Tumgik
#उत्तराखंड मुख्यमंत्री संकट
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन, हिंगोलीसह राज्यात सात ठिकाणी सुरू होणार एफ एम सेवा
धर्मादाय रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे निर्देश
येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
भारतीय किसान सभेच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य, शेतकऱ्यांची नियोजित मोर्चा स्थगित
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान
मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट, वीज पडण्याच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाची चेन्नई सुपर किंग्जवर ३२ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
देशात रेडिओ संपर्क व्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. १८ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या ८४ जिल्ह्यांमध्ये, हे शंभर वॅटचे ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत. यामध्ये आकांक्षी जिल्हे आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजरात, केरळ, छत्तीसगड, नागालँड इत्यादी राज्यांचा समावेश आहे. या अंतर्गत राज्यात हिंगोली, सटाणा, नंदुरबार, वाशिम, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या सात ठिकाणी, एफ एम सेवा सुरू होणार आहे. आकाशवाणीच्या एफ एम सेवेच्या विस्तारामुळे अतिरिक्त दोन कोटी लोकांना संपर्क व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
****
नागपूरमध्ये राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नव्यानं उभारण्यात आलेल्या या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये संशोधन केंद्रंही असल्यानं देशाला कर्करोगमुक्त बनवण्याचं स्वप्न ही संस्था पूर्ण करेल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले…
Byte…
टाटा कॅन्सर के सिवाय कोई पर्याय नही था। और मुंबई मे इस प्रकार की सेवा, वहां रहना काफी मुश्किलें होती थी। पर मुंबई मे जो टाटा कॅन्सर का जो स्टँडर्ड था, जो इक्विपमेंट थे, डॉक्टर्स थे, उसी स्तर का ये नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूट तयार हुआ है। और मुझे इस बात की खुशी है, की ये स्टेट ऑफ आर्ट ऐसा बना है की इसकी हर चीज केवल देश मे ही नही तो वर्ल्ड स्टँडर्ड का ये इन्सिट्यूट बना है। और इसलिये ऐसा संकट जिनके उपर आता है, उनको .फिर से जीवन मे जीने की उम्मीद देना, उनका आत्मविश्वास बढाना, उनकी सेवा करना, उनको वैद्यकीय उपचार रिजनेबल रेट मे उपलब्ध कराके देना ये बहोत ही आवश्यक काम है।
हवामान बदल, जीवनशैलीतील बदल यामुळे कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कर्क रोगावर उपचार करणाऱ्या अशा विशेष रुग्णालयांची गरज असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भविष्यात परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सर्वांना उपलब्ध करून देणं हे आव्हान असून, शासन यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या वतीनं या राष्ट्रीय कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेत रुग्णांच्या नातेवाईकांच्या नि:शुल्क निवासासाठी धर्मशाळा उभारण्यात येणार असून, एक संशोधन केंद्र देखील उभारण्याचा मानस असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
****
धर्मादाय रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या दरात उपचार मिळणं आवश्यक आहे. यादृष्टीनं सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. मुंबईत काल या रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागानं धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के उपलब्ध खाटांची माहिती देणारं, सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असं ॲप प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदारानं दिलेला उत्पन्नाचा दाखला, या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त, अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशी सूचनाही सावंत यांनी केली.
****
येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते, त्यासंदर्भात पुराव्यांनिशी तपशीलवार अंतरिम अहवाल राज्यानं २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तेव्हापासून सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्वसंबंधित विभागांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यास मान्यता दिली असून, फक्त केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब करणं बाकी असल्याकडेही अजित पवार यांनी या पत्राद्वारे लक्ष वेधलं.
****
रायगड जिल्ह्यात खारघर इथं महाराष्ट्र भूषण ��ुरस्कार वितरण वेळी, उष्माघाताच्या त्रासामुळे झालेल्या १४ जणांचा मृत्यू प्रकरणी, संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास, मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. विरारच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या इतर दहा जणांविरुद्ध या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी, या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या आठ जूनला सुनावणी होणार आहे.
****
सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांसाठी सात हजार मेगावॅट वीज निर्मितीमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असं महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते काल वार्ताहरांशी बोलत बोलत होते. राज्य सरकारनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत ‘मिशन २०२५’ ला सुरुवात झाली आहे. सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालवण्याचं या अभियानाचं उद्दीष्ट असल्याचं पाठक यांनी सांगितलं. राज्यात ४५ लाख कृषी पंपधारक शेतकरी आहेत आणि त्या सर्वांसाठी आगामी काळात हे अभियान महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग परवा रविवारी प्रसारीत होणार असून, प्रेरणा आणि माहिती देणारा हा कार्यक्रम सर्वांनी ऐकावा, असं आवाहन, अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. 'मन की बात' कार्यक्रमाचा शंभरावा भाग विशेष असल्यामुळे सर्वांना तो ऐकता यावा, यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय, अंगणवाडी तसंच जिथे जिथे शक्य आहे तिथे कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
भारतीय किसान सभेच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजित मोर्चा स्थगित केल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. ते काल अहमदनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी, दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात अकोला ते लोणी दरम्यान, लाँग मार्च काढला होता. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलडाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमधले शेतकरी, या मोर्चात सहभागी झाले होते. किसान सभेनं केलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी काल संगमनेर इथल्या बैठकीत चर्चा झाल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठीच्या निवडणुकीचं आज आणि परवा ३० तारखेला मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड तसंच लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज तर पैठण, गंगापूर आणि फुलंब्री बाजार समित्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. जालना जिह्यातल्या परतूर आणि घनसावंगी बाजार समितीसाठी आज, तर अंबड, आष्टी आणि मंठा बाजार समितीसाठी ३० तारखेला मतदान होणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या नऊ पैकी कडा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज आणि वडवणी या बाजार समित्यांसाठी आज, तर माजलगाव आणि पाटोदा या बाजार समित्यांसाठी परवा ३० तारखेला मतदान होणार आहे.
****
`प्रधानमंत्री स्वनिधी` योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल या संबंधी महोत्सवा अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महापालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही कराड यांनी दिली. ते म्हणाले,
Byte…
या जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका आहेत. ही योजना जशी महानगरपालिकेला आहे तशी नगरपालिकेला सुद्धा आहे. म्हणून कन्नड असेल, वैजापूर असेल, गंगापूर असेल, सिल्लोड असेल, खुलताबाद असेल याठिकाणी सुद्धा ही योजना चालू आहेच. पण त्याचं रिव्ह्यू मिटींग आपण लवकरात लवकर घेऊ. म्हणून जिल्हा परिषदेचे असिस्टंट सीईओ जिल्हा परिषदेमार्फत मी त्यांना सूचना करतो की लवकरात लवकर तुम्ही आढावा घ्या. आणि एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी कन्नड किंवा वैजापूर असा मेळावा ठेवा. आणि त्यात एसबीआय बँक असेल सर्व बँक असेल सर्व सहकार्य करतील.
****
मराठवाड्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह वीज पडण्याच्या घटनांमध्ये विभागात काल पाच जणांचा मृत्यू झाला. 
हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश गावांत काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान कळमनुरी, वरूड, जवळाबाजार, वाकोडी, रामेश्वरतांडा, डिग्रस कऱ्हाळे, कनेरगाव नाका, सवना, कडोळी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हळद काढणी आणि वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव शहरात काल अवकाळी पाऊस पडला. सिल्लोड तालूक्यातील घटांब्री आणि आमसरी इथं दुपारी दोनच्या सुमारास गारपीटीसह पाऊस पडला.
जालना जिल्ह्यातही विरेगाव, रामनगर परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. निलंगा तालुक्यातल्या मुबारकपूर इथं आरुषी राठोड या १३ वर्षीय मुलीचा, तर तगरखेडा इथं राजाप्पा कल्याणे हा शेतकर्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यातही काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. माहूर तालुक्यात सातघरी इथं घराच्या पत्र्यावर ठेवलेला दगड अंगावर पडल्यानं सोनुबाई पवार या महिलेचा मृत्यू झाला. मालटेकडी परिसरातल्या कामठा इथं वीज पडून शेख वजीर शेख चांद यांचा मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यात पांगरी तालुक्यातही एका मुलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
दरम्यान, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दहा हजार आठ शेतकऱ्यांच्या पाच हजार ४८७ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात गारपीटीचा फटका बसला असून, गहू पिकासह मोसंबी, आंबा या फळपिकांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, आजही मराठवाड्यासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं चेन्नई सुपर किंग्जवर ३२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानच्या संघाने २० षटकात २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला चेन्नईचा संघ १���० धावातच सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच राजस्थानचा संघ पदक तालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
****
पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा घडवणाऱ्या भारत गौरव रेल्वेला, आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पुणे इथं हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उदात्त पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशानं, ही योजना सुरू करण्यात आली आहे.
****
मुंबई इथल्या `आफ्टरनून व्हॉईस`च्या १५ वा `न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड` २०२३ मधला 'सर्वोत्कृष्ट कार्यशील राजकारणी'चा पुरस्कार, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना जाहीर झाला आहे. जलील यांची संसदेतली भाषणं हा लोकांचा आवाज असल्यानं, त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं, या संदर्भातली घोषणा करताना संयोजक डॉ. वैदेही तमन यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनी - येत्या एक मे रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जलील यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 
****
कोविड -१९ लसीकरणा अंतर्गत इन्कोव्हॅक ही नाकवाटे घ्यावयाची लस छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चिकलठाणा इथल्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. ही लस फक्त ६० वर्षांवरील नागरिकांच्या वर्धक मात्रेसाठीच वापरण्यात येणार असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितलं.
****
0 notes
newsreporters24 · 3 years
Text
Not part of Uttarakhand CM race: Trivendra Singh Rawat ahead of BJP legislature meet
Not part of Uttarakhand CM race: Trivendra Singh Rawat ahead of BJP legislature meet
छवि स्रोत: पीटीआई उत्तराखंड सीएम की दौड़ का हिस्सा नहीं: बीजेपी विधायक दल की बैठक से पहले त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंड के पूर्व मुख्यमंत्री और भाजपा नेता त्रिवेंद्र सिंह रावत ने शनिवार को कहा कि तीरथ सिंह रावत के पद से इस्तीफा देने के बाद वह मुख्यमंत्री बनने की दौड़ में नहीं हैं। मुख्यमंत्री पद के लिए उनकी उम्मीदवारी के बारे में पूछे जाने पर त्रिवेंद्र ने यहां संवाददाताओं से कहा, “न तो मैं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years
Text
उत्तराखंड राजनीतिक संकट लाइव अपडेट: पुष्कर सिंह धामी राज्यपाल से म���ले, कल लेंगे मुख्यमंत्री पद की शपथ oath
उत्तराखंड राजनीतिक संकट लाइव अपडेट: पुष्कर सिंह धामी राज्यपाल से मिले, कल लेंगे मुख्यमंत्री पद की शपथ oath
उत्तराखंड के मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत शुक्रवार को नई दिल्ली में अपने आवास पर। (एक्सप्रेस फोटो: प्रवीण खन्ना) इस्तीफा सौंपने के बाद मीडियाकर्मियों से बात करते हुए तीरथ सिंह रावत ने मुख्यमंत्री पद के लिए उन पर भरोसा करने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा को धन्यवाद दिया। उन्होंने कहा, “संवैधानिक संकट को देखते हुए… मैंने इस्तीफा देना उचित…
View On WordPress
0 notes
uttarakhandchardham · 4 years
Photo
Tumblr media
चार धाम यात्रा 2020 *सांकेतिक रूप से निर्धारित समय पर खुलेंगे उत्तराखंड चारधाम के कपाट। * कोरोना महामारी से बचाव हेतु सरकारी एडवाइजरी का पालन होगा। * कोरोना संक्रमण से बचाव रहेगी प्राथमिकता। ‌ उत्तराखंड प्रदेश के मुख्यमंत्री श्री त्रिवेंद्र सिंह रावत एवं प्रदेश के पर्यटन एवं धर्मस्व मंत्री श्री सतपाल जी महाराज ने कहा है कि उत्तराखंड चार धाम- श्री बदरीनाथ , श्री केदारनाथ, श्री गंगोत्री, श्री यमुनोत्री धाम के कपाट अपने पूर्व निर्धारित तिथियों, समय पर खुल रहे हैं। कोरोना महामारी से बचाव हो सके सभी लोग सुरक्षित रहे इसके लिए लाक डाउन का हर स्तर पर पालन होना जरूरी है। यह प्रधानमंत्री माननीय नरेन्द्र मोदी जी एवं प्रदेश सरकार की प्राथमिकता भी है। इसके लिए, जनता कर्फ्यू का पालन,साफ सफाई, सामाजिक दूरी, मास्क पहनना, सेनिटाइजर प्रयोग पर, सरकारी गाईड लाईन के अनुपालन पर जोर दिया जा रहा है। कहा जा सकता है कि यात्रा तभी सुचारू हो पायेगी।जब कोरोना महामारी का संकट टल जायेगा। इस तरह चारधाम यात्रा सांकेतिक रूप से शुरू होगी। चारधाम विकास परिषद के उपाध्यक्ष आचार्य शिव प्रसाद ममगाईं ने निर्णय का स्वागत किया है। गढ़वाल आयुक्त एवं देवस्थानम बोर्ड के सीईओ रमन रविनाथ के अनुसार कपाट तय तिथि एवं समय पर खुल रहे है।प्रदेश सरकार एवं‌ केन्द्र के एडवाइजरी के तहत चारधाम यात्रा का संचालन होगा। यात्रियों को कोरोना से बचाव पहली प्राथमिकता है। कपाट खुलने की तिथियां निम्नवत है (1) श्री बदरीनाथ धाम 30 अप्रैल प्रात:4 बजकर 30 मिनट। (2) श्री केदारनाथ 29 अप्रैल प्रात: 6 बजकर 10 मिनट। (3) श्री गंगोत्री 26 अप्रैल मध्यान 12 बजकर 35 मिनट। (4) श्री यमुनोत्री 26 अप्रैल मध्यान 12 बजकर 41 मिनट। प्राप्त जानकारी के अनुसार कोरोना महामारी के संकट को देखते श्री बदरीनाथ धाम जानेवाली गाडू घड़ा (तेल कलश) यात्रा की तिथि अब 24 अप्रैल कर दी गयी है। तेलकलश की रस्मों को अति संंक्षिप्त रूप में निभाया जायेगा। *डा.हरीश गौड़ मीडिया प्रभारी द्वारा जारी। #uttarakhandchardhamyatra #uttarakhandchardham2020 #chardhamyatra #kedarnathyatra2020 #badrinathyatra2020 #gangotriyatra2020 #yamunotriyatra2020 https://www.instagram.com/p/B-18rJQJxRl/?igshid=s8h0c4e3w5yc
1 note · View note
tazacoverage · 2 years
Text
उत्तराखंड: बिजली कटौती से सीएम नाराज, अधिकारियों को लगाई फटकार- ‘शुरूआत में ही क्यों नहीं हुआ समाधान’, दिए ये कड़े निर्देश..
उत्तराखंड: बिजली कटौती से सीएम नाराज, अधिकारियों को लगाई फटकार- ‘शुरूआत में ही क्यों नहीं हुआ समाधान’, दिए ये कड़े निर्देश..
देहरादून: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने शुक्रवार को सचिवालय में ऊर्जा विभाग की बैठक बैठक ली। राज्य में अधिक बिजली कटौती पर गहरी नाराजगी व्यक्त करते हुए उन्होंने अधिकारियों को सख्त निर्देश दिये कि जल्द से जल्द बिजली संकट की समस्या का समाधान ढ़ूढ़ा जाय। सचिव ऊर्जा, यूपीसीएल, पिटकुल और यूजेवीएनएल के अधिकारी बिजली संकट की समस्या के समाधान के लिए क्या किया जा सकता है, इसकी रिपोर्ट शीघ्र मुख्यमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swarajtv · 2 years
Text
उत्तराखंड: बिजली कटौती से सीएम नाराज, अधिकारियों को लगाई फटकार- ‘शुरूआत में ही क्यों नहीं हुआ समाधान’, दिए ये कड़े निर्देश..
उत्तराखंड: बिजली कटौती से सीएम नाराज, अधिकारियों को लगाई फटकार- ‘शुरूआत में ही क्यों नहीं हुआ समाधान’, दिए ये कड़े निर्देश..
देहरादून: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने शुक्रवार को सचिवालय में ऊर्जा विभाग की बैठक बैठक ली। राज्य में अधिक बिजली कटौती पर गहरी नाराजगी व्यक्त करते हुए उन्होंने अधिकारियों को सख्त निर्देश दिये कि जल्द से जल्द बिजली संकट की समस्या का समाधान ढ़ूढ़ा जाय। सचिव ऊर्जा, यूपीसीएल, पिटकुल और यूजेवीएनएल के अधिकारी बिजली संकट की समस्या के समाधान के लिए क्या किया जा सकता है, इसकी रिपोर्ट शीघ्र मुख्यमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-trust-india · 2 years
Text
Department of Energy: के साथ मुख्यमंत्री धामी ने की बैठक
Department of Energy: के साथ मुख्यमंत्री धामी ने की बैठक
उत्तराखंड: Department of Energy  मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी ने शुक्रवार को सचिवालय में ऊर्जा विभाग (Department of Energy) की बैठक ली। राज्य में अधिक बिजली कटौती पर गहरी नाराजगी व्यक्त करते हुए उन्होंने अधिकारियों को सख्त निर्देश दिये कि जल्द से जल्द  बिजली संकट की समस्या का समाधान ढ़ूढ़ा जाय। सचिव ऊर्जा, यूपीसीएल, पिटकुल और यूजेवीएनएल के अधिकारी बिजली संकट की समस्या के समाधान के लिए क्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
divyabhashkar · 3 years
Text
उत्तराखंड में बीजेपी के खिलाफ जीत के बाद नए सीएम चेहरे का चुनाव
उत्तराखंड में बीजेपी के खिलाफ जीत के बाद नए सीएम चेहरे का चुनाव
उत्तराखंड में बीजेपी के लिए एक बड़ा संकट खड़ा हो गया है. एक बड़े दंगे के बाद पार्टी सत्ता में लौट सकती है लेकिन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपका चुनाव हार गए। अब चुनौती नए नेता को चुनने की है। Source by [author_name]
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years
Text
तीरथ सिंह रावत का इस्तीफा: कांग्रेस ने मोदी, नड्डा पर लगाया 'सीएम स्वैप योजना, सत्ता की लूट' का आरोप
तीरथ सिंह रावत का इस्तीफा: कांग्रेस ने मोदी, नड्डा पर लगाया ‘सीएम स्वैप योजना, सत्ता की लूट’ का आरोप
उत्तराखंड के मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत के पदभार संभालने के चार महीने से भी कम समय बाद इस्तीफा देने के एक दिन बाद, कांग्रेस ने शनिवार को राज्य में राजनीतिक अस्थिरता पर ध्यान देने के लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस की और भारतीय जनता पार्टी (भाजपा) पर सत्ता की भूख दिखाने का आरोप लगाया। कांग्रेस नेता रणदीप सुरजेवाला ने कहा, ‘2017 में बीजेपी ने उत्तराखंड में सरकार बनाई थी. लेकिन वे राज्य के विकास के लिए काम…
View On WordPress
0 notes
breakingnewsfirst · 3 years
Text
1. ओमिक्रॉन ने बढ़ाई चिंता, इस राज्य में बंद किए गए कक्षा 1 से 9वीं तक के स्कूल
2. चक्का जाम पर बोले डिप्टी CM सिसोदिया 3500 करोड़ की चोरी रुकने से BJP को हो रहा है दर्द
3. Corona virus : कोरोना संक्रमण ने पकड़ी रफ्तार , 24 घंटे में मिले 33,750 केस , 123 लोगों की गई जान
4. देश में ओमिक्रोन के अब तक 1700 मामले दर्ज, आगे जाने दिल्ली-केरल की स्थिति
5. उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी मजदूरों को देंगे 1,500 करोड़ का भरण-पोषण भत्ता
6. अखिलेश ने टैक्स की छापेमारी को बताया जातिवादी रंग , कहा- BJP जैन समुदाय को बना रही निशाना
7. नवजोत सिंह सिद्धू का बड़ा ऐलान, बोले- 5 लाख लोगों को नौकरी नहीं मिली तो छोड़ दूंगा राजनीति
8. यूपी में 2150 केंद्रों पर कल से शुरू हुआ 15 से 18 साल के बच्चों का टीकाकरण, CM योगी बोले- ओमीक्रॉन से घबराने की जरूरत नहीं
9. राजस्थान को फिलहाल नहीं मिलेगी सर्दी से राहत, आज ओलों के साथ बारिश होने की संभावना
10. PM इमरान की पूर्व पत्नी पर हमला, बोलीं- क्या यही नया पाकिस्तान है
11. दिल्ली और मुम्बई से पश्चिम बंगाल के लिए उड़ाने केवल सोमवार, शुक्रवार को सप्ताह में दो बार आने की अनुमति देने का फैसला किया
12. चुनाव आयोग का 5 चुनावी राज्यों को निर्देश, कहा- टीकाकरण में लाएं तेजी
13. अखिलेश यादव का दावा, समाजवाद का रास्ता ही रामराज्य का मार्ग है
14. जम्मू कश्मीर में बड़े आतंकी हमले को लेकर खुफिया एजेंसियों ने जारी किया अलर्ट
15. सीएम योगी ने दिया 1.5 करोड़ श्रमिकों को बड़ा तोहफा , खाते में भेजे 1-1 हजार रुपए
16. 8 जनवरी को प्रियंका गांधी करेंगी , अल्मोड़ा में चुनावी सभा को सम्बोधित
17. मुंबई में बढ़ी कोरोना की रफ्तार, कक्षा 1 से 8 तक के सभी स्कूल 31 जनवरी तक बंद
18. इंडियन आर्मी को मिली बड़ी कामयाबी, श्रीनगर में लश्कर के खूंखार आतंकी को मौत की नींद सुलाया
19. अगर AAP सरकार सत्ता मे आएगी तो शहीद फोजियों के परिवार को एक करोड़ रुपए दिये जाएंगे , उत्तराखंड में बोले केजरीवाल
20. मुंबई में गहराते कोरोना संकट के बीच बड़ा फैसला , कक्षा 1 से 9 और 11 के स्कूल 31 जनवरी तक बंद
21. पश्चिम बंगाल में लगा लॉकडाउन, सोमवार से सभी स्कूल, कॉलेज, पार्क, जिम, स्पा, सैलून बंद
22. आइए अब जानते दिल्ली-केरल की स्थिति:- omicron के अब तक 23 राज्यों तथा केन्द्र शासित प्रदेशों में सामने आए। केन्द्रीय स्वास्थ्य मंत्रालय ने बताया कि महाराष्ट्र में सबसे अधिक 510 मामले सामने आए और इसके बाद दिल्ली में 351, केरल में 156, गुजरात में 136, तमिलनाडु में 121 और राजस्थान में 120 मामले सामने आए।
0 notes
officialptdeepu · 3 years
Text
मां भगवती बगलामुखी का यह मंदिर नलखेड़ा के बीच श्मशान घाट में बना है। देश के कई बड़े दिग्गज नेता यहां अपनी मनोकामनाएं पूरी करने आते हैं और संकट से बचाने के लिए पूजा-अर्चना करते हैं. सभी देवियों में इसका महत्व विशेष है। उनके पास दुनिया में केवल तीन प्राचीन मंदिर हैं, जिन्हें सिद्धपीठ कहा जाता है। यह मंदिर तंत्र-मंत्र साधना के लिए भी प्रसिद्ध है।
तीन मुख, त्रिशक्ति का प्रतीक
मध्य प्रदेश में, तीन मुखी बगलामुखी त्रिशक्ति माता का प्रतीक है। यह मंदिर शाजापुर तहसील नलखेड़ा में लखुंदर नदी के तट पर स्थित है। द्वापर युग का यह मंदिर बहुत ही चमत्कारी है। यहां देश भर से साधु-संत तांत्रिक अनुष्ठानों के लिए आते रहते हैं।
मोदी के भाई ने किया मंत्रोच्चार
लोकसभा चुनाव के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के भाई प्रह्लाद मोदी ने यहां नारा लगाया था. स्मृति ईरानी भी मां के दरबार में माथा टेकने पहुंचीं. यूपी से बीजेपी सांसद जगदंबिका पाल यहां आए हैं. टीवी सीरियल तारक मेहता..के अय्यर भाई, छत्तीसगढ़ के पूर्व मुख्यमंत्री वसुंधराजे सिंधिया, दिग्विजय सिंह, शिवराज सिंह चौहान, उत्तराखंड की महारानी भी यहां आ चुके हैं. पुजारी पं. कैलाशनारायण शर्मा ने बताया कि मंदिर का जीर्णोद्धार 1815 में किया गया था। यहां लोग अपनी मनोकामना पूरी करने या किसी भी क्षेत्र में विजय प्राप्त करने के लिए यज्ञ, हवन और पूजा करते हैं।
स्थापना कृष्ण के निर्देश पर हुई थी
इस मंदिर की स्थापना महाराज युधिष्ठिर ने महाभारत काल में विजय प्राप्त करने के लिए भगवान कृष्ण के निर्देश पर की थी। यह भी माना जाता है कि यहां बगलामुखी की मूर्ति स्वयंभू है। इस मंदिर में माता बगुलामुखी के अलावा माता लक्ष्मी, कृष्ण, हनुमान, भैरव और सरस्वती भी विराजमान हैं।
संपर्क पंडित दीपू आचार्य माँ बगलामुखी मंदिर नलखेड़ा मो.9174936832
Tumblr media
1 note · View note
tazacoverage · 3 years
Text
उत्तराखंड : कुछ कीजिए CM साहब, यहां काट दी अस्पताल की बिजली, संकट में लोग
उत्तराखंड : कुछ कीजिए CM साहब, यहां काट दी अस्पताल की बिजली, संकट में लोग
                                                    पौड़ी: राज्य में सरकार भले ही स्वास्थ्य सेवाओं के बेहतर होने के कितने ही दावे कर ले, लेकिन हालात कुछ और ही बयां करते हैं। कुछ ऐसा ही हाल पूर्व मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत और कैबिनेट मंत्री सतपाल महाराज के गृह क्षेत्र के अस्पताल का भी है। अस्पताल में बिजली गुल है। ऐसे में सवाल यह है कि जिस अस्तपताल में बिजली ही नहीं, वहां इलाज कैसे होता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
athibanhindi · 3 years
Text
मुख्यमंत्री ने कहा कि हरियाणा सरकार उत्तराखंड को पांच करोड़ रुपये देगी, साथ ही दवा, कपड़े और टेंट भी भेजे जाएंगे.
मुख्यमंत्री ने कहा कि हरियाणा सरकार उत्तराखंड को पांच करोड़ रुपये देगी, साथ ही दवा, कपड़े और टेंट भी भेजे जाएंगे.
हरियाणा के मुख्यमंत्री मनोहर लाल ने उत्तराखंड में आई प्राकृतिक आपदा को देखते हुए उत्तराखंड सरकार को पांच करोड़ रुपये की आर्थिक सहायता मुहैया कराने की घोषणा की है। मुख्यमंत्री मनोहर लाल ने कहा कि उत्तराखंड में आई आपदा में जान-माल का भारी नुकसान हुआ है। आपदा में जान गंवाने वाले लोगों की मृत्यु पर गहरा शोक व्यक्त किया है। मुख्यमंत्री ने कहा कि हरियाणा सरकार की तरफ से उत्तराखंड सरकार को इस संकट की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
मुख्यमंत्री ने उत्तराखंड में भारी बारिश के कारण हुई लोगों की मृत्यु पर शोक व्यक्त किया
मुख्यमंत्री जय राम ठाकुर ने पड़ोसी राज्य उत्तराखंड में भारी बारिश के कारण हुई लोगों की असामयिक मृत्यु पर शोक व्यक्त किया है। मुख्यमंत्री ने उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी से दूरभाष पर बात की और संकट के इस समय में हिमाचल प्रदेश सरकार की ओर से हर संभव सहायता प्रदान करने का आश्वासन दिया। https://twitter.com/jairamthakurbjp/status/1450819754336219140 उन्होंने शोकाकुल परिजनों के प्रति अपनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
uknewsnetwork · 3 years
Text
चारधाम यात्रा पर लगा ग्रहण शायद अब हट जाएगा। मुख्यमंत्री ने एक दिन पहले श्रीनगर में इस बात के संकेत दिए हैं। उनका कहना हैं कि मामला हाईकोर्ट में है, लेकिन सरकार इस दिशा में विचार कर रही है। कोरोना महामारी के कारण उत्तराखंड के प्रसिद्ध चारों तीर्थस्थल बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री और यमुनोत्री की यात्रा के दो सीजन बर्बाद हो गए।
जिसका खामियाजा अब तक यात्रा से जुड़े तमाम वर्ग के लोगों को भुगतना पड़ रहा हैं। हरिद्वार से लेकर चारों धामों तक जिनकी आजीविका इस यात्रा पर निर्भर है वे आर्थिक संकट के दौर से गुजर रहे हैं। साल 2020 में तो सरकार ने 1 जुलाई से कुछ प्रतिबंधों के साथ यात्रा को खोल दिया था। लेकिन इस साल शुरूआत से ही इस पर रोक है। केवल स्थानीय लोगों को ही वहां जाने की सीमित अनुमति मिली है। उसमें भी वह लोग मंदिरों में दर्शनों के लिए प्रवेश नहीं कर सकते हैं।
0 notes
chaitanyabharatnews · 3 years
Text
पीएम मोदी अन्न योजना के लाभार्थियों से हुए रूबरू, कहा- विपक्ष ने गरीबों को सुविधाओं से रखा दूर
Tumblr media
चैतन्य भारत न्यूज नई दिल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्यप्रदेश में पीएम गरीब कल्याण अन्न योजना के लाभार्थियों से बात की। इस दौरान उन्होंने कहा कि सरकार ने संकट के समय गरीबों को प्राथमिकता दी और गरीबों को भोजन और रोजगार की चिंता की। उन्होंने कहा कि अन्न योजना से कोरोना काल में लोगों को बड़ी राहत मिली है।  पीएम मोदी ने कहा कि जनधन योजना से आज देश की बड़ी आबादी लाभान्वित हुई है।  पीएम ने विपदा से निपटने के लिए सभी को एक साथ आने की अपील की। इस मौके पर मध्यप्रदेश के राज्यपाल मंगूभाई पटेल और मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भी मौजूद रहे।  इस कार्यक्रम में उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, असम, त्रिपुरा, हरियाणा और गोवा के मंत्री और खाद्य क्षेत्र के अधिकारी भी वर्चुअली रूप से  शामिल हुए। सबका साथ, सबका विकास सरकार का संकल्प वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए कार्यक्रम को संबोधित करते हुए पीएम मोदी ने कहा कि 80 करोड़ लोगों को इस योजना का लाभ मिला है, इस योजना से राज्य के पांच करोड़ लोगों को फायदा हुआ है। सरकार गरीबों का जीवन स्तर उठाने के लिए दिन रात प्रयासरत है। सबका साथ सबका विकास करना भाजपा सरकार का सिर्फ नारा नहीं है, बल्कि संकल्प है। विपक्ष पर पीएम मोदी का निशाना इस दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने विपक्ष पर तीखा हमला बोला। लाभार्थियों को संबोधित करते हुए पीएम ने कहा कि पहले की सरकारी व्यवस्था में कई विसंगतियां थी। विपक्ष ने हमेशा गरीबों को सुविधा से दूर रखा।  उन्होंने कहा कि विकास के लिए डबल इंजन की जरूरत है। शिवराज सिंह के नेतृत्व में मध्यप्रदेश के हर क्षेत्रों में तेजी से विकास हो रहा है। पीएम ने प्रदेश में बारिश और बाढ़ से बिगड़े हालात पर दुख जाताया। राज्य सरकार को हर संभव मदद कराने का भरोसा दिया है। भारत में 50 करोड़ से ज्यादा लोगों को वैक्सीन- पीएम  पीएम मोदी ने कोरोनाकाल का जिक्र करते हुए कहा कि संक्रमण को रोकने के लिए जनजीवन रोकना पड़ा हर चुनौती का देश ने एकजुट होकर मुकाबला किया। कोरोना से लड़ाई एक बड़ी चुनौती थी। दुनिया में भारत वैक्सीन के मामले में सबसे आगे रहा। भारत के पास स्वदेशी वैक्सीन उपलब्ध हैं। अभी तक देश में 50 करोड़ से ज्यादा लोगों को वैक्सीन लगाई जा चुकी है । Read the full article
0 notes