#पाठोपाठ
Explore tagged Tumblr posts
Text
नगरपाठोपाठ कर्जत तालुक्यात व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न
नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून नगर पाठोपाठ कर्जत तालुक्यातील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे व्यापाऱ्याने प्रसंगावधान राखत हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. 18 तारखेला सकाळी नऊच्या सुमारास राशीन रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ ही घटना घडलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार , रामराजे प्रफुल नेवसे (वय 21 राहणार भांडेवाडी कर्जत )…
0 notes
Text
शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार - महासंवाद
नांदेड दि. ४ जानेवारी : लाईन क्लिअर…जोडी सोडा… जोडी मालकासाठी खुशखबर… तीन सेकंद 38 पाँईट… आणि वायुगतीने… विक्रमी वेळेत अंतर पार… पाठोपाठ शेतकऱ्यांच्या टाळ्या शिट्ट्या… अशा माळेगावच्या माळ���ानावरील धावत्या समालोचनात ५८ बैल जोड्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार रचला. शंकर पटाच्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. शेती,मातीत रमणाऱ्या शेतकऱ्यांचा माळेगावचा शंकरपट…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a80182cb03093388b6139f0c6558eeb6/15af3e5683a09a44-b2/s540x810/5831edabf54bb3dad593163945e40d8f6f18341e.jpg)
View On WordPress
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३२
चहा पिऊन झाल्यावर विशाल आणि विवेक लगेच निघाले. अनंत आणि सबनीसांना उद्देशून विशाल म्हणाला, "काका, आम्ही येऊं आतां? दुकानांत एक मदतनीस आहे कामांत मदत करायला;-- पण त्याच्यावर जास्त वेळ सगळं काम टाकणं बरोबर नाहीं!" "अनंतराव, आपणही आतां चलायचं कां?" त्यांच्या पाठोपाठ सबनीसांनी सूतोवाच केलं,"या दोघांचीही धंद्याच्या टायमाला आपण आणखी किती खोटी करायची?" "काका, बसा हो जरा निवांत!आतां या टायमाला गिऱ्हाईकांची वर्दळ नसल्याचं तुम्ही बघतांय् की! रोज सकाळी १० नंतर दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत आम्हांलाही थोडी फुरसत भेटते" ऊठूं पाहणाऱ्या सबनीसांना खाली बसायचा आग्रह करीत केदार म्हणाला. त्याला दुजोरा देत एकनाथ सांगू लागला," मग मात्र साधारणतः ३ वाजेपर्यंत गिऱ्हाईक भरपूर येतं! त्यानंतर एकदां ५ वाजले की पुन्हा गर्दी होऊं लागते ती अगदी रात्री ८-८.३० वाजतां आम्ही स्टाॅल बंद करीपर्यंत!" " म्हणजे तुम्ही स्टाॅल बंद करतां रात्री ���-८.३० वाजतां?" सबनीसांनी कांहीशा आश्चर्याने विचारलं, " मी तर ऐकून आहे की खवय्यांची गर्दी रात्री अगदी १०-१०.३० पर्यंत असते!" "अहो काका, मी रात्री १० पर्यंत स्टाॅल चालवायचा ठरवलं तर माझी बायको मला घरांत तरी घेईल का?" केदार चेष्टेच्या सूरांत म्हणाला, 'झोपण्यापुरता तरी कशाला घरी येतोस? स्टाॅलवरच झोप' म्हणत घराचं दार माझ्या थोबाडावर बंद करील ती!" "चेष्टा राहूं दे!", एकनाथ म्हणाला, " पण काका, आम्ही सकाळी ७ वाजतां स्टाॅल उघडतो तो दिवसभर चालुं असतो! त्यामुळे रात्री ८ /८.३० पर्यंत इतकं थकायला होतं की पुढे आणखी उशिरापर्यंत स्टाॅल सुरु ठ���वणं शक्यच नाहीं!"
आतांपर्यंत सगळं संभाषण शांतपणे ऐकत असलेला अनंत म्हणाला, "माफ करा, पण तुमच्या खाजगी आयुष्यात मी नाक खूपसतोय असं वाटत नसेल तर माझ्या कांही प्रश्नांची उत्तरं द्याल?" केदार आणि एकनाथने एकमेकांकडे बघत होकारार्थी मान हलवली तेव्हां अनंतने विचारलं, " एकुण परिस्थिती बघतां हा स्टाॅलच तुम्हां दोघांच्या उपजीविकेचं साधन असावं! म्हणजे यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच तुमची दोघांचीही कुटुंबं अवलंबून असतील ना?" दोघांनीही पुन्हा होकारार्थी मान हलवली;-- तथापि अनंतचा रोख कशाकडे आहे याचा अंदाज न आल्याचा गोंधळ त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होता. तो दूर करण्यासाठी अनंत म्हणाला, "म्हणजे थोडक्यात, यातून जास्तीत जास्त नफा कसा होईल याचा विचार तुम्ही करीत असाल ना?" "नक्कीच!" अनंतचा रोख लक्षांत आल्याने कांहीसा हुरूप येऊन केदार म्हणाला," सुरुवातीला ६ महिने जेमतेम स्टाॅलच्या भाड्यापुरते पैसे सुटत होते;-- पण मग हळुहळू धंदा वाढत चालला, तसा नफाही चांगला होऊं लागला!" "खोटं कशाला बोलूं, काका?" एकनाथ म्हणाला, "देवाच्या दयेनं गेलं वर्षभर आम्हांला केलेल्या कष्टांचं चांगलं फळ मिळत आहे! त्यामुळे आतां पूर्वीचं कर्जही थोडं थोडं करून फेडतां येतंय्!" "म्हणजे?" सबनीसांनी आश्चर्याने विचारलं, "अरे, कुुठल्या कर्जाच्या गोष्टी करताय् तुम्ही?"
"काका, ती चित्तरकथा खुप मोठी आहे! थोडक्यात सांगायचं तर एकाच मोटारसायकल दुरुस्तीच्या गराजमधे काम करीत असतांना माझी आणि एकनाथची दोस्ती झाली. राहायलाही आम्ही एकाच वस्तीमधे होतो. घरी समजावून सांगणारं वा धाक दाखवणारं कुणी नसल्याने शाळेत जाण्याच्या वयांत आम्ही उंडारक्याच केल्या! शिक्षण नाही, मग चांगली नोकरी तरी कोण देणार होतं?" गत दिवसांच्या वाईट आठवणींनी केदारचा घसा दाटून आला! "पण असंच चोरून-मारून कुणाच्या तरी बाईक्स चालवायच्या छंदापायीं आम्हांला सगळ्या गाड्यांची माहिती झाली होती, दुरुस्तीची छोटी-मोठी कांमंही शिकलो होतो! त्यांतूनच मग पुढे गराजमधे काम लागलं, हात सरावले आणि पोटापुरते पैसेही मिळायला लागले! पण सगळं सुरळीत चाललं असतांना अचानक करोनाची साथ आली ;-- आणि हळुहळू गराजमधे येणारं काम कमी-कमी होत शेवटी गराज बंदच झालं!" "अचानक नोकरी गेल्याने घरांत सगळ्यांची उपासमार होऊं लागली! खुप वणवण केली, पण कांही काम भेटेना! भाजी विक���्यापासून ते हमालीपर्यंत काय-काय नाहीं केलं, पण पोटापुरतेही पैसे मिळत नव्हते! जे मिळेल ते घरीं देऊन कधी कधी नुसत्या चहा-पावावर दिवस काढले आहेत!" आवंढा गिळत केदार म्हणाला,"असेच एकदां कुठल्याशा स्टाॅलवर एक चहा दोघांत पीत असतांना माझ्या आणि एकनाथच्या मनांत विचार आला की सतराशे साठ ठिकाणी कामधंदा शोधीत फिरण्याऐवजी असाच स्टाॅल आपण टाकला तर?"
१६ फेेब्रुवारी २०२३
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर सदस्यांच्या शपथविधीला सुरूवात झाली. अस्थायी अध्यक्षांच्या तालिकेवरील सदस्यांच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून सदस्यत्वाची शपथ घेतली. आज शनिवारी आणि उद्या रविवारी उर्वरीत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
दरम्यान, नव्याने गठित विधानसभेच्या अध्यक्षांची परवा नऊ डिसेंबर रोजी निवड केली जाणार आहे. त्यासाठी उद्या दुपारी बारा वाजण्यापूर्वी प्रस्ताव सादर करण्याचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी यासंदर्भातील घोषणा आज केली, तर येत्या १६ डिसेंबरच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करावी, असे आदेश दिल्लीतील न्यायाधिकरण न्यायालयानं आयकर विभागाला दिले आहेत. आयकर विभागानं ऑक्टोबर २०२१ मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेली सुमारे एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यासह मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, एक साखर कारखाना आणि एका रिसॉर्टचाही समावेश होता. मात्र, याबाबत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. दिल्ली नायाधीकरण न्यायालयानं यावर काल सुनावणी घेत आयकर विभागाची याचिका फेटाळली आणि अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी वर्षातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी आज नवी दिल्ली इथं एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विविध शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ज्ञांसोबत सल्लामसलत केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने काल देशभरात ८५ केंद्रीय विद्यालयं स्थापित करण्यास मंजुरी दिली. यापैकी तीन केंद्रीय विद्यालयं महाराष्ट्रातील असून त्यापैकी एक पुण्यात स्थापित होईल. पुण्यातील सुडुंब्रे इथल्या एनडीआरएफ कॅम्��स याठिकाणी हे केंद्रीय विद्यालय स्थापन केलं जाईल. यासोबतच, देशात २८ नवीन नवोदय विद्यालयं स्थापन करण्यास मंजुरी मिळाली असून त्यापैकी एक ठाणे जिल्ह्यात स���थापन केलं जाणार आहे.
भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियाचा प्रवास टाळण्याचा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. सीरियात वाढत असलेले बंडखोरांचे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सीरियातील सध्याची असुरक्षित परिस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियाला जाणं टाळावं. जे लोक परत येऊ शकतात, त्यांनी लवकरात लवकर व्यावसायिक उड्डाणं करून मायदेशी परत यावं आणि इतरांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यात काल सकाळपासून अवकाळी पाऊस सुरू असून यामुळं शेती पिकं आणि फळबागांचं नुकसान होत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीची तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपवर करण्यासाठी तलाठी आणि संबंधित यंत्रणे मार्फत शेतकऱ्यांना कळवावं, तसंच घटनास्थळी जाऊन पंचनामे करावेत आणि शेतकरी बांधवांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशीही क्षीरसागर यांची मागणी आहे.
सांगली जिल्ह्यातल्या काही भागात आज पहाटे पाच वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळं काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. दरम्यान, मराठवाड्यात काल सर्वत्र पावसानं हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ॲडलेड ओव्हल इथं बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आस्ट्रेलियाच्या ५ गडी बाद २३५ धावा झाल्या होत्या. काल पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव १८० धावांत संपुष्टात आला. सध्या आस्ट्रेलियानं ५५ धावांची आघाडी घेतली आहे.
0 notes
Text
Alandi: शहरात गौरी गणपती निमित्त मोठा उत्साह:घरोघरी आकर्षक सजावट व देखावे
एमपीसी न्यूज – गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन (Alandi)झाले. त्या पाठोपाठ मंगळवारी गौरीचे ही मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. घरोघरी गौरींच्या स्वागताची तयारी होत असते. वेगवेगळ्या फराळांच्या तयारी पासून ते दारातील रांगोळीपर्यंत, घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळते.तसेच गौरी गणपती निमित्त घरोघरी सर्वत्र आकर्षक देखावे सादर करतात तर काही विविध सामाजिक संदेश देतात. Alandi : आळंदी नगरपरिषद…
0 notes
Text
मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_
या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.
_*मृत्यू कधी येतो ?*_
मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहि���े त्यावेळीच येतो.
या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. ‘प्रारब्ध’ या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.
हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे – कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्या���्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.
काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला “क्रियमाण कर्म” म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळा नंतर मिळते, त्याला “संचित कर्म” म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच ‘प्रारब्ध भोग’ असेही म्हणतात.
_*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_
प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात. _*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_
स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच ‘जीवन नियोजन’ असेही म्हणतात.
प्रारब्धा कडे “घ्यायचे अनुभव” किंवा “शिकायचे धडे” या दृष्टिकोनातूनही पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने ‘प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच ‘तीव्र प्रारब्ध’ असेही म्हणतात. परंतु ��्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.
_*मृत्यूची भिती का वाटते ?*_
१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.
२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.
_*"मृत्यू" म्हणजे काय ?*_
हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ “मृत्यू” म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन – मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे.
गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात मंत्र मूलम् गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य मोक्षमूलम् गुरुकृपा यास पात्र होतो.
तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.
लेख अप्रतिम आहे . जरूर वाचा
0 notes
Text
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यात वाघिणी पाठोपाठ वाघाला पकडण्यात वनविभागाला यश
https://bharatlive.news/?p=187731 चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यात वाघिणी पाठोपाठ वाघाला पकडण्यात ...
0 notes
Text
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ' तसलाच ' अनुभव , पहा व्हिडीओ
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ‘ तसलाच ‘ अनुभव , पहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश येथे एक दौरा केला होता त्यामध्ये त्यांचे भाषण सुरू असतानाच अनेक नागरिक तिथून उठून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता.. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेला गेल्या काही वर्षात ओहोटी लागल्याचे दिसून येत असून अशाच स्वरूपाचे अनेक व्हिडीओ याआधी देखील व्हायरल झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये देखील असाच प्रकार समोर आलेला असून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7b5efee1aa62e055239438cb0745f828/0eb7624597836d89-c7/s540x810/dd6d58591dec7318e2ef3dd60cd3715f01eb4600.jpg)
View On WordPress
0 notes
Text
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ' तसलाच ' अनुभव , पहा व्हिडीओ
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ‘ तसलाच ‘ अनुभव , पहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश येथे एक दौरा केला होता त्यामध्ये त्यांचे भाषण सुरू असतानाच अनेक नागरिक तिथून उठून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता.. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेला गेल्या काही वर्षात ओहोटी लागल्याचे दिसून येत असून अशाच स्वरूपाचे अनेक व्हिडीओ याआधी देखील व्हायरल झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये देखील असाच प्रकार समोर आलेला असून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7b5efee1aa62e055239438cb0745f828/066eb74ba5d2350d-1b/s540x810/236b96218ac53a874e3777f4cd195c24afbaeb8c.jpg)
View On WordPress
0 notes
Text
विवाहित महिलेवर घरात घुसून अत्याचार , महिलेच्या पाठोपाठ घरात शिरला आणि..
महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून मानखुर्दमध्ये एका २७ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला आहे. मानखुर्द पोलिसांनी तातडीने कारवाई करत १८ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपी अल्पवयीन आहे की नाही यासाठी त्याच्या जन्म प्रमाणपत्राची पडताळणी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हा प्रकार केला त्यावेळी महिलेची अल्पवयीन मुली देखील घरात होती. सोमवारी…
0 notes
Text
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ' तसलाच ' अनुभव , पहा व्हिडीओ
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ‘ तसलाच ‘ अनुभव , पहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश येथे एक दौरा केला होता त्यामध्ये त्यांचे भाषण सुरू असतानाच अनेक नागरिक तिथून उठून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता.. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेला गेल्या काही वर्षात ओहोटी लागल्याचे दिसून येत असून अशाच स्वरूपाचे अनेक व्हिडीओ याआधी देखील व्हायरल झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये देखील असाच प्रकार समोर आलेला असून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7b5efee1aa62e055239438cb0745f828/40759a2e313cec47-f3/s540x810/4c87c582dfd735cdcf3c483c2864b910bd250bc8.jpg)
View On WordPress
0 notes
Text
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ' तसलाच ' अनुभव , पहा व्हिडीओ
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ‘ तसलाच ‘ अनुभव , पहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश येथे एक दौरा केला होता त्यामध्ये त्यांचे भाषण सुरू असतानाच अनेक नागरिक तिथून उठून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता.. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेला गेल्या काही वर्षात ओहोटी लागल्याचे दिसून येत असून अशाच स्वरूपाचे अनेक व्हिडीओ याआधी देखील व्हायरल झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये देखील असाच प्रकार समोर आलेला असून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7b5efee1aa62e055239438cb0745f828/ab3ded0752719677-93/s540x810/67aa1cc278abc59d2f3ca185874e1f956a16b4db.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 03 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशभरातल्या महामार्गांलगत ट्रक तसंच टॅक्सी चालकांसाठी विश्रामभवन उभारण्यात येणार- भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांची घोषणा
विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत-कुलपती रमेश बैस यांचे निर्देश
९७वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विभागीय नाट्य संमेलन तसंच वेरुळ अजिंठा महोत्सवाला प्रारंभ
आणि
यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९ धावांच्या बळावर इंग्लंडविरोधातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर ३३६ धावा
****
देशभरातल्या महामार्गांलगत ट्रक तसंच टॅक्सी चालकांसाठी विश्रामभवन उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो च्या उद्घाटनानंतर बोलत होते. ट्रक आणि टॅक्सीचालक हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत, या विश्रामभवनांमुळे चालकांचं आरोग्य उत्तम राहिल, तसंच अपघातांच���या प्रमाणात घट होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले....
‘‘इन भवनों मे ड्राईवरों के लिए भोजन, पीने के साफ पानी, शैचालय पार्किंग व आराम करने की पूरी व्यवस्था होगी. सरकार की तय्यारी इस योजना के पहले चरण मे देश भर मे एसे एक हजार भवन बनाने से शुरुआत करने की है. यह भवन ड्राईवर्स की ईज़ ऑफ लिविंग और ईज़ ऑफ ट्राव्हेलिंग दोनों बढायेंगे. इससे उनकी सेहत भी ठीक रहेगी और दुर्घटनाओं को रोकने मे भी बहोत मदद मिलेगी.’’
इलेक्ट्रीक वाहनं, ग्रीन हायड्रोजन, रूफ टॉप सोलर पॅनेल, जलवाहतुक, आदी विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. देशात विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर आपल्या सरकारचा भर असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
****
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर संसदेत कालपासून चर्चा सुरु झाली. लोकसभेत भाजपच्या खासदार हिना गावित यांनी तर राज्यसभेत भाजपच्या कविता पाटीदार यांनी या चर्चेला प्रारंभ केला. काँग्रेस नेते खासदार डी के सुरेश यांनी केलेल्या टिप्पणीचे काल संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत, हे प्रकरण आचार समितीकडे पाठवून, सुरेश यांच्यावर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी दोन्ही सदनातून सभात्याग केला.
****
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचारू करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी दिले आहेत. काल मुंबईत राजभवनात कुलगुरुंच्या संयुक्त मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. विद्यापीठांनी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
****
महाविकास आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीमुळे संविधान रक्षणाच्या लढ्याला बळ प्राप्त होईल, असा विश्वास महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी यावेळी व्यक्त केला.
****
विधान परिषदेचे व���रोधी पक्ष नेते अंबादा�� दानवे यांनी जनाधिकार कार्यक्रमाच्या माध्यमातून काल पालघर इथं जनतेशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षातर्फे उद्या ४ फेब्रुवारीपासून ते ११ फेब्रुवारीपर्यंत व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' राबवण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
राज्यभरात सलोखा योजनेतून आतापर्यंत ५८५ शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. या योजने अंतर्गत अमरावती विभागातून सर्वाधिक १४४ दावे निकाली काढण्यात आले, त्या पाठोपाठ लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नागपूर आणि पुणे विभागाचा समावेश आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी मोहिमेत शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक नागरिक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. जालना जिल्ह्यातले मुकूंद लाड तसंच वर्षा बोरडे यांनी आपल्याला झालेल्या लाभांबाबत माहिती दिली...
****
९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं काल लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. समाजात वागावं कसं, याची शिकवण साहित्यातून मिळते, असं महाजन यांनी नमूद केलं. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं भरलेल्या या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. मराठीला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं शोभणे यांनी सांगितलं. तर पुढच्या तीन वर्षांनी होणारं शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार होण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. दरम्यान, काल सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, उद्योजक अशोक जैन, यांच्यासह राज्यभरातून साहित्यिक आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी झाले आहेत.
****
रंगभूमी तसंच रंगकर्मींसाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही, उद्योग मंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी दिली आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त काल बीड इथं विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालक मंत्री धनंजय मुंडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यावेळी उपस्थित होते. जागर ��पक्रमातंर्गत राज्यभर नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यातून उद्याचे उत्कृष्ट कलाकार, निर्माते, दिग्दर्शक घडतील, अशी अपेक्षा सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, बीड औद्योगिक विकासासाठी ७५ कोटीं रुपयांचे आर्थिक सहाय्य दिलं जाणार असल्याची घोषणा, सामंत यांनी बीड इथं पत्रकार परिषदेत केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कालपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सोनेरी महल परिसरात आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झालं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार संजय शिरसाट, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. काल या महोत्सवात प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा यांचं भरतनाट्यम्, पंडिता अनुराधा पाल यांचं स्त्री शक्तीवर आधारित पाच वाद्यांचं सादरीकरण आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे तसंच प्रियंका बर्वे यांचं सादरीकरण झालं. आज या महोत्सवात अमान आणि अयान अली बंगश यांचं सरोद वादन, तसंच प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचं सादरीकरण होणार आहे.
****
पं.सी.आर व्यास यांच्या जन्मशताब्दी निमित्त अंबाजोगाई इथं गुणीजन संगीत समारोहाला कालपासून प्रारंभ झाला. काल या कार्यक्रमात सहाना बॅनर्जी यांचं सतार वादन झालं, प्रसाद पाध्ये यांच्यातबल्यासोबत सतारीच्या जुगलबंदीला रसिकांची विशेष दाद मिळाली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उभारलेल्या हज हाऊसचं काल अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह हज हाऊस कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. हज हाऊसची ही इमारत हज यात्रेकरूंसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. शहरातील आमखास मैदानावर दीडशे कोटी रुपये खर्च करून फुटबॉल मैदान उभारले जाईल, नारेगाव इथं हज कमिटीच्या चाळीस एकर जागेवर मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी 'केजी टू पीजी' शिक्षणाची सुविधा दिली जाईल असं सत्तार यांनी सांगितलं.
****
क्रिकेट
सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९ धावांच्या बळावर इंग्लंडविरोधातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३६ धावा केल्या आहेत. विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. काल खेळ थांबला तेव्हा यशस्वी जैस्वाल १७९ तर रविचंद्रन अश्विन पाच धावांवर खेळत होते.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखा��ील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नेपाळचा १३२ धावांनी पराभव करुन भारताने उपान्त्य फेरीत प्रवेश केला. भारताने प्रथम फलंदाजी करत सचिन धस च्या ११६ धावांच्या बळावर २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला नेपाळचा संघ १६५ धावाच करु शकला.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात उद्या प्राचार्य बी.के.सबनीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाला दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठवता येईल. स्पर्धेचं हे एकोणीसावं वर्ष आहे.
****
नांदेड जिल्ह्यातले बळीरामपूर इथले सैनिक महेंद्र अंबुलगेकर यांना ३१ जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या चार तारखेला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षण कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला आहे. नांदेड इथं उद्या या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
****
0 notes
Text
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ' तसलाच ' अनुभव , पहा व्हिडीओ
हिमाचल पाठोपाठ गुजरातमध्येही मोदींना ‘ तसलाच ‘ अनुभव , पहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश येथे एक दौरा केला होता त्यामध्ये त्यांचे भाषण सुरू असतानाच अनेक नागरिक तिथून उठून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता.. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेला गेल्या काही वर्षात ओहोटी लागल्याचे दिसून येत असून अशाच स्वरूपाचे अनेक व्हिडीओ याआधी देखील व्हायरल झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये देखील असाच प्रकार समोर आलेला असून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7b5efee1aa62e055239438cb0745f828/8b9f531286a5af77-f0/s540x810/49e442c0378d8761d98fd0645f4a6cf195310601.jpg)
View On WordPress
0 notes
Text
संशयी बायकोला वैतागून नवरा अमरधामात , पाठोपाठ बायको पोहचली मात्र त्यानंतर..
संशयी बायकोला वैतागून नवरा अमरधामात , पाठोपाठ बायको पोहचली मात्र त्यानंतर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नाशिकमध्ये समोर आलेली असून आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पत्नीने चार ओळखीच्या तरुणांना हाताशी धरत पती कैलास साबळे यांना मध्यरात्रीच्या सुमारास अमरधाम परिसरात मारहाण केली आणि मार लागल्यावर घरी आणून हळद लावून इलाज देखील केला मात्र त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. सदर प्रकरणात त्यांची पत्नी निशा हिच्यासोबत इतर चार संशयितांच्या विरोधात…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/4c69a8d1b10a671fd30ccd08144ac114/76421f885d531517-27/s540x810/0381b5aeb1ea33a161fc50923ff6e1ed2d35f8c1.jpg)
View On WordPress
0 notes