Tumgik
#प्रियंका चतुर्वेदी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बेळगाव सीमा प्रश्नी सभागृहात पडसाद उमटणार? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कुणाला पाठविली नोटीस ?
बेळगाव सीमा प्रश्नी सभागृहात पडसाद उमटणार? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कुणाला पाठविली नोटीस ?
बेळगाव सीमा प्रश्नी सभागृहात पडसाद उमटणार? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कुणाला पाठविली नोटीस ? प्रदीप कापसे, दिल्ली : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद अधिकच तापला आहे. ठिकठिकाणी या वादाचे पडसाद उमटतांना बघायला मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकमध्ये न येण्याचा फतवा काढल्याने वातावरन अधिकच चिघळले आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील…
View On WordPress
0 notes
abtnews24 · 15 days
Text
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस डीवाई चंद्रचूड़ के घर गणेश पूजा में शामिल होने को लेकर विवाद ,नेताओं ने न्यायपालिका की निष्पक्षता पर सवाल उठाए, जबकि कुछ वकीलों ने इसे न्यायपालिका की स्वतंत्रता पर हमला करार दिया।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस डीवाई चंद्रचूड़ के घर गणेश पूजा में शामिल होने को लेकर राजनीतिक विवाद खड़ा हो गया है। पीएम मोदी ने खुद सोशल मीडिया पर इसकी जानकारी दी, लेकिन विपक्षी दलों ने इसे लेकर सवाल उठाने शुरू कर दिए। शिवसेना (UBT) नेता संजय राउत और प्रियंका चतुर्वेदी जैसे नेताओं ने न्यायपालिका की निष्पक्षता पर सवाल उठाए, जबकि कुछ वकीलों ने इसे न्यायपालिका की…
0 notes
rajusaini75 · 2 months
Video
youtube
प्रियंका चतुर्वेदी ने संसद सत्र में छात्रों की मौत की दुखद घटना पर चर्चा की
हाल ही में हुई संसद सत्र में, प्रियंका चतुर्वेदी ने छात्रों की मौत की दुखद घटना पर चर्चा की, जिसमें उन्होंने जवाबदेही और प्रणालीगत बदलाव की तत्काल आवश्यकता पर जोर दिया। उनके भावुक भाषण ने भविष्य में ऐसी त्रासदियों को रोकने के लिए तत्काल कार्रवाई की मांग की। जुड़ें हमारे साथ, जहां हम उनके शक्तिशाली शब्दों और अन्य सदस्यों की प्रतिक्रियाओं को जानेंगे।
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य देणाऱ्या सुधारित फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेला गती मिळणार-केंद्रीय गृहमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त.
पेपरफुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन.
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून पंकजा मुंडे तसंच सदाभाऊ खोत यांच्यासह पाच उमेदवार जाहीर.
आणि
नीट पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग.
****
देशभरात आजपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून, यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं, शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले…
साडे बावीस लाख पुलिसकर्मियों को ट्रेनिंग के लिए बाराह हजार मास्टर ट्रेनर्स बना दिए गए है. कई इस्टिट्युशन को अधिकृत किया गया है.और तेवीस हजार नौ सो बानवे मास्टर ट्रेनर अब तक ट्रेन हो चुके है.ज्युडीसरी मे ईक्कीस हजार सबऑर्डिनरी ज्युडीसरी का ट्रेनिंग हो चुका है. और इसके लिए भी मास्टर ट्रेनर्स की कई बॅच स्थानिक भाषाओं मे तय्यार हो गई है. बीस हजार पब्लीक प्रोसिक्युटर को ट्रेन किया गया है. ४२२४ पुलिसकर्मियों का ट्रेनिंग हुआ है और फॉरेन्सीक के ४००० कर्मचारीओ का ट्रेंनिग हुआ है.
****
संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभि��ाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावर सत्ताधारी बाकांवरच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गांधी यांनी अग्निवीर, अयोध्या तसंच इतर मुद्यांवरून सरकारवर टीका केली. त्यांच्या भाषणातल्या काही मुद्यांसह हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा तसंच पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आक्षेप घेतला, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी यासंदर्भात बोलताना, राहुल गांधी यांनी सदनाची माफी मागावी, अशी मागणी केली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात शेतकरी कायदे, नीट प्रक्रिया तसंच बेरोजगारीसह इतरही मुद्यांवर भाष्य केलं. या चर्चेत भाजपचे अनुरागसिंह ठाकूर, बासुरी स्वराज, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांचीही भाषणं झाली.
राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सहभागी होत, रेल्वे अपघात, जम्मू काश्मीरमधला दहशतवादी हल्ला, तसंच नीट प्रक्रियेबद्दल टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेतला.
दरम्यान, टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल दोन्ही सदनांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं
****
राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या विधानाचे पडसाद आज राज्य विधान परिषदेतही उमटले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज आधी पाच मिनिटांसाठी, नंतर दहा मिनिटांसाठी, आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनासंदर्भात विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना बोलू दिलं नसल्याचा आरोप करत, विरोधकांनी सभात्याग केला.
****
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ दोन वर्षांवरून तीन वर्षे करण्यासाठीचं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे विधेयक मांडलं.
****
अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली. याबाबत शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर हा निर्णय घेतला जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
पेपर फुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आज विधानसभेत राज्यातल्या पेपर फुटीच्या संदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना फडणवीस यांनी ही माहिती दिली, ते म्हणाले...
‘‘पेपर फुटीच्या संदर्भातल्या केंद्र सरकारनं कायदा केल्यानंतर, राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचं मनोदय, हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला. या संदर्भात आमची कारवाई चालली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सा��गितलेलं आहे की, याचं अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत.’’
गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आणखी ३१ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं घेतलेल्या नीट - यूजी या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. गेल्या २३ जूनला एक हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
****
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ४३ हजार २९७ मतपत्रिका तर मुंबई पदवीधर मतदार संघात ६७ हजार ६४४ मतपत्रिका योग्य आढळल्या. या मतपत्रिकांच्या वैधतेची तपासणी सुरु असून त्यानंतर विजयाचा कोटा निश्चित होणार आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण १२ हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली असून विजयासाठी पाच हजार ८०० हा कोटा निश्चित झाला आहे.
****
विधान परिषद आगामी निवडणूकांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर होताच, परळीत भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसंच पेढे वाटून आनंद साजरा केला.
****
'नीट'पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने आज लातूर न्यायालयात याबाबत केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली. या प्रकरणी अटकेत असलेले जमील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सीबीआयच्या पथकाने आज पूर्ण केली. त्यांचा ताबाही सीबीआयला सोपवण्यात आला. दरम्यान या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या दोन जुलैला पूर्ण होत असून, उद्या दुपारी या दोन्ही आरोपींना न्यायालयापुढं हजर केलं जाणार आहे.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात १०० वा शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद कार्यक्रम आज पार पडला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कृषी विभागातील विविध पुरस्कारांचं वितरण तसंच प्रगतीशील शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला, दरम्यान शहरातल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास महापालिकेसह विविध शासकीय, सामाजिक संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, विशेष चर्चासत्र पार पडलं.
हिंगोली शहर तसंच जिल्ह्यात कृषी दिन विविध उपक्रम तसंच वृक्षारोपणानं साजरा करण्यात आला.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणि थकीत पीक विमा तत्काळ द्यावा तसंच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, आदी मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या.
बीड इथं आज बँक ठेवीदारांनीही आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या अनेक पतसंस्थांना कुलूप लागलं असून नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकामध्ये अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्यात चालू वर्षी आतापर्यंत सरासरी २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीपाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.
****
आषाढी वारीसाठी, नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातून पंढरपूरकडे निघालेल्या साधू महाराज पायी दिंडी वारीला आज लातूर जिल्ह्याच्या सीमेवर निरोप देण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण अफ्रिकेच्या संघाचा दहा खेळाडू राखून पराभव केला. सामन्याच्या आज अखेरच्या दिवशी पाहुण्या संघाचा दुसरा डाव ३७३ धावांवर आटोपला. भारताने विजयासाठी आवश्यक ३७ धावा दहाव्या षटकांत बिनबाद पूर्ण केल्या. सामन्यामध्ये दहा बळी घेणारी स्नेह राणा सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
या दोन संघांमध्ये होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या शुक्रवारी चेन्नई इथं होणार आहे.
****
0 notes
newshawkers · 5 months
Text
0 notes
deshbandhu · 10 months
Text
संसद सुरक्षा उल्लंघन का दोष विपक्ष पर मढ़ने की कोशिश कर रही बीजेपी : शिवसेना (यूबीटी)
संसद की सुरक्षा में सेंध के एक दिन बाद, शिवसेना (यूबीटी) की राज्यसभा सांसद प्रियंका चतुर्वेदी ने गुरुवार को भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि समस्या को गंभीर सुरक्षा उल्लंघन के रूप में देखने के बजाय किसी तरह विपक्ष पर दोष मढ़नेे का प्रयास किया जा रहा है।
0 notes
prakhar-pravakta · 1 year
Text
PM मोदी के आगमन को लेकर CSP के नेतृत्व में शहर भर के होटलों में की गई चेकिंग
रीवा। पुलिस अधीक्षक विवेक सिंह के निर्देशानुसार नगर पुलिस अधीक्षक शिवाली चतुर्वेदी के नेतृत्व में शहर के सिटी कोतवाली थाना प्रभारी आदित्य प्रताप सिंह परिहार सिविल लाइन थाना प्रभारी हितेंद्र नाथ शर्मा चोरहटा थाना प्रभारी अवनीश पाण्डेय बिछिया थाना प्रभारी प्रियंका पाठक विश्वविद्यालय थाना प्रभारी विद्या वारिधि तिवारी अमहिया थाना प्रभारी निशा के साथ शहर के कई होटलों में चेकिंग की गई होटल के रिसेप्शन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newswave-kota · 2 years
Text
साड़ी रन से महिलाओं में दिखा जोश, जज्बा और जुनून
Tumblr media
‘स्वच्छ कोटा-स्वस्थ कोटा’ के लिये प्लोगिंग एम्बेसेडर ऑफ इंडिया रिपु दमन बेल्वी ने महिलाओं को घर की तरह शहर को स्वच्छ रखने की शपथ दिलाई न्यूजवेव @ कोटा कोटा फिटनेस एवं रनर्स फाउंडेशन (KFRF) द्वारा ‘स्वच्छ कोटा-स्वस्थ कोटा’ का संदेश देते हुये रविवार को शहर की 175 से अधिक महिलाओं ने 3.5 किमी की साडी रन में जबर्दस्त उत्साह से भाग लिया। फाउंडेशन के निदेशक व रनिंग कोच अमित चतुर्वेदी एवं अर्चना मूंदडा ने बताया कि कोटा में यह पहली अनूठी महिला दौड़ सेवन वंडर्स से प्रारंभ हुई, जिसमें कडाके की सर्दी के बावजूद 7 बजे 175 से अधिक महिलाओं व युवतियों ने साडी पहनकर दौड लगाई। यह रन सेवन वंडर्स से कोटडी, बड तिराहा, सत्येश्वर महोदव, लक्की बुर्ज, जयपुर गोल्डन, गीता भवन, ज्वाला तोप होते हुये 8 बजे सेवन वंडर्स पर समाप्त हुई। जहां प्लोगिंग एम्बेसेडर रिपु दमन बेल्वी ने सामूहिक शपथ दिलाई कि हम अपने घर की तरह पूरे शहर को स्वच्छ रखेंगे। बाजार में एक थैला साथ लेकर निकलेंगे। सिंगल यूज प्लास्टिक बोतल का प्रयोग नहीं करेंगे। हम अपने शहर को स्वच्छ व स्वस्थ रखने की शपथ लेती हैं। दौडते हुये पूरे रूट की सफाई की
Tumblr media
साडी रन के दौरान अपने साथ एक थैला लेकर दौडते हुये रिपु दमन ने पूरे 3.50 किमी मार्ग से प्लस्टिक थैलियां व कचरा उठाया। उनके साथ डॉ. शैफाली शर्मा, रोटरी क्लब अध्यक्ष वैशाली भार्गव, रोटरी क्लब रायल अध्यक्ष ममता खंडेलवाल व रोटरी पद्मिनी अध्यक्ष गुरप्रीत आनंद व मैराथन कोच अजय सेठी भी थैला लेकर कचरा उठाते हुये चले। जिससे 1 घंटे में पूरे 3.5 किमी के रास्ते को कचरामुक्त कर दिया। दमन ने कहा कि महिलायें स्वयं को चौका-चूल्हा और चारदीवारी तक ही सीमित रखती है। अब समय आ गया है कि हम चारदीवारी से बाहर निकलें। पूरा शहर और देश भी अपना घर है, इसे स्वच्छ और स्वस्थ बनाने के लिये ऐसी मुहिम में शामिल हों। हम क्लीन के साथ कूल इंसान भी बनें। इससे पहले 2020 में रिपु दमन कोटा में 50 किमी मार्ग पर सफाई करते हुये बिना रूके मैराथन पूरी कर वर्ल्ड रिकॉर्ड बना चुके हैं। गुरूग्राम से कोटा पहुंची ‘खयालों की उडान’ की फाउंडर फैजी खान ने कहा कि ‘जी हां मैं रनर हूं, अपने पैरों से नये ख्वाब देखती हूं..’ जैसी पॉजिटिव सोच लेकर रोज दौड़ लगायें। नियमित दौडने से हैप्पी हार्मोन्स जैसे एंडोर्फिन शरीर से निकलेंगे। यही उर्जा आपको खुशमिजाज बना देगी। मिस राजस्थान ज्योति पुष्पेंद्र सिंह ने साडी पहनकर दौड लगाई। उनका कहना है कि 7 माह की प्रिगनेंसी में दौडकर खुशी महसूस कर रही हूं तो सामान्य महिलायें दौडने से क्यों झिझकती है। टीनएजर गर्ल्स के लिये रनिंग एक टॉनिक की तरह है। कोटा में हजारों कोचिंग छात्रायें पढाई के प्रेशर में रहती हैं, उनको रोज सुबह 30 मिनट योगा व रनिंग करना चाहिये। फिटनेस होने से सफलता अवश्य मिलती है। 11 साल की खनक व 75 साल की लीला ने दिखाया हौसला
Tumblr media
प्रथम साडी रन को लेकर शहर की महिलाओं के साथ टीनएजर्स में भी बहुत उत्साह दिखा। कक्षा-6 की छात्रा खनक ओबेराय ने साडी पहनकर अपनी दौड़ निर्धारित समय में पूरी की। वहीं बुजुर्ग महिला लीला सेवक (75) एवं अर्चना माथुर (73) ने उम्र व मौसम की परवाह किये बिना महिलाओं के साथ धीरे-धीरे दौडते हुये सबको स्वस्थ बने रहने के लिये दौड़ने का संदेश दिया। केशवरायपाटन की 43 वर्षीया ममता भारद्वाज मात्र 20 मिनट में अपनी दौड पूरी कर प्रथम रहीं, विभू माहेश्वरी (43) 22 मिनट में दौड़ पूरी कर दूसरे स्थान पर रहीं। रामपुरा की योग टीचर वसुधा राजावत (29) ने कहा कि घर में रहने वााली गृहणियों को स्वस्थ बने रहने का यह अच्छा अवसर मिला, सबके चेहरे पर रौनक दिखाई दी। मोनिका दाधीच (31), मीनू बंसल (45), अदिति शर्मा (34) ने पहली बार 3.5 किमी दौडकर कहा कि अब वे रोज पार्क में रनिंग करेंगी। पिंक साडी में दौडी महिलायें
Tumblr media
कॉर्डिनेटर घनश्याम मूंदडा ने बताया कि पहली साडी रन में डॉ. नीता जिंदल, डॉ. गरिमा माहेश्वरी, डॉ.सुरभि गोयल, डॉ अर्चना मीणा, प्रियंका माथुर, वैशाली भार्गव, ममता खंडेलवाल, शालीनी टूटेजा, गुरप्रीत आनंद, सविता सिंह, मीता अग्रवाल, रीतू मंूदडा व प्रीति राठी, कवलीन मालवीय, गुंजन गांधी, रिचा अग्रवाल, राखी शर्मा, श्वेता साहू पिंक साडी पहनकर शामिल हुई। शहर के कई पुरूष धावकों ने भी साथ दौडते हुये महिलाओं का उत्साह बढाया। Read the full article
0 notes
abhinews1 · 2 years
Text
राजीव इंटरनेशनल स्कूल के विद्यार्थियों ने किया कोका-कोला कम्पनी का भ्रमण
Tumblr media
राजीव इंटरनेशनल स्कूल के विद्यार्थियों ने किया कोका-कोला कम्पनी का भ्रमण
शैक्षिक भ्रमण से मिलता है वास्तविक ज्ञानः डॉ. रामकिशोर अग्रवाल मथुरा। विद्यार्थी जीवन में शैक्षिक भ्रमण का विशेष महत्व है। इससे छात्र-छात्राओं में समूह में रहने की प्रवृत्ति, नायक बनने की क्षमता, आत्मविश्वास व भाईचारे की भावना प्रबल होती है। इसी उद्देश्य को ध्यान में रखते हुए राजीव इंटरनेशनल स्कूल के विद्यार्थियों को शिखा सिंह, प्रियंका चतुर्वेदी, सनी, सोनिका, श्याम पांडेय आदि शिक्षकों के नेतृत्व में शीतल पेय कम्पनी कोका-कोला का भ्रमण कराया गया। अपने शैक्षिक भ्रमण में राजीव इंटरनेशनल स्कूल के छात्र-छात्राओं ने छाता स्थित कोका-कोला कम्पनी की शीतल पेय निर्माण इकाई का भ्रमण किया। शैक्षिक भ्रमण में कोका-कोला कम्पनी के अधिकारियों ने छात्र-छात्राओं को विभिन्न प्रकार के पेय उत्पादों को बनाने की विधियों की जानकारी प्रदान की। छात्र-छात्राओं ने शैक्षिक भ्रमण में यह भी जाना कि जिस पेय पदार्थ को वे बड़े चाव से पीते हैं, उसे किस तरह अत्यधिक शुद्धता के साथ तथा सरकार द्वारा नियत मानकों के तहत तैयार किया जाता है। इस शैक्षिक भ्रमण का उद्देश्य छात्र-छात्राओं को सैद्धांतिक ज्ञान के साथ-साथ व्यावहारिक ज्ञान प्रदान करना था। आर.के. एजूकेशनल ग्रुप के अध्यक्ष डॉ. रामकिशोर अग्रवाल ने कहा कि अर्जित ज्ञान के मूल्यांकन और उसकी कमियों का पता छात्र-छात्राओं को शैक्षिक भ्रमण के दौरान ही चलता है। इस प्रकार के भ्रमण बच्चों को तरोताजा कर देते हैं, जिससे वे अग्रिम शिक्षा पूरे मनोयोग से प्राप्त करते हैं। डॉ. अग्रवाल ने कहा कि शैक्षिक भ्रमण से छात्र-छात्राओं को वास्तविक ज्ञान प्राप्त होता है जोकि जीवन पर्यंत मानस में अंकित रहता है। प्रबंध निदेशक मनोज अग्रवाल ने कहा कि विद्यार्थियों के करियर निर्माण में शैक्षिक भ्रमण का विशेष महत्व है। इस तरह के भ्रमण के दौरान विद्यार्थी खुले वातावरण में शिक्षा को अपने व्यक्तिगत अनुभवों से परिभाषित करते हैं। शैक्षिक भ्रमण से छात्र-छात्राओं में एक अनुभूति जागृत होती है। इससे बच्चों में शिष्टाचार की भावना भी पैदा होती है।
Tumblr media
राजीव इंटरनेशनल स्कूल के विद्यार्थियों ने किया कोका-कोला कम्पनी का भ्रमण Read the full article
0 notes
lok-shakti · 2 years
Text
Lucknow News : फर्जी जॉइनिंग लेटर बांटकर दिया झांसा, आयकर विभाग में नौकरी के नाम पर ठगने वाला गि���फ्तार
Lucknow News : फर्जी जॉइनिंग लेटर बांटकर दिया झांसा, आयकर विभाग में नौकरी के नाम पर ठगने वाला गिरफ्तार
लखनऊ: उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ की हजरतगंज पुलिस ने बेरोजगार युवाओं के साथ नौकरी दिलाने के नाम पर ठगी करने वाले आरोपी लक्ष्मी नारायण चतुर्वेदी को गिरफ्तार कर लिया है। लक्ष्मी नारायण पर फर्जी दस्तावेज तैयार कर आयकर विभाग में नौकरी दिलाने के नाम पर ठगी करके रुपये ऐंठने का आरोप है। दरअसल बीते महीने लखनऊ के आयकर विभाग में फर्जी नौकरी का भंडाफोड़ हुआ था जिसमें प्रियंका मिश्र समेत कुछ लोग गिरफ्तार…
View On WordPress
0 notes
newslobster · 2 years
Text
पटना : आदित्य ठाकरे ने तेजस्वी यादव और नीतीश कुमार से मुलाकात की
पटना : आदित्य ठाकरे ने तेजस्वी यादव और नीतीश कुमार से मुलाकात की
आदित्य ठाकरे ने पटना में मुख्यमंत्री नीतीश कुमार और उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव से मुलाकात की. पटना: महाराष्ट्र विधानसभा के नेता प्रतिपक्ष आदित्य ठाकरे ने आज बिहार के उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव से पटना में उनके आवास पर पहुंचकर मुलाकात की. आदित्य ठाकरे के साथ शिवसेना के उद्धव ठाकरे गुट के नेता अनिल देसाई और प्रियंका चतुर्वेदी भी तेजस्वी यादव से मिलने के लिए पहुंचे. महाराष्ट्र और बिहार के इन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 2 years
Text
श्रद्धा हत्याकांड: 'पढ़ी-लिखी लड़कियां बनती हैं लिव-इन की शिकार', केंद्रीय मंत्री कौशल किशोर का बयान दे सकता है विवाद
श्रद्धा हत्याकांड: ‘पढ़ी-लिखी लड़कियां बनती हैं लिव-इन की शिकार’, केंद्रीय मंत्री कौशल किशोर का बयान दे सकता है विवाद
दिल्ली में श्रद्धा नाम की एक लड़की के साथ उसके लिव-इन पार्टनर ने बेरहमी से मारपीट की। इस पूरी घटना के बाद पूरे देश में हाहाकार मच गया है. इस बीच केंद्रीय मंत्री ने इस पूरे मामले पर बेहद विवादित टिप्पणी की है। केंद्रीय मंत्री कौशल किशोर ने हत्या के लिए सिर्फ पढ़ी-लिखी लड़कियों और लिव-इन रिलेशन को जिम्मेदार ठहराया है। उनके इस बयान की काफी आलोचना भी हो रही है. शिवसेना सांसद प्रियंका चतुर्वेदी ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
telnews-in · 2 years
Text
Union Minister Kaushal Kishore Blames Live-In Relationships After Delhi Fridge Murder
Union Minister Kaushal Kishore Blames Live-In Relationships After Delhi Fridge Murder
घरेलू विवाद के बाद आफताब पूनावाला ने अपनी लिव-इन पार्टनर श्रद्धा वॉकर की हत्या कर दी नई दिल्ली: दिल्ली में एक महिला की उसके लिव-इन पार्टनर द्वारा की गई जघन्य हत्या पर एक केंद्रीय मंत्री ने बेहद विवादित टिप्पणी की है। शिवसेना की प्रियंका चतुर्वेदी ने केंद्रीय मंत्री कौशल किशोर की टिप्पणी पर निशाना साधा है जिसमें “शिक्षित लड़कियों” को अपने माता-पिता को छोड़ने और लिव-इन रिलेशनशिप में रहने का आरोप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajusaini75 · 2 months
Video
youtube
प्रियंका चतुर्वेदी ने संसद सत्र में छात्रों की मौत की दुखद घटना पर चर्चा की
हाल ही में हुई संसद सत्र में, प्रियंका चतुर्वेदी ने छात्रों की मौत की दुखद घटना पर चर्चा की, जिसमें उन्होंने जवाबदेही और प्रणालीगत बदलाव की तत्काल आवश्यकता पर जोर दिया। उनके भावुक भाषण ने भविष्य में ऐसी त्रासदियों को रोकने के लिए तत्काल कार्रवाई की मांग की। जुड़ें हमारे साथ, जहां हम उनके शक्तिशाली शब्दों और अन्य सदस्यों की प्रतिक्रियाओं को जानेंगे।
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा सत्तेत येईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास.
१०० स्मार्ट शहरातील ७४ टक्के विकासकामं पूर्ण, उर्वरित काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची सरकारची ग्वाही.
रेपो दर ६ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांवर कायम.
आणि
पश्चिम विभाग आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट.
****
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारविरुद्ध लोकसभेत सादर अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिलं, त्यावेळी मोदी बोलत होते. त्यांनी आपल्या निवेदनादरम्यान विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. राजकारण करणं ही विरोधी पक्षांची प्राथमिकता आहे. त्यांना देशातल्या गरिबांच्या भुकेची चिंता नसल्याचं ते म्हणाले. आपलं सरकार देशातल्या जनतेसाठी काम करत असून भारताचं नाव जगभरात उंचावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या काळात देशात विक्रमी गुतवणूक झाली असुन देशाच्या निर्यातीनंही नविन उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या पाच वर्षांत देशातले साडेतेरा कोटींहून अधिक लोक गरीबीतून बाहेर आले असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
****
देशात सुरु असलेल्या १०० स्मार्ट शहरातील ७४ टक्के विकासकामं पूर्ण झाली असून उर्वरीत कामं जून २०२४ पर्यंत पुर्ण होतील असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रिय शहरी कार्य राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. या १०० शहरांमध्ये सात हजार ९७८ विकास कामं प्रस्तावित असून यापैकी पाच हजार ९०९ कामं पूर्ण झाली आहेत. या विकासकामांसाठी सरकारनं ७३ हजार ४५४ कोटी रुपये निधी दिला असून यापैकी ६६ हजार २३ कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाल्याचं किशोर यांनी सांगितलं. या योजना पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारनं याचा कालावधी जून २०२४ पर्यंत वाढवला असून तोपर्यंत ही सर्व विकासकामं पूर्ण होतील अशी आशा किशोर यांनी यावेळी व्यक्त केली.          
****
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत देशभरात १२ कोटी ७५ लाख घरांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवलं जात असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केन्‍द्रीय जल शक्ती राज्‍यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी लोकसभेत आज एका लेखी उत्तरात ही माहीती दिली. २०१९ मध्ये ही योजना सुरु झाली तेव्हा फक्त तीन कोटी २३ लाख ग्रामिण घरात नळ जोडणी होती. आतापर्यंत देशातल्या ७० टक्के घरांना या योजनेअंतर्गत नळ जोडणी दिल्याचं ते म्हणाले. गुजरात, तेलंगाना आणि हरयाणा या राज्यांसह आणखी कांही राज्यात या योजनेचं १०० टक्के काम झाल्याची माहिती पटेल यांनी दिली.
****
विविध पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही व्यत्यय येत राहिला. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मणिपूर आणि इतर विषयांवर स्थगन प्रस्ताव मांडायला विरोधी पक्षांना परवानगी नाकारली. दरम्यान, राज्यसभेचं कामकाज यापुढं सुरळीत चालण्यासाठी सभापती जगदिप धनखड यांनी आज त्यांच्या कक्षात सर्वपक्षीय बैठक घेतली. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतले नेते पियूष गोयल, कांग्रेसचे जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी या बैठकीत सहभागी झाले. बीआरएसचे केशव राव, द्रमुकचे तिरुचि शिवा, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, सीपीआयचे बिनॉय विश्वम, एजीपीचे बीरेंद्र प्रसाद बैश्य, आरएलडीचे जयंत चौधरी आणि टीएमसीचे सुखेंदु शेखर रॉय यांचाही या बैठकीमध्ये सहभागी झालेल्यांत समावेश होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला असून त्यामुळं विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोंदवलं आहे. त्यांनी केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्वास ठरावावर सामाजिक संपर्क माध्यमांतून आपली प्रतिक्रीया नोंदवली, त्यामध्ये हे मत नोंदवलं आहे. काँग्रेस पक्षाच्या सुमारे ६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामं झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या नऊ वर्षांत झाली आहे असं त्यांनी नमुद केलं आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचं स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यातले विकासप्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवायचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांकडे सादर करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी राज्यातल्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी निरीक्षण कक्ष कार्यान्वित केला आहे. त्याची बैठक अलीकडेच मंत्रालयात झाली, त्यावेळी पवार बोलत होते. दर आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढवा घेतला जाईल. प्रकल्पांच्या मार्गातले अडथळे द��र केले जातील, असं त्यांनी सांगितलं. यापुढच्या काळात राज्यातले विकास प्रकल्प वेगानं पूर्ण करणं, हीच शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे. याअनुषंगानं संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश पवार यांनी दिले.
****
रिजर्व्ह बॅंकेच्या द्वैमासिक पतधोरणाचा चालू आर्थिक वर्षाचा तिसरा आढावा आज रिजर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केला. या अंतर्गत रेपो दरात कोणताही बदल केला नसून रेपो दर ६ पूर्णांक ५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. व्याज दरही कायम ठेवण्यात आले आहेत. देशातल्या बँकांची आर्थिक स्थिती चांगली असून भारत ही जगात पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असल्याचं ते म्हणाले. या संबंधीची समिती आर्थिक पतधोरण आणि महागाई वर लक्ष ठेवून आहे. केंद्रानं मुद्रास्थिती चार टक्यांच्या जवळपास स्थिर ठेवायला सांगितलं असल्याची माहिती दास यांनी  दिली.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी अधिवक्ता मंजुषा अजय देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्र सूचना कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी त्यांची ही नियुक्ती केली असून त्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा असेल.
****
पंधरा लाख रुपयांच्या लाच प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोठडीत असलेले तहसीलदार नरेशकुमार बहिरम याला निलंबित करण्यात आलं आहे. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहेत.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख संकल्पनेतून औरंगाबाद इथं येत्या रविवारी आरोग्य शिबिर होत आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या संदर्भात समिती स्थापन केली आहे. विविध प्रमुख अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी या संदर्भातली जबाबदारी योग्य रितीनं पार पाडून अहवाल सादर करावेत, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधिताना केलं आहे.
****
राज्याच्या बॅडमिंटन संघानं इंदूरमध्ये झालेल्या पश्चिम विभाग आंतरराज्य स्पर्धेत तिहेरी मुकुट पटकावला आहे. राज्यानं पुरुष, महिला आणि आणि कनिष्ट गटाचं विजेतेपद मिळवलं आहे. औरंगाबादच्या अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडीत जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातले खेळाडूं प्रथमेश कुलकर्णी आणि सोनाली मिलखेलकर यांचा या संघांत समावेश होता. या यशामुळं त्यांचा समावेश असलेल्या राज्याच्या संघांची येत्या डिसेंबर महिन्यात गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
****
आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये उद्या भारतविरुद्ध जपान तसंच मलेशियाविरुद्ध दक्षिण कोरिया अशा लढती होणार आहेत. चेन्नईमध्ये सुरू या स्पर्धेमध्ये भारताचा सामना रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. गत विजेत्या दक्षिण कोरिया आणि मलेशियाचा सामना संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. भारतानं काल झालेल्या अंतिम साखळी सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-० असा सहज विजय नोंदवून गुणतालिकेत प्रथम स्थान पटकवलं आहे. भारतानं तेरा गुण कमवले आहेत. उद्या होणाऱ्या उपांत्य फेरीतल्या सामन्यांमधले विजयी संघ आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदाचा सामना परवा, शनिवारी खेळतील.  
****
सोलापूर जिल्ह्यात दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायती जमीनीच्या खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या महसूल विभागानं या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे. महापालिका नगरपालिका नगरपरिषदेची हद्द वगळून सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांसाठी हा आदेश लागू करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरच्या शिर्डी ते भरवीर मार्गिकेवर अपघात रोखणं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग प्रयत्न करत आहे.
****
0 notes
studycarewithgsbrar · 2 years
Text
उज्जैन मंदिर में रणबीर-आलिया के विरोध का सामना करने के बाद, शिवसेना सांसद प्रियंका चतुर्वेदी ने पीएम मोदी के साथ बी-टाउन कलाकारों की एक पुरानी तस्वीर साझा करते हुए कहा, 'इससे ​​कोई फायदा नहीं होगा'
उज्जैन मंदिर में रणबीर-आलिया के विरोध का सामना करने के बाद, शिवसेना सांसद प्रियंका चतुर्वेदी ने पीएम मोदी के साथ बी-टाउन कलाकारों की एक पुरानी तस्वीर साझा करते हुए कहा, ‘इससे ​​कोई फायदा नहीं होगा’
ट्रिब्यून वेब डेस्क चंडीगढ़, 7 सितंबर 2011 में पूर्व की कथित ‘बीफ’ टिप्पणी को लेकर उज्जैन के महाकालेश्वर मंदिर में रणबीर कपूर और आलिया भट्ट के विरोध का जिक्र करते हुए, शिवसेना सांसद प्रियंका चतुर्वेदी ने देश में ‘नफरत’ पर चुप रहने के लिए बी-टाउन की हस्तियों की निंदा की है। चतुर्वेदी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ कुछ बॉलीवुड सितारों की तस्वीरें साझा करते हुए कहा कि अगर बॉलीवुड सितारे…
View On WordPress
0 notes