#सलग
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार सलग आठवा केंद्रीय अर्थसंकल्प • केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन • आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; आर्थिक वाढीचा दर सहा पूर्णांक आठ टक्के राहण्याचा अंदाज • तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि • इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत भारताची विजयी आघाडी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंक्लप असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असेल. गेल्या वर्षी निवडणुकीमुळं हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन अर्थसंकल्पाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. दरम्यान, काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेसमोर सादर करण्यात आला. २०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या वर्षामध्ये तो तीन पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवे��नाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या.. ‘‘मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है। देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है। डिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत है। और आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।’’
राष्ट्रपतींनी यासह इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना या बाबींकडेही लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच विकास सार्थक होत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या… ‘‘जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।’’
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२��-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेतही दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. या याचिकेतल्या मुद्द्यांशी न्यायालय सहमत असलं तरी, याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं, असं म्हटलं आहे.
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला कालपासून पुण्यात प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं. या सोहळ्यात कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास मंत्रालयाच्या 'सिद्ध' या संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं. पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर, विश्व मराठी साहित्य संमेलन आता परदेशातही व्हावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
राज्यात सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 31 जानेवारीनंतरही सोयाबीनची खरेदी सुरु रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी राज्यानं केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता.
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं रौप्य प��क मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
क्रिकेट: पुणे इथं झालेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करत पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना जिंकला. या विजयासह भारतानं मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतानं इंग्लंडला १८२ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युरादाखल इंग्लंडचा संघ १६६ धावांवर सर्वबाद झाला. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी ५३ धावा केल्या तर रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी तीन, तर वरुण चक्रवर्तीनं दोन गडी बाद केले. मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना उद्या मुंबईत खेळला जाणार आहे.
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं ११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून, दोन फेब्रुवारीला क्वालालंपूर इथं होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली… ‘‘सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली आहे.’’
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेल इमारतीचं काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. लातूर पोलिसांकडून महिला, मुलींसाठी राबवण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी या विभागाची प्रशंसा केली. भरोसा सेलच्या समुपदेशनानंतर समेट झालेल्या जोडप्यांचा यावेळी पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
0 notes
Text
Pune Metro : गणेश विसर्जनानिमित्त मेट्रो सेवा सलग 40 तास राहणार सुरू
Pune Metro : गणेश विसर्जनानिमित्त मेट्रो सेवा सलग 40 तास राहणार सुरू – MPC…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/ganeshotsav-hope-of-women-to-make-lakhs-by-selling-ganesha-idols-inaugurated-by-guardian-minister-sattar/
0 notes
Text
Nanded Rain Update: सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका, २५ जनावरे मृत्युमुखी
Heavy Rains In Nanded: नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २५ जनावरांचा मृत्यू झालाय तर एक जण पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नांदेड(अर्जुन राठोड): जिल्हात सलग दुसऱ्या दिवशी ही पावसाने जोरदार हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवष्टीमुळे दोन लाख हेक्टरहुन अधिक शेतीचे…
View On WordPress
#heavy rains in nanded#nanded news today#rain news#नांदेड आजच्या बातम्या#नांदेड पाऊस बातमी#नांदेड पावसाचे अपडेट#नांदेडमध्ये अतिवष्टी#विष्णुपुरी प्रकल्प
0 notes
Text
Albatya Galbatya: Bollywood masala Makes History with Unique World Record.
Discover the magic of Albatya Galbatya, a Marathi drama that has set a remarkable world record in children's theatre. This incredible achievement adds to the growing influence of latest Marathi movies and showcases the richness of entertainment mix masala. With a touch of Bollywood masala flair, this drama is a must-watch for those who love innovative and captivating storytelling.
0 notes
Text
Share Market Today: आठवड्याचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी चांगला जातांना दिसत नाही आहे. सलग 5 दिवस सुरू असलेला तेजीचा कल आज मोठ्या घसरणीसह थांबला. प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 50 मोठ्या तोट्यासह व्य��हार करत आहेत.
शेयर बाजारात सलग 5 दिवसांची वाढ आज थांबताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह उघडले. आज सकाळी 10.39 वाजता बीएसई सेन्सेक्स 644 अंकांनी घसरून 81,223 अंकांवर व्यवहार करत होते. गुरुवारी सेन्सेक्स 81,867 अंकांवर बंद झाला, आज 81,345 अंकांवर मोठ्या घसरणीसह उघडला. वृत्त लिहिपर्यंत सेन्सेक्स 80,995 अंकांच्या नीचांकी आणि 81,345 अंकांच्या उच्चांकाच्या दरम्यान व्यवहार करत होता.
0 notes
Text
आजपर्यंतचे सर्वाधिक तापमान; मालेगावचा पारा ४३.२ अंशाची नोंद!
मालेगाव (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सलग दुस-��ा दिवशीही मालेगावचा पारा वाढलेला आहे. बुधवारी (दि.१७) रोजी मालेगाव शहरात ४३.२ तापमानाची नोंद करण्यात आली. उष्णतेच्या पा-याने यंदाची सर्वाधिक पातळी गाठली असून दिवसभर असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. राज्यात बीड आणि मालेगावचा पा-याची नोंद ४३.२ अंश घेण्यात आली. मालेगाव शहरात सकाळपासून असह्य उकाडा जाणवत होता. दुपारच्यावेळी ढगाळ वातावरण पसरले होते.…
View On WordPress
0 notes
Text
Menopause Meaning in Marathi ? मेनोपॉज म्हणजे काय?: लक्षणे, कारणे आणि उपचार
मेनोपॉज,( Menopause) म्हणजे मासिक पाळीची नैसर्गिक समाप्ती, जे स्त्रीच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण संक्रमण दर्शवते. जेव्हा स्त्रीला सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही त्याला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणतात. जेव्हा स्त्रीच्या शरीरामधील स्त्रीबीजग्रंथी (ओव्हरी) वाढत असलेल्या वयामुळे काम करणे बंद करतात. त्यामुळे शरीरामधील हार्मोन्सचे असंतुलन होते ही एक सामान्य जैविक प्रक्रिया असते तथापि, हे भावनिक आव्हाने सादर करू शकते, विशेषत: ज्यांनी त्यांचे कुटुंब पूर्ण केले नाही त्यांच्यासाठी. सुदैवाने, आधुनिक असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) रजोनिवृत्तीनंतरही पालकत्वाची आशा देते, जे पालकत्वाचा आनंद अनुभवू इच्छिणाऱ्यांना प्रकाशाचा किरण प्रदान करते. याशिवाय, PCOD हा एक महत्त्वाचा विषय आहे ज्याला समजून घेणे आवश्यक आहे. PCOD हा विविध शारीरिक आणि भावनिक समस्यांशी निगडीत असू शकतो आणि त्यावर उपचार आवश्यक असू शकतात. या विषयांवर अधिक माहितीसाठी, PCOD Meaning In Marathi वर क्लिक करा.
मेनोपॉज दरम्यान काय होते? (What happens during menopause?)
मेनोपॉज हे प्रमुख पुनरुत्पादक संप्रेरक इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमधील घट दर्शवते, ज्यामुळे अनियमित ओव्हुलेशन होते आणि शेवटी अंडाशयातून अंडी सोडणे बंद होते. या टप्प्यात हार्मोनल असंतुलन शारीरिक आणि भावनिक बदल घडवून आणते, ज्यामुळे स्त्रीच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो.
मेनोपॉज कधी सुरू होते? (When does menopause begin?)
मेनोपॉज विशेषत: 45 ते 55 वयोगटातील आढळते, जरी प्रत्येक स्त्रीसाठी सुरुवात बदलू शकते. काहींना आधी मेनोपॉजचा अनुभव येऊ शकतो, ज्याला अकाली रजोनिवृत्ती म्हणतात, जे वयाच्या 35 ते 40 वर्षांच्या सुरुवातीला येऊ शकते.
मेनोपॉजचे प्रकार आणि टप्पे (Types and stages of menopause)
रजोनिवृत्तीचे नैसर्गिक आणि प्रेरित श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, जेव्हा अंडाशय नैसर्गिकरित्या फॉलिकल्स तयार करणे थांबवतात तेव्हा नैसर्गिक रजोनिवृत्ती येते आणि वैद्यकीय हस्तक्षेपामुळे प्रेरित रजोनिवृत्ती येते. रजोनिवृत्तीद्वारे होणारे संक्रमण तीन टप्प्यांत हळूहळू उलगडते: पेरीमेनोपॉज, रजोनिवृत्ती आणि रजोनिवृत्तीनंतर. पेरीमेनोपॉज, अनियमित मासिक पाळी आणि गरम चमक आणि मूड स्विंग यांसारखी लक्षणे, रजोनिवृत्तीच्या आधी, ज्या दरम्यान ओव्हुलेशन थांबते, आणि योनीमार्गात कोरडेपणा आणि रात्री घाम येणे यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. मासिक पाळी सलग १२ महिने बंद झाल्यावर रजोनिवृत्तीनंतर येते, ज्यामुळे अनेक लक्षणांपासून आराम मिळतो परंतु दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोकाही निर्माण होतो.
मेनोपॉज दरम्यान आणि नंतर प्रजनन क्षमता (Fertility during and after menopause)
पेरीमेनोपॉज दरम्यान गर्भधारणा अनियमित ओव्हुलेशनमुळे शक्य आहे, परंतु त्यासाठी वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते. रजोनिवृत्तीच्या काळात गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी प्रजनन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि तणाव व्यवस्थापन आणि निरोगी आहार यांसारख्या जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस केली जाते. रजोनिवृत्तीनंतर गर्भधारणा अशक्य आहे असा सामान्य समज असूनही, नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट IVF केंद्राद्वारे (IVF Centre in Navi Mumbai)ऑफर केलेल्या आधुनिक ART तंत्रांमुळे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) आणि इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या पद्धतींमुळे पालकत्व साध्य करता येते.
मेनोपॉज लक्षणे आणि परिणाम (Menopause Symptoms and Effects)
मेनोपॉजमुळे अनियमित मासिक पाळी येणे, गरम चमकणे, रात्री घाम येणे, मूड बदलणे आणि थकवा यासह अनेक लक्षणे दिसतात. हे फॉलिकल्सची संख्या कमी करून, प्रजनन संप्रेरक पातळी कमी करून आणि योनिमार्गात कोरडेपणा आणि कामवासना कमी करून प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम करते. लवकर रजोनिवृत्ती, वयाच्या 40 वर्षापूर्वी उद्भवते, अतिरिक्त आव्हाने निर्माण करतात, परंतु अंडी दाता कार्यक्रम आणि अंडाशयाच्या ऊती प्रत्यारोपणासारखे पर्याय गर्भधारणेसाठी मार्ग प्रदान करतात.
मेनोपॉज गर्भधारणेसाठी उपचार पर्याय (Treatment options for menopausal pregnancy)
जरी मेनोपॉज स्त्रीच्या पुनरुत्पादक वर्षांचा अंत दर्शवत असली तरी, आधुनिक वैद्यकीय प्रगती गर्भधारणेसाठी विविध पर्याय देतात. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, आयव्हीएफ, अंडी दाता कार्यक्रम, अंडाशयाच्या ऊतींचे प्रत्यारोपण आणि इतर प्रगत प्रजनन तंत्रज्ञान स्त्रियांना मेनोपॉजनंतरही त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करू शकतात. "नवी मुंबईतील IVF उपचारांच्या (IVF Treatment in Navi Mumbai) असंख्य पर्यायांमध्ये, Yashoda IVF Fertility & IVF Centre ही प्रमुख निवड म्हणून उदयास आली आहे. आमची वंध्यत्व तज्ञांची टीम, 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभवासह, तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते आणि आम्हाला (Best IVF Centre in Navi Mumbai) नवी मुंबईतील अव्वल IVF केंद्र बनवते."
निष्कर्ष
मेनोपॉज (Menopause) हा स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे ज्यामध्ये शारीरिक बदल आणि मूड स्विंग यांचा समावेश होतो. तथापि, या कालावधीत त्यांची चिन्हे आणि लक्षणे नियंत्रित करण्यासाठी वैद्यकीय संघाकडून मदतीची मागणी करणे हे आव्हान आहे. प्रगत प्रजनन तंत्रज्ञानामुळे रजोनिवृत्तीनंतरही पालक बनणे शक्य झाले आहे. आरोग्य प्रथम आणि सक्रिय व्यवस्थापन रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीची ताकद बाहेर आणते, तिच्या उज्ज्वल आणि गतिमान जीवनासाठी दरवाजे उघडतात. "पालकत्वाकडे वाटचाल करताना, Yashoda IVF Fertility & IVF Centre वर विश्वास ठेवा आणि तुम्हाला योग्य असलेली दयाळू काळजी आणि कौशल्य प्रदान करा. आत्मविश्वास आणि आशावादाने पालकत्वाच्या तुमच्या मार्गावर जाण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा आणि जाणून घ्या आमच्या (IVF Centre in Navi Mumabi) नवी मुंबई मधील IVF केंद्रा बद्दल.
#IVF centre in navi mumbai#best ivf centre navimumbai#ivf treatment in navi mumbai#What is menopause#menopause meaning in marathi#menopause meaning in hindi#what is menopause#Menopause Symptoms in Marathi#रजोनिवृत्तीचा काळ#how to deal with menopause#महिलांचे आरोग्य#After Menopause Care Tips#menopause treatment#मेनोपॉज म्हणजे काय#menopause causes#मासिक पाळीचा त्रास#hormonal changes#Irregular menstruation#Menopause#Menstrual cycle#menopause symptoms#मेनोपॉजची लक्षणे#stages of menopause#मेनोपॉजच्या स्टेज#मेनोपॉजचे योग्य वय#रजोनिवृत्ती
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/jamb-seized-2-138-cubic-meters-of-teak-from-sindagi/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीपैकी ९८ टक्के थेट परदेशी गुंतवणूक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. • मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन. • भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. • राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाची सुरुवात. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ६० धावांनी ��िजय.
स्वित्झर्लंडच्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचादरम्यान महाराष्ट्रानं केलेल्या सामंजस्य करारांच्या एकंदर गुंतवणुकीपैकी ९८ टक्के गुंतवणूक ही थेट परदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दावोस इथून काल वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी, या गुंतवणुकीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी ग्वाही दिली. या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याचं फिचर असेल तर याच्यामध्ये जवळपास अठ्ठाण्णव टक्के जी गुंतवणूक आहे, ही फॉरेन डायरेक्ट इनव्हेसमेंट आहे. ती एफडीआय एफआय च्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आपल्या राज्याकरता यासाठी महत्वाची आहे, ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणूकीच्या स्वरुपात येत आहे. आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणूकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि त्यात जॉबची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. ती विस्तारीत होते एक्सपांड होते.
या परिषदेदरम्यान महाराष्ट्रानं एकंदर ६१ सामंजस्य करार केले असून त्यामुळे १५ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या सर्व भागात आणि क्षेत्रात गुंतवणूक आल्यानं राज्याचा समतोल विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या २८ पैकी २० कंपन्या राज्यातल्या असताना दावोस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्याचवेळी गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारापैकी किती अंमलात आले याची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना केलं. दावोसमध्ये सर्व गुंतवणूकदार एकत्र येतात, त्यामुळं इथे येणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, जे एफडीआय आहे त्यामुळे त्यांची अशी इच्छा असते की त्यांचे जे ग्लोबल पार्टनर आहेत. त्यांचे जे इनव्हेस्टर आहेत. किंवा त्यांच्या सोबत जे लोकं टेक्नॉलॉजी मांडताय अशा सगळ्यांच्या प्रेझेन्स मध्ये एमओयु झाले पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतय नेटवर्कींगचं कनेक्टींच एक महत्वाचं सेंटर आहे. इथला तुमचा प्रेझेन्स हा जे काही जगभरातले उद्योजक असतात, जे इनव्हेस्टर असतात त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करतो.
दरम्यान, दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करारांची प्रथा सलग तिसऱ्या वर्षी कायम राहिली असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात काही हजार कोटींची गुंतवणूक यानिमित्ताने येणार असून, औद्योगिक क्षेत्रात समतोल राखण्याचं कामही महायुती सरकारने केलं, असं सामंत म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १० हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहणार आहेत.
भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते काल परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या देश कृषि उत्पादन निर्याती��ध्ये जगात अग्रेसर ठरत आहे, असं ते म्हणाले. मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे या कार्यक्रमास उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती काल पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते, असं नमूद केलं.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काल मुंबईत मेळावा झाला. यावेळी बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, वेळ येईल तेव्हा स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं.
साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. एफआरपीच्या प्रमाणात एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत वाढत नाही, या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री त���ंच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यातल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी, तसंच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. हमी भावाने ३०० केंद्रांवरून तीन लाख मेट्रीक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या सर्व एस टी बस स्थानकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावं आणि ती एक लोकचळवळ व्हावी, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मुंबईत कुर्ला बसस्थानक इथं या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते काल बोलत होते. बसस्थानक ही सार्वजनिक जागा असून, तिथे स्वच्छता ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.
महिला क्रिकेटमध्ये, १९ वर्षांखालील टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी विजय मिळवला. काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात ११८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २० षटकात नऊ बाद ५८ धावाच करु शकला.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात नवी दिल्लीत मूळच्या बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या देवडी इथल्या फ्लाईंग ऑफीसर दामिनी देशमुख या परेड कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. याबद्दल दामिनी यांचे वडील माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दामिनीचे आर्मी परेडसाठी सलेक्शन झाले, ही गोष्ट आमच्या कुटुंबासाठी खूपच अभिमानाची आहे. आम्हाला त्याचा खूप आनंद झालेला आहे.
महसूल विभागात अंतर्भाव झालेल्या अनेक नवीन संगणकीय प्रणालींची कार्यपद्धती प्रशिक्षणातून जाणून घ्यावी, असं आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. सध्याच्या काळात आपल्या कामाच्या स्व��ुपाचं आकलन करुन त्यानुसार प्रशिक्षण घ्यावं, या प्रशिक्षणाचा अंतिम उपयोग हा लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.
जालना जिल्ह्यात येत्या ३० ते १३ फेब्रुवारी दरम्यान स्पर्श -कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. यासंर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून तालुकास्तरावर नवीन आयुष्यमान कार्ड काढण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज कर समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप, तक्रारी निकाली काढण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येतं.
नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना १७ हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
Text
Pune : पेट्रोलियम, रेल्वे बोर्ड संघ अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने
हॉकी: उपांत्य फेरीत सर्व्हिसेस बोर्ड व एफसीआयवर पिछाडीवरून विजय एमपीसी न्यूज -गतविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) आणि गतवर्षीचे ( Pune ) उपविजेते रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) संघांनी हॉकी महाराष्ट्र आयोजित चौथ्या हॉकी इंडिया पुरुष आंतर-विभाग राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सलग दुसर्या वर्षी दोन्ही संघ जेतेपदासाठी झुंजतील. चिंचवड महानगरपालिकेच्या…
0 notes
Text
#explorepage #newreels #reelsindia #reelsinstagram #goviral #exploremore #photography#MiracleOfGodKabir_In_1513
#SaintRampalJi
#SupremeGod
५१० वर्षांपूर्वी विणकराची भूमिका साकारताना परमदेव कबीर साहेबांनी अठरा लाख ऋषी-मुनींना भोजन दिले. सर्व अन्न भंडारा सतलोकातून आणून प्रत्येक खाणाऱ्याला एक दोहर व मोहर दिला. तो अलौकिक भंडारा सलग तीन दिवस चालला. सध्या २६ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संत रामपाल जी महाराज जी यांच्या नेतृत्वाखाली १० सतलोक आश्रमांमध्ये "दिव्य धर्म यज्ञ" दिवस साजरा केला जात आहे. ज्यामध्ये आपण सर्व देशबांधवांना आमंत्रित केले आहे.
0 notes
Text
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?
https://bharatlive.news/?p=186273 शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?
पुढारी ...
0 notes