खिंड लढविली चालवीत तरवार शर्थिने खणाखणा
अखेर भांडी गडगडता ती, तोहि खिंडीमधि गडगडला
गडगडता परि पुटपुटला....
पोचलात सुखरूप गडावर धनी | धन्य हे मरण मला !
#इथेच_फुटली_छाती_परिना_दिमाख_हरला_जातीचा !
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#पावनखिंड #बाजीप्रभू #देशपांडे #शिवाजी_महाराज #Paeankhind #BajiPrabhuDeshpande #BajiPrabhu #Deshpande #ShivajiMaharaj
0 notes
मान्यवरांसाठी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा विशेष शो - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मान्यवरांसाठी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा विशेष शो – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.3 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुढील आठवड्यात या चित्रपटाचा विशेष शो राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, आमदार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी…
View On WordPress
0 notes
पावनखिंड या सिनेमातील बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे अजय पुरकर यांची सर्वत्र चर्चा; जाणून घ्या त्यांच्याविषयी…
पावनखिंड या सिनेमातील बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे अजय पुरकर यांची सर्वत्र चर्चा; जाणून घ्या त्यांच्याविषयी…
“पावनखिंड” हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवताना दिसत आहे. हा सिनेमा अनेक बॉलीवूड सिनेमांना टक्कर देत आहे. प्रेक्षक या सिनेमातील कलाकारांचे कौतुक करत आहेत. या सिनेमात बाजीप्रभूंची भूमिका साकारणारे अजय पुरकर यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजय पुरकर यांना या सिनेमामुळे नवीन ओळख मिळाली आहे.
��ॉलिवूड मधील सुपरहिरोज काल्पनिक आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील मावळे हे खरे आहेत. मावळ्यांची…
View On WordPress
0 notes
सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांची बाजीप्रभू साकारण्यासाछी केसांना कात्री | जय भवानी जय शिवाजी
सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांची बाजीप्रभू साकारण्यासाछी केसांना कात्री | जय भवानी जय शिवाजी
भूमिकेसाठी काय पण…
स्टार प्रवाहवर २६ जुलैपासून भेटीला येणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली त्या शिलेदारांच्या शौर्याला ही मालिका समर्पित आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्य़ासाठी…
View On WordPress
0 notes
बाजीप्रभू देशपांडे हे दांडपट्टा आणि तलवार चालवण्यात तरबेज होते. घोडखिंडीच्या लढाईत बाजीप्रभुंची प्रमुख भूमिका होती.
0 notes
शिवकाळ पुन्हा जिवंत होणार! पावनखिंडीतल्या शौर्याचे आता तुम्हीही होणार साक्षीदार मुंबई-बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
0 notes
बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकरांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकरांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकरांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
अभिनेते अजय पुरकर यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मराठी नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेते अजय पुरकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘पावनखिंड’ चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका तर प्रचंड गाजली. त्यांच्या या चित्रपटाला…
View On WordPress
0 notes
छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
#बाजीप्रभू_देशपांडे
#SVA_Telhara
0 notes
श्रीमंत.....भाग – ३
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
अफजलखानाच्या वधानंतर शिवाजीराजांनी अदिलशहाचा बराचसा प्रदेश काबीज करण्याचा धडाका लावला. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा स्वराज्यात आला. विजापूर दरबार हादरले. पुढच्याच वर्षी १६६० ला अदिलशहाने सिद्धी जोहरला मोठी फौज देऊन शिवरायांचा बिमोड करायला पाठवले. त्यावेळी शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्यास वेढा देवून बसले होते. सिद्धी येण्याची खबर मिळताच ते सुरक्षिततेसाठी पन्हाळ्याला आले. सिद्धीने २ मार्च १६६० ला पन्हाळ्याला वेढा घातला. काही करुन शिवाजीला पकडायचेच असा सिद्धीने निर्धार केला होता. इंग्रजांच्या मदतीने दारुगोळ्याचा वर्षाव सुरु झाला. वेढा तोडणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर शिवाजीराजांनी वेगळाच डाव टाकला. शिवा काशीद हा न्हावी शिवाजीराजांसारखाच दिसायचा. राजांनी सिद्धीला तहाच्या बोलणीत गुंतवले आणि शिवा काशीदला नकली शिवाजी बनवून सिद्दीकडे मेण्यात बसवून पाठवले. त्याचवेळी वेढयातली ढील हेरून १२ जुलै १६६० ला राजे भर पावसात रात्रीच्या अंधारात बेमालुमपणे सहाशे निवडक सैन्यासह विशाळगडावर जाण्यासाठी निघाले. सिद्धीला ही खबर लागली आणि त्याने सिद्धी मसाऊदला शिवाजीराजांच्या मागावर धाडले. पन्हाळा ते विशाळगड २७ मैलाचे अंतर चिखलातून पार करत राजे १३ जुलै १६६० ला घोडखिंडीजवळ पोहोचले होते. त्यावेळीच गनीम जवळ आल्याची खबर आली. ‘लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशींदा जगला पाहिजे’ ही शपथ घालून बाजीप्रभू देशपांडेने तीनशे सैन्यासह राजाला विशाळगडाकडे जाण्यास भाग पाडले. गडावर पोहोचल्यावर तोफांचा आवाज करायला सांगितले. राजे गेले आणि गनीमाबरोबर दिवसभर लढता लढता तीनशे मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले. गडावरुन तोफांचा आवाज आल्यावरच बाजीप्रभूंनी आपला देह खाली ठेवला.
सिद्धीने विशाळगडलाही वेढा घालण्याचा प्रयत्न केला, पण तो मराठ्यांनी उधळून लावला. चिडलेल्या सिद्धीने पन्हाळा घेण्यासाठी आक्रमण सुरु केले. मराठ्यांची हानी होवू नये म्हणून शिवाजीराजांनीच २२ सप्टेंबर १६६० रोजी पन्हाळा सिद्धी जोहरच्या ताब्यात दिला.
तीनशे मावळे, बाजीप्रभु, शिवा न्हावी यांनी बलिदान देवून आपल्या पोशिंद्याचे रक्षण केले. अशा असंख्य लोकांमुळेच स्वराज्याचा पाया भक्कम बनला होता. या योद्ध्यांच्या जाण्याने राजांना प्रचंड दु:ख झाले. पण शोक करायलाही वेळ नव्हता. इकडे औरंगजेबाने शिवाजीराजांचा बिमोड करण्यासाठी प्रचंड फौजेनिशी शाहिस्तेखानाला औरंगाबादला पाठवले होते. २८ जानेवारी १६६० ला त्याने औरंगाबाद सोडले आणि अहमदनगरला छावणी केली. तिथून २५ फेब्रुवारी १६६० ला निघून तो ३ मार्च १६६० ला स्वराज्यात घुसला. स्वराज्यात त्याने खूप अराजकता माजवली. अनेक मंदिरे फोडली, शेती��ी धुळधाण केली, रयतेला लुटले. सोनवडी, सुपे, शिरवळ, इंदापूर, बारामती इ. भागावर ताबा मिळवला आणि ९ मे १६६० ला तो पुण्यात आला. शिवाजी महाराजांचे बालपण ज्या महालात गेले त्या लाल महालावर त्याने कबजा केला.
अदिलशहा आणि मुघलांच्या आक्रमणाने चारी बाजूने स्वराज्यावर संकट आले होते. शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी दोन्ही शाह्यांनी कंबर कसली होती. पन्हाळ्यावर सिद्धीच्या तावडीत शिवाजी अडकेल या विचाराने शाहिस्तेखान पुण्यात आरामात थांबला होता. पुणे प्रांतात त्याचा हैदोस चालूच होता. १५ ऑगस्ट १६६० ला त्याने चाकणचा किल्ला घेतला. मराठ्यांनी त्यासाठी त्याला ५६ दिवस खेळवले होते. शिवाजीराजे १३ जुलै १६६० रोजीच पन्हाळ्यावरुन निसटले होते त्यामुळे मराठ्यांमध्ये खूप जोश भरलेला होता.
कोकण त्याब्यात घेण्यासाठी त्याने कारतलबखानाला मोठ्या फौजेनिशी पाठवले. पण शिवाजीराजांनी त्याला उंबरखिंडीत गाठून त्याची प्रचंड दुर्दशा केली. त्याला संपूर्ण लुटून २ फेब्रुवारी १६६१ रोजी सोडून दिले.
पन्हाळ्यावर इंग्रजांनी सिद्धी जोहरला मदत केली होती. मार्च १६६१ ला शिवाजीराजांनी इंग्रजांची राजापूरची वखार पूर्णपणे लुटली, बेईमान इंग्रजांना कैद केले आणि राजापूर ताब्यात घेतले. त्याचवेळेस सिद्धीला मदत करणार्या सूर्यराव सुर्वेचे शृंगारपूर २९ एप्रिल १६६१ ला ताब्यात घेतले. सूर्यराव निसटून जाण्यात सफल राहिला.
शाहिस्तेखानाकडे शिवाजीराजांचे लक्ष होतेच. त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. त्यामुळे कोकण मोहीम आटोपती घेऊन जुलै १६६१ मध्ये राजे राजगडावर आले. शाहिस्तेखानाने जरी स्वराज्यात धुमाकूळ घातला तरी अनेक ठिकाणी त्याच्या फौजेला मराठ्यांनी गनीमी काव्याने सतावून सोडले होते. शाहिस्तेखानाला स्वराज्यातून हुसकावून लावणे हा एकच ध्यास शिवाजीराजांनी घेतला होता. अनेक खलबतानंतर बेत ठरला आणि नेताजी पालकर व मोरोपंताच्या फौजेच्या तुकड्या घेऊन राजे स्वत: वेष बदलून पुण्यात शिरले. केवढे हे धाडस! ५ एप्रिल १६६३ रोजी स्वत: राजे काही निवडक सोबती घेऊन लाल महलात बेमालुमपणे दाखल झाले. लहानपण याच लालमहलात गेलेले असल्यामुळे तिथली खडानखडा माहिती राजांना होती. मराठे महालात शिरल्याची खबर लागताच एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळून गेलेला शाहिस्तेखान खिडकीतून उडी मारुन पळून जात असतांना राजांच्या तलवारीने त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे कापून काढली. कुणाला काही कळण्याच्या आत शिवाजीराजे बिनबोभाट सिंहगडावर पोहोचले. शिवाजी अचानक प्रकट होतो, त्याच्या अंगात दैवी शक्ती आहे, असा समज झालेला बिना बोटाचा खान आपल्या शाही लवाजम्यासह ८ एप्रिल १६६३ रोजी पाय लावून दिल्लीकडे पळाला.
शाहिस्तेखान पळून गेल्यानंतर शिवाजीराजांनी आक्रमक धोरण अवलंबले. मुघलांनी स्वराज्यात केलेली प्रचंड हानी त्यांच्याकडूनच वसूल करण्यासाठी मुघलांच्या राज्यातील संपन्न शहर सुरत लुटण्याचे शिवाजीराजांनी ठरवले. बहिर्जी नाईकने सुरतची खडानखडा माहिती पुरवली. नेताजी पालकरच्या साथीने मराठ्यांनी ५ जानेवारी १६६४ ते १० जानेवारी १६६४ या सहा दिवसात सुरतला बेसुरत केले. प्रचंड लुटीसह राजे राजगडावर परत आले.
शाहिस्तेखानाला हुसकावून लावल्यानंतर पुणे परगणा सोडून गेलेली रयत परत पुण्यात येवू लागली. याच काळात एक आघात झाला. २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजी राजांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. जिजाऊ सती जायला निघाल्या. राजांनी त्यांची मनधरणी करुन त्यांना त्यापासून प्रवृत्त केले. सुरत मोहिमेवरुन राजे वेळेवर पोहोचले नसते तर अघटीत घडले असते.
To be cont'd....
© नितीन म. कंधारकर
0 notes
*अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा पावनखिंडीतला थरार रुपेरी पडद्यावर*
‘जंगजौहर’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षक भेटीला
१३ जुलै १६६०
आषाढ शुद्ध पौर्णिमा
मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित अध्याय याचदिवशी घोडखिंडीत लिहिला गेला.
अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा हा ठसठशीत वस्तूपाठ जगासमोर साकारला गेला.
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’…
View On WordPress
0 notes
"श्री बाजींचे रक्त पेरिलें खिंडीत त्या काळा म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला" नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अभूतपूर्व पराक्रमाची शौर्यगाथा... 'जंगजौहर', हे आमचं सिनेमारूपी पुष्प श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन चरणी अर्पण... #जंगजौहर #JungJauhar #AAFilms In Association with @almondscreations Written and Directed By : @digpalofficial Produced By : @ajayarekarofficial #AniruddhaArekar PR By: @mediaone_pr @chinmay_d_mandlekar @ajay.purkar @harishh_dd #SunilJadhav @ankittmohan @akshayswaghmare @mrinalmrinal2 @sameerdharmadhikari @aastadkale #ShushrutMankani @rishi_saxena_official @ajinkya_nanaware @s.bhilare7 #SurajPilley @mahesh_ghag13 #AmirTalekar #JayendraMore #MadhaviNimkar @prajakta_official @rajanbhise #RohanMankani @daveruchi @nikhilslanjekar @pratikredij #VaibhavGalandePatil #SubhodPatil @aman_alkunte #BabbuKhanna #AmolGoley #MoviemateMedia @sanika_gadgil #PournimaOak https://www.instagram.com/p/CCf8ABWJjbM/?igshid=t37x0wmv45q1
0 notes
Youngest Leader In Politics ......# India
तरुणांनी राजकारणात का यावे ?
'समर्थांच्या राजकारणाचे मर्म दुसऱ्याला समर्थ बनविण्यात आहे. पण जो दुसऱ्याच्या सामर्थ्याला घाबरून ते नष्ट करण्याचे डावपेच खेळतो, त्याच्या सामर्थ्याला शिवतेज लाभणे शक्य नाही. ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्य महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपत होता, त्याच काळात कान्होजी आंग्रे आणि बाजीप्रभू देशपांडे यांसारखे तेजस्वी नरवीर ' न भूतो न भविष्यती ' अशी ऐतिहासिक कामगिरी बजावतात , हा योगायोग नसतो. ती सर्वोच्च नेतृत्वाची बुध्दीमान योजना व विचारसरणी असते. पण आज चित्र असे दिसते , की नेत्याला दाखवून द्यायचे की असते की मीच सर्वश्रेष्ठ आहे , त्यामुळं तो पक्षातील आपल्या इतर साथींना मोठा होऊ देत नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षात सक्षम नेतृत्व करणारा नेता शोधणं अवघडच. कारण प्रत्येकजण प्रत्येकाचे पाय ओढत असतात. यातच राजकारण्यांचा बहुतांशी वेळ खर्च होतो.
आज मनी अँण्ड मसल हेच राजकारणाचे सूत्र झालेले आहे. विचारांचे राजकारण शिल्लक आहे का ? तर नाही, चालू आहे ते फक्त प्रचारांचे राजकारण आणि गटबाजी. त्यासाठी सर्व राजकीय मुल्यांची श्रदांजली दिली जाते. लोकांना दिलेली आश्वासने धुळीस मिळवली जातात . देशाला गरज आहे तो उत्तरदायी नेतृत्वाची स्वच्छ प्रशासनाची जबरदस्त धाडसी निर्णय घेणाऱ्या नेत्याची , नव्या कल्पना तत्काळ अंमलात आणणाऱ्या व्यक्तींची , भ्रष्टाचाराने आज संपूर्ण देश पोखरलेला आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्याची तळमळ असणारे नेतृत्वच देशाला वाचू शकते. म्हणूनच अशा तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. प्रश्न सोडवणाऱ्या नव्या लोकांना जनतेने निवडून द्यायला हवे. मग तो अपक्ष का असेना. राजकारणात बदल हा नेहमीच चांगला ठरतो. त्यातूनच व्यक्तीत बदल घडतो. नवी पिढी हि बंडखोर असते व तीच बदल घडवून आणू शकते.
आपण पाहतो, बुद्धीवतांनी, विचारवंतांनी, सुशिक्षित मध्यमवर्गीयानी, सच्चे सामाजिक कार्यकते , सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या अभ्यासकांनी निवडणूक प्रक्रियेपासून स्वत:ला कायम दुर ठेवले आहे. अगदी मतदानाबद्दल त्यांची अनिच्छा दिसते. त्यामुळेच भ्रष्ट , मनगटशाहीवाले , घराणेशाहीवाले सतत निवडून देताना दिसतात. त्याचाच परिणाम म्हणजे अद्यापही राष्ट्रीय व राज्य स्तरावरील शहरांचे , खेड्यांचे प्रश्न सुटलेले नाही. सामान्य माणसाचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे . तेव्हा या सगळ्यातून तरुणांचे नवविचार क्रांती करू शकतात.
- भास्करराव म्हस्के
0 notes
‘जंगजौहर’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षक भेटीला
‘जंगजौहर’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षक भेटीला
अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा पावनखिंडीतला थरार रुपेरी पडद्यावर
१३ जुलै १६६०
आषाढ शुद्ध पौर्णिमा
मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित अध्याय याचदिवशी घोडखिंडीत लिहिला गेला.
अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा हा ठसठशीत वस्तूपाठ जगासमोर साकारला गेला.
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार…
View On WordPress
0 notes
वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते. वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले. दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते. झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती,....👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
https://youtu.be/TFvSGb5llLY कुस्ती : kusti New Official Trailer 2017 कोल्हापूर : कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन : इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. मराठा साम्राज्य : देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहे. त्यापैकी काही घटना :- १ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले. २ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे. ३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला. ४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली.. ५ संभाजीराजास पकडणार्या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली. ६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकार्यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या भूमीत घडला. मध्ययुगीन : इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव या��े कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. मराठा साम्राज्य : देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहे. त्यापैकी काही घटना :- १ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले. २ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे. ३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला. ४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली.. ५ संभाजीराजास पकडणार्या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली. ६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकार्यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या भूमीत घडला. कुस्ती : एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणार्या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :- १. कसबा बावडा कुस्ती केंद्र २. खासबाग ३. नवी मोतीबाग तालीम ४. पंत बावडेकर आखाडा ५. मोतीबाग तालीम ६. शाहू आखाडा, चंबूखडी ७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड ८. शाहूपुरी आखाडा ९. शाहू विजयी गंगावेस 10.कालाईमाम तालिम चला तर मग कुस्तीचा अभिमान असणाऱ्याने कुस्तीचा सन्मान म्हणून एक Share तर बनतोच की!!!
0 notes