#यंदा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
बेकायदा धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून शांततेत सुरुवात
४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून प्रारंभ
आणि
मराठा आरक्षणासंदर्भात मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शासनाला पंधरा दिवसांची मुदत
****
बेकायदा धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी राज्यसरकारने पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग, अल्पसंख्याक व्यवहार विभाग, विधी आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा समावेश आहे.
ही समिती बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विषयी राज्यातल्या सद्यस्थितीचा अभ्यास करेल, आणि यासंदर्भातल्या तक्रारींवरील कार्यवाहीसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहे. इतर राज्यांमधल्या यासंदर्भातल्या कायद्यांचा ही समिती अभ्यास करणार आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला. देशातल्या ७ हजार ८४२, तर परदेशातल्या २६ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. यंदा दहावीच्या परीक्षांसाठी २४ लाख १२ हजारापेक्षा जास्त तर बारावीच्या परीक्षांसाठी १७ लाख ८८ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीच्या परीक्षा १८ मार्च, तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपणार आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं समुपदेशन सेवाही सुरू केली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळात ही सेवा उपलब्ध असेल.
****
जगभरातील युवा नेत्यांच्या सुसंवादातून जगासमोरील सामायिक आव्हानांवर उपाय शोधता येतील, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत फोरम ऑफ यंग ग्लोबल लिडर्सच्या ५० युवा सदस्यांनी आज मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी संपत्ती निर्माण करावी मात्र अर्जित संपत्तीचा समाजासाठी वापर करावा, असं आवाहन राज्यपालांनी केलं. यावेळी युवा उद्योजक अमेय प्रभू, गौरव मेहता यांच्यासह ४० देशातील नेते उपस्थित होते.
****
कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याऐवजी, कॅलिफोर्नियाला कोकणासारखं व्हावंसं वाटेल, असं का करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज रत्नागिरी इथं पक्षाच्या आभार सभेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळालेल्या विजयामध्ये कोकणी माणसाचा वाटा मोठा आहे, या विजयाने विरोधकांची बोलती बंद केली, अशी भावनाही शिंदे यांनी व्यक्त केली.
****
पर्यटकांना जगभर फिरवून आणणारे केसरी टुर्सचे संचालक केसरी पाटील यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पर्यटन व्यवसायातले रोजगार आणि व्यवसाय तसंच व्यवस्थापन संधीची माहिती देऊन अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केसरी पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
संत सेवालाल महाराजांचा २८६वा जन्मसोहळा आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं आठवडाभरापासून श्रीमद् भागवत सप्ताह, ग्रंथ लिलामृत कथा, कलश पालखी सोहळा, शोभायात्रा मिरवणुक, भजन, कीर्तन आदीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
****
संत सेवालाल महाराज यांच्या २८६व्या जयंतीनिमित्त हिंगोली इथं आज आरोग्य तपासणी आणि ��क्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथंही विविध संस्था संघटनांच्या वतीनं सेवालाल महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उभारलेल्या विलासराव देशमुख साहित्य नगरीतून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. मसिआचे अधक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आलं. या ग्रंथदिंडीत लेझीम पथक, लाठी काठी पथक, भजनी मंडळ सहभागी झालं होतं. लाठी काठी फिरवण्याचं प्रात्यक्षिक तसंच भारूड आणि देशभक्तीपर गीतं सादर करून या कलाकारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.
त्यानंतर मुख्य मंडपात संमेलनाध्यक्ष डॉ भीमराव वाघचौरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. पालकमंत्री संजय शिरसाट, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष विजय राऊत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उद्यापर्यंत चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासूनचं नियोजित साखळी उपोषण पुढे ढकललं आहे. शासनाने आपल्या चार मागण्यांपैकी दोन मागण्यांबाबत निर्णय घेतला आहे, उर्वरित दोन मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला पंधरा दिवसाचा वेळ देत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शिवाजीनगर भुयारी बोगद्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मंत्री अतुल सावे तसंच खासदार संदिपान भुमरे यांच्यासह परिसरात���ल नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे शहरातील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. दोन वर्षापासून बीड बायपास वर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताची मालिका देखील आता थांबेल, अशी अपेक्षा मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी व्यक्त केली.
****
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना देशभरातील ऊर्जा कंपन्यांमधून सर्वोत्कृष्ट अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून गौरवण्यात आलं आहे. गव्हर्नन्स नाऊ या प्रतिष्ठित नियतकालिकाच्यावतीनं काल मुंबईत घेतलेल्या ‘वेस्टेक सिम्पोसियम अँड ॲवॉर्ड २०२५’ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातील धानुरी इथं ��हाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात-उमेद अभियानाच्या सहकार्यातून अंबिका महिला बचत गटाने गो- संवर्धनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे. या बचतगटाने गोमूत्र आणि शेणांच्या गोवऱ्यापासून दंतमंजन करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. याशिवाय पंचगव्यापासून अमृतधारा नावाचं गुणकारी तेल, पंचगव्य बाम, पंचगव्य साबण यासारखी उत्पादनं तयार केली आहेत. बचत गटाच्या महिलांनी याबाबत अधिक माहिती दिली –
नमस्कार. माझे नाव पुष्पावती लक्ष्मण बाबर. मी दंत्तमंजन घेतलेलं आहे. आणि सेंद्रीय खताची शेती केलेली आहे. गोमुत्र आम्ही फवारणीसाठी वापर करतो. म्हणून आमचं पीकपाणी, उत्पन्न वाढतंय.
नमस्कार. माझे नाव वैशाली साळुंखे. मी धानोरीमध्ये २०२० पासून सी आर पी म्हणून काम करत आहे. यांना आम्ही प्रोत्साहन केले की त्यांच्याकडे देशी गाई आहेत. त्यांनी म्हणले प्रॉडक्ट आम्ही बनवू शकतो, पण प्रॉडक्ट बनवण्यासाठी पैसा नाही. मग आम्ही अंतर्गत कर्ज दिलं. बँकेचं कर्ज मिळवून दिलंय. ग्रामसंघातून, सी आय एफच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन केलं की तुम्ही प्रॉडक्ट तयार करा.
****
हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात आज शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवकालीन आणि ऐतिहासिक नाण्यांचं प्रदर्शनाचे उदघाटन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात देशविदेशातील नाणी, नोटांचं प्रदर्शन आणि त्यांचा इतिहास मांडण्यात आला. शहरातील युवक वैभव कोटकर यांनी दहा वर्षापासून या नाण्यांचं आणि नोटांचं संकलन केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं पोलिसांनी एमडी हा अमंलीपदार्थ विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी अंमलीपदार्थांनच्या ५९ पुड्या जप्त केल्या असून, त्याची किंमत अडीच लक्ष रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी एक वाहन, मोबाईल यासह एकून दहा लाख ७५ हजार रुपये किमतीचा मद्देमाल जप्त केला आहे.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. या योजनेचा महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील साडेनऊ हजारांहून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला आहे, अशी माहीती छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अन��दान दिलं जातं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मालमत्ता धारकांकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेकडून सातत्याने प्रभावीपणे मोहीम राबवण्यात येत आहे.
****
0 notes
Text
खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन - महासंवाद
मुंबई, दि. 2 :- केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराॲथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/369f0c1ff277dc468fd27bd6d3485b0d/4174939d7d9c1caa-1d/s540x810/81b1cd5ae68167b2994312034d1b9039ab0dec72.jpg)
View On WordPress
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : १७
मित्रांबरोबर शुक्रवारची सकाळची चहा, खाणं आणि गप्पांची मैफिल संपवून अनंत घरीं परतला तो एक आवडतं जुनं गाणं गुणगुणतच! 'आपण पक्के बेसुरे आहोंत' याची पुरेपूर जाणीव असल्याने तो कधी तोंड उघडून गायच्या वगैरे फंदात पडत नसे. तथापि जुन्या, लोकप्रिय गाण्यांची मनापासून आवड असल्याने खुशीत असला की एखादं आवडीचं गाणं हलकेच गुणगुणायची त्याची संवय शुभदाला माहीत असल्याने 'आज काय खुशीचं कारण?' या विचाराने तिचंही कुतूहल जागृत झालं! त्यांतच अनंतने येतांना आणलेलं नेहमींपेक्षा मोठं पार्सल ��िच्या हातांत देतांना "आधी मी काय-काय आणलं आहे ते बघ आणि मग जोडीला काही लागेल ते बनव!" असं सांगितल्याने ती चकीतच झाली. कपडे बदलण्यासाठी बेडरूममधे जाणा-या अनंतकडे कौतुकाने हंसून बघत ती स्वतःशीच पुटपुटली, "आज एवढं खुश व्हायला काय झालं आहे, कुणास ठाऊक!"
रोजच्याप्रमाणे दुपारी एक वाजेपर्यंत अनंतने स्नान करून देवपूजा वगैरे नित्यक्रम उरकले आणि डायनिंग टेबलापाशी येऊन बसत तो म्हणाला, "मला आज संध्याकाळीं ५ वाजतां आमच्या ग्रुपच्या मनोहर भोसलेंबरोबर बाहेर जायचं आहे!" "अरे, वा! आज संध्याकाळीं तुमच्या 'खाबु ग्रुप'ची पुन: बैठक आहे वाटतं? म्हणून कां स्वारी एवढी खुश आहे?" शुभदाने केलेली चेष्टा लक्षांत न येऊन अनंत म्हणाला, "अग, सकाळी झाली की आमच्या ग्रुपची बैठक! आज संध्याकाळी फक्त मी आणि भोसले दोघेच जाणार आहोंत! तुला आठवतंय् कां, मध्यंतरी भोसलेंनी आपल्याला काय ऑफर दिली होती?" ही प्रस्तावना म्हणजे कुठल्यातरी खोड्यांत स्वत:ला अडकवण्याची नांदी असल्याचा दाट संशय येऊन शुभदा सावधपणे म्हणाली, " तुमच्या 'खाबु ग्रुप'मधील मित्रांच्या ऑफर्स ना, तुमचा रिकामा वेळ जाण्यासाठी, तुमच्यापुरत्या असतात! मला माझी नेहमींची भरपूर कामं आहेत, दुसर्या कुठल्या फंदात पडण्यापेक्षा! रिटायर झाल्यापासून तुम्हांला आराम आहे, पण माझी कुठली कामं कमी झाली आहेत ते सांगा!" आपल्याच नादांत अनंत पुढे सांगू लागला,"बरं शुभदा, माझा रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी समज! मनोहर भोसलेंना सामाजिक कार्यामधे रस आहे;-- म्हणून मी त्यांना कांही समाजकार्य माझ्यासाठी सुचवा असं सांगितलं होतं! त्या संदर्भात त्यांनी आज मला एका लहान मुलांच्या अनाथाश्रमाबद्दल सुचवलं आहे---' "म्हणजे?"
"लोहगांव परिसरात, एअरपोर्टच्या जवळ लहान मुलांचा हाॅस्पिटलवजा अनाथाश्रम आहे. तिथे विशेषत: अपंग लहान मुलांवर, नाममात्र दरांत वा कधी मोफतही उपचार केले जातात. एका ट्स्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या या 'स्वयंसिद्ध' नामक अनाथाश्रमाला थोडीफार सरकारी मदत मिळते;-- पण बव्हंशी याचा कारभार लोकांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो. 'त्यांचे हिशोब तपासण्याचं काम कराल कां' असं मला भोसलेंनी विचारलं आहे! तुला काय वाटतं?" "मला विचारताय् म्हणजे हे का�� विनामोबदला असणार ना?" शुभदाने खडा टाकला. "तसंच कांही नाहीं! मी विनामोबदला नाही म्हटलं, तर 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून नाममात्र मोबदला देईलही ट्रस्ट!" म्हणत 'नरो वा, कुंजरो वा' थाटात अनंतने आपलं घोडं पुढे दामटलं. "चांगल्या कामाला हातभार लागणार असेल तर एकतर पूर्णत: विनामूल्य करा नाहीतर पूर्णत: योग्य मोबदला घ्या असं मला वाटतं! दिखाव्यापुरता नाममात्र मोबदला नको!" "कसं माझ्या मनातलं बोललीस! अजून मी भोसलेंना कांहीच शब्द दिलेला नाहीं. 'आधी अनाथाश्रम तर बघावा' म्हणून मी त्यांच्याबरोबर आज संध्याकाळी जाणार आहे. एकदां ट्रस्टचं प्रत्यक्ष कामकाज बघितलं, विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींशी बोललो की एकुण कसं-काय चाललं आहे त्याची कल्पना येईल! सगळा कारभार पारदर्शी आणि चोख वाटला तरच मी हो म्हणेन!" "तुुमचे ते मनोहर भोसले काय काम करतात अनाथाश्रमासाठी?" "ते ट्रस्टसाठी जमेल तशा देणग्या गोळा करतात! यंदा दिवाळीपर्यंत त्यांनी सुमारे पंधरा लाख गोळा केल्याचं म्हणाले! त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत गाजावाजा न करतां काम करीत राहणारे! बरं, आज तूंही येशील कां आमच्यासोबत? " नको, --आज तुम्ही एकटेच जा! एकदा तुम्ही अनाथाश्रमाचं काम अंगावर घेतलंत, तर मग माझंही येणं होईलच! बघुंया, जमेल तशी मदत मीही करीन!"
३ नोव्हेंबर २०२२
0 notes
Text
मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचं मोठं यश , शहरात वाढलं मतदान पण सत्ताधाऱ्यांची धाकधूक
नगर शहरात मतदारांमध्ये जागृतीसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले होते त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे सरासरी 64 टक्के मतदान झालेले असून महापालिकेतर्फे झालेली आदर्श मतदान केंद्राची उभारणी , दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर , पाणी तसेच इतर सुविधा यामुळे मतदारांना देखील फारसा त्रास सहन करावा लागला नाही. मनपा आयुक्त यशवंत…
0 notes
Text
#देव_देश_धर्मरक्षक
ओळख आधी हिंदू नागरिक आणि मग सुजाण मतदार,
हिंदुत्वाचा सन्मान राखणाऱ्यालाच यंदा आम्ही निवडून आणणार!!
#आम्ही_भगव्याचे_रक्षक
#हिंदू #hindu #bhagwa #hindutwa #hindurashtra
(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
0 notes
Text
Pune : शिवाजीनगरमध्ये यंदा 1127.4 मिमी हंगामी पावसाची नोंद
Pune : शिवाजीनगरमध्ये यंदा 1127.4 मिमी हंगामी पावसाची नोंद – MPC…
0 notes
Text
आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनातील प्रेम collect करणाऱ्या आपल्या लाडक्या collector madam अभिनेत्री शिवाणी नाईक madam( @shivaninaikofficial )ह्यांनी यंदा माझा मोरया मध्ये आपला बाप्पा बुक केला आहे!!
तुम्ही कधी करताय??!
आजच भेट द्या www.majhamorya.in ला आम्हाला भेट देण्यासाठी आमचा पत्ता BIO मध्ये 😌😇 . . . @shivaninaikofficial 😇 @majhamoryaofficial . . .
ganeshutsav #zeemarethiofficial #appiamchicollector #marathiactress #ganpatibappamorya #ganeshreels #ganpatiidol #ghargutibappa #sankashtichaturthi
. . . [ Ganesh Murti, Ganesh Idols, Bappa shop, zee marathi official, Ganpati near me, Bappamorya, Majha Morya]
0 notes
Text
Sugarcane Farming: महाराष्ट्राच्या कृषी विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात मराठवाडा विभागातील उसाचे क्षेत्र यंदा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पावसाच्या आधारे गोळा केलेली आकडेवारी ही दिशा दर्शवते. महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयाने 31 जुलैपर्यंतच्या पावसाच्या आधारे कृषी विभागाच्या अहवालातून ऊस लागवडीची आकडेवारी संकलित केली आहे. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत सर्व ७० जागांचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्षाला ४० जागांवर आघाडी मिळालेली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष ३० जागी आघाडीवर आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांचा पराभव झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा सोमवारी सकाळी ११ वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या संवादातून परीक्षेची तयारी, तणाव व्यवस्थापन आणि व्यक्तीमत्व विकास याबाबत पंतप्रधान आपले विचार सादर करतील.
राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधला औषधाचा उपलब्ध साठा आणि गुणवत्ता याची नवीन नियमावलीप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत दिले आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमावलीनुसार करावी. सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्यानुसार औषधाच्या नोंदी ई-औषधी प्रणालीमध्ये ४८ तासांच्या आत घ्याव्यात, औषध साठ्याच्या समूह क्रमांकनिहाय नोंदी बिनचूक ��साव्यात, तपासणी अहवालानुसार प्रमाणित केलेल्या औषधांचा वापर करावा, आदी नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत.
संवाद चिमुकल्यांशी' अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत काल मुक्काम केला. इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेनं परिपूर्ण करु, असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, आदिवासी विकास मंत्र्यांच्या आदेशानुसार काल रात्री अनेक नेते आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या आश्रमशाळांवर मुक्काम केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या परिक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, आणि जालना या जिल्ह्यातून एक लाख ८५ हजार ३०० विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी मंडळानं ४६० परीक्षा केंद्रं निश्चित केली आहेत. दरम्यान, परीक्षेच्या या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ९०११३०२९९७, ९९६०६४४४११, ८१६९२०२२१४, या भ्रमणध्वनी क्रमांकांवर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क करुन विद्यार्थ्यांना समुपदेशनाचा लाभ घेता येणार आहे.
जगभरात प्रदर्शित होणारे उत्तमोत्तम आशयघन चित्रपट राज्यातल्या प्रे���्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संस्था दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करतात. अशा संस्थांसाठी शासन अर्थसहाय्य योजना राबवत असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या १० संस्थांना प्रती वर्षी १० लाख रुपये अनुदान देण्यात येतं. ही योजना चित्रपट, माहितीपट आणि लघुपट महोत्सावाचं आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी लागू आहे. या योजनेचा संस्थांनी लाभ घ्यावा, असं आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील आणि सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथं नोकरीच्या आमिषानं दोन तरुणा��ची १२ लाखांची फसवणूक झाल्याचं काल उघडकीस आलं. सरकारी शाळेत शिपाई आणि क्लर्क पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून धिरज बद्रीनारायण बाहेती आणि दीपा धीरज बाहेती या दांम्पत्यानं दोन तरुणांकडून १२ लाख रुपये उकळले. याप्रकरणी बाहेती दाम्पत्यावर निसर्ग जमशेट्टे यांनी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यस्तरीय पिक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. रब्बी ज्वारी आणि करडईचं भरघोस पीक घेऊन नांदेड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले. देगलूर तालुक्यातून माधव शंकरराव पाटील, कुडली इथले सुनील नामदेव चिमणपाडे तर लोहा तालुक्यातील सायाळ इथले शेतकरी रत्नाकर पाटील ढगे सायाळकर या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-district-10th-result-92-percent-vasmat-taluka-topper/
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/lok-sabha-election-ego-of-superiority-is-not-right/
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : १६
पहांटे जाग आल्यावर अनंतने उशीखालचे घड्याळ उचलून बघितलं तर ठीक ५-३० वाजले होते. खरं तर झोंपायला मध्यरात्र उलटून गेल्याने 'सकाळी वेळेवर हमखास जाग ���ाहीं आली तर?' या शंकेपोटीं अनंंतने पर्याय म्हणून ६ वाजतांचा गजर लावून ठेवला होता! पण पहांटे ५-३० वाजतां नेमकी जाग आल्याने अंगीं बाणलेल्या संवयीचा परीणाम जाणवून तो स्वत:च कांहीसा चकीत झाला होता! 'गजर बंद करावा की राहूं द्यावा, म्हणजे शुभदाला ६ वाजतां उठायला आपसूक मदत होईल?' या संभ्रमांत कांही क्षण गेल्यावर त्याने गजर बंद न करण्याचा निर्णय घेतला व हलकेच पांघरूणाची घडी करून ठेवल्यावर तो मुखमार्जनासाठी बाथरूमकडे वळला. अनंत बाथरूम मधून बाहेर आला तोंवर शुभदाने उठून उशा आणि पांघरूणं आवरलीही होती. त्याने कांही विचारण्याआधीच शुभदा थट्टेच्या स्वरांत म्हणाली, "तुम्ही जागे होऊन, तुमची खुडबुड एकदां सुरु झाली की मला कशी बरं झोंप लागणार?" आणि कीचनकडे निघालेल्या अनंतला इशाऱ्याने थांबवीत ती पुढे म्हणाली," आपण दोघेही वेळेवर उठलो आहोत;- तरी कसला गजर लावला असेल तर आतां तो बंद करून ठेवा! नाहींतर मी नेमकी बाथरूममधे असतांना ठणाणा वाजत राहील!"
त्यानंतर १५-२० मिनिटांनी डायनिंग टेबलापाशी बसून गरमागरम चहाचे घुटके घेतां घेतां अनंतने विचारलं, "पमाताईला आपण किती वाजेपर्यंत पोहोंचूं असं सांगीतलं आहेस? उशीर झाला तर ती बिचारी वाट बघत बसेल!" " आम्ही ९ वाजेपर्यंत येतो असं सांगीतलंय् -पण आपल्याला काल झोपायला किती वाजले असतील याची त्यांना कल्पना आहे;--त्यामुळे थोडा उशीर झाला तरी समजून घेतील पमाताई! मात्र काल रात्री सगळा पसारा आवरण्यापासून त्यांना थांबवायचं बरं सुचलं ना!" "हो;-नाहींतर आपल्याला घरी परतायलाच पहांट झाली असती! दिवसभर नेटाने उभं राहून सगळ्यांना हवं-नको बघतांना पार दमली असणार पमाताई! पण तोंडातून ब्र काढील तर शप्पथ! माझ्यापेक्षां ५ वर्षांनी मोठी आहे ती;- पण उत्साह मला लाजवील असा! त्यामुळे आतां निदान ५-६ तासांची विश्रांती झाल्यावर, नव्या दमाने तुम्ही कालचा पसारा आज दिवसभर आवरीत बसलात तरी त्रास जाणवणार नाही!" "काल पावसानेही उसंत घेतल्यामुळे अपेक्षित ती सगळी मंडळी येऊं शकली ते मात्र फार छान झालं! त्यांत दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी असल्याने जणूं डबल धमाकाच! खाण्यापिण्याचा रामरगाडा दिवसभर सुरु होता,--पण त्यामुळे घर कसं सतत हंसतं-निनादतं राहिलं! जणूं ३ वर्षांनी घराला पुन: एकदां घरपण आलं! मला फक्त एक खटकलं;-- वरवर हंसरा चेहरा ठेवून वावरत असल्या तरी मीनाताई अंतर्यामीं उदासच होत्या!"
"साहजिकच आहे ते!ती कितीही नाहीं म्हणाली तरी दिवसभर तिला सतत शेजारच्या सबनीस पती-पत्नींची आठवण येतच असणार ग! इतक्या वर्षांचा त्यांंचा शेजार, पण यंदा जानेवारीत कसा अकस्मात् संपला! कोविडचं निमित्त होऊन नवरा आणि बायको दोघेही तडकाफडकी ८ दिवसांच्या अंतराने मरण पावले! मागील दिवाळीत नांदत्या असलेल्या त्या घरांत, यंदा पणती लावायलाही कुणी नाही!" "असं मरण कुणाच्याच वांट्याला ये॓ऊं नये, परमेश्वरा! कर्ते-धर्ते दोन्ही मुलगे परदेशांत स्थायिक झालेले! त्यामुळे अंत्यसंस्कारांसह सगळे विधी सोसायटीतील लोकांनीच पार पाडले! आतां यंदा ख्रिसमसच्या सुमारास दोन्ही मुलगे घरादाराची उस्तवार करण्यासाठी येणार आहेत असं काल मीनाताईंच्या बोलण्यांत आलं!" "या कोविड काळानं नको-नको ते सगळे अनुभव प्रत्येकाच्या पदरांत टाकले आहेत, शुभदा! त्यांतून शिकण्यासारखं एकच की आजचा दिवस आपला म्हणत आनंदाने जगायचा!" अनंत निष्कर्ष काढीत म्हणाला," मी आतां पटकन थोडा योगपाठ करतो म्हणजे मला जरा फ्रेश वाटेल. त्यानंतर लगेेच आंघोळी आटपून शक्यतों लवकर बाहेर पडुंया! ब्रेकफास्टसाठी गरम पॅटिस जातां-जातां आपल्या नेहमीच्या बेकरीतून घ्यायचे आहेत ते ध्यानांत ठेव! -- म्हणजे मी विसरलो तर मला आठवण कर!!"
२७ ऑक्टोबर २०२२
0 notes
Text
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी; यंदा युवा मतदार ठरणार निर्णायक, साडेसहा लाखांपेक्षा जास्त नोंदणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी आता जोमाने सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे निवडणूक तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा काही महिन्यांपासून व्यस्त आहे. दरम्यान, १५ मार्चच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मतदार आतापर्यंत ३० लाख ३१ हजारांच्या पुढे गेली आहे. यामध्ये नवमतदारांची संख्या ४१ हजारांच्या घरात आहे. यात २० ते २९ वयोगटातील युवा…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ea64e874c3c47e516517364758202b32/3a1fcedc05d7c93d-63/s75x75_c1/9a540eca520dad0f1f8afa056f8c3f263acfaaa9.jpg)
View On WordPress
0 notes
Video
youtube
झेप क्षितिजा पासी पोलीस भरती कडक तयारी | यंदा १००% police Bharti
0 notes