Tumgik
#मिळू
bharatlivenewsmedia · 2 years
Text
या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळू शकते Android 13 Update, पाहा तुमचा फोन लिस्टमध्ये आहे की नाही?
या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळू शकते Android 13 Update, पाहा तुमचा फोन लिस्टमध्ये आहे की नाही?
या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळू शकते Android 13 Update, पाहा तुमचा फोन लिस्टमध्ये आहे की नाही? Android Updates: अँड्रॉइड 13 बद्दल अनेक रिपोर्ट्स सध्या समोर येत आहेत आणि एका नवीन बातमीनुसार, लवकरच ५ नोकिया फोन्समध्ये Google चे नवीन सॉफ्टवेअर व्हर्जन दिले जाऊ शकते. त्यांची नावे जाणून घ्या Android Updates: अँड्रॉइड 13 बद्दल अनेक रिपोर्ट्स सध्या समोर येत आहेत आणि एका नवीन बातमीनुसार, लवकरच ५…
View On WordPress
0 notes
Text
43. ‘तटस्थ’ राहणे 
आपल्या जीवनाला आपल्या कृती आणि निर्णय तसेच इतरांच्या कृती चांगल्या किंवा वाईट अशी विभागण्याची सवय आहे. श्रीकृष्ण म्हणतात की समता असलेला मनुष्य या जगात पुण्य आणि पाप दोन्ही सोडतो (2.50). याचा अर्थ असा की एकदा आपण समत्व योग साधला की विभाजन/वर्गीकरण संपते.
आपले मन रंगीत चष्म्यांनी झाकलेले असते जे आपल्या जन्माच्या काळात आपल्या पालकांच्या, कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्रभावाने तसेच देशाच्या कायद्याच्या प्रभावाने आपल्यावर अंकित होतात. आपण या चष्म्यातून गोष्टी/कृती पाहत राहतो आणि त्यांचे चांगले किंवा वाईट असे वर्गीकरण करतो. योगामध्ये, या चष्म्यांचे टिंट्स निघून जातात, ज्यामुळे गोष्टी स्पष्ट दिसतात, जे फांद्यांऐवजी मुळे नष्ट करणे आणि गोष्टी जसेच्या तसे स्वीकारण्यासारखे आहे.
अशा विभाजने व्यावहारिक जगात आपली दृष्टी अधू होते आणि त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची माहितीही आपल्याला मिळू शकत नाही. व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचे झाले तर अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे घेतलेला कोणताही निर्णय अपयशीच ठरणार, हे नक्की.
मध्यभागी असणे हे एखाद्या चर्चेसारखे असते जेथे विद्यार्थ्याला एकाच वेळी एखाद्या समस्येच्या बाजूने आणि विरोधात युक्तिवाद करावा लागतो. हे कायद्यासारखे आहे, जिथे आपण निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकतो. हे सर्व प्र��णीमात्रांमध्ये स्वतःला आणि सर्व प्राणिमात्रांना स्वतःमध्ये पाहण्यासारखे आहे आणि शेवटी सर्वत्र श्रीकृष्ण पाहण्यासारखे आहे (6.29).
एखाद्या स्थितीतून स्वत:ला त्वरेने वेगळे करून घेण्याची आणि कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू समजून घेण्याची ही क्षमता आहे. ही क्षमता जेव्हा विकसित होते तेव्हा आपण एखाद्या दोलायमान दारुमा बाहुलीप्रमाणे स्वत:ला मध्यभागी ठेवू शकतो.
जेव्हा एखाद्याला समत्वाचा योगावस्थेचा क्षणिक अनुभव येतो, तेव्हा त्यांच्या हातून घडणारे कोणतेही कर्म सुसंवादी असते. सांख्यिकीय दृष्टिकोनातून अध्यात्माकडे पाहिल्यास, ही त्या वेळेची टक्केवारी आहे जेव्हा आपण संतुलनात असतो आणि हा प्रवास ती टक्केवाती शंभर पर्यंत नेण्याचा प्रवास आहे.
0 notes
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश.
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्���ण.
राज्यातल्या ४३४ आयटीआयमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं परवा उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन.
आणि
संविधानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्यानं, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहीमा राबवण्याचे निर्देश प्राधिकरणानं दिले आहेत. ज्या बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहे, तिथे फूड सेफ्टी ऑन व्हील्स- अर्थात फिरती पथकं तैनात करावीत, ज्यामुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ मिळू शकतील, असं अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या हिंदी राजभाषा दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राजभाषा विभागातर्फे हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या संमारंभाचं उद्घाटन होईल. यानिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत. भारती पत्रिकेच्या हीरक महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन आणि राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरणही यावेळी शाह यांच्या हस्ते होणार आहे.
उद्या हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं देशाला संबोधन प्रसारित होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारं, प्रादेशिक बातमीपत्रं सकाळी सात वाजून दहा मिनिटांऐवजी सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होईल.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हयात राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित जयदीप आपटे याला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने आज मालवण न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातला दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं. काही लाभार्थी शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेत गेल्या सहा महिन्यात दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती केली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरे बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून परवा १५ सप्टेंबरला उद्घाटन करण्यात येणार आहे. १२ ते १५ तारखेदरम���यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शनं तर आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर इथं मूक आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होत राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं.
जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा येत्या सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
२०२५ या वर्षासाठीच्या शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आर.एन चिमंद्रे यांनी ही माहिती दिली. ५ ते १८ वर्षे वयोगटातल्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांनी awards.gov.in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात “एक पेड मां के नाम” या अभियानांतर्गत मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत राज्यात मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे.
****
लातूर इथं उद्या आणि परवा संसर्गजन्य आजारावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर यात सहभागी होणार आहेत.
****
थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ३१८ वीजग्राहकांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी २२४ ग्राहकांनी ८७ लाख ८५ हजार रुपयांची मुद्दल एकरकमी भरून व्याज आणि विलंब माफीचा फायदा घेतला आहे. तर २० ग्राहकांनी हफ्त्याने रक्कम भरण्याचा पर्याय निवडला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वडगाव कोल्हाटी आणि तीसगाव इथं वीजचोरी प्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
जालना इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या विविध विकास कामांची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पाहणी केली.
****
0 notes
mazhibatmi · 1 month
Text
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने महिलांना आकर्षित करण्यासाठी एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 (Maharashtra Pink E Riksha Yojna 2024) सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षाच्या माध्यमातून राज्यातील 17 जिल्ह्यांतील 10 हजार महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून त्याद्वारे त्या स्वयंरोजगार बनतील. राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने पिंक ई-रिक्षा योजनेसाठी 80 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. जेणेकरून राज्यातील अधिकाधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media Tumblr media
सगरोळी येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशिबीर संपन्न..
कार्यक्रमासाठी वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. मंगेश पाटील, कोल्हापूर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन आणि गाढव पालन या महत्वाकांक्षी योजना आणि त्यांसाठी आवश्यक असणारे कागदपत्र, नियम, अटी आणि प्रस्ताव दाखल करताना आणि त्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. यादरम्यान उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीना असलेल्या सर्व शंका आणि अडचणी बाबत विस्तृत माहिती दिली. एन. एल. एम. अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायात उतरता यावे आणि त्याद्वारे स्थानिक पातळीवर चांगल्या प्रतीची आणि शुद्ध जातीची करडे आणि कुक्कुटपिल्ले उपलब्ध व्हावीत या उद्देशाने ५० % पर्यंत अनुदान देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प शेतकऱ्याला उभारता येतो. याच अनुषंगाने शेतकऱ्यांनाहो योजना राबविताना येणारी दुसरी अडचण म्हणजे चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन. यासाठी कार्यक्रमास लाभलेले दुसरे मार्गदर्शक डॉ. प्रफुल्ल पाटील, प्रक्षेत्र व्यवस्थापक,पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन तसेच, डॉ. संतोष शिंदे, पशुधन विकास अधिकारी, त्र्यंबकेश्वर, नाशिक यांनी कमीत कमी खर्चामध्ये आणि संसाधनामध्ये यशस्वी शेळीपालनाची पंचसूत्री बाबत त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी शेतकऱ्यांकडील शेळीपालनाची उदाहरणे देऊन विस्तृत माहिती दिली.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) सुरु होणाऱ्या “पशुसंवर्धन पंधरवडा २०२४” याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्दिष्ट सहभागींच्या कौशल्य आणि ज्ञानात वाढ करून पशुधन व्यवस्थापनात सुधारणा करणे आणि या क्षेत्रात उद्यमशीलता वाढविणे असे होते. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरून पशुधन उत्पादकता वाढवता येईल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार मिळू शकेल. कार्यक्रमामध्ये इच्छुक शेतकरी, पशुसंवर्धन विभागाचे विविध पदाधिकारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) इतर महत्त्वाच्या व्यक्ति अश्या एकूण ११० व्यक्तींचा समावेश होता. #agriculture#animals#poltryfarming#Goatfarminginindia#KrishiVigyanKendra#skills
1 note · View note
homeloansguide101 · 2 months
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसला तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा स्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक आणि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागातील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आर्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयंरोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभावामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती पैसे मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात ते��्हा पासून ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
nagesh-thakur · 2 months
Text
Birthday Wishes For Son
तुझा इच्छा, तुझा आकांक्षाना,  उंच – उंच भरारी मिळू दे, मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे. लाडक्या मुलाला साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️ ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक, सुंदर आणि हुशार मुलगा दिला या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा. तुला संपूर्ण आयुष्य सुख…
0 notes
muthoot1 · 4 months
Text
मुथूट एक्झिमने ठाणे जिल्ह्यात सुरु केले गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे: मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मौल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांन उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील 23 वे केंद्र बनले आहे.
आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर 1, 2, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम- 400601 येथे उघडण्यात आले आहे. 
मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर देणारा अतुलनीय अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
Publication Name: Thane Vaibhav
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
toive-suomalainen · 6 months
Text
हनुमान चालिसा मराठी माहिती | Hanuman Chalisa Information in Marathi
हनुमान चालिसा हे भगवान हनुमानाला समर्पित एक भक्तिगीत आहे, हिंदू पौराणिक कथांमधील एक मध्यवर्ती व्यक्ती आणि शक्ती, भक्ती आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे. यात 16व्या शतकातील भारतीय कवी आणि संत, गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या "रामचरितमानस" या महाकाव्याचा भाग म्हणून रचलेल्या 40 श्लोकांचा (चालीसा) समावेश आहे.
हनुमान चालीसाचा इतिहास: हनुमान चालिसाचे मूळ हिंदू महाकाव्यांपैकी एक असलेल्या रामायणाच्या कथेत सापडते. भगवान रामाचे श्रद्धावान अनुयायी गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमानाची प्रार्थना म्हणून हनुमान चालीसा रचली. हनुमानाच्या सद्गुणांची आणि प्रभू रामावरील अटल भक्तीची स्तुती करण्यासाठी तुलसीदासांनी १६व्या शतकात हनुमान चालीसा लिहिली अशी आख्यायिका आहे.
तुलसीदासांना भगवान हनुमानाचे दर्शन झाले असे म्हणतात, ज्याने त्यांना हे स्तोत्र रचण्याची प्रेरणा दिली. असे मानले जाते की हनुमान तुलसीदासांसमोर त्याच्या शारीरिक रूपात प्रकट झाले, ज्यामुळे त्यांना हनुमान चालीसा- Hanuman Chalisa in Marathi लिहिण्यास प्रवृत्त केले. तेव्हापासून, हनुमान चालीसा ही भगवान हनुमानाच्या भक्तांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे आणि भारतभर आणि जगाच्या अनेक भागांमध्ये तिचे मोठ्या प्रमाणावर पठण केले जाते.
हनुमान चालीसा वाचनाचे फायदे: हनुमान चालीसा त्याच्या अध्यात्मिक महत्त्वासाठी पूज्य आहे आणि असे मानले जाते की त्याचे पठण करणाऱ्यांना अनेक फायदे होतात. हनुमान चालिसाचे पठण किंवा जप करण्याशी संबंधित काही फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
संरक्षण: असे मानले जाते की भक्तीभावाने हनुमान चालिसाचे पठण केल्याने भक्तांचे नकारात्मक ��र्जा, दुष्ट आत्मे आणि ग्रहांच्या अशुभ प्रभावांपासून रक्षण होते.
सामर्थ्य आणि धैर्य: भगवान हनुमान त्यांच्या अफाट शक्ती, धैर्य आणि पराक्रमासाठी ओळखले जातात. हनुमान चालिसाचे पठण केल्याने भक्तांना या गुणांनी ओतप्रोत केले जाते, त्यांना जीवनातील अडथळे आणि आव्हानांवर मात करण्यास मदत होते.
भगवान हनुमानाचे आशीर्वाद: भक्तांचा असा विश्वास आहे की हनुमान चालीसा प्रामाणिकपणाने आणि भक्तीने पाठ केल्याने भगवान हनुमानाचा आशीर्वाद मिळू शकतो, जो वरदान आणि इच्छा पूर्ण करण्यास सक्षम एक परोपकारी देवता मानला जातो.
आध्यात्मिक वाढ: हनुमान चालीसा ही केवळ प्रार्थना नाही तर आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. असे म्हटले जाते की चालिसाचे नियमित पठण मन शुद्ध करू शकते, शिस्त लावू शकते आणि परमात्म्याशी संबंध अधिक दृढ करू शकते.
उपचार: काही भक्तांचा असा विश्वास आहे की हनुमान चालिसाचे पठण केल्याने शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक आजारांवर उपचार होऊ शकतात, ज्यामुळे शांती आणि कल्याणाची भावना येते.
एकंदरीत, हनुमान चालिसाला हिंदू अध्यात्मात विशेष स्थान आहे आणि जगभरातील लाखो भक्तांना प्रेरणा, संरक्षण आणि उन्नती करण्याच्या सामर्थ्यासाठी तिचे कौतुक केले जाते.
0 notes
adhiraj09 · 6 months
Video
youtube
म्युच्युअल फंडात मुदत ठेवी (FD) पेक्षा जास्त नफा मिळू शकतो., तुम्हीपण पै...
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months
Text
35. ‘कर्मयोग’ हा जगण्याचा मार्ग  
श्रीकृष्ण म्हणतात की, आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही (2.47). जर आपल्या जवळच्या कुणावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर आपण एखाद्या चांगल्या शल्यविशारदाशी संपर्क साधू. त्याच्या कौशल्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये नक्कीच यश मिळेल आणि त्याच्या चांगल्या चारित्र्यामुळे तो अनावश्यक शस्त्रक्रिया करणार नाही. थोडक्यात आपण अशा एका शल्यविशारदाच्या शोधात आहोत जो कर्मयोगी आहे. या स्थितीतील दोन संदेश आपल्याला हा श्लोक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत करू शकतात.  
आपल्याला सेवा देणारे सगळे कर्मयोगी असावेत आणि त्यांनी आपल्याला सर्वोत्तम सेवा द्यावी अशी आपली अपेक्षा असते. हेच तत्त्व जर आपण आपल्यासाठीच्या समत्वाला लावले तर आपणदेखील इतरांना दैनंदिन सेवा पुरवताना कर्मयोगी होऊ शकू. हा श्लोक आपल्याला सांगतो की आपण जे काही करू त्यात सर्वोत्तम काम करू, मग ते काम असो की घरगुती बाबी.
श्रीकृष्ण गीतेमध्ये इतरत्र आपल्याला खात्री देतात की कर्मयोगाच्या सरावातील लहान लहान गोष्टी आपल्याला समत्वाच्या अधिक जवळ आणतात, ज्यातून खरा आनंद मिळू शकतो. जेव्हा आपण एखाद्याला पुन्हा कधीही भेटणार नाही अशी खात्री असतानाही जेव्हा सर्वोत्तम सेवा देऊ शकतो, आपण कर्मयोगी बनंण्याच्या मार्गावर आहोत हे समजून घ्यावे.
कर्मफलाची चिंता न करता आपण जेव्हा कर्मामध्ये पूर्णपणे गुंतलो असतो तेव्हा आपण कालातीत अवस्थेत प्रवेश करतो जेथे काळ हा संदर्भहीन आहे. आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरबाहेर वाट बघत असतो, वेळ अगदी संथगतीने पुढे सरकत आहे असे वाटायला लागते. दुसर्‍या बाजूला, कर्मयोगी शल्यविशारद आपल्या कामात वेळेचे भानही विसरून गेला असतो आणि जणू काही काळ त्याच्यासाठी एका जागी थांबलेला असतो.
श्रीकृष्ण आपल्याला दु:खाचे झाड समूळ उपटून काढायला सांगतात, ज्याची मूळे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कर्मफलाची इच्छा असणे हीच आहेत.
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
आषाढी एकादशी आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरी होत आहे. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तिभाव, नम्रता आणि करुणा वाढीस लागू दे, तसंच प्रामाणिकपणे सर्वांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून केली आहे. आजच्या देवशयनी आषाढी एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं जतन संवर्धन करून ��ूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी १०३ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या महापूजेनंतर बोलताना केली -
तिरूपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्‌धत आपण करू या. याला लागणारे १०३ कोटी रूपये शासन तात्काळ देईल एवढी खात्री मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या, महापुजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
****
शिर्डी इथं आज साईबाबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्तानं मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. संस्थांनचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते आज महापूजा करण्यात आली.
प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज सकाळी आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. ही पालखी नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून आहेत.
****
मुस्लिम धर्मियांमध्ये करबला युद्धातल्या बलिदानाचं स्मरण करून देणारा मोहरम आज पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैंगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. यानिमित्त ताजिया मिरवणूक काढली जाते.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २२ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं २१ जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करतील.
****
लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येत्या एकोणीस तारखेला सातारा इथे पोहचणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला आहे. हा सोहळा अत्यंत दिमाखदार आणि राजेशाही थाटात व्हावा, यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार असून, ती सकाळी दहा ते पाच या वेळेत नागरिकांना पाहता येतील.
****
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचे पुत्र आदित्य यांचा काल एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. बारामती तालुक्यात रुई लिम्टेक मार्गावर धावत्या कारचं टायर फुटून हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
****
विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष श्रेठींकडे पाठवला आहे. याबाबतचा निर्णय परवा १९ तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर इथं ही माहिती दिली.
****
पुण्यातल्या पिंपरी चिंचवड इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक तसंच कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांचं स्वागत केलं.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
Shilai Machine Yojna 2024: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी कामगार वर्गातील महिला आणि पुरुष आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू केली होती.
शिलाई मशीन योजनेअंतर्गत, कामगार वर्गाला स्वतःचे शिवणकाम सुरू करता यावे, यासाठी ₹ 15,000 ची आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून देशातील छोट्या कारागिरांना या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकेल.
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
करवंदाचे सजीव कुंपण गरजेचे आहेच सोबत प्रक्रिया देखील महत्त्वाची... शेताला जनावरांच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका हवी असेल तर करवंदाचे सजीव कुंपण एक चांगला पर्याय आहे. तसेच त्याला येणारी करवंद फळे प्रक्रिया करून अनेक चविष्ट चटपटीत पदार्थ तयार करता येतात ज्या मधून तरुणांना एक चांगला उद्योग मिळू शकतो. याच उद्देशाने दि. 22 ते 25 जुलै 2024 या कालावधीमध्ये संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे संस्थेच्या Gender Sensitization प्रकल्पांतर्गत करवंद लागवड ते प्रक्रिया उद्योग हे कौशल्य आधारित प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये करवंदाच्या विविध जाती, त्याची लागवड पद्धत, फायदे तसेच त्यापासून विविध वर्षभर टिकणारे प्रक्रियायुक्त पदार्थ सहभागी प्रशिक्षणार्थींना शिकवण्यात आले. सोबतच तयार पदार्थांचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, मार्क��टिंग तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे, कायदेशीर बाबी इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर डॉ माधुरी रेवणवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा कार्यक्रमात शेतकरी महिला, तरुण उद्योजक-उद्योजिका यांनी सहभाग नोंदविला. #Skills #processing #foodlover #FoodProcessingEquipment #agriculture #foodProcessingMachine #FoodProcessingPlant #youthempowerment #करवंद #फळप्रक्रियाउद्योग #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes
kbc-78 · 7 months
Text
Tumblr media
नियमित हृदय तपासणी इतके #महत्त्वाचे का आहे ? नियमित हृदय तपासणी आणि स्क्रिनिंगमुळे तुम्हाला योग्य उपचार लवकर मिळण्याची आणि मूलभूत वैद्यकीय स्थितीचे त्वरित निदान करण्याची उत्तम संधी मिळते. यामुळे दीर्घ, #निरोगी_आयुष्य मिळू शकते
0 notes
Video
youtube
मराठ्यांना एकही प्रमाणपत्र मिळू देणार नाही सदावर्ते..
0 notes