Tumgik
#मुलांमध्ये
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लहान मुलांमध्ये वाढतेय Stranger Anxiety, याचा अर्थ काय समजून घ्या
लहान मुलांमध्ये वाढतेय Stranger Anxiety, याचा अर्थ काय समजून घ्या
लहान मुलांमध्ये वाढतेय Stranger Anxiety, याचा अर्थ काय समजून घ्या आपल्या घरातील मुलं सुरक्षित राहावीत यासाठी त्यांना लहानपणासूनच आपण जपत असतो. तर मुलांनाही लहानपणापासूनच आपले आणि परके यातील अंतर कळते. पण काही मुलांना परकी माणसं पाहून एक वेगळीच भीती वाटते आणि अशी मुलं परक्या माणसांसमोर येतच नाहीत. पण अशा परिस्थितीत मुलांची ही भीती काढून त्यांना योग्य ती सवय लावण्याची जबाबदारी ही नक्कीच त्यांच्या…
View On WordPress
0 notes
aissmseducation · 26 days
Text
सभोवतालच्या परिसरातून घडते विद्यार्थ्यांचे जीवनमान
Author- सौ.ज्योती अजित येनपुरे Asst. Teacher (SSPMS Primary Day School)
मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यावर सभोवतालच्या परिसराचा प्रभाव पडतो. आई-बाबा, आजी-आजोबा हा इतकाच त्याचा परिसर. मूल आपल्या कुटुंबातील लोकांचे निरीक्षण करत असते. जसे, की ते कसे बोलतात, कसे वागतात यावरूनच ते मूल बोलायला, वागायला शिकते.
जसजसे मूल मोठे होत जाते ते त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्ये मिसळू लागते. यातूनच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी ते शिकत जाते. सोबतच इतरांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, छोट्यांना आधार देणे अशा बऱ्याच गोष्टीही ते शिकत असते. परिसर त्याच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणून अनेक नवनव्या गोष्टींची भर घालत असतो.
परिसरात वावरत असताना घरातील लोकांपेक्षा, त्याच्या आई-बाबांपेक्षा वेगळे वागणे, बोलणे मुलाच्या कानावर पडत असते. मग ते कधी चांगले तर कधी वाईट असते. या गोष्टींचा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे त्याच्यावर होत असलेल्या किंवा आई-बाबांकडून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असते. यातूनच त्याची सामाजिक जडणघडणही व्हायला सुरुवात होते.
मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या जीवनात शाळा अत्यंत प्रभावशाली ठरते. शाळेमध्ये साजरे होणारे विविध दिन जसे, की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. शिवजयंती उत्सव साजरी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार त्याच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. तसेच वाचन प्रेरणा दिवस, शिक्षक दिन यामुळे साहजिकच मुलाला वाचनाची, अभ्यासाची गोडी लागते आणि शिक्षकांबद्दलची ओढही निर्माण होते. एखादे ध्येय ठरवून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळावा, यासाठी या गोष्टी मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
शाळेमधूनच मुलांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये गड किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. या भेटींमधून ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळते तसेच निसर्गदर्शन घडते आणि त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे प्रेम वाढीस लागून त्याचे महत्त्व समजते. निसर्गाची काळजी कशी घ्यावी, पशुपक्षांची काळजी कशी घ्यावी हेही लक्षात येते. या सगळ्यांतून मुलांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते.
एकंदरीत, वरील सर्वच गोष्टींचा सारासार विचार करता विद्यार्थ्यांच्या जीवनावर आजूबाजूच्या परिसराचा सकारात्मक प्रभाव पडत असतो.
Source: https://sspmpds.in/sabhotalchya-parisaratun-ghadte-vidhyarthi-jiwanman/
0 notes
nashikfast · 3 months
Text
सावधान! पारा ४० च्या पार : काळजी घ्या उष्माघाताचा धोका निर्माण
उष्माघ���ताची लक्षणे : प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरनहाइटपर्यंत पोहोचल्यास स्नायूंचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे व धडधडणे, तसेच उन्हात फिरल्यामुळे डोकेदुखी, ताप, जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे लहान मुलांमध्ये, आहार घेण्यास नकार देणे, नियमित चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, रक्तस्राव…
View On WordPress
0 notes
druttamgavane · 5 months
Text
लहान मुलानं मधील ADHD म्हणजे काय ? लक्षणे व उपाय डॉक्टर उत्तम गव्हाणे | संमोहन तज्ञ
Tumblr media
मुलांमध्ये एडीएचडीचा अर्थ काय आहे. याविषयीची सर्व माहिती व्हिडिओमध्ये डॉ. उत्तम गव्हाणे.
youtube
1 note · View note
smithjocob · 5 months
Text
Tumblr media
लहान मुलानं मधील ADHD म्हणजे काय ? लक्षणे व उपाय डॉक्टर उत्तम गव्हाणे | संमोहन तज्ञ
मुलांमध्ये एडीएचडीचा अर्थ काय आहे. याविषयीची सर्व माहिती व्हिडिओमध्ये डॉ. उत्तम गव्हाणे.
youtube
0 notes
gaurvaaadityaa · 10 months
Text
Intuition Process
Intution Process आर्ट ऑफ लिविंग,बारामतीआयोजितINTUITION PROCESS✨ अंतर्ज्ञान प्रक्रिया✨ प्रशिक्षक :श्री राजेंद्र राऊत सर 👉🏻आपण सर्वजण आपल्या इंद्रियांच्या पलीकडे जाणण्याची नैसर्गिक अंतर्ज्ञानी क्षमता घेऊन जन्माला आलो आहोत. हे विशेषतः अशा मुलांमध्ये दिसून येते ज्यांची मने अजूनही ताजी, निरागस आणि निसर्गाशी अधिक सुसंगत आहेतफायदे 💡 ०६ वे इंद्रिय विकसित करा. 🤓 *फोटोग्राफिक मेमरी विकसित करा. 🎯…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
https://wa.link/pntukd
मुलांचे आरोग्य हि प्रत्येक आई वडिलांची काळजी असते.त्यात आजकाल मुलांचं शेड्युल फार बिझी झालाय. शाळा, अभ्यास, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यात मुलांचा दिवस कसा जातो हेच कळत नाही. मुलांची शारीरिक हालचाल, व्यायाम पाहिजे तेवढा होत नाही. आजकाल मुलांचा बौद्धिक विकास जरी चांगला असला तरी फिजिकली कमकुवत होत चालला आहे. वातावरण बदलल कि मुलांच आजारी पडणं, वायरल इन्फेक्शन .... या गोष्टी तर आजकाल कॉमन झाल्या आहेत.
मनसोक्तपणे खेळण नाही, बागडन नाही, स्पर्धांच्या मागे धावणं.फक्त अभ्यास, मार्क्स आणि त्यांच्या मागे टॉपर होण्यासाठी असलेला तगादा ..... तेच जर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिल तर नक्कीच उत्तम ठरेल. आजकाल बऱ्याच लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण जाणवून येतो. काही मुलांचे कॅल्शियम कमी तर कोणाला व्हिटॅमिन ची कमतरता......
मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी आणि भावी पिढीसाठी उत्तमोत्तम आरोग्य लाभावे म्हणून एक पालक म्हणून आपण नक्की प्रयत्न करत राहायला हव. पौष्टिक आहाराचा समावेश करणे. होताहोईल तेवढ जंक फूड टाळणे. मुलांसाठी डाएट चार्ट बनवणे.एकदम नाही पण हळू हळू या गोष्टींची सुरवात तर करता येईल.
एकंदरीतच सगळ्याच बाजूने पाहिलं तर मुलांच्या आरोग्यावर होणार परिणाम हा विचारात घ्यायलाच हवा. एक पालक म्हणून आपल्या आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवेत. यात प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात. पण यामागे "मुलांचे उत्तम आरोग्य" हेच ध्येय प्रत्येक पालकाचे असते.
''आरोग्यम् धनसंपदा.....!
तर मग चला जाणून घेऊया 20 ऑगस्टला दुपारी 3:00pm
Happy To Help सत्रात
Ask for zoom link : 9011050390
#kidshealth #momlife #kids #health #healthykids #healthylifestyle #kidsgym #toddlerlife #dadlife #momentsthatmatter #childrensfitness #parentwin #kidsgymnastics #mommyandme #kidsclasses #mygymclasses #cutekids #minime #nutrition #kidsgymnasticsclasses #littleathlete #parenting #mommyandmeclasses #clockinandplay #mommyandmeclass #mygymsmiles #mygymparty #kidsbirthday #childrenshealth #pediatrics
0 notes
igamravatirange · 11 months
Text
राष्ट्रपती पदकाचे मानकरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे जसे दिसले तसे.
लातूरला मिशन आयएएसच्या कार्यक्रमासाठी आलो होतो . १५ ऑगस्टला सकाळी सकाळी वर्तमानपत्र हाती आले आणि त्यात अतिशय आनंदाची बातमी ��ाचली .ती म्हणजे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याची .खरोखरच खूप आनंद झाला. तो यासाठी की जयंत नाईकनवरेसाहेब हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते एक कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महा निरीक्षक आहेत. एक संवेदनशील मनाचा कर्तव्य तत्पर आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा परोपकाराची भावना मनामध्ये बाळगणारा आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे हे विसरून लोकांमध्ये मिसळणारा पोलीस अधिकारी म्हणून मी जयंत नाईक नवरे साहेबांचा उल्लेख करेन.
सर अमरावतीला रुजू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मध्यंतरी श्री संत गाडगेबाबा यांचे वाहन चालक श्री भाऊराव काळे पाटील माझ्याकडे आले .मी साहेबांना सूचना दिली. साहेब म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे .त्याप्रमाणे आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी हृदयापासून त्यांचे स्वागत केले . संत गाडगे महाराज यांच्या आठवणी त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष गाडगे महाराजांना आपण जरी भेटू शकलो नाही तरी त्यांचे चालक म्हणून काम करणारे श्री भाऊराव काळे यांना भेटू शकलो त्याबद्दल श्री नाईकनवरे साहेबांनी खूप आनंद व्यक्त केला .
दरवर्षी आमचे मे जून महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर असते. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून मुले येतात. मी सरांना शिबिराचे निमंत्रण दिले .सरांनी ते स्वीकारले. मी म्हटलं सर मी कोणाला तरी घ्यायला पाठवतो. ते म्हणाले त्याची गरज नाही. मी बरोबर वेळेवर येईल. सरांनी शिबिरासाठी वेळ दिली ती देखील सायंकाळी सहानंतर . म्हणजे आपले कार्यालयीन कामकाज ऑटोपल्यानंतर. साहेब आमच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये आले आणि मुलांमध्ये इतकी मिसळून गेले आणि पोरांनाही त्यांचे भाषण त्यांचे अनुभव इतके जवळचे वाटले की दोन तास कसे निघून गेले ते कळले नाही..
आम्ही अमरावतीच्या शारदा विद्यालयांमध्ये व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिशन आयएएस अंतर्गत अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात अधिकारी त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्या अंतर्गत मी साहेबांना निमंत्रण दिले. साहेबांनी ते हसतमुखाने स्वीकारले. आणि येण्याचे मान्य केले .मी परत सरांना म्हटलं की तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवतो. सरांनी स्पष्टपणे नकार दिला .ते म्हणाले आम्ही शोधून घेऊ .सर त्याप्रमाणे आले .शारदा विद्यालयातील व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मुलांना इतके प्रेरित केले की जवळपास 20 मुलांनी सरांना प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाला सरांनी हसत खेळत उत्तर दिले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलांनी सरांची गाडी पाहिली. सायरन कसा वाजतो ते प्रात्यक्षिक करून पाहिले .पोरांना खूप कुतुहूल असते. पोलिसांबद्दल भीती असते .पण नाईकनवरेसरांनी पोरांमध्ये मिसळून आपल्या गाडीची तोंड ओळख त्यांना करून देऊन पोलिसांचा सायरन कसा वाजते त्याचे प्रॅक्टिकल करून मुलांची मने जिंकली .
अशाच एक वेळ मला सरांचा फोन आला. ते म्हणाले काठोळे सर तुम्ही घरी आहात काय ? ते म्हणाले मला तुम्हाला काही पुस्तके भेट द्यावयाची आहेत. त्यांनी दोन बॉक्स भरून पुस्तके मला सप्रेम भेट दिली. त्यानंतरही परत त्यांचा फोन आला. सर अजून काही पुस्तके शिल्लक आहेत. ती देखील मला तुम्हाला द्यावयाची आहेत. मित्रांनो पुस्तकाचे दान हे सगळ्यात महत्त्वाचे दान असते. आणि जयंत नाईकनवरे सरांनी पुस्तक लिहून नुसतं ते थांबले नाहीत .तर प्रत्यक्षात कृतीतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती व्यक्त केलेली आहे .ही एक परोपकाराची प्रवृत्ती दर्शवून आपली भारतीय संस्कृती आपलीसी केलेली आहे.
सरांचे माझे फोनवर अधून मधून बोलले होते. आमचा दर रविवारचा जो साहित्य परिवाराचा गेट-टु -गेदर कार्यक्रम होतो. त्याबद्दल ही सरांनी आनंद व्यक्त केला आणि त्या कार्यक्रमातही मला यायचे आहे. साहित्यिक लोकांचा परिचय करून घ्यायचा आहे .असाही मनोदय व्यक्त केला. मी सतत प्रवासात असतो. परंतु आमचे अधून मधून सरांशी संपर्क सुरूच असतात. एक चांगला विशेष पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे सरांच्या रूपाने अमरावतीला मिळाला आहे .सरांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून हा महत्त्वाचा पल्ला गाठलेला आहे .आपल्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. लेखनाचा छंद असलेला आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने चालणाऱ्या या माणसाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला .खरोखरच हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे झालेले मूल्यांकन आहे .मी अमरावतीकर नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो .आणि त्यांना शुभेच्छा देतो.
- प्रा. डॅा.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस अमरावती.
0 notes
nandedlive · 1 year
Text
सर्दी-खोकल्याचे औषध घ्या काळजीपूर्वक! थेट मेंदूवर होतोय वाईट परिणाम
Tumblr media
WHO | या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने म्हटले होते की फोलकोडिनचा वापर कफ सिरपमध्ये केला जातो, अशा परिस्थितीत ते टाळणे आवश्यक आहे. 14 जुलै रोजी ‘औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कफ सिरपमध्ये फोलकोडिन पदार्थ बंद करण्याचा सल्ला दिला आहे. WHO च्या मते ‘फोलकोडाइन’ हे ओपिओइड औषध आहे जे प्रौढ आणि मुलांमध्ये गैर-उत्पादक (कोरड्या) खोकल्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. फोलकोडिनचा वापर जगभरात कफ सिरपमध्ये केला जातो. जसे की ओव्हर-द-काउंटर गोळ्या आणि सिरप. WHO ने दिली चेतावणी मार्चमध्ये, WHO ने आरोग्य सेवा व्यावसायिकांना आणि नियामक अधिकाऱ्यांना चेतावणी दिली ज्यांनी न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट्स (NMBAs) सह सामान्य भूल देण्याच्या प्रक्रियेच्या किमान 12 महिने आधी फोल्कोडिन हे औषध वापरलेल्या लोकांमध्ये अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया होण्याच्या जोखमीबद्दल विषय तज्ञ समिती (अँटीमाइक्रोबियल आणि अँटीव्हायरल) नावाच्या एका विशेष समितीने फोलकोडाइनच्या वापराविरुद्धच्या पुराव्याचे पुनरावलोकन केले. तसेच आरोग्य व्यावसायिक, डॉक्टर आणि ग्राहकांसाठी शिफारसी सुचवल्या. डॉक्टरांनी काय दिला सल्ला? अॅडव्हायझरीनुसार, डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांना खोकला आणि सर्दीवरील उपचारांसाठी फोल्कोडाइन असलेली औषधे घेणे थांबवण्याचा सल्ला रुग्णांना देण्यात आला आहे आणि त्यांच्या लक्षणांकडे लक्ष देण्यास सांगितले. न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट (NMBAs) असलेले जनरल ऍनेस्थेटिक्स घेणार्‍या रूग्णांनी गेल्या 12 महिन्यांत खोकला आणि सर्दीच्या उपचारांसाठी फोल्कोडाइन असलेले औषध घेतले आहे की नाही हे सत्यापित करण्यासाठी आणि अशा रूग्णांमध्ये ऍनाफिलेक्टिक प्रतिक्रियांबद्दल देखील जागरूक रहा. सीके बिर्ला हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉ.सौरभ खन्ना म्हणाले की, फोलकोडिन हे रोगप्रतिबंधक औषध आहे. फोलकोडाइन हे अँटीट्यूसिव्ह औषधांच्या गटाशी संबंधित आहे जे खोकला दाबते. तर, दुसऱ्या शब्दांत, हे खोकला शमन करणारे आहे जे ओपिओइड व्युत्पन्न आहे. हे मेंदूतील खोकला केंद्र दाबून कार्य करते,” डॉ सौरभ खन्ना म्हणाले. वैद्यकीय तज्ञांच्या मते, काउंटरवर उपलब्ध असलेल्या बहुतेक खोकल्याच्या सिरपमध्ये याचा वापर केला जातो. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या १५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे
मुंबई, दि.25 : शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने महाराष्ट्रात ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत राज्यातील 65 हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे 15 लाख मुलांची शाळापूर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
प्रियांका चोप्राने सांगितलं सुखी जीवनाचे रहस्य, म्हणाली मुलींनो मुलांमध्ये 'ही' खास गोष्ट पाहायलाच हवी
प्रियांका चोप्राने सांगितलं सुखी जीवनाचे रहस्य, म्हणाली मुलींनो मुलांमध्ये ‘ही’ खास गोष्ट पाहायलाच हवी
प्रियांका चोप्राने सांगितलं सुखी जीवनाचे रहस्य, म्हणाली मुलींनो मुलांमध्ये ‘ही’ खास गोष्ट पाहायलाच हवी Priyanka-Nick Wedding Anniversary: प्रियांका चोप्राने नुकतेच तिच्या लग्नाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने निकला त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये तीने मुलींसाठी एक खास संदेश सुद्धा दिला आहे. या फोटोमध्ये प्रियांका आणि निक आनंदाने…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क असण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून व्यक्त.
९७ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरची सर्वानुमते निवड.
ओबीसीत समावेशाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचं १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं ठिय्या आंदोलन.
आणि
तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष रिकर्व प्रकारात भारताला रौप्यपदक.
****
आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क असण्याची गरज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज बंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. पॉन्झी ॲप्स- फसव्या गुंतवणूक योजनांवर कारवाईसाठी रिझर्व्ह बँक आणि संबंधित मंत्रालयांसोबत सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. कोविड काळात पाश्चिमात्य देशांनी चुकीचे निर्णय घेतल्याने तसंच कोविडपश्चात युक्रेन युद्धामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने भारतीय अर्थव्यवस्था अन्य देशांच्या तुलनेत सुस्थितीत असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं.
****
भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या स्थानावर पोचवण्यासाठी देशातील युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात ‘सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करत होते. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण असलेला देश असून गेल्या ८ वर्षांच्या काळात केंद्र सरकारनं विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये ३९ हजार सुधारणा केल्याचं कराड यांनी सांगितलं. युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी युवकांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नॅशनल युवा सोसायटी सारख्या संस्थांनी काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाणेसह राज्यातल्या दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात यावं, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी गठीत विशेष कृतीदलाच्या बैठकीत पुणे इथं ते बोलत होते. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सराव प्रात्यक्षिकात आढळलेल्या त्रुटींचं तत्काळ निराकरण करावं. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावं, अशा सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी यावेळी दिल्या.
****
मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी, विज्ञान कथा आणि विज्ञान कादंबरी उपयुक्त ठरतील, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. स्तंभलेखिका, ब्लॉगर आणि प्राप्तिकर विभागाच्या महासंचालक डॉ. ���ाधना शंकर यांनी लिहिलेल्या ‘असेन्डन्स’ या विज्ञान कादंबरीच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते मुंबईत राजभवनात झालं, त्यावेळी ते बोलत होते. अन्न सुरक्षा, आरोग्य, लोकसंख्या नियंत्रण, पाण्याचे दुर्भिक्ष यांसारख्या मूलभूत समस्यांवर फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करता येते. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात बुद्धिमान आणि मेधावी विद्यार्थी आले पाहिजेत अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
****
रेल्वे मंत्रालय देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत येत्या शुक्रवार पासून पुण्याहून भारत गौरव पर्यटनासाठी पुरी-गंगासागर दिव्य काशी रेल्वे यात्रेचं आयोजन करणार आहे. दहा दिवसीय यात्रेत ही रेल्वेगाडी जगन्नाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या शहरांना भेटी देत जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर, लिंगराज मंदिर, कालीबाड़ी, विष्णुपद मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर या धार्मिक स्थळांची यात्रा घडवणार आहे. देशी-विदेशी पर्यटकांना भारतातील विविध स्थळांचं दर्शन घडवण्यासाठी रेल्वे मंत्रालय ही गाडी चालवत आहे.
****
९७ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं होणार आहे. साहित्य महामंडळानं गठित केलेल्या स्थळनिवड समितीतर्फे आज पुण्यात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. अमळनेरच्या मराठी वाङमय मंडळ या संस्थेनं हे संमेलन घेण्याची शिफारस केली, त्याचा स्वीकार करत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं या प्रस्तावाला मान्यता दिली. या समितीनं सातारा जिल्ह्यातील औदुंबर आणि जळगाव जिल्ह्यात अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून ९७ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरची निवड केली आहे.
****
मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासप्रवर्ग ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी येत्या १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजानं केला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणासंबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. राज्य शासनाचा क्युरेटिव्ह पिटीशन - सुधारणा याचिका दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय हा वेळकाढूपणा असल्याचा सूर या बैठकीतून निघाला. कोणीही राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला छत्रपती संभाजीनगर इथं येण्यास भाग पाडावं, असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.
****
इंडियन प्रीमिअर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करत १९० धावांचं लक्ष्य राजस्थान रॉयल्ससमोर ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या आतापर्यंत पाच्या षटकांत एक बाद ३५ धावा झाल्या आहेत.
या स्पर्धेतला अन्य सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघादरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जाईल.
****
तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष रिकर्व प्रकारात भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. अतनु दास, धीरज बोम्मादेवरा आणि तरुणदीप राय या नेमबाजांच्या संघाचा चीनच्या संघाने पाच-चार असा पराभव केला. पुरुष रिकर्व एकेरीच्या उपान्त्यफेरीत भारताचा धीरज बोम्मादेवरा आणि मोल्दोवाचा डॅन ओलारु यांच्यात सध्या सामना होत आहे.
****
उमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केल्यामुळे सोलापूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. सामाजिक समावेशन, संस्थीय बांधणी, क्षमता बांधणी, महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी देणं, रुक्मिणी रानभाज्या महोत्सव, रुक्मिणी दिवाळी महोत्सव आदी उपक्रमांसाठी सोलापूर जिल्ह्याला शंभरपैकी ९० पूर्णांक ७ दशांश गुण मिळाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या २४ एप्रिल रोजी पंचायत राज दिनानिमित्त जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष तसंच पंचायत विभागाच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत संत गाडगेबाबा पुरस्कार, महाआवास अभियान आणि इतर योजनेतील पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. तापडिया नाट्यमंदिरात सकाळी १० वाजता पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आणि सोलापूर इथलं रब्बी ज्वारी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं ‘मिल्लेट स्टार्टअप फेस्ट २०२३’ या भरडधान्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस  आणि रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर चे प्रमुख डॉ. बसवराज रायगोंड यांच्या हस्ते नुकतच झालं. या प्रदर्शनात नवउद्योजक आणि सरकारी यंत्रणा यांनी मिळून २३ दालनं उभी केली आहेत. या कार्यक्रमात वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. पात्रोटी यांनी विद्यार्थ्यांना आणि नवउद्योजकांना भरडधान्य आणि त्या संबंधित उद्योगाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केलं. एक हजार ५०० पेक्षा जास्त स्टार्टअप, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी यावेळी यात भाग घेतला.
****
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचं लक्ष लागून असलेल्या बुलडाण्यातील भेंडवळच्या घटमांडणी चे अंदाज आज जाहीर करण्यात आले. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी झाली होती. गेल्या ३५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते, भेंडवळच्या या भविष्यवाणीला शास्त्रीय आधार नाही, मात्र संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष या अंदाजाकडे लागलेलं असतं. चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या मांडणीचं आज सकाळी निरीक्षण करून यंदाचा अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार यावर्षी जूनमध्ये कमी पाऊस होणार असून पेरणी उशिरा होणार आहे, तसंच वर्षभर पीकपरस्थिती सर्वसाधारण राहणार आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 21 : शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ वा तत्सम चित्रीकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टिकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार अथवा हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय…
View On WordPress
0 notes
karmadlive · 2 years
Text
मरयम मिर्झाला एएफएमआयचा विशेष पुरस्कार जाहीर.
औरंगाबाद : पुस्तकांविषयी जनजागृती निर्माण करून मुलांमध्ये संस्कृती रुजविण्यासाठी वाचन मोहल्ला बाल वाचनालय अभियान राबविणारी औरंगाबाद येथील आठवीत शिकणारी विद्यार्थिनी मरयम मिर्झाला अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लीमस ऑफ इंडियन ओरिजन ( एएफएमआय ) यूएसए व कॅनडाच्या वतीने देण्यात येणारा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे . त्याचे वितरण दि . ३१ डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय समारंभात होईल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
smithjocob · 5 months
Text
लहान मुलानं मधील ADHD म्हणजे काय ? लक्षणे व उपाय डॉक्टर उत्तम गव्हाणे | संमोहन तज्ञ
मुलांमध्ये एडीएचडीचा अर्थ काय आहे. याविषयीची सर्व माहिती व्हिडिओमध्ये डॉ. उत्तम गव्हाणे.
youtube
0 notes
mhlivenews · 2 years
Text
जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी आदिवासींना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही- आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित
जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी आदिवासींना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही- आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित
यवतमाळ ,दि १० जिमाका:- आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जगात स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षण घ्यावेच लागेल.  आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा टक्का पाहिजे तसा वाढला नाही, त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागण्यासाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी १ हजार क्षमतेचे मुलांचे व ५०० क्षमतेचे मुलींची आश्रमशाळा बांधण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित…
Tumblr media
View On WordPress
0 notes