आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
आसामच्या नऊ लाख पस्तीस हजारहून अधिक लोकांची आधारपत्रं देण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. २०१९ च्या फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान एनआरसी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपशी संबंधित बायोमेट्रिक प्रक्रियेतल्या काही बाबींमुळे या आधारपत्रांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वशर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांची भेट घेतली होती. या लोकांना येत्या पंधरा ते तीस दिवसात आपली आधारपत्रं मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ साठी सामान्य नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, इतर भागधारक आणि संबंधित संस्थांकडून मतं आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदेच्या संयुक्त समितीनं या सूचना मागवल्या आहेत. यासंदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या १५ दिवसांत संबंधितांनी आपली मतं मांडावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी बी.श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीनिवासन हे १९९२ च्या तुकडीचे भारतीय पोलिससेवा बिहार केडरचे अधिकारी आहेत.
****
दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआयच्या एका प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी तीन सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बाबेजा यांच्यासमोर दूरदृष्यप्रणालीद्वारे केजरीवाल यांना हजर करून घेण्यात आलेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात 'एकीकृत निवृत्तिवेतन योजना' -युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास वित्त विभागानं मान्यता दिली आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वं महाराष्ट्रात लागू करण्यासाठी "वित्त विभागाला” प्राधिकृत करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये आज अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी वॉर्ड, अर्थात सूक्ष्मजीव प्रतिरोधक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. इस्रायलचे निवासी परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. या कक्षाला आधुनिक प्रतिजैविक ॲक्रेलिक रंग देण्यात आला आहे. या रंगामुळे ९९ पूर्णांक ९९ टक्के जिवाणू आणि विषाणूंवर नियंत्रण मिळवता येतं, यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणात मोठी मदत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे आणि शिवप्रेमी नागरिकांतर्फे मालवणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने आज शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गुजरात मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत ८४ भारतीय क्रिडापटू सहभागी झाले आहेत.
****
0 notes
आज दिनांक - 18 अप्रैल 2024, का वैदिक हिन्दू पंचांग
दिनांक - 18 अप्रैल 2024
दिन - गुरुवार
विक्रम संवत् - 2081
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत
मास - चैत्र
पक्ष - शुक्ल
तिथि - दशमी शाम 05:31 तक तत्पश्चात एकादशी
नक्षत्र - अश्लेषा सुबह 07:57 तक तत्पश्चात मघा
योग- गण्ड रात्रि 12:44 अप्रैल 19 तक तत्पश्चात वृद्धि
राहु काल - दोपहर 02:13 से दोपहर 03:47 तक
सूर्योदय - 06:19
सूर्यास्त - 06:57
दिशा शूल - दक्षिण दिशा में
ब्राह्ममुहूर्त - प्रातः 04:48 से 05:33 तक
अभिजीत मुहूर्त - दोपहर 12:13 से 01:03 तक
निशिता मुहूर्त- रात्रि 00:15 अप्रैल 19 से रात्रि 01:00 अप्रैल 19 तक
विशेष - दशमी को कलंबी शाक त्याज्य है । एकादशी को शिम्बी (सेम) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)
कामदा एकादशी 19 अप्रैल 2024
व्रत उपवास 19 अप्रैल 2024 शुक्रवार को रखा जायेगा ।
18 एवं 19 अप्रैल दोनों दिन चावल खाना और खिलाना निषेध है ।
सदगृहस्थों के आठ लक्षण
सदगृहस्थों के लक्षण बताते हुए महर्षि अत्रि कहते हैं कि अनसूया, शौच, मंगल, अनायास, अस्पृहा, दम, दान तथा दया – ये आठ श्रेष्ठ विप्रों तथा सदगृहस्थों के लक्षण हैं । यहाँ इनका संक्षिप्त परिचय दिया जा रहा हैः
अनसूयाः जो गुणवानों के गुणों का खंडन नहीं करता, स्वल्प गुण रखने वालों की भी प्रशंसा करता है और दूसरों के दोषों को देखकर उनका परिहास नहीं करता – यह भाव अनसूया कहलाता है ।
शौचः अभक्ष्य-भक्षण का परित्याग, निंदित व्यक्तियों का संसर्ग न करना तथा आचार – (शौचाचार-सदाचार) विचार का परिपालन – यह शौच कहलाता है)
मंगलः श्रेष्ठ व्यक्तियों तथा शास्त्रमर्यादित प्रशंसनीय आचरण का नित्य व्यवहार, अप्रशस्त (निंदनीय) आचरण का परित्याग – इसे धर्म के तत्त्व को जानने वाले महर्षियों द्वारा ʹमंगलʹ नाम से कहा गया है ।
अनायासः जिस शुभ अथवा अशुभ कर्म के द्वारा शरीर पीड़ित होता हो, ऐसे व्यवहार को बहुत अधिक न करना अथवा सहज भाव से आसानीपूर्वक किया जा सके उसे करने का भाव ʹअनायासʹ कहलाता है ।
अस्पृहाः स्वयं अपने-आप प्राप्त हुए पदार्थ में सदा संतुष्ट रहना और दूसरे की स्त्री की अभिलाषा नहीं रखना – यह भाव ʹअस्पृहाʹ कहलाता है ।
दमः जो दूसरे के द्वारा उत्पन्न बाह्य (शारीरिक) अथवा आध्यात्मिक दुःख या कष्ट के प्रतिकारस्वरूप उस पर न तो कोई कोप करता है और न उसे मारने की चेष्टा करता है अर्थात् कियी भी प्रकार से न तो ��्वयं उद्वेग की स्थिति में होता है और न दूसरे को उद्वेलित करता है, उसका यह समता में स्थित रहने का भाव ʹदमʹ कहलाता है ।
दानः ʹप्रत्येक दिन दान देना कर्तव्य हैʹ - यह समझकर अपने स्वल्प में भी अंतरात्मा से प्रसन्न होकर प्रयत्नपूर्वक यत्किंचित देना ʹदानʹ कहलाता है ।
दयाः दूसरे में, अपने बंधुवर्ग में, मित्र में, शत्रु में, तथा द्वेष करने वाले में अर्थात् सम्पूर्ण चराचर संसार में एवं सभी प्राणियों में अपने समान ही सुख-दुःख की प्रतीति करना और सबमें आत्मभाव-परमात्मभाव समझकर सबको अपने ही समान समझकर प्रीति का व्यवहार करना – ऐसा भाव ʹदयाʹ कहलाता है । महर्षि अत्रि कहते हैं, इन लक्षणों से युक्त शुद्ध सदगृहस्थ अपने उत्तम धर्माचरण से श्रेष्ठ स्थान को प्राप्त कर लेता है, पुनः उसका जन्म नहीं होता और वह मुक्त हो जाता हैः
यश्चैतैर्लक्षणैर्युक्तो गृहस्थोઽपि भवेद् द्विजः।
स गच्छति परं स्थानं जायते नेह वै पुनः।।
(अत्रि संहिताः 2.42)
Akshay Jamdagni:
Expert in Astrology, Vastu, Numerology, Horoscope Reading, Education, Business, Health, Festivals, and Puja, provide you with the best solutions and suggestions for your life’s betterment.
9837376839
0 notes
Dengue vaccine | मोठी बातमी! आता डेंग्यूचा होणार अंत; वर्षभरात येणारं लस, सायरस पूनावाला यांची घोषणा
Dengue vaccine | भारतातील लस किंग सायरस पूनावाला यांनी एक मोठे विधान केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की ते एका वर्षात डेंग्यूवर बरा करणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी सांगितले की, वर्षभरात आम्ही डेंग्यू उपचार आणि डेंग्यूची लस (Dengue vaccine ) विकसित करू. आफ्रिकन देश आणि भारतात या नवीन लसीची खूप गरज आहे, जिथे लाखो लोकांना या आजाराची लागण होत आहे.
Malaria vaccine
Covishield च्या यशानंतर, SII जगात प्रथमच मलेरियाची लस लॉन्च करणार आहे. या लसीची आफ्रिकन देशांमध्ये आणि भारताच्या अंतर्गत भागातही नितांत गरज आहे, जिथे लाखो लोकांना या सामग्रीमुळे संसर्ग होत आहे. मोठ्या संख्येने स्त्रियांना संक्रमित करणाऱ्या रोगासाठी एक लस आहे, ही एक लस आहे जी गर्भाशयाला संक्रमित करते.
Work started at SII Serum Institute of India एसआयआय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये काम सुरू
सायरस पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत डेंग्यूसंदर्भात मोठी घोषणा केली. पूनावाला यांनी डेंग्यूच्या लसीची नितांत गरज सांगितली. सिरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या लसीवर दीर्घकाळापासून काम करत आहे. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त, संपूर्ण आशिया आणि भारतात डेंग्यूमुळे बरेच लोक मरतात. अलीकडेच, सीरम इन्स्टिट्यूटच्या अहवालाने निष्कर्ष काढला की डेंग्यू लसीचा एकच डोस प्रौढांमध्ये सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे सहन केला जातो. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सतत चाचणी आणि काम केले जात आहे.
There will be a vaccine for all four types या चारही प्रकारांसाठी लस असेल
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणण्याची घोषणा केली आहे. यामध्ये डेंग्यूच्या चारही प्रकारांवर उपचार केले जातील. सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या प्रक्रियेकडे पावले टाकू शकते. देशात औषधाच्या प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे. सीरमने आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यूएस स्थित बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत सहकार्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी 10 ते 40 कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात
Read the full article
0 notes
#जनहितार्थ
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांना सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे.
________________________________
डोळे आल्यास काय काळजी घ्याल?
• डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
• इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
• डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
• उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्याचा वापर करावा.
• आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#eye #eyecare #Conjunctivitis
0 notes
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
View On WordPress
0 notes
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
View On WordPress
0 notes
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
View On WordPress
0 notes
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
View On WordPress
0 notes
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्���ा व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
View On WordPress
0 notes
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
View On WordPress
0 notes
सत् का समागम एवं सत्पुरुषों का सत्संग ही स्वर्ग है। असत् एवं नश्वर संसार के विषयों का संसर्ग ही नरक है॥ अनात्म रूप - नश्वर विषयों का सङ्कल्प करना ही दुःख है। भज मन 🙏 ओ३म् शान्तिश् शान्तिश् शान्तिः #sumarti https://twitter.com/swamisandeepani/status/1602091311946874880?s=48&t=TatOSnkJZCb-u8qP5PEvSg https://www.instagram.com/p/CmDQEMSvPE6/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख १० हजार ८७४ कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्यास रिझर्व्ह बँकेची मंजुरी
कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे पुण्यात सर्वाधिक ५१ रुग्ण
आणि
बीड जिल्ह्याच्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई तालुक्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर
****
लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षानं परस्परांविरोधात दाखल केलेल्या तक्रारींच्या संदर्भात आयोगानं दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आचारसंहिता भंग होईल, अशी विधानं कोणी करू नयेत, यासाठी आपल्या पक्षांच्या प्रचारकांसाठी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश, आयोगानं या पत्रात दिले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी परवा २५ मे रोजी देशभरातल्या आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५८ मतदार संघात मतदान होत आहे. या सर्व मतदार संघातला प्रचार आज सायंकाळी संपणार आहे.
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख १० हजार ८७४ कोटी रुपये अतिरिक्त निधी द्यायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय राखीव निधी साडेसहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णयही बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेतला आहे.
****
पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला काल बालहक्क न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्याच्यावर दारू पिऊन कार चालवल्या बद्दल कलम १८५ अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, संबंधित बारचे चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर अशा तिघांना काल सत्र न्यायालयानं २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, गंभीर गुन्ह्यातून अल्पवयीन आरोपींची सुटका होण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी, ही वयोमर्यादा १६ वर्षे करावी अशी मागणी, महाराष्ट्र पोलीस मित्र सघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
****
कोरोना विषाणूच्या केपी टू या नवीन उपप्रकाराचे सर्वाधिक ५१ रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. हा जे एन वन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. सध्याच्या रूग्णांच्या नमुन्याचं जिनोम सिक्वेन्सिकग केलं असता, ७० टक्के नमुने केपी टू पॉझिटिव्ह आढळून आले ओहत. कोरोना विषाणूच्या संसंर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाही या नव्या उपप्रकाराचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती या विभागाचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे दोन नवे रुग्ण आढळून आले असून, त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
****
बुद्ध पौर्णिमा आज साजरी होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांची अहिंसा, शांती आणि करुणेची शिकवण पूर्वीइतकीच आजही प्रासंगिक असल्याचं, राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
नागपूर इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमानं दीक्षाभूमीवर आयोजित तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यात शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा दिली जाईल, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली आहे.
****
मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यंदाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार', कर्नल सचिन अण्णाराव निंबाळकर यांना घोषित झाला आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कारासाठी, भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीचे डॉ. सुहास जोशी यांची निवड झाली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार' अभिनेता रणदीप हुड्डा यांना, तर 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार' यंदा विद्याधर जयराम नारगोळकर यांना घोषित झाला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामांच्या प्रकरणात फौजदारी कारवाईसंदर्भात, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निर्देश दिले आहेत. अशा प्रकारात सामील विकासक, त्यांना मदत करणारे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही आवश्यक असल्याचं, त्यांनी याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ, तर बीड, गेवराई, शिरुर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातल्या महसुली मंडळांमध्ये, दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या भागांना विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४३ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. पाणी तसंच चारा टंचाई भासणाऱ्या गावांनी संबंधित तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एकूण ६७८ टँकरद्वारे जवळजवळ ४१२ गावं आणि ६१ वाड्या यांना ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरु आहे. जवळजवळ २८५ गावांसाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे. या सर्व सुविधेनंतरही काही गावांमध्ये पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा. वस्तुस्थितीदर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिजे. कुठलाही नागरिक, कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्यावाचून वंचीत राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतो आहोत.
****
उजनी जलाशयात पाणीसाठा नसल्यानं धाराशिव शहराला पुढील काही दिवस नऊ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्याच्या पावसाळी वातवरणामुळे शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरण मार्फत होणारा विद्युतपुरवठा खंडित होत असल्यानं देखील, नियमित पाणी पुरवठा करण्यास अडचण येत असल्याचं, प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन, उजनी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यामध्ये टंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकार दिले असून, कुठेही टंचाई असेल तर नागरिकांनी थेट संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभगानं काल केलेल्या दोन कारवायांमध्ये एका कार्यकारी अभियंत्यासह २ खाजगी अभियंत्यांना लाच घेताना जेरबंद केलं, तर एक नगर रचनाकार फरार झाला.
बीड जिल्ह्यात अकृषिक परवान्याच्या पोर्टलवर आलेल्या ऑनलाईन प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी प्रभारी नगर रचनाकार प्रशांत डोंगरे यानं ३० हजार रुपयाची लाच मागितली होती. मदतनीस शेख निहाल शेख अब्दुल गनी आणि खासगी अभियंता निलेश पवार यांना ही लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आलं. मात्र डोंगरे हा फरार झाला.
अन्य एका कारवाईत परळी वैजनाथ पाटबंधारे विभाग वर्ग एक चा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याला २८ हजार रुपयांची लाच घेताना काल सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली. चिंचोटी तलावातला गाळ आणि माती काढून सात शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याची परवानगी मिळण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती.
****
जालना जिल्ह्यातल्या मंठा इथल्या पंचायत समितीमधल्या एका कंत्राटी अभियंत्याला गाय गोठ्याच्या बांधकाम अनुदानाची रक्कम देण्याकरता पाच हजार रुपये लाच घेताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. महेश बोराडे असं या अभियंत्याचं नाव आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात रॉजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा चार गडी राखून पराभव केला. या स्पर्धेचा दुसरा क्वालिफायर सामना उद्या शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि सनाराईजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत खेळेल.
****
जपानच्या कोबे इथं सुरु असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक प्रकारात भारताच्या सचिन खिलारीनं सुवर्ण पदक पटकावलं. सचिननं पुरुषांच्या एफ ४६ प्रकारात १६ पूर्णांक ३० मीटर गोळा फेकत, नवीन विक्रम प्रस्थापित केला.
****
हवामान
विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड ४३ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथं ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
0 notes
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
पुणे, दि. 5 : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन…
View On WordPress
0 notes
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
पुणे, दि. 5 : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन…
View On WordPress
0 notes
#जनहितार्थ
डोळे येणे (कंजक्टिवाईटीस ) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांना सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे
________________________________
डोळे आल्यास काय काळजी घ्याल?
• डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.
• इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
• डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
• उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चण्यांचा वापर करावा.
• आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
• कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#eye #eyecare #Conjunctivitis
0 notes
राज्यात गोवर रुग्णांची संख्या आठशे तेवीस ! मुंबई शहर परिसरात सर्वाधिक रुग्ण
राज्यात गोवर रुग्णांची संख्या आठशे तेवीस ! मुंबई शहर परिसरात सर्वाधिक रुग्ण
राज्यात गोवर रुग्णांची संख्या आठशे तेवीस ! मुंबई शहर परिसरात सर्वाधिक रुग्ण
पुणे -राज्यात गोवर या विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील चार वर्षाच्या तुलने यावर्षी (2022) गोवर रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत राज्यात गोवरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 823 वर पोहचली आहे, यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये 386 इतके आहेत.
राज्यात गोवरचा संसर्ग वाढत असल्याच्या…
View On WordPress
0 notes