Tumgik
#निवृत्त
nagarchaufer · 1 year
Text
' मुलांना एक रुपया देणार नाही कारण त्यांना.. ' , निवृत्त वडिलांचा व्हिडीओ व्हायरल
प्रत्येक आईवडील आपल्या मुलाचे लाड करतात आणि त्याला जे काही मिळाले नाही ते सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक आई-वडिलांची हीच इच्छा असते मात्र सोशल मीडियावर सध्या एका निवृत्त झालेल्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये वडिलांनी ‘ आयुष्य माझ्यासाठी आहे असे म्हणत मुलाला मी एक छदाम देखील देणार नाही ‘ असे म्हटलेले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
पेन्शन तुम्ही एकटेच खाता का ? निवृत्त डीवायएसपी यांना मुलाची मारहाण
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून साताऱ्यात समोर आलेली असून निवृत्त असलेले डी वाय एस पी यांना चक्क त्यांच्या मुलाने ‘ पेन्शन तुम्ही एकटेच खाता का ..मला का देत नाही ? ‘ असे म्हणत बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शाहूपुरी परिसरातील गुलमोहर कॉलनी ही घटना घडलेली आहे. आरोपी मुलासह त्याच्या आईवर देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
पेन्शन तुम्ही एकटेच खाता का ? निवृत्त डीवायएसपी यांना मुलाची मारहाण
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून साताऱ्यात समोर आलेली असून निवृत्त असलेले डी वाय एस पी यांना चक्क त्यांच्या मुलाने ‘ पेन्शन तुम्ही एकटेच खाता का ..मला का देत नाही ? ‘ असे म्हणत बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शाहूपुरी परिसरातील गुलमोहर कॉलनी ही घटना घडलेली आहे. आरोपी मुलासह त्याच्या आईवर देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
iskconchd · 2 years
Photo
Tumblr media
श्रीमद्‌ भगवद्‌गीता यथारूप 2.9 https://srimadbhagavadgita.in/2/9 सञ्जय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तपः । न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २.९ ॥ TRANSLATION संजय ने कहा – इस प्रकार कहने के बाद शत्रुओं का दमन करने वाला अर्जुन कृष्ण से बोला, “हे गोविन्द! मैं युद्ध नहीं करूँगा,” और चुप हो गया । PURPORT धृतराष्ट्र को यह जानकर परम प्रसन्नता हुई होगी कि अर्जुन युद्ध न करके युद्धभूमि छोड़कर भिक्षाटन करने जा रहा है । किन्तु संजय ने उसे पुनः यह कह कर निराश कर दिया कि अर्जुन अपने शत्रुओं को मारने में सक्षम है (परन्तपः) । यद्यपि कुछ समय के लिए अर्जुन अपने पारिवारिक स्नेह के प्रति मिथ्या शोक से अभिभूत था, किन्तु उसने शिष्य रूप में अपने गुरु श्रीकृष्ण की शरण ग्रहण कर ली । इससे सूचित होता है कि शीघ्र ही वह इस शोक से निवृत्त हो जायेगा और आत्म-साक्षात्कार या कृष्णभावनामृत के पूर्ण ज्ञान से प्रकाशित होकर पुनः युद्ध करेगा । इस तरह धृतराष्ट्र का हर्ष भंग हो जायेगा । ----- Srimad Bhagavad Gita As It Is 2.9 sañjaya uvāca evam uktvā hṛṣīkeśaṁ guḍākeśaḥ paran-tapaḥ na yotsya iti govindam uktvā tūṣṇīṁ babhūva ha TRANSLATION Sañjaya said: Having spoken thus, Arjuna, chastiser of enemies, told Kṛṣṇa, “Govinda, I shall not fight,” and fell silent. PURPORT Dhṛtarāṣṭra must have been very glad to understand that Arjuna was not going to fight and was instead leaving the battlefield for the begging profession. But Sañjaya disappointed him again in relating that Arjuna was competent to kill his enemies (paran-tapaḥ). Although Arjuna was, for the time being, overwhelmed with false grief due to family affection, he surrendered unto Kṛṣṇa, the supreme spiritual master, as a disciple. This indicated that he would soon be free from the false lamentation resulting from family affection and would be enlightened with perfect knowledge of self-realization, or Kṛṣṇa consciousness, and would then surely fight. Thus Dhṛtarāṣṭra’s joy would be frustrated, since Arjuna would be enlightened by Kṛṣṇa and would fight to the end. ----- #krishna #iskconphotos #motivation #success #love #bhagavatamin #india #creativity #inspiration #life #spdailyquotes #devotion
2 notes · View notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी-काँग्रेस पक्षाचा विरोध
चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या अनुदालाही केंद्राची मान्यता
राज्यभरात ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन
आणि
गणपती विसर्जनानंतर मुंबईत सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्याचं संकलन
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –
इसका इम्पिमेंटेशन दो फेजेस्‌ में होगा। फर्स्ट फेज मे लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और उसके सेकंड फेज मे लोकल बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना है। जिससे की एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब के सब देश के निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको पुरे देश भर मे डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस्‌ है, उन सब के उपर डिस्कशन्स करें। और एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे लीगल प्रोसेस से इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देश��त जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक घ्यावी लागेल, असं खरगे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, आज केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रबी हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवणं, ७९ हजार १५६ कोटी रुपयांचं पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेचा आज शुभारंभ झाला. नवी दिल्ली इथं झालेल्या या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग होता. नागपूरमधल्या बेलतरोडी इथल्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी या सोहळ्याचं दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीनं ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये सुमारे दीड हजार रुग्णालयांचा समावेश असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संस्था, धर्मादाय रुग्णालयं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि लोक सहभागातून ही आरोग्य शिबीरं घेतली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या शिबीरांच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक ठिकाणी ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्यांचं उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं छावणी भागात महिला आणि बालकांसाठी १०० खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं आज लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर तसंच मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात महिला आणि बारा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांवर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातील, तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था करण्यात आल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी देणारे भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला आजपासून नवी मुंबईत सुरूवात करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’चे राज्य संचालक नवनाथ वाठ यांच्यासह स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं काल विविध चौपाट्यांवर, समुद्र किनारी ��िशेष स्वच्छता मोहीम राबवून ३६३ मेट्रिक टन तर नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरून एकूण सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाणार असून, महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये हे वापरण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण २८ हजार ३२ मूर्ती संकलित करण्यात आल्या, यापैकी २४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर दान स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार ७४८ मूर्ती, विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे ३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रीय खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं काल वितरण करण्यात आलं.
****
जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३ तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश मूर्तींचं इथे विसर्जन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन आज सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन आज दुपारपर्यंत सुरू होतं.
****
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ २० सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना होणार आहे. युवकांनी या योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावं, असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते आज अहमदनगर इथं याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधि���ारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली होती. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी उद्या १९ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या मेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
astroclasses · 5 days
Link
0 notes
6nikhilum6 · 14 days
Text
Pune : नृत्य सादरीकरणातून रोहिणी भाटे यांना गुरुवंदना
एमपीसी न्यूज : प्रख्यात नृत्यगुरू रोहिणी भाटे यांच्या (Pune) जन्मशताब्दी निमित्त पी वाय सी जिमखाना येथे ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते. रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या सौ .अरुणा केळकर यांनी पीवायसी जिमखानाच्या सहकार्याने या नृत्य कार्यक्रमाचे संयोजन केले. एयर मार्शल( निवृत्त )भूषण गोखले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.…
0 notes
astrovastukosh · 15 days
Text
Tumblr media
*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक - 6 सितम्बर 2024*
*⛅दिन - शुक्रवार*
*⛅विक्रम संवत् - 2081*
*⛅अयन - दक्षिणायन*
*⛅ऋतु - शरद*
*⛅मास - भाद्रपद*
*⛅पक्ष - शुक्ल*
*⛅तिथि - तृतीया दोपहर 03:01 तक तत्पश्चात चतुर्थी*
*⛅नक्षत्र - हस्त प्रातः 09:25 तक तत्पश्चात चित्रा*
*⛅योग - शुक्ल रात्रि 10:15 तक तत्पश्चात ब्रह्म*
*⛅राहु काल - प्रातः 11:04 से दोपहर 12:38 तक*
*⛅सूर्योदय - 06:27*
*⛅सूर्यास्त - 06:49*
*⛅दिशा शूल - पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त - प्रातः 04:51 से 05:37 तक*
*⛅ अभिजीत मुहूर्त - दोपहर 12:13 से दोपहर 01:03 तक*
*⛅निशिता मुहूर्त- रात्रि 12:15 सितम्बर 07 से रात्रि 01:01 सितम्बर 07 तक*
*⛅ व्रत पर्व विवरण - श्री वराह जयंती, हरितालिका तृतीया, स्वर्ण गौरी व्रत, चतुर्थी (चंद्र दर्शन निषिद्ध, चन्द्रास्त - रात्रि 08:56 तक),रूद्र सावर्णि मन्वादि*
*⛅विशेष - तृतीया को परवल खाना शत्रु वृद्धि करता है व चतुर्थी को मूली खाने से धन-नाश होता है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🔹प्रायश्चित जप🔹*
*🔸पूर्वजन्म या इस जन्म का जो भी कुछ पाप-ताप है, ��से निवृत्त करने के लिए अथवा संचित नित्य दोष के प्रभाव को दूर करने के लिए प्रायश्चितरूप जो जप किया जाता है उसे प्रायश्चित जप कहते हैं ।*
*🔸कोई पाप हो गया, कुछ गल्तियाँ हो गयीं, इससे कुल-खानदान में कुछ समस्याएँ हैं अथवा अपने से गल्ती हो गयी और आत्म-अशांति है अथवा भविष्य में उस पाप का दंड न मिले इसलिए प्रायश्चित – संबंधी जप किया जाता है ।*
*🔸ॐ ऋतं च सत्यं चाभिद्धात्तपसोऽध्यजायत ।*
*ततो रात्र्यजायत तत: समुद्रो अर्णव: ।।*
*समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत ।*
*अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी ।।*
*सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् ।*
*दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो स्व: ।। (ऋग्वेद :मंडल १०, सूक्त १९०, मंत्र १ - ३ )*
*🔸इन वेदमंत्रों को पढ़कर त्रिकाल संध्या करें तो किया हुआ पाप माफ हो जाता है, उसके बदले में दूसरी नीच योनियाँ नहीं मिलतीं । इस प्रकार की विधि है ।*
*🔹लक्ष्मी कहाँ विराजती हैं ?🔹*
*🔸जहाँ भगवान व उनके भक्तों का यश गाया जाता है वहीँ भगवान की प्राणप्रिया भगवती लक्ष्मी सदा विराजती है । (श्रीमद् देवी भागवत )*
*🔹घृतकुमारी (ग्वारपाठा) रस 🔹*
*🔸घृतकुमारी शरीर गत दोषों व मल के उत्सर्जन के द्वारा शरीर को शुद्ध व सप्तधातुओं को पुष्ट कर रसायन का कार्य करती है I*
*🔸विविध त्वचा विकार, पीलिया, रक्ताल्पता, कफजन्य ज्वर, हड्डियों का बुखार, नेत्ररोग, स्त्रीरोग, जलोदर, घुटनों व अन्य जोड़ों का दर्द, जलन, बालों का झड़ना, आदि में उपयोगी है I*
*🔸पेट के पुराने रोग, चर्मरोग, गठियाव व मधुमेह (डायाबिटीज) में यह विशेष लाभप्रद है I*
*🔸रस की मात्रा : बच्चों के लिए ५ से १५ मी.ली. तथा बड़ों के लिए १५ से २५ मी.ली. रस सुबह खाली पेट लें I*
0 notes
sharpbharat · 18 days
Text
jamshedpur rural-चाकुलिया के शाकाभांगा निवासी बीएसएफ जवान हुए सेवानिवृत्त,गांव पहुंचने पर हुआ भव्य स्वागत
चाकुलिया: चाकुलिया प्रखंड के शाकाभांगा गांव निवासी बीएसएफ जवान नरसिंग हेम्ब्रम सेवा निवृत्त होकर मंगलवार की शाम को अपने गांव पहुंचे. जवान का गांव में ग्रामीणों ने गाजे बाजे के साथ पारंपरिक तरीके से भव्य स्वागत किया. मौके पर सेवानिवृत्त जवान नरसिंग हेम्ब्रम ने बताया कि वे 1988 में बीएसएफ में योगदान दिया था और 31 अगस्त 2024 को असिस्टेंट सब इंस्पेक्टर के पद से सेवानिवृत्त हुए हैं. उनकी अंतिम…
0 notes
narmadanchal · 19 days
Text
मध्यप्रदेश शिक्षक ने बनायी सेवानिवृत शिक्षकों के सम्मान कार्यक्रम की रूपरेखा
इटारसी। मध्य प्रदेश शिक्षक संघ विकासखंड सोहागपुर की बैठक में इस वर्ष भी सेवा निवृत्त शिक्षकों के सम्मान कार्यक्रम के संबंध में विस्तृत कार्य योजना तैयार की एवं वार्षिक सदस्यता के संबंध में चर्चा करते हुए योजनाबद्ध तरीके से सदस्यता अभियान करवाने पर चर्चा की गई। बैठक में महेश कुमार रघुवंशी तहसील अध्यक्ष मालकजी पटेल, जिला कोषाध्यक्ष राजेंद्र कुमार मालवीय, रघुनंदन पाली, नगर अध्यक्ष हाकम सिंह मेहरा,…
0 notes
aartigyan · 2 months
Text
गुप्त नवरात्रि दस देवियों के नाम | Gupt Navratri 2024 date
Gupt Navratri 2024 date
Gupt Navratri –  गुप्त नवरात्रि वर्ष में दो बार मनाई जाती है - एक बार माघ (जनवरी-फरवरी) महीने में और दूसरी बार आषाढ़ (जून-जुलाई) महीने में। गुप्त नवरात्रि विशेष रूप से तंत्र साधना और गुप्त साधना के लिए जानी जाती है।
गुप्त नवरात्रि 2024  gupt navratri 2024 date
गुप्त नवरात्री 2024 में 6 जुलाई शनिवार 2024 को पर्व प्रारंभ होकर दिन 16 जुलाई, मंगलवार 2024 तक जारी रहेगा | 
Tumblr media
नवरात्रि हिंदुओं का एक मुख्य त्यौहार है | साल में चार नवरात्रि मनाई जाती है जो - चैत्र, माघ, आषाढ़, आश्विन माह में मनाई जाती हैं | गुप्त नवरात्रि की पूजा प्रत्यक्ष नवरात्रि से अलग होती है | प्रत्यक्ष नवरात्री में नो देवियो की पूजा की जाती है | और गुप्त नवरात्रि में दस महाविद्याओं की साधना की जाती है | 
गुप्त नवरात्रि दस देवियों के नाम
दस देवियों के नाम क्रम से इस प्रकार है - (1) काली, (2) तारा, (3) त्रिपुर-सुंदरी (सोदासी), (4) भुवनेस्वरी, (5) छिन्नमस्ता, ( 6) भैरवी, (7) धूमावती, (8) बगलामुखी, (9) मातंगी, और (10) कमला। अधिकांश स्रोतों में दस देवियो का वर्णन इस प्रकार किया गया है |
पूजन विधि -
गुप्त नवरात्रि पर्व के दिनों में सुबह जल्द उठकर दैनिक कार्यों से निवृत्त होकर स्नान करने के बाद स्वच्छ कपड़े पहनें।
देवी पूजन की सभी सामग्री को एकत्रित करें। पूजा की थाल सजाएं।
मां दुर्गा की प्रतिमा को लाल रंग के वस्त्र में सजाएं।
मिट्टी के बर्तन में जौ के बीज बोएं और नवमी तक प्रति दिन पानी का छिड़काव करें।
पूर्ण विधि के अनुसार शुभ मुहूर्त में कलश को स्थापित करें
इसमें पहले कलश को गंगा जल से भरें, उसके मुख पर आम की पत्तियां लगाएं और उस पर नारियल रखें।
फिर कलश को लाल कपड़े से लपेटें और कलावा के माध्यम से उसे बांधें
अब इसे मिट्टी के बर्तन के पास रख दें
फूल, कपूर, अगरबत्ती, ज्योत के साथ पंचोपचार पूजा करें
पूरे परिवार सहित माता का स्वागत करें, उनका पूजन, आरती करके भोग लगाएं और उनसे सुख-समृद्धि की कामना करें।
नौ दिनों तक मां दुर्गा के मंत्रों का जाप करें।
अष्टमी या नवमी को दुर्गा पूजा के बाद नौ कन्याओं का पूजन करें और उन्हें तरह-तरह के व्यंजनों (पूड़ी, चना, हलवा) का भोग लगाएं।
गुप्त नवरात्रि अंतिम दिन दुर्गा पूजा के बाद घट विसर्जन करें।
मां की आरती गाएं, उन्हें फूल, अक्षत चढ़ाएं और बेदी से कलश को उठाएं।
इस तरह नवरात्रि के पूरे दिनों में मां की आराधना करें।
1 note · View note
erupse · 3 months
Text
सहरमा बास, गाउँकै खान्कीमा चाख
भारतीय सेनाबाट निवृत्त भएपछि पोखराको अमरसिंह चोकमा बस्दै आउनुभएका म्याग्दीको मालिका गाउँपालिका–५ देवीस्थानका तोपबहादुर बूढालाई रातो च्याउ, सिमी, टुसा र निगुरोको तरकारी नभई खानै रुच्दैन । पोखरा पठाउन गाउँबाट ल्याएको अर्गानिक उत्पादनको पोको देवीस्थानबाट दरबाङ आएको बोलेरो जिपबाट निकाल्दै गर्दा दरबाङ बसपार्कमा भेटिनुभएकी बूढाकी आफन्त पर्ने ४२ वर्षीया लालकुमारी बूढाले भन्नुभयो, “सहरको बास भए पनि…
0 notes
animalvidoes · 3 months
Text
हनुमदष्टादशाक्षर मन्त्र प्रयोग
‘मन्त्र महोदधि‘ में यह मन्त्र इस प्रकार उल्लिखित है- ‘ॐ नमो भगवते आञ्जनेयाय महाबलाय स्वाहा।’ इस अष्टादशाक्षर मन्त्र का प्रयोग स्नान एवं सन्ध्यादि नित्य क्रिया से निवृत्त होकर करना चाहिए। विनियोग ॐ अस्य मन्त्रस्य ईश्वर ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, हनुमान् देवता, हुं बीजम्, स्वाहा शक्तिः, सर्वेष्टसिद्धये जपे विनियोगः । श्री सिद्धबली हनुमान मंदिर, गोरखनाथ और बजरंगबली की कहानी (Story of Shri Siddhabali…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
कर्करोगाच्या औषधांवरच्या जीएसटीत सात टक्के कपात-मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश
राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतल्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात १९ टक्के वाढ 
आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन-ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या बारा दरवाजातून सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू
****
कर्करोगा औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन पाच टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. काल नवी दिल्लीत परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. फरसाण आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य विम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमी करण्याचा मुद्दा मंत्र्यांच्या गटाकडे पाठवला आहे. त्यांना ऑक्टोबरपर्यंत शिफारशी सुचवायला सांगितल्या असून, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
****
मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.
****
शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेऊन ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाच्या ॲपचं आज लोकार्पण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही घोषणा केली. मार्च २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ लागू करण्यात आली आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी.ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं.
****
प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये मंजूर आकृतीबंधाच्या ५० टक्के जागा मिळणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. परळीतल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसंच मागण्या प्राधान्यानं सोडवल्या जातील, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.
****
राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, शहरातल्या लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांना देखील चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राज्यपालांचं शहरात आगमन होईल.
****
राज्यातल्या सगळ्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढच्या एकत्रित वाटचालीच्या दृष्टीनं राज्यात जळगाव, मनमाड आणि नागपूर इथे जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.
****
अखिल भारतीय मजलिस - ए - इत्तेहादूल मुसलमिन - एआयएमआयएम पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील, मालेगावातून आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, धुळे इथले आमदार फारुख शहा, सोलापूर इथून फारुख शाब्दी, तर मुंबई इथून रईस लष्करिया यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं ओवेसी यांनी सांगितलं.
****
नंदुरबार इथं काल बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांच्या बालसहकाऱ्यांच्या ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्थळावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
****
गणेशोत्सवात आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती काल शेतकरी, पोलीस तसंच स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणेशाचं दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रस���द्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा आपण दररोज आढावा घेत आहोत. आज आपण जपानमध्ये टोक्यो इथल्या गणेशोत्सवा��ाबत तिथे राहणाऱ्या प्राची धर्मे यांच्याकडून जाणून घेत आहोत...
आमच्या काही मित्रांच्‍या घरी गणपतीच्या मातीच्या सुंदर मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. आम्ही बाप्पासाठी घरच्या प्रमाणे पारंपारिक पद्धतीने पदार्थ प्रसाद बनवतो. आणि त्यात अशा काही जपानी पदार्थांचाही समावेश करतो. प्रत्येकजण आपल्याला शक्य असेल तसं इथं असलेले भारतीय कुटुंब किंवा मित्रांच्या घरी तर काही जणं कम्युनिटी हॉलमध्ये जमतात आणि गणेशोत्सव साजरा करतात. या उत्सवानिमित्त आम्ही विविध उपक्रम आयोजित करतो. आणि विशेष म्हणजे या सांस्कृतिक देवाणघेवाणीत सामील होण्यासाठी आमचे जपानी मित्र सुद्धा आमच्या सोबत या उत्सवात सहभागी होतात.
****
हिंगोली जिल्ह्यात एक हजार चारशे चौसष्ट ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तर ७१० पैकी ३०५ गावांनी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे.
****
अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असं आश्वासन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं आहे. काल नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १२ हजार ७४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीवरचा नियोजित खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार चारशे शहाऐंशी जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. या योजना दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या तेरखेडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याला शासकीय मान्यता मिळाली आहे. आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या आरोग्यविषयक महत्त्वाच्या मागणीला एक महिन्याच्या आत तात्काळ मंजुरी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
astroclasses · 21 days
Link
0 notes