Tumgik
#केरळ बातम्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
घटस्फोटासाठी पती-पत्नीने एक वर्ष वेगळे राहणे आवश्यक नाही, केरळ हायकोर्टाचा मोठा निर्णय
घटस्फोटासाठी पती-पत्नीने एक वर्ष वेगळे राहणे आवश्यक नाही, केरळ हायकोर्टाचा मोठा निर्णय
घटस्फोटासाठी पती-पत्नीने एक वर्ष वेगळे राहणे आवश्यक नाही, केरळ हायकोर्टाचा मोठा निर्णय Kerala high court on divorce : केरळ उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, परस्पर संमतीने पती-पत्नी घटस्फोट घेत असल्यास त्यांना एक वर्ष वेगळे रहायला लावणे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. Kerala high court on divorce : केरळ उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, परस्पर संमतीने पती-पत्नी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर हुसैन राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय अमेरिकेच्या अपील न्यायालयानं दिला आहे. भारत-अमेरिका उभय देशातल्या हस्तांतरण करारानुसार सध्या लॉस एंजलिसच्या तुरूंगातील राणाचं हस्तांतरण होऊ शकतं. राणा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या डेविड हेडलीशी संबंधित असून, त्याचा पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध असल्याचाही आरोप आहे.
****
नागरिकत्व सुधारणा अधिनियम अर्थात सीएए अंतर्गत विस्थापीत १८८ हिंदूंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज अहमदाबाद इंथ एका कार्यक्रमात भारताचं नागरिकता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.  गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री शाह यांनी अहमदाबाद महापालिकेच्या अनेक विकास कामांचं उद्धाटन आज सकाळी केलं.
****
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज विजा आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत पश्चिम बंगालसह हिमालयाशी जोडलेला भाग ईशान्येकडील राज्ये तसंच केरळ,तमिलनाडु आणि लक्षद्वीपमध्येही तीव्र स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 
****
काँग्रेस पक्षातर्फे परवा मंगळवारी वीस ऑगस्टला माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी मुंबई इथं कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष-राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते उपस्थित असणार आहेत.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तब्बल पावणे पाच कोटी रुपये किंमतीचं अंमली पदार्थ कोकेन जप्त करत आरोपीला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. इथिओपिया एयरलाईन्स विमानातून प्रवास करणाऱ्या केनियन इसममाची तपासणी केली असता अंमली पदार्थाच्या गोळ्या शरीतून लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 
****
छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ६६ व्या वर्धापनदिनी देण्यात येणारा जीवनसाधना पुरस्कार ज्येष्ठ लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार वर्धापनदिनी २३ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं सढळ हस्ते मदत केल्यानं गेल्या चार महिन्यात एक लाख कोटींची  गुंतवणूक राज्यात झाली. राज्यात मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचा निधी मंजूर झाल्यानं राज्यात जगातील सर्वात मोठं मेट्रोचं जाळं पुण्यासह मुंबई परिक्षेत्रात विणलं जात असल्याचं शिवसेना खासदार मिल��ंद देवरा यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने राज्याला काय दिलं असे विचारणाऱ्या विरोधकांवर खासदार देवरा यांनी या माहितीद्वारे उत्तर दिलं. वाढवण बंदरासाठीच्या निधीचाही यात समावेश असल्याचं देवरा म्हणाले.
****
भारतानं आर्थिक राष्ट्रवाद स्वीकारुन उद्योग, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राने टाळता येण्यासारखी आयात टाळत स्थानिक उत्पादनास प्राधान्य देण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते काल व्यंकटचलमच्या स्वर्ण भारत ट्रस्ट इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशाचं चलन भांडार रितं होण्यासह भारतीय कामगारांच्या रोजगाराच्या संधी कमी होणं आणि उद्योजकतेच्या विकासामध्ये होणारा अडथळा यामुळे आयातीचा अर्थव्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम याद्वारे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केला. एक देश म्हणून, आपल्याला दीर्घकालीन राष्ट्रीय हितांऐवजी सहज-झटपट आर्थिक लाभाला प्राधान्य देणं परवडणारं नाही असही ते म्हणाले.
****
चीनमध्ये चेंगडू इथं परवा मंळवारी वीस तारखेपासून सुरू होणाऱ्या १५ आणि १७ वर्षांखालील कनिष्ठ गट आशियाई अजिंक्य पद बडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा ३९  खेळाडूंचा संघ रवाना झाला आहे.मागिल  वर्षी या स्पर्धेत भारतानं एका सुवर्णासह तीन पदकं पटकावली होती.दरम्यान, पुढील वर्षी कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्य पद स्पर्धेचं यजमानपद भारतानं स्वीकारलं आहे
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
हिजाबिनी ओणम लोक विद्यार्थी विद्यार्थांचा व्हिडिओ व्हायरल | केरळमधील विद्यार्थिनींनी शाळेत हिजाब घालून ओणम साजरे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला काँग्रेस नेते शशी थरूर यांना पीआरपी ९३ ला लाईक
हिजाबिनी ओणम लोक विद्यार्थी विद्यार्थांचा व्हिडिओ व्हायरल | केरळमधील विद्यार्थिनींनी शाळेत हिजाब घालून ओणम साजरे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला काँग्रेस नेते शशी थरूर यांना पीआरपी ९३ ला लाईक
उत्तरे के मल्प्पुरम काँग्रेसमधील वंडळ दूरवर एकामध्‍ये होत आहे. हा व्हिडीओ युद्धाचे युद्ध लाय शशी थरूर यांनी ट्विट केले आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठी पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये वंदूर सरकारी कन्या उच्च माध्यमिक विद्यालयातील काही हिजाब परिधान विद्यार्थिनी त्यांच्या संगीतावर इतर विद्यार्थिनीं स्थानिक ओणम उत्सवाच्या नाचत आहेत. सोशल मीडियावर हजारो लोक त्या कौतुक करत आहेत.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
घरगुती इलेक्ट्रिक कार, 5 रुपयात 60 किमी धावते
घरगुती इलेक्ट्रिक कार, 5 रुपयात 60 किमी धावते
घरगुती इलेक्ट्रिक कार: गरज ही शोधाची जननी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या काळात या महागाईतून जनतेला दिलासा मिळू शकेल अशा साधनांची गरज आहे. हीच गरज लक्षात घेऊन केरळमधील एका ६७ वर्षीय व्यक्तीने अवघ्या ५ रुपयांत ६० किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक कार बनवली आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या अँटोनी जॉनने हा पराक्रम केला आहे. त्याने आपल्या घरी इलेक्ट्रिक कार डिझाईन केली आहे. ते तयार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webnewswala · 4 years
Video
instagram
केरळ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या हत्तीणीचा हृदयद्रावक व्हिडिओ #webnewswala #बातम्या #मराठी #ताज्याबातम्या #marathi #mimarathi #मराठीबोलाचळवळ #महाराष्ट्र #बातमी #news #marathinews #corona #coronavirus #coronamemes #covid #covid19 #covid_19 Please Follow Our other social Media Handle फेसबुक https://www.facebook.com/webnewswala/ Instagram https://www.instagram.com/webnewswala/ Twiter https://twitter.com/WebNewswala Helo https://m.helo-app.com/al/cdewybMYZR Share chat https://b.sharechat.com/bL1CpY2Fm5 YouTube https://www.youtube.com/channel/UCfyx9cToeIyDYIEqMy2EhyQ/about?disable_polymer=true https://www.instagram.com/p/CA_ywGrgUac/?igshid=ydg5nmd27j2k
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
पश्चिम घाट परिसर ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
अन्य राज्यातल्या आयुर्वेदिक पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीचा सामना
आणि 
नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी आत्तापर्यंत पाच हजार दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग
****
पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या ५६ हजार ८०० चौरस किलोमीटर पेक्षा जास्त परिसराला, ‘पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या साठ दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मागवल्या असून, नागरिक [email protected] या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात. सहा राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, आदी कामांवर बंधनं येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
अन्य राज्यातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन बी ए एम एस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित ८५ टक्के तसंच खाजगी विना अनुदानित ७०टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.
****
राज्यातल्या सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसह १६३ शासकीय तंत्र विद्यालयातल्या संविधान मंदिरांचं, येत्या १५ ऑगस्टला एकत्रित दूरदृश्य पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य कौशल्य विद्यापीठ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार समजण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. २६ जूनला संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता.
****
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्यावतीनं काल राष्ट्रीय अवयवदान दिन पाळण्यात आला. मुंबईत विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीच्या वतीनं गेल्या जवळपास महिनाभर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व, भित्तीपत्रक, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. काल जनजागृती फेरीने या उपक्रमांचा समारोप झाला. जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांच्या उपस्थितीत निघालेली ही जनजागृती फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, पुन्हा घाटी रुग्णालयात विसर्जित झाली. अवयवदानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पथनाट्य, काव्यवाचन, घोषणा, वक्तृत्व, रांगोळी यासारख्या उपक्रमांमधून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली, तसंच सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.
****
नांदेड इथं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वतीने काल सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले.
****
पत्री सरकारचे जनक, महान स्वातंत्र्यसेनानी आणि बीडचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे इथल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना  डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसन सोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता हा सामना सुरु होईल. भारतीय हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत आज ब्रिटनसोबत लढत होणार आहे.
दरम्यान, काल या स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हिला २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. भारताच्या दीपिका कुमारीला तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तर नेमबाजीतही महिला एकेरीत भजन कौरचा पराभव झाला.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होत आहे. कोलंबो इथं दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत परवाचा पहिला सामना अनिर्णित राहिला होता.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करतांना शिक्षण आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य देऊन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला, तसंच २०२४-२५ या वर्षासाठी ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीही देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली.
दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी काल आढावा घेतला. घाटनांद्रा बंधाऱ्यावरील प्रकल्पाची पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी आणि जलसंधारणाचं काम पूर्ण करावे, असे निर्देश सत्तार यांनी यावेळी जलसंपदा विभागाला दिले.
****
परभणी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत चालू आर्थिक वर्षांत नागरिकांना विविध योजनासांठी ३४५ कोटी रुपयांच्या विकास कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील स्थानिक गरजा लक्षात घेत, लोकप्रतिनधींशी समन्वय साधून विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बनसोडे यांनी दिल्या.
****
लातूर पोलीस दलाच्या दामिनी पथकातर्फे तयार करण्यात आलेल्या 'इंस्पेक्टर दामिनी' या चित्रमय पुस्तकाचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकात छोट्या गोष्टी आणि चित्रांच्या माध्यमातून दामिनी पथक आणि ११२ या मदत क्रमांकाच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
****
राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा १५ ऑगस्टपासून जुन्या जालन्यातील गांधी चमन इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं समितीची राज्यव्यापी बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविड संसर्ग झालेले नवे पाच रुग्ण आढळले. यामध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. सध्या शहरात कोविडचे १६ सक्रीय रुग्ण आहेत, वयोवृद्ध नागरिकांनी तसंच रक्तदाब-मधुमेहाचा इतिहास असणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी आत्तापर्यंत पाच हजार दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या नांदूर-मधमेश्वर,दारणा धरणांमधून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ७५ टक्के भरलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात रात्री पावसाच्या तुरळक सरी बरसल्या मात्र, रात्री उशिरा हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पश्चिम घाट परिसर ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
सर्वोच्च न्यायालयाच्या लोक अदालतीमध्ये एक हजारांहून अधिक खटले निकाली
अन्य राज्यातल्या आयुर्वेदिक पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
आणि
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकारात नेमबाज मनू भाकरला पदकाची हुलकावणी
****
प���्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या ५६ हजार ८०० चौरस किलोमीटर पेक्षा जास्त परिसराला ‘पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या साठ दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मागवल्या असून नागरिक [email protected] या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात.
सहा राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, आदी कामांवर बंधनं येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटले निकाली निघाले आहेत. याअंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचं ७५ वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अखेरचा दिवस आहे.
****
जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं, त्या वेळी ते बोलत होते. देशात रसायनमुक्त, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या परिषदेत सुमारे ७५ देशांच्या एक हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन’ ही यावर्षीची परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
****
अन्य राज्यातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज वर्षा या निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित ८५ टक्के तसंच खाजगी विना अनुदानित ७० टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
राज्यातल्या सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, १६३ शासकीय तंत्र विद्यालयातील संविधान मंदिरांचं, येत्या १५ ऑगस्टला एकत्रित दूरदृश्य पद्धतीने उद्‌घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य कौशल्य विद्यापीठ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार समजण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. २६ जूनला संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता.
****
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्यावतीनं आज राष्ट्रीय अवयवदान दिन पाळण्यात आला. यानिमित्त राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुष महाविद्यालयामार्फत अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
मुंबईत विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागाद्वारे अवयवदात्यांचा गौरव करण्यात आला. अवयवदान मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन नार्वेकर यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीच्या वतीनं गेल्या जवळपास महिनाभर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व, भित्तीपत्रक, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. आज जनजागृती फेरीने या उपक्रमांचा समारोप झाला. जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांच्या उपस्थितीत निघालेली ही जनजागृती फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, पुन्हा घाटी रुग्णालयात विसर्जित झाली. अवयवदानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पथनाट्य, काव्यवाचन, घोषणा, वक्तृत्व, रांगोळी यासारख्या उपक्रमांमधून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली. तसंच सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.
****
नंदुरबार शहरातूनही आज अवयवदान दिनानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली. यात शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग होत अवयवदाना विषयी जनजागृती केली. यावेळी भित्तीपत्रक, रांगोळी यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं.
****
बीडचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे इथल्या निवासस्थानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारताची नेमबाज मनू भाकर हिला २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. भारताच्या दीपिका कुमारीने तिरंदाजीमध्ये महिला गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. नेमबाजीत महिला एकेरीत भजन कौरचा इंडोनेशियाच्या दयानंद कोइरुनिसाकडून पराभव झाला. बॉक्सिंगमध्ये, निशांत देव आज रात्री पुरुषांच्या ७१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिको विरुद्ध खेळणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करतांना शिक्षण आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य देऊन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला, तसंच २०२४-२५ या वर्षासाठी ७७३ कोटी ९० लाख र���पयांच्या खर्चाला मंजूरीही देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली.
दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत आढावा घेतला. घाटनांद्रा बंधाऱ्यावरील प्रकल्पाची पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी आणि जलसंधारणाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश सत्तार यांनी यावेळी जलसंपदा विभागाला दिले.
****
लातूर पोलीस दलाच्या दामिनी पथकातर्फे तयार करण्यात आलेल्या 'इंस्पेक्टर दामिनी' या चित्रमय पुस्तकाचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्यात चाकूर तालुक्यात जानवळ इथल्या जनार्धनराव राजेमाने आश्रमशाळेत झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब माने, प्राचार्य निलेश राजेमाने, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकात छोट्या गोष्टी आणि चित्रांच्या माध्यमातून दामिनी पथक आणि ११२ या मदत क्रमांकाच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींना अडचणीच्या वेळी दामिनी पथकाच्या माध्यमातून मदत घेण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक मुंडे यांनी यावेळी केलं.
****
राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा १५ ऑगस्टपासून जुन्या जालन्यातील गांधी चमन इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं समितीची राज्यव्यापी बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला ३० जिल्ह्याचे समन्वयक उपस्थित होते. ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावं, समाजातील विद्यार्थांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह उभारावं, सर्वांना मोफत शिक्षण द्यावं, पौरोहित्य करणाऱ्यांना प्रतिमहा पाच हजार रुपये मानधन द्यावं, आदी मागण्या समितीने केल्या आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी चार उमेदवार जाहीर
नांदेड जिल्ह्यातल्या दोन लाखाहून अधिक महिलांची शंभर टक्के मतदान करण्याची शपथ
आणि
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपत असून, सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल करत आहेत.
केरळ मधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी कलपेट्टा इथं एका रोड शोचं नेतृत्व केलं. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, के सी वेणुगोपाळ आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघात आज नऊ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख उपस्थित होते.
परभणी लोकसभा मतदरासंघात आज १८ उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले. यामध्ये स्वाभिमानी पक्षाचे किशोर ढगे यांचा समावेश आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षातले नेते यावेळी उपस्थित होते. पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत धोत्रे यांनी शक्तिप्रदर्शन करुन हा अर्ज दाखल केला.
वर्धा इथं भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
अमरावती इथं प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं.
यवतमाळ लोकसभा मतदरासंघात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख यांच्यासह चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या मतदारसंघात आतापर्यंत आठ अर्ज दाखल झाले आहेत.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात आज सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, पालघर - भारती कामडी, जळगाव - करण पवार आणि हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाविकास आघाडीतल्या जागावाटपानुसार आम्ही उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, मुंबईत उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष काँग्रेसने निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
दरम्यान, जळगावचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार पाटील यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
बळीराजा पक्षानेही आज सात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. लातूर लोकसभा मतदारसंघातून शंकर तडाखे, तर परभणीतून कैलास पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेक इथून संविधान लोखंडे, मावळ- संभाजी गुणाट, हातकणंगले - शिवाजीराव माने, तर सांगली इथून आनंदराव नालगे -पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी आज सांगली इथं दिली.
****
आगामी लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात आणि कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता पार पाडण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. आयोगानं आज राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कायदा अंमलबजावणी संस्थाची आढावा बैठक घेतली, त्यात हे निर्देश देण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, अनुचित प्रकारांना आळा घालणं तसंच आंतरराज्यीय सीमा आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर देखरेख याबद्दलचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
राज्यसभेच्या नवनिर्वाचित उमेदवारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी, केंद्रीय मंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे आणि मेधा कुलकर्णी यांना सदस्यत्वाची शपथ दिली. माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्यासह ५६ राज्यसभा सदस्यांनी या आठवड्यात आपला कार्यकाळ पूर्ण केला.
****
इयत्ता पहिली, दुसरी, सातवी, आठवी, दहावी आणि बारावीची ३३ लाख शालेय पाठ्यपुस्तकं देशभरातल्या पुस्तक विक्रेत्यांकडे पाठवल्याचं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं म्हटलं आहे. अन्य इयत्तांची पुस्तकं या महिन्यात उपलब्ध होतील, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं कारण नाही, असंही परिषदेनं म्हटलं आहे. बाजारात पुस्तकं उपलब्ध नसल्याच्या वृत्तांवर परिषदेनं आज हे स्पष्टीकरण दिलं.
****
नांदेड जिल्ह्यात वडेपूरी इथं आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत महिला बचत गटांसाठी मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. लोकशाही बळकटीकरणासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या मोहिमेअंतर्गत आज जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात सुमारे दोन लाखाहून अधिक महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्नीशमन दलानं सांगितलं. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. दुकानाला आग लागली तेव्हा हे सर्व वरच्या मजल्यावर झोपलेले होते, त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या हट्टा जवळील चिखली फाटा इथं कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. गयाबाई आणि शिवाजी भालेराव अशी मृतांची नावं असून, आज सकाळच्या सुमारास परभणीकडे जात असताना हा अपघात झाला.
****
धर्माबाद -मनमाड मराठवाडा एक्सप्रेस येत्या सात आणि दहा एप्रिल रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या दिवशी ही गाडी मनमाडला जाण्यासाठी धर्माबाद ऐवजी नांदेड इथून सुटेल. आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी एक एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान दादरपर्यंतच धावणार आहे. तसंच औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस नऊ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून वेळेवर सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसपंर्क कार्यालयानं दिली आहे. नांदेड ते एरोड विशेष गाडीला येत्या ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
थायलंड मधल्या फुकेत इथं सुरू असलेल्या जागतिक महिला भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या इंद्रायणी देवीनं ५९ किलो वजनी गटात आज कांस्य पदक पटकावलं. देवीनं एकूण १९६ किलो वजन उचललं. उत्तर कोरियाच्या कँग ह्यॉन ग्याँगला सुवर्ण आणि वॅलेंशियाच्या कँबी मिहेलाला रौप्य पदक मिळालं. राष्ट्रकूल स्पर्धेत इंद्रायणी देवीनं रौप्य पदक पटकावलं होतं.
****
नाशिक जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून, सात तालुक्यातल्या २०३ गावं आणि ४३६ वाड्यांना २१० टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तसंच टँकर आणि गावांसाठी जिल्ह्यातल्या ६७ खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातही भीषण पाणी टंचाई असून, नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 03 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची मोठी संधी - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा खासदार इम्तियाज जलिल यांचा आरोप
      आणि    
नांदेड जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
****
नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची एक मोठी संधी मिळाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बारामती इथं काल नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यापूर्वी नागपूर, लातूर आणि अहमदनगर इथं मेळावे झाले, बारामतीतला हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून, यातून २५ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी बारामतीचं बस स्थानक, बऱ्हाणपूरच्या पोलीस उप - मुख्यालय इमारतीसह बारामती तालुक्यातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारनं रोजगाराच्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रसंगी, सरकारच्या विविध उप्रकमांची माहिती दिली. पुढचा रोजगार मेळावा ठाणे इथं सहा आणि सात मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या वढु बुद्रुक इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या विकासकामाचं भूमिपूजन देखील काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
भारतीय जनता पक्षानं काल लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेश मधून ५१, मध्य प्रदेश २४, पश्चिम बंगाल २०, गुजरात आणि राजस्थान मधून प्रत्येकी १५, केरळ १२, आसाम, झारखंड आणि छत्तीसगड मधून प्रत्येकी ११, तेलंगणा नऊ, दिल्ली पाच, उत्तराखंड तीन, जम्मू कश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधून प्रत्येकी दोन, तर गोवा, त्रिपुरा, अंदमान निकोबार, आणि दमन दिव मधून प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोटा मतदारसंघातून, अमित शहा गांधीनगरमधून, राजनाथ सिंग लखनऊ, स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत.
****
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठवणार असल्याची माहिती, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यभरातले भाजपाचे ३३ हजाराहून अधिक कार्यकर्ते सूचनापत्राची पेटी घेऊन घरोघरी जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. येत्या चार तारखेला नागपूर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाच तारखेला अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यक्रमात सहभागी होतील असं बावनकुळे म्हणाले.
****
नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यंदा पहिल्यांदा मतदान करणारे छत्रपती संभाजीनगर इथले साक्षी वैद्य आणि कैवल्य जोशी यांनी मतदान करणार असल्याचा संकल्प केला,
****
देशातल्या तेहतीस साखर कारखान्यांच्या, एक हजार ३७८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी करण्याला मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे ६१९ कोटी रुपयांचं अतिरिक्त व्याज पुर्णपणे माफ होणार आहे. या एकूण थकीत कर्जामध्ये महाराष्ट्रातल्या कारखान्यांचं जवळपास ८६१ कोटी रुपये कर्ज थकीत होतं.
****
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यासाठी, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, राज्यात सर्वच शैक्षणिक संस्थांनी येत्या जूनपासून करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आनंदशाळा, या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यासोबतचं मुलींना येत्या १ जूनपासून सर्व शिक्षणाचा लाभ मोफत मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सहकार विभागानं राज्यातल्या सुमारे ३८ हजाराहून अधिक सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण ��रण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत, सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याकरीता ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्र, नांदेड जिल्ह्यात दोन हजार ७६७, लातूर शहरात २१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरती पथकं, तर जालना इथं एक हजार ५२१ बुथ तसंच १०९ फिरत्या पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप, खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक वसाहतीत विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझ च्या अंतर्गत एका बड्या कंपनीनं २००७ मध्ये २३२ एकर भुखंड संपादित केला होता. त्यावर मोठा प्रकल्प उभारण्यात येणार होता मात्र आता या भूखंडाची परस्पर विक्री होत असल्याचं खासदार जलिल यांनी सांगितलं. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांनी, औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या दहेली तांडा नजिक का��, दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त तिघे जण, आपला बारावीच्या परीक्षेचा पेपर देवून माहूर तालुक्याच्या अंजनखेड इथून एकाच दुचाकीवरुन वापस येत होते. दुपारच्या सुमारास दुचाकी दहेली तांडा गावाजवळ आली असता, एका वळण रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटून, ती झाडावर आदळली. गावातल्या प्राथमिक उपचार केंद्रात उपचारानंतर त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र यावेळी दोघांना मृत घोषित करण्यात आलं.
****
शेतकऱ्यांच्या हिताच्या केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देत, शेती समृद्ध करण्याचं आवाहन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना इथं कृषी विभागातर्फे आयोजित 'गोद��� समृध्दी जालना कृषी महोत्सवाला' काल दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवातल्या विविध कृषी विषयक दालनांना भेट देउन, त्यांनी शेतक-यांसोबत चर्चाही केली.
****
लातूर जिल्ह्यात पाणी पुरवठ्याचं सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या, मांजरा प्रकल्पातला पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असल्यानं, शहरी भागात पाणीपुरवठ्यासाठी इतर पर्यायी उपाययोजना सज्ज ठेवाव्यात तसंच कोणत्याही गावाला पाणी टंचाई सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री बनसोडे यांनी संबंधितांना दिले आहेत.
****
छत्रपती संभाजी नगर इथं जीवन विकास ग्रंथालयाच्या ५१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात काल लेखक माणिक पुरी यांच्या "पक्षी येती अंगणी" या कादंबरीवर परिसंवाद घेण्यात आला. पक्षी नसतील तर माणूसही संपुष्टात येईल, या सलीम अली यांच्या वाक्यानं आपल्याला अंतर्मुख केल्याचं, पुरी यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी पक्षी निरीक्षणाच्या बहुआयामी लेखन प्रवासाबद्दल आपला मनोगत व्यक्त केलं.
****
हिंगोली शहरात जलेश्वर तलाव परिसरातलं अतिक्रमण काल काढण्यात आलं. या तलाव परिसराचं आता सौंदर्यीकरणं करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना २९ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावण्यात आला होत्या, त्यानुसार ही कारवाई झाली.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 09 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
अर्थव्यवस्थेवरची श्वेतपत्रिका संसदेत सादर;विरोधकांकडून काळीपत्रिका जाहीर
राज्यभरातल्या सर्व प्राथमिक शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश
छत्रपती संभाजीनगर इथं दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू
आणि
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळण्याची आवश्यकता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून व्यक्त
****
केंद्र सरकारनं काल संसदेत भारतीय अर्थव्यवस्थेवरची श्वेतपत्रिका सादर केली. योग्य धोरणं, खरे हेतू आणि योग्य निर्णय घेऊन सरकारने आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या माध्यमातून, २०१४ पूर्वीच्या काळातल्या प्रत्येक आव्हानावर मात केली असल्याचं यात म्हटलं आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झालं, त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत होती. आर्थिक गैर व्यवस्थापन, बेशिस्त आणि मोठ्या प्रमाणातल्या भ्रष्टाचारामुळे अर्थव्यवस्थेची ही दुरावस्था होती, असं यात म्हटलं आहे. विद्यमान सरकारने देशाला शाश्वत उच्च विकासाच्या दृढ मार्गावर नेल्याचं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही सभागृहात मांडलेल्या या श्वेतपत्रिकेवर, दोन्ही सभागृहात आज चर्चा होणार आहे.
****
दरम्यान, काँग्रेसनं काल नवी दिल्लीत सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली. सध्याचं सरकार देशातल्या बेरोजगारीसारख्या मुख्य मुद्द्यांवर बोलत नसल्याचा आरोप, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. केरळ, कर्नाटक, तेलंगणा या बिगर भाजप राज्यांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोपही खरगे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसनं सरकार विरोधात काढलेल्या या काळ्या पत्रिकेविरोधात कठोर टीका केली. काल राज्यसभेत बोलताना त्यांनी, आपलं सरकार देशाच्या विकासासाठी काम करत असून, त्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या ६८ सदस्यांना काल निरोप देण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाला आणि सदनाला त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन चिरस्मरणीय असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल आर्थिक वर्ष २०२३-२४ मधला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण आढाव्यात रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आदेश लागू होतील. दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांच्या प्राथमिक विभागाचे वर्ग दुसऱ्या सत्रात भरतील, अशी सूचना यात केली आहे. ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना वेळेत बदल शक्य नाही, त्या प्रकरणी शिक्षणाधिकारी किंवा प्राथमिक शिक्षण निरीक्षकांनी प्रत्येक शाळेनुसार निर्णय द्यावा, असे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं दिले आहेत.
****
नाशिक इथं चौतिसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसंच सायबर सुरक्षीत राज्य तयार करण्यासाठी ८३७ कोटी रूपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या स्पर्धेत राज्यभरातून साडेतीन हजार पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं आवाहन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथल्या काटोल दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारच्या वतीनं कापूस खरेदी केंद्र वा��वण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात, किमान समान कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं काल आपले मुद्दे जाहीर केले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, बियाणे, खतं, कीटकनाशकं, पाणी, वीज आणि डिझेल यांची दरवाढ नियंत्रणात आणावी, एकाधिकार कापूस खरेदी योजना पुन्हा कार्यान्वित करावी, या प्रमुख मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.
****
राज्यात अनेक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, ठिकठिकाणी नागरीकांचा या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
नांदेड शहरात काल ही यात्रा गाडीपुरा आणि वजिराबाद भागात पहोचली. यावेळी महापालिकेच्या अधिकार्यांनी नागरीकांना विविध योजनांची माहिती दिली. आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत श्वेता राठोड यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
यावेळी नांदेड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अब्दुल राफे यांनी या यात्रेदरम्यान आरोग्य विभागाकडून देत असलेल्या योजनांची माहिती दिली:
‘‘मैं डॉ. अब्दुल राफे, मेडीकल ऑफीसर नांदेड महानगरपालिका, हम अलग अलग एरियों मे जाकर आरोग्य कॅम्प रख रहे हैं. जिसमे बीपी, शुगर और हार्ट सभी टाईप के पेशंट की तपासनी करके उनको मेडीसिन दिया जा रहा है और इसमे हमें बहोत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है, सभी टाईप के लाभार्थी यहां आकर ऊस चिज़ का फायदा उठा रहे हैं.’’
****
मुंबईतील दहिसर विभागातले शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला. घोसाळकर यांचा मित्र मॉरिस नरोन्हा यानेच काल संध्याकाळच्या सुमारास घोसाळकर यांच्यासोबतची चर्चा सामाजिक संपर्क माध्यमांवर लाईव्ह प्रसारित केल्यानंतर त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वतःवर ही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. हा हल्ला पैशाच्या वादातून आणि वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात बीड वळण रस्त्यावर हायवाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण, प्रदीप आणि प्रतिक्षा अंभोरे अशी त्यांची नावे असून, ते परभणी जिल्ह्यातले रहिवासी होते. अपघातानंतर हायवा चालक फरार झाला.
गंगापूर - वैजापूर रस्त्यावर मांजरी फाट्यावर झालेल्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातले शेतमजुर दशरथ रंधावे हे आपली दोन मुलं आणि पत्नीला दुचाकीवरुन घेऊन जात असताता, त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात अनुक्रमे तीन आणि एक वर्षीय बालकांसह दशरथ रंधावे यांचा मृत्यू झाला.
****
बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचं नुकसान होत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळणं आवश्यक असल्याचं, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. लातूर इथं काल जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भविष्यात बांबूला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी केलं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात कृषी आणि गृहपयोगी वस्तूंचे १७७ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या बाभळगाव इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जलपुनर्भरण कार्यक्रमाचं उद्घाटन काल कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर यांच्या हस्ते झालं. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलपुनर्भरण ही काळाची गरज असून, जल आत्मनिर्भरगाव करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्यावतीनं डॉ. रखमाबाई राऊत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार इचलकरंजी इथले डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश पवार यांना जाहीर झाला आहे. मंडळाच्या संचालकांनी काल जालना इथं ही माहिती दिली. देवदासींच्या प्रथा उत्थानासाठी समर्पित सेवा केलेले डॉ.भीमराव गस्ती पुरस्कार मुंबईच्या पत्रकार योगिता श्रीराम साळवी यांना जाहीर झाला आहे. जालना इथं येत्या शनिवारी सेवा भारतीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री विजय पुराणिक, यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. रोख २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि स्मृतीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या 'सम्राट अशोक अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची काल सांगता झाली. या परिषदेत काल सकाळी भिक्खू प्राचार्य डॉ. खेमोधम्मो, भदंत पैय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघाच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ संध्या रंगारी यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान झालं.
****
राज्य कृषी विभागानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. यासंबंधी दोन हजार चारशे ५३ दावे निकाली काढण्यात आले होते. राज्यात सात एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीतल्या ७७ दाव्यांसांठी, एक कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या कुणबी नोंदी धारकांच्या वारसांना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. यासाठी वंशावळी जुळवण्याकरता तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२४ सायं��ाळी ६.१०
****
यूपीए सरकारच्या काळात देशाच्या बिकट आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकणारी श्वेतपत्रिका लोकसभेत सादर
भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम
शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
आणि
लातूर इथं जिल्हा कृषी महोत्सवाला सुरुवात
****
यूपीए सरकारच्या काळात देशाच्या बिकट आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकणारी श्वेतपत्रिका सरकारने आज लोकसभेत सादर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही श्वेतपत्रिका सादर केली. उद्या या श्वेतपत्रिकेवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसनं नवी दिल्लीत सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली असून, सध्याचं सरकार देशातल्या बेरोजगारीसारख्या मुख्य मुद्द्यांवर बोलत नसल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. तसंच केरळ, कर्नाटक, तेलंगणा या बिगर भाजपशासित राज्यांशी केंद्राकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसनं सरकार विरोधात काढलेल्या ब्लॅक पेपर विरोधात कठोर टीका केली. आपलं सरकार देशाच्या विकासासाठी काम करत असून, त्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला.
राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या ६८ सदस्यांचा निरोप समारंभ आज झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा गौरव केला. देशाला आणि सदनाला त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन चिरस्मरणीय आहे, असं ते म्हणाले.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वर्ष २०२३-२४ मधला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण आढाव्यात रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल केलेला नाही, असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. बँकेनं आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ सात टक्के राहाण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर किरकोळ महागाईचा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के राहील, असा अंदाज आहे. जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असूनही भारतीय अर्थव्यवस्थेनं उत्तम कामगिरी केल्याचं दास यांनी सांगितलं.
****
एआय फॉर महाराष्ट्र या योजनेअंतर्गत, राज्य सरकार आणि गुगलमध्ये आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामजंस्य करार करण्यात आला. यात कृषी, आरोग्य, कौशल्य, स्टार्ट अप, शाश्वतता यासंह विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्यात येणार असून, हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं आवाहन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केलं आहे. नागपूर इथल्या काटोल दौऱ्यादरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. व्यापारी हमीभावापेक्षा कमी किंमतीनं कापूस खरेदी करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घाई न करता हमीभावापेक्षा कमी किंमतीला कापूस विकू नये, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध होण्यासाठी सोलार फिडर योजना सुरु करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराची रक्कम ७५ हजार वरुन तीन लाख करण्यात आली आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, उद्यान पंडित या पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी ५० हजार वरून दोन लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
****
राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा कारभार गतिमान करण्यासाठी १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती करण्यात आली असल्याचं, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. या पदभरतीसाठी एक कोटी २७ लाख ५८ हजार इतक्या खर्चास देखील मंत्रीमंडळाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या मनुष्यबळाच्या परिपूर्ततेनंतर लवकरच आयोगाचं प्रशासकीय कामकाज गतिमान पद्धतीने पूर्ण होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
विधानसभा सदस्य बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती समाजमाध्यमावर दिली आहे. ४८ वर्षांपूर्वी तरुण वयात त्यांनी काँग्रेस पक्षात सहभाग घेतला होता, हा प्रवास महत्त्वाचा असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे.
****
बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचं नुकसान होत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळणं आवश्यक असल्याचं, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. लातूर इथं आज जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भविष्यात बांबूला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी केलं. १० तारखेपर्यंत सुर राहणाऱ्या या कृषी महोत्सवात कृषी आणि गृहपयोगी वस्तूंचे १७७ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
****
राज्यात अनेक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, ठिकठिकाणी नागरीकांचा या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
नांदेड शहरात आज ही यात्रा गाडीपुरा आणि वजिराबाद भागात पोहोचली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली. आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी अर्ज यावेळी भरून घेण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा नगर परिषद क्षेत्रात आज विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. याव��ळी विविध योजनांची माहिती देण्यात आली.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत सोलापूर इथले अंबादास बल्ला आणि इमरान शेख यांनी या यात्रेच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
बाईट - अंबादास बल्ला आणि इमरान शेख, जि.सोलापूर
****
राज्य कृषी विभागानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. यासंबंधी दोन हजार चारशे ५३ दावे निकाली काढण्यात आले होते. राज्यात सात एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीतल्या ७७ दाव्यांसांठी, एक कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे.
****
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं डॉ. रखमाबाई राऊत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार इचलकरंजी इथले डॉ.हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश पवार यांना जाहीर झाला आहे. मंडळाच्या संचालकांनी आज जालना इथं ही माहिती दिली. देवदासींच्या प्रथा उत्थानासाठी समर्पित सेवा केलेले डॉ.भीमराव गस्ती पुरस्कार मुंबईच्या पत्रकार योगिता श्रीराम साळवी यांना जाहीर झाला आहे. जालना इथं येत्या शनिवारी सेवा भारतीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री विजय पुराणिक, यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि स्मृतीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
नाशिक ते पुणे औद्योगिक महामार्ग जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने मान्यता दिली आहे. नाशिक ते पुणे औद्योगिक द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जून २०२३ मध्ये घेतला होता, त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, सल्लागार संस्थेने हा अहवाल नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 08 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यात गेल्या दहा - पंधरा दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यासंदर्भात विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजही नाकारला, मात्र वडेट्टीवार यांना निवेदन देण्यास सांगितलं. राज्यात जवळपास सहा लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असून, पंचनाम्यासंदर्भात सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. कांदा निर्यातीवरची बंदी उठवण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केली. यानंतर अध्यक्षांनी पुढचं कामकाज सुरु केल्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत तत्काळ चर्चा करण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली.
हा विषय गंभीर आणि महत्वपूर्ण असून, यासंदर्भात सभागृहात चर्चा कधी होईल हे कळवण्यात येईल, असं अध्यक्षांनी सांगितलं.
****
राज्यात ज्यांची वीज जोडणी थकाबकिपोटी कायमस्वरुपी खंडित केली आहे, त्यांना पुन्हा जोडणी देण्यासाठी नवी सोपी योजना आणली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मीटर रीडिंग न घेताच परस्पर बिले देण्याचा प्रकार जिथे झाला आहे त्यांना विशेष मोहीम राबवून नव्याने सुधारित बिले दिली जातील अशी माहिती त्यांनी दिली. सदस्य विनोद निकोले, राजेश टोपे, सुनील भुसारा आदींनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.
****
राज्य सरकार एक नवीन एव्हिएशन अर्थात उड्डयन धोरण आणणार असून यामध्ये विमानतळाप्रमाणेच हेलीपोर्ट तयार करण्याची सुद्धा तरतूद असेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर इथं आज एअरबस एमआरओ फॅसिलिटी चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पर्यटन क्षेत्रात आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये उड्डयन क्षेत्राचा फार मोठा सहभाग असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेऊ नये या आशयाचं देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, नवाब मलिक यांची भुमिका जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीनं व्याज दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत २०२३-२४ या आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के कायम ठेवण्यात आला आहे. देशांतर्गत मागणी चांगली असल्यानं अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे. महागाईही कमी होण्याची चिन्ह दिसत असल्यानं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. रेपोदरात वाढ न केल्यामुळं गृहकर्जदारांना दिलासा मिळाला असल्याचं दास यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वास्तविक एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपी वाढीचा अंदाज सात टक्के असल्याचं देखील ते म्हणाले.
****
केंद्र शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ पद्धतीने संवाद साधणार आहेत. देशातल्या नागरिकांनी विकसित भारत दूत व्हावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. केंद्र सरकारची विविध विकासकामं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या दूतांना मिळेल. नमो ॲपवर १०० दिवसांचं आव्हान पूर्ण करण्याचा संकल्प करून यात सहभागी होता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा ४१वा वर्धापन दिन आज साजरा ���ोत आहे. यानिमित्त आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी क्रांती चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शक ठेवण्यात येणार असल्यामुळे राज्यात औषधाचा तुटवडा भासणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
****
केरळ इथल्या सबरीमला जत्रेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून केरळमधल्या कोट्टयम करता विशेष गाड्या चालवणार आहे. कोट्टयम - सिकंदराबाद विशेष ‌गाडी दहा तारखेला, आदिलाबाद - कोट्टयम विशेष गाडी २५ डिसेंबर आणि एक जानेवारीला, तर कोट्टयम - सिकंदराबाद विशेष गाडी २७ डिसेंबर आणि तीन जानेवारीला सुटणार आहे.
****
मलेशियामध्ये सुरु असलेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल भारताला स्पेन कडून चार - एक असा पराभव पत्करावा लागला. भारताचा शेवटचा साखळी सामना उद्या कॅनडा सोबत होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 17 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १७ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
संरक्षण खात्यामध्ये भारतीयकरणासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे, आत्मनिर्भर भारत या राष्ट्रीय कार्यक्रमाची पूर्तता होण्यास मदत झाली असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तेलंगणात दिंडिगड इथल्या वायूसेवा अकदामीतल्या अधिकार्यांसह, नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना, राष्ट्रपतींच्या हस्ते आज पदकं प्रदान करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी वायुदलाच्या कर्मचार्यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवावा, असं त्यांनी सांगितलं. वायूदलानं त्यांचं गौरवाने आकाशाला स्पर्श करा, हे त्यांचं ब्रिदवाक्य आत्मसात करावं आणि देशाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, असं राष्ट्रपती म्हणाल्या. 
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नवी दिल्लीत चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण केलं. राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२ अंतर्गत ११ श्रेणींत एकूण ४१ पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
मध्यप्रदेशला सर्वोत्तम राज्य श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कारानं गौरवण्यात आलं, तर सर्वोत्तम जिल्ह्याचा पुराकार ओडीशातल्या गंजम जिल्ह्याला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार तेलंगणा जिल्ह्यातल्या जगन्नाथपुरम ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठी या पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं
****
जी-20 परिषदेअंतर्गत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपुर्णा देवी यांच्या हस्ते आज झालं. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या सत्रांमुळे शिक्षणासाठी प्रगतीशील मार्ग तयार करण्यात मदत होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १८ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे दोनावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्यावर सर्व जिल्ह्यांनी भर देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले आहेत. राज्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, या कार्यक्रमांच्या जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा सौनिक यांनी काल दूरदृश्य प्रणाली��्या माध्यमातून घेतला, त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छ भारत मिशनमध्ये महिलांचा आणि स्वयंसहायता गटांचा सहभाग घेऊन गाव  उघड्यावर शौचापासून मुक्त करुन, स्वच्छ महाराष्ट्राचं उद्दिष्ट साध्य करावं, असं ते म्हणाले.
****
देशभरातल्या सर्व राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणासाठी एकच संकेतस्थळ निर्माण करण्याची गरज, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक,  केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या एकत्रित आंतरराज्यीय संकेतस्थळाचं उद्घाटन काल न्यायमूर्ती ओक यांच्या हस्ते काल मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रशासकीय न्यायाधिकरणांनी आता अधिक आधुनिक होण्याची गरज असून, न्यायाधिकरणांच्या कार्यालयांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजे, असं ते म्हणाले.
****
आषाढी वारीसाठी पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण आज घुमरे पारगाव या ठिकाणी पार पडणार आहे. काल या पालखीचं हाटकरवाडी इथं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सोबतच विना बैलाच्या बैलगाडीतून सोहळ्याचे मानकरी नाथवंशज यांना बसवून अवघड गारमाथा घाट हजारो वारकरी भाविक भक्ताच्या उपस्थितीत पार करण्यात आला.
****
बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूची साथ पसरली आहे. चिखली तालुक्यातल्या भानखेड गावात डेंग्यूनं तीन जणांचा मृत्यू झाला असून, यात दोन मुलं आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. आरोग्य यंत्रणेनं डेंग्यूच्या साथीला आळा घालण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांचं पथक तयार केलं असून, त्यामाध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
****
बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता पुढच्या सहा तासांमध्ये कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हे चक्रीवादळ दक्षिण राजस्थानच्या दिशेनं सरकत असल्याचं, भारतीय हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितलं. त्यामुळे राजस्थानमधल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.
****
येत्या आठवडाभरात नैऋत्य मौसमी पाऊस मुंबई आणि कोकणाच्या उर्वरित भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ११ जून रोजी मान्सूननं कोकणात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळानं त्याचा प्रवास मंदावला आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत हा पाऊस संपूर्ण राज्यात दाखल होईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.  
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 14 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १४ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 14 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १४ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचं २०१९-२० मध्ये प्रथम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. मात्र २०१९-२० या वर्षात कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये बंद होती, परिणामी अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याने त्यांना पाचव्या वेळेस परीक्षेची संधी द्यावी, अशी भूमिका केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केंद्रीय वैद्यकीय आयोगापुढे मांडली. डॉ पवार यांच्या भूमिकेला मान्यता देत या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ही या निर्णयाला मान्यता दिली आहे.
***
गेल्या ९ वर्षांत, परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार करणारा देश म्हणून भारताला जागतिक स्तरावर पसंती लाभली आहे, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील एम्स कल्याणी इथे नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या ४२व्या वार्षिक परिषदेत, ते बोलत होते. कोणत्याही प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी पुर्वी भारत ओळखला जात नव्हता मात्र आज जगातील महत्त्वाचं प्रमुख लसीकरण केंद्र म्हणून भारताचं नाव झालं आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी, वैद्यकीय संघटनांनी सरकारी संस्थांचं सहकार्य घ्यावं अशी सूचना जितेंद्र सिंह यांनी यावेळी केली.
***
समाज माध्यमावरील आक्षेपार्ह मजकुरावरून अकोला शहरात काल रात्री दोन गटात वाद होऊन तणाव निर्माण झाला. संतप्त झालेल्या एका गटाने तोडफोड आणि दगडफेक सुरू केली, दोन्ही जमाव परस्परांवर चालून गेल्याने धावपळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घडामोडीत काही दुचाकींचं नुकसान झालं, तर समाजकंटकांनी एक घर पेटवून दिलं. अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराच्या कांड्या फोडाव्या लागल्या.
दरम्यान, अमरावती परिक्षेत्राचे आयुक्त शेरशिंग दोरजे यांनी अकोल्यात दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. सामाजिक माध्यमांवर पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन गृहमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
***
केरळ इथं ऑपरेशन समुद्रगुप्त या मोहिमेअंतर्गत नौसेनेनं काल एका जहाजातून जवळपास अडीच हजार किलो अंमली पदार्थ जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अंमली पदार्थाचं मूल्य १५ हजार कोटी रुपये इतकं आहे. देशात आजवर झाल��ली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एका विशेष छापेमारी अभियानाअंतर्गत, काल अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या चार जणांना अटक केली. या चौघांकडून साडे सहाशे ग्राम हेरॉईन आणि सव्वा किलोहून अधिक प्रमाणात भांग जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अंमली पदार्थांची किंमत तीन कोटी रुपयांहून अधिक आहे.
***
देशभरात गेल्या २४ तासात कोरोना विषाणू संसर्ग झालेले एक हजार ७२ नवे रुग्ण आढळले असून २ हजार २५२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या देशात १५ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचा देशातला दर ९८ पूर्णांक ७८ दशांश टक्के आहे.
***
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ट्विट संदेशातून अभिवादन केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. टीव्ही सेंटर परिसरात असलेल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून नागरिकांची गर्दी झाली आहे. या निमित्तानं शहराच्या महत्त्वाच्या मार्गावरून वाहन फेरी देखिल काढण्यात आली.
//***********//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन, हिंगोलीसह राज्यात सात ठिकाणी सुरू होणार एफ एम सेवा
धर्मादाय रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे निर्देश
येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
भारतीय किसान सभेच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य, शेतकऱ्यांची नियोजित मोर्चा स्थगित
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान
मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट, वीज पडण्याच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाची चेन्नई सुपर किंग्जवर ३२ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
देशात रेडिओ संपर्क व्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. १८ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या ८४ जिल्ह्यांमध्ये, हे शंभर वॅटचे ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत. यामध्ये आकांक्षी जिल्हे आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजरात, केरळ, छत्तीसगड, नागालँड इत्यादी राज्यांचा समावेश आहे. या अंतर्गत राज्यात हिंगोली, सटाणा, नंदुरबार, वाशिम, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या सात ठिकाणी, एफ एम सेवा सुरू होणार आहे. आकाशवाणीच्या एफ एम सेवेच्या विस्तारामुळे अतिरिक्त दोन कोटी लोकांना संपर्क व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
****
नागपूरमध्ये राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नव्यानं उभारण्यात आलेल्या या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये संशोधन केंद्रंही असल्यानं देशाला कर्करोगमुक्त बनवण्याचं स्वप्न ही संस्था पूर्ण करेल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले…
Byte…
टाटा कॅन्सर के सिवाय कोई पर्याय नही था। और मुंबई मे इस प्रकार की सेवा, वहां रहना काफी मुश्किलें होती थी। पर मुंबई मे जो टाटा कॅन्सर का जो स्टँडर्ड था, जो इक्विपमेंट थे, डॉक्टर्स थे, उसी स्तर का ये नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूट तयार हुआ है। और मुझे इस बात की खुशी है, की ये स्टेट ऑफ आर्ट ऐसा बना है की इसकी हर चीज केवल देश मे ही नही तो वर्ल्ड स्टँडर्ड का ये इन्सिट्यूट बना है। और इसलिये ऐसा संकट जिनके उपर आता है, उनको .फिर से जीवन मे जीने की उम्मीद देना, उनका आत्मविश्वास बढाना, उनकी सेवा करना, उनको वैद्यकीय उपचार रिजनेबल रेट मे उपलब्ध कराके देना ये बहोत ही आवश्यक काम है।
हवामान बदल, जीवनशैलीतील बदल यामुळे कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कर्क रोगावर उपचार करणाऱ्या अशा विशेष रुग्णालयांची गरज असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भविष्यात परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सर्वांना उपलब्ध करून देणं हे आव्हान असून, शासन यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या वतीनं या राष्ट्रीय कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आ��े. या संस्थेत रुग्णांच्या नातेवाईकांच्या नि:शुल्क निवासासाठी धर्मशाळा उभारण्यात येणार असून, एक संशोधन केंद्र देखील उभारण्याचा मानस असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
****
धर्मादाय रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या दरात उपचार मिळणं आवश्यक आहे. यादृष्टीनं सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. मुंबईत काल या रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागानं धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के उपलब्ध खाटांची माहिती देणारं, सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असं ॲप प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदारानं दिलेला उत्पन्नाचा दाखला, या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त, अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशी सूचनाही सावंत यांनी केली.
****
येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी ��ागणी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते, त्यासंदर्भात पुराव्यांनिशी तपशीलवार अंतरिम अहवाल राज्यानं २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तेव्हापासून सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्वसंबंधित विभागांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यास मान्यता दिली असून, फक्त केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब करणं बाकी असल्याकडेही अजित पवार यांनी या पत्राद्वारे लक्ष वेधलं.
****
रायगड जिल्ह्यात खारघर इथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण वेळी, उष्माघाताच्या त्रासामुळे झालेल्या १४ जणांचा मृत्यू प्रकरणी, संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास, मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. विरारच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या इतर दहा जणांविरुद्ध या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी, या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या आठ जूनला सुनावणी होणार आहे.
****
सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांसाठी सात हजार मेगावॅट वीज निर्मितीमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असं महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते काल वार्ताहरांशी बोलत बोलत होते. राज्य सरकारनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत ‘मिशन २०२५’ ला सुरुवात झाली आहे. सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालवण्याचं या अभियानाचं उद्दीष्ट असल्याचं पाठक यांनी सांगितलं. राज्यात ४५ लाख कृषी पंपधारक शेतकरी आहेत आणि त्या सर्वांसाठी आगामी काळात हे अभियान महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग परवा रविवारी प्रसारीत होणार असून, प्रेरणा आणि माहिती देणारा हा कार्यक्रम सर्वांनी ऐकावा, असं आवाहन, अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. 'मन की बात' कार्यक्रमाचा शंभरावा भाग विशेष असल्यामुळे सर्वांना तो ऐकता यावा, यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय, अंगणवाडी तसंच जिथे जिथे शक्य आहे तिथे कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
भारतीय किसान सभेच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजित मोर्चा स्थगित केल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. ते काल अहमदनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी, दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात अकोला ते लोणी दरम्यान, लाँग मार्च काढला होता. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलडाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमधले शेतकरी, या मोर्चात सहभागी झाले होते. किसान सभेनं केलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी काल संगमनेर इथल्या बैठकीत चर्चा झाल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठीच्या निवडणुकीचं आज आणि परवा ३० तारखेला मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड तसंच लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज तर पैठण, गंगापूर आणि फुलंब्री बाजार समित्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. जालना जिह्यातल्या परतूर आणि घनसावंगी बाजार समितीसाठी आज, तर अंबड, आष्टी आणि मंठा बाजार समितीसाठी ३० तारखेला मतदान होणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या नऊ पैकी कडा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज आणि वडवणी या बाजार समित्यांसाठी आज, तर माजलगाव आणि पाटोदा या बाजार समित्यांसाठी परवा ३० तारखेला मतदान होणार आहे.
****
`प्रधानमंत्री स्वनिधी` योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल या संबंधी महोत्सवा अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महापालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही कराड यांनी दिली. ते म्हणाले,
Byte…
या जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका आहेत. ही योजना जशी महानगरपालिकेला आहे तशी नगरपालिकेला सुद्धा आहे. म्हणून कन्नड असेल, वैजापूर असेल, गंगापूर असेल, सिल्लोड असेल, खुलताबाद असेल याठिकाणी सुद्धा ही योजना चालू आहेच. पण त्याचं रिव्ह्यू मिटींग आपण लवकरात लवकर घेऊ. म्हणून जिल्हा परिषदेचे असिस्टंट सीईओ जिल्हा परिषदेमार्फत मी त्यांना सूचना करतो की लवकरात लवकर तुम्ही आढावा घ्या. आणि एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी कन्नड किंवा वैजापूर असा मेळावा ठेवा. आणि त्यात एसबीआय बँक असेल सर्व बँक असेल सर्व सहकार्य करतील.
****
मराठवाड्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह वीज पडण्याच्या घटनांमध्ये विभागात काल पाच जणांचा मृत्यू झाला. 
हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश गावांत काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान कळमनुरी, वरूड, जवळाब���जार, वाकोडी, रामेश्वरतांडा, डिग्रस कऱ्हाळे, कनेरगाव नाका, सवना, कडोळी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हळद काढणी आणि वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव शहरात काल अवकाळी पाऊस पडला. सिल्लोड तालूक्यातील घटांब्री आणि आमसरी इथं दुपारी दोनच्या सुमारास गारपीटीसह पाऊस पडला.
जालना जिल्ह्यातही विरेगाव, रामनगर परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. निलंगा तालुक्यातल्या मुबारकपूर इथं आरुषी राठोड या १३ वर्षीय मुलीचा, तर तगरखेडा इथं राजाप्पा कल्याणे हा शेतकर्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यातही काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. माहूर तालुक्यात सातघरी इथं घराच्या पत्र्यावर ठेवलेला दगड अंगावर पडल्यानं सोनुबाई पवार या महिलेचा मृत्यू झाला. मालटेकडी परिसरातल्या कामठा इथं वीज पडून शेख वजीर शेख चांद यांचा मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यात पांगरी तालुक्यातही एका मुलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
दरम्यान, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दहा हजार आठ शेतकऱ्यांच्या पाच हजार ४८७ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात गारपीटीचा फटका बसला असून, गहू पिकासह मोसंबी, आंबा या फळपिकांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, आजही मराठवाड्यासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं चेन्नई सुपर किंग्जवर ३२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानच्या संघाने २० षटकात २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला चेन्नईचा संघ १७० धावातच सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच राजस्थानचा संघ पदक तालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
****
पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा घडवणाऱ्या भारत गौरव रेल्वेला, आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पुणे इथं हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उदात्त पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशानं, ही योजना सुरू करण्यात आली आहे.
****
मुंबई इथल्या `आफ्टरनून व्हॉईस`च्या १५ वा `न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड` २०२३ मधला 'सर्वोत्कृष्ट कार्यशील राजकारणी'चा पुरस्कार, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना जाहीर झाला आहे. जलील यांची संसदेतली भाषणं हा लोकांचा आवाज असल्यानं, त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं, या संदर्भातली घोषणा करताना संयोजक डॉ. वैदेही तमन यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनी - येत्या एक मे रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जलील यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 
****
कोविड -१९ लसीकरणा अंतर्गत इन्कोव्हॅक ही नाकवाटे घ्यावयाची लस छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चिकलठाणा इथल्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. ही लस फक्त ६० वर्षांवरील नागरिकांच्या वर्धक मात्रेसाठीच वापरण्यात येणार असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
डिजिटायझेशन आणि ऑनलाइन सेवा वितरणामुळे नागरी प्रशासनातील पारदर्शकतेत वाढ - राष्ट्रपतींचं प्रतिपादन.
राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला.
आणि
हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी.
****
डिजिटायझेशन आणि ऑनलाइन सेवा वितरणामुळे नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. भारतीय नागरी लेखा सेवेतील २०१८ च्या तुकडीच्या अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रशासन प्रणालींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासनाचा साचाच बदलला आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती कोणत्याही विभागात झाली तरी, आपल्या कामाच्या मूळ उद्देशाची जाणीव ठेवून, जनतेचे कल्याण आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या उद्देशाने काम करावं, असा सल्ला राष्ट्रपतींनी भावी अधिकाऱ्यांना दिला.
****
राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज केरळमधल्या तिरुवनंतपुरम स्थानकातून वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर बोलत होते. वंदे भारत रेल्वे गाड्या पर्यावरणपूरक असून, देशभरात अशा चारशे गाड्या सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेचं जाळं देशभरात पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्याचं काम सुरु आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. केरळ मधल्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं. माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं. या प्रकल्पाचं सर्वेक्षण थांबवायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प आम्हाला नको, असं सांगावं, म्हणजे काय करायचं ते ठरवता येईल, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केली आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही, सरकारनं आंदोलकांवर दडपशाही न करता सर्वेक्षण थांबवावं, असं मत एका ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केलं आहे.
****
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागानं स्वीकारला आहे, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते आज मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. सत्तार यांनी यासंदर्भातला अहवाल आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपवला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा, असं केसरकर यांनी म्हटलं, तर, कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे साहित्य आणि मदत लागेल, ते देण्याची कृषि विभागाची भूमिका असल्याचं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले आहेत. यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले. काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही सत्तार यांनी दिले. यासाठी भरारी पथकं कार्यान्वित करण्याची सूचना सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
****
राज्य सरकारच्या वतीनं राज्यातल्या शाळांसाठी आता वर्चुअल क्लासरूम अर्थात आभासी वर्ग, ही संकल्पना राबवली जाणार असून, यंदा मे महिन्यामध्ये या आभासी वर्गांच्या माध्यमातून इयत्ता दहावीसाठी उन्हाळी वर्ग घेतले जाणार आहेत. तसंच, येत्या जूनपासून वर्षभर आभासी वर्गांद्वारे राज्यातल्या सातशे एकसष्ट शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी या शाळांमध्ये विशेष वर्ग तयार करण्यात आले आहेत. आभासी वर्ग घेण्याच्या या उपक्रमासाठी बालभारती इथे या महिन्याच्या दहा तारखेपासून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांना या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
मराठवाड्यात आज हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वरूड, दांडेगाव, दिग्रस बुद्रुक आदी या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली तर वसमत तालुक्यातील कवठा, किन्होळा, कुरुंदा या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे तसंच दुकानांचे फलक उडून गेले. डोंगरकडा, कुरुंदा, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळीच्या बागांचं तसंच आंब्याचं मोठे नुकसान झालं. हळद काढणीचं काम सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात आज दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. राणीउंचेगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर घनसावंगी तालुक्यातल्या गंगाचिंचोली शिवारात काही वेळ बोराच्या आकारांच्या गारा पडल्या. एकलेहरा इथे शेतात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात इतरत्र ढगाळ वातावरण असून, दमटपणा वाढल्याचं, तसंच हवामान विभागानं जिल्ह्यात येत्या २९ एप्रिलपर्यंत ऑरेंज अर्लट जारी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याशिवाय तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही या केंद्रानं दिला आहे.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतली रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिल्या असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार जलील यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं शस्त्रक्रिया होत नसल्याकडे खासदार इम्तियाज जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. केंद्र सरकार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार आहे, मात्र यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचं कोणतंही नियोजन केलेलं नाही, असं मत जलील यांनी न्यायालयासमोर मांडलं.
जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार जलील यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित संस्थांना नोटीस बजावली असल्याची माहितीही जलील यांनी यावेळी दिली.
****
0 notes