Tumgik
#संघाला
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भारतीय संघाला मिळाले आता नवीन टार्गेट, रोहित शर्मासह राहुल द्रविड यांची चिंता आता वाढली
भारतीय संघाला मिळाले आता नवीन टार्गेट, रोहित शर्मासह राहुल द्रविड यांची चिंता आता वाढली
भारतीय संघाला मिळाले आता नवीन टार्गेट, रोहित शर्मासह राहुल द्रविड यांची चिंता आता वाढली Team India : आशिया कप, टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर बांगलादेमधील लाजीरवाणा पराभव, भारतीय संघाची कामगिरी ही निराशाजनक होत आहे. पण आता टीम इंडियापुढे एक टार्गेट आले आहे आणि त्यांना ते पूर्ण करावे लागणार आहे. पण हे टार्गेट नेमकं आहं तरी काय आणि त्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावे लागेल, जाणून घ्या… Team India :…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 26 days
Text
Pune : मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत स्काय रेंजर्सला विजेतेपद
एमपीसी न्यूज : विदुर पेंढारकर यांनी केलेल्या (Pune) दुहेरी कामगिरीच्या जोरावर स्काय रेंजर्स संघाने प्रौढांच्या पुणे मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी स्पार्टन्स संघाला 3-1 असे पराभूत केले. टॉस अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेस शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे शारदा समूहाचे प्रायोजकत्व लाभले होते. अंतिम सामन्यातील पहिला लढतीत स्काय रेंजर्स संघाचे नचिकेत…
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत सादर
तुरीच्या दरातील तफावत दूर करून नव्या दराने खरेदीचं सरकारकडून आश्वासन
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये बक्षीस-मुंबईकर क्रिकेटपटूंच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं एमआयडीसी स्थापनेबाबतची अधिसूचना जारी
आणि
संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची, तर परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपयांपर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. परीक्षा सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून जारी परिपत्रकानुसार ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत काल ते बोलत होते. मराठवाड्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
तुरीच्या दरातील तफावत दूर करून, नव्या दराने तूर खरेदी केली जाईल, असं आश्वासन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. तुरीचे बाजारभाव आणि हमी भावाच्या तफावतीचा मध्यबिंदू काढून तूर खरेदी दर निश्चित करण्याचा विचार केला जाईल, असं सत्तार म्हणाले. सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. चालू हंगामात शासनाच्या १५३ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत फक्त ४६ शेतकऱ्यांनी साडे पाचशे क्विंटल तूर विक्री केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान काल विधान भवनातील उपाहारगृहात ‘‘भरडधान्य महोत्सव’’ घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघातले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यानंतरच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार काल दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश आहे. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं ३६७ एकरावर नवीन औद्योगिक वसाहत -एमआयडीसी स्थापन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची,विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला सोलापूर इथं बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं काल रोटीघाट पार केला. ही पालखी आज बारामती तालुक्यातल्या उंडवडी गावाकडून मार्गस्थ होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज नीरा स्नान सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी स���तारा जिल्ह्यात लोणंद मुक्कामी पोहोचेल.
संत मुक्ताबाईंच्या पालखीत काल बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीकाठी गोविंदपंत कुलकर्णी यांच्या समाधीस्थळी आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा झाला. मुक्ताबाईंच्या पादुका त्यांचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीपर्यंत वाजत गाजत नेण्यात आल्या. दरम्यान मुक्ताबाईंची पालखी आज पाली इथून मार्गस्थ होईल.
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण काल बीड जिल्ह्यात पाटोद्यातल्या पारगाव घुमरे इथं पार पडलं. शेकडो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा अनुभवला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला कालपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुनर्भरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटी वितरित करण्यात येत असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.
****
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील आगावू मालमत्ता कर भरणाऱ्यांना कर सवलत देण्यात आली होती. या योजनेला १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी घेतला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केली आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी काल विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या स���चनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
राज्यात २०२१ आणि २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या काही सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र अद्याप दाखल केलेलं नाही. परभणी जिल्ह्यात संबंधित सदस्यांनी १० जुलैपर्यंत त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावं, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आजपासून येत्या १३ तारखेपर्यंत मराठा आरक्षण संवाद रॅली काढण्यात येणार आहे. आज हिंगोलीतून या रॅलीला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी आज परीक्षा होणार आहे. दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेत संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने दक्षता घेण्यात येत आहे.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल' या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते काल संबोधित करत होते.
****
0 notes
mahavoicenews · 7 months
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
mhlivenews · 8 months
Text
सुपर आरएसएस बना; जिजाऊसृष्टीवरुन पुरुषोत्तम खेडेकर यांचे मराठा समाजाला आवाहन
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : आजवर जे घडले ते होऊन गेले. जुने उगाळत बसण्यापेक्षा नव्याने चिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नावे ठेवण्यापेक्षा सुपर आरएसएस बना. पुनरुज्जीवित होऊन कामे करा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सिंदखेडराजात जिजाऊसृष्टी परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमातील शिवधर्म पीठावरून मार्गदर्शन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rashtrasanchar · 1 year
Text
Asia Cup 2023, IND Vs SL : रोहित शर्माची अपवाद सर्वाधिक 53 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यासिवाय ईशान किशन 33 आणि केएल राहुल याने 39 धावांचे योगदान दिले. वेलाल्लागे याने अचूक टप्प्यावर मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. वेल्लालागे याने पाच विकेट घेतल्या. भारताचा संपूर्ण डाव 213 धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे. भारतासाठी रोहित शर्मा आणि गिल यांनी 80 तर इशान किशन आणि केएल राहुल यांनी 63 धावांची भागिदारी केली. या दोन भागिदारीचा अपवाद वगळता एकही मोठी भागिदारी झाली नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली.
0 notes
starfriday · 1 year
Text
*‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतात 10 भाषांमधून प्रसिद्ध होणार!*
_भारतीय 9 भाषांसह सर्व 10 भाषांमधील ट्रेलर नुकताच प्रसिद्ध_
*मराठी ट्रेलर लिंक:*
youtube
भारतात सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच, बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय हॉलीवूड फ्रेँचायझी फिल्म विविध 10 भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होते आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर स्पायडर-मॅन पटांनी कायमच अभूतपूर्व यश कमावले असून स्पायडर-मॅन हा आपल्या देशाचा सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो राहिला आहे. लहान-थोरांना, सर्वांनाच हा सुपरहिरो आपलासा वाटतो. देशात स्पायडर-मॅनचा चाहता वर्ग अफाट असून त्याची भुरळ सर्वांना झपाटून टाकते. हाच धागा साधून निर्मात्यांनी स्पायडर-मॅनला सर्व भारतीयांच्या अधिक जवळ आणण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे, ज्यामुळे ही एक पॅन-इंडिया फिल्म झाली असून 2023 मधील सर्वाधिक पसंतीची कलाकृती बनली आहे.
इंग्रजीशिवाय, ‘स्पायडर-मॅन: अ���्रॉस द स्पायडर-व्हर्स’ ही फिल्म हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषांत प्रदर्शित होणार आहे. 10 भाषांमध्ये एखादा सिनेमा प्रदर्शित होणे मुळात हाच एक मापदंड असून त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाचा अनुभव अनेक भाषांमध्ये, तो देखील स्वत:च्या आवडीनुसार करता येईल.
*सोनी पिक्चर्स रिलीझिंग इंटरनॅशनल (एसपीआरआय), इंडिया’चे महाव्यवस्थापक आणि प्रमुख शोनी पंजीकरण सांगतात,* " स्पायडर-मॅन हा भारतातील सर्वांच्या पसंतीचा सुपर-हिरो आहे, आणि कोणताही स्पायडर-मॅन सिनेमा म्हणजे संपूर्ण भारतातील खरी आणि वास्तविक घटना आहे. 'नो वे होम' या शेवटच्या स्पायडर-मॅन सिनेमाने स्पायडर-मॅनला प्रेक्षकांकडून मिळालेल्या पसंतीत आणखीन भर घातली. प्रदेश आणि भाषांमधील कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे, भारतातील प्रत्येक घराने त्यांच्या स्वतःची भाषेत आवडत्या सुपरहिरोचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा होती. 10 भाषांमध्ये 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' रिलीज केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारताला स्पायडर-मॅन आवडतो आणि पवित्र प्रभाकर या भारतीय स्पायडर-सह अनेक भारतीय घटकांची ओळख करून देणारा हा आमच्यासाठी अधिक खास आहे. देशभरातील प्रेक्षक या चित्रपटावर प्रेम कर तील याची खात्री मला वाटते."
माइल्स मोरालेस ऑस्कर®-विजेत्या स्पायडर-व्हर्स गाथा, स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्सच्या पुढील अध्यायासाठी परतले. ग्वेन स्टेसी समवेत पुन्हा एकत्र आल्यानंतर, ब्रुकलिनचा पूर्ण-वेळ, मैत्रीपूर्ण शेजार यांच्यासह स्पायडर-मॅन मल्टीव्हर्समध्ये पोहोचला आहे, जिथे तो स्पायडर-पीपलच्या एका संघाला भेटतो. जिथे त्याच्या अस्तित्वाचं रक्षण करण्याचा आरोप ठेवण्यात येतो. या चित्रपटाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरची पहिल्यांदाच थेट ओळख मुंबॅटनच्या रस्त्यावर होते.
आता आम्हाला प्रचंड आवडणाऱ्या या जाळं विणणाऱ्या सुपरहिरोला भेटण्याची आतुरता आहे, कारण तो सगळ्याच भाषांमधून आपल्या भेटीला येतो आहे!
*सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया निर्मित 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' 2 जून 2023 पासून इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होतो आहे. फक्त सिनेमागृहांमध्ये.*
0 notes
vishwasdgaikwad · 2 years
Video
youtube
माजी नगर सेवक रामभाव तायडे यांनी,भिक्षु संघाला कार्तिक दान दिले,जयभीम नग...
0 notes
nashikfast · 2 years
Text
रणजी ट्रॉफी समकक्ष नियोजित
रणजी ट्रॉफी समकक्ष नियोजित
कै. शेखर गवळी मेमोरियल भव्य दिमाखदार स्पर्धा नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, मैदानावर भव्य दिमाखदार प्रमाणावर  कै. शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ६  ते  १०  डिसेंबर दरम्यान सदर टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. विजेतेपदासाठी रुपये एक लाख एक हजार  व उपविजेत्या संघाला एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. नाशिकमध्ये प्रथमच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Brazil FIFA WC: ब्राझीलला त्या मांजरीचा शाप लागला, नेमारच्या संघाला नेटकऱ्यांनी दाखवला आरसा
Brazil FIFA WC: ब्राझीलला त्या मांजरीचा शाप लागला, नेमारच्या संघाला नेटकऱ्यांनी दाखवला आरसा
Brazil FIFA WC: ब्राझीलला त्या मांजरीचा शाप लागला, नेमारच्या संघाला नेटकऱ्यांनी दाखवला आरसा Brazil out to fifa world cup 2022, Because of cat: फिफा वर्ल्डकपमधून ब्राझीलचा संघ बाहेर पडला आहे. यानंतर ब्राझीलचा संघ प्रचंड ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर मांजरीचा एक व्हिडिओ ट्रेंड होत आहे. या मांजरीच्या शापामुळेच ब्राझील बाहेर पडला आहे, असे चाहते म्हणत आहेत. Brazil out to fifa world cup 2022, Because…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कणकवली मतदार संघाला आता खऱ्या अर्थाने "अच्छे दिन"
कणकवली मतदार संघाला आता खऱ्या अर्थाने “अच्छे दिन”
उद्धव ठाकरेंच्या काळात सर्वात जास्त कणकवली मतदारसंघाला त्रास आमदार नितेश राणे यांचा आरोप कणकवली भाजपा युतीचे राज्यात सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मिळाला. आता कणकवली विधानसभा मतदारसंघाचा वनवास संपला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये सर्वात जास्त त्रास कणकवली मतदार संघाला दिला गेला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
दक्षिण अफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत जगज्जेता-विराट कोहली आणि रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त 
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ
आणि  
बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर मात्र सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत भारत जगज्जेता ठरला आहे. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने विराट कोहलीच्या ७६ आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या जोरावर सात बाद १७६ धावा केल्या. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात आपला पहिलाच अंतिम सामना खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र, निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच करू शकला. अखेरच्या षटकापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवनं डेव्हीड मिलरला सीमारेषेवर झेलबाद करत भारताचा विजय निश्चित केला. हार्दिकनं तीन, जसप्रीत बुमराह तसंच अर्शदीपसिंगने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी घेतला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शहा यांच्या उपस्थितीत भारतीय संघाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. विराट कोहली सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 
या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी कारवाई सुरु असून, जो पर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, अर्थसंकल्पात विविध निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी काल विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधत, आभार मानले.
****
विरोधकांनी मात्र हा शासन निर्णय म्हणजे सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पाला प्रथम विधीमंडळाची आणि त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. परंतु ही प्रक्रिया डावलून सदरील शासन निर्णय काढत, सरकारने महिलांची फसवणूक केली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश देण्याच्या परंपरेला छेद गेल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. काल विधान परिषदेत याविषयावर बोलतांना दानवे यांनी, शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावरही सुमारे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित असल्याकडे लक्ष वेधलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, अशी माहिती शासनाने दिल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
विशेष सहाय्य योजनांचा निधी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. राष्ट्रीय-तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पात्र खेळाडू शासकीय नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
दरम्यान, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल, असं पवार यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी राज्यात काही ठिकाणी सेवा केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाहून अधिक रक्कम अवैधरित्या वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास, कठोर कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. याबाबत कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 98-22-44-66-55 यावर थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक अलकापुरीत दाखल झाले आहेत. काल रात्री पालखीचा मुक्काम आळंदीतच माऊलीच्या आजोळघरी होता. आज सकाळी हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आपेगाव इथूनही संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल देहूतल्या इनामदार वाड्यातून पुण्याकडे मार्गस्थ झाला.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार इथून श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं, या दिंडीला तीन शतकांची परंपरा आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर शहरात काल बंद पाळण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची वादग्रतस्त ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, दरम्यान, पक्षविरोधी कार्य केल्यामुळे शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  
****
लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्���ा सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशिकांत पाटील, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी गुरुकुलात प्रातिग्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या ख्याल गायक पद्मा तळवलकर, ओडिशी नृत्यांगना पद्मश्री कुमकुम मोहंती, तसंच उत्तराखंडच्या लोककलाकार पद्मश्री बसंती बिष्ट यांनी आपापल्या सादरीकरणातून या कलाप्रकारांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. 
****
चेन्नईच्या एम ए चिदंबरम्‌ मैदानावर सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकन महिला संघाच्या चार ��ाद २३६ धावा झाल्या आहेत. भारताच्या स्नेह राणानं सर्वाधिक तीन खेळाडू बाद केले. त्याआधी सकाळी भारतीय महिला संघानं सहा बाद ६०३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६९ आणि ऋचा घोषनं ८६ धावा केल्या.
****
ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत या जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा ११-४, ११-२, ११-२ असा पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे दौंड निजामबाद, निजामाबाद पुणे, आणि नांदेड पुणे गाड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, हा लाईन ब्लॉक काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याने या गाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
मुंबई, दि. २७ : कर्णधार शंकरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने मंगळवारी  ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात चंदीगडला धुळ चारली. महाराष्ट्र टीमने ६०-२१ ने दणदणीत विजयाची नाेंद केली. संघाच्या विजयासाठी आकाश, असलम, पंकज माेहिते, मयुर कदम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आपली विजयी माेहिम…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
IPL 2022: CSK आणि RCB विरुद्ध जाण्यापूर्वी खेळाडूंनी मैत्री दाखवली, धावत जाऊन विराट कोहलीला मिठी मारली; व्हिडिओ पहा - आयपीएल 2022: सामन्यात सामना करण्यापूर्वी विराट कोहलीने चेन्नई-बंगळुरूच्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाला मिठी मारली; व्हिडिओ पहा
IPL 2022: CSK आणि RCB विरुद्ध जाण्यापूर्वी खेळाडूंनी मैत्री दाखवली, धावत जाऊन विराट कोहलीला मिठी मारली; व्हिडिओ पहा – आयपीएल 2022: सामन्यात सामना करण्यापूर्वी विराट कोहलीने चेन्नई-बंगळुरूच्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाला मिठी मारली; व्हिडिओ पहा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे संघ आमनेसामने असतील. हा सामना 12 एप्रिल रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळवला जाणार आहे. मात्र, एकमेकांविरुद्ध विजयासाठी उत्सुक असलेल्या संघांच्या खेळाडूंमध्ये सामन्यापूर्वी जोरदार सौहार्द निर्माण झाला होता. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर दोन्ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
मुंबई, दि. २७ : कर्णधार शंकरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने मंगळवारी  ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात चंदीगडला धुळ चारली. महाराष्ट्र टीमने ६०-२१ ने दणदणीत विजयाची नाेंद केली. संघाच्या विजयासाठी आकाश, असलम, पंकज माेहिते, मयुर कदम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आपली विजयी माेहिम…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
U19 विश्वचषक 2022: अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीचे भारतीय संघासाठी आलेले ट्विट
U19 विश्वचषक 2022: अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीचे भारतीय संघासाठी आलेले ट्विट
IND vs ENG U19 विश्वचषक फायनल 2022: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 6.30 वाजता होणाऱ्या या सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचे युवा संघ सज्ज झाले आहेत. जिथे इंग्लंड संघ (इंग्लंड U19 संघ) दुसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याच वेळी, भारतीय संघ (भारत U19 संघ) पाचव्यांदा ही ट्रॉफी…
View On WordPress
0 notes