#राष्ट्रीय वीरता पुरस्कार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• देशभरात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, नवी दिल्लीत मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण • आर्थिक सुधारणांसाठीच्या धाडसी आणि दूरदर्शी निर्णयांमुळे देशाचा विकासदर कायम राहणार -राष्ट्रपतींचं प्रतिपादन • शौर्य चक्रासह देशभरात ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं तसंच सेवा पदकं जाहीर • पद्म पुरस्कारांची घोषणा; सात पद्मविभूषण, २६ पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री सन्मान • १५ वा राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा आणि • ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. नवी दिल्लीत साजऱ्या होत असलेल्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी होत आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं देशाच्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ३१ चित्ररथ सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी देशभरातून विविध ३४ क्षेत्रातल्या दहा हजार मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
आर्थिक सुधारणांसाठीच्या धाडसी आणि दूरदर्शी निर्णयांमुळे देशाचा विकासदर कायम राहिल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे. काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षात वाढत्या विकास दरा��ुळे युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या… ‘‘हाल के बर्सों मे आर्थिक विकास की डोर लगातार ऊंची रही है, जिससे हमारे युवाओं के लिये रोज़गार के अवसर पैदा हुये हैं. किसानों और मज़दुरों के हाथों मे अधिक पैसा आया है, तथा बडी संखिया मे लोगों को गरीबी से बाहर निकाला गया है, साहसिक और दूर्दशी आर्थिक सुधारों के बल पर आनेवाले वर्षों मे प्रगती की ये रफतार बनी रहेगी.’’
गेल्या ७५ वर्षांच्या काळात राज्यघटनेच्या मार्गदर्शनाशिवाय देशाची गौरवपूर्ण वाटचाल शक्य झाली नसती, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. राज्यघटना ही आपल्या सामुहिक अस्मितेचा मूलभूत आधार असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.
सैन्यदलात अतुलनीय धाडस आणि पराक्रमासाठी राष्ट्रपतींनी काल शौर्य चक्र जाहीर केले. यामध्ये कार्पोरेल दाभी संजय हिफ्फाबाये, फ्लाईट लेफ्टनंट अमनसिंह हंस यांचा समावेश आहे. वायू सेनेसाठीची सात वीरता पदकंही जाहीर झाली आहेत.
देशभरातल्या ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं तसंच सेवा पदकं काल जाहीर झाली. यामध्ये पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक दल तसंच नागरी सुरक्षा आणि कारागृह प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण ४३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरवलं जाणार आहे. यासह रविंद्रकुमार सिंघल, दत्तात्रय कारळे, सुनील फुलारी आणि रामचंद्र केंडे या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. तर ३९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक तर कारागृह सेवेतल्या पाच जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. जीवन रक्षा पदकंही काल जाहीर झाले. महाराष्ट्रातले शशिकांत गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ तर दादाराव पवार आणि ज्ञानेश्वर भेदोडकर यांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातले उपनिरीक्षक नजीर नसीर शेख यांना गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शेख यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
पद्म पुरस्कार काल जाहीर झाले. प्रसिद्ध गायिका दिवंगत शारदा सिन्हा आणि प्रसिद्ध उद्योजक दिवंगत ओसामा सुझुकी यांच्यासह सात जणांना पद्मविभूषण, २६ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा यात समावेश आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर जोशी, दिवंगत गायक पंकज उधास आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत सुशीलकुमार मोदी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान जाहीर झाला आहे. चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, साध्वी ऋतंभरा आणि हॉक��पटू पी. आर. श्रीजेश यांनाही पद्मभूषण सन्मान घोषित झाला आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये सुलेखनकार अच्युत पालव, उद्योजिका अरुंधती भट्टाचार्य, अभिनेता अशोक सराफ, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे - देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता चैत्राम पवार, गायक अरिजीत सिंह, गायिका जसपिंदर नरुला, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, बासरीवादक रोणु मुजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष शर्मा, डॉ. विलास डांगरे, चित्रकार वासुदेव कामत, आणि क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांचा यात समावेश आहे.
१५ वा राष्ट्रीय मतदार दिन काल देशभरात उत्साहात साजरा झाला. नवी दिल्ली इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला, निवडणुकीच्या सर्वोत्तम नियोजनासाठीचा पुरस्कार देण्यात आला, मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यातही राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला, राज्याचा मुख्य कार्यक्रम पुण्यात झाला. या निमित्तानं नागरिकांना मतदार शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिका देवाण-घेवाण कार्यवाहीसाठी उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार तसंच लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीड, परभणी, हिंगोलीसह सर्वत्र मतदार जनजागृती फेरी, रांगोळी स्पर्धा तसंच विविध कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. एक जानेवारी २०२५ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असं आवाहन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी यावेळी केलं.
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चपळगांवकर यांचं काल पहाटे निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. साहित्य, कला, राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमं, विधी आणि न्याय, उद्योग, वैद्यकीय, प्रशासन आदी क्षेत्रातल्या मान्यवरांनी चपळगांवकर यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चपळगावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
शिवसैनिकांनी शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जालना इथं शिवसेनेच्या आभार मेळाव्यात ते काल बोलत होते. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक, असं अभियान राबवण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाट���ल यांनी काल पुन्हा अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करावी, आदी मागण्यांचा जरांगे यांनी पुनरुच्चार केला आहे.
राष्ट्रीय पर्यटन दिन काल सर्वत्र साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं पर्यटन क्षेत्रात कार्यरत मराठवाडा पर्यटन विकास संघटनेकडून विविध सामाजिक कार्यक्रम सातत्याने राबवले जातात, मराठवाड्यातल्या सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचा प्रसार आणि प्रचार करण्यासोबतच स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी आपली संघटना कार्यरत असल्याचं, संघटनेचे अध्यक्ष जयंत गोरे यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘ह्या संस्था उभ्या करण्यामागचा हाच उद्देश होता की, मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे पर्यटनस्थळे त्याचप्रमाणे आपला सांस्कृतिक धरोवर जपणारी लोकं, सांस्कृति कार्यक्रम करणारी लोकं, कलाकार यांना सगळ्यांना लोकल प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि त्यामुळे मराठवाड्यात पर्यटन ह्या संस्थेची सुरवात झाली. आज या संस्थेमार्फत अनेक कार्य केले जातात. आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे छोटे छोटे मंदिरं आहेत, किंवा त्या मंदिरांमध्ये जो जीर्णोद्धार असेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त असणारे सांस्कृतिक छोटे छोटे कलाकार आहेत, त्यांचे कार्यक्रम्स असतील, तर या सगळ्यांना कसा प्लॅटफॉर्म तयार करून देता येईल यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो.’’
दुसऱ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर दोन गडी राखून विजय मिळवला. काल चेन्नई इथं झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दिलेलं १६६ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने विसाव्या षटकाचे चार चेंडू आणि दोन गडी शिल्लक असतांना पूर्ण केलं. ७२ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर ठरला. या विजयाबरोबरच भारत पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्यनं आघाडीवर आहे. मालिकेतला तिसरा सामना येत्या २८ तारखेला राजकोट इथं खेळला जाईल.
धाराशिव जिल्ह्यात आगामी पाच वर्षात गाव तिथे एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. धाराशिव बस स्थानकाचं काम एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून, धाराशिव जिल्ह्याला ५० नवीन एसटी बस देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
लातूरमध्ये पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत काल संविधान गौरव सभा पार पडली. सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्रित बां��ून ठेवण्याचं काम भारतीय संविधानाने केल्याचं, भोसले म्हणाले.
ऑल इंडिया योगा आणि कल्चर फाउंडेशनच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत अंबाजोगाईचे योगगुरू उत्रेश्वर पांचाळ यांनी रौप्यपदक मिळवल्यानं आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.
मनमाड-येवला महामार्गावर अनकवाडेजवळ रेल्वे पुलावरून एक कठडा तोडून रेल्वे ट्रॅकवर जाऊन ट्रॅक कोसळला. त्यामुळे मनमाडकडून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री उशिरापर्यंत रेल्वे ट्रॅकवरून अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचे काम सुरू होतं. या अपघातात सुदैवाने चालक बचावला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
नांदेड इथल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात आज, जिल्हा क्रीडा अधिकारी -जिल्हा पुरस्कार प्रदान होणार आहेत. गेल्या चार वर्षांचे पुरस्कार आज देण्यात येतील.
0 notes
Text
रक्षा मंत्री ने ओपन वाटर तैराकी अभियान का ध्वज हासिल किया
– अभियान के दौरान तैराकों को कई चुनौतियों का सामना करना पड़ा- तीनों सेनाओं के 11 कर्मियों ने सभी 21 द्वीपों पर राष्ट्रीय ध्वज फहराया नई दिल्ली, 20 सितम्बर (हि.स.)। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने परमवीर चक्र पुरस्कार विजेताओं के नाम पर रखे गए अंडमान एवं निकोबार के 21 द्वीपों के लिए अपनी तरह के पहले खुले जल में तैराकी अभियान का ध्वज शुक्रवार को नई दिल्ली में हासिल किया। इस अभियान के दौरान 21 वीरता…
0 notes
Text
राष्ट्रीय वीरता पुरस्कार के लिए आवेदन 15 अक्टूबर तक
राष्ट्रीय वीरता पुरस्कार के लिए आवेदन 15 अक्टूबर तक
हरियाणा: भारतीय बाल कल्याण परिषद ने राष्ट्रीय वीरता पुरस्कार हेतु बहादुर बच्चों के लिए 15 अक्टूबरए 2022 तक आवेदन आमंत्रित किए हैं। जिला बाल कल्याण परिषद के ��ध्यक्ष एवं डीसी अशोक कुमार गर्ग ने जानकारी देते हुए बताया कि पुरस्कार पाने वाले बच्चों की आयु 6 वर्ष से 18 वर्ष के बीच होनी चाहिए और उन द्वारा बहादुरी का कार्य पहली जुलाईए 2021 से 30 सितंबर, 2022 तक किया हुआ हो। Haryana News: रणबांकुरो के…
View On WordPress
#DC rewari Ashok#Application for National Bravery Award till 15 October#DC REWARI#HARYANA NEWS#आवेदन 15 अक्टूबर#राष्ट्रीय वीरता पुरस्कार
0 notes
Photo
🇮🇳 कैप्टन विक्रम बत्रा, (९ September १९७४ – ७ जुलै १९९९), भारतीय सेना के एक अधिकारी थे। पढ़ाई में मेधावी होने के अलावा, बत्रा एक उत्सुक खिलाड़ी थे और दिल्ली में युवा संसदीय प्रतियोगिताओं के दौरान राष्ट्रीय स्तर पर अपने स्कूल का प्रतिनिधित्व करते थे। उन्होंने कई खेलों में उत्कृष्ट प्रदर्शन किया और टेबल टेनिस, कराटे और ऐसे अन्य खेलों में अपने स्कूल और कॉलेज का प्रतिनिधित्व किया। हालाँकि, यह टेबल टेनिस में था जहाँ उन्होंने वास्तव में उत्कृष्ट प्रदर्शन किया। १९९० में, उन्होंने और उनके जुड़वां भाई (विशाल बत्राजी) ने अखिल भारतीय केवीएस नेशनल्स में टेबल टेनिस में अपने स्कूल का प्रतिनिधित्व किया। वह कराटे में ग्रीन बेल्ट धारक भी थे और मनाली में एक राष्ट्रीय स्तर के शिविर में भाग लेने गए थे। परमवीर चक्र भारत का सर्वोच्च सैन्य अलंकरण है, जिसे युद्ध के दौरान वीरता के विशिष्ट कार्यों को प्रदर्शित करने के लिए प्रदान किया जाता है। परम वीर चक्र का अनुवाद "अंतिम बहादुर का पहिया" के रूप में किया जाता है, और यह पुरस्कार"दुश्मन की उपस्थिति में सबसे विशिष्ट बहादुरी" के लिए दिया जाता है। जब कैप्टन विक्रम बत्रा ने कारगिल में युद्ध के मैदान से 'ये दिल मांगे मोर' वाक्यांश का इस्तेमाल किया, तो इसका मतलब केवल एक ही था - उन्होंने अपना मिशन पूरा कर लिया था। सिद्धार्थ मल्होत्रा और कियारा आडवाणी अभिनीत शेरशाह को दर्शकों से सकारात्मक प्रतिक्रिया मिल रही है। कारगिल युद्ध के नायक कैप्टन विक्रम बत्रा के जीवन पर आधारित फिल्म अमेझोन प्राइम वीडियो पर स्ट्रीमिंग कर रही है। सिद्धार्थ जहां फिल्म में कैप्टन बत्रा की भूमिका निभाते हैं, वहीं कियारा उनकी लेडीलव डिंपल की भूमिका में दिखाई देती हैं। लोग फिल्म को पसंद कर रहे हैं। अभिनेताओं ने अपनी-अपनी भूमिकाओं के साथ पूरा न्याय किया है। अपने पिता के शब्दों में; ----------------------------- "विक्रम को जीवन में अपना उद्देश्य मिल गया था। उसने एक ऐसे धार्मिक मार्ग का रास्ता खोज लिया था जो उसे उसके लक्ष्य तक ले जाएगा - एक ऐसी सेवा के लिए जो असाधारण रूप से उच्च और सर्वोच्च थी।" जय हिंद 🇮🇳 @sidmalhotra @kiaraaliaadvani @primevideoin @batra7478 . . . . ,#captainvikrambatra #शेरशाह #shershah #shershaah #shershahmovie #siddharthmalhotra #kiaraadvani #kargilvijaydiwas #kargilwar #kargilwarmemorial #rememberingcaptainvikrambatra #indianarmy🇮🇳 #proudtobeindian #amazonprimevideo #bollywood #vishalbatra, (at India) https://www.instagram.com/p/CTWou71NKvP/?utm_medium=tumblr
#captainvikrambatra#शेरशाह#shershah#shershaah#shershahmovie#siddharthmalhotra#kiaraadvani#kargilvijaydiwas#kargilwar#kargilwarmemorial#rememberingcaptainvikrambatra#indianarmy🇮🇳#proudtobeindian#amazonprimevideo#bollywood#vishalbatra
0 notes
Text
इंसान की जान बचाने से ज्यादा बड़ी सेवा नहीं हो सकती: ओम बिरला
इंसान की जान बचाने से ज्यादा बड़ी सेवा नहीं हो सकती: ओम बिरला
नई दिल्ली:
बाल बाल अनुकरणीय साहस और अतिरिक्त हमुरी के अपने कार्यों के लिए हमारी शुभकामनाओं के पात्र हैं। लोकसभा अध्यक्ष ओम बिरला ने आज संसद भवन में राष्ट्रीय वीरता पुरस्कार से सम्मानित बच्चों से मुलाकात की और उनसे बातचीत की। इस साल देश के अलग-अलग हिस्सों से कुल 22 बच्चों को पुरस्कार दिया गया है, जिसमें एक मरणोपरांत प्रतिष्ठित शामिल है।
टिप्पणियां
इस अवसर पर बिरला ने कहा कि, “ये बहादुर बच्चे…
View On WordPress
#Brave Children#National Bravery Award#Om Birla#Sansad#इसन#ओम#ओम बिरला#क#जन#जयद#नह#बचन#बड#बरल#बहादुर बच्चे#राष्ट्रीय वीरता पुरस्कार#स#संसद भवन#सकत#सव#ह
0 notes
Text
नीदरलैंड की राष्ट्रीय क्रिकेट टीम के कप्तान स्कॉट एडवर्ड्स उम्मीद कर रहे हैं कि भारत की राष्ट्रीय क्रिकेट टीम के स्टार बल्लेबाज विराट कोहली नीदरलैंड के खिलाफ मैच में पाकिस्तान के खिलाफ अपनी वीरता को नहीं दोहराएंगे। आईसीसी पुरुष टी20 विश्व कप 2022 के 16वें मैच में, जो रविवार, 23 अक्टूबर को मेलबर्न क्रिकेट ग्राउंड में चिर-प्रतिद्वंद्वी भारत और पाकिस्तान के बीच खेला गया था, विराट कोहली ने 53 गेंदों पर 6 चौकों सहित 82 रनों की शानदार पारी खेली। प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार जीतने के लिए 4 छक्के। पाकिस्तान के मजबूत तेज आक्रमण के खिलाफ 160 रनों का पीछा करते हुए, भारत ने केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव और अक्षर पटेल के शुरुआती विकेट खो दिए और 31/4 पर आउट हो गए। फिर, विराट कोहली और हार्दिक पांड्या ने भारत की ओर गति को स्थानांतरित करने के लिए 113 रनों की साझेदारी की। हास्यास्पद रूप से नाटकीय अंतिम ओवर में हार्दिक आउट हो गए, लेकिन कोहली नाबाद रहे और भारत को नेल-बाइटिंग मैच में जीत के लिए निर्देशित किया। मेन इन ब्लू का अगला मुकाबला स्कॉट एडवर्ड्स की अगुवाई वाली नीदरलैंड्स नेशनल क्रिकेट टीम के साथ गुरुवार 27 अक्टूबर को सिडनी क्रिकेट ग्राउंड पर होगा। मैच से पहले की प्रेस कॉन्फ्रेंस में, नीदरलैंड्स के कप्तान स्कॉट एडवर्ड्स ने पाकिस्तान के खिलाफ कोहली के "असली" प्रदर्शन की सराहना की। लेकिन उन्हें उम्मीद थी कि 33 वर्षीय उनके खिलाफ अच्छा प्रदर्शन नहीं करेंगे। नीदरलैंड के कप्तान ने कहा, "विराट (कोहली) ने दूसरे दिन जो किया वह असली था। उम्मीद है कि वह हमारे खिलाफ इसे नहीं दोहराएगा।" बहुत से लोग हमसे जीतने की उम्मीद नहीं करते हैं, इसलिए हम पर ज्यादा दबाव नहीं है- स्कॉट एडवर्ड्स ICC पुरुषों की T20I टीम रैंकिंग में नंबर 1 रैंक वाली टीम के खिलाफ जीत। “बहुत से लोग हमसे जीतने की उम्मीद नहीं करते हैं, इसलिए हम पर बहुत अधिक दबाव नहीं है। हमारे क्रिकेट के ब्रांड का मतलब है अपनी क्षमता के अनुसार सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करना। बस हमारा ए-गेम लाओ। अगर काफी है तो काफी है। अगर ऐसा नहीं है, तो एडवर्ड्स ने कहा। "आप हमेशा विश्व कप खेलने का स���ना देखते हैं और यकीनन दुनिया की सर्वश्रेष्ठ टीमों में से एक के खिलाफ असली है," उन्होंने कहा। यह भी पढ़ें: ICC T20 विश्व कप 2022: "मैं हैरान नहीं था, मैं पता था कि यह ऑस्ट्रेलिया में होगा ”- विराट कोहली की “महानतम टी 20 दस्तक” पर रवि शास्त्री
नीदरलैंड की राष्ट्रीय क्रिकेट टीम के कप्तान स्कॉट एडवर्ड्स उम्मीद कर रहे हैं कि भारत की राष्ट्रीय क्रिकेट टीम के स्टार बल्लेबाज विराट कोहली नीदरलैंड के खिलाफ मैच में पाकिस्तान के खिलाफ अपनी वीरता को नहीं दोहराएंगे। आईसीसी पुरुष टी20 विश्व कप 2022 के 16वें मैच में, जो रविवार, 23 अक्टूबर को मेलबर्न क्रिकेट ग्राउंड में चिर-प्रतिद्वंद्वी भारत और पाकिस्तान के बीच खेला गया था, विराट कोहली ने 53 गेंदों पर 6 चौकों सहित 82 रनों की शानदार पारी खेली। प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार जीतने के लिए 4 छक्के। पाकिस्तान के मजबूत तेज आक्रमण के खिलाफ 160 रनों का पीछा करते हुए, भारत ने केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव और अक्षर पटेल के शुरुआती विकेट खो दिए और 31/4 पर आउट हो गए। फिर, विराट कोहली और हार्दिक पांड्या ने भारत की ओर गति को स्थानांतरित करने के लिए 113 रनों की साझेदारी की। हास्यास्पद रूप से नाटकीय अंतिम ओवर में हार्दिक आउट हो गए, लेकिन कोहली नाबाद रहे और भारत को नेल-बाइटिंग मैच में जीत के लिए निर्देशित किया। मेन इन ब्लू का अगला मुकाबला स्कॉट एडवर्ड्स की अगुवाई वाली नीदरलैंड्स नेशनल क्रिकेट टीम के साथ गुरुवार 27 अक्टूबर को सिडनी क्रिकेट ग्राउंड पर होगा। मैच से पहले की प्रेस कॉन्फ्रेंस में, नीदरलैंड्स के कप्तान स्कॉट एडवर्ड्स ने पाकिस्तान के खिलाफ कोहली के “असली” प्रदर्शन की सराहना की। लेकिन उन्हें उम्मीद थी कि 33 वर्षीय उनके खिलाफ अच्छा प्रदर्शन नहीं करेंगे। नीदरलैंड के कप्तान ने कहा, “विराट (कोहली) ने दूसरे दिन जो किया वह असली था। उम्मीद है कि वह हमारे खिलाफ इसे नहीं दोहराएगा।” बहुत से लोग हमसे जीतने की उम्मीद नहीं करते हैं, इसलिए हम पर ज्यादा दबाव नहीं है- स्कॉट एडवर्ड्स ICC पुरुषों की T20I टीम रैंकिंग में नंबर 1 रैंक वाली टीम के खिलाफ जीत। “बहुत से लोग हमसे जीतने की उम्मीद नहीं करते हैं, इसलिए हम पर बहुत अधिक दबाव नहीं है। हमारे क्रिकेट के ब्रांड का मतलब है अपनी क्षमता के अनुसार सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करना। बस हमारा ए-गेम लाओ। अगर काफी है तो काफी है। अगर ऐसा नहीं है, तो एडवर्ड्स ने कहा। “आप हमेशा विश्व कप खेलने का सपना देखते हैं और यकीनन दुनिया की सर्वश्रेष्ठ टीमों में से एक के खिलाफ असली है,” उन्होंने कहा। यह भी पढ़ें: ICC T20 विश्व कप 2022: “मैं हैरान नहीं था, मैं पता था कि यह ऑस्ट्रेलिया में होगा ”- विराट कोहली की “महानतम टी 20 दस्तक” पर रवि शास्त्री
नीदरलैंड राष्ट्रीय क्रिकेट टीम के कप्तान स्कॉट एडवर्ड्स उम्मीद कर रहे हैं कि भारत की राष्ट्रीय क्रिकेट टीम स्टार बल्लेबाज विराट कोहली नीदरलैंड के खिलाफ मैच में पाकिस्तान के संघर्ष से अपनी वीरता को नहीं दोहराता है। आईसीसी पुरुष टी20 विश्व कप 2022 के 16वें मैच में, जो रविवार 23 अक्टूबर को मेलबर्न क्रिकेट ग्राउंड में चिर-प्रतिद्वंद्वी भारत और पाकिस्तान के बीच खेला गया था, विराट कोहली ने 53 गेंदों पर…
View On WordPress
0 notes
Text
छत्तीसगढ़ की अमनज्योति को मिलेगा राष्ट्रीय बाल वीरता पुरस्कार
छत्तीसगढ़ की अमनज्योति को मिलेगा राष्ट्रीय बाल वीरता पुरस्कार
भारतीय बाल कल्याण परिषद ने की घोषणा रायपुर(realtimes) छत्तीसगढ़ के अमनज्योति जाहिरे को राष्ट्रीय बाल वीरता पुरस्कार वर्ष 2021 प्रदान किया जाएगा। भारतीय बाल कल्याण परिषद नई दिल्ली ने कोरबा जिला निवासी अमन ज्योति का चयन इस पुरस्कार के लिए किया है। उल्लेखनीय है कि साहसिक कार्यों और बहादुरी के लिए बच्चों को नगद राशि सहित प्रमाण पत्र के साथ भारतीय बाल कल्याण परिषद द्वारा हर साल यह पुरस्कार प्रदान…
View On WordPress
0 notes
Text
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. जळगाव येथील शिवांगी काळे हिने ‘वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने ‘नव संशोधन’ मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच ना��िकच्या स्वयम् पाटील याने ‘क्रीडा’ श्रेणीमध्ये प्रधानमंत्री…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 19 June 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ जून २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
छत्रपती शिव���जी महाराजांच्या जलदुर्गांवरचे जलस्रोत हा जलव्यवस्थापनाचा वस्तुपाठ;मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन
२०२१ चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूर या संस्थेला जाहीर
लोकशाही अबाधित ठेवण्यासाठीच विरोधी पक्ष एकत्र-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बीड जिल्ह्यात केज इथल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचं उद्घाटन
औरंगाबाद इथल्या योग शिक्षिका डॉ. चारुलता रोजेकर यांना क्रीडा भारती योग पुरस्कार' जाहीर
आणि
इंडोनेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडी अजिंक्य;धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माला सुवर्णपदक
सविस्तर बातम्या
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग आज शेकडो वर्षांनंतरही दिमाखात उभे असून त्यावरचे जलस्रोत हा जलव्यवस्थापनाचा वस्तुपाठ असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. `मन की बात` या आकाशवाणीवरच्या एकशे दोनाव्या कार्यक्रमात ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त रायगडासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्सव साजरा झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराजांच्या शौर्याबरोबरच, त्यांची शासनपद्धती आणि व्यवस्थापन कौशल्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, असं सांगतानाच, महाराजांनी जलव्यवस्थापनासंदर्भात केलेल्या कार्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं...
Byte…
साथियों जब प्रबंधन की बात हो रही है, तो मै आज छत्रपती शिवाजी महाराज को भी याद करूंगा। छत्रपती शिवाजी महाराज के वीरता के साथ ही उनकी गव्हर्नन्स और उनके प्रबंध कौशल से भी बहोत कुछ सिखने को मिलता है। विशेष कर जल प्रबंधन और नौ सेना को लेकर छत्रपती शिवाजी महाराज ने जो कार्य किये है, वो आज भी भारतीय इतिहास का गौरव बढाते है। उनके बनाये जलदुर्ग इतने शताब्दियों बाद भी समंदर के बीच में आज भी शान से खडे है।
बिपरजॉय चक्रीवादळाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, गेल्या काही वर्षांत भारतानं विकसित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद आज दिसून येत असल्याचं नमूद केलं. मुंबईसह देशाच्या विविध भागात मियावाकी जंगलांचा प्रसार वेगानं होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या अमेरिका दौऱ्यामुळे मन की बात हा कार्यक्रम एक आठवडा आधी घेत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. यंदा संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात आपण सहभागी होणार असल्याचं सांगत, प्रत्येकानं आपल्या दिनचर्येत योगाभ्यासाचा समावेश करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
देशाला २०२५ पर्यंत क्षयमुक्त बनवण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. लोकसहभाग हे या अभियानाचं सर्वात मोठं बलस्थान आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं.
****
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल मुंबईजवळ नालासोपारा इथं स्थानिक रहिवाशांसोबत मन की बात हा कार्यक्रम ऐकला. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.
****
औरंगाबाद इथं सिडको परिसरात भारतीय जनता पक्षाच्या महाजनसंपर्क अभियान - विकास तीर्थ याअंतर्गत, मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. सहकार मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते.
****
पुण्यात जी-20 कृतीगटाच्या शिक्षण विषयक बैठकीच्या अनुषंगानं सावित्रीबाई फुले विद्यापीठात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा काल समारोप झाला. प्रामुख्यानं शिक्षकांची क्षमता बांधणी या विषयावर तज्ञांनी आपले विचार मांडले. भारतातल्या काही राज्यांनी शिक्षक क्षमता बांधणीविषयी राबवलेल्या उपक्रमांची या परिषदेत माहिती देण्यात आली.
****
२०२१ चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूर या संस्थेला जाहीर झाला आहे. गीता प्रेस गोरखपूर शंभर वर्षे जुनी संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षततेतील निवड समितीनं काल ही घोषणा केली. एक कोटी रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था -आयआयटी मध्ये प्रवेशासाठी असणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा - जेईईचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत हैद्राबाद विभागातला वाविलाला रेड्डी देशभरातून सर्वप्रथम आला आहे.
****
देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठीच आम्ही विरोधी पक्ष एकत्र आलो असल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल पक्षाच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रातल्या भाजप सरकारवर टीका केली. राज्यातले कट्टर शिवसैनिक आपल्याबरोबर असून गद्दारांपेक्षा निष्ठावंताचं नेतृत्व करण्यात अधिक आनंद असल्याचं ठाकरे म्हणाले.
पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना, राज्यातल्या आणि मुंबईतल्या विकास कामांमध्ये शिवसेनेच्या योगदानाची माहिती दिली.
तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीविषयक धोरण, कायदा आणि सुव्यवस्था, भाजपच्या जाहीरनाम्यातल्या फसलेल्या घोषणा, आदी मुद्द्यांवर सरकारवर टीका केली.
****
काँग्रेस नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी काल नागपूर इथं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रसेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनसामान्यांच्या हितासाठी ते अविरत काम करत असतात, त्यामुळे त्यांना कुणीही पराभूत करू शकत नाही, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आमदार कायंदे यांचं पक्ष प्रवक्ते पद रद्द केल्याचं पत्रक काल संध्याकाळी जारी केलं. कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद इथं असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याच्या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज झाले आहेत, असं विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल बारामती इथं वार्ताहरांशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ आहेत, काय करावे, हा त्यांच्या विवेकबुद्धीनुसार त्यांचा अधिकार आहे. मात्र शिवप्रेमींना हे योग्य वाटत नाही, असं पवारांनी नमूद केलं.
****
न्यायालय हे पक्षकारांसाठी आहे, पक्षकारांसाठीचा न्याय निर्णय हाच न्यायदान असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात केज इथल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचं उद्घाटन काल न्यायमूर्ती घुगे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट, न्यायमूर्ती रविंद्र जोशी, बीड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधिश आनंद यावलकर यावेळी उपस्थित होते. वकील संघाच्या न्याय्य मागण्याची नक्कीच दखल घेऊन विचार केला जाईल, असं आश्वासन न्यायमूर्ती जोशी यांनी यावेळी दिलं.
****
येत्या २१ जून ला आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. योगाचं महत्त्व सर्वांना समजावं या��रता हा दिवस साजरा केला जातो. योगक्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ योगशिक्षक रवी दीक्षित यांनी अंगदुखी, सांधेदुखीवर योगापासून होणाऱ्या लाभाविषयी माहिती दिली….
Byte…
शरीराची हालचाल चांगली ठेवली, दर एक तासाने हालचाल केली शरीराची, इकडे तिकडे फेरी मारली, तर रक्तसंचार चांगला होणार, आणि जे शरीराचं दुखणं आहे, शरीरामध्ये काही ताणतणाव आहेत, ते कमी होणार. कारण शरीरातील रक्तसंचार चांगला होणार. तर सर्वांनी दर अर्ध्या तासाने, एक तासाने थोडा योग करायचा, हातापायाची हालचाल करायची, आणि फेरी मारायची. महत्त्वाचं आहे की, हातापायाची बोटं हलवून घ्यायची, हे केल्यानंतर आपलं दुखणं नक्की कमी होणार.
****
क्रीडा भारती या खेळासाठी समर्पित संघटनेचा 'क्रीडा भारती योग पुरस्कार' यंदा औरंगाबादच्या योग शिक्षिका डॉ. चारुलता रोजेकर यांना जाहीर झाला आहे. २१ जून रोजी जगभरात साजरा केला जाणाऱ्या जागतिक योग्य दिनाच्या निमित्तानं हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा भारतीचे प्रमुख पंकज भारसाखळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
****
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं कालपासून तीन दिवसीय पूर्वतयारी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात होत असलेल्या या शिबिराचं उद्घाटन काल आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते झालं.
****
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं इंडोनेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचा किताब पटकावला आहे. जकार्ता इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं मलेशियाच्या ॲरॉन चिया आणि सोह वुई यिक या जोडीचा २१-१७, २१-१८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
****
कोलंबियाच्या मेडेलिन इथं सुरु असलेल्या धनुर्विद्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा यानं सुवर्णपदक पटकावलं. यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा हा तिसरा तिरंदाज ठरला असून, भारतीय संघानं आतापर्यंत तीन सुवर्ण आणि तीन कांस्यपदकं जिंकली आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी नऊ आणि दहा सप्टेंबरला मेक्सिकोच्या हेरमेसिलो इथं होणार आहे.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचं वितरण या महिन्यात होत आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खातं आधारशी संलग्न करणं आणि ई-केवायसी प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. यासाठी लातूर जिल्ह्यात उद्या आणि परवा प्रत्येक गावात कृषी विभागामार्फत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शिबिरात सहभागी होवून बँक खातं आधारशी संलग्न करुन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरालगत झाल्टा फाटा परिसरात भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. पिंटोसिंग राजपूत, गजानन मोहिते आणि कमलेशसिंग राजपूत हे तिघे मजूर, कामासाठी झाल्टा परिसरातून आडगाव इथं पायी जात असताना भरधाव ट्रकनं त्यांना उडवलं. यात पिंटोसिंग आणि गजानन यांचा मृत्यू झाला.
****
ओडिशातल्या जगन्नाथ पुरी इथं होत असलेल्या रथोत्सवासाठी नांदेड ते खुर्दा रोड ही विशेष रेल्वेगाडी आज नांदेड इथून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी निघणार आहे. ही गाडी उद्या मंगळवारी बेरहामपूरमार्गे दुपारी साडेचार वाजता खुर्दा रोड इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता खुर्दा रोड इथून निघून नांदेड इथं बुधवारी रात्री पोहोचेल.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे एकूण सहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या आठवडाभरासाठी तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. यानुसार, नांदेड ते निजामाबाद ही रेल्वे २५ जूनपर्यंत, निजामाबाद-नांदेड रेल्वे आजपासून २६ जूनपर्यंत, तसंच पूर्णा ते परळी वैजनाथ आणि परळी वैजनाथ-पूर्णा या रेल्वेगाड्या आजपासून २५ जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
यासोबतच, दौंड-निजामाबाद रेल्वे २४ जूनपर्यंत मुदखेड-निजामाबाद दरम्यान, तर निजामाबाद-पंढरपूर रेल्वे आजपासून २५ जूनपर्यंत निजामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
****
बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात किरकोळ पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातल्या नांदेड, हिंगोलीसह काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता औरंगाबाद इथल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली आहे. २३ जूननंतर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी पूर्वमोसमी, तर काही ठिकाणी मोसमी पावसाला सुरुवात होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
Text
रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने भारतीय तटरक्षक बल के कर्मियों को प्रदान किए वीरता और मेधावी सेवा पदक
New Post has been published on https://lokkesari.com/raksha-mantri-shri-rajnath-singh-presents-gallantry-and-medevvy-service-medal-to-indian-coast-guard-personnel.html
रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने भारतीय तटरक्षक बल के कर्मियों को प्रदान किए वीरता और मेधावी सेवा पदक
नई दिल्ली / रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने 09 अक्टूबर, 2021 को नई दिल्ली में आयोजित एक अलंकरण समारोह में भारतीय तटरक्षक (आईसीजी) कर्मियों को वीरता और मेधावी सेवा पदक प्रदान किए। तीन राष्ट्रपति तटरक्षक पदक (प्रतिष्ठित सेवा) सहित कुल 21 पुरस्कार, समारोह के दौरान आठ तटरक्षक पदक (वीरता) और 10 तटरक्षक पदक (मेधावी सेवा) प्रदान किए ।उन्होंने विजेताओं को शुभकामनाएं दीं और विश्वास व्यक्त किया कि इन पुरस्कारों और पदकों से न केवल पुरस्कार विजेताओं का मनोबल बढ़ेगा, बल्कि अन्य आईसीजी कर्मियों को भी राष्ट्र के हितों की रक्षा के लिए अपना सर्वश्रेष्ठ देने के लिए प्रेरित किया जाएगा।
राजनाथ सिंह ने समुद्री सीमाओं की सुरक्षा बनाए रखने और देश की विशाल तटरेखा को सुरक्षित रखने में आईसीजी के प्रयासों की सराहना की।उनकी ऊर्जा और समर्पण की सराहना करते हुए, रक्षा मंत्री ने कहा, आईसीजी, जिसने सिर्फ 4-6 नावों के साथ राष्ट्र के लिए अपनी सेवा शुरू की, अब 150 से अधिक जहाजों और 66 विमानों के साथ दुनिया की सबसे अच्छी समुद्री सेनाओं में से एक है। उन्होंने कहा कि यह लगातार बढ़ता हुआ कद लोगों में यह विश्वास जगाता है कि राष्ट्रीय समुद्री हित सुरक्षित निगरानी में हैं।
इसी क्रम में उन्होंने कहा कि भारत की संस्कृति, साहित्य, व्यापार और अर्थव्यवस्था का समुद्र से गहरा संबंध है । समृद्धि की संभावनाओं के साथ-साथ समुद्र ने विभिन्न सुरक्षा चुनौतियों का भी सामना किया है। उन्होंने देश की समुद्री सुरक्षा को मजबूत करने के सरकार के संकल्प को आवाज दी, इसे व्यापक आंतरिक और बाहरी सुरक्षा ढांचे का एक महत्वपू��्ण पहलू बताया। “भारत के समुद्री क्षेत्र सुरक्षित, सुरक्षित और प्रदूषण मुक्त होने चाहिए। यह हमारी सुरक्षा जरूरतों को पूरा करेगा और पर्यावरणीय स्वास्थ्य और आर्थिक विकास सुनिश्चित करेगा।”
रक्षा मंत्री ने कहा कि ‘निर्बाध समुद्री गतिविधि’ को तीव्र विकास के पथ पर आगे बढ़ने की आवश्यकता बताया। उन्होंने कहा कि भारत एक उभरती हुई समुद्री शक्ति है और इसकी समृद्धि काफी हद तक समुद्र पर निर्भर है। प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी के ‘सागर’, यानी ‘क्षेत्र में सभी के लिए सुरक्षा और विकास’ के दृष्टिकोण का उल्लेख करते हुए, उन्होंने क्षेत्रीय सहयोग को बढ़ावा देने, हिंद महासागर में समुद्री शांति बनाए रखने के द्वारा उस लक्ष्य को प्राप्त करने में सबसे आगे रहने के लिए आईसीजी की सराहना की।
राजनाथ सिंह ने पड़ोसी देशों को जरूरत पड़ने पर सहायता प्रदान करने के अपने वीरतापूर्ण कार्यों के लिए भी आईसीजी की प्रशंसा की। उन्होंने आईसीजी – सागर रक्षा- I ‘और सागर रक्षा- II’ के अग्निशमन और प्रदूषण प्रतिक्रिया संचालन का विशेष उल्लेख किया – जिसने बड़े कच्चे तेल वाहक ‘न्यू डायमंड’ और कंटेनर में लगी आग को बुझाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई और जहाज ‘एक्सप्रेस पर्ल’ हाल ही में श्रीलंका के तट पर। उन्होंने कहा कि इन समय पर और साहसी क���र्यों ने आईओआर में बड़ी तबाही को टाल दिया और भारत को एक जिम्मेदार और सक्षम समुद्री शक्ति के रूप में स्थापित किया है।
रक्षा मंत्री ने हाल ही में आए चक्रवात ‘तौकते’ और ‘यस’ के दौरान बहुमूल्य जीवन बचाने में आईसीजी द्वारा निभाई गई सराहनीय भूमिका को याद किया। उन्होंने अवैध हथियारों और नशीले पदार्थों की तस्करी के खिलाफ अपने अभियानों के लिए आईसीजी की प्रशंसा करते हुए कहा कि ‘समुद्र के प्रहरी’ न केवल वर्तमान की चुनौतियों से निपट रहे हैं, बल्कि देश के भविष्य को सुरक्षित और मजबूत करने के लिए भी काम कर रहे हैं।
पिछले एक साल में, ICG ने 70 चिकित्सा निकासी की, 555 खोज और बचाव अभियान चलाए और 1,090 से अधिक लोगों की जान बचाई।
अलंकरण समारोह के बाद, रक्षा मंत्री ने 38वें तटरक्षक कमांडरों के सम्मेलन को भी संबोधित किया। तीन दिवसीय सम्मेलन के दौरान आईसीजी को मजबूत करने के साथ-साथ महासागरों के वैध कानूनी उपयोग से संबंधित मुद्दों की एक विस्तृत श्रृंखला पर चर्चा की जाएगी।
इस अवसर पर महानिदेशक आईसीजी श्री के नटराजन और रक्षा मंत्रालय और भारतीय तटरक्षक बल के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
0 notes
Text
राष्ट्रीय वीरता पुरस्कार के लिए आवेदन आमंत्रित, यहाँ करे आवेदन
राष्ट्रीय वीरता पुरस्कार के लिए आवेदन आमंत्रित, यहाँ करे आवेदन
गरियाबंद, जिले के बालक -बालिकाओं से राष्ट्रीय वीरता पुरस्कार के लिए निर्धारित प्रारूप में आवेदन 1 अक्टूबर 2021 तक आमंत्रित किया गया है। राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हेतु बालक-बालिका द्वारा अपनी जान की परवाह किये बिना दूसरे की जान बचाने हेतु वीरता का किया गया कार्य, उम्र घटना दिनांक को कम से कम 6 वर्ष एवं अधिकतम 18 वर्ष तक, शौर्य पुरस्कार की अवधि 1 जुलाई 2020 से 30 जून 2021 के मध्य हो। शौर्य पुरस्कार…
View On WordPress
#Applications invited for National Bravery Award#apply here#CG DAILY TIMES#cg daily times bhatha gao#cg daily times cricket match#cg daily times durg#CG DAILY TIMES GARIABAND#cg daily times khabar#cg daily times news#chhattisgarh aaj ka news#chhattisgarh crime news#chhattisgarh khabr#chhattisgarh news#chhattisgarh news in English#chhattisgarh news live#chhattisgarh news today#news in hindi#news today#पुरस्कार#यहाँ करे आवेदन#राष्ट्रीय वीरता#राष्ट्रीय वीरता पुरस्कार के लिए आवेदन आमंत्रित#शौर्य पुरस्कार
0 notes
Text
सेना के छह शूरवीरों को शौर्य चक्र, अपनी बहादुरी से J&K में आतंकियों के मंसूबों पर फेरा पानी Divya Sandesh
#Divyasandesh
सेना के छह शूरवीरों को शौर्य चक्र, अपनी बहादुरी से J&K में आतंकियों के मंसूबों पर फेरा पानी
नई दिल्लीआतंकवा��� विरोधी अभियानों में बहादुरी का प्रदर्शन करने के लिए सेना के छह शूरवीरों को से सम्मानित किया गया है। यह भारत का तीसरा सबसे बड़ा वीरता पदक है। भारतीय सेना के अनुसार, यह प्रतिष्ठित पुरस्कार पाने वालों में मेजर अरुण कुमार पांडे, मेजर रवि कुमार चौधरी, कैप्टन आशुतोष कुमार (मरणोपरांत), कैप्टन विकास खत्री, राइफलमैन मुकेश कुमार और सिपाही नीरज अहलावत शामिल हैं।
सेना ने बताया कि स्वतंत्रता दिवस की पूर्व संध्या पर सेना के चार कर्मियों को ‘बार टू सेना’ पदक से सम्मानित किया गया, जबकि 116 अन्य को सेना पदक के लिए नामित किया गया। राष्ट्रीय राइफल्स की 44वीं बटालियन के मेजर पांडे ने पिछले साल नौ और 10 जून को जम्मू-कश्मीर के एक गांव में आतंकवाद विरोधी अभियान का नेतृत्व किया और अभियान के दौरान ‘अद्वितीय साहस’ का प्रदर्शन किया।
सेना ने कहा कि राष्ट्रीय राइफल्स की 55वीं बटालियन के मेजर चौधरी ने अपनी यूनिट की ओर से चार सफल अभियानों का नेतृत्व करने ��ें ‘असाधारण दृढ़ संकल्प’ और दृढ़ता का प्रदर्शन किया। इसके परिणामस्वरूप 13 आतंकवादियों का सफाया हुआ। पिछले साल तीन जून को उनके नेतृत्व में एक अभियान का उनके प्रशस्ति पत्र में विशेष रूप से उल्लेख किया गया था।
मद्रास रेजिमेंट की 18वीं बटालियन के कैप्टन कुमार को ‘अदम्य साहस’ प्रदर्शित करने के लिए मरणोपरांत शौर्य चक्र पुरस्कार से सम्मानित किया गया है। पिछले साल आठ नवंबर को एक अभियान में उन्होंने अपने एक साथी सैनिक की जान बचाने और एक कट्टर आतंकवादी का खात्मा करने के लिए उच्च स्तर का पेशेवर कौशल दिखाया था।
राष्ट्रीय राइफल्स की 16वीं बटालियन के कैप्टन विकास खत्री को पिछले साल 12 और 13 दिसंबर की रात को 12,000 फुट की ऊंचाई पर चुनौतीपूर्ण इलाके के तहत जम्मू-कश्मीर में एक गश्त क्षेत्र के विशेष कार्य के वास्ते तैनात किया गया था। सेना ने कहा कि उन्होंने भारी जवाबी कार्रवाई के बावजूद साहस और बहादुरी का परिचय देते हुए एक विदेशी आतंकवादी को मार गिराया।
राष्ट्रीय राइफल्स की नौवीं बटालियन के राइफलमैन कुमार 16 जुलाई की रात को जम्मू-कश्मीर के एक दूरदराज के गांव में आतंकवादियों की संभावित मौजूदगी की खुफिया जानकारी के आधार पर एक खोजबीन अभियान का हिस्सा थे।
सेना ने कहा, ‘कुमार ने आतंकवादी का मुकाबला किया। वह गोली लगने से घायल होने के बावजूद अपने हथियार की बट से आतंकवादी पर हमला करते रहे।’
सेना के मुताबिक, ‘अपने जख्म की परवाह किए बिना राइफलमैन मुकेश कुमार ने काफी करीब से आतंकवादी को मार गिराया और यह सुनिश्चित किया कि साथी सैनिक या आम नागरिक जख्मी नहीं हों।’
सेना के अनुसार, सिपाही अहलावत को पिछले साल 20 जून को जम्मू-कश्मीर में आतंकवाद विरोधी अभियान के दौरान असाधारण वीरता दिखाने के लिए शौर्य चक्र पुरस्कार से सम्मानित किया गया है। अभियान में एक कट्टर पाकिस्तानी आतंकवादी को मार गिराया गया था। अहलावत के वीरतापूर्ण कृत्यों से एक पाकिस्तानी आतंकवादी का सफाया हुआ था।
0 notes
Text
महारानी एलिजाबेथ कोविड की सेवा के लिए यूके के स्वास्थ्य कर्मियों का सम्मान करेंगी
महारानी एलिजाबेथ कोविड की सेवा के लिए यूके के स्वास्थ्य कर्मियों का सम्मान करेंगी
रानी ने कहा, “आप (एनएचएस कर्मचारी) हम सभी का स्थायी धन्यवाद और हार्दिक सराहना करते हैं।” लंडन: ब्रिटेन की महारानी एलिजाबेथ ब्रिटेन की राज्य द्वारा संचालित राष्ट्रीय स्वास्थ्य सेवा (एनएचएस) को महामारी के दौरान स्वास्थ्य कर्मियों की सेवा के लिए देश के सर्वोच्च नागरिक सम्मान से सम्मानित करेगी, सरकार ने सोमवार को घोषणा की। जॉर्ज क्रॉस का पुरस्कार, जो असाधारण सैन्य वीरता के लिए ब्रिटेन के विक्टोरिया…
View On WordPress
0 notes
Text
सकारात्मक भाव और ईमानदारी से की गई कोशिश होती है फलीभूत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
सकारात्मक भाव और ईमानदारी से की गई कोशिश होती है फलीभूत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
सकारात्मक भाव और ईमानदारी से की गई कोशिश होती है फलीभूत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार: 2021 से सम्मानित उत्तर प्रदेश के पांच होनहार बच्चों को प्रदेश की इंद्रधनुषी प्रतिभा, क्षमता और विशिष्टता की पहचान कहा है। मुख्यमंत्री ने कहा है कि वीरता, विद्वता, इनोवेशन, खेल, कला और संगीत के विलक्षण प्रतिभासंपन्न इन बच्चों ने स्वयं को…
View On WordPress
0 notes
Text
REPUBLIC DAY 2021: नीलम काण्डपाल ने संभाली नौसेना के मार्चिंग दस्ते की कमान, इन महिलाओं ने भी जीते कई वीरता पुरस्कार
REPUBLIC DAY 2021: नीलम काण्डपाल ने संभाली नौसेना के मार्चिंग दस्ते की कमान, इन महिलाओं ने भी जीते कई वीरता पुरस्कार
नई दिल्ली: आज देश भर में 72वां गणतंत्र दिवस बड़े धूमधाम से मनाया जा रहा है. कोरोना वायरस महामारी के चलते इस बार का रिपब्लिक डे थोड़ा अलग है. लेकिन सेना की ओर से प्रस्तुत की जाने वाली परेड में किसी भी तरह की कोई कमी नहीं रही. इस बार नौसेना की झांकी 1971 के युद्ध के स्वर्णिम विजय वर्ष पर आधारित थी. हर क्षेत्र में महिलाओं की भागीदारी को नकारा नहीं जा सकता. महिलाएं भारत के राष्ट्रीय पर्वों पर नेतृत्व…
View On WordPress
#indian navy neelam kandpal#president ram nath kovind#rajpath#republic day 2021#republic day celebration 2021#Republic Day Parade#republic day special#नीलम काण्डपाल
0 notes
Photo
गृह मंत्रालय ने किया वीरता पुरस्कारों का ऐलान : यूपी समेत कई राज्य सम्मिलित
नई दिल्ली। देश में हर साल 15 अगस्त को भारत में स्वतंत्रता दिवस मनाया जाता है |इतना ही नहीं स्वतंत्रता दिवस को देशभर में काफी धूमधाम से राष्ट्रीय पर्व के रूप में बनाया जाता है | इस दिन भारत के प्रधानमंत्री लालकिले की प्राचीर से झंडा फहराते हैं। स्वतंत्रता दिवस के मौके पर पुलिस कर्मियों (Police Medal 2020) को दिए जाने वाले वीरता पुरस्कारों और सर्विस अवॉर्ड की लिस्ट जारी कर दी गई है। गृह मंत्रालय ने बताया कि 215 कर्मियों को वीरता के लिए पुलिस पदक, 80 को राष्ट्रपति पुलिस पदक, विशिष्ट सेवा के लिए और 631 को पुलिस पदक दिया जाएगा। इस लिस्ट में यूपी में 23 पुलिस कर्मियों को गैलेंट्री, 6 को राष्ट्रपति पदक और 73 को पुलिस मेडल दिया जाएगा। वहीं, जम्मू-कश्मीर में 81 को गैलेंट्री, 1 को राष्ट्रपति पदक और 12 को पुलिस पदक दिया जाएगा। महाराष्ट्र से 14 को गैलेंट्री, 5 को राष्ट्रपति पदक और 39 को पुलिस पदक दिए गए हैं।
आइये जाने कि�� राज्यों के कितने पुलिस कर्मियों को मिलेंगे पुरस्कार
देश के इन राज्यों के पुलिस को पुरस्कार दिए जायेंगे जिसमे जम्मू-कश्मीर पुलिस के 94 जवानों को पुरस्कार दिए जाएंगे। यूपी के 102 जवान सम्मानित किए जाएंगे. गृह मंत्रालय द्वारा जारी की गई सूची के अनुसार आंध्र प्रदेश के 16, अरुणचाल के 4, असम के 21, छत्तीसगढ़ के 14, गोवा के 1, गुजरात के 19, हरियाणा के 12, हिमाचल प्रदेश के 4, झारखंड के 24, कर्नाटक के 19, केरल के 6, मध्य प्रदेश के 20 जवानों को सम्मानित किया जाएगा।
स्वतंत्रता दिवस : जानें आखिर इसी दिन क्यों बनाते है स्वतंत्रता दिवस …
https://kisansatta.com/home-ministry-announced-bravery-awards-many-states-including-up/ #Breakingnews, #INDIANGOVERNMENTNEWS, #Hindinews #breakingnews, #INDIANGOVERNMENTNEWS, hindinews National, Top, Trending #National, #Top, #Trending KISAN SATTA - सच का संकल्प
0 notes