Tumgik
#इतर क्रीडा हिंदी बातम्या
airnews-arngbad · 22 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा इथं दोन, तर तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं सांगीतलं आहे.
****
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या व्यस्त वेळअपत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
४४ व्या ‘प्रगती’ बैठकीत महाराष्ट्रासह ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ७६ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सात प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.
****
देशभरातल्या शिक्षण पद्धतीत अमूलाग्र सुधारणांच्या दृष्टीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला प्रतिसाद मिळत असल्याचं, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. बाजारपेठेतल्या गरजा, मागणीशी सुसंगता असणारा अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात २४६ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी, तर उत्कृष्ट कामगिरीसाठी नऊ पदवीधर विद्यार्थांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं.
****
भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केलं आहे. ते काल वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर व्याख्यान देत होते. २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्‍प पूर्ण करण्यासाठी आपल्याला साडेतेराच्या आर्थिक विकास दरानं पुढे जावं लागेल. यामुळे आपण केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार नाही, तर आपल्या सर्व समस्याही दूर होतील, असं ते म्हणाले.
****
काँग्रेसच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी काल राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
****
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक लाभ देण्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तूंचं वाटप सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
आदिवासी क्षेत्रातल्या म्हणजेच पेसा क्षेत्रातल्या भरतीसाठी नाशिकसह राज्यातल्या शेकडो आदिवासींनी काल नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढला. आदिवासी भरती होणार नाही तोपर्यंत आंदोलनं सुरुच राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला. पंचवटीतील तपोवन इथून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तेथून आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मेार्चात तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने काल शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
ब्राझीलच्या रिओ दि जानेरिओ इथं झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई केली. बंगळुरूच्या दक्ष तयालियानं सुवर्ण पदक जिंकलं, तर पुण्याच्या आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ, हैदराबादच्या बनिब्रता माजी आणि बिहारच्या पाणिनी, या विद्यार्थ्यांनी रौप्यपदकं जिंकली.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या समारंभात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत २४ भारतीय खेळाडू विविध १२ प्रकारात खेळणार आहेत.
****
0 notes
darshaknews · 2 years
Text
भारतीय महिला हॉकी संघाने सलग दुसरा ड्रॉ खेळला, चीनविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राहिला
भारतीय महिला हॉकी संघाने सलग दुसरा ड्रॉ खेळला, चीनविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राहिला
FIH महिला हॉकी विश्वचषक २०२२: महिला हॉकी विश्वचषकात भारताला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. संघाने मंगळवारी बी पूलमध्ये चीनविरुद्ध सलग दुसरा सामना ड्रॉ केला. यापूर्वी भारताने इंग्लंडसोबत 2-2 अशी बरोबरी साधली होती. भारताला गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. वंदना कटारियाने गोल केला टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाविरुद्ध (भारत) चीनच्या झेंग जियालीने…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
विम्बल्डन 2022: ऑस्ट्रेलियन निक किर्गिओसला 8 लाख रुपये द्यावे लागतील, 5 महिलांसह एकूण 14 खेळाडूंना हजारो डॉलर्सचा दंड
विम्बल्डन 2022: ऑस्ट्रेलियन निक किर्गिओसला 8 लाख रुपये द्यावे लागतील, 5 महिलांसह एकूण 14 खेळाडूंना हजारो डॉलर्सचा दंड
ऑस्ट्रेलियन खेळाडू निक किर्गिओसला $10,000 (अंदाजे रु. या स्पर्धेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे. याशिवाय या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य १३ खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे. किर्गिओसने स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर पत्रकार परिषदेत कबूल केले की त्याने त्रासदायक प्रेक्षकांवर थुंकले होते. ऑल इंग्लंड क्लबने सामन्यादरम्यान आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम जाहीर केली. किर्गिओसच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
महिला शक्तीचा सन्मान वाढवून आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करूनच कोणताही देश पुढे जाऊ शकतो, असं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेत सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात ते आज बोलत होते. नमो ड्रोन दिदींनी सादर केलेली कृषी ड्रोन प्रात्यक्षिकं त्यांनी पाहिली. देशभरातल्या विविध ११ ठिकाणांहून नमो ड्रोन दिदी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी, एक हजार नमो ड्रोन दिदींना, ड्रोन हस्तांतरित केले. विविध क्षेत्रात महिलांनी मिळवलेल्या यशाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, एकविसाव्या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व देशातल्या महिला करु शकतात, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी, नारी शक्तीचा गौरव केला.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या ८५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यामध्ये लातूर इथला रेल्वे बोगीबांधणी कारखाना, बडनेरा इथली रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळा, पुण्यातली वंदे भारत कोच देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, रेल्वे स्थानकावरची जनऔषधी केंद्रं, रेल कोच उपाहारगृहं, सुमारे दीडशे वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल, आदी उपक्रमांचा समावेश आहे. त्याबरोबरच पंतप्रधान, देशभरातल्या विविध ठिकाणांवरुन सुरु होणाऱ्या दहा वंदे भारत गाड्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
लातूरचा हा रेल्वे बोगी कारखाना हा महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला चौथा कारखाना आहे. या कारखान्यातून रेल्वे बोगीसह मेट्रोचे कोच तसंच वंदेभारत रेल्वेचे कोचही तयार केले जाणार आहेत.
****
भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची, भारतीय स्टेट बँकेची मागणी, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं बॅंकेला, उद्या १२ मार्चला कामकाजाची वेळ संपेपर्यंत निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर न्यायालयानं निवडणूक आयोगाला देखील, १५ मार्चपर्यंत एसबीआयकडून आलेली निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्यास सांगितलं आहे.
****
यंदाचा ऑस्कर सोहळा अमेरिकेत लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये आज पार पडला. या सोहळ्यात सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. या प्रतिष्ठित सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात पुरस्कार मिळाले. यावेळी ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. दिवंगत टिना टर्नर, मॅथ्यू पेरी आणि इतर अनेक जणांची नावं या यादीत होती.
****
मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड म्हणजेच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या, वरळी ते मरीन ड्राईव्ह या दक्षिणवाहिनी मार्गिकेचं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या किनारी रस्त्याला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय इंद्रधनुष युवा महोत्सवाचं उद्घाटन आज राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणलीच्या माध्यमातून झालं. विद्यार्थ्यांनी अभ्यासासह कला क्रीडा आणि संस्कृतीच्या माध्यमातून देशासाठी तसंच समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य करावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. येत्या १५ तारखेपर्यंत चालणार्या या महोत्सवात, २४ विद्यापीठांचे ८७५ कलावंत सहभागी झाले आहेत. महोत्सवाच्या प्रारंभी आज सकाळी विद्यापीठ परिसरात शोभायात्रा काढण्यात आली.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथल्या स्ट्राँग रूमची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज पाहणी केली. लोहा इथल्या पाच मतदान केंद्रांना देखील भेट देऊन त्यांनी, आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत निर्देश दिले.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
आम्ही बनवू, आम्ही तोडू, ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये इतिहास रचला, खेळाडू आणि राजकारणी म्हणाले
आम्ही बनवू, आम्ही तोडू, ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये इतिहास रचला, खेळाडू आणि राजकारणी म्हणाले
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने स्टॉकहोम येथील डायमंड लीगमध्ये इतिहास रचला. त्याने एका महिन्यात दुसऱ्यांदा 89.94 मीटरच्या सुरुवातीच्या थ्रोसह राष्ट्रीय विक्रम मोडला. नीरज चोप्राने 14 जून 2022 रोजी पावो नुर्मी गेम्समध्ये त्याच्या पदार्पणाच्या हंगामात 89.30m सह स्वतःचा विक्रम मोडला. तथापि, 24 वर्षीय भालाफेकपटूने स्टॉकहोममधील 90 मीटरचा टप्पा केवळ 6 सेमीने चुकवला. नीरज चोप्राची 90 मीटर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
फुटबॉल विश्वचषकातही दिसणार महिला शक्ती, ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेफ्री बनले
फुटबॉल विश्वचषकातही दिसणार महिला शक्ती, ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेफ्री बनले
फिफा WC कतार 2022: या वर्षाच्या अखेरीस कतारमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा होणार आहे. हा विश्वचषक ऐतिहासिक असणार आहे. या स्पर्धेत प्रथमच अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. फिफा विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेत होणार आहे. हा विश्वचषक प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. यादरम्यान, स्पर्धेत प्रथमच महिला पंचाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी फिफा विश्वचषक 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे. FIFA…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
कुस्तीपटू विनेश फोगाटने युक्रेनियन कुस्तीपटू व प्रशिक्षक मेमोरियल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले भारतीय कुस्तीपटू विनेशकडून आणखी एक सुवर्ण पैज, बेलारूसच्या कालाजिन्स्कायाला हरवून युक्रेन कुस्ती स्पर्धा जिंकली
कुस्तीपटू विनेश फोगाटने युक्रेनियन कुस्तीपटू व प्रशिक्षक मेमोरियल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले भारतीय कुस्तीपटू विनेशकडून आणखी एक सुवर्ण पैज, बेलारूसच्या कालाजिन्स्कायाला हरवून युक्रेन कुस्ती स्पर्धा जिंकली
डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी रविवारी युक्रेनियन कुस्तीपटू व प्रशिक्षक स्मारकाचे सुवर्णपदक जिंकून देशाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. 26 वर्षीय महिला कुस्तीगीरने 53 किलो वॅट व्हॅट प्रकारातील अंतिम फेरीत बेलारूस कुस्तीपटू आणि माजी विश्वविजेत्या व्हेनेसा कलाजिन्स्कायाचा 10-8 असा पराभव केला. सामन्यादरम्यान विनेश 6–8 ने पिछाडीवर पडला होता, पण शेवटच्या seconds 35…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
लॉस एंजिलिसमध्ये कार अपघातानंतर गोल्फर टायगर वुड्स रुग्णालयात दाखल - रॉल अपघातात जखमी गोल्फर टायगर वुड्स एका वेगवान मोटारीच्या दुभाजकाला धडक दिल्यानंतर पलटला.
लॉस एंजिलिसमध्ये कार अपघातानंतर गोल्फर टायगर वुड्स रुग्णालयात दाखल – रॉल अपघातात जखमी गोल्फर टायगर वुड्स एका वेगवान मोटारीच्या दुभाजकाला धडक दिल्यानंतर पलटला.
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका प्रख्यात गोल्फपटू टायगर वुड्स मंगळवारी सकाळी लॉस एंजेलिस येथे रस्ता अपघातात जखमी झाला, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तो त्याच रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वुड्सचे भागीदार मार्क स्टीनबर्ग म्हणाले की, अपघातात वुड्स दुखापत झाले होते,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
भारतीय नेमबाज मनु भाकरने दिल्ली विमानतळावर अपमान केला भारतीय नेमबाज मनु भाकरने दिल्ली विमानतळावर अपमान केला, बंदुकीच्या गोळीशी संबंधित कागदपत्र असूनही अधिका authorities्यांनी विमानात चढण्यापासून रोखले
भारतीय नेमबाज मनु भाकरने दिल्ली विमानतळावर अपमान केला भारतीय नेमबाज मनु भाकरने दिल्ली विमानतळावर अपमान केला, बंदुकीच्या गोळीशी संबंधित कागदपत्र असूनही अधिका authorities्यांनी विमानात चढण्यापासून रोखले
डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. भारताच्या स्टार महिला नेमबाज मनु भाकरला दिल्ली विमानतळावर अपमान सहन करावा लागला. एअर इंडियाने त्याला विमानात चढण्यापासून रोखले आणि त्याच्याकडे 10,200 रुपये मागितले. वास्तविक, मनु भाकर शुक्रवारी दिल्लीहून भोपाळ प्रशिक्षणात जात होते, परंतु एअर इंडियाच्या अधिका officials्यांनी त्यांना विमानात चढण्यापासून रोखले. शुक्रवारी संध्याकाळी ऑलिम्पिक कोटा विजेता पिस्तूल नेमबाज मनु…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
कंबला रेसर नावाचा इंडियस उसैन बोल्ट श्रीनिवास गौडा गडी बाद होण्याचा क्रम मध्ये जखमी आहे - बोल्टशी तुलना केली जाणारी कमला रेसर पुन्हा चर्चेत आहे, यावेळी म्हशीवरील नियंत्रण गमावला.
कंबला रेसर नावाचा इंडियस उसैन बोल्ट श्रीनिवास गौडा गडी बाद होण्याचा क्रम मध्ये जखमी आहे – बोल्टशी तुलना केली जाणारी कमला रेसर पुन्हा चर्चेत आहे, यावेळी म्हशीवरील नियंत्रण गमावला.
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका गेल्या वर्षी कर्नाटकचा कंबाला धावपटू (पारंपारिक म्हशी शर्यत) शंभर मीटरची शर्यत 9.55 सेकंदात चर्चेत आल्यानंतर चर्चेत आलेला श्रीनिवास गौडा हंगामाच्या पहिल्या शर्यती दरम्यान जखमी झाला आणि शर्यत पूर्ण करू शकला नाही. असे असूनही त्याने हार मानली नाही. शनिवारी इकला बाव�� कांबळा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      देशातल्या कोविडबाधितांची संख्या एक कोटीवर; संसर्गमुक्तीचं प्रमाण ९५ पूर्णांक ४६ शतांश टक्के.
·      राज्यात तीन हजार ९४० नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या अडीचशे रुग्णांची नोंद.
·      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत - पत्रकार मा गो वैद्य यांचं निधन.
·      येत्या पाच वर्षांत १७ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचं उद्दीष्ट उद्योग क्षेत्राला पूरक - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.
·      अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर.
·      शाश्वत विकासासाठी मराठवाड्यातल्या चारही विद्यापीठांनी किमान समान कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा - कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचं आवाहन.
·      परभणी इथला हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांचा ऊर्स कोविड पार्श्वभूमीवर रद्द.
आणि
·      ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताचा दारूण पराभव; भारतीय संघाकडून निच्चांकी धावसंख्येचा विक्रम.
****
देशात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक कोटीचा आकडा पार केला आहे. काल सकाळी संपलेल्या २४ तासांत देशात नव्या २१ हजार १५३ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी चार हजार ५९९ इतकी झाली आहे. काल ३४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ४५ हजार १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल २९ हजार ८८५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, हे प्रमाण ९५ पूर्णांक ४६ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण १ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं आहे.
****
राज्यात काल तीन हजार ९४० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ९२ हजार ७०७ झाली आहे. काल ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४८ हजार ६४८ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका झाला आहे. काल तीन हजार १११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८१ हजार ८४१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ६१ हजार ०९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या अडीचशे रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर, बीड जिल्ह्यातल्या एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ६२ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ५५, लातूर ४८, बीड २८,  उस्मानाबाद २०, परभणी १६, जालना १४, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले सात नवे रुग्ण आढळले.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत पत्रकार, माधव गोविंद उपाख्य मा गो वैद्य यांचं काल दुपारी नागपूर इथं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. १९४३ सालापासूनच संघाचे सक्रिय स्वयंसेवक असलेल्या वैद्य यांनी, १९६६ पासून अनेक वर्षे पत्रकारिता केली. १९७८ ते १९८४ या कालावधीत ते राज्य विधान परिषदेचे सदस्य होते. शिक्षण, समाजकारण, संस्कृती आणि राजकारण असं बहुआयामी जीवन जगणाऱ्या वैद्य यांची विविध विषयांवरची १९ पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. दैनिक तरुण भारतच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. पत्रकारिता तसंच सामाजिक कार्यासाठी त्यांना ११ पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज नागपूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
वैद्य यांच्या निधनानं, संघ कार्यकर्ते आपल्या ज्येष्ठ छायाछत्राला मुकले, या शब्दांत संघानं वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी जारी केलेल्या शोकसंदेशात वैद्य यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला आहे.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वैद्य यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसंच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचं सातत्यपूर्ण प्रबोधन केलं, या शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वैद्य यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांच्या निधनानं विदर्भातला ज्ञानदीप मालवला, असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपलं, अशी शोकभावना, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली, तर देशेसेवेसाठी संघर्ष करणारं झंझावाती वादळ शांत झालं, या शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
****
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं काल निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. गोव्याला कामानिमित्त गेले असता तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं. भारतीय विद्या���्थी सेनेचे ते अध्यक्ष होते. दक्षिण मध्य मुंबईतून ते सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. रावले यांच्या निधनाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे.
****
राज्याचं येत्या पाच वर्षांत सौर प्रकल्पांच्या माध्यमातून १७ हजार ३८५ मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दीष्ट असून, राज्याच्या उद्योग क्षेत्राला हे धोरण पूरक असल्याचं ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज - सीआयआयच्या ‘कार्बनविरहित औद्योगिक वाढ - नूतनीकरण मार्ग’ या ऑनलाइन परिषदेत ते बोलत होते. या धोरणांर्गत उद्योग आणि शेतीला स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्यानं राज्याच्या आर्थिक क्षेत्रात क्रांती घडून येईल, असं राऊत यांनी नमूद केलं. या धोरणाअंतर्गत कृषी पंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी येत्या ५ वर्षांत पाच लाख सौर कृषी पंप देण्याचे उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.  
****
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस  मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. आज दुपारी तीन वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात या पथकासमोर नुकसानाचं सादरीकरण करण्यात येणार आहे. उद्या हे पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करणार आहे.
****
सुधारित कृषी कायदे हे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्या निर्णयाचा एक भाग आहेत, या राष्ट्र हिताच्या कायद्यांचं सर्वांनी स्वागत करावं, असं आवाहन लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं बोलत होते. या कायद्यांना काहीजण राजकीय हेतूने विरोध करत असल्याचा आरोप, श्रृंगारे यांनी केला. सरकारने आजपर्यंत कृषीसंदर्भात घेतलेल्या निर्णयांचा श्रृंगारे यांनी आढावा घेतला.
****
मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली. माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर नसीम खान यांची मुंबईच्या प्रचार समिती अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणाही काल करण्यात आली.
****
५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या विविध भाषांमधल्या २३ चित्रपटांची तसंच २० लघुपटांची घोषणा काल करण्यात आली. ‘सांड की आंख’ आणि ‘छिछोरे’ या हिंदी चित्रपटांसह ‘प्रवास’ या मराठी चित्रपटाचा यात समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. हा महोत्सव येत्या जानेवारी महिन्यात गोव्यात होणार आहे.
****
शाश्वत विकासासाठी मराठवाड्यातल्या चारही विद्यापीठांनी एकत्रित येऊन किमान समान कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केलं आहे. ‘महात्मा गांधी मिशन’च्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त काल मराठवाड्यातल्या कुलगुरुंच्या परिषदेत ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या परिषदेत ‘मराठवाड्याच्या शाश्वत विकासात विद्यापीठांची भूमिका’ या विषयावर मान्यवर कुलगुरुंनी विचार मांडले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले, ‘एमजीएम’विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे, विश्वस्त प्राचार्य डॉ.प्रताप बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेत सहभागी झाले. हे विचार मंथन म्हणजे, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विद्यापीठांनी टाकलेलं पहिलं आश्वासक पाऊल आहे. ही सुरुवात अत्यंत सकारात्मक तसंच आशादायक असल्याचं मत डॉ.सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं.
****
परभणी जिल्हा प्रशासनानं यंदा हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांचा ऊर्स रद्द केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव अद्यापही संपलेला नाही, या विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं, जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान हा ऊर्स होणार होता.
****
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव झाला. ॲडलेड इथं झालेल्या या सामन्यात काल तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं अत्यंत सुमार फलंदाजी करत, आजवरच्या निच्चांकी धावसंख्येचा विक्रम नोंदवला. दुसऱ्या डावात भारताचे सर्व फलंदाज अवघ्या ३६ धावात तंबुत परतले. गेल्या ६५ वर्षांत जगातल्या कोणत्याही क्रिकेट संघानं कसोटी सामन्यात केलेली ही निच्चांकी धावसंख्या आहे. भारतीय फलंदाजांपैकी मयंक अग्रवालनं सर्वाधिक ९ धावा केल्या, हनुमा विहारीनं ८, तर कर्णधार विराट कोहलीनं ४ धावा केल्या. फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी फक्त ९० धावांचं लक्ष्य होतं, ते त्यांनी दोन गड्यांच्या बदल्यात सहज साध्य केलं. मालिकेतला पुढचा कसोटी सामना पुढच्या शनिवारी २६ तारखेला मेलबर्न इथं होणार आहे.
****
लातूर इथल्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या पी हरिकृष्ण या विद्यार्थ्याने टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात जागतिक विक्रम नोंदवला आहे. हरिकृष्णने एका तासात न थांबता पेडलच्या साह्याने ९ हजार ५१२ स्ट्रोक यशस्वीपणे पूर्ण केले. त्याच्या या विक्रमाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यात आली. याबाबतचं प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड च्या वतीनं त्याला प्रदान करण्यात आलं आहे. या यशाबद्दल  राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या वतीनं काल हरिकृष्णचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचे प्रशिक्षक प्रविण शिवनगीकर यांचंही विशेष कौतुक करण्यात आलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद जिल्ह्यातले लोककलावंत जालिंदर केरे यांनी केलं आहे.  
****
परभणी महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवण्यात येत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशावरून काल वसमत रस्त्यावरच्या पाच दुकानातून प्लास्टीक कॅरीबॅग, ग्लास, पिशव्या तसंच इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. या पाच दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड लावण्यात आला. उघड्यावर कचरा फेकणाऱ्या चार ��्यक्तींनाही काल प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावण्यात आला.
****
औसा तालुक्यात बेलकुंड इथल्या संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याला कर्ज परतफेड करण्यासाठी ९ वर्षांची मुदत दिली असून, सुरवातीची दोन वर्ष हप्ता भरण्यासही मुभा दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला हा साखर कारखाना, कर्जापोटी लातूर जिल्हा बँकेच्या ताब्यात होता, शासनाने थकहमी घेतल्यानं, जिल्हा बँकेने या कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे दिला आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तसंच हदगाव तालुक्यात राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु आहे. शेतकऱ्यांनी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करावी, आणि बाजार समितीचा एसएमएस मिळाल्यावर संबंधीत केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा, असं आवाहन पणन महासंघाच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांकडून करण्यात आलं आहे. एफ.ए.क्यू दर्जाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरी शिल्लक असेपर्यंत कापूस पणन महासंघाकडून खरेदी सुरू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लक्ष्मण काशीनाथ चांडाळ असं या इसमाचं नाव असून, त्याने ११ ऑगस्ट २०१८ रोजी पत्नी कांचन हिची डोक्यात दगड घालून हत्या केली होती.
****
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या नाटयशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ संपदा कुलकर्णी यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी फेर नियुक्ती झाली आहे. याबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेतल्या सर्व पदाधिकारी, संचालक, तसंच प्राध्यापक वर्गानं डॉ कुलकर्णी यांचं अभिनंदन केलं आहे
****
औरंगाबाद शहरातली नेहरू भवन ही इमारत पाडून याठिकाणी भव्य व्यावसायिक संकुल विकसित करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. यासंबंधीचा प्रकल्प विकास आराखडा तयार झाला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 June 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ जून २०२० सकाळी ७.१० मि. **** ** कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘घरीच योग आणि कुटुंबासह योग’ करत राज्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा ** लडाखच्या गलवान खोऱ्यातल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भारतीय सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा ** देशाच्या काही भागात काल कंकणाकृती तर काही भागात खंडग्रास सुर्यग्रहणाचं दर्शन ** राज्यात तीन हजार ८७० नवे रुग्ण, तर १७० मृत्यूची नोंद. ** औरंगाबाद शहरातही नवे १७० रुग्ण तर चार जणांचा मृत्यू ** परभणी वगळता मराठवाड्यातल्या अन्य सर्व जिल्ह्यातल्या रुग्णांच्या संख्येत वाढ आणि ** शेतकऱ्याचे रूप धारण करत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी औरंगाबादच्या खत विक्रेत्याकडून होणारी फसवणूक आणली उघडकीस **** राज्यात काल आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘घरीच योग आणि कुटुंबासह योग’ या संकल्पनेनुसार काल राज्यातल्या सर्व जिल्ह्यात योग साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध शासकीय-खासगी कार्यालयं, सामाजिक-शैक्षणिक संस्था, संघटनांतर्फे योगाभ्यास करण्यात आला. सुरक्षाविषयक योग्य काळजी घेत प्रत्यक्ष सहभागी होत नागरिकांनी योग केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनच्या हिरवळीवर योग वर्गात सहभागी होऊन योगासनं केली. यावेळी राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील योग वर्गात सहभाग घेतला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली. औरंगाबाद इथं भारतीय वैद्यकीय संघटना-आय.एम.ए.च्या महिला डॉक्टरांनी ऑनलाईन योगचं आयोजन केलं होतं. भारतीय योग संस्थानतर्फे आयोजित चार दिवसीय योग शिबीराचा समारोप काल झाला. जवाहर कॉलनी इथल्या आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास केला. औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा सायकल संघटनेतर्फे औरंगाबाद लेणी इथं गिरिभ्रमण मोहिम आणि योग शिबीर घेण्यात आलं. भगवान बालिकाश्रम इथं श्रीनिवास स्पोर्टसतर्फे योग वर्ग घेण्यात आला. औरंगाबाद इथल्या योग मित्र मंडळातर्फे सहा दिवसीय ऑनलाईन योग विषयक व्याख्यानमाला आणि योगसाधना करण्यात आली. बीड जिल्ह्यात पतंजली योग समितीतर्फे कोरोना विषाणू संसर्गामुळे सामाजिक संपर्क माध्यमातून योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित उपक्रमाला शहर आणि ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं समिती जिल्हाध्यक्ष हेमा विभुते यांनी सांगितलं. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासनातल्या निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन योग अंगीकारण्याचा संदेश दिला. परभणीतही योगाभ्यासकांसह नागरिकांनी घरातच योगासनं करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. लातूर जिल्ह्यात विविध मान्यवर लोकप्रतिनिधी तसंच सामान्य जनतेनं आपल्या कुटुंबासह घरीच योग दिन साजरा केला. शहरातल्या राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालयातले विद्यार्थी तसंच प्राध्यापकांनी सामाजिक संपर्क माध्यमातून योग दिनाची प्रात्यक्षिकं आणि सहभाग असं नियोजन केलं होतं. परभणी, हिंगोली, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. **** योग हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याच्या प्रकियेला गती देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी, काल ऑनलाइन योग प्रश्नमंजुषा स्पर्धेचा शुभारंभ केला. या स्पर्धेचं आयोजन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परीषद- एनसीईआरटीनं केलं आहे. देशभरातल्या सहावी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. विद्यार्थ्यांमध्ये योगविषयक जागरुकता निर्माण करणं तसंच योगविषयक योग्य माहिती मिळवण्यास त्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेच्या आयोजनामागे हेतू असल्याचं निशंक यांनी यावेळी सांगितलं. स्पर्धेचे सर्व प्रश्न बहु पर्यायी असतील आणि हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत ते विचारले जातील. स्पर्धेत सर्वश्रेष्ठ ठरणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जातील. ही ऑनलाईन स्पर्धा २० जुलैपर्यंत सुरू असणार आहे. **** लडाखच्या गलवान खोऱ्यातल्या घटनेनंतर भारत आणि चीनदरम्यानच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्���भूमीवर काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा केली. या बैठकीला संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह आणि हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया उपस्थित होते. चीनच्या प्रत्येक हालचालींना उत्तर देण्यासाठी लष्करानं तयार राहण्याचे निर्देश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत दिल्याचं सांगण्यात आलं. **** देशाच्या काही भागात काल कंकणाकृती तर काही भागात खंडग्रास सुर्यग्रहण पाहायला मिळालं. पृथवीपासून चंद्र दूर गेल्यानंतर त्याचा आकार सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही, अशावेळी सूर्याच्या बाहेरीला बाजूच्या कडा दिसतात, तेव्हा आपणास कंकणाकृती सूर्यग्रहणाचं दर्शन होतं. काल सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ३२ मिनिटांपर्यंत अशा प्रकारच्या सूर्यग्रहणाचं उत्तर भारतीयांना दर्शन झालं. इतर भागात मात्र ते खंडग्रासच्या स्वरूपात पाहायला मिळालं. या कालावधीत सूर्याचा अंदाजे ७० टक्के भाग चंद्रानं व्यापलेला होता. सुर्यग्रहणानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजा भवानी मातेची मूर्ती पुर्वापार प्रथेप्रमाणं सोवळ्यात, पांढऱ्या श्वेत कपड्यात ठेवण्यात आली होती. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं भाविकांनी खंडग्रास सुर्यग्रहणावेळी गोदावरी नदीच्या जलपात्रात, कृष्णकमल, मोक्ष आणि नागघाटावर जप आणि नामस्मरण केलं. सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या काळात पैठणला मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यल्प भाविकांनी गोदावरी पात्रात स्नान केलं. परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरात नेमगिरी परिसरामधील परभणी ॲस्ट्रॉनॉमीक सोसायटीच्या वतीनं काल नागरिकांना सूर्यग्रहण बघण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. **** राज्यात काल तीन हजार ८७० नवे रुग्ण आढळले, यामुळे राज्यातली एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या एक लाख ३२ हजार ७५ एवढी झाली आहे. काल दिवसभरात उपचारानंतर बरे झाल्यामुळे एक हजार ५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत उपचारानंतर ६५ हजार ७४४ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत, तर सध्या ६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज १७० नव्या करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी १०१ रुग्णांचा मृत्यू काल झाला, अन्य ६९ मृत्यू मागील काही दिवसांतले आहेत. त्याची नोंद कालच्या आकडेवारीत घेण्यात आली आहे. १०१ मृत्यूंपैकी सर्वाधिक ४१ मृत्यू मुंबईत झाले आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात १७० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या तीन हजार ५३० झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये ११५ पुरुष आणि ५५ महिलांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ९६८ रुग्ण या संसर्गातून मुक्त होऊन घरी गेले आहेत. तर, काल चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत शहरातल्या संजय नगर मधील ७१ वर्षीय पुरूष, बायजीपुऱ्यातील इंदिरा नगरातील ६६ वर्षीय पुरूष आणि एन आठ मधल्या यशोधरा कॉलनीतल्या ४८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात न्यू बायजीपुरा इंदिरा नगर मधल्या ६५ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एक हजार ३७१ रुग्णांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येत असल्यानं नगरपरिषदेनं आजपासून तीन दिवस जनता संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सिल्लोड व्यापारी महासंघानं पाठिंबा दिला असल्याचं महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल यांनी सांगितलं. वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठानं या काळात बंद राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. **** लातूर जिल्ह्यात काल नऊ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये एक जण लातूर शहरातल्या गवळीनगर भागातला तर एक जण अजिंक्य सिटीतला रहिवाशी आहे. अन्य सात जण हे औसा शहरातले आहेत. यामध्ये चार जण कालन गल्ली तर तीन जण हे कारंजे गल्लीतले रहिवाशी आहेत. दरम्यान, काल आजारातून बरे झाल्यामुळे पाच जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या १५१ झाली असून सध्या ७१ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या आजारामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. **** बीड जिल्ह्यात काल पाच जणांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित आले आहेत. यातील चार जण हे पाटोदा गावातल्या माळेगल्लीतले असून एक जण बीड शहरातल्या शहेनशाह नगर भागातला आहे. जिल्ह्यात आता एकूण बाधित रूग्णांचा आकडा हा १०६ झाला असून यातील ७४ जण हे कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. **** नांदेड जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातल्या रूग्णांची संख्या ३०८ झाली आहे. काल दहा रूग्ण विषाणू मुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता एकूण २१९ रूग्ण बरे झाले आहेत. तर ७५ रूग्ण उपचार घेत आहेत. **** जालना जिल्ह्यात काल तीन नवे रुग्ण आढळले. यामध्ये जालना शहरातली गुडलागल्ली, कन्हैयानगर आणि संभाजीनगर भागातला प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश **** उस्मानाबाद जिल्ह्यात काल दोन रुग्ण आढळले. हे दोघेही तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्गचे रहिवाशी आहेत. यामुळे जिल्ह्यातल्या बाधित रुग्णांची संख्या १७७ झाली आहे. यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३२ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. **** हिंगोली जिल्ह्यात काल दोन लहान मुलींना कोरोना विषाणुची लागण झाल्याचं आढळून आलं. या मुलींची आजी बाधित झाली होती, तिच्या संपर्कात आल्यामुळे या दोन मुलींची तपासणी करण्यात आली. यापैकी एक दोन वर्षाची तर दुसरी आठ वर्षाची आहे. दरम्यान, उपचार घेत असलेले दोन रुग्ण बरे झाल्यानं त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात सध्या २४० रुग्ण झाले असून त्यापैकी २१२ रुग्ण बरे झाले आहेत. **** अहमदनगर जिल्ह्यात काल दिवसभरात १८ नवीन रुग्ण वाढले, असून ही संख्या ३०२ इतकी झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णात संगमनेर तालुक्यातले ७, श्रीगोंदा तालुक्यातले तीन, अहमदनगर शहरातले पाच पारनेर तालुक्यातले दोन आणि अकोले तालुक्यातल्या एका जणाचा समावेश आहे. **** नाशिक शहरात काल १०८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर सहा जणांचा मृत्यू झाला. शहरातल्या एकूण बधितांची संख्या आता १ हजार २०१ झाली असून आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिका क्षेत्रातली रुग्णसंख्या नियंत्रित होत असताना नाशिक महापालिका क्षेत्रात मात्र रुग्ण संख्या झपाट्यानं वाढत असून मृत्यूदर कमी करण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर निर्माण झालं आहे. **** बुलडाणा जिल्ह्यात काल कोरोना विषाणूचे ६ नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता १५७ झाली आहे. यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. **** पुणे शहरात काल दिवसभरात नव्यानं ६२० रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या १२ हजार, ४७४ एवढी झाली आहे. तर दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत मृत���यू झालेल्या रुग्णांची संख्या ५१० वर पोहोचली आहे. **** गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी तीन जण कोरोना विषाणूमुक्त झाल्यामुळे त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४५ झाली असून सध्या १४ बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. **** धुळे शहर आणि परिसरात २६, तर शिरपूरला २५ असे एकूण ५१ व्यक्ती काल कोरोना विषाणूबाधित आढळून आल्या. यामुळे धुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या ५४६ वर पोहचली आहे. यातील ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. **** यवतमाळ इथं काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यु झाला, त्यामुळे जिल्ह्यात या आजारामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या आठ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२५ रुग्ण आढळले असून यापैकी १६१ जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ***** सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल १३ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३० झाली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात २५ सक्रीय रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. **** सोलापूर जिल्ह्यात काल ३९ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २ हजार १२६ झाली आहे. यातील १ हजार ११८ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. **** सांगली जिल्ह्यात काल ८ जणांचा अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या २९४ झाली आहे. **** राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्याचे रूप धारण करत औरंगाबाद शहरातल्या एका खत विक्रेत्या दुकानदाराकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक काल उघडकीस आणली. उपलब्ध असतानाही जाधवमंडी भागातला नवभारत फर्टिलायझरचा दुकानदार शेतकऱ्यांना युरिया देत नव्हता. युरियासोबत अन्य माल खरेदी करण्याचा तो आग्रह करत होता. मंत्री भुसे यांनी अगोदर एक डमी ग्राहक पाठवला, त्यानंतर ते स्वतः शेतकरी बनून या दुकानात गेले, अगोदर त्यांनी युरियाच्या दहा गोण्या मागितल्या, त्यानंतर पाच गोण्या देण्याची मागणी केली, मात्र दुकानदारांने त्या देण्यास नकार दिला, त्यानंतर भुसे यांनी आपली ओळख देत जिल्हा कृषी अधिक्षकांना दुकान तसंच गोदामाची तपासणी करण्याचे आदेश दिले. सदरील दुकानदाराकडे युरियाचा पुरेसा साठा आढळून आला. याचवेळी भुसे यांनी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले. **** मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलीसांना हवा असलेला, तहव्वूर राणा याचं अमेरिकेतून भारतात हस्तांतरण करण्याविषयी आपण केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. राणा याला अलीकडेच अमेरिकेत अटक झाली आहे. त्याच्यावर मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यामुळे भारतानं त्याला फरार म्हणूनही घोषित केलं होतं, याशिवाय विशेष न्यायालयानं त्याच्याविरोधात २८ ऑगस्ट २०१८ला अटक वॉरंटही जारी केलं होतं. **** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग पंधराव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतीलिटर ३५ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतीलिटर ६० पैसे वाढ नोंदवण्यात आली. १५ दिवसात पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे ७ रुपये ९७ पैसे, तर डिझेलच्या किमतीत लिटरमागे आठ रुपये ८८ पैसे वाढ झाली आहे. **** कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना पिक कर्जाचं वाटप करण्यात यावं या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष राज्यभर आंदोलन करणार असल्याचं काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सांगितलं. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं कर्जमुक्ती योजनेची अंशतः अंमलबजावणी केली असून यामुळे लाखो शेतकरी खरीप हंगामासाठीच्या पिक कर्जापासून वंचित राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार असल्याचं पाटील म्हणाले. आंदोलनादरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठीच्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल. कापूस, तूर हरभरा आदी धान्य विक्री अभावी शेतकऱ्यांकडे पडून असल्यामुळे शेतकरी कर्जफेड करू शकले नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. **** ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसंच योग्य सावधानता बाळगावी, असं आवाहन राज्य सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे. विशेषत ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत विशेष खबरदारी घेवून कोणत्याही अनोळखी लिंकवर, तसंच कोणत्याही संकेतस्थळावर आपली माहिती, आपल्या बँक खात्यांची माहिती, डेबिट क्रेडिट कार्ड ची माहिती देऊ नये असं सायबर विभागानं म्हटलं आहे. **** पूर्व विदर्भातल्या गोंदिया जिल्ह्याची शान समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांची गणना या वर्षी १३ जून ते १८ जून दरम्यान करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तसंच नजीकच्या बालाघाट जिल्ह्यात सारस पक्ष्याच्या संख्येत वाढ झाल्यानं, सारस प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सारस पक्षाच्या संवर्धनाचं काम करणाऱ्या सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले...... गोंदिया जिल्हा सोबतच लागलेला भंडारा जिल्हा आणि मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्हा या तीन जिल्ह्यांमध्ये आम्ही गणना केली जवळपास एक आठवडा गणना केली यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास ४७ सारस पक्षी यावर्षी आपल्याला गणनेने मध्ये निदर्शनात आले सोबतच बालाघाट मध्ये जवळपास ५८ सारस पक्षी निदर्शनात आले गोंदिया जिल्ह्यामध्ये पाच ते सहा सारस वाढलेल्या आणि बालाघाट जिल्ह्यामध्ये पण सात ते आठ सारस वाढलेले आपल्याला दिसून येतात पूर्ण वर्ष भर एक प्रोसेस आहे त्याचा प्रोटेक्शन करणं आणि गणना हा त्या Conservation मधला एक भाग आहे **** परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रभागातून मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी नगर विकास मंत्रालयानं ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक ४ आणि १० मध्ये पुलाची निर्मिती, रस्त्यांचं डांबरीकरण तसंच सिमेंट कॉंक्रीट नाली बांधकामासाठी हा निधी मंजूर झाला आहे. **** हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी शहरात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे एकाचा मृत्यू झाला. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नगरातील विठ्ठल नेमाजी खिल्लारे पत्रा लागल्यानं गंभीर जखमी झाले होते. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कळमनुरी बुडकी नाल्यात पुरामुळे वाहून गेलेल्या वयस्क दांपत्यापैकी महिलेचा मृतदेह काल आढळला. शुक्रवारी झालेल्या या दुर्घटनेत हे दांपत्य बैलगाडीसह वाहून गेलं होतं. यापूर्वी परवा पुरुषाचा मृतदेह आढळला होता. नांदेड तालुक्यातल्या लिंबगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. काल या भागात ७१ मिलीमीटर पाऊस पडल्याचं सांगण्यात आलं. **** विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सामाजिक माध्यमावर अश्लील भाषेत मजकूर लिहिल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरोधात लातूर जिल्ह्यातले औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तात्काळ गुन्हेगाराचा शोध घेवून त्याच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. **** परभणी जिल्ह���यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत गेल्या काही दिवसांत १५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात आतापर्यंत १३३ पुर्णांक ४३ मिलीमीटर पाऊस झाला. **** येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. **** परभणी जिल्ह्यात टाळेबंदीतून वगळण्यात आलेल्या सर्व आस्थापना आजपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्यावतीनं जारी करण्यात आले आहेत. अन्य आस्थापना मात्र बंदच राहतील असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. **** महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीस लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय महावितरणनं घेतला आहे. विद्युत संचालन-दुरुस्ती यासह विविध विभागात कार्यरत सर्व तांत्रिक-अतांत्रिक, बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही यात समाविष्ट आहेत. **** पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे काल औरंगाबादच्या पैठण गेट इथं आंदोलन करण्यात आलं. या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासह गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना पक्षातर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली. **** यवतमाळच्या घाटंजी येथील बेलोरा रोडवरील वाघाडी नदीत बुडून काल बापलेकाचा दुदैवी मृत्यू झाला. वाघाडी नदीच्या काठावरील शनी मंदिरात पूजापाठ-विधी करण्यासाठी मृत बापलेकासह कुटुंबीय गेले असतांना ही घटना घडली. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 June 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०१ जून २०२० सकाळी ७.१० मि. **** ** राज्य सरकारचं ‘मिशन बिगीन अगेन’ नवं धोरण; तीन टप्प्यात राज्यातल्या टाळेबंदीची तीव्रता कमी करण्याची घोषणा ** रेड झोनमधल्या शहरातही दुकाने आणि अन्य व्यवहार सुरू करण्यास परवानगी; मात्र प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही सवलत नाही ** विद्यापीठस्तरीय पदवी, पदविका, पदव्युत्तर विषयांच्या अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द; सेमिस्टरमधल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय ** विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर - मुख्यमंत्री ** राज्यात दोन हजार ४८७ नवीन कोरोना विषाणू बाधित रूग्ण; उपचारादरम्यान ८९ रूग्णांचा मृत्यू ** औरंगाबादमध्येही तीन जणांचा मृत्यू तर ४५ नवे रूग्ण ** हिंगोली, जालना, परभणी, नांदेड आणि उस्मानाबादमध्येही रूग्णांच्या संख्येत वाढ ** कोविड १९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी ** हिंदी चित्रपट सृष्टीतले नव्या दमाचे संगितकार, गायक वाजिद खान यांचं मुंबईत निधन आणि ** राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन; जालना आणि परभणी जिल्ह्यात वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू **** केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनंही राज्यात ३० जूनपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचबरोबर नवी सुरूवात करण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ नावानं नवं धोरणही राबवण्याचा ठरवलं आहे. या धोरणानुसार आता तीन टप्प्यात टाळेबंदीची तीव्रता कमी करण्यात येणार आहे. चौथ्या टाळेबंदीच्या काळात राज्य सरकारनं रेड झोन वगळता अन्य भागात विविध व्यवहार आणि सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता रेड झोनमध्ये येणाऱ्या मुंबई महापालिकेसह महानगर परीसर, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, आणि नागपूर या महानगरपालिकांच्या हद्दीत व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रतिबंधित -कंटेन्मेंट झोनमध्ये टाळेबंदीचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. मिशन बिगीन अगेनचा पहिल्या टप्प्याची सुरुवात परवा 3 जून पासून होणार आहे टप्प्यात काही अटींवर बीच सरकारी किंवा खासगी मैदानं गृहनिर्माण सोसायट्यांचे मैदान अशा ठिकाणी सायकलिंग जॉगिंग धावण्याचा यासारखे व्यायाम करण्यास परवानगी असेल सकाळी 5 ते 7 या वेळेत हा व्यायाम करता येईल समूहाने कोणती कृती करता येणार नाही एकमेकांमध्ये अंतराच्या नियमाचं पालन करत स्वयंरोजगाराचा व्यवसाय कार्यरत असलेल्या प्लंबर इलेक्ट्रिशियन पेस्ट कंट्रोल आणि तांत्रिक व्यवसायिकांना आपलं काम करता येईल वाहन दुरुस्ती ची गॅरेज वर्कशॉप ही सुरू करता येतील पण तत्पूर्वी वाहन दुरुस्ती बाबत ची पूर्वसूचना वाहनधारकांना द्यावी लागेल अत्यावश्यक सेवेमध्ये येणारे सरकारी कार्यालय वगळून इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के किंवा कमीत कमी 15 कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा 5 जून पासून सुरू होईल या मध्ये काही अटींवर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहेत मात्र यामध्ये मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल त्यांना परवानगी नसेल सर्व दुकाने आणि बाजारपेठा एक दिवस एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसर्या बाजूची आधारावर सुरू करण्यासाठी परवानगी असणार आहे कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही तसेच एकदा खरेदी केलेले कपडे बदलण्यासाठी ही परवानगी असणार नाही लोकांनी दुकानांवर किंवा बाजारात जाताना पायी किंवा सायकल वर जावं शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा अत्यावश्यक असलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल किंवा यासाठी वाहनही वापरता येणार नाहीत एखाद्या बाजारपेठेत एकमेकांपासून अंतर राखण्याचा नियमांचा अवलंब केला जात नसेल तर सदर बाजार पैसे तात्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत रिक्षा,टॅक्सी येत्या शुक्रवारपासून सुरू करण्यात येतील एक चालक अन्य दोन प्रवाशांना यातून प्रवास करण्याची परवानगी असेल सर्व चारचाकी वाहनासाठी हाच नियम राहील मात्र दुचाकीवरून फक्त एकच जण जाऊ शकेल मिशन बिगीन अगेनचा तिसरा टप्पा 8 जून पासून सुरू होईल या खासगी कार्यालयात 10% कर्मचाऱ्यांसह सुरू करता येतील इतर कर्मचाऱ्यांना घरून काम करावं लागणार आहे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आपल्या मार्गदर्शक तत्त्वात 8 जून पासून धार्मिक तसेच प्रार्थनास्थळ, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण��यास परवानगी दिली असती तरी राज्य सरकारने मात्र यावर बंदी कायम ठेवली आहे याशिवाय शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासही बंदच राहणार आहेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो रेल्वे, चित्रपटगृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन नाट्यगृह, प्रेक्षागृह, मंगल कार्यालय बंद राहतील सामूहिक पद्धतीने साजरे होणारे सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांनी बंदच राहणार आहेत याशिवाय केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा सेंटरही 30 जून पर्यंत बंद राहणार आहेत आंतर जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद राहील मात्र जिल्हांतर्गत समतेच्या 50% प्रवाशांसह ती सुरू राहील यापूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत सर्वांनी आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड करण्याचा सल्लाही सरकारने आपल्या कार्य जारी केलेल्या नियमावलीला आहे **** राज्यात पदवी, पदविका, पदव्युत्तर विषयांच्या अंतिम सत्राच्या परिक्षा तुर्तास रद्द करण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन जनतेशी संवाद साधत होते. विद्यार्थ्यांना यापूर्वीच्या सेमिस्टरमधल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात येईल, असं ते म्हणाले. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, शिक्षणाचा खेळखंडोबा हा होऊ द्यायचा नाही या मुलाने अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे केवळ आता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून आपण ठरविलेले आहे या विद्यार्थ्यांना जेवढे सेमिस्टर झाले त्याची सरासरी करुन मार्क देऊन पास करायचं आणि जर पास केल्यानंतर जर कोणाला असं वाटत असेल तर परीक्षा झाली असती तर मी आणखीन चांगले मार्क मिळवू शकलो असतो ज्यांना – त्यांना परीक्षेला बसून अधिक मार्क मिळवण्याची त्यांची इच्छा असेल त्यांची परीक्षा घेण्याचे तयारी ठेवतो आहोत म्हणजे आपण त्यांना टेन्शन मधून मोकळं करत आहोत विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर देत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोना विषाणूचा फैलाव न झालेल्या राज्याच्या दुर्गम भागातल्या ज्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही, त्या शाळा सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा नियम पळून उघडता येतील, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या भागातल्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करता येईल, असं ते म्हणाले. यासंदर्भात विशेषत: ग्रामीण भागातल्या शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाळी आपत्तीसाठी राज्य पूर्णपणे सज्ज असल्याचं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. **** कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक डॉक्टर आणि परिचारिकांना मानधन तत्वावर सेवेत घेण्यात यावं, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरोगी आणि अंतर्वासिता पूर्ण केलेल्या नोंदणीकृत डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा ८० हजार रुपये मानधन दिलं जाईल. तसंच भूलतज्ज्ञ आणि अतीव दक्षता तज्ज्ञांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. मुंबईतली परिचारिकांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर तातडीनं सेवेत घेण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** राज्यात काल दिवसभरात दोन हजार ४८७ नवीन कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. यामुळे राज्यातल्या एकूण रूग्णांची संख्या ६७ हजार ६५५ एवढी झाली आहे. दिवसभरात उपचारादरम्यान ८९ रूग्ण मरण पावले. त्यामुळे या आजारानं राज्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता दोन हजार २८६ एवढी झाली आहे. काल दिवसभरात एकूण एक हजार २४८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत एक हजार २४४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतली एकूण रुग्णसंख्या ३८ हजार ४६४ झाली आहे. काल दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईतल्या मृतांची एकूण संख्या एक हजार २७९ एवढी झाली आहे. काल ४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी ४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ५४३ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये जुना मोंढ्यातलं भवानी नगरमध्ये चार, कैलास नगर गल्ली क्रमांक दोन, सिडको एन सहा, किराडपुरा इथं प्रत्येकी तीन, जुना बाजार, मनजित नगर इथं प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. जाफर गेट, संजय नगर, जसवंतपुरा, व्यंकटेश नगर, समता नगर, नवीन बायजीपुरा, अहिंसा नगर, पिसादेवी रोड, बजाज नगर, देवळाई परिसर, नाथ नगर, बालाजी नगर, हमालवाडी, भोईवाडा, सुराणा नगर, आझम कॉलनी, सादात नगर, महेमुदपुरा, निझामगंज कॉलनी, शहागंज, बीड बायपास रोड, स्वप्न नगरी, चंपा चौक, शताब्दी नगर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. अन्य भागातले तीन रुग्ण आहेत. दरम्यान, औरंगाबादमध्ये काल तीन बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये निजामगंज कॉलनीतली ५२ वर्षीय तर किराडपुरा भागातल्या ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जुना बाजारमधल्या ७५ वर्षीय पुरुषाचाही काल मृत्यू झाला. या आजारानं औरंगाबादमध्ये एकूण मृतांची संख्या ही ७२ झाली आहे. काल औरंगाबाद मध्ये १२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ४४२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. **** हिंगोली जिल्ह्यात काल पुन्हा आठ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित रूग्णांची संख्या १८० झाली आहे. यामध्ये वसमत, गिरगाव, कौठा, कुरूंदवाडी इथला प्रत्येकी एक जण तर हयातनगर आणि पहेणीचे प्रत्येकी दोघे जण आहेत. सध्या ७५ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १०५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. **** जालना जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातल्या रूग्णांची संख्या १२७ झाली आहे. अंबड तालुक्यातल्या मठ पिंपळगाव आणि जालना तालुक्यातल्या गोलवाडी इथल्या प्रत्येकी एका महिलेचा आणि गोलापांगरी इथल्या एका अंगणवाडी सेविकेचा यात समावेश आहे. परतूर तालुक्यातल्या मापेगाव इथल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूनंतरचा अहवाल बाधित असल्याचा आला आहे. जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. **** नांदेड जिल्ह्यातही काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले. दोन्ही रूग्ण मुखेड तालुक्यातल्या भेंडेगाव इथले असून, ते मुंबईहून नुकतेच परतले आहेत. आता जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. आजपर्यंत १०३ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. **** परभणी शहरात काल आणखी दोन जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. मातोश्री नगर आणि त्रिमूर्ती नगर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ८२ झाली आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. सुंभा आणि नळदुर्ग इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळाला. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७३ झाली आहे. **** बीड जिल्ह्यात काल १४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी द���ण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २९ जण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या २७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. **** कोविड १९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. कोविड १९ ची महामारी आणि टाळेबंदीच्या काळातले अनुभव देशाला स्वावलंबाच्या वाटेवर पुढे जायला उपयुक्त ठरतील असं सांगून पंतप्रधानांनी अनेक प्रेरणादायी उदाहरणांचा उल्लेख केला. यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथल्या राजेंद्र जाधव या शेतकऱ्यानं तयार केलेल्या सॅनिटायझर फवारणी यंत्राचंही पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलं. आपल्या संशोधनाबद्दल माहिती देतांना जाधव म्हणाले.... कोरोनावर मात आपण एखाद्या मशीन करावा असं माझ्या डोक्यात मशीन बनवण्याचे माझ्या डोक्यात कल्पना आली तर हे आणि मशीन सॅनिटायझरींग करण्यासाठी बनवले त्याच्यामध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या त्याच्यावरती आणि बरच मटेरयिल जमा करून साहित्य आणून हे तयार केलेले मशीन आहेत लोकं रस्त्याने ये-जा करतात काही कोरोनाबाधित लोकांचे जे काही वाहनांना किंवा दरवाजांना जाता-येताना जो संसर्ग होतो त्याच्यासाठी हे कोरोनाचे जंतू नष्ट होण्यासाठी ह्या मशीन चा उपयोग होऊ शकतो सध्याच्या कोरोना विषाणूच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं केलेल्या काही उपाययोजनांची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. पाणी ही आपली जबाबदारी असून, येत्या पावसाळ्यात गावागावात सोप्या पारंपरिक उपायांनी पाणी जिरवलं पाहिजे, असं आवाहन करत पंतप्रधानांनी, येत्या पाच जून रोजी 'पर्यावरण दिना'निमित्त प्रत्येकानं आपापल्या परिसरात काही झाडं लावावीत, तसंच उष्णता वाढत असल्यामुळे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी असं सांगितलं. **** परभणी महानगरपालिकेनं ३१ मे पर्यंतचा थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कर एकरकमी भरणा केल्यास, मालमत्ता कराच्या विलंब शास्तीवर ५० टक्के तर पाणीपट्टी कराच्या विलंब शास्तीवर शंभर टक्के सूट देण्याची मुदत ३० जून पर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत ३१ मे पर्यंत होती. **** रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यातही कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी खासदार राजीव सातव यांनी केली आहे. जिल्ह्यात रुग्णांचा आकडा लक्षणीय असून इथल्या रुग्णांचे तपासणीचे नमुने औरंगाबाद किंवा नांदेडला पाठवावे लागतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असल्यानं हिंगोलीत प्रयोगशाळा सुरू व्हावी, अशा मागणीचं पत्र सातव यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पाठवलं आहे. **** हिंदी चित्रपट सृष्टीतले नव्या दमाचे संगितकार, गायक वाजिद खान यांचं आज पहाटे मुंबईत निधन आलं. ते ४२ वर्षांचे होते. किडनीशी संबंधित जंतु संसर्गामुळे प्रकृतीत बिघाड झाल्यानं, त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे त्यांचा मृत्य झाला. त्यांनी साजिद खान यांच्यासोबत साजिद-वाजिद या नावानं अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेल्या दबंग, वाँटेड, एक था टायगर अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. **** राज्यात काल बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झालं. रोहिणी नक्षत्रावरच्या हा पाऊस होता. मराठवाड्यात औरंगाबाद, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद, जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तर, जालना, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाची नोंद झाली. या पावसामध्ये वीज अंगावर पडून दोन जणाचा मृत्यू झाला. औरंगाबाद शहरात काल रात्री दहा वाजेच्या सुमारास चांगला पाऊस झाला. सिल्लोड तालुक्याच्या अनेक भागात तसंच फुलंब्री तालुक्यातल्या वडोद बाजार इथंही काल दुपारी वादळी वारा, मेघ गर्जनेसह पाऊस झाला. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या राजूर, परिसरात सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. टेंभुर्णीसह चंदनझीरा इथंही पाऊस झाला. काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली. जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात आळंद इथं शेतात काम करत असणाऱ्या एका युवकावर वीज पडल्यानं त्याचा मृत्यू झाला. भोकरदान तालुक्यात खामखेडा इथं वीज पडून एक दुचाकी खाक झाली. जालना तालुक्यात पळसखेडा ठोबरे इथं घरावरील पत्रं उडाल्यानं नऊ जण जखमी झाले. बीड शहरासह धारुर, केज, परळी, अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यात संध्याकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात पाथरी, गंगाखेडसह जिंतूर, पालम, मानवत, सेलू तालुक्यात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात संध्याकाळी वादळी पाऊस पडला. मानवत तालुक्यात कोल्हावाडी तर, बोरी इथं घरावरील पत्रं, शेतातले शेड, विद्युत वितरणाचे खांब यांचं नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी सहाच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. पावसामुळं बऱ्याच ठिकाणाचा विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. शिरडशहापूर इथं एका नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं त्यानं पेट घेतला. सेनगाव तालुक्यात हाताळा, आजेगा परिसरात वाऱ्यामुळं अनेक घरांवरील पत्रं उडाली. औंढा, केंद्रा बुद्रुक, कहाकर, ताकतोडा, वलाना, नरसी नामदेव, येहळेगाव सोळंके या भागातही पाऊस झाला. नांदेड शहरात हलका ते मध्यम तसंच कंधारसह लोहा इथंही चांगला पाऊस पडला. लातूर जिल्ह्यात लातूरसह, निलंगा आणि औसा शिरुर तालुक्यात रिमझीम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी कमी -अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात येडशी इथं वाऱ्यामुळं अनेक घरांसह दुकानावरील पत्रं उडाली. अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटून विज पुरवठा खंडीत झाला. भूम तालुक्याच्या काही भागातही काल जोरदार पाऊस झाला. लातूर तालुक्यात चिकलठाणा इथं शेतात काम करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर वीज कोसळल्यानं ती गंभीर जखमी झाली. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं परवा तीन जूनपर्यंत महाराष्ट्रासह गुजरात किनारपट्टीवर वादळ धडकणार असल्याचं हवामान विभागानं सूचित केलं आहे. याच्या परिणामस्वरुप पुढचे दोन दिवस मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यतेचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानही वर्तवला आहे. *** हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि वसमत इथं काल पोलिस दलातले अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये मधुमेह, हृदयरोग, थर्मल गनच्या साह्याने तापाची तपासणी, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब, अस्थीरोग, त्वचारोग अशा रोगासंबंधी तपासण्या तज्ञ ��ॉक्टरांकडून करण्यात आल्या. पोलीस मुख्यालयाचे ४८ अधिकारी आणि ८४१ कर्मचाऱ्यांची यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. **** लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ते रावनकोळा या नांदेड जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झाला. केंद्रीय रस्ता निधीतून होत असलेल्या या १८ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामावर ६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. **** बीड शहरातले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व्यापारी आणि बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, हिरालाल सारडा यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. नगरसेवक, मंत्री बँक, हिरालाल चौक व्यापारी महासंघ, राजस्थानी सेवा समाजाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता बीड शहरातल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करताना शरीरातलं तापमान मोजण्या सोबतच ऑक्सीमीटरद्वारे तपासणी व्हावी, तसंच आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, कोरोना कक्षात काम करणारे कर्मचारी, यांना आर्सेनिक अल्बम थर्टीचं वाटप केलं जावं असा आदेश उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी आरोग्य विभागाला दिला आहे. कांबळे यांनी काल उस्मानाबाद तालुक्यातल्या सुंबा या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीनं मास्क, तसंच सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. **** अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची नायगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुनिता कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी तिलोत्तमा नायगावकर तर कोषाध्यक्षपदी रोहिणी जोशी यांची निवड झाली आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं कृषी विज्ञान केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं महिला शेतकऱ्यांसाठी ऑडिओ कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. घरगुती बियाणं वापरत असताना करावयाची बीजप्रक्रिया, एकरी वापरावं लागणारं बियाणे, बियाण्यांची उगवण क्षमता यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. ****  मुंबई शहर आणि उपनगरात व्यावसायिक आस्थापनं रात्रभर सुरु ठेवण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी  ”शिवभोजन” योजनेसाठी आधारकार्ड दाखवण्याची सक्ती नसल्याचा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचा खुलासा  नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला तत्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार  मराठवाड्यातला शिल्पकलेचा आविष्कार हा आर्थिक संपन्नता आणि राजकीय स्थैर्याचं द्योतक - ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रभाकर देव यांचं प्रतिपादन आणि  तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा समारोप; ७५ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र प्रथम **** मुंबई शहर आणि उपनगरात येत्या सव्वीस तारखेपासून मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनं रात्रभर सुरु ठेवण्याच्या निर्णयाला या राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची काल मुंबईत बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. रात्रभर आस्थापनं चालू ठेवणं कोणासही बंधनकारक नसेल, तसंच पब आणि बारसाठीची कालमर्यादा मात्र कायम राहणार आहे. या निर्णयामुळे सेवा क्षेत्रातली मनुष्य बळाची गरज वाढून रोजगार निर्मितीला हातभार लागेल, असं मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी, 2017 मध्ये केलेली सुधारणा रद्द करण्यात आली आहे. आता पूर्वीप्रमाणे विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्यांची निवड करण्याला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची थेट निवड पद्धतही रद्द करण्यात आली आहे. आता निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णयही कालच्या या बैठकीत घेण्यात आला. ”तान्हाजी-द अनसंग वॉरियर” या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू आणि सेवा करातून सूट देण्याचा तसंच वस्तू आणि सेवा कर सुधारणा अधिनियम, 2019 मध्ये अनुषंगिक सुधारणेच्या निर्णयलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. **** येत्या प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणार असलेल्या ”शिवभोजन” योजनेसाठी आधारकार्ड दाखवण्याची सक्ती नसल्याचा खुलासा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात तसंच महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. या योजनेनुसार एका भोजनालयात दररोज दुपारी बारा ते दोन या वेळेत किमान ७५ तर कमाल दीडशे थाळी भोजन, दहा रुपये दराप्रमाणे उपलब्ध असेल. **** केंद्रीय मंत्रिमंडळाचीही काल बैठक झाली. इतर मागास वर्ग आयोगाला सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं या बैठकीत घेतला. देशातल्या सहा राष्ट्रीय तंत्रज्ञान विद्यापीठांसाठी चार हजार तीनशे एक्काहत्तर कोटी रुपयांचा निधीही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. **** राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल पंतप्रधान राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्राच्या अथर्व मनोजकुमार लोहार या सर्वात कमी वयाच्या तबला वादकाला कला आणि संस्कृती विभागाचा पुरस्कार देण्यात आला तर देवेश पंकज भय्या याला प्रतिभावान युवा गणितज्ज्ञ म्हणून गौरवण्यात आलं. **** नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला तत्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या एकशे त्रेचाळीस याचिकांच्या एकत्रित सुनावणीला कालपासून सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. यासंदर्भात केंद्रसरकारची बाजू ऐकल्याशिवाय काहीही निर्णय देणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. तसंच, या याचिकांची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णयही न्यायालयानं काल घेतला. या याचिकांवर प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारला चार आठवड्यांत उत्तर देण्यास न्यायालयानं सांगितलं. याशिवाय, सर्वोच्च न्यायालय या याचिकांवर निर्णय देईपर्यंत कोणत्याही उच्च न्यायालयानं या कायद्यासंदर्भातल्या याचिकांची सुनावणी करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयानं काल दिले. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ जानेवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६१वा भाग असेल. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** मराठवाड्यात प्राचीन काळापासून दिसून येत असलेला शिल्पकलेचा आविष्कार हा मराठवाड्याच्या आर्थिक संपन्नतेचं, तसंच राजकीय स्थैर्याचं द्योतक आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रभाकर देव यांनी केलं आहे. औरंगाबाद इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात सुरू असलेल्या इतिहास महोत्सवातल्या परिसंवादात ते काल बोलत होते. हा कलाविष्कार स्वांतसुखाय असल्याचं सांगताना प्रभाकर देव म्हणाले... अंजठा-वेरूलच्या लेण्यापासून ते पितळखोऱ्याच्या लेण्यापासून ते अगदी चालूक्यकालीन देवळापर्यंत, यादवकालीन देवळापर्यंत झालेला हा सगळा जो कलाविष्कार आहे तो कलाकारांनी केलेला स्वांतसुखाय हा कलाविष्कार आहे. पहिल्या दूसऱ्या शतकापासून सूरू असलेला हा कलाविष्कार मराठवाड्यामध्ये थेट तेराव्या शेतकापर्यंत सातत्याने चालू आहे. या परिसंवादात राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे, जवाहरलाल नेहरु विद्यापीठातले निवृत्त प्राध्यापक डॉ हरबन्स मुखिया यांची व्याख्यानं झाली. आज या इतिहास महोत्सवाचा समारोप होणार आहे. **** केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथं झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी राही नितीन गायकवाड आणि जाह्नवी संजू मुकींद सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. स्मार्ट इलेक्ट्रीक व्हीकल चार्जिंग अॅंड स्पीड कंट्रोलर प्रकल्प त्यांनी या परिषदेत सादर केला. पर्यावरण रक्षण तसंच सुरक्षित रस्ते वाहतूक, इंधन बचत आदींसाठी उपयुक्त अशा या प्रकल्पाचं या परिषदेत कौतुक झालं. या यशाबद्दल या विद्यार्थिनींसह त्यांच्या मार्गदर्शक डॉ. प्राध्यापक वंदना जाधव यांना महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव थोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. **** गुवाहाटी इथं काल तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा समारोप झाला. केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत ७५ सुवर्ण पदकांसह एकूण २४५ पदकं जिंकून महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक मिळवला. ६३ सुवर्ण पदक मिळवून हरियाणा दुसर्या, तर ३६ सुवर्ण पदकांसह दिल्ली तिसर्या स्थानावर राहीला. या तिनही संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. **** परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठं आणि महाबीज यांच्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत २०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. **** स्वामी रामानंद तीर्थ यांनी पुकारलेला हैदराबाद मुक्तिलढा हा प्रतिगामी अन्याय्य निजामी राजवटी विरुद्धचा लढा होता, असं मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते प्राध्यापक शमसुद्दिन तांबोळी यांनी म्हटलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल अंबाजोगाई इथं, जागर लोकशाहीचा या कार्यक्रमात ते बोलत होते. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. **** जनता दल सेक्युलरच्या नांदेड शाखेचा सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांना काल प्रदान करण्यात आला. तर सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार अहमदनगर इथले पत्रकार सुधीर लंके यांना प्रदान करण्यात आला. माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतीचिन्ह, देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. **** ब्राह्मण समाजाच्या उत्थानासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, तसंच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीनं बीड इथं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर काल धरणं आंदोलन करण्यात आलं. या मागण्यांचं निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना देण्यात आलं. अंबाजोगाई इथंही ब्राह्मण समाजाच्यावतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन सादर केलं. **** नागरिकत्व सुधारणा कायदा हा शरणार्थी हिताचा असून घुसखोरांविरोधात कारवाई करणारा असल्याचं प्रसिद्ध अभिनेते दलितमित्र राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं, एका व्याख्यानात बोलत होते. जे लोक वर्षानुवर्षे भारतात राहत आहेत त्यांना या कायद्यामुळे कसलाही धोका नाही, याकडे सोलापूरकर यांनी लक्ष वेधलं. **** नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एक आरोपी शिक्षक सय्यद रसुल याला पोलिसांनी अटक केली आहे. या चारही शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, आरोपी शिक्षकांना अटक करुन फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी काल जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आरोपी शिक्षकांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. बिलोली शहरात बंद पाळण्यात आला. आरोपींवर कारवाईच्या मागणीची निवदेनंही विविध संघटनांकडून प्रशासनाला देण्यात आली. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15  September 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा. **** निर्यात आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी केंद्र सरकारनं सुचवलेल्या उपाय योजनांचं उद्योग क्षेत्रानं स्वागत केलं आहे. अर्थमंत्र्यांनी सुचवलेले उपाय अर्थव्यवस्थेला चालना देणार असल्याचं भारतीय उद्योग महासंघाचे सरसंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. आसोचेमचे अध्यक्ष बी. के. गोएंका यांनी, या उपाययोजनांमुळे निर्यातीला मदत होणार असून, भविष्यात भारतीय निर्यातदार जागतिक स्तराच्या दर्जाचे होतील, असं मत व्यक्त केलं आहे. निर्यातक्षम वाणिज्यिक वस्तूंच्या शुल्क आणि करांमध्ये सूट, निर्यातदारांना ५० हजार कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन अशा अनेक उपाययोजना सरकारनं केल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं होतं. जीएसटीमधे जमा झालेला कर परतावा स्वयंचलित असेल, या महिन्याच्या शेवटी तो लागू केला जाईल, असं सांगतानाच, निर्यातदारांसाठी प्राथमिक क्षेत्र कर्ज प्रणालीत ३६ हजार कोटी ते ६८ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या होत्या. **** थोर अभियंते सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या यांची जयंती अभि���ंता दिन म्हणून साजरी केली जाते. आज देशभर साजऱ्या होत असलेल्या अभियंता दिनानिमित्त उपराष्ट्रपति एम. वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतंत्र भारताच्या पायाभरणीत विश्वेश्वरैया यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ असल्याचे उद्गार उपराष्ट्र्पती नायडू आणि पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. **** गंगा नदीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू मैदानात ग्रेट गंगा रन-२०१९ या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय जलशक्ती आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. सर्व वयोगटातल्या लोकांनी यात सहभाग घेतला. **** दैनंदिन व्यवहारात राष्ट्रभाषा हिंदीचा प्रभावी वापर केल्याबद्दल राज्यातल्या आठ केंद्रीय संस्थांना काल नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हिंदी राजभाषा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हिंदी भाषा दिनाचं औचित्य साधून वर्ष 2018-19 च्या राजभाषा किर्ती पुरस्कार, तसंच राजभाषा गौरव पुरस्कारांचं यावेळी वितरण करण्यात आलं. **** गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातल्या ग्यारापत्ती जंगलात आज पहाटे झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकातील जवानांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केलं. कालपासून या जंगलात पोलिसांचं नक्षलविरोधी अभियान सुरू होतं. यादरम्यान, आज पहाटे एका ठिकाणी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे मारले गेले, तर इतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या दोघांचे मृतदेह आणि काही साहित्य ताब्यात घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्तृत्वाखाली सुरू असलेली भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यात जाणार आहे. या यात्रेदरम्यान वाई इथं स्वागत सभा होणार असून, त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता सातारा इथं पहिली, तर कराड इथं दुसरी सभा होणार आहे. ही यात्रा वाई, कोरेगाव, सातारा, कराड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांतून जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पोलिस दलानं पूर्वतयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या समाजकंटकांची यादी तयार करण्यात येत असून, बंदोबस्तासाठी तैनात करण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं देखील निश्चित करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलांनाही सुरक्षेसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. **** अमरावती इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीनं काल सीताफळ संशोधन केंद्राचा कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सीताफळ हे पीक कोरडवाहू क्षेत्राला तारून नेणारं असल्यानं या केंद्रानं सीताफळाच्या विविध वाणांवर संशोधनासह प्रक्रिया, साठवणूक आणि विपणनासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन बोंडे यांनी यावेळी केलं. देशातल्या सीताफळ उत्पादनापैकी ३१ टक्के उत्पादन महाराष्ट्रातच होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. **** मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुळे वसई, पालघर आणि भिवंडीसह अनेक भागांत पुन्हा पाणी तुंबल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं बदलापूर गावाकडे जाणारा ब्रिटिशकालीन छोटा पूल पाण्याखाली गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातही पावसामुळे मन नदीचं पात्र फुगलं आहे. लोहारा येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अकोट-देवरी-शेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याचं वृत्त आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 July 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ जुलै २०१९ सकाळी ७.१० मि. ****  माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवरची स्थगिती आंतरराष्ट्रीय न्यायालयात कायम  राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१९ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी  पीक विम्याचे दावे पंधरा दिवसात मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन - शिवसेनेचा इशारा आणि  गर्भाशय शस्त्रक्रियांप्रकरणी निश्चित कालमर्यादेत निर्णयासाठी शासनास प्रवृत्त करू - डॉ. नीलम गोऱ्हे यांचं आश्वासन **** माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवरची स्थगिती आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कायम ठेवली आहे. काल या प्रकरणी हेग इथं, आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली, यावेळी पाकिस्ताननं जाधव यांना भारताकडून कायदेशीर सहकार्य नाकारून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. जाधव यांना कायदेशीर मदत घेण्यात आडकाठी आणू नये, असं सांगत, जाधव यांना सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर पाकिस्तान पुनर्विचार करत नाही, तोवर या शिक्षेवर स्थगिती कायम राहील, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयानं सांगितलं आहे. सोळापैकी पंधरा न्यायाधीशांनी बहुमतानं हा निर्णय सुनावला. **** दरम्यान, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफीझ सईद याला काल पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात तिथल्या दहशतवाद प्रतिबंधक विभागानं अटक केली. सईदला अमेरिकेनं विशेष जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. **** कर्नाटक विधानसभेतल्या राजीनामा सादर केलेल्या बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयामुळे, आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असलेल्या एच.डी.कुमारस्वामी सरकारपुढच्या अडचणी वाढण्याची स्थिती आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर.रमेशकुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, असंही सांगितलं. याबाबतीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार असल्याचं सभापती रमेशकुमार यांनी म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मागे फिरण्याचा तसंच विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया या बंडखोर आमदारांनी मुंबईत दिली आहे. आमदारांचा हा नैतिक विजय झाला असल्याचं मत भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे. **** केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१९ ला काल मंजुरी दिली. या विधेयकामुळे, भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा भारतीय वैद्यकीय आयोग घेईल. तसंच, या विधेयकामुळे भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६, रद्द होईल. यातल्या तरतुदी नुसार, एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची सार्वत्रिक परीक्षा, `नॅशनल एक्झिट टेस्ट`, या नावानं ओळखली जाईल आणि हीच परीक्षा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा असेल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयं आणि अभिमत विद्यापीठांतल्या पन्नास टक्के जागांच्या शैक्षणिक आणि इतर शुल्कांचं नियमन या आयोगाच्या अखत्यारीत राहील, असं जावडेकर यांनी सांगितलं. धरण सुरक्षा विधेयकाचा मसूदा तसंच दिवाळखोरी आणि नादारी कायदा दुरुस्ती विधेयकाचा मसूदाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केला. **** पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातल्या चारशे सहा जिल्हयांमध्ये घरगुती वापराचा गॅस पुरवठा पाईपद्वारे करण्यासाठी परवानगी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. परवानगी मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, आणि अहमदनगर सह एकोणीस जिल्ह्यांचा समावेश आहे. **** राज्यातल्या खाजगी पीक विमा कंपन्या आणि बँकांनी, शेतकऱ्यांच्या, पीकविमा आणि कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणांचे दावे येत्या पंधरा दिवसात मार्गी लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल, इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेतर्फे काल मुंबईत राज्यातल्या खाजगी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं पीकविम्याच्या आणि कर्जमाफीच्या विविध योजना आणलेल्या असतानाही, शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे पीक विमा कंपन्या मिळू देत नाहीत, असा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. **** आदिवासी विकास विभागाच्या वतीनं अनुसूचित जमातीसाठी लागू असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजाला लाभ घेता यावा, यासाठीची आवश्यक प्रक्रिया लवकर पूर्ण करून येत्या ऑगस्ट महिन्यापासून या योजना लागू करण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. **** औरंगाबादमध्ये जाहीर झालेल्या क्रीडा विद्यापीठासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेत केली. क्रीडा महासंघांमधे राजकीय नेत्यांचा सहभाग नसावा तसंच औरंगाबाद इथं फुटबॉल खेळासाठी सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** गर्भाशय शस्त्रक्रियांप्रकरणी निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्यासाठी शासनास प्रवृत्त करू असं आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलं आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल त्यांनी या विषयाशी संबंधित विविध समाज घटकांशी आढावा बैठक घेतली त्यावेळी, त्या बोलत होत्या. आणखी दोन बैठका घेऊन चौकशी समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करेल तसेच यासाठी आरोग्य मंत्र्यांशी देखील तपशीलवार चर्चा केली जाईल असं त्यांनी सांगितलं. ऊसतोड महिला कामगारांच्या दृष्टीने आरोग्यपूर्ण सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याची शिफारस करू, यासाठी त्यांना ऊसतोड हंगामावर जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी आणि प्रत्यक्ष हंगामाच्या कालावधीत संबंधित ठिकाणी उपचार मिळतील, असं ही गोऱ्हे यांनी सांगितलं. त्याआधी गोऱ्हे यांनी काल सकाळी वंजारवाडी इथं पीडित महिला तसंच आशा सेविका, अंगणवाडी ताई यांच्यासमवेत चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. **** राज्य महिला आयोगाच्या ‘प्रज्ज्वला’ योजनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते काल अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलतांना रहाटकर यांनी बचत गटांतल्या महिलांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी प्रज्ज्वला योजनेअंतर्गत प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. राज्य महिला आयोगाच्या वतीने अहमदनगर, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, राहुरी इथं आज आणि उद्या हे प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** वाङमयामध्ये नवे प्रवाह आणण्यासाठी पाश्चात्य भाषांकडे न पाहता, देशातल्या विविध भाषांमधल्या अभिजात साहित्यकृतींचं आदान - प्रदान होणं आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या मराठवाडा विभागीय गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान आणि गुरूजनांच्या सत्कार समारंभात बोलत होते. भाषांच्या आदान प्रदानातून वाङमयीन प्रवृत्ती आणि जाणीवांची देवाण घेवाण होईल आणि भारतीय साहित्य नावाची संकल्पना अस्तिवात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. गुरूदत्त राजपुत यांचं ‘ज्ञानेश्वरी : एक हिंदी अनुवाद’ या विषयावर व्याख्यान झालं. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असूनही साहित्यक्षेत्रात मोलाचं योगदान दिलेल्या शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. **** त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं काल उस्मानाबाद इथं दोन मैदानांची पाहणी केली. मुख्य सभामंडपाबरोबरच इतर सभा मंडपांसाठी काही मंगल कार्यालयं तसंच महाविद्यालय परिसराची पाहणी करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यासह समितीच्या सदस्यांनी उस्मानाबादकरांना निराश करणार नाही, असं सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** यावर्षी मराठवाडयात सरासरीच्या तुलनेत केवळ ३४ टक्केच पाऊस पडला असल्यानं पीक परिस्थिती समाधानकारक नसून काही ठिकाणी अजून पेरण्या बाकी आहेत. अशा परिस्थितीत पर्यायी पीक पेरणी करणं सोईस्कर होईल, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अधिकारी डॉ. यू. एन. आळसे यांनी दिला आहे. पेरणीयोग्य पावसाच्या आगमनानुसार पेरणी करावी, तसंच या महिनाअखेरपर्यंत सोयबीनसोबत सुर्यफूल-बाजरी-तूर, बाजरीसोबत तूर-एरंडी- कारळं-तीळ-हुलगा-मटकी अशा पीकांची पेरणी करावी, असंही डॉ. आ7ळसे यांनी सुचवलं आहे. **** शेतकऱ्यांनी पेरणीची वाट न पाहता स्वयं घोषणापत्राच्या आधारावर पिक विमा भरावा असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केल आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै असून आतापर्यंत फक्त २६ टक्केच पेरण्या झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जिल्ह्यात सध्या एकशे दोन गावा��� एकशे आठ टॅंकर सुरु आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी इथल्या पशू वैद्यकीय दवाखान्यातला पर्यवेक्षक रामदास शिंदे याला साडे सातशे रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या गाईवर उपचारासाठी शिंदे यानं लाच मागितली होती. **** नाशिक जलसंपदा विभागातला उपअभियंता राजेंद्र शिरवाडकर याला 30 हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. वडाळभोई इथल्या एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला भरपाईच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी शिरवाडकर यांनी ही लाच मागितली होती, काल नाशिक कार्यालयात त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. **** इंडोनेशियाच्या जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी.व्ही. सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. या दोन्ही खेळांडूनी जपानच्या खेळांडून पराभूत केलं. दरम्यान, म्युनिच इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठगट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनीष भनवाल यानं २४ मीटर रॅपिड ओहायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. ***** ***
0 notes