#भारतीय क्रिकेट बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. हा कार्यक्रम परीक्षेतील तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रीया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. “प्रधानमंत्री मोदीजी नी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे ‘परिक्षा पे चर्चा’ यामुळं शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये न घाबरता, न कसलं प्रकारचं तणाव घेता, कसं सामोरं जावं, तसंच याचा फायदा विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांना सुद्धा होतो.’’ “विद्यार्थी हे फक्त विद्यार्थीच नाही. विद्यार्थी हे परीक्षार्थी नाही, तर भारताचे भविष्यातले चांगले नागरिक होणार, या दृष्टीकोनातूनच परीक्षा पे चर्चा ही मोहीम राबवली आहे. याचा फायदा आम्हासारख्या तुम्हासारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो.’’
छत्तीसगढ इथं आज सकाळपासून बिजापूर-नारायणपूर सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. तसंच दोन सुरक्षा कर्मचारी शहीद तर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असल्याचं बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज यांनी सांगितलं. याबाब�� मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी स्वयंचलित शस्त्रांसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ५२ व्या जागतिक पुस्तक मेळ्याचा आज समारोप होणार आहे. या मेळ्यात पन्नास देशातले दोन हजार प्रकाशक आणि एक हजार वक्ते सहभागी झाले होते.
जर्मनी इथं सुरू असलेल्या खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी भारताचा डी.गुकेश बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. पात्रता फेरीच्या नवव्या आणि अंतिम फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत होऊनही गुकेशनं तीन पूर्णांक पाच गुणांसह हा टप्पा गाठला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं थोड्याच वेळात सुरू होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे. हा सामनाही जिंकून विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काल सत्तारुढ आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सकाळी ११ वाजता त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. आतिशी यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ केवळ चार महिन्यांचा राहिला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. दिल्ली विधानसभेत मोठा विजय मिळविल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाचे नाव निश्चित करायचे यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली भाजप अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्यासह भाजपचे अन्य काही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
नवीन आयकर विधेयक या आठवड्यात संसदेत सादर करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठविलं जाईल. संसदीय समितीनं मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधीचे आयकर विधेयक सहा दशकांपूर्��ी मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते. त्याची जागा आता हे आगामी विधेयक घेईल.
इन्शुरन्स मार्केट, पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनमी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आज नागपूर इथं ‘अमृतकाल: विकसीत भारत २०४७’ या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात सगरोळी इथं आज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट-युजी परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए नं जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन दिवसीय ४५ व्या पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र शासन, उपवने, उद्याने आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन विभागाचे सहायक संचालक जे.व्ही चौगुले यांनी केलं आहे.
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
व्हिडिओ क्रिकेटप्रेमींचे स्वप्न आहे की भारतीय दिग्गज एकत्र आले आणि धमाका केला सचिन तेंडुलकर तुम्हाला मित्र सुरेश रैनाची आठवण करून देईल
व्हिडिओ क्रिकेटप्रेमींचे स्वप्न आहे की भारतीय दिग्गज एकत्र आले आणि धमाका केला सचिन तेंडुलकर तुम्हाला मित्र सुरेश रैनाची आठवण करून देईल
T20 2022 रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज भारताच्या मातब्बरांनी दक्षिण आफ्रिकन संघाचा पार धुववला. मोठ्या मैदानानंतर स्वत: क्रिकेटचा देव सचिन तेुलकर मैदानात दिसल्याने भारतीयांना आनंदाला पारावार उरला. दणदणीत विजय शिवाजी टीम इंडिया लिजेंड्सचा एक धम्माल व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवराज सिंहने आपल्या गटावर हा व्हिडीओ शेअर केला असून सर्व भावनेने एकत्रितपणे पाहणे हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Suresh Raina सुरेश रैनाने घेतली भारतीय क्रिकेटमधूनही निवृत्ती, IPLमध्ये दिसणार नाही
Suresh Raina सुरेश रैनाने घेतली भारतीय क्रिकेटमधूनही निवृत्ती, IPLमध्ये दिसणार नाही
Suresh Raina सुरेश रैनाने घेतली भारतीय क्रिकेटमधूनही निवृत्ती, IPLमध्ये दिसणार नाही डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.त्याच्या काही मिनिटांपूर्वी एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.जरी दोन्ही दिग्गज आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटसाठी उपलब्ध होते, तरीही … डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला - सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली 'रन मशीन'ची समस्या
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला – सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली ‘रन मशीन’ची समस्या
भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. तो म्हणतो की विराट कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. तो म्हणाला की खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्टार फलंदाजाच्या फॉर्ममध्ये काय अडथळा आणत आहे याची मला जाणीव आहे. गावस्कर म्हणाले की, त्यांचा सल्ला कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
उद्या, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा T20 खेळला जाईल, ही दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन असू शकते.
उद्या, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा T20 खेळला जाईल, ही दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन असू शकते.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा T20 खेळ�� आहे 11: भारत आणि इंग्ल��ड यांच्यातील दुसरा टी-२० सामना उद्या, शनिवारी ९ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. टीम इंडियाने मालिकेतील पहिला टी-20 जिंकला असला तरी दुसऱ्या टी-20 मध्ये त्यात अनेक बदल होऊ शकतात. दुसऱ्या T20 मध्ये दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते हे जाणून…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दिल्ली विधानसभेत मोठा विजय मिळविल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली भाजप अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्यासह भाजपचे अन्य काही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. त्यात भाजपला ४८ तर आम आदमी पक्षाला अवघ्या २२ जागा मिळाल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काल सत्तारुढ आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी त्यांच्या मतदारसंघात विजय मिळविला असला तरी त्यांच्या पक्षाच्या सर्वच दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज सकाळी आतिशी यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात त्या दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करतील.
नवीन आयकर विधेयक या आठवड्यात संसदेत सादर करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठविलं जाईल. संसदीय समितीनं मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधीचे आयकर विधेयक सहा दशकांपूर्वी मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते. त्याची जागा आता हे आगामी विधेयक घेईल.
इन्शुरन्स मार्केट, पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनमी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आज नागपूर इथं ‘अमृतकाल: विकसीत भारत २०४७’ या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आर्थिक वाढीसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची असून यासाठी जागृती करण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी म्हणाले.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावं आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करावे, असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं आहे. तसंच भयमुक्त-कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन दिवसीय ४५ व्या पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र शासन, उपवने, उद्याने आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन विभागाचे सहायक संचालक जे.व्ही चौगुले यांनी केलं आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणाऱ्या मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. काल झालेल्या लिलावात मोसंबीला प्रतिटन १८ हजार रुपये दर मिळाला. जालना बाजार समितीमध्ये दररोज अडीचशे ते ३०० टन मोसंबी विक्रीस येत असून दरात आणखी वाढ होण्याची शक्यता, जालना जिल्हा मोसंबी अडतिया संघटनेचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं असून, त्यात २५ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टियुद्धात दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत परभणी जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचा खेळाडू किरण मात्रे याने १० हजार मीटर धावण्याच��या स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. किरण हा परभणी तालुक्यातल्या त्रिधारावाडी इथला रहिवासी असून सध्या सेनादलात कार्यरत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्वागत उपक्रमात काल ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्रीकांत सराफ तसंच लेखक माणिक पुरी यांचं व्याख्यान झालं, सराफ यांनी आपल्या तितरबितर या पुस्तकाबद्दल तर पुरी यांनी पक्षी येती अंगणी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केलं.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवनसमोर अमेरिका आणि भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. अमेरिकेच्या अमानवीय कृती आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात ही निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट-युजी परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए नं जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे.
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात होताच विरोधकांनी अमेरिकेहून हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावरुन सभागृहाचं कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर परत कामकाजाला सुरुवात होताच अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. मात्र, विरोधकांनी याच मुद्यावर परत गोंधळ घातल्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही याच मुद्यावर गोंधळ झाला. उपसभापती हरिवंश यांनी सुरुवातीला १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेहून परत आलेल्या भारतीयांच्या मुद्यावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर दुपारी दोन वाजता निवेदन देणार असल्याची माहिती राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत चार वाजता उत्तर देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली.
****
परीक्षा पे चर्चा कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली इथं भारत मंडपमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करतील. ३६ विद्यार्थी पंतप्रधानांसोबत थेट संवाद साधणार आहेत. यावर्षी विविध माध्यमांतून सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची विक्रमी संख्या पाच कोटी एवढी आहे.
****
दहावी आणि बारावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळ सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी दिली. सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निःशुल्क आवश्यक ते समुपदेशन मिळणार असल्याचं सावरकर यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मा��ण्यासाठी नांदेडमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड इथल्या श्री हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराला देखील शिंदे भेट देणार आहेत.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी आज पदभार स्वीकारला. नांदेडचे मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि  सेवा कर विभागाचे सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
****
पक्ष आणि सरकार यामधील समन्वय साधण्यासाठी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री नाहीत, त्या सतरा जिल्ह्यांमध्ये पक्षानं जिल्हा संपर्कमंत्री नियुक्त केले आहेत. यामध्ये अतुल सावे यांची छत्रपती संभाजीनगर, पंकजा मुंडे बीड, जयकुमार गोरे धाराशिव, मेघना बोर्डीकर यांची हिंगोली  जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या, पनवेल-इंदापूर या ८४ किलोमीटर टप्प्याचं काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिली आहे. सध्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यात सेवा रस्ता पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर असून, मुख्य रस्त्याच्या व्हाईट टॉपिंग-पीक्यूसीचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्राधिकरणानं दिली आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं काल वेव्ह्ज परिषदेचं मुंबईतल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-एनएफडीसी मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेसाठी मुंबईतल्या विविध महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले होते. ऍनिमेशन, व्हीएफएक्स या क्षेत्रात असलेल्या संधींचा युवा वर्गानं फायदा करून घ्यावा,असं या परिषदेच्या मार्गदर्शक सरस्वती वाणी यांनी म्हटलं.
****
प्रयागराज इथं आज महाकुंभात आदिवासी सांस्कृतिक समागम-२०२५ आयोजित करण्यात आला आहे. बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २०२५ हे वर्ष आदिवासी अभिमानाचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान आज सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे ३८ लाख ७० हजार भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केल्याची माहिती महाकुंभ मेळा प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, महाकुंभमेळ्यात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे २३३ एटीएम उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत ४० लाख ८५ हजार भाविकांना शुद्ध पाणी मिळाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात नागपूर इथं सुरुवात होणार आहे. भारतीय पुरुष संघानं ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका २-० अशी गमावली होती. त्यानंतर प्रथमच भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरत आहे. या ��ालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी कटकमध्ये तर शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.
****
ज्येष्ठ क्रीडा आणि चित्रपट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. शिक्षणानं अभियंता असणारे संझगिरी हे मुंबई महापालिकेत मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. क्रीडा आणि चित्रपट या विषयांवरील त्यांचं समीक्षण व���चकांच्या विशेष पसंतीला उतरलं. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 9 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ ��काळी ७.१० मि.
• राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; शक्तिपीठ महामार्गाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याची माहिती. • मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत. • महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताला विजेतेपद, पुरुष संघाचाही इंग्लंडविरुद्ध मालिका विजय.
राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या पाच वर्षांच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत, त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू.
रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचं काम सुरु असून, यापुढेही हे कार्य सुरू राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून विकास कामं केली जातील, चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभं राहील, असं ते म्हणाले. मराठवाडा, विदर्भासह ठिकठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, शक्तिपीठ महामार्गाला सगळ्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.
आदिवासी भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे आपल्यापुढचं सर्वांत मोठं आव्हान असून, सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्समध्ये ‘फिस्ट-२०२५’ या आंतर��ष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते. या परिषदेचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्री पदाची संधी आपल्याकडे आली असून, सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, यावेळी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी विविध वेषभूषा साकारुन सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, अशी शासनाकडे मागणी करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा, अशी मागणी, जलतज्ज्ञांनी यावेळी केली. या एक दिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी निर्माण झालेली ही समस्या भांडण -तंटा न करता देखील सोडवता येऊ शकते, असं मत व्यक्त केलं. कोकणातून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत बंद पाईपने पाणी आणणं सहज शक्य आहे, यातून जलविद्युत प्रकल्प देखील उभारता येईल. सर्व अर्थाने उपयुक्त असा हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी ��ोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
अहिल्यानगर इथं झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. गादी गटात त्याने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव केला, तर माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजनं विजय मिळवला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता भरणे, यांच्या उपस्थितीत त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात तीन खेळाडू बाद करणारी गोंगदी त्रिशा हिला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
पुरुष क्रिकेटमध्ये, पाचव्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत, पाच सामन्यांची मालिका चार - एक अशी जिंकली. काल मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २४८ धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ ९७ धावातच सर्वबाद झाला. अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच, तर वरुण चक्रवर्तीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटात काल महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ठाकूर याने सुवर्ण पदक पटकावलं. पदक तालिकेत सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानावर, तर कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०० कोटी रूपयांच्या, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची सुधारित किंमत आता तीन हजार कोटी रुपये इतकी झाली असून, त्यानुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली काल ही माहिती दिली. अद्ययावत सुविधांसह धाराशिवचं रेल्वेस्थानक तिप्पट मोठं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा असून, ही चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं प्रतिपादन सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीनं काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं काल जालना इथं आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या सहकारी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जुना जालन्यातल्या भाग्यनगर भागात वीर विनायक दामोदर सावरकर भवन उभारलं जाणार असून, या भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ काल आमदार खोतकर यांच्या हस्ते झाला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे आजपासून तीन दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी होणार आहे.
0 notes
airnews-arngbad · 9 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना प्रामाणिक करदात्यांना करामध्ये सवलत देण्याचं उद्दिष्ट होतं - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती
राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
देशभरात आज वसंत पंचमी उत्साहात साजरी, पंढरपुरात विठ्ठल-रुख्मीणीचा विवाह सोहळा
आणि
१९ वर्षांखालील महिलांचा टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय
****
देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून, त्यांच्याकरता करांमध्ये सवलत देण्याचं उद्दिष्ट यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना होतं, असं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. करआकारणी सुलभ आणि सोपी असावी, त्यामुळे करभरणा प्रामाणिकपणे करण्याला प्रोत्साहन मिळतं, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकन डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाहीये, असं त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्या�� हदगाव इथं महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचं काम सुरु असून, यापुढेही हे कार्य सुरू राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून विकास कामं केली जातील, चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभं राहील, असं ते म्हणाले. मराठवाडा, विदर्भासह ठिकठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते.
****
जानेवारी २०२५ या महिन्यात एक लाख ९५ हजार कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात १२ पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन ३६ हजार ७७ कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन ४४ हजार ९४२ कोटी रुपये इतकं आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन १ लाख कोटी रुपये तर उपकर संकलन १३ हजार ४१२ इतकं आहे.
****
दिल्ली विधा��सभा निवडणुकीचा प्रचार उद्या संध्याकाळी संपणार आहे. भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष रिंगणात असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोमाने प्रचार करत आहेत. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी येत्या बुधवारी पाच तारखेला मतदान होणार आहे; तर आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
****
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे. गेल्या बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सर्व राज्यांना प्रयागराज इथल्या सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी आणि आपत्कालिन परिस्थितीत त्या-त्या राज्यातल्या रहीवाशांना मदत करण्यासाठी सुविधा केंद्र स्थापन करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
****
देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वतीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो.
शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून, सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो, अशी प्रार्थना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना वसंतपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
पंढरपुरात आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुख्मीणीचा विवाह सोहळा झाला. यावेळी रुख्मिणीला शुभ्र वस्त्र, मोत्याचे दागिने, अलंकार परिधान करण्यात आले होते. विविध अलंकारांनी नटलेल्या मूर्ती विठ्ठल आणि रखुमाईच्या शाही मंडपात आणण्यात आल्या, तिथं भाविकांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांच्या घोषात दोन्ही देवतांचं लग्न लागलं. सोहळ्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
****
सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन इथं ‘हर कंठ में भारत’ हा संगीताचा विशेष कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम आजपासून १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज २१ आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते साडेदहा पर्यंत थेट प्रक्षेपित केला जाईल. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणिश चावला आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर याही यावेळी उपस्थित होत्या.
****
१९ वर्षांखालील महिलांचा टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला आ��े. आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. भारताची फलंदाज गोंगदी त्रिशा हिने नाबाद ४४ तर सानिका चाळकेनं नाबाद २६ धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी प्रथम फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावाच करु शकला. भारताच्या गोंगदी त्रिशानं तीन, पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन, तर शबनम शकिल हिनं एक खेळाडू बाद केला. गोंगदी त्रिशा हिला सामना वीर आणि मालिका वीर म्हणून गौरवण्यात आलं.
****
पुरुष क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारताने तीन - एक अशी विजयी आघाडी घेतली आहे. टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.
****
उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटात आज महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ठाकूर याने सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत आज महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात मध्य प्रदेशच्या आशी चौकसी ने सुवर्ण पदक जिंकलं. या विजयासोबतच तीने राष्ट्रीय विक्रम देखील केला आहे.
पदक तालिकेत सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानावर, तर कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
****
आजच्या जागतिक पाणथळ दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका आणि इन्व्हायरमेंट लाईफ आणि सेव्ह नवी मुंबई या दोन पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थांच्या सहयोगाने बेलापूर विभागात सागरी किनारा तसंच सीवूड्स इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी प्लास्टिक बंदी आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सामुहिक शपथ घेण्यात आली, तसंच कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. या मोहिमेअंतर्गत पाणथळ जागांमधून मोठ्या प्रमाणात कचरा काढून टाकण्यात आला.
****
नाशिकजवळ सिन्नर इथं झालेल्या इनोव्हा आणि डंपर च्या अपघातात इनोव्हातल्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. रत्नागिरीचे रहिवासी असलेले हे प्रवासी कुंभमेळ्यात अमृतस्नान करून परत येत असताना सिन्नरजवळ त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली. महामार्गावर प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांनी थांबून त्यांना मदत केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे उद्यापासून तीन दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी होणार आहे.
****
नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट इथं येत्या आठ फेब्रुवारीला शासकीय सेवा आणि योजनांचं महाशिबीर आयोजित करण्यात आलं आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ गरजुंना मिळावा, तसंच तळागाळातील व्यक्ती सुध���दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी हे महाशिबीर होत आहे.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. त्याचं आंतरराष्‍ट्रीय बाजार पेठेतलं मूल्य अंदाजे १६ कोटी ४९ लाख रुपये इतकं आहे. पॅरिसमार्गे मुंबईला आलेल्या प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाच्या १७० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष आपापल्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी एकामागून प्रचारसभा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी आरके पुरम येथे एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राजेंद्र नगर, चांदणी चौक आणि लक्ष्मी नगर येथील सभांना उपस्थित राहतील. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत एक प्रचारफेरी काढणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह हे दिल्लीतील अनेक भागात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुस्तफाबाद परिसरात एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही राष्ट्रीय राजधानीत सभा घेणार आहेत. दरम्यान, ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून ८ तारखेला मतमोजणी होणार आहे. ****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधील द्वारका इथं यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक खाजगी बस आज डांग जिल्ह्यातल्या सापुतारा घाटातील खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन महिला आणि तीन पुरुषांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डी, त्र्यंबकेश्वर इथं दर्शन घेऊन काल रात्री नाशिक हुन बसने यात्रेकरू निघाले होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस कठडा तोडून खोल दरीत कोसळली. या अपघातातील जखमींवर अहवा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस मधले यात्रेकरू मध्यप्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोकनगर जिल्ह्यातले आहेत, असं याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे. **** कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अधिक पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताची होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं ई-नाम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई-लिलाव पद्धतीनं शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३० हजार शेतकऱ्यांनी ई-नाम प्रणालीवर नोंदणी केली आहे. २०२४ या वर्षाअखेर जवळजवळ ३५ लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे तेराशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव आणि बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीवर नोंदणी करुन जास्त भाव देणा��्या व्यापाऱ्याकडे शेतमाल विक्री करावा, असं आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे. **** मुंबई इथं काल पार पडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ -बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दोन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सचिन यांना सन्मानित केलं. भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला २०२४ मधल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्कार देण्यात आला. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला. बीसीसीआयनं यावेळी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीचं निवृत्ती घेतलेल्या आर. अश्विनचाही सत्कार केला. ****
महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु आहे. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं होत असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकुन दक्षिण अफ्रिका संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण अफ्रिकन संघानं १३ षटकात ५ खेळाडूंच्या बदल्यात ४५ धावा केल्या आहेत. **** भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी मुंबईत खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना पाच फेब्रुवारी, दुसरा नऊ फेब्रुवा���ी आणि तिसरा बारा फेब्रुवारी रोजी होणार आहे. ****
नेदरलँडमध्ये काल झालेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने सर्बियाच्या अलेक्सी श्र्नाचा पराभव केला तर विश्वविजेत्या डि. गुकेशला नेदरलँडच्या जॉर्डी व्हॅन फॉरेस्टने बरोबरीत रोखले. १२ व्या आणि शेवटच्या फेरीनंतर प्रज्ञानंदाने सलग तिसरा विजय मिळवत ८ पुर्णांक ५ गुण मिळवले. ११ व्या फेरीत गुकेश प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह यांच्यापेक्षा अर्ध्या गुणांनी आघाडीवर होता, पण आता त्याचा सामना अनिर्णित राहील्यानंतर तो प्रज्ञानंदाच्या बरोबरीत आला आहे. दुसरीकडे, अब्दुसत्तारोव्हला भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसीकडून पराभव पत्करावा लागला. ****
0 notes
airnews-arngbad · 11 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन;संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ
आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; सकल घरेलु उत्पादन दरात सहा पूर्णांक आठ टक्के वाढीचा अंदाज
देवस्थानांची व्हीआयपी दर्शन व्यवस्था मनमानी स्वरूपाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल
****
केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या –
मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है। देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है। डिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत है। और आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।
इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देणारा इंडिया ए आय’ कार्यक्रम, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधा, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना, लखपती दिदी योजना, अन्नपूर्णा योजना तसंच केंद्र सरकारच्या इतर समाजाभिमुख योजनांकडे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच विकास सार्थक ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या –
जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो ��ारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देतांना, त्या फार थकल्याचं तसंच त्यांना बोलणं कठीण जात असल्याची टिप्पणी केली, राष्ट्रपती भवनाकडून गांधी यांच्या या टिप्पणीचं खंडन करण्यात आलं आहे. अशी टीका ही राष्ट्रपती पदाच्या मर्यादेचा भंग करत असल्यानं, गांधी यांची ही टिप्पणी राष्ट्रपती भवनानं अस्वीकार केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
उपेक्षित घटक, महिला आणि शेतकऱ्यांवर बोलण्याने कधीही थकवा येऊ शकत नाही, असं राष्ट्रपतींचं ठाम मत आहे, भारतीय भाषांमधल्या म्हणी तसंच वाक्प्रचाराबा��त काँग्रेस नेते अनभिज्ञ असल्यानं, त्यांच्याकडून अशी टिप्पणी आली असावी, असंही राष्ट्रपती भवनाकडून जारी पत्रकात नमूद असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
२०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या वर्षामध्ये तो तीन पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, अर्थमंत्री उद्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील, या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चेची शक्यता आहे.
****
देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. याचिकेतल्या मुद्यांशी सहमत असलो तरी याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं, असंही म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथं तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या सोहळ्यात प्रसिद्ध मराठी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तसंच ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास मंत्रालयाच्या सिद्ध या संकेतस्थळाचं उद्घाटन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर, मराठी विश्व संमेलन आता परदेशातही व्हावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
****
उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.
****
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं इंग्लंडचा नऊ विकेट राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं ११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून, दोन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली –
सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली आहे.
****
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या उद्यानातील दोन सिंह शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले.
****
0 notes
airnews-arngbad · 15 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २८ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पूर्वोत्तर भारत देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन अ��ल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जेव्हा जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता, तेव्हा देशाच्या पूर्वेकडच्या भागाचं महत्त्वाचं योगदान होतं, असं सांगून पंतप्रधानांनी, ओडिशाशी व्यापारी संबंध मजबूत करण्यात आसियान देशांनी तयारी दर्शवली असल्याचं सांगितलं. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पुर्वोदय दृष्टीकोनाचं केंद्र तसंच भारताचं आघाडीचं गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास १५ कोटी नागरीकांनी पवित्र संगमात स्नान केलं आहे. या मेळ्यात उद्या पौष महिन्यातल्या मौनी अमावस्येनिमित्त दुसरं शाही अमृत स्नान होणार आहे. यानिमित्त महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांचं आगमन सुरू आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सरकारने सात-स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून, महाकुंभ परिसराला नो-व्हीआयपी झोन घोषित करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून एक हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरल�� असून औरंगाबाद विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारासंदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
परभणी इथं हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत शहा तुराबुल हक दर्ग्याचा ऊर्स दोन फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल याचा आढावा घेतला. १५ दिवस चालणार्या या उर्स मध्ये देशभरातून भाविक आणि व्यापारी मोठ्या संख्येने येतात. या काळात कायदा आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी सर्व धर्मीय शांतता कमिटीची बैठक देखील घेण्यात आली.
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
0 notes
airnews-arngbad · 16 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• ७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा-नवी दिल्लीत कर्तव्यपथावर सेना दलांसह चित्ररथांचं शानदार संचलन • छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत-पालकमंत्री संजय शिरसाट यांचं ध्वजारोहणानंतर आवाहन • लाडकी बहीण योजनेचा लाभ सक्तीने परत घेण्याबाबतच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सरकारकडून स्पष्ट • नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या किवळा परिसरातल्या कोंबड्यांना 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल
७६वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपतींनी स्वीकारली. 'स्वर्णिम भारत - विकास आणि वारसा' ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती. देशाची तीनही सेना दलं, सीमा सुरक्षा तसंच तटरक्षक दल, सशस्त्र पोलीस दल, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, गृहरक्षक दल अशी अनेक पथकं संचलनात सहभागी झाली होती. देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे १६ विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे मिळून ३१ चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडोनेशियाच्या सेनादलांचं ३५२ जणांचं पथकही या संचलनात सहभागी झालं होतं.
प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत शि��ाजी पार्क इथं झाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राज्याची सर्वांगीण प्रगती आणि लोककल्याणासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांची राज्यपालांनी आपल्या भाषणातून माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन सरकारी कामकाज अधिक गतिमान करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला.
मराठवाड्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट यांनी, आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. ‘‘त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपले प्रजासत्ताक, आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाही मुल्याची जपवणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावत असतो. लोकशाही बळकट करत असतो. या संविधानाचे महतीही आपण घरोघरी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो.’’
यावेळी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, सहायक फौजदार एकनाथ गायकवाड, तुकाराम आव्हाळे, तसंच जीवन रक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर नासिर शेख, आणि हवलदार दादासाहेब पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ** जालना इथं पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. ** परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना बोर्डीकर यांनी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या… ‘‘पालकमंत्री म्हणून माझ्यावरती दिलेली आहे, त्या जबाबदारीचं भान राखत जिल्हावासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रण केलेला आहे. चांगलं काम जिल्ह्यामध्ये उभ करणार. आणि जेवढ्याकाही केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करु.’’ ** लातूर इथं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया, असं आवाहन पालकमंत्री भोसले यांनी यावेळी केलं. ते म्हणाले… ‘‘आपल्या जिल्ह्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. संविधानाची शिकवण, स्वातंत्र्य लढ्याचे बळ आणि लोकशाहीची शक्ती याच्या आधारे आपण एक भारत, श्रेष्ठ भारत घडवू शकतो. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवुया.’’ ** नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक संजय जोशी आणि पोलीस हवालदार दिलीप राठोड यांचा सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ** मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागात पोलीस आणि अन्य विभागांचं पथसंचलन, विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी, देशभक्ती गीत गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सक्तीने परत घेण्यासंदर्भातल्या बातम्या चुकीच्या असल्याचं महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी स्पष्ट केलं आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिला, पात्रता निकषात बसत नसल्यानं, स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसंच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत कळवण्यात येत आहे, अशाच महिलांना लाभ देण्यात येत नसल्याचं, यादव यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा इथं कोंबड्यांमध्ये 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. २० जानेवारी रोजी अनेक कोंबड्या दगावल्याचं आढळून आल्याने पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबड्यांचे नमुने पुणे इथल्या राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि भोपाळ इथल्या कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्या नमुन्यांच्या तपासणीत 'बर्ड फ्लू' लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून लोहा तालुक्यातल्या किवळा परिघातला दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल सराफ यांनी ��नंद व्यक्त केला… ‘‘प्रतिक्रिया माझी आनंदाची आहे. महाराष्ट्रभूषण मिळालं आणि त्याची वरची पायरी म्हणजे पद्मश्री आहे. त्यामुळे आनंद हा माझा आणखी वाढलेला आहे, एक पायरी वरती चढल्यामुळे. हा जो एक पायरी वरती चढल्याचा जो प्रसंग आहे, तो तुम्ही लोकांनी माझ्यावर आणलेला आहे. माझ्या लोकांनी, माझ्या ऑडीयंसनी आणलेला आहे. त्यामुळे मला त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. Thank You Very Much म्हणून.’’
आयसीसी १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेशवर आठ खेळाडू राखून विजय मिळवत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. बांग्लादेशच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत अवघ्या ६४ धावा केल्या. भारताने आठव्या षटकात दोन गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं.
नाशिक इथं झालेल्या रणजी सामन्यात काल महाराष्ट्राने बडोद्याचा ४२९ धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या बळावर महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी ६१६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बडोद्याचा संघ अवघ्या १८७ धावाच करु शकला. पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा सौरभ नवले सामनावीर ठरला.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल जिल्ह्यात विविध विभाग���ंमार्फत होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. जनहित हा प्राधान्यक्रमाचा निकष असायला हवा त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा, असं त्यांनी सांगितलं. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामांचा देखील शिरसाट यांनी आढावा घेतला.
धाराशिव इथं जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल झाली. या बैठकीत २०२५-२६ साठी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्तावित आराखडा मांडण्यात आला. दरम्यान, महा आवास योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन सरनाईक यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल जालना ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योगाची आणि शेतीमालाची निर्यात आणि आयातीसह देशातंर्गत मालवाहतूक करण्यासाठी या ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत आहे.
0 notes
airnews-arngbad · 18 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केलेले चपळगांवकर यांनी, ७० च्या दशकात बीड इथं वकिली केली, आणि ८० च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९९९ साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रीय राहिले. माजलगाव इथं झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन तसंच वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भुषवली होती. चपळगांवकर यांची अनंत भालेराव-काळ आणि कर्तृत्व, कर्मयोगी संन्यासी, कहाणी हैदराबाद लढ्याची, कायदा आणि माणूस, विधीमंडळ आणि न्यायसंस्था, मनातली माणसे, संस्थानी माणसे, हरवलेले स्नेहबंध, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, यासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं, चपळगांवकर यांची समग्र माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळाचं नुकतचं लोका��्पण केलं आहे. चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना आदरांजली वाहिली आहे, चपळगावकर यांच्या निधनानं सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे, त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी शोक व्यक्त केला. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात आज पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये जीवित किंवा मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालं नाही. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २ पूर्णांक ४ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू दुंडा तहसीलमधील खुरकोट आणि भरणगाव वनक्षेत्र होते. काल सकाळीही उत्तरकाशीमध्ये दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत असलेले राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि चित्ररथांच्या कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी संवाद साधला. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व नागरिकांनी अत्यंत जबाबदारीनं आपापली कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सर्वच सहभागींनी विविध राज्यांच्या लोकांशी संवाद साधून एक भारत श्रेष्ठ भारत भावनेला बळकटी द्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरसह राज्यात वीस शहरांमध्ये सहाशेहून अधिक ठिकाणी ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. यात मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि बीड या शहरांचा समावेश आहे. ई-कचरा निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. २०२१-२२ मध्ये देशात १६ लाख टन ई-कचरा तयार झाला होता. शिसं, पारा, कोबाल्ट, निकेल असे यातले रासायनिक घटक मानवासाठी आणि पर्यावरणासाठी घातक ठरतात. त्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर हा त्यावरचा उपाय आहे. ही बाब लक्षात घेऊन, पुण्यातल्या पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशननं काही संस्थांच्या मदतीनं ई-यंत्रण नावाची व्यापक ई-कचरा संकलन मोहीम आखली आहे. उद्या प्रजासत्ताक दिनी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत या ठिकाणच्या सहाशेहून अधिक ��ेंद्रांवर नागरिकांकडून ई-कचऱ्याचं संकलन केलं जाणार आहे.
नांदेड इथल्या श्री सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या सेवेला २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आज नांदेड इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी नऊ वाजता श्री अखंड पाठ साहिबची समाप्ती होईल. सायंकाळी श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवनमध्ये विशेष गुरुमत समागम, सन्मान सोहळा आणि आभार कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांमध्ये देश विदेशातील संत महापुरुष, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी सहभागी आहेत.
भारत आणि इंग्लंड संघात दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम् मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल.
0 notes
airnews-arngbad · 19 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीपैकी ९८ टक्के थेट परदेशी गुंतवणूक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. • मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन. • भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. • राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाची सुरुवात. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ६० धावांनी विजय.
स्वित्झर्लंडच्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचादरम्यान महाराष्ट्रानं केलेल्या सामंजस्य करारांच्या एकंदर गुंतवणुकीपैकी ९८ टक्के गुंतवणूक ही थेट परदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दावोस इथून काल वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी, या गुंतवणुकीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी ग्वाही दिली. या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याचं फिचर असेल तर याच्यामध्ये जवळपास अठ्ठाण्णव टक्के जी गुंतवणूक आहे, ही फॉरेन डायरेक्ट इनव्हेसमेंट आहे. ती एफडीआय एफआय च्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आपल्या राज्याकरता यासाठी महत्वाची आहे, ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणूकीच्या स्वरुपात येत आहे. आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणूकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि त्यात जॉबची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. ती विस्तारीत होते एक्सपांड होते.
या परिषदेदरम्यान महाराष्ट्रानं एकंदर ६१ सामंजस्य करार केले असून त्यामुळे १५ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या सर्व भागात आणि क्षेत्रात गुंतवणूक आल्यानं राज्‍याचा समतोल विकास होईल, असा ‍विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या २८ पैकी २० कंपन्या राज्यातल्या असताना दावोस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्याचवेळी गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारापैकी किती अंमलात आले याची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना केलं. दावोसमध्ये सर्व गुंतवणूकदार एकत्र येतात, त्यामुळं इथे येणं आवश्यक असल्याची ��्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, जे एफडीआय आहे त्यामुळे त्यांची अशी इच्छा असते की त्यांचे जे ग्लोबल पार्टनर आहेत. त्यांचे जे इनव्हेस्टर आहेत. किंवा त्यांच्या सोबत जे लोकं टेक्नॉलॉजी मांडताय अशा सगळ्यांच्या प्रेझेन्स मध्ये एमओयु झाले पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतय नेटवर्कींगचं कनेक्टींच एक महत्वाचं सेंटर आहे. इथला तुमचा प्रेझेन्स हा जे काही जगभरातले उद्योजक असतात, जे इनव्हेस्टर असतात त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करतो.
दरम्यान, दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करारांची प्रथा सलग तिसऱ्या वर्षी कायम राहिली असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात काही हजार कोटींची गुंतवणूक यानिमित्ताने येणार असून, औद्योगिक क्षेत्रात समतोल राखण्याचं कामही महायुती सरकारने केलं, असं सामंत म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १० हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहणार आहेत.
भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते काल परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या देश कृषि उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे, असं ते म्हणाले. मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे या कार्यक्रमास उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती काल पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते, असं नमूद केलं.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काल मुंबईत मेळावा झाला. यावेळी बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, वेळ येईल तेव्हा स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं.
साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसा���ारण सभेत ते काल बोलत होते. एफआरपीच्या प्रमाणात एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत वाढत नाही, या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री तसंच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यातल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी, तसंच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. हमी भावाने ३०० केंद्रांवरून तीन लाख मेट्रीक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या सर्व एस टी बस स्थानकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावं आणि ती एक लोकचळवळ व्हावी, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मुंबईत कुर्ला बसस्थानक इथं या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते काल बोलत होते. बसस्थानक ही सार्वजनिक जागा असून, तिथे स्वच्छता ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.
महिला क्रिकेटमध्ये, १९ वर्षांखालील टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी विजय मिळवला. काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात ११८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २० षटकात नऊ बाद ५८ धावाच करु शकला.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात नवी दिल्लीत मूळच्या बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या देवडी इथल्या फ्लाईंग ऑफीसर दामिनी देशमुख या परेड कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. याबद्दल दामिनी यांचे वडील माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दामिनीचे आर्मी परेडसाठी सलेक्शन झाले, ही गोष्ट आमच्या कुटुंबासाठी खूपच अभिमानाची आहे. आम्हाला त्याचा खूप आनंद झालेला आहे.
महसूल विभागात अंतर्भाव झालेल्या अनेक नवीन संगणकीय प्रणालींची कार्यपद्धती प्रशिक्षणातून जाणून घ्यावी, असं आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. सध्याच्या काळात आपल्या कामाच्या स्वरुपाचं आकलन करुन त्यानुसार प्रशिक्षण घ्यावं, या प्रशिक्षणाचा अंतिम उपयोग हा लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.
जालना जिल्ह्यात येत्या ३० ते १३ फेब्रुवारी दरम्यान स्पर्श -कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. यासंर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून तालुकास्तरावर नवीन आयुष्यमान कार्ड काढण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज कर समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप, तक्रारी निकाली काढण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येतं.
नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना १७ हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
airnews-arngbad · 21 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये सहा लाख २५ हजार कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन कंपन्यांचा पुढाकार, सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांच्या कारवाईत १४ नक्षलवादी ठार
आणि
१९ वर्षांखालील टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा मलेशियावर अवघ्या १७ चेंडूत विजय
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या ३१ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू समूहासोबत झालेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारानुसार, गडचिरोलीत २५ मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल. कल्याणी उद्योगसमुहासोबत संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत संरक्षण क्षेत्रात, तर विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत पोलाद आणि धातू क्षेत्रात सामंजस्य करार झाले. छत्रपती संभाजीनगर इथं एबी इनबेव, अवनी पॉवर बॅटरीज आणि जेन्सोल यांची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे....
‘‘छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटी, विद्युत बस, ट्रक आणि परवडण्याजोग्या इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन कंपनी करणार आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होतील. तसंच एबी इनबेव्ह या जगातल्या सर्वात मोठ्या ब्रुअरीसोबतही महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठीचा सामंजस्य करार केला.’’
या सर्वच करारांच्या माध्यमातून राज्यभरात ९२ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल जागतिक आर्थिक मंचच्या कार्यक्रमांअंतर्गत विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासंदर्भात चर्चा केली.
****
जागतिक स्तरावर भारतानं एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे, राज्यघटनेने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिल्यानेच हे शक्य झालं असल्याचं, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं आहे. पाटणा इथं ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते काल बोलत होते. लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे, सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं.
****
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाच्या कौशल्याचं दर्शन घडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओने विकसित केलेलं 'प्रलय' हे क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर प्रदर्शित होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष दोन चित्ररथही संचलनात सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी होणार आहे.
दरम्यान, नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत महाराष्ट्रातल्या दोन शाळांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये इस्लामपूरच्या राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी, तसंच नाशिकच्या भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूलच्या पथकांचा समावेश आहे. ही महाअंतिम फेरी परवा २४ आणि २५ जानेवारी रोजी होणार आहे.
****
तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल सायंकाळी मुंबईत झालेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आराधे यांना पदाची शपथ दिली.
****
येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात ५० लाख मतं कशी वाढली याची माहिती निवडणूक आयोग देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करून, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.
****
छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवर सोमवारी रात्री झालेल्या संयुक्त अभियानात १४ नक्षलवादी मारले गेले. कुल्हाडीघाट आरक्षित वन क्षेत्रात मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगढ आणि ओडिशा पोलिस तसंच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान राबवलं. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं.
दरम्यान, या कारवाईमुळे नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात शाह यांनी, नक्षलवादावर हा मोठा प्रहार असल्याचं नमूद केलं.
****
१९ वर्षांखालील टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अवघ्या १७ चेंडूत यजमान मलेशियाचा पराभव करून इतिहास घडवला. मलेशियात क्वालालांपूर इथं काल झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर मलेशियाचा संघ अवघ्या ३१ धावांत गारद झाला, भारताच्या वैष्णवी शर्मा हिने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाच धावांत पाच बळी घेत, हॅटट्रिक नोंदवली. भारतीय संघानं सलामीवीर जी त्रिशाच्या १२ चेंडूत नाबाद २७ धावांच्या बळावर अवघी दोन षटकं आणि पाच चेंडूत बिनबाद ३२ धावा करत, विजय मिळवला. वैष्णवी शर्मा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी श्रीलंकेसोबत होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेला काल प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेतले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
****
दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी, या दोघांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या संशोधनाचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत..
‘‘वाहन चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचं कुठे, हा दुचाकी चालकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र येत्या काही दिवसांत हे हेल्मेट दुचाकीच्या डिक्कीमध्ये फोल्ड करून ठेवता येणार आहे. नागपूरचे डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी फोल्डिंग हेल्मेट तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे हेल्मेट तयार करताना, त्याची सर्व कार्यपद्धती आणि मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेल्या या फोल्डिंग हेल्मेट साठी डॉ. संजय ढोबळे आणि आदिती देशमुख या दोघांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळालं आहे.’’
****
ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिव देहावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. साखरे यांचं सोमवारी रात्री पुण्यात निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. राज्य सरकारनं २०१८ या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. साखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या सहकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपये अनुदान जमा झालं आहे.
****
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १३ ते २७ जानेवारी या कालावधीत 'जंत निर्मुलन पंधरवडा' पाळला जात आहे. त्या अनुषंगाने सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय पशूंना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून जंत निर्मुलन औषधी द्यावीत, असं आवाहन बीडच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलं आहे. आपल्या पशूंना लाळ-खुरकूत लसीकरण करून घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
****
जालना इथं काल महानगरपालिका आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे काल प्लास्टिक विरोधी तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये सुमारे १० किलो प्लास्टिक जप्‍त करण्‍यात आलं. यापुढे प्‍लास्‍टीक आढळून आल्‍यास दंड आकारण्‍यात येईल अशी ताकीद देण्‍यात आली.
****
नांदेडमध्ये काल पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ५० उमेदवारांची ‍अंतिम निवड करण्यात आली.
****
0 notes