Tumgik
#भारत महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला
loksutra · 3 years
Text
महिला विश्वचषक 2022: न्यूझीलंडने सलग दुसरा सामना जिंकला, भारताचा 62 धावांनी पराभव; मिताली राजचा संघ टॉप-4 मधून बाहेर - महिला विश्वचषक 2022: न्यूझीलंडने सलग दुसरा सामना जिंकला, भारताचा 62 धावांनी पराभव; मिताली राजचा संघ टॉप-4 मधून बाहेर पडला
महिला विश्वचषक 2022: न्यूझीलंडने सलग दुसरा सामना जिंकला, भारताचा 62 धावांनी पराभव; मिताली राजचा संघ टॉप-4 मधून बाहेर – महिला विश्वचषक 2022: न्यूझीलंडने सलग दुसरा सामना जिंकला, भारताचा 62 धावांनी पराभव; मिताली राजचा संघ टॉप-4 मधून बाहेर पडला
भारत महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताकडून झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याचवेळी राजेश्वरी गायकवाडने 2 गडी बाद केले. आयसीसी महिला विश्वचषक २०२२: ICC महिला विश्वचषक 2022 च्या 8 व्या सामन्यात, 10 मार्च 2022 रोजी, न्यूझीलंडने भारताचा 62 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा विजय आहे. त्याचवेळी भारताने पहिला सामना गमावला आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 10 विकेट घेणारा न्यूझीलंडचा एजाज पटेल तिसरा गोलंदाज | क्रिकेट बातम्या
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 10 विकेट घेणारा न्यूझीलंडचा एजाज पटेल तिसरा गोलंदाज | क्रिकेट बातम्या
एजाज पटेलने भारताविरुद्ध एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या.© एएफपी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने मुंबईत भारताच्या पहिल्या डावात सर्व 10 विकेट्स घेतल्याने दुर्मिळ पराक्रम गाजवला. शनिवारी अशी कामगिरी करणारा एजाज पटेल कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू ठरला. एका डावात 10 विरोधी खेळाडूंना बाद करण्यासाठी तो इंग्लंडचा जिम लेकर आणि माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांच्यासोबत सामील होतो.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, आणि मणिपूर या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक मतमोजणी सुरु आहे. काही ठिकाणचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष होण्याकडे वाटचाल करत आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०३ जागांपैकी ३९९ जागांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजप २४८, तर समाजवादी पक्ष ११२ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष पाच, राष्ट्रीय लोक दल दहा, तर काँग्रेस तीन जागांवर अघाडीवर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव करहाल इथून आघाडीवर आहेत.
 उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजप ४३, काँग्रेस २३, बहुजन समाज पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. लालकुआ मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार माजी मुख्यमंत्री हरीश रावत पिछाडीवर आहेत.
 पंजाब विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी आम आदमी पक्ष ८९, काँग्रेस १८, शिरोमणी अकाली दल सहा, तर भाजप तीन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री चरणजसिंग चन्नी देखील भदौर आणि चमकौर साहिब या दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग पटियाला मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
 मणिपूर विधानसभेच्या ६० जागांपैकी भाजप २२, काँग्रेस तीन, नॅशनल पीपल्स पार्टी सहा, नागा पीपल फ्रंट्स पाच जागांवर आघाडीवर आहे.
 गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागांपैकी भाजप १९, काँग्रेस ११, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तीन, आम आदमी पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे.
भाजपचे बंडखोर उमेदवार माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पणजी मतदारसंघातून पराभव झाला.
दरम्यान, गोव्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार असल्याचं वृत्तसंस्थ���च्या बातमीत म्हटलं आहे.
****
अपंग, मूक-बधिर आणि मतिमंद असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर शाळेमध्ये मिळणाऱ्या महत्वाच्या सुविधे बाबत विचारणा करत परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शहरातल्या कांचन त्र्यंबकराव कत्रुवार कर्णबधीर विद्यालय आणि रीना करेवार मतिमंद विद्यालय या शाळांना त्यांनी भेट दिली. अपंग, मतिमंद कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत त्यांच्याशी सांकेतिक भाषेत संवाद साधताना टाकसाळे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा आणि संगणक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित शाळांना दिले.
****
नांदेड जिल्ह्यात मुदत संपलेल्या कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड आणि हदगाव, या नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी, प्रभाग रचना कार्यक्रम-२०२२ जाहीर करण्यात आला आहे. या प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती, सूचना असतील तर येत्या १७ मार्च पर्यंत लेखी सादर करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार १७६ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. चांदवड तालुक्यात वाकी बुद्रुक इथं वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर अन्य भागात एकूण पाच जनावरं दगावली असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या अवकाळी पावसामुळे ११ हेक्टरवरील गहू पिकाला फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
क्रिकेट खेळाविषयीच्या नियमांचे सर्वाधिकार असलेल्या एम सी सी क्रिकेट संघटनेनं, २०१७ नंतर प्रथमच क्रिकेटच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या असून हे नियम येत्या १ ऑक्टोबर पासून लागू केले जाणार असल्याचं म्हटलं आहे. एम सी सी नं सुधारणा केलेल्या एकूण नियमांची संख्या ९ असून यापुढे एखादा खेळाडू झेलबाद होत असताना धावपट्टीवरल्या फलंदाजांनी धाव घेतली, तरी झेलबाद झालेल्या फलंदाजाच्या जागी येणाऱ्या फलंदाजालाच स्ट्राईक घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय चेंडूला चमक आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या लाळेच्या वापरावरही बंदी लादण्यात आली आहे.
****
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरु आहे. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २६१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३८ षटकात सहा बाद १३५ धावा झाल्या होत्या. भारताला विजयासाठी आणखी १२६ धावांची आवश्यकता आहे.
****
0 notes
mhlivenews · 3 years
Text
इंग्लंडच्या हाता-तोंडाशी आलेला विजय हिसकावला
इंग्लंडच्या हाता-तोंडाशी आलेला विजय हिसकावला
मुंबई-ललिता पिल्लेवार  भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना सुरू आहे. तर दुसरीकडे महिला संघाचा इंग्लंड विरुद्ध सामना रंगला होता. या सामन्यामध्या शेफाली वर्मा आणि स्नेहा राणाने कमालीची कामगिरी केली. महिला क्रिकेट संघाचं जगभरात कौतुक होत आहे. महिला संघाने आपली जबरदस्त कामगिरी करत आता इंग्लंड टीमच्या हातून विजय खेचून आणत सामना ड्रॉ केला. स्नेहा राणाने 80 तर तानिया भाटियाने 44…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कॉमनवेल्थ गेम्स 2022, महिला हॉकी कांस्यपदक सामना, भारत विरुद्ध न्यूझीलंड, लाइव्ह अपडेट्स: भारत 1-0 ने पुढे, कांस्यपदकावर बंद | राष्ट्रकुल खेळ बातम्या
कॉमनवेल्थ गेम्स 2022, महिला हॉकी कांस्यपदक सामना, भारत विरुद्ध न्यूझीलंड, लाइव्ह अपडेट्स: भारत 1-0 ने पुढे, कांस्यपदकावर बंद | राष्ट्रकुल खेळ बातम्या
कॉमनवेल्थ गेम्स 2022, भारत विरुद्ध न्यूझीलंड, महिला हॉकी कांस्यपदक सामना, लाइव्ह अपडेट्स: सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकाच्या लढतीत भारत न्यूझीलंडविरुद्ध 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या क्वार्टरनंतर स्कोअरलाइन 0-0 अशीच राहिली पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये सलीमा टेटेने स्कोअरिंगची सुरुवात केली. 3थ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने बरोबरी साधल्यासारखे वाटत होते परंतु भारताने रेफरलचा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 June 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ जून २०१९ सकाळी ७.१० मि. ****  अकरावीच्या आरक्षित जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पालकांच्या हमीपत्रावर प्रवर्ग बदलण्याची मुभा  मादक द्रव्य तस्कर आणि विक्रेत्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद करावी - अजित पवार यांची मागणी  मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल आणि  राज्यात पावसाशी निगडित घटनांमध्ये वीस जणांचा मृत्यू; मराठवाड्यात अनेक भागात पाऊस **** राज्यात अकरावी प्रवेशासाठी अधिकांश विद्यार्थ्यांनी सामान्य प्रवर्गातून अर्ज भरले असून, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या अनेक आरक्षित जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातून प्रवर्ग बदलण्याची सुविधा उपलब्ध क���ून दिली जात आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र नसेल, त्यांना पालकांच्या हमीपत्रावर प्रवेश देण्यात येईल तसंच ही प्रमाणपत्रं सादर करण्यासाठी तीन महिने मुदत देण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली. राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी राखीव कोट्यातून फक्त १३ टक्के तर आर्थिक दुर्बल घटकातून फक्त ९ टक्के विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. औरंगाबाद विभागातून हे प्रमाण अनुक्रमे १५ आणि सुमारे अकरा टक्के एवढं आहे. भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम- आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या भाग एक आणि दोनमध्ये सुधारणांसाठी एक जुलैपर्यंत मुदत दिली असल्याची माहितीही शेलार यांनी दिली. दरम्यान, पुढील पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी सौर ऊर्जा सयंत्र बसवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असं शेलार यांनी काल विधानसभेत सांगितलं. यावर्षी जिल्हा परिषदांच्या शाळांच्या दुरुस्तीसह अन्य भौतिक सुविधांसाठी ४०० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी दिली. **** मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या तेरा हजारावर तरुणांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल विधानसभेत केली. आंदोलनादरम्यान मृतांच्या कुटुंबियांना नोकरी आणि दहा लाख रुपये मदत जाहीर झाली होती ती तात्काळ मिळावी, असंही वडेट्टीवार म्हणाले. याबाबत महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी, गुन्हे मागे घेण्याची प्रकिया सुरू असून, नोकरी आणि दहा लाख रुपये मदतीबाबतचा लवकरच माहिती देण्यात येईल असं सदनाला सांगितलं. **** मादक द्रव्य तस्कर आणि विक्रेत्यांसाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. यावर, राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराला आळा घालण्याकरता मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात असा एक कक्ष स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिली. **** अनाथांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. काल विधानसभेत बच्चू कडू यांनी राज्यातल्या अनाथ बालकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानांतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. **** खटले सुरू असणाऱ्या आणि दोषी ठरलेल्या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेत राज्यात तीन नवीन तुरुंग उभारण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांनी काल विधानसभेत दिली. यवतमाळ, गोंदिया आणि अहमदनगर इथे हे तुरुंग उभारले जाणार आहेत. औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करतांना संबंधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्यासाठी, वाटाघाटीनं दर ठरवण्याची आणि संमतीशिवाय भूसंपादन न करण्याची तरतूद असलेलं विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं. दुष्काळी भागातल्या चारा छावण्या १ ऑगस्टपर्यंतच सुरू ठेवणं आणि टँकरनं पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झाला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. राज्यातले अडीच कोटी, सात बारा उतारे संगणकीकृत झाले असून त्यापैकी ८० लाख उताऱ्यांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झाल्याचंही त्यांनी यावेळी दिली. **** बुलडाणा जिल्ह्यातल्या ऐतिहासिक लोणार सरोवराच्या समस्यांबाबत स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाल�� एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत सांगितलं. वन्य प्राण्यांमुळे शेतीच्या नुकसानाची भरपाई १५ दिवसांत नाही मिळली तर ती व्याजासह दिली जाईल, असं मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत सांगितलं. **** दूध भेसळी विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. दूध भेसळीला सहकार्य करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांविरूद्ध कारवाई केली जाईल, असं त्यांनी काल मुंबईत स्पष्ट केलं. राज्यात्या दूध स्थीतीबाबत अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्यांबरोबर विधानभवनातल्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काल सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केलं. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता असल्यानं कॅव्हिएट दाखल केल्याचं पाटील यांनी सांगितलं. यामुळे, आता मराठा आरक्षणाविरोधात कोणीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, तरी न्यायालय आधी विनोद पाटील यांची बाजू ऐकेल. **** मुंबई स्टॉक एक्सचेंजनं हळद व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या एक्सचेंजमार्फतच्या हळद व्यापाराला काल सांगली इथून सुरुवात करण्यात आली. देशातले चार कोटी ग्राहक ऑनलाईन पद्धतीनं या व्यवहारात आता सहभागी होऊ शकतील. **** राज्यात पावसाशी निगडित घटनांमध्ये वीस जणांचा मृत्यू झाला. पुण्यात एका गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. मुंबईत पावसाशी संबंधित अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले, नांदेड जिल्ह्यात उमरी इथं एका महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. दरम्यान, नांदेडसह जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. **** यवतमाळ जिल्ह्यातल्या कोसदनी घाटात रस्ता वाहून गेल्यानं नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग बंद झाल्याचं वृत्त आहे. काल पहाटेच्या सुमारास उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर कोसदनी घाटातला नाला दुथडी भरून वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात होत आहे. शून्य टक्के पाणी साठा असलेल्या भंडरदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. **** खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँका तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून चोवीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांना एकशे अट्ठावन्न कोटी साठ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याला एक हजार पन्नास कोटी रुपये पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. **** निराधारांना महिन्याला तीन हजार रुपये मानधन द्यावं या आणि अन्य मागण्यांसाठी निराधार संघर्ष समितीच्यावतीनं काल लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून निराधार तसंच दिव्यांग मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. निराधारांसाठ�� दारिद्र्य रेषेची अट रद्द करावी, अपंगत्वासाठीचं वैद्यकीय प्रमाणपत्र तालुकास्तरावर देण्यात यावं या प्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड, सोयगाव तालुक्यातल्या सिंचन प्रकल्पांची कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. काल औरंगाबाद इथं फुलंब्री तालुक्यातल्या सांजूळ लघु तलाव तसंच कन्नड तालुक्यातल्या प्रस्तावित नेवपूर आणि जामडी धरणासह विविध कामांचा आढावा कराड यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी पाणी वापराचं योग्य नियोजन करावं, असं आवाहन कराड यांनी केलं आहे. **** झारखंडमध्ये जमावाच्या मारहाणीत एका इसमाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ काल मराठवाड्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. औरंगाबाद, परभणी, हिंगोली इथं नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर केलं. **** परभणी शहरात अनेक ठिकाणची अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. स्वछता मोहिमेअंतर्गत नाल्यांवरची अतिक्रमणं काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. **** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघानं काल श्रीलंकेचा नऊ गडी राखू न पराभव केला. श्रीलंकेनं दिलेलं दोनशे चार धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेनं सदतिसाव्या षटकांत एक गडी गमावून पार केलं. दरम्यान, या स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असे दोन सामने होणार असून, उद्या भारत आणि यजमान इंग्लंड संघात सामना होणार आहे. ***** ***
0 notes