#दिले
Explore tagged Tumblr posts
Text
✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨
GAZA! 🇵🇸 Almost everybody on the planet has heard of this word, though. Why not, too? The most shocking thing about this brutal genocide against the world's most oppressed people is how they justify this senseless slaughter of women and children. They are having difficulty obtaining necessities like food and water, and guess what? The Jews, who were given sanctuary by the Palestinians, are subjected to this persecution in a Muslim-majority nation. Ahhh, the unsettling pictures of kids and the reports of adolescent girls and women being sexually assaulted. And here I am, writing this blog and doing absolutely nothing.
Perhaps the most severe sensation I have is that after we all pass away, questions regarding our roles in the tyranny will be raised. not one thing has changed in our ordinary lives; yet, some people are boycotting companies that promote Israel, raising the question of why these companies even exist. As you can see, they are so consumed with their success and wealth that they don't even consider humanity or our fundamental morality. What's worse is that we have no empathy whatsoever for Palestinians. Yes, even you! heard me correctly! because it has no effect on your day-to-day existence. We are having a pleasant time while dining in restaurants. Nothing in how we live every day has altered. And since we as human beings fell short to act and speak up for them, we are the individuals who are most accountable for this holocaust. We will pay a price for this.The Qur'an indicates that Almighty is aware of everything.
✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨✨🇵🇸✨
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d1037526587f2f69dd96ea5d1d883292/b7fb9c75b2c8c35c-13/s540x810/889550f1effb459fe9a25ab0907eae6101c48bfc.jpg)
غزہ! سیارے پر تقریباً ہر شخص نے اس لفظ کے بارے میں سنا ہے۔ کیوں نہیں، بھی؟ دنیا کے مظلوم ترین انسانوں کے خلاف اس وحشیانہ نسل کشی کے بارے میں سب سے افسوسناک بات یہ ہے کہ وہ عورتوں اور بچوں کے اس بے ہودہ قتل کو کس طرح جائز قرار دیتے ہیں۔ انہیں خوراک اور پانی جیسی ضروریات کے حصول میں دشواری کا سامنا ہے، اور اندازہ لگائیں کہ کیا؟ یہودی، جنہیں فلسطینیوں نے پناہ دی تھی، مسلم اکثریتی قوم میں اس ظلم و ستم کا نشانہ بنتے ہیں۔ آہ، بچوں کی پریشان کن تصاویر اور نوعمر لڑکیوں اور خواتین کے ساتھ جنسی زیادتی کی اطلاعات۔ اور میں یہاں ہوں، یہ بلاگ لکھ رہا ہوں اور کچھ بھی نہیں کر رہا ہوں۔ شاید مجھے سب سے شدید احساس یہ ہے کہ ہم سب کے گزر جانے کے بعد، ظلم میں ہمارے کردار کے بارے میں سوالات اٹھیں گے۔ ہماری عام زندگیوں میں ایک چیز بھی نہیں بدلی۔ پھر بھی، کچھ لوگ اسرائیل کو فروغ دینے والی کمپنیوں کا بائیکاٹ کر رہے ہیں، یہ سوال اٹھا رہے ہیں کہ یہ کمپنیاں کیوں موجود ہیں۔ جیسا کہ آپ دیکھ سکتے ہیں، وہ اپنی کامیابی اور دولت کے ساتھ اس قدر ہڑپ کر جات�� ہیں کہ وہ انسانیت یا ہماری بنیادی اخلاقیات کا خیال تک نہیں رکھتے۔ سب سے بری بات یہ ہے کہ ہمیں فلسطینیوں کے لیے کوئی ہمدردی نہیں ہے۔ ہاں، تم بھی! مجھے صحیح سنا! کیونکہ اس کا آپ کے روزمرہ کے وجود پر کوئی اثر نہیں پڑتا۔ ریستوراں میں کھانے کے دوران ہم خوشگوار وقت گزار رہے ہیں۔ ہم جس طرح سے ہر روز رہتے ہیں اس میں کچھ بھی نہیں بدلا ہے۔ اور چونکہ ہم بحیثیت انسان ان کے لیے کام کرنے اور بولنے میں کوتاہی کرتے ہیں، اس لیے ہم وہ افراد ہیں جو اس ہولوکاسٹ کے لیے سب سے زیادہ جوابدہ ہیں۔ ہم اس کی قیمت ادا کریں گے۔ قرآن بتاتا ہے کہ اللہ تعالیٰ ہر چیز سے باخبر ہے۔
✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/c5859072fa87f7ded53ed7840dc42a8c/b7fb9c75b2c8c35c-94/s540x810/0d74ad74fb4bc803a1a90b87940d6872732590f7.jpg)
गाझा! ग्रहावरील जवळजवळ प्रत्येकाने हा शब्द ऐकला आहे. का नाही, पण? जगातील सर्वात अत्याचारित लोकांवरील या क्रूर नरसंहाराची सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ते स्त्रिया आणि मुलांच्या या मूर्खपणाच्या कत्तलीचे समर्थन कसे करतात. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या गरजा मिळवण्यात अडचण येत आहे आणि अंदाज लावा काय? ज्यू, ज्यांना पॅलेस्टिनींनी अभयारण्य दिले होते, मुस्लिमबहुल राष्ट्रात हा छळ केला जातो. अहो, लहान मुलांची अस्वस्थ करणारी छायाचित्रे आणि किशोरवयीन मुली आणि स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या बातम्या. आणि मी इथे आहे, हा ब्लॉग लिहित आहे आणि काहीही करत नाही.
कदाचित मला सर्वात तीव्र खळबळ अशी आहे की आपण सर्वांचे निधन झाल्यानंतर, जुलमी शासनातील आपल्या ��ूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जातील. आपल्या सामान्य जीवनात एकही गोष्ट बदललेली नाही; तरीही, काही लोक इस्रायलला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांवर बहिष्कार टाकत आहेत आणि या कंपन्या अस्तित्वात का आहेत असा प्रश्न उपस्थित करत आहेत. तुम्ही बघू शकता, ते त्यांच्या यशाचा आणि संपत्तीचा इतका उपभोग घेतात की ते मानवतेचा किंवा आपल्या मूलभूत नैतिकतेचाही विचार करत नाहीत. सर्वात वाईट म्हणजे पॅलेस्टिनी लोकांबद्दल आम्हाला सहानुभूती नाही. होय, अगदी तुम्हीही! मला बरोबर ऐकले! कारण त्याचा तुमच्या दैनंदिन अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही. रेस्टॉरंटमध्ये जेवताना आम्ही आनंददायी वेळ घालवत आहोत. आपण दररोज कसे जगतो यातील काहीही बदललेले नाही. आणि त्यांच्यासाठी कृती करण्यात आणि बोलण्यात आम्ही मानव म्हणून कमी पडलो असल्याने, या सर्वनाशासाठी आम्ही सर्वात जबाबदार व्यक्ती आहोत. आम्ही याची किंमत मोजू. कुराण सूचित करते की सर्वशक्तिमान सर्व गोष्टींबद्दल जागरूक आहे.
🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/3b5cafb3f319724ec6d7acbf784d664e/b7fb9c75b2c8c35c-1b/s540x810/07246a069e36942a72b6e06f1cef0a39132cfc58.jpg)
غزة! ومع ذلك، فقد سمع الجميع تقريبًا على هذا الكوكب بهذه الكلمة. لماذا لا أيضا؟ إن الشيء الأكثر إثارة للصدمة في هذه الإبادة الجماعية الوحشية ضد الشعوب الأكثر اضطهادا في العالم هو كيف يبررون هذه المذبحة التي لا معنى لها للنساء والأطفال. إنهم يواجهون صعوبة في الحصول على الضروريات مثل الطعام والماء، وخمنوا ماذا؟ ويتعرض اليهود، الذين منحهم الفلسطينيون الملاذ، لهذا الاضطهاد في دولة ذات أغلبية مسلمة. آه، الصور المزعجة للأطفال والتقارير عن تعرض الفتيات والنساء المراهقات للاعتداء الجنسي. وها أنا أكتب هذه المدونة ولا أفعل شيئًا على الإطلاق.
ولعل أشد ما ينتابني هو أنه بعد وفاتنا جميعا ستُطرح أسئلة حول دورنا في الاستبداد. لم يتغير شيء واحد في حياتنا العادية؛ ومع ذلك، يقاطع بعض الناس الشركات التي تروج لإسرائيل، مما يثير التساؤل عن سبب وجود هذه الشركات. وكما ترون، فإنهم منشغلون جدًا بنجاحهم وثرواتهم لدرجة أنهم لا يفكرون حتى في الإنسانية أو أخلاقنا الأساسية. والأسوأ من ذلك هو أنه ليس لدينا أي تعاطف على الإطلاق مع الفلسطينيين. نعم، حتى أنت! سمعتني بشكل صحيح! لأنه ليس له أي تأثير على وجودك اليومي. نحن نقضي وقتًا ممتعًا أثناء تناول الطعام في المطاعم. لم يتغير شيء في الطريقة التي نعيش بها كل يوم. وبما أننا كبشر فشلنا في التحرك والتحدث نيابة عنهم، فإننا الأفراد الأكثر مسؤولية عن هذه المحرقة. وسندفع ثمن ذلك. ويشير القرآن إلى أن الله تعالى يعلم كل شيء.
✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨🇵🇸✨
गाजा! हालाँकि, ग्रह पर लगभग हर किसी ने इस शब्द के बारे में सुना है। भी क्यों नहीं? दुनिया के सबसे उत्पीड��ित लोगों के खिलाफ इस क्रूर नरसंहार के बारे में सबसे चौंकाने वाली ��ात यह है कि वे महिलाओं और बच्चों के इस संवेदनहीन वध को कैसे उचित ठहराते हैं। उन्हें भोजन और पानी जैसी ज़रूरतें प्राप्त करने में कठिनाई हो रही है, और सोचिए क्या? जिन यहूदियों को फ़िलिस्तीनियों ने शरण दी थी, उन्हें मुस्लिम-बहुल राष्ट्र में इस उत्पीड़न का सामना करना पड़ रहा है। आह, बच्चों की परेशान करने वाली तस्वीरें और किशोर लड़कियों और महिलाओं के यौन उत्पीड़न की खबरें। और मैं यहाँ हूँ, यह ब्लॉग लिख रहा हूँ और बिल्कुल कुछ नहीं कर रहा हूँ।
शायद मेरी सबसे गंभीर अनुभूति यह है कि हम सभी के निधन के बाद, अत्याचार में हमारी भूमिकाओं के बारे में सवाल उठाए जाएंगे। हमारे सामान्य जीवन में एक भी चीज़ नहीं बदली है; फिर भी, कुछ लोग इज़राइल को बढ़ावा देने वाली कंपनियों का बहिष्कार कर रहे हैं, जिससे यह सवाल उठता है कि ये कंपनियाँ अस्तित्व में क्यों हैं। जैसा कि आप देख सकते हैं, वे अपनी सफलता और धन से इतने लीन हैं कि वे मानवता या हमारी मौलिक नैतिकता पर भी विचार नहीं करते हैं। इससे भी बुरी बात यह है कि फ़िलिस्तीनियों के प्रति हमारी कोई सहानुभूति नहीं है। हाँ, आप भी! मुझे सही सुना! क्योंकि इसका आपके दैनिक अस्तित्व पर कोई प्रभाव नहीं पड़ता है। रेस्तरां में भोजन करते समय हम सुखद समय बिता रहे हैं। हम हर दिन कैसे जीते हैं, इसमें कोई बदलाव नहीं आया है। और चूँकि हम मनुष्य के रूप में उनके लिए कार्य करने और बोलने में विफल रहे, हम ही वे व्यक्ति हैं जो इस विनाश के लिए सबसे अधिक जिम्मेदार हैं। हम इसके लिए कीमत चुकाएंगे। कुरान इंगित करता है कि सर्वशक्तिमान को हर चीज की जानकारी है।
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d16a1efea64b4a47472a81faac64de3b/b7fb9c75b2c8c35c-2e/s540x810/0b4a2074585d82927cc8f161ee1b0b8d79f3d250.jpg)
#gaza genocide#palestine#free gaza#free palestine#book quotes#islamic#muslims#illustration#urduposts#urduadab#marathi#english#arabic#hindi#news
20 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/9edd593f55924f3e7c2212d75ee1af28/b288303c1def3f7a-55/s540x810/0573803a5bb2a0aea5465e01ed02bbafa4e35425.jpg)
श्रीमद् भगवद् गीतेतील ज्ञान श्रीकृष्णांमध्ये प्रवेश करून कोणी दिले पहा उदया सकाळी 5:55 वाजता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
4 notes
·
View notes
Text
2 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/cb82f4615c1c1b46c898cc7f5c80e37f/e6a76de42e836631-84/s540x810/ab71835033f0bbdaecddb4997d07c624d380f2b5.jpg)
परमशक्ती युक्त परमात्मा कबीर (कविरदेव) आपल्या नशिबात लिहिलेले कष्टही नष्ट करून सत्य भक्ती करणाऱ्या व्यक्तीला सुख प्राप्त करून देऊ शकतो बाकी अन्य देवतांमध्ये ती शक्ती नाही. प्रमाण वेद गीता आणि पुराणांमध्ये दिले आहे
अधिक माहितीसाठी गुगल करा संत रामपाल जी
3 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/9846db3911caff959ba99ba50d86b7e6/aba93c15f2b7610f-a7/s540x810/623ecebbfcfcbaeda17eff06efb8f4a9e8044a19.jpg)
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने ��िष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही ��रमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा ��ावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्र��ती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
वस्त्रोद्योग क्षेत्रातली निर्यात २०३० पर्यंत नऊ लाख कोटींपर्यंत नेण्याचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधानांच प्रतिपादन
नवी दिल्ली स्थानकावर शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास राज्य शासनाचं प्राधान्य, सीसीआयची कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा - मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
दोन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनाची सांगता
आणि
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना सुरुवात
****
भारत जगातला सहावा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश असून, २०३० पर्यंत या क्षेत्रातली निर्यात नऊ लाख कोटींवर घेऊन जाणं हेच आपलं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित भारत टेक्स २०२५ मध्ये ते काल बोलत होते.
‘‘ये मिशन ग्रोथ के नये रास्ते खोल रहा है। आज हम दुनिया के छठे सबसे बडे टेक्स्टाईल और अप्रायजरल एक्सपोर्टर है। हमारा टेक्सटाईल निर्यात तीन लाख करोड रूपये तक पहूंच चुका है। अब हमारा लक्ष है, ट्वेंटी-थर्टी तक हम इसे नाईन लाख करोड रूपये तक लेकर जायेंगे।’’
गेल्यावर्षी आपण कापड उद्योगात फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन या पाच घटकांविषयी बोललो होतो, हे धोरण आता भारतासाठी महत्त्वपूर्ण झालं असून, यातून शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत प्रगतीच्या नव्या वाटा मिळत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारत टेक्स प्रदर्शनातून भारतीय संस्कृती आणि विकसित भारताच्या भविष्याचं चित्र दिसत असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
भारत टेक्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भव्य वस्त्रोद्योग प्रदर्शन असून, ते आजपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनांपर्यंत विविध उत्पादनं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.
****
नवी दिल्ली स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची ��ौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांचा समावेश आहे. या समितीने स्थानकावरचे सीसीटीव्ही फूटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले.
****
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेची बातमी दुःखद आणि वेदनादायक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महाकुंभातून आणलेल्या गंगाजलाचा लाभ घेण्यासाठी नागपूरमधे आयोजित कार्यक्रमानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते.
****
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास राज्य शासनाचं प्राधान्य असल्याचं, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्णी इथं शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर शासनाचा भर असून, सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची भारतीय कापूस महामंडळ - सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. ते म्हणाले,
‘‘सीसीआयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं. निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन आणि स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन. आणि सीसीआयची थांबलेली खरेदी, ही तत्काळ आपण सुरु करु. शेतकर्याचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही, तो विकत घेतला जाईल, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल.’’
****
परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या कालच्या भागात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठी चांगला आराम करावा, नेहमी स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहावा आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास करावा असा सल्ला, विक्रांत मेस्सी यानं दिला. त्यांनी पालकांना मुंलामुलांमध्ये स्पर्धा न करण्याचा, तसंच मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नये, असं आवाहन केलं.
****
केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा ‘मेरा युवा भारत’ उपक्रम जळगाव इथं सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात मुंबईतल्या २७ युवक युवतींचा समावेश आहे. रा��्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल या युवकांशी संवाद साधत जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषि परंपरेची माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूज इथं ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. साहित्य समाजाच्या व्यथा मांडत असतं, असं मत दानवे यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले,
‘‘खऱ्या अर्थाने साहित्य हे समाजाचा आरसा असतो, समाजाच्या व्यथा मांडतात. मग शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, माताभगिनींच्या असतील. इथं या सगळ्या व्यथा या साहित्य संमेलनानी व्यक्त केलेल्या असं मला वाटतं. मग शेतमालाच्या भावाचा प्रश्न असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील. किंवा या भागातील विकासाचे प्रश्न असतील. या भागातील शेतकऱ्यांना न मिळणारं कर्ज असतील. या सगळ्या विषयाचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की साहित्य सातत्यानं समाजाचा विचार करत असतं. समाजाच्या व्यथा मांडत असतं.’’
दरम्यान, या समारोप सत्रात यावेळी ११ विविध ठराव पारित करण्यात आले. मराठवाड्यातून जाणारे सर्व रेल्वे मार्ग दुहेरी करावेत, तसंच हे मार्ग रेल्वेच्या मध्य विभागाशी जोडण्यात यावेत, समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार मराठवाड्याला २२ टीएमसी पाणी प्रत्येक वर्षी विनाविलंब देण्यात यावं, शिक्षणात गळती निर्माण होईल अथवा शिक्षणाच्या प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटक वंचित राहतील अशा प्रकारची धोरणं शासनाने राबवू नयेत, राजकीय नेत्यापर्यंत पोहचलेली गुंडगिरी आणि राजकारण्यांचा पक्षपातीपणा संपवण्याची मागणी, आदी ठरावांचा यात समावेश आहे.
यावेळी प्राचार्य प्रतापराव बोराडे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कादंबरीकार रा. रं. बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या संमेलनात झलेल्या परिसंवाद, कथाकथन, बालकुमार मेळाव्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
****
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना कालपासून सुरुवात झाली. यात शहरातल्या सर्व पुतळ्यांची साफसफाई जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली, तसंच सायकल रॅली काढण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौकात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यानिमित्त शिवकालीन शस्त्र आणि संस्कृती तसंच त्यांनी केलेली युद्धनीती याबद्दल आबालवृद्धांना माहिती मिळाली. आज याठिकाणी शिवकालिन मैदानी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्घा��न काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते झालं. हे न्यायालय सुरू झाल्यामुळे पक्षकारांना भूसंपादन आणि कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणांसाठी धाराशिव जिल्हा न्यायालयात जाण्याची गरज राहिलेली नाही, असं पेडणेकर यावेळी म्हणाले.
****
नांदेडहून आयोध्येला दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यात लोणीकटरा इथं अपघात होऊन, चार जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. काल पहाटेच्या सुमारास या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेल्या एका बसला धडक देऊन हा अपघात झाला. मृतांमधले तीघे जण नांदेड इथले, तर एक जण हिंगोली इथलं रहीवाशी होते.
****
लातूर जिल्ह्यात मुरूड इथं काल दुपारी चालकाचा स्कॉर्पिओ गाडीवरचा ताबा सुटल्यानं ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या उपहारगृहात घुसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. ही गाडी पुण्यावरून लातूरला लग्नासाठी जात होती. वेगात आलेल्या गाडीनं छोटी संरक्षण भिंत तोडून उपहारगृहातल्या ग्राहकांना चिरडलं.
****
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांचा कृती आराखड्याअंतर्गत परभणी पोलीस दल सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. याअंतर्गत काल पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या काही पोलीस स्टेशन आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशिभिकरणाच्या कामाचं भुमिपूजन काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. इतर मागासवर्ग कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड इथं रेल्वेमार्ग विस्तारीकरणाच्या कामांमुळे आजपासून येत्या तीन मार्च पर्यंत काही रेल्वेगाड्या काही दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी-नांदेड एक्स्प्रेस १९, २०, २२, २३, २६, २७ फेब्रुवारी तसंच एक आणि दोन मार्च या दिवशी रद्द करण्यात आली आहे. तर नांदेड - औरंगाबाद एक्स्प्रेस २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी रद��द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथल्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक महाविद्यालय परिसरात काल पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ४७९ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र��च्या सहायक आयुक्तांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या खामसवाडी शिवारात अवैध गांजाच्या झाडाची लागवड करुन संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली. यावेळी एकूण ३४७ किलो २८० ग्रॅम वजनाची गांजाची झाडं जप्त करण्यात आली.
****
0 notes
Text
66. समर्पण की संघर्ष
जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे समर्पण आणि दुसरे म्हणजे संघर्ष. शरणागती म्हणजे युद्धात पराभूत झालेल्या शरणागतीप्रमाणे असहाय्य शरणागती नव्हे. हे जागरूकता आणि सक्रिय स्वीकृतीसह शरणागती आहे. इतरांपेक्षा पुढे असण्याचा विचार हा एक ��ंघर्ष आहे. आपल्याला जे काही दिले जाते त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी; आणि आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा वेगळे काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे संघर्ष. समर्पण, दुसरीकडे, प्रत्येक जिवंत क्षणाबद्दल कृतज्ञता आहे.
श्रीकृष्ण म्हणतात, “जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो” (3.16). इंद्रियसुखांच्या मागे धावणार्यासाठी हा कधीही न संपणारा जीवनसंघर्ष आहे. या संघर्षातून ताण, चिंता आणि दु:ख निर्माण होते, म्हणजेच आयुष्य व्यर्थ जाते.
श्रीकृष्ण पावसाच्या उदाहरणाने सृष्टीचे चक्र स्पष्ट करतात (3.14). पाऊस हा पाण्याच्या निःस्वार्थ कृतीचा एक प्रकार आहे जेथे पाण्याचे बाष्पीभवन होते आणि निःस्वार्थपणे पावसाच्या रूपात पडते. अशी निःस्वार्थ कृती ही सर्वोच्च शक्तीचा स्रोत आहे (3.15). नि:स्वार्थी कर्माच्या चक्रावर चालणे हे समर्पणाचे जीवन आहे जे आपल्याला आनंदित करते.
श्रीकृष्ण म्हणतात की, “जो माणूस आत्मरत असतो, स्वत:मध्येच त्याला आनंदप्राप्ती होते तो स्वत:बद्दल समाधानी असतो, आत्मतृप्त असतो, त्याच्याकरिता कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही” (3.17). इंद्रियांपासून स्वतंत्र असे हे आयुष्य आहे ज्यामध्ये अस्तित्वाव्यतिरिक्त इतर कोणत्याही इच्छा उरलेल्या नाहीत. नि:स्वार्थ कृती करीत असताना आपल्या वाट्याला जे काही येईल ते बिनदिक्कतपणे स्वीकारण्याचा हा मार्ग आहे. “त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही” (3.18).
‘स्वतःवर समाधानी’ ही गीतेतील मूलभूत शिकवण आहे की माणूस स्वतःमध्ये आनंदी असतो आणि स्वतःमध्ये समाधानी असतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःमध्ये समाधानी असते, तेव्हा आपल्या अधिकार आणि क्षमतांबद्दल कोणतीही तक्रार किंवा तुलना नसते.
0 notes
Text
आमदार महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौ चित्रा ताई वाघ यांनी संघटन पर्व सदस्यता अभियानात माझी सदस्यता नोंदणी 1000 झाली. त्याबद्दल अभिनंदन पत्र दिले. ताई ह्या पत्राने माझ्यासारख्या कार्यकर्ता ला सुद्धा अजून काम करण्याची प्रेरणा मिळते आणि आपल्या पक्षात स्त्री शक्तीचं स्थान अधिक बळकट होताना समाधान वाटतं. आपले मनापासून आभार.
@narendramodi @devendra_fadnavis @mieknathshinde @medhasomaiya @kirit.somaiya @ckbawankule @advocateashishshelar @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @mihirkotecha18 @narendramodi @bjpmanishtiwari @ravindrachavanofficial @chitrakwagh @mipravindarekar_ @chitrataisamrthk @prasadladofficial
#संघटनपर्व #माझीसदस्यता #स्त्रीशक्ती #भाजपमहिलाआघाडी #अभिनंदन #सामाजिककार्यकर्ता #महिलासशक्तिकरण #नवमहाराष्ट्र #राजकीयप्रेरणा #जयभाजपा
0 notes
Text
0 notes
Text
#TrueGuruSantRampalJi #sanews #झूठेगुरुकेआसरे_कदे_न_उधरेजीव #Real spiritual knowledge of sant Rampal ji Maharaj ji 🙏 Supreme God is Kabir Saheb Ji 🙏🙏
0 notes
Text
0 notes
Text
गीता ज्ञान दाताने गुप्ताहूनही गुप्त कोणते ज्ञान दिले ? | Sant Rampal Ji...
youtube
अवश्य पहा हा शॉर्ट सत्संग: गीता ज्ञान दाताने गुप्ताहूनही गुप्त कोणते ज्ञान दिले? |Sant Rampal Ji Marathi Satsant
0 notes
Text
0 notes
Text
गीता ज्ञान दाताने गुप्ताहूनही गुप्त कोणते ज्ञान दिले ? | Sant Rampal Ji...
youtube
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भारत टेक्स एक्स्पोमध्ये परंपरेसोबत विकसित भारताचं दर्शन होत असल्याचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
राज्यातल्या ��्रत्येक शाळेला मराठी विषय शिकवणं सक्तीचं करण्यात आल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना सुरुवात
आणि
नांदेडहून आयोध्येला जात असलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात चार जणांचा मृत्यू
****
भारत टेक्स एक्स्पोमध्ये परंपरेसोबत विकसित भारताचं दर्शन होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारत मंडपम् इथं भारत टेक्स २०२५ या वस्त्रोद्योग मेळाव्यात ते बोलत होते. हे जागतिक वस्त्रोद्योग संमेलन असून, यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि निर्यातीला चालना मिळत आहे, तसंच यामधून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
भारत टेक्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भव्य वस्त्रोद्योग प्रदर्शन असून, ते उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनांपर्यंत विविध उत्पादनं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.
****
नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांचा समावेश आहे. या समितीने स्थानकावरचे सीसीटीव्ही फूटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. फलाट क्रमांक १४ आणि १५ वर उतरण्यासाठी असलेल्या पुलावरुन उतरताना काहीजण घसरले त्यामुळे गर्दीतली माणसं एकमेकांवर कोसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचं, उत्तर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. दुर्घटनेच्या आधी तासाभरात पंधराशेहून अधिक तिकिटं विकली गेली होती, त्यामुळे रेल्वेला गर्दीचा अंदाज यायला हवा होता, असं त्या म्हणाल्या.
****
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेची बातमी दुःखद आणि वेदनादायक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महाकुंभातून आणलेल्या गंगाजलाचा लाभ घेण्यासाठी नागपूरमधे आयोजित कार्यक्रमानंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लव जिहाद वर मत व्यक्त केलं. एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे गैर नाही, मात्र यात फसवणुकीचे प्रकार वाढत असून, त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, जळगाव इथं एका कार्यक्रमासाठी आले असता, मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या प्रत्येक शाळेला मराठी विषय शिकवणं सक्तीचं करण्यात आल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही. यासंदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत. दुसरं शाळा हिंदी असो, इंग्रजी असो, कुठलीही असो, त्यांना मराठी शिकवावी लागेल, याची आपण सक्ती केलेली आहे. ती सक्ती ते योग्य प्रकारे पालन कराताहेत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे. यासंदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो आहोत. त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अश�� प्रकारचा आपला निर्णय आहे.
****
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या आजच्या भागात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठी चांगला आराम करावा, नेहमी स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहावा आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास करा असा सल्ला, विक्रांत मेस्सी यानं दिला. त्यांनी पालकांना मुंलामुलांमध्ये स्पर्धा न करण्याचा, तसंच मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नये, असं आवाहन केलं. तर आपल्याला भविष्यात काय करायचं याबद्दल मुलांनी आपल्या पालकांना विश्वासात घेऊन सांगावं आणि ते पूर्ण करून दाखवावं, असं भूमी पेडणेकर यांनी सांगितलं.
उन पॅरेंटस् को भी कहना चाहुंगा की जो एक्सपेक्टेशन्स आपने अपने बच्चों पे डाली है, वो बर्डन जिस दिन लगने लगती है ना, तो दे आर नॉट एबल टू ग्रो। और प्रधानमंत्री श्री मोदीजी भी ये कहते है की, आपके सपने जो है, वो आपके है, आपके बच्चों के नही।
मेरे मम्मी पापा चाहते थे की, मै एक डिफरंट करीअर पार्ट चुनूं। और तब मैने अपने तरीके से उनको एक पॉझिटीव्ह चीज दिखानी शुरू की एक्टींग की दुनिया पॉझिटीव्ह है। ये इतनी आपको घबराने की जरूरत नही है।
****
केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा ‘मेरा युवा भारत’ उपक्रम जळगाव इथं सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात मुंबईतल्या २७ युवक युवतींचा समावेश आहे. राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज या युवकांशी संवाद साधत जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषि परंपरेची माहिती दिली.
****
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झाली. यात शहरातल्या सर्व पुतळ्यांची साफसफाई जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली, तसंच सायकल रॅलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात युवकांसह नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी सायकल रॅली मधून आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौकात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यानिमित्त शिवकालीन शस्त्र आणि संस्कृती तसंच त्यांनी केलेली युद्धनीती याबद्दल आबालवृद्धांना माहिती होत आहे.
****
नांदेडहून अयोध्येला दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यात लोणीकटरा इथं अपघात होऊन, चार जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारास या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेल्या एका बसला धडक देऊन हा अपघात झाला. मृतांमधले तिघे जण नांदेड इथले, तर एक जण हिंगोली इथले रहिवासी होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरणाच्या कामाचं भुमिपूजन आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. इतर मागासवर्ग कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं उत्तम स्मारक आणि सर्वोपयोगी अद्यावत सभागृह, यासारख्या कामांसाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकविचाराने आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन शिरसाट यांनी यावेळी दिलं.
****
नाशिक महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तीन हजार ५४ कोटी ७० लाख रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीला आज सादर केलं. अत्यल्प करवाढ वगळता गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ५०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असून, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज उचलण्याऐवजी महापालिकेने दोनश�� कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यासाठी शासन आराखड्यात मंजूर नसलेली कामं परंतू सिंहस्थाच्या दृष्टीने आवश्यक आणि पूरक असणाऱ्या कामासाठी टोकन म्हणून पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कसाबखेडा इथल्या आयुष्मान आरोग्य मंदिराची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. विविध अधिकाऱ्यांनी पाहणी करून या केंद्राचं उत्कृष्ट कामकाज दिसून आल्यामुळे, ही निवड करण्यात आली.
****
नांदेड इथं रेल्वेमार्ग विस्तारीकरणाच्या कामांमुळे उद्या १७ फेब्रुवारीपासू��� येत्या तीन मार्च पर्यंतच्या १५ दिवसांच्या कालावधीत काही रेल्वेगाड्या काही दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी-नांदेड एक्स्प्रेस १९, २०, २२, २३, २६, २७ फेब्रुवारी तसंच एक आणि दोन मार्च या दिवशी रद्द करण्यात आली आहे. तर नांदेड - औरंगाबाद एक्स्प्रेस २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन, दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथल्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक महाविद्यालय परिसरात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ४७९ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या खामसवाडी शिवारात अवैध गांजाच्या झाडाची लागवड करुन संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली. संभाजी हिलकुटे असं या शेतकऱ्याचं नाव असून, त्याच्या शेतातून एकूण ३४७ किलो २८० ग्रॅम वजनाची गांजाची झाडं ताब्यात घेण्यात आली.
****
उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी तसंच सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर नगरपालिका आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी उद्या भीमा नदीतून पाणी सोडलं जाणार आहे. सुरुवातीला सोळाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं, त्यानंतर सहा हजार घनफूट प्रति सेकंद वेगानं हे पाणी सोडलं जाणार आहे.
****
0 notes
Text
संत रामपाल जी महाराज यांचे अनमोल सत्संग बघून आणि ज्ञान समजून खूप माणसांनी नशा सोडून दिले
0 notes