Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीत २९२ जागांसह एनडीएला बहुमत-इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय
मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह सात राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह पाच राज्यांत काँग्रेसला निर्भेळ यश
इंदूरचे भाजप उमेदवार दहा लाखांहून अधिक मतांनी विजयी तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा-१३ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
औरंगाबादहून संदिपान भुमरे विजयी तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर श्रृंगारे पराभूत
परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली तर हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
****
केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्ष १६, भाजप तीन; आसाम - भाजप नऊ, काँग्रेस तीन; छत्तीसगड - भाजप १०, काँग्रेस एक; हरियाणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंड भाजप आठ, झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन; ओडिशा भाजप १९, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटक भाजप १७, काँग्रेस नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दल दोन; तेलंगणा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थान - भाजप १४, काँग्रेस आठ; गुजरात - भाजप २५, काँग्रेस एक; बिहार - भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १२, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष ३७, भाजप ३३, काँग्रेस सहा; पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसनं २९, काँग्रेस एक तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत.
काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली - भाजप एक, अपक्ष एक; गोवा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक; मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक २२, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले.
काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक १४ तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुरागसिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी, आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी १२ लाखावर मतं मिळवत, दहा लाख आठ हजार मताधिक्यानं विजय संपादित केला, मात्र याच मतदार संघात वरीलपैकी कोणी नाही-नोटा या पर्यायाला सुमारे दोन लाख १८ हजार मतदारांनी पसंती दिली.
****
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त १७ जागाच मिळवता आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँगेसला चार, तर काँगेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते, यंदा शिंदे यांचे सात सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे एक खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते, तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्या वेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला, १३ जागा मिळून तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले होते, ही संख्या आता नऊ झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त ३ खासदार राहिले होते, ती संख्या आता आठ झाली आहे.
****
विदर्भात नागपूर मधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, गडचिरोली-चिमूर नामदेव किरसान, अमरावती बळवंत वानखेडे, वर्धा अमर काळे, बुलडाणा प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगाव मधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी - भास्कर भगरे, नाशिक राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
****
सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळ श्रीरंग बारणे, पुणे मुरलीधर मोहोळ, बारामती सुप्रिया सुळे, शिरुर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला.
****
रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदूर्ग-रत्नागिरीतून नारायण राणे, पालघर हेमंत सावरा, भिवंडी सुरेश म्हात्रे, कल्याण श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले.
****
उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला.
वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रविंद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी तेलगु देसम पक्ष १३५, वायएसआर काँग्रेस ११, तर भाजपनं आठ जागांवर विजय मिळवला.
ओडिशा विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी भाजप ७८, बिजू जनता दल ५१, तर काँग्रेसनं १४ जागा जिंकल्या.
****
मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदिपाम भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख ३३ हजार ५५७ मतांनी पराभव केला. भुमरे यांना चार लाख ७४ हजार ४३४, सय्यद इम्तियाज यांना तीन लाख ४० हजार ८७७, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख ९१ हजार ८७० तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे ६९ हजारावर मतं मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनेक फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत, अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सहा हजार ५५३ मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना सहा लाख ७७ हजार ३९७, तर सोनवणे यांना सहा लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली.
जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. दानवे यांना चार लाख ९७ हजार ९३९, तर काळे यांना सहा लाख सात हजार ८९७ मतं मिळाली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा एक लाख ३४ हजार ६१ मतांनी विजय झाला. जाधव यांना सहा लाख एक हजार ३४३, तर महायुतीचे महादेव जानकर यांना चार लाख ६७ हजार २८२ मतं मिळाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार ६०२ मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना चार लाख ९२ हजार ५३५, तर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना तीन लाख ८३ हजार ९३३ मतं मिळाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना पाच लाख २८ हजार ८९४, तर चिखलीकर यांना चार लाख ६९ हजार ४५२ मतं मिळाली.
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी ६१ हजार ९०० मतांनी विजय मिळवला. काळगे यांना सहा लाख नऊ हजार २१, तर विद्यमान खासदार सुधार श्रृंगारे यांना पाच लाख ४७ हजार १२० मतं मिळाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मताधिक्यानं विजय झाला. त्यांना सात लाख ४८ हजार ७५२, तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ मतं मिळाली.
****
जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘देशवासियों ने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बडे लोकतंत्र की जीत है, ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है, ये विकसित भारत के पर्व की जीत है।’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी मताने हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
या निकालानंतर सामान्य माणसाने आपली ताकत दाखवून दिली असून, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्तदि ली आहे.
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस पक्षानेही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा, जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले.
‘‘जो देश मे चुनाव के रिज़ल्ट आएं हैं, मैं तो पहले कहूंगा ये जो रिज़ल्ट है, जनता के रिज़ल्ट हैं, और ये जनता की जीत है, और लोकतंत्र की जीत है।’’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
‘‘मेरे माइंड मे था के हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खडे होकर लड जाएंगे और ये सच साबित हुवा। मुझे भरोसा था और मै हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन पार्टनर्स से, काँग्रस पार्टी के हमारे सब नेताओं और कार्यकर्ताओं से दिलसे धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बडा कदम ले लिया है।’’
काँग्रेस नेते राहुल गांधी
दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीएचीही आज दिल्लीत बैठक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. का�� या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा सहा गडी राखून, तर अफगाणिस्ताननं युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला.
****
0 notes
140 से अधिक कारों वाले मंत्री - जो नबा किशोर दास थे, बीजेडी नेता को पुलिस वाले ने गोली मार दी थी | Who was Naba Kisore Das, the BJD leader tragically murdered by a policemen, the minister with almost 140 cars?
नबा किशोर दास
पार्टी: बीजू जनता दल ट्रेंड कर रहा है
जन्म: 7 जनवरी 1962
निधन: 29 जनवरी 2023
पिछले कार्यालय: ओडिशा सरकार के स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्री (2019-2023)
तीन बार के विधायक और पटनायक सरकार में
दास, जो 2019 में कांग्रेस से बीजद में चले गए थे, को एक आधिकारिक समारोह में जाते समय गोली मार दी गई थी। अस्पताल ने एक बयान में कहा, बाद में शाम को उनकी मृत्यु हो गई।
कोलकाता: जब उन्होंने 2019 में कांग्रेस छोड़ दी, तो नाबा किशोर दास, जिन्हें रविवार को उनके पूर्व निजी सुरक्षा अधिकारी (पीएसओ) ने गोली मार दी थी, ने तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी से कहा था कि उनके निर्वाचन क्षेत्र के लोग चाहते थे कि वह बीजू जनता दल में शामिल हों।
"मेरे क्षेत्र के लोग और मतदाता चाहते हैं कि मुझे बीजद से अगला चुनाव 2019 लड़ना चाहिए क्योंकि वे चाहते हैं कि हमारे क्षेत्र का विकास हो और मुझे ओडिशा के मुख्यमंत्री श्री नवीन जी से हाथ मिलाना चाहिए," दास, तीन बार के विधायक और पटनायक सरकार में वर्तमान स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्री ने 16 जनवरी को गांधी को लिखे अपने पत्र में लिखा था।
तब से दास, जिनकी रविवार दोपहर उनके निर्वाचन क्षेत्र झारसुगुड़ा में गोली मारकर हत्या कर दी गई थी, इसके सबसे वरिष्ठ नेताओं में से एक बन गए हैं।
रविवार शाम को जारी बयान में अपोलो अस्पताल, जहां दास का इलाज चल रहा था, ने उनकी मौत की पुष्टि की।
'चोटों की मरम्मत की गई, और हृदय की पंपिंग में सुधार के लिए कदम उठाए गए। उन्हें तत्काल आईसीयू देखभाल दी गई। लेकिन तमाम कोशिशों के बावजूद उसे बचाया नहीं जा सका और उसने दम तोड़ दिया।'
स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआई) के एक नेता और ओडिशा कांग्रेस के प्रमुख से नवीन पटनायक कैबिनेट के सबसे भरोसेमंद मंत्रियों में से एक के रूप में, पटनायक सरकार के सबसे अमीर मंत्री, दास ने एक उल्कापात देखा है राजनीतिक उदय।
'असामान्य'
रविवार को, 2019 में पहली बार मंत्री बने दास को एक आधिकारिक कार्यक्रम में भाग लेने के दौरान गोली मार दी गई थी। सब-इंस्पेक्टर गोपाल दास के रूप में पहचाने जाने वाले संदिग्ध, कथित तौर पर कुछ साल पहले स्वास्थ्य मंत्री के पीएसओ थे और तब से उन्हें हिरासत में ले लिया गया है।
पुलिस का कहना है कि गोली दास के सीने में लगी। इस घटना में दो अन्य लोग भी घायल हुए हैं जिनमें एक पुलिसकर्मी भी है।
पुलिस का कहना है कि यह अभी स्पष्ट नहीं है कि संदिग्ध ने मंत्री को क्यों हटाया। ब्रजराजनगर के अनुमंडलीय पुलिस अधिकारी (एसडीपीओ) गुप्तेश्वर भोई ने संवाददाताओं से कहा, "एएसआई को हिरासत में ले लिया गया है और उनसे पूछताछ की जा रही है।" 'हम अभी नहीं कह सकते कि उसने ऐसा कदम क्यों उठाया'। ,
वायरल हुए एक वीडियो में दिखाया गया है कि दास अपने वाहन के पास गिरने से पहले गांधी चौक, ब्रजराजनगर में अपने समर्थकों का अभिवादन कर रहे हैं। जैसे ही उनकी सफेद शर्ट पर लाल दाग फैलता है, वह समर्थकों से घिरे रहते हैं, हवा के लिए हांफते हैं।
प्रत्यक्षदर्शियों के मुताबिक कम से कम 4-5 राउंड गोलियां चलाई गईं।
इस घटना ने अपने पीछे कई सवाल छोड़े हैं - सुरक्षा से संबंधित उनमें से प्रमुख। उन्होंने कहा, 'जब मंत्री अपने निर्वाचन क्षेत्र में जाते हैं, तो सुरक्षा तंत्र मौजूद होता है, मुझे नहीं लगता कि इसमें कोई तोड़ था। हम इंतजार कर रहे हैं कि जांच में क्या खुलासा होता है। बीजद सांसद कलिकेश सिंह देव ने द प्रिंट को बताया कि ओडिशा में ऐसा कुछ होना असामान्य है।....
0 notes
द्रौपदी मुर्मू का संक्षिप्त जीवन परिचय ~ Draupadi Murmu Biography in Hindi
Draupadi Murmu Biography in Hindi: 18 जुलाई को देश के सर्वोच्च पद के लिए होने वाले चुनाव में आदिवासी समुदाय से सम्बन्ध रखने वाली द्रौपदी मुर्मू को भारतीय जनता पार्टी द्वारा राष्ट्रपति पद का उम्मीदवार बनाया है। ज्ञात रहे 14वे राष्ट्रपति के रूप में पदभार सँभालने वाले श्री राम नाथ कोविंद जी का कार्यकाल ख़त्म हो रहा है।
भारत के उड़ीसा राज्य में जन्मी द्रौपदी मुर्मू आदिवासी समुदाय से सम्बन्ध रखती है, और वह भारत की पहली महिला आदिवासी के रूप में इस पदभार को ग्रहण करेंगी।
आजकल हर कोई द्रोपदी मुर्मू के बारे में जानना चाहता है। आज इस लेख में हम जानने वाले वाले है द्रोपदी मुर्मू के बारे में, जानते उनकी जीवनी और राष्ट्र्पादी पद तक के सफ़र का संघर्ष तक की पूरी कहानी।
द्रौपदी मुर्मू का संक्षिप्त जीवन परिचय : Draupadi Murmu Biography in Hindi
नाम:द्रौपदी मुर्मूजन्म तिथि:20 जून 1958पिता का नाम:बिरंचि नारायण टुडुमाता का नाम:किनगो टुडूपति का नाम:स्व. श्याम चरण मुर्मूजन्म स्थान:मयूरभंज, ओड़िशा, भारतउम्र:64 वर्ष धर्म:हिन्दूजाति:अनुसूचित जनजातिराशि:मीन राशिपेशा:राजनीतिपार्टी:भारतीय जनता पार्टी द्रौपदी मुर्मू का संक्षिप्त जीवन परिचय
द्रौपदी मुर्मू का शैक्षिक जीवन परिचय: Draupadi Murmu Personal Life
प्रारंभिक शिक्षाअज्ञातकॉलेजरमा देवी महिला कॉलेज, भुवनेश्वर, ओडिशाशिक्षाकला स्नातकद्रौपदी मुर्मू का शैक्षिक जीवन परिचय
द्रौपदी मुर्मू का प्रारंभिक जीवन परिचय:
20 जून 1958 को उड़ीसा राज्य के मयुरभंज जिले के बैदापोसी गाँव के एक आदिवासी परिवार में द्रौपदी मुर्मू का जन्म हुआ था। इनके पिता जी नाम बिरंचि नारायण टुडु और माता का नाम किनगो टुडू था। द्रौपदी मुर्मू के पिता और दादा दोनों की ग्राम प्रधान रहे।
इनकी प्रारंभिक शिक्षा गाँव के ही स्कूल से शुरू हुई, यह शुरू से पढने में मेधावी थी। पढाई लिखाई के प्रति इनकी रूचि को देखकर इनके पिता ने आगे की पढाई के लिए भुवनेश्वर भेज दिया। जहाँ इन्होने रमा देवी महिला कॉलेज, भुवनेश्वर, ओडिशा से अपना ग्रेजुएशन पूरा किया।
पढाई पूरी करने के बाद 1983 में ओडिशा सरकार के अंतर्गत सिंचाई विभाग में बतौर जूनियर लिपिक कार्य करना शुरू किया। जिसके बाद सन 1994 में बतौर शिक्षक अरबिंदो इंटीग्रल सेण्टर राइरांगपुर ओड़िसा में बच्चों को शिक्षा देने का कार्य शुरू किया।
द्रौपदी मुर्मू का पारिवारिक जीवन परिचय:
इसी दौरान द्रौपदी मुर्मू का विवाह श्याम चरण मुर्मू से हुआ, जिनसे उनको तीन संताने दो पुत्र और एक पुत्री के रूप में प्राप्त हुई। इनके दोनों बेटों का एक एक्सीडेंट में निधन हो गया और इसके बाद उनके पति श्याम चरण मुर्मू भी पञ्च तत्व में विलीन हो गए। अब उनकी सिर्फ एक बेटी है जिनका नाम इतिश्री मुर्मू है।
द्रौपदी मुर्मू का वैवाहिक जीवन भी बहुत ही कष्ट में बीता, पति और बेटों के ना रहने के बाद भी उनकी दृढ इच्छाशक्ति और कुछ कर गुजरने के जज्बे ने उन्हें हिम्मत नहीं हारने दी, और जीवन पथ में आगे बढ़ने को सदा प्रेरित रही।
द्रौपदी मुर्मू राजनैतिक जीवन परिचय:
- अपने राजनैतिक करियर की शुरुआत द्रौपदी मुर्मू ने भारतीय जनता पार्टी के साथ की। सन 1997 में उन्होंने भारतीय जनता पार्टी की तरफ से रायरंगपुर नगर पंचायत के पार्षद चुनाव में नामांकन किया और जीत हासिल की।
- इसके बाद पार्टी ने इनकी सफलता और लोकप्रियता को देखते हुए इन्हें पार्टी के अनुसूचित जनजाति मोर्चा का उपाध्यक्ष बना दिया।
- भाजपा और बीजू जनता दल की गठबंधन सरकार के दौरान आप सन 2000 से 2002 तक कॉमर्स व ट्रांसपोर्ट की स्वतंत्र प्रभार मंत्री रहीं।
- इसके बाद साल 2002 से 2004 तक मत्स्य पालन और पशु संसाधन विकास राज्य मंत्री के तौर पर काम किया।
- इसके बाद साल में 2004 ओडिशा के रायगंज विधानसभा सीट से विजय हासिल कर विधान सभा में अपनी उपस्थिति दर्ज करायी।
- साल 2015 में आपकी नियुक्ति झारखंड के राज्यपाल के रूप में हुई और साल 2021 तक झारखंड के राज्यपाल के रूप में अपने कर्तव्यों का निर्वाहन किया।
- आप झारखंड की पहली महिला गवर्नर के रूप में भी जानी जाती है।
- इसके अलावा द्रौपदी मुर्मू की पहचान स्वतंत्र भारत की पहली आदिवासी महिला राज्यपाल के रूप में भी जानी जाती है।
राष्ट्रपति पद के उम्मीदवार का सफ़र:
जीवन में कोई भी उपलब्धि बिना त्याग और परिश्रम के नहीं प्राप्त होती है। आरंभिक जीवन से लेकर वैवाहिक जीवन तक का सफ़र द्रौपदी मुर्मू के लिए बहुत ही उतार चढाव वाले रहे। साल 1997 में शुरू हुआ राजनैतिक जीवन 2022 में राष्ट्रपति जैसे पद तक पहुंचा देगा द्रौपदी मुर्मू ने शायद ही कभी इसकी कल्पना की हो।
लेकिन आज यह हकीकत में बदल चूका है। द्रौपदी मुर्मू की भारतीय जनता पार्टी ने राष्ट्रपति पद का उम्मीदवार घोषित किया है और नामांकन के दौरान देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रस्तावक और राजनाथ सिंह अनुमोदक के रूप में उपस्थित रहे है।
आप देश की पहली आदिवासी महिला राष्ट्रपति पद की उम्मीदवार के रूप में चुनी गयी है जो कि अपने आप में एक बहुत बड़ी उपलब्ब्धि है।
इसके पूर्व तक देश के राष्ट्रपति के रूप में हर वर्ग के लोगों ने प्रतिनिधित्व किया है लेकिन आदिवासी के रूप में आप पहली महिला होगी जिन्हें इस पद के लिए चयनित किया गया है।
इन पार्टियों ने दिया है समर्थन:
भारतीय जनता पार्टी की तरफ से राष्ट्रपति के रूप में उम्मीदवार घोषित करने के बाद देश की तमाम राजनैतिक पार्टियों आपके समर्थन में सामने आये है जो निम्न प्रकार से है।
- ओडिशा की बीजू जनता दल पहले ही मुर्मू को समर्थन की घोषणा कर चुकी है।
- बिहार की राजनैतिक पार्टी LJP (रामविलास) भी मुर्मू के समर्थन की घोषणा कर चुकी है।
- बिहार के ही एक और राजनैतिक दल हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) ने भी द्रौपदी के समर्थन की घोषणा की है।
- मेघालय जनतांत्रिक गठबंधन (MDA) ने भी समर्थन करने की घोषणा की है।
- सिक्किम के मुख्यमंत्री और सिक्किम क्रांतिकारी मोर्चा के अध्यक्ष प्रेम सिंह तमांग ने राष्ट्रपति पद के चुनाव के लिए द्रौपदी मुर्मू की उम्मीदवारी का समर्थन किया है।
- महाराष्ट्र की उद्धव शिव सेना ने भी द्रपादी मुर्मू को समर्थन देने की घोषणा की है।
द्रपादी मुर्मू के जीवन से जुड़े रोचक तथ्य:
साल 2007 में ओडिशा विधान सभा ने सर्वश्रेष्ठ विधायक के रूप में नीलकंठ पुरस्कार से सम्मानित किया गया था।
द्रौपदी मुर्मू झारखंड की पहली महिला गवर्नर के रूप में भी जानी जाती है।
वे भारत के राज्य की पूर्णकालिक राज्यपाल बनने वाली पहली जनजातीय महिला भी हैं।
वे भारत की पहली आदिवासी महिला है जिन्होंने राष्ट्रपति पद के लिए नामांकन किया है।
यदि द्रौपदी मुर्मू राष्ट्रपति पद का चुनाव जीत जाती है तो वे भारत की पहली आदिवासी राष्ट्रपति बनेंगी।
इसके आलावा जीतने के बाद भारत का सबसे कम उम्र की राष्ट्रपति होने का रिकॉर्ड भी उनके नाम दर्ज होगा।
- भारत के राष्ट्रपति और उनके नाम
- रामनाथ कोविंद का जीवन परिचय
- भारत के राज्यपाल एवं उनके नाम
- देश के 14वें राष्ट्रपति रामनाथ कोविंद के बारे में 10 बड़ी बातें
- योगी आदित्यनाथ का जीवन परिचय
- अमिताभ बच्चन का जीवन परिचय
महत्वपूर्ण FAQS
द्रौपदी मुर्मू का जन्म कब और कहाँ हुआ था? 20 जून 1958 को मयूरभंज, ओड़िशा, भारत द्रौपदी मुर्मू किस जाति से है? आदिवासी जनजाति द्रौपदी मुर्मू के पिता जी का नाम क्या है? बिरंचि नारायण टुडु द्रौपदी मुर्मू के माता जी का नाम क्या है? किनगो टुडू द्रौपदी मुर्मू पति का नाम क्या है? स्व. श्याम चरण मुर्मू झारखंड की पहली महिला राज्यपाल का नाम बताये? द्रौपदी मुर्मू भारत की पहली आदिवासी राष्ट्रपति का नाम बताओ? द्रौपदी मुर्मू भारत की पहली आदिवासी महिला राष्ट्रपति है।
Read the full article
0 notes