Tumgik
#जयभवानी
kusumprinthouse · 7 months
Text
Tumblr media
On the auspicious occasion of Chatrapati Shivaji Maharaj Jayanti, may his valor, wisdom, and indomitable spirit inspire us to uphold righteousness, fight injustice, and strive for the betterment of society. Let us remember his legacy of courage, leadership, and love for his people, and may we emulate his noble qualities in our lives. Wishing you all a blessed Shivaji Jayanti! Jai Bhavani, Jai Shivaji! @kusumprintinghouse
0 notes
happytownplay · 7 months
Text
Tumblr media
On the auspicious occasion of Chatrapati Shivaji Maharaj Jayanti, may his valor, wisdom, and indomitable spirit inspire us to uphold righteousness, fight injustice, and strive for the betterment of society. Let us remember his legacy of courage, leadership, and love for his people, and may we emulate his noble qualities in our lives. Wishing you all a blessed Shivaji Jayanti! Jai Bhavani, Jai Shivaji!
@happytownplay
Instagram: https://lnkd.in/dP3CVHET
Website: https://happytown.in/
Twitter: https://lnkd.in/ddDHTGUz
LinkedIn:
Google:
YouTube:
Contact Us :
Tumblr media
0 notes
cambridgemontessori21 · 7 months
Text
Tumblr media
On the auspicious occasion of Chatrapati Shivaji Maharaj Jayanti, may his valor, wisdom, and indomitable spirit inspire us to uphold righteousness, fight injustice, and strive for the betterment of society. Let us remember his legacy of courage, leadership, and love for his people, and may we emulate his noble qualities in our lives. Wishing you all a blessed Shivaji Jayanti! Jai Bhavani, Jai Shivaji!
@cambridge.montessori.10
Soham exotica, plot no 69 ,sector 21 ,shop no 7, Navi Mumbai (New Mumbai), India, Maharashtra
+91 93211 48266
Websites and social links
Website
Pinterest
Twitter
Instagram
Tumblr
0 notes
drpankajshukla · 7 months
Text
Tumblr media
शिवाजी महाराज की जयंती पर शत्-शत् नमन! 🚩 समर्थ, साहसी और शूरवीर छत्रपति को श्रद्धांजलि। डॉ. पंकज शुक्ला #छत्रपतिशिवाजीजयंती #डॉपंकजशुक्ला #शिवराय #जयभवानी #नमन
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Date – 04 May 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारतीय माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र संपूर्ण जगावर आपली छाप पाडेल- केंद्रीय मंत्री पियूष गोयल. 
रेल विकास निगम लिमिटेडला ‘नवरत्न’चा दर्जा.
राजिनाम्यावरचा निर्णय दोन दिवसांत घेणार- शरद पवार.
आणि
मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत `चिरभोग`ला प्रथम पारितोषिक.
****
`अमृत काळ` साजरा करत असताना भारतीय माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र संपूर्ण जगावर आपली छाप पाडेल, असं केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत फिक्की अर्थात भारतीय उद्योगपतींच्या शिखर संस्थेच्या एका विशेष सत्रात बोलत होते. माध्यमं आणि मनोरंजन व्यवसायात लोकांना, उद्योगांना आणिे देशांना जोडण्याची शक्ती असून, माध्यमं आणि मनोरंजन उद्योग भारताच्या बदलत्या नव्या चित्राला जगभरात पोहचवू शकतात, असंही गोयल यांनी सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसंच सकारात्मकतेचा प्रसार करण्याचं कामही माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय संस्कृती आणि कलेबद्दल जगभरात कौतुक होत असल्याचं ते म्हणाले. नुकत्याच ऑस्कर पटकावलेल्या `नाटू नाटू` आणि `द एलिफंट व्हिस्परर्स` या कलाकृतींचा गौरवपूर्ण उल्लेखही गोयल यांनी यावेळी केला.
****
रेल विकास निगम लिमिटेड, या भारतीय रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला ‘नवरत्न’ हा दर्जा मिळाला आहे. रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रकल्पांची जलद अंमलबजावणी करणं, आणि विशेष प्रकल्पांसाठी निधी उभारणं या प्रमुख उद्दिष्टांसाठी, २४ जानेवारी २०२३ रोजी या कंपनीची स्थापना झाली होती. आता ‘नवरत्न’ हा दर्जा मिळाल्यामुळं कंपनीला जास्त अधिकार, कामकाजाचं स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वायत्तता मिळणार आहे. 
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजिनाम्यावर आपण येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार आहोत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागं घ्यावा, या मागणीसाठी दोन दिवसांपासून पक्ष कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत आहेत. पवार यांनी आज या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना समजावलं, त्यावेळी ते बोलत होते. आपण पक्षाच्या हितासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचं आणि यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भातल्या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा ही त्यांच्या पक्षांतर्गत घडामोड आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सर्वांच्या हिताचा ते निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयापर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थांबा, त्यानंतर आपण यावर बोलू, असंही ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले. हिंदूत्वासाठी प्रचार केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. आता मोदी यांनी `बजरंगबली की जय` म्हणत मतदान करण्याचं आवाहन कर्नाटकमधल्या जनतेला केलं आहे, त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेणार काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर तिथल्या मराठी माणसानं `जयभवानी -जय शिवाजी` म्हणून मतदान करावं तसंच मराठी विरोधकांना हरवावं, असं आवाहनही ठाकरे यांनी केलं. देशात हुकुमशाही येऊ नये या विचारांचे पक्ष एकत्र येत आहेत. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यानंतर वज्रमूट सभा घ्यायच्या का, याचा विचार करत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी नमुद केलं.
****
बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे देशद्रोह्यांना साथ देण्यासारखं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यादरम्यान बेळगाव इथं पत्रकारांशी बोलत होते. आपण आणि आपला पक्ष बेळगावामधल्या मराठी भाषिकांच्या मागं उभा आहे, असंही फडणविस यांनी यावेळी सांगितलं.
****
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारनं कोणतेही प्रयत्न केले नाहीत, शिंदे - फडणवीस सरकार फक्त वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं गेल्या एक मे पासून इतर मागास वर्ग-ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असतांना आपलं सरकार आल्याबरोबर मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं म्हटलं होतं, ते आश्वासन त्यांनी पाळलं नसल्याची टीका दानवे यांनी यावेळी केली.
****
राज्यात अनेक ठिकाणी येत्या शनिवारपर्यंत जोराचं वारं, विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडेल. हवामान विभागानं या संदर्भातला अंदाज व्यक्त केला आहे. औरंगाबादमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होतं.
****
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत जिल्हा शल्य चिकित्सक स्तर या आरोग्य संस्थाच्या गुणवत्तेत लातूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांवर पटकावला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी ही माहीती दिली. लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचंही जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख यांनी म्हटलं आहे.
****
मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं `चिरभोग` या मराठी लघुपटाची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली आहे. आसामी भाषेतल्या `सक्षम` ला द्वितीय, तर तमीळ भाषेतल्या `अछम थावीर`ला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचं यंदा आठवं वर्ष होतं. एकूण १२३ लघुपट स्पर्धेत होते. प्रथम क्रमांकासाठी दोन लाख रुपयांचा पुरस्कार आहे. समाजातल्या, जात आणि व्यवसायावर आधारित भेदाभेद, स्वातंत्र्य, समानता, सन्मान आणि मानवी हक्क यासाठीच्या संघर्षावर निलेश आंबेडकर यांनी ‘चिरभोग या मराठी लघुपटामध्ये प्रकाश टाकला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. गुजरात टायटन्स नऊ सामन्यांमध्ये बारा गुण घेऊन प्रथम स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किं���्जनं दहा सामन्यांत प्रत्येकी अकरा गुण घेतले आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडीयन्सकडे प्रत्येकी नऊ सामन्यांतले प्रत्येकी दहा गुण आहेत. गोलंदाजांसाठीची `पर्पल कॅप` गुजरात टायटन्सकडून १७ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीकडे आहे. नऊ सामन्यांत ४६६ धावा काढणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या `फॅफ डुप्लेसीस`कडे ऑरेंज कॅप आहे.
****
सोलापूर- पुणे महामार्गावर दुचाकीच्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. माढा तालुक्यातल्या अरण गावच्या शिवारात आज पुण्याकडे निघालेल्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
मराठी चित्रपटसृष्टीतले लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं आज पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. त्यांचा 'मराठी पाऊल पडते पुढे' हा चित्रपट उद्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. मयेकर यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
****
बीड मधल्या मिलिया महाविद्यालयाच्या पूर्व बाजुला कागदी दरवाजा परिसरातल्या  हेमाडपंथी पुरातन वास्तूमध्ये प्रवेश करायला आणि त्यासंबंधी प्रसिद्धी द्यायला मनाई करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधी शिवाय इतर सर्वांना ही मनाई करणारे या संदर्भातले तत्कालिन उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेले मनाई आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील असं जिल्हा न्यायालयाच्या या संदर्भातल्या एका आदेशात नमुद करण्यात आलं आहे. सदर पुरातन वास्तूच्या संबंधी चुकीची माहिती समाज माध्यमावर प्रसारित केल्याच्या कारणावरून भविष्यात घडणारी दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगानं हे निर्देश देण्यात आले असल्याचं उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
jagdamb · 2 years
Text
शिवराय मनामनात
शिवजयंती घराघरात !!
#जयभवानी #छत्रपती_शिवाजी_महाराज #JayBhavani #ShivJayanti #ChatrapatiShivajiMaharajJayanti
1 note · View note
mimrbsd · 4 years
Text
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Tumblr media
@staff
छत्रपती शिवाजी महाराज
1 note · View note
cherishunisexsaloon · 4 years
Video
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत "छत्रपती शिवाजी महाराज" यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!! #छत्रपती_शिवाजी_महाराज #महाराष्ट्र #जयंती #जयभवानी #जयशिवाजी #जयमहाराष्ट्र https://www.instagram.com/p/B-hi5I5ALOq/?igshid=tdvqnqy0b3mm
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
उच्चशिक्षित तरुणांकडून २१ लाखांची घरफोडी; तपासातून धक्कादायक कारण उघडकीस
उच्चशिक्षित तरुणांकडून २१ लाखांची घरफोडी; तपासातून धक्कादायक कारण उघडकीस
उच्चशिक्षित तरुणांकडून २१ लाखांची घरफोडी; तपासातून धक्कादायक कारण उघडकीस Nashik Robbery News: नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने नाशिक रोडमधील दोघा संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या. त्यांनी आठवडाभरापूर्वी जयभवानी रोडवरील एका बंगल्यात घरफोडी करत २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिने, रोकड लांबविली होती. ‘ईश्वर’ बंगला बंद असताना, चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आतमध्ये…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
कन्नड भवनच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो - पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची अपेक्षा - महासंवाद
कन्नड भवनच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची अपेक्षा – महासंवाद
सोलापूर, दि. 6 (जिमाका): वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचा वापर सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी येणाऱ्या जगतगुरू महाराजांच्या निवासासाठी होणार आहे. या भवनातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना चांगली अभ्यासिका करावी. या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. कुंभार वेस येथील जयभवानी मैदानात वीरशैव…
View On WordPress
0 notes
4memoriesevent · 3 years
Text
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र #मुंबई #महाराष्ट्रदिवस #आमचीमुंबई #आमचामहाराष्ट्र #भगवाझेंडा #मर���ठी #जयशिवाजी #जयभवानी #छत्रपतिशिवाजीमहाराज #महाराष्ट्रदेश #आम्हीमराठी #मीमराठी #जयमहाराष्ट्र
@4memoriestours @4memoriesevent @gogeetapawar @icreatesuraj @cute4pink @be__sheetal
Tumblr media
0 notes
hallomanojposts · 4 years
Text
*पाथर्डीत 6 व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह*
*पाथर्डीत 6 व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह*
  पाथर्डी दि 23 जुलै टीम सीएमन्यूज
आज घेतलेल्या तालुक्यातील 19 जणांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले. यामध्ये 6 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे.हे सर्व अँटी रॅपिड किटच्या साहाय्याने पुढे आले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली.
पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान 2,जयभवानी चौक 1,शिरसाटवाडी 3 या गावातील कोरोना रुग्ण आहेत.
शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय येथील कोव्हीड सेंटरवर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 November 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      मोठ्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून २२०० कोटी रुपये वितरीत.
·      राज्यात ग्रामपंचायत क्षेत्रात घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे.
·      राज्यातल्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीपूर्वी वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार.
·      सांगलीचे संपतराव पवार यांना नदी पुनरुज्जीवनासाठी जलशक्ती मंत्रालयाचा पहिला पुरस्कार.
·      आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाची गरज राज्यपालांकडून व्यक्त.
·      आमदार मेघना बोर्डीकर यांचं उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित.
आणि
·      मराठवाड्यात काल तेरा कोविडग्रस्तांचा मृत्यू, तर नव्या ३०६ रुग्णांची नोंद.
****
दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह १५ राज्यांना पहिल्या टप्प्यात दोन हजार २०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरुन हा निधी जारी करण्यात आला आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढवणं आणि वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याकरता या निधीचा उपयोग होईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राला एकूण निधीपैकी ३९६ कोटी रुपये इतका निधी देण्यात आला आहे. यापैकी औरंगाबादला १६ कोटी, नाशिक २० कोटी पन्नास लाख, नागपूर ३३ कोटी, पुणे ६७ कोटी तर बृहन्मुंबईसाठी २४४ कोटी रुपये निधी दिला जाणार आहे.
दरम्यान, कोविड प्रतिबंधाच्या टाळेबंदीनंतर राज्यातल्या प्रदुषणात ३० ते ५५ टक्क्यांची घट झाली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाचा २०१९-२०२० चा अहवाल नुकताच जाहीर झाला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात मुंबई आणि चंद्रपूर हे जास्त प्रदूषित विभाग ठरले असून, सुक्ष्मधुलीकणांचं प्रमाण अधिक असलेल्या शहरांच्या यादीत औरंगाबाद शहराचा समावेश आहे.
****
विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निवडणूक प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचं सांगत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. विधान परिषद सभापतींनी ८ सप्टेंबरला निवडणूक जाहीर केली होती. मात्र, पडळकर हे दोन दिवस आधीच कोविडबाधित झाले होते. विरोधी पक्षातील अनेक नेतेही निवडणुकीवेळी सभागृहात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे विधिमंडळाच्या नियमांना डावलून विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया राबवली गेल्याचा आरोप, पडळकर यांनी या याचिकेत केला आहे.
****
राज्यात ग्रामपंचायत क्षेत्रात घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सिंधुदुर्ग इथं ही माहिती दिली. युती सरकारच्या काळात घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतींकडून काढून नगरविकास विभागाकडे देण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना घर बांधणीसाठी अडचणी येत होत्या. लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाला विरोध केला होता. विनापरवानगी बांधकामावर ग्रामपंचायतींकडून कारवाई होत नव्हती. त्यामुळे हे अधिकार ग्रामपंचातींना दिल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविकांना दिवाळीपूर्वी वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार आहे. आशा स्वयंसेविका तसंच गटप्रवर्तकांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी ५६ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने काल शासन निर्णय जारी केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. २५ जून २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २००० आणि ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एल. आय.सी. योजनेंतर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार आहेत. महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली.
****
कोविड प्रतिबंधासाठी सर्वांनी त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या क्रांतीस्मृती वनाचे प्रणेते भाई संपतराव पवार यांना ‘अग्रणी’ नदीच्या पुनरुज्जीवन कामासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दीडशे वर्षापूर्वी वाहती असलेली मात्र आता लुप्त झालेली अग्रणी नदी पुनरुज्जीवित करण्याची कल्पना पवार यांनी मांडली होती, पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बलवडी आणि बेणापूर गावच्या ग्रामस्थानी लोकवर्गणीतून धरण बांधून अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या उपक्रमाला सहकार्य केलं आणि शासकीय खर्चातून हा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वी केला. पुढील आठवड्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
कोविडसारख्या आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्धाटन तसंच सौरउर्जा प्रकल्पाचं उदघाटन केल्यानंतर बोलत होते. कोविडच्या आपत्ती काळात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा यासारख्या विविध उपचार पद्धतींनी समाधानकारक काम केल्याचं राज्यपाल म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी परीक्षा घेण्याची ठाम आणि आग्रही भूमिका घेतली, ती भूमिका खरोखरच कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल म्हणाले. योग्य ती काळजी घेऊन सामना केल्यास कोविडपेक्षा भयंकर महामारीवरही मात करणं शक्य असल्याचं मत राज्यपालांनी व्यक्त केलं.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी केलेल्या भाषणात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल असं सांगितलं.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी परवा सोमवारपासून सुरू केलेलं उपोषण काल परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या पत्रातून शासन निकषानुसार काही बाधीत शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असल्यास अशा शेतकऱ्यांची चौकशी करून त्यांना शासनाच्या निर्णयानुसार मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असं म्हटलं आहे. २०१८-१९ मधल्या कोरडा दुष्काळाबाबत शासनाकडे ११२ कोटी ६७ लाख रुपये निधीची मागणी करण्यात आली असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. पीकविम्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने आज होणाऱ्या बैठकीतून आढावा घेतला जाईल आणि वंचित शेतकऱ्यांना नियमानुसार पीककर्ज वाटपाबाबत कार्यवाही केली जाईल, असंही या पत्रात म्हटलं आहे.
****
सांगली जिल्ह्यात कृषी विभागाने रासायनिक खतांच्या बोगस कारखान्यावर छापा टाकून १८ लाख ७८ हजार रूपये किंमतीचं खत जप्त केलं आहे. म्हैसाळ इथल्या तुषार प्रॉडक्टस नावाच्या या खत कारखान्यातून सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात खत पुरवठा होत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शिवलिंग संगाप्पा सनबे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने लाखो रुपयांचा वस्तू आणि सेवा कर बुडवल्याचं निदर्शनास आलं आहे.
****
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीस ठार मारल्याप्रकरणी परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं एका महिलेसह तिच्या प्रियकराला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. १२ सप्टेंबर २०१७ रोजी मौजे उखळद इथं ही घटना घडली होती. न्यायालयाने या प्रकरणी एकूण १३ साक्षीदार तपासून परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरत ही शिक्षा सुनावली. दोषींनी दंड न भरल्यास, त्यांना सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
****
अवैध पिस्तुल विक्रीप्रकरणी धुळे पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे. सोमीनाथ भगवान लाड असं या तरुणाचं नाव असून तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथला रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून १५ हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल, ३६० रुपये किंमतीची तीन काडतुसं आणि १५ हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण ३० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
बँक ऑफ बडोदाच्या मिरज शाखेची १६ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. बँकेकडे तारण म्हणून ठेवलेला बेदाणा, शीतगृहातून परस्पर विक्री करण्यात आला आहे. याप्रकरणी सी एन एक्स कार्पोरेशन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक निरुपमा पेंडुरकर यांच्यासह आठ जणांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मराठवाड्यात काल तेरा कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, तर कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या नव्या ३०६ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, तर नवे ५४ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात काल तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, तर नव्याने ४० कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. जालना तसंच बीड जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, जालना जिल्ह्यात नवे २४ रुग्ण तर बीड जिल्ह्यात ८१ नवे रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर २२ नवीन रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात काल ५० नवे रुग्ण, उस्मानाबाद जिल्ह्यात ३० नवे रुग्ण तर हिंगोली जिल्ह्यात काल पाच नवे रुग्ण आढळले.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या घटल्यानं सोलापूर शहरातली तीन कोविड सुश्रुषा केंद्रं बंद करण्यात आली आहेत. गेल्या पाच महिन्यांत या केंद्रांमध्ये ३७४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या केंद्रात जवळपास दीडशे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा��ी नेमण्यात आले होते. भविष्यात रुग्णांची संख्या ��ाढल्यास पुन्हा या ठिकाणी कोविड सुश्रुषा सुरु करण्यात येतील अशी माहिती, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी दुधभाते यांनी दिली.
****
कोविड प्रादुर्भावामुळे व्यवसायात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर परळी शहरातल्या जिजामाता फूड प्लाझा इथल्या सर्व विक्रेत्यांचं सहा महिन्यांचं भाडं माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. सर्व व्यावसायिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
लातूरचे अपर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी कोविड प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचं तसंच वारंवार साबणानं हात धुण्याचं आवाहन केलं आहे.
****
राज्यातील १४८ साखर कारखान्यांना चालू हंगामासाठी ऊस गाळप परवाना देण्यात आला असून, ५२ कारखान्यांच्या प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या हंगामात राज्यातल्या १४७ साखर कारखान्यांनी ५४५ पूर्णांक २६ लाख मेट्रिक टन उसाचं गाळप करून ६६ पूर्णांक ६१ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली होती. ३१ मे २०२० अखेर राज्यात ८४ पूर्णांक ३१ लाख मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या जयभवानी साखर कारखान्याकडून कार्यक्षेत्रातल्या जास्तीत जास्त उसाचं गाळप करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी म्हटलं आहे. ते काल कारखान्यात तयार झालेल्या पहिल्या साखर पोत्यांचे पूजन केल्यानंतर बोलत होते. कोविड संकटकाळात चांगलं काम केलेल्या कारखान्याच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं त्यांनी विशेष कौतुक केलं.
****
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीत काल कांद्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे हजार ते बाराशे रुपयांनी घट झाली. लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत इथं कांद्याच्या दरात क्विंटलमागे ९०० रुपये तर मनमाड बाजार समितीत प्रति क्विंटल ८०० रुपये घसरण झाली.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या आष्टूर इथले आयुर्वेद औषधी तज्ञ केरबाजी विठोबा आचणे यांचं काल रात्री निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. आज सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर आष्टूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ओबीसी बचाओ आंदोलनाअंतर्गत काल परभणी जिल्ह्यात सर्व तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. २०२१ ची जनगणना राज्य सरकारनं जातनिहाय करावी, ओबीसी प्रवर्गात मराठा जातीचा समावेश करू नये, एमपीएससीसह पुढे ढकलण्यात आलेल्या अन्य परीक्षा तातडीने घेण्यात याव्यात, यासह अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालय तसंच तहसील कार्यालयासमोर काल ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
राज्यातली धार्मिक स्थळं उघडण्याच्या मागणीसाठी तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिरासमोर उद्या ५ नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आध्यात्मिक समन्वय आघाडीने घेतला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह प्रमुख साधुसंत या आंदोलनास सहभागी होणार आहेत.
****
0 notes
jagdamb · 2 years
Text
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ||
हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी राजे हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा...
Tumblr media
तमाम शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!
#ChatrapatiShivajiMaharajJayanti #ShivJayanti #JayBhavani #छत्रपती_शिवाजी_महाराज #जयभवानी #शिवजन्मोत्सव #शिवजयंती
(CONTENT © COPYRIGHT)
0 notes
mhlivenews · 3 years
Text
लोककलांच्या माध्यमातून जागर जनजागृती मोहिमेचा शुभारंभ - महासंवाद
लोककलांच्या माध्यमातून जागर जनजागृती मोहिमेचा शुभारंभ – महासंवाद
बीड, दि. 9 (जि. मा. का.) :- विद्यमान सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार – दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित “लोककलांच्या माध्यमातून जागर” जनजागृती मोहिमेला आज जिल्ह्यात प्रारंभ झाला. या जनजागृती मोहिमेत दि. 9 मार्च रोजी सकाळच्या सत्रात जयभवानी कलापथकाने परळी तालुक्यातील रेवली, समता कलापथकाने गेवराई तालुक्यातील मादळमोही व तांबवेश्वर कलापथकाने केज…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 August 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.०० **** ** हिंदू उत्तराधिकारी कायद्यात मुलींच्या समान हक्काबाबत २००५ मध्ये केलेली सुधारणा पूर्वलक्षी प्रभावानं लागू असणार ** सामुहिक प्रयत्नातूनच कोरोना विषाणूविरोधातला लढा जिंकता येईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी ** कोविड १९ च्या स्वदेशी लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा आजपासून नागपुरात सुरू ** औरंगाबाद इथं पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू; उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंड्यात परवापासून आठवडाभर संचारबंदी आणि ** प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचं निधन **** १९५६ च्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यात मुलींच्या समान हक्काबाबत २००५ मध्ये केलेली सुधारणा, पूर्वलक्षी प्रभावानं लागू असणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज यासंदर्भातल्या एका खटल्यात निर्णय देताना, ही बाब स्पष्ट केली. मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्याबाबतचा कायदा २००५ मध्ये करण्यात आला आहे. मात्र हा कायदा होण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झालेला असेल, तरीही मुलींचा वडिलांच्या संपत्तीतला समान वाटा कोणी नाकारू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. या संदर्भात देशभरातली विविध उच्च न्यायालयं आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं पुढच्या सहा महिन्यात निकाली काढण्याच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. **** सामुहिक प्रयत्नातूनच कोरोना विषाणूविरोधातला लढा जिंकता येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आज देशभरातल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. रुग्ण आढळण्याचं प्रमाण घटत असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे, कोविडवर नियंत्रणाच्या प्रयत्नात यश येत असल्याचं यावरून सिद्ध होतं, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. कोविडमुळे होणारा मृत्यू दर सातत्याने घटत असून, जगभरात भारतातला मृत्यू दर कमी असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बोलताना, राज्यात कोविडबाधित रुग्णसंख्या आणि मृत्यू याबाबत पारदर्शकता पाळली जात असल्याचं सांगितलं. कोविड संसर्गाची दुसर��� लाट येऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेत असल्याचं, मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. **** कोविड १९ च्या स्वदेशी लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा आजपासून नागपुरात सुरू झाला. हैदराबाद इथल्या भारत बायोटेक ने ही लस विकसित केली आहे. दरम्यान, रशियाने कोरोना विषाणूची लस विकसित केली असून, त्याबाबतची नोंदणी केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुतीन यांच्या कन्येनं कोरोना लसीकरण करून घेतलं असल्याचं, या बातमीत म्हटलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यात शहरातल्या उस्मानपुरा इथल्या ८६ वर्षीय, गजानन नगर इथल्या ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा, सिल्लोड इथल्या ६५ वर्षीय महिला, गंगापूर तालुक्यातल्या आंबेगाव इथल्या ८० वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हादगावच्या तांसा इथल्या ५४ वर्षीय महिला रुग्णाचा औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गानं मृतांची संख्या आता ६६२ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ७५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये महापालिका हद्दीतल्या ३६ आणि ग्रामीण भागातल्या ३९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजा�� १२५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १२ हजार ५३७ रुग्ण उपचार घेवून बरे झाले असून चार हजार ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा नगर पालिका क्षेत्रात कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परवा १३ तारखेपासून २० तारखेच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना या काळात बंद राहणार आहेत. पीक कर्ज आणि अंतर्गत कामकाजासाठी सर्व बँका सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सुरु राहणार आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. या सूचनांचं उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. **** अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय - ईडीने आज सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी, व्यवस्थापक श्रुती मोदी तसंच सुशांतची मोठी बहीण मितू सिंग या सर्वांची चौकशी केली. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे. राजपूत यांच्याशी निगडित दोन कंपन्याशी अभिनेत्री रिया चक्रवर्ती तसंच तिच्या कुटुंबीयांचे आर्थिक व्यवहार याबाबतही ईडीचा तपास सुरू आहे. रिया, तिचे वडील आणि भाऊ या कंपन्यामध्ये संचालक असल्याचं सांगितलं जातं. **** माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. काल मेंदूवरच्या शस्त्रक्रियेनंतर मुखर्जी यांना सध्या कृत्रीम श्चसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं आहे. मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यानं, त्यांच्यावर काल शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापूर्वी मुखर्जी यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं चाचणीतून निष्पन्न झालं आहे. **** एअर इंडिया एक्सप्रेसचे वैमानिक विंग कमांडर दीपक साठे यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत विक्रोळी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साठे यांचं गेल्या शुक्रवारी केरळ मध्ये कोझीकोड इथं विमान अपघातात सहवैमानिक अखिलेशकुमार आणि १८ प्रवाशांसह मृत्यू झाला होता. साठे यांचे कुटुंबीय, वायू सेनेचे अधिकारी तसंच विविध विमान कंपन्याचे वैमानिक तसंच कर्मचाऱ्यांनी साठे यांना अखेरचा निरोप दिला. **** प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचं इंदूर इथं कोविड संसर्गामुळे आज निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. इंदौरी यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं, त्यांच्यावर मध्यप्रदेशात इंदूर इथं एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सायंकाळी त्यांचं निधन झालं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंदोरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे **** बुलडाणा जिल्हयातल्या चिखली तालुक्यातील सैलानी इथं आज सकाळी भिंत अंगावर कोसळल्यानं आई आणि मुलीचा मृत्यू झाला. सुगवंती मनोज काजळे आणि कविता मनोज काजळे असे मृतकांची नावे असून या दोघी मध्यप्रदेशातील खांडवा बोटी इथल्या रहिवाशी आहेत. मानसिक रोगावर उपचार करण्यासाठी त्या सैलानी इथं ताडपत्राच्या खोलीत राहत होत्या.काल रात्री झालेल्या पावसानं भिंत अंगावर पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यृची नोंद केली आहे. **** हिंगोली जिल्हात नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर आपत्ती पासून स्वत:चा बचाव करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. येलदरी धरणात सूमारे ९२ टक्के, तर सिध्देश्वर धरणात ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. येलदरी धरण कधीही पूर्ण भरु शकतं, त्यामुळे कोणत्याही क्षणी येलदरी धरणातून पूर्णा नदीत पाणी सोडण्यात येऊ शकतं. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा आणि या गावांसाठी उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे. दरम्यान, पुरस्थितीत घाबरून नका, सरकारी सुचनांचं पालन करा, तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असंही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं. **** नांदेड शहरातल्या नाना नानी पार्क इथं अँटीजन कोरोनाविषाणू चाचणी शिबीर सुरु करण्यात आलं आहे. या शिबीरात नागरिक उत्स्फूर्तपणे तपासणीसाठी समोर येत आहे.तर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत उपजिल्हा रुग्णालयात आज व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी सुरू आहे. या चाचणीला व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद शहरातल्या जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्याचे काम लवकर पूर्णकरण्याच्या मागणीसाठी महापालिकेचे बुजगावणे लावून शहर परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज तीव्र निषेध केला. ****
0 notes