती है लेकिन त्याग किए बिना इसको हासिल करना कठिन है। डा. सचिन गुप्ता ने संस्कृति विवि में प्रवेश लेने वाले विद्यार्थियों का स्वागत करते हुए कहा कि तय कर लें आप नौकरी की इच्छा रखने वाले बनना चाहते हैं या फिर नौकरी देने वाले उद्यमी। संस्कृति विवि ने दोनों तरह के विद्यार्थियों की इच्छा पूरी करने के लिए सभी साधन जुटाए हैं। उन्होंने सफलता के लिए मूल मंत्र बताते हुए कहा सबसे पहले आपमें अपने लक्ष्य के लिए प्रतिबद्धता जरूरी है। उन्होंने कहा आपको कोई आयडिया आए तो उसे उसी समय नोट करें और फिर उस आयडिया को कैसे लागू करें उसका प्रयास करना चाहिए। उन्होंने कहा हारने से नहीं डरना चाहिए। निर्णय किसी के भी गलत हो सकते हैं। उन्होंने कई सफल लोगों के उदाहरण देते हुए कहा कि सफल वही हुए हैं जिन्होंने प्रतिबद्धता के साथ कोशिश करना जारी रखा है। उन्होंने विद्यार्थियों से कहा कि विवि में आपके लिए परिपूर्ण लाइब्रेरी है, रोजाना एक घंटे लाइब्रेरी जाने और पढ़ने की आदत डालें। खेलने और मनोरंजन की सभी सुविधाएं मौजूद हैं। डा. गुप्ता ने कहा कि हमारे लक्ष्य बड़े होने चाहिए। आप क्या बनना चाहते हैं उसकी प्लानिंग आज करें। मन में निराशा का भाव कभी न लाएं। आप वह उपलब्धि हासिल करें जिससे आपके माता-पिता और विश्वविद्यालय आपके ऊपर गर्व कर सके। इससे पूर्व विवि की सीईओ श्रीमती मीनाक्षी शर्मा ने बहुत सहज शब्दों में विद्यार्थियों के प्रति आत्मीयता के साथ अनेक सवाल पूछे और उनकी जिज्ञासाएं शांत कीं। उन्होंने कहा कि संस्कृति विश्वविद्यालय उच्च शिक्षा का एक ऐसा संस्थान है जहां न केवल संस्कार, वरन पारिवारिक मूल्यों के प्रति भी संवेदनशीलता बरती जाती है। उन्होंने कहा कि विद्यार्थियों को ज्ञान प्राप्त करने के लिए अहंकार को त्यागना चाहिए, झुकना सीखना चाहिए। विश्वविद्यालय के कुलपति डा. एमबी चेट्टी ने नए प्रवेश लेने वाले विद्यार्थियों का स्वागत करते हुए विश्वविद्यालय की सोच और विश्वविद्यालय के बारे में विद्यार्थियों को विस्तार से बताया। विश्वविद्यालय के डाइरेक्टर जनरल डा. जेपी शर्मा ने संस्कारों के महत्व की बात की। उन्होंने कहा कि अक्सर लक्ष्य प्राप्ति में इतनी बाधाएं नहीं होतीं जितनी हम स्वयं खड़ी कर लेते हैं। उन्होंने कहा कि हमारा मस्तिष्क ही हमारी राह तय करता है। दौड़ पैरों से नहीं हौसले से जीती जाती है। एश्वर्य अवस्थी ने परीक्षा प्रणाली की, स्टूडेंट वेलफेयर के डीन डा. डीएस तौमर ने अनुशासन, समयबद्धता और विवि ड्रेस की, स्कूल आफ एग्रीकल्चर के डीन डा.केके सिंह ने छात्रवृत्तियों की, एनसी��ी के इंचार्ज विपिन सोलंकी ने एनसीसी की जानकारी विद्यार्थियों को दी। डा. रेनू गुप्ता ने क्लास में अटेंडेंस से जुड़े नीयमों की जानकारी दी। इस मौके पर कल्चरल हेड डा. दुर्गेश वाधवा के निर्देशन में विद्यार्थियों ने सांस्कृति कार्यक्रमों की प्रस्तुति दी। कार्यक्रम का संचालन अनुजा गुप्ता ने किया।
Read the full article
0 notes
Text
Zero investment high profit business ideas: मशीन शिवाय मागणीनुसार प्रिंट सुरू करा, दररोज ₹ 1000 कमवा.
झिरो इन्व्हेस्टमेंट हाय प्रॉफिट बिझनेस आयडिया Zero investment high profit business ideas : तुम्हालाही टी-शर्ट, कॉफी मग, पिलो कव्हर्स आणि अशा सर्व गोष्टींवर कस्टमाइज प्रिंटिंगचे काम करायचे असेल पण आत्मविश्वास निर्माण होत नसेल, तर हरकत नाही. तुम्ही मशीन न घेता तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही दररोज किमान ₹ 1000 कमवू शकता आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल, तेव्हा तुमचे मशीन इंस्टॉल करा. Zero…
View On WordPress
#Business#Government Scheme#maharashtra#small business idea#Startup#Zero investment high profit business ideas
0 notes
Text
पैसे बचाने के 10 तरीके |10 Ways to Save Money in Hindi
अगर आप को जीवन में सफल होना है और अपने मनपसंद तरीकें से जीना है। तो आप के पास पैसा होना बेहद जरूरी है। वैसे तो सैलरी के रुप में पैसे हर महिने आते है। लेकिन यदि ध्यान नहीं दिया जाय तो सारा पैसा खर्च हो जाता है। इससे बचने के लिए आपको कुछ मनी सेवि��ग टिप्स सीखने की आवश्यकता है। ताकि आप हर महीने कुछ पैसा बचा पाये। मनी सेविंग आयडिया सिखकर आप मनीको सेव्ह कर सकते है। जब आपके पास पैसा होता है तब आपका…
View On WordPress
0 notes
Text
अरे वाह! तुमचे केस तुम्हाला महिन्याला 25,000 रुपये कमवून देऊ शकतात
नवी दिल्ली | स्त्रीचं सौंदर्य म्हणजे तिचे सुंदर लांबसडक केस (Hair) होय. केसांमुळं स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते. अनेक स्त्रींया त्यांच्या केसांची काळजी अगदी प्राणपणाने घेत असतात. काहींना मोठे केस नको वाटतात, काहींना लहान केस आवडतात,मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? की याच केसाने आपल्याला पैसे देखील मिळू शकतात. हल्ली अनेक वेगवेगळ्या बिझनेस (business) आयडिया येत आहेत. घरीबसल्या तुम्ही पैसे कमवायचा विचार करत असाल तर तुमचे केस तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतात. तुम्ही कधी विचार केलाय का तुम्ही जेव्हा पार्लरला केस कट करण्यासाठी जाता तेव्हा हे पार्लरवाले तुमचे हे केस विकून कसे आणि किती पैसे कमावतात. कट केलेल्या केसांना आपल्याकडं कचरा मानला जातो. हाच केसांचा कचरा तुम्हाला बक्कळ कमाई करुन देऊ शकतो. या केसांपासून अनेक वस्तू तयार होतात. या केसांचा उपयोग कृषी(agriculture), वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्रात (Construction sites) देखील केला जातो. पार्लर किंवा न्हावी हे तुमचे केस बाजारात किंवा परदेशात विकतात. या कामाला केसांचा व्यवसाय म्हणतात. या केसांचा उपयोग भारत(India), चीन(Chin) आणि अमेरिकेत(America) खतं बनवण्यासाठी केला जातो. केसांपासून विविध प्रकारच्या दोऱ्या, स्टफिंग खेळणी(Stuffing toys), फर्निचर, गाद्या, काॅस्मेटिक ब्रश या गोष्टी बनवल्या जातात. यांपासून अनेक सुंदर काॅस्मेटिक्स बनवल्या जातात. बनावट मिशा, बनावट केस, भुवया, दाढी हे या केसांपासून बनवले जातात जे आपण कचरा म्हणून टाकून देतो. या व्यवसायात मिळणारा फायदा प्रंचड आहे. अनेकदा हे तुमच्या केसांच्या प्रमाणा��र अवलंबून असतं. कधी कधी खूप जास्त तर कधी खूप कमी कमाई मिळते. तरीदेखील तुमच्याकडं योग्य प्रमाणात केस असले तर तुम्ही महिन्याला आरामात 20,000 ते 25,000 कमवू शकता. महत्त्वाच्या बातम्या Read the full article
0 notes
Text
Paper Bag Startup
Paper Bag Startup… पेपर बॅगचा व्यवसाय… ©मराठी बिझनेस काही महिन्यांपासून केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक राज्यांत प्लॅस्टिक बंदी घोषित केली आहे. प्लॅस्टिक बंदी आपल्या हातातील सामान नेण्याची पिशवी ह��्दपार होत आहे. त्याला पर्याय म्हणून कागदी किंवा कापडी पिशव्या बाजारात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एक नवी आणि स्मॉल स्केल बिझनेस आयडिया तुमच्यासोबत शेअर करतो… ती म्हणजे पेपर म्हणजेच कागदी किंवा कापडी…
View On WordPress
#Paper Bag Startup#गुंतवणूक कमी आणि प्रॉफिट मार्जिन जास्त#पेपर बॅगचा व्यवसाय#प्लॅस्टिक बंदी#राज्यांत प्लॅस्टिक बंदी#स्मॉल स्केल बिझनेस आयडिया
0 notes
Text
सलमान खानची फॅन निखत जरीनला आलिया भट्टकडून शुभेच्छा, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने हिजाबवर आपले अस्पष्ट मत दिले
सलमान खानची फॅन निखत जरीनला आलिया भट्टकडून शुभेच्छा, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने हिजाबवर आपले अस्पष्ट मत दिले
वर्ल्ड चॅम्पियन बनून भारताचा गौरव करणारी निखत जरीन भलेही हैदराबादची रहिवासी असेल, पण तिला हिंदी चित्रपट पाहायला आवडतात. ती सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. तथापि, जर तिच्या बायोपिकचा विचार केला तर ती तिची भूमिका पडद्यावर जगण्यासाठी आलिया भट्टची निवड करेल. निखत जरीनने इंडियन एक्स्प्रेसशी खास संवाद साधताना आलिया भट्टची निवड करण्यामागील खास कारणही सांगितले. इतकंच नाही तर संवादादरम्यान निकत जरीननेही…
View On WordPress
#आयडिया एक्सचेंज#आलिया भट्ट#आलिया भट्ट निखत जरीन#आलिया भट्टने तिचा बायोपिक करावा अशी निखत जरीनची इच्छा आहे#इंडियन एक्सप्रेस#इंडियन एक्सप्रेस इंडिया न्यूज#इंडियन एक्सप्रेस न्यूज सर्व्हिस#एक्सप्रेस न्यूज#एक्सप्रेस वृत्तसेवा#कल्पना विनिमय#क्रीडा बातम्या#चालू घडामोडी#जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप#निखत जरीन#निखत जरीन करा. भारत#निखत जरीन बॉक्सिंग#निखत जरीन भारत#निखत जरीन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप#निखत जरीन हिजाब#निखत जरीनने आलिया भट्टला तिचा बायोपिक साकारण्याची इच्छा व्यक्त केली#बातम्या व्यक्त करा#बॉक्सिंग निखत जरीन#बॉक्सिंगमध्ये हिजाब#बॉलीवूड बायोपिक चित्रपट#भारत#भारत बातम्या#भारताच्या बातम्या#भारतीय एक्सप्रेस#भारतीय एक्सप्रेस इंडिया बातम्या#भारतीय बॉक्सर निखत जरीन
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
सत्तासंघर्षाची याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.
परदेशी गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र हे ‘फे��्हरेट डेस्टिनेशन’ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
‘जी-२०’च्या माध्यमातून जागतिक शांततेसाठी भारतानं उचललेलं पाऊल आश्वासक - संरक्षणतज्ज्ञ डॉ.विजय खरे.
आणि
बॉर्डर - गावसकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या बिनबाद २१ धावा.
****
राज्यातल्या सत्ता संघर्षाशी संबंधित याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. आज सकाळी कामकाज सुरू होताच, न्यायालयानं ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार असून, येत्या मंगळवारी २१ फेब्रुवारीपासून पाच न्यायमूर्तींच्या याच घटनापीठासमोरच या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, त्यांनी गुणवत्तेवर निर्णय घ्यावा. आमचं सरकार बहुमताचं आणि कायद्याने स्थापन झालेलं सरकार असल्याचं म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची निरोप भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं देखील कोश्यारी यांना काल निरोप देण्यात आला.
दरम्यान, राज्याचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस उद्या शपथ घेणार आहेत. बैस यांचं आज मुंबईत आगमन होणार आहे. उद्या दुपारी साडे बाराच्या सुमारास राजभवनातल्या दरबार हॉल इथं त्यांचा शपथविधी सोहळा होईल असं राजशिष्टाचार विभागानं कळवलं आहे.
****
परदेशी गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत महाराष्ट��र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर -मसिआच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. राज्य शासनानं उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत उद्योजकांचा विश्वास संपादित केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशाच्या सकल उत्पन्नात राज्याचा १५ टक्के, औद्योगिक उत्पादनात २० टक्के तर परकीय गुंतवणुकीत सुमारे ३० टक्के एवढा वाटा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न आणि त्यात राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग पूर्ण करण्यासाठी उद्योजकांचा हातभार महत्त्वाचा असल्याचं ते या��ेळी म्हणाले.
****
सुशिक्षित बेरोजगार होतकरू तरुण तरुणींना ��शस्वी उद्योजक व्यावसायिक बनवण्याकरीता इस्लामपूर फोरम यांच्या वतीने आयोजित एक्स्पो - २०२३ उपक्रम कौतुकास्पद असून अशा उपक्रमाचे अनुकरण सबंध राज्यभरात होईल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं एक्स्पो २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी देशमुख बोलत होते. या आयोजनातून अधिकाधिक तरुण तरुणी उद्योग व्यवसायाकडे वळतील असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
****
‘वसुधैव कुटूंबकम’ हे सुत्र असणाऱ्या ‘जी-२०’ आयोजनाच्या माध्यमातून जागतिक शांततेसाठी भारतानं उचललेलं आश्वासक पाऊल असल्याचं मत संरक्षणतज्ज्ञ डॉ.विजय खरे यांनी व्यक्त केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘जी-२०’ युनिर्व्हसिटी कनेक्ट - एंगेजिंग यंग मांईडस’अंतर्गत आज विशेष व्याख्यानात डॉ. खरे बोलत होते. ‘जी-२० द मल्टी डायमेन्शनल पर्सपेक्टिव्ह ऑफ सायंटिफिक अॅण्ड कल्चरल हेरिटेज’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता. सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या संचालक डॉ.ज्योती चंदीरमानी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, ‘वन अर्थ वन फॅमिली, वन फ्यूचर’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून, या परिषदेतून जागतिक प्रश्नांवर नक्कीच उत्तरे मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
या निमित्तानं प्रश्नमंजुषा, फलक बनवण्याची स्पर्धा, बिझनेस आयडिया कॉन्टेस्ट आदी स्पर्धा घेण्यात आल्या. ‘जी-२०’ बहुउद्देशिय आयामी दृष्टीकोन - शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा हा स्पर्धेकरिता मुख्य विषय होता. या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
आग्रा इथल्या किल्ल्यात यंदाची शिवजयंती साजरी करण्याला परवानगी दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेनं केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलताना, हा दिवाण-ए-आम यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, औरंगाबाद इथं भाजपच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहितीही बोराळकर यांनी यावेळी दिली.
****
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात जेपीएन फार्मा या केमिकल कंपनीत आज सकाळी झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर तीन कामगार जखमी झाले. सर्व जखमी कामगारांवर बोईसर मधल्या संजीवनी रुग्णालयात उपच���र सुरू आहेत.
****
जालना शहरात भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. उषा योगानंद पवार असं या महिलेचं नाव असून, त्या औरंगाबाद मधल्या पैठणगेट भागातल्या रहिवासी आहेत. घरगुती कार्यक्रमासाठी त्या कुटुंबियांसह जालना इथं गेल्या असता, हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बॉर्डर-गावसकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर बिनबाद २१ धावा केल्या असून भारत अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार रोहित शर्मा १३ तर के एल राहुल चार धावांवर खेळत आहेत. त्याआधी सकाळी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाहुणा संघ पहिल्या डावात २६३ धावांवर सर्वबाद झाला. मोहम्मद शमीनं चार तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
****
महिला टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा उद्या इंग्लंड बरोबर सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या सेंट जॉर्ज पार्क इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं स्पर्धेतले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत.
****
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आज सकाळी घेण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत हजारो युवकांनी सहभाग घेतला. शहरातल्या औरंगपुरा भागातून आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड, राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आली.
****
पंतप्रधान टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत देशात ‘कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात क्षयरुग्णांना पोषण आहार कीट वाटपात जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचं जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी सांगितलं. जालना स्टील असोसिएशन आणि विक्रम टी प्रोसेसर या औद्योगिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे ‘निक्क्षय मित्र’ म्हणून नोंदणी उपचाराधीन क्षयरुग्णांना पोषण आहार कीट वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातल्या २ हजार २९५ क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचं वाटप करण्यात आलं असून, या संस्था पुढील तीन वर्ष हा उपक्रम राबवणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात येत्या ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून येत्या २७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज ही माहिती दिली. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज स्तरावर मुलींसाठी घोषवाक्य लेखन, कविता तसंच चित्रकला स्पर्धांचं आयोजन करुन विजेत्या मुलींचा सत्कार करण्याच्या सुचना घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
****
औरंगाबाद इथं होत असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात उद्या सायंकाळी सात वाजता पूर्वरंग या कार्यक्रमाअंतर्गत जागर इतिहासाचा, लोककलेचा आणि संस्कृतीचा, हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पंडीत विश्वनाथ दाशरथे यांचं उपशास्त्रीय गायन तर राहुल खरे यांचे भावगीत रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
****
उद्या महाशिवरात्री निमित्त औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी औरंगाबाद स्मार्ट शहर बस विभागामार्फत ३० बस गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, मध्यवर्ती बस स्थानक इथूनही वेरुळ साठी दर पाच मिनिटाला बस उपलब्ध असणार आहे.
****
0 notes
Text
ही आयडिया देशाबाहेर गेली नाही पाहिजे…!
ही आयडिया देशाबाहेर गेली नाही पाहिजे…!
ही आयडिया देशाबाहेर गेली नाही पाहिजे…! आईने नारळ फोडायला दिला की आपल्या जीवावर येतं. घरात इडली करायची असली, नारळाची वडी करायची असली की नारळ फोडणं हा एक वेगळा आणि प्रचंड अवघड कार्यक्रम असतो. अनेक वेळा सोशल मीडियावर देशाच्या कानाकोपऱ्यातून असे व्हिडिओ समोर येतात, जे युजर्सना आश्चर्यचकित करतात. यामध्ये अशा व्हिडिओंचा देखील समावेश असतो ज्यात लोक आपली जुगाडू वृत्ती दाखवतात. असाच एक व्हिडिओ समोर आलाय,…
View On WordPress
0 notes
Link
चलिए दोस्तों जाणते है कुछ बढ़िया Business आईडियास के बारे में
1 note
·
View note
Text
Business Idea : ही बिझनेस आयडिया तुम्हाला बंपर कमाई करून देईल, लगेच सुरू करा.
Business Idea : आज आमची Business Idea बटाटा चिप्स बद्दल आहे. त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे सुरू करून, तुम्ही दरमहा बंपर कमाई करू शकता. हा असा व्यवसाय आहे, ज्याची रोज विक्री होत असते. हे केळी, रताळे, पपई, बटाटे, बीट इत्यादी अनेक प्रकारच्या फळे आणि भाज्यांचे चिप्स बनतात. मोठ्या कंपन्या हा व्यवसाय करून नफा कमावत आहेत. Small Business Idea in Marathi Business Idea : असे बरेच लोक आहेत ज्यांना…
View On WordPress
1 note
·
View note
Link
1 note
·
View note
Text
माहूरच्या रेणुका माता यात्रेची सांगता
माहूरगड : कोरोनाच्या कारणास्तव मागील दोन वर्षे परिक्रमा यात्रा पूर्णपणे बंद होती. शासनाचे सर्वच निर्बंध उठताच परीक्रमा यात्रेसाठी भावीकांनी माहुरगडावर मोठी गर्दी केली होती. राखी पौर्णिमा निमित्त श्रीदत्तशिखर संस्थानवर काकडा प्रज्वलित करून दत्त नामाच्या सप्ताहाला सुरुवात होते. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दत्तशीखर संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या गणेश कुंडात तोच काकडा विसर्जित केल्यानंतर परीक्रमा यात्रेची सांगता झाली. राज्य व पर राज्यातील हजारो दत्त भक्तांनी दत्तात्रेय महाराज की जय असा जयकारा करीत श्रीदत्तशिखर, कमंडलूकुंड, काळेपाणी, अनुसया माता मंदिर,सयामाय टेकडी, मातृतीर्थ तलाव, पांडवलेणी, देवदेव���श्वर, पंचदेवळी, चीलमीचा गोटा, नवनाथ टेकडी, वनदेव, कैलाश टेकडी, शेख फरीदबाबा दर्गाह, सर्वतीर्थ अशा जंगल मार्गाने सुमारे २२ किमी अंतर अनवाणी पायी चालत वेढ्यात ( सह्याद्री पर्वताची परिक्रमा ) सहभाग घेतला. नगर प्रशासनाने पिण्याचे पाणी, शौचालय, मुतारी आदी मूलभूत सुविधा पुरविण्याचे कर्तव्य पार पाडले नसल्याने महीलासह भाविकांची प्रचंड गैरसोय झाली. यात्रेसाठी परिवहन महामंडळाच्या माहूर आगाराचे आगार प्रमुख चंद्रशेखर राजेश्वर यांनी चालक व वाहकाच्या साहाय्याने बाहेरील आगाराच्या ३० व माहुर आगाराच्या २० अशा एकूण ५० बसेस दिवसरात्र सुरू ठेवल्याने भाविकांना गडावर जाणे सुलभ झाले. सुरक्षेच्या दृष्टीने पो. नि. नामदेव रिठ्ठे यांचे मार्गदर्शनात स.पो.अण्णासाहेब पवार, संजय पवार,श्रीधर जगताप यांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी सुसज्ज आरोग्य पथक जागोजाग तैनात करून २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता एन. पी.कोठे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अखंडित विद्युत पुरवठा केला. दि.१० ऑगस्ट रोजी टी पॉइंट जवळील एटीएम मध्ये सायंकाळच्या सुमारास रोकड नसल्याने व मागील अनेक दिवसापासून आयडिया व वोडा फोनची सेवा मोडकळीस निघाल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. यात्रा काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी अथक परिश्रम घेतले. एकंदरीत प्रचंड गर्दी होऊनही परिक्रमा यात्रा सुरळीत पार पडली. Read the full article
0 notes