#सूर्याचा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 19 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
हवामान विभागाचे अंदाज जितके जास्त अचूक तितकंच त्यांच्या माहितीचं महत्त्व अधिक - पंतप्रधानांचं प्रतिपादन
पानिपत स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार आवश्यक भूसंपादन करणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३१ वा नामविस्तार विविध कार्यक्रमांनी साजरा
आणि
छत्रपती संभाजीनगर इथल्या पाणचक्की तसंच दरवाजांचे चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं प्रकाशन
****
हवामान विभागाचे अंदाज जितके जास्त अचूक होत जातील, तितकंच त्यांच्या माहितीचं महत्त्व वाढेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या दिडशेव्या स्थापना दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं मिशन मौसमचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हवामानाच्या क्षेत्रात अधिक संशोधनाची गरज व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले –
साथियों, आज समय है हम इस दिशा मे और ज्यादा रिसर्च करें जो विनाम प्रामाणिक हो उसे आधुनिक सायंस से लिंक करने के तरीकों को तलाशें. साथियों, मौसम विभाग के अनुमाण जितने ज्यादा सटीक होते जायेंगे उसकी सुचनाओं का महत्व बढता जायेगा. आनेवाले समय मे आयएमडी के डेटा की मांग बढेगी, विभिन्न सेक्टर्स इंडस्ट्री यहां तक के सामान्य मानवी के जीवन मे इस डेटा की उपयोगिता बढेगी! इस लिये हमें भविष्य की ज़रूरतों को ध्यान मे रख्ते हुये काम करना है.
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या आयएमडी व्हिजन - २०४७ चं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. त्यात हवामानाचा अंदाज, हवामान व्यवस्थापन आणि हवामान बदल कमी करण्याच्या योजनांचा समावेश आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मुंबई इथं नौदलातील आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वागशीर या तीन लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदनमोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षेवरील चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावर्षी सव्वा तीन कोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी करत विक्रम मोडला आहे. नोंदणीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे, परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची ही ८ वी आवृत्ती शालेय स्तरावर आयोजित केली जात आहे, यासाठीची नोंदणी २३ जानेवारीपर्यंत करता येणार आहे.
****
सूर्याचा मकर राशीत प्रवेश तसंच दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमणाचं पर्व, मकरसंक्रांतीचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी परस्परांना तीळगुळ वाटपाचा तसंच महिलावर्गात सौभाग्यदानासह मातीच्या सुगड्यांमधून विविध वस्तूंचं वाण देण्याचा प्रघात आहे. दक्षिण भारतात पोंगल तर ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमधे माघ बिहू म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
इसवीसन १७६१ साली आजच्या दिवशी हरियाणात पानिपत इथं मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याचं स्मरणही आज केलं जातं. या निमित्त पानिपत इथं होत असलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. या लढाईचं स्मारक उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादन महाराष्ट्र राज्य सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, ते म्हणाले –
आज ये आश्वासित करना चाहता हूं, आनेवाले दशकों दशकों तक यहां पर कार्यक्रम आयोजित करने के लिये केवल शौर्य स्मारक ट्रस्ट नही होगा। महाराष्ट्र की सरकार ही आपके साथ में इस कार्यक्रम का आयोजन करेगी। और यहां पर जिस जमीन का अधीग्रहण करना है, इस स्मारक के विस्तार के लिये इसका अधिग्रहण महाराष्ट्र की सरकार पैसे देकर करेगी।
****
मकर संक्रांतीच्या पुण्य पर्व काळात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात आज अमृत स्नान सोहळा साजरा झाला. आज पहाटेपासून विविध १३ आख��्यांचे प्रमुख संत-महंत आणि त्यांच्या असंख्य शिष्यगणांनी, साधुंनी त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केलं. सर्वप्रथम स्नान करण्याचा मान महानिर्वाणी पंचायतनी आखाड्याला मिळाला, तर शेटवचं शाही स्नान पंचायतनी निर्मल आखाड्याने केलं. आज सुमारे साडे तीन कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आहे.
****
कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे यांनी दिली. कुंभ मेळ्याबाबत दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते –
सगळ्या जातीचे, सगळ्या संप्रदायाचे सर्व लोक एकत्र येऊन एका ठिकाणी स्नान करणं, याच्यासारखी जगात मोठी समरसता कुठेच नाही. सगळे भारतातील संप्रदाय त्या तिथे स्नानाला येतात. आपल्या देवगिरी प्रांतातून विविध संप्रदायाचे शंभर साधू यावेळी जाणार आहेत. आपण देवगिरी प्रांतातर्फे भगवे वस्त्र दोन हजार साधुंना तिथे प्रदान करणार आहोत.
बारगजे यांची ही मुलाखत उद्या सकाळी दहा वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक कार्यक्रमात आपण ऐकू शकता.
****
नाशिकमध्ये संक्रांतीनिमित्त नाशिकला रामकुंड इथं स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली. त्याचबरोबर मंदिरांमध्ये देखील गर्दी झाली आहे. सर्वच मंदिरांवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
दरम्यान, शिकमध्ये पतंग उडवत असतांना एका बावीस वर्षीय मुलाचा नायलॉनच्या मांज्याने गळा कापला गेल्याने मृत्यू झाला. नाशिक पोलीसांनी नायलॉन मांजाच्या विरोधात कडक भूमिका घेतली असून काल एका दिवसात २४ गुन्हे दाखल करण्यात आले.
****
सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस आज साजरा केला जात आहे, यानिमित्त नागपूर इथं वायुसेना नगर इथल्या मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. सैनिकांचं सेवा कार्य आपण कधीच विसरू शकत नाही, त्यांच्यामुळेच या देशाचा गौरवशाली इतिहास, परंपरा आणि आपण सुरक्षित असल्याची भावना गडकरी यांनी व्यक्त केली.
****
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवव्या सशस्त्र माजी सैनिक दिनानिमित्त पुण्यात एका कार्यक्रमाला संबोधित केलं. देशात सव्वा कोटी माजी सैनिक, सैनिक आणि त्यांचा परिवार आहे. या मनुष्य बळाचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी करता येऊ शकतो असं प्रतिपादन द्विवेदी यांनी केलं. यावेळी वीर पत्नी तसंच वीर सैनिकांच्या पालकांचा, द्विवेदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
राष्ट्रीय चाचणी संस्था - एनटीएनं उद्या १५ जानेवारीला नियोजित युजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. पोंगल, मकरसंक्रांत आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करण्यात येत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएनं निवेदनाद्वारे कळवलं आहे.
****
राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सुरक्षा, कार पुलींग, परवाना, वाहतुक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. राज्यात अनेक बसस्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’, या तत्वावर विकसित करण्यात येत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात २५ तर मुंबईतील बोरिवली इथं १०० खाटांचं रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३१ वा नामविस्तार आज विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. नामांतराचा लढा ही भारतात शिक्षणासाठी झालेली पहिली सामाजिक परिवर्तनाची चळवळ असून, बाबासाहेब हेच या चळवळीचे प्रेरणास्रोत असल्याचं प्रतिपादन नाशिकच्या डॉ बी आर आंबेडकर एस सी, एसटी महासंघाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. इंदिरा आठवले यांनी केलं आहे. ‘नामविस्तारानंतरची आव्हाने’ या विषयावर आज विद्यापीठातल्या विशेष व्याख्यानात डॉ. आठवले बोलत होत्या. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, बाबासाहेबांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी नैतिकता आणि व्यावसायिक मूल्यांचं जतन करण्याचं आवाहन केलं.
****
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज विद्यापीठ परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आठवले यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत, या आंदोलनात आपल्या पाठिशी असलेल्या मराठवाड्याच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.
धाराशिव इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसरात नामविस्तार दिन साजरा करण्यात आला.
नामविस्तार दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम इथं विविध सामाजिक संघटना, पक्ष यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐतिहासिक पाणचक्की आणि दरवाजांचे चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं आज खासदार भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन झालं. शहरातील महात्मा गांधी मि��नमध्ये डाग विभागाचा महापेक्स २०२५ कार्यक्रम संपन्न झाला. पारपत्राची सुविधा शहरातल्या टपाल कार्यालयाद्वारे देण्यात यावी अशी अपेक्षाही कराड यांनी या प्रसंगी व्यक्त केली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. अक्षय शेळके आणि गोविंद माने हे दोन टपाल विभागाचे कर्मचारी ‘डाक सेवा जनसेवा’ या संकल्पनेद्वारे ई सायकलवर विविध शहरांमध्ये प्रवास करून मुंबईला पोहोचणार आहेत. या ई सायकल रॅली ला हिरवा झेंडा कराड यांच्या हस्ते दाखवण्यात आला.
****
अवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांना केज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
सूर्याचा फॉर्म, अय्यरचा फिटनेस; वर्ल्डकपपूर्वी भारतासमोर अनेक प्रश्न
https://bharatlive.news/?p=145318 सूर्याचा फॉर्म, अय्यरचा फिटनेस; वर्ल्डकपपूर्वी भारतासमोर अनेक ...
0 notes
djsongsdotorg · 4 years ago
Text
Devavina Mansachi Zindagani Ekti ( Soundcheck ) चंद्राचा सूर्याचा खेळ Dj Song Download
Devavina Mansachi Zindagani Ekti ( Soundcheck ) चंद्राचा सूर्याचा खेळ Dj Song Download
DJSONGS DOWNLOAD Download Now Google Tags :Devavina Mansachi Zindagani Ekti ( Soundcheck ) चंद्राचा सूर्याचा खेळ Dj Song Download
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : १० ऑक्टोंबर
असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : १० ऑक्टोंबर
सोमवार, १० ऑक्टोबर २०२२. अश्विन कृष्ण प्रतिपदा. शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००”आज उत्तम दिवस आहे” सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश. (शुक्र अस्त चालू आहे) चंद्र नक्षत्र – रेवती. मेष:- खर्चात वाढ करणारा पूर्वार्ध आहे. दगदग वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. वृषभ:- आर्थिक उन्नती होईल. संवाद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
योग 166 वर्षांनंतर गुरू ग्रह पृथ्वीच्या एवढा जवळ येईल शनीही कुठे आणि कसा पाहावा
योग 166 वर्षांनंतर गुरू ग्रह पृथ्वीच्या एवढा जवळ येईल शनीही कुठे आणि कसा पाहावा
पृथ्वीवरून दिसणा���े गुरु आणि शनि: आपल्या आकाशातील सर्वात मोठा ग्रह गुरु’ पृथ्वीचा सर्वात मोठा कारण आहे. गुरु सूर्याचू प्रदक्षिणा घालण्यास १२ वर्षे ग्रहाला आणि यावेळेस समूह १६६ वर्षे पूर्त्व मुळात गुरु अस्तित्वात आहे. जेव्हा एकाच वेळी पश्चिमेला सूर्याला अस्त होतो तेव्हा सूर्याचा उदय पूर्वेकडे होतो. यावेळेस जेव्हा गुरु ग्रहाच्या शक्ती ही खगोलीय घटना घडेल तेव्हा गुरुचे दर्शन पृथ्वीपासून सर्वात मोठे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
मोठ्या मनाचे देवेंद्र फडणवीस! तुम्ही किंग ते किंगमेकर कसा गेलात? राजकारणाचे पूर्ण चरित्र वाचा
मोठ्या मनाचे देवेंद्र फडणवीस! तुम्ही किंग ते किंगमेकर कसा गेलात? राजकारणाचे पूर्ण चरित्र वाचा
देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो) देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मोठे मन दाखवले आहे असे नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र लढूनही शिवसेना वेगळी झाली तेव्हा फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाटून घेण्याचे मान्य केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ३० जून ही तारीख एका नव्या सूर्याचा उदय म्हणून नोंदली गेली आहे. शिवसेनेचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे न जुळलेले सरकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
बुडत्या मुंबई इंडियन्सला सूर्याचा आधार... सूर्यकुमारने अर्धशतकासह पुन्हा संघाला सावरले
बुडत्या मुंबई इंडियन्सला सूर्याचा आधार… सूर्यकुमारने अर्धशतकासह पुन्हा संघाला सावरले
पुणे : आरसीबीच्या संघाने आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची लक्तरं वेशीवरच टांगल्याचे पाहायला मिळाली होती. मुंबईने सुरुवात चांगली केली होती. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी ५० धावंची सलामी दिली. पण रोहित शर्मा बाद झाल्यावर मुंबई इंडियन्सचा डाव कोसळला. त्यामुळे एकेकाळी बिनबाद ५० असणाऱ्या मुंबई इंडियन्सची अवस्था ५ बाद ६२ झाली. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा मुंबईच्या संघाला सावरले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 3 years ago
Text
सूर्यास्त
दिवसभर चालून थकलाझाला सूर्याचा अस्त ।आली फौज चांदण्यांचीचमचमण्यात त्या व्यस्त ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
atulpandit68 · 4 years ago
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, १०.
साम्यसूत्र, 
३. प्रयोजनवत्त्वात् ।
वृत्ति,
१२. परधर्मः श्रेष्ठ इति न ग्राह्य: । 
१३. सुकर इति न स्वीकार्यः । 
१२. दुसऱ्याचा धर्म श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात माझे कल्याण नसते. सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे. त्या प्रकाशाने माझी वाढ होते. सूर्य मला वंदनीय आहे. पण म्हणून मी पृथ्वीवरचे वास्तव्य सोडून त्याच्याजवळ जाऊ पाहीन तर जळून जाईन. उलट पृथ्वीवर राहणे विगुण असेल, पृथ्वी सूर्यापुढे अगदीच तुच्छ असेल, ती स्वयंप्रकाशी नसेल, तथापि जोपर्यंत सूर्याचे तेज सहन करण्याचे सामर्थ्य माझ्यामधे नाही तोपर्यंत सूर्यापासून दूर पृथ्वीवर राहूनच मी माझा विकास करून घेतला पाहिजे. माशाला जर कोणी म्हणेल, पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे, दुधात रहा, तर मासा ते कबूल करील का? मासा पाण्यातच वाचेल, दुधात मरेल.
१३. दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला म्हणूनहि स्वीकारावयाचा नसतो. पुष्कळ वेळा सोपेपणाचा भासच असतो. संसारात बायकामुलांचे नीट रक्षण करता येत नाही म्हणून कंटाळून जर कोणी गृहस्थ संन्यास घेईल, तर ते ढोंग होईल व जडहि जाईल. संधि सापडताच त्याच्या वासना जोर करतील. संसाराचे ओझे झेपत नाही म्हणून वनात जाणारा आधी तेथे लहानशी झोपडी बांधील, मग त��च्या रक्षणासाठी तो कुंपण करील. असे करता करता त्याला तेथे सवाई संसार उभा करण्याची पाळी येईल. वैराग्यवृत्ति असेल तर संन्यासातहि कठिण काय आहे? संन्यास सोपा म्हणून सांगणारीहि स्मृतिवचने तर आहेतच. पण मुख्य मुद्दा वृत्तीचा आहे. ज्याची जी खरी वृत्ति असेल तदनुसार  त्याचा धर्म राहील. श्रेष्ठ-कनिष्ठ, सोपे-कठिण, हा प्रश्न नाही. खरा विकास हवा. खरी परिणति हवी.
0 notes
bhuvneshkumawat · 4 years ago
Photo
Tumblr media
Today Pooja Mahalaxmi Temple kolhapur Maharashtra India #घटस्थापना आजची श्री महालक्ष्मी ची कुण्डलिनी स्वरुपात पूजा जगन्मात्रे नमः आज अश्र्विन शुद्ध प्रतिपदा श्रीशके १९४२ अर्थात १७/१०/२०२० आज घटस्थापनेच्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई श्री कुंडलिनी रूप पराम्बिकेच्या स्वरुपात नटली आहे. पराम्बा अर्थात वाणी शब्द याला अनाकलनीय असं भगवतीचं रूप . अशी ही जगदंबा जिने त्रिनेत्र आणि दोन हाताचं रूप धारण करून एका हातामध्ये रत्नजडित मधुपात्र आणि दुसऱ्या हातात लाल कमळ धारण करणाऱ्या या देवीचा वर्ण हा उगवत्या सूर्याचा प्रमाणे अर्थात सिंदूरी आहे. डोक्यावर माणकं जडवलेला किरीट आणि चंद्र धारण करणारी सुहास्य वदना अशी ही पराम्बिका रत्नघटावर चरण ठेवून विराजमान आहे. या कुंडलिनी स्वरूपी देवीचे ध्यान ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचे पठणापूर्वी अवश्य केले जाते. योगी जनांच्या साधनेचा आधार म्हणजे कुंडलिनी जागृती जी सुप्तावस्थेत असते त्या मुळे आपण सर्व भवबंधनात असतो पण मूलाधार चक्रात साडेतीन वेटोळे घालून बसलेली ही पराशक्ती जागी होऊन षट्चक्रांचा भेद करत सहस्त्रार चक्रात पोहोचतो आणि उन्मनी अवस्था रूप अमृताची वृष्टी करते अशी ही कुंडलिनी भगवती आपल्यावर नवरात्र नावाच्या साधनापर्वात कृपा वृष्टी करो हीच ज��दंबा चरणी प्रार्थना. सिन्दूरारूण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलि स्फुरत् तारा नायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहाम् | पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्फलं बिभ्रतीं सौम्यां रत्न घटस्थ रक्तचरणां ध्यायेत् पराम्बिकाम् श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकः https://www.instagram.com/p/CGcUmZqlqNe/?igshid=1uju8rmgra8zs
0 notes
airnews-arngbad · 21 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 14 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १४ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
हवामान विभागाचे अंदाज जितके जास्त अचूक होत जातील, तितकंच त्यांच्या सूचनांचं महत्त्व वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या दिडशेव्या स्थापना दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं मिशन मौसमचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हवामानाच्या क्षेत्रात अधिक संशोधनाची गरज व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले: “साथियों, आज समय है हम इस दिशा मे और ज्यादा रिसर्च करें जो विनाम प्रामाणिक हो उसे आधुनिक सायंस से लिंक करने के तरीकों को तलाशें. साथियों, मौसम विभाग के अनुमाण जितने ज्यादा सटीक होते जायेंगे उसकी सुचनाओं का महत्व बढता जायेगा. आनेवाले समय मे आयएमडी के डेटा की मांग बढेगी, विभिन्न सेक्टर्स इंडस्ट्री यहां तक के सामान्य मानवी के जीवन मे इस डेटा की उपयोगिता बढेगी! इस लिये हमें भविष्य की ज़रूरतों को ध्यान मे रख्ते हुये काम करना है.’’ हे अभियान शाश्��त भविष्यासाठी भारताच्या समर्पणाचं आणि येणाऱ्या आव्हानांसाठी सक्रिय तयारीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या १० वर्षांत, भारतीय हवामान विभागाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हवामानशास्त्र देखील अंतराळ तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत असल्याचं नमूद केलं. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या आयएमडी व्हिजन - २०४७ चं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. त्यात हवामानाचा अंदाज, हवामान व्यवस्थापन आणि हवामान बदल कमी करण्याच्या योजनांचा समावेश आहे.
दरम्यान, पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मुंबई इथं नौदलातील आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वागशीर या तीन लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदनमोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश तसंच दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमणाचं पर्व, मकरसंक्रांतीचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी परस्परांना तीळगुळ वाटपाचा तसंच महिलावर्गात सौभाग्यदानासह मातीच्या सुगड्यांमधून विविध वस्तूंचं वाण देण्याचा प्रघात आहे. दक्षिण भारतात पोंगल तर ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमधे माघ बिहू म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हरियाणात पानिपत इथं मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याचं स्मरणही आज केलं जातं. या निमित्त पानिपत इथं होत असलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत.
मकर संक्रांतीच्या पुण्य पर्व काळात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात आज अमृत स्नान होत आहे. आज पहाटेपासून विविध साधू आखाड्याच्या संत महंतांनी शाही स्नान करुन या पर्वणीला सुरुवात केली. एकंदर १३ आखड्यांचे प्रमुख संत- महंत आणि त्यांच्या असंख्य शिष्यगणांनी, साधुंनी त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केलं. सर्वप्रथम स्नान करण्याचा मान महानिर्वाणी पंचायतनी आखाड्याला मिळाला, तर शेटवचं शाही स्नान पंचायतनी निर्मल आखाड्याने केलं.
राष्ट्रीय चाचणी संस्था - एनटीएनं उद्या १५ जानेवारीला नियोजित युजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. पोंगल, मकरसंक्रांत आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करण्यात येत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएनं निवेदनाद्वारे कळवलं आहे.
सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस आज साजरा केला जात आहे, यानिमित्त नागपूर इथं वायुसेना नगर इथल्या मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. सैनिकांचं सेवा कार्य आपण कधीच विसरू शकत नाही, त्यांच्यामुळेच या देशाचा गौरवशाली इतिहास, परंपरा आणि आपण सुरक्षित असल्याची भावना गडकरी यांनी व्यक्त केली.
जालना जिल्ह्यातल्या रासायनिक खत टंचाई संदर्भात खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या उपस्थितीत काल बैठक घेण्यात आली. पुढील काळात येणाऱ्या अडचणी टाळून शेतकऱ्यांना खताची टंचाई येणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी दिलं.
महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाचं उद्घाटन आज कोल्हापूर इथं खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. ताराराणींचा स्फुर्तिदायक इतिहास प्रत्येकाला माहित असण्याची आवश्यकता शाहू महाराज यांनी व्यक्त केली.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Sun Transit : सूर्याचा धनु राशीत प्रवेश, १६ डिसेंबरला 'या' सहा राशीच्या व्यक्तींवर ओढावणार संक्रांत
Sun Transit : सूर्याचा धनु राशीत प्रवेश, १६ डिसेंबरला ‘या’ सहा राशीच्या व्यक्तींवर ओढावणार संक्रांत
Sun Transit : सूर्याचा धनु राशीत प्रवेश, १६ डिसेंबरला ‘या’ सहा राशीच्या व्यक्तींवर ओढावणार संक्रांत Sun Transit To Sagittarius On 16 December : सूर्य धनु राशीत येणार असल्याने अनेक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात परिणाम होणार आहे. त्यातल्या त्यात सहा राशींवर १६ डिसेंबर रोजी विपरीत परिणाम होणार असल्याचे संकेत आहेत. Sun Transit To Sagittarius On 16 December : सूर्य धनु राशीत येणार असल्याने अनेक…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
स्कॉटलंडमध्ये हुमा खुरेशी आणि लारा दत्ताचा पोस्ट कोरंटाईन सूर्याचा आनंद घेत दिसले अभिनेत्री हुमा खुरेशीने आणि अभिनेत्री लारा दत्ताचा पोस्ट कोरंटाईन सूर्याचा आनंद घेताना दिसले. #laradutta #humaqureshi #bellbottom http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/huma-qureshi-and-lara-dutta-enjoy-post-quarantine-sun-in-scotland/?feed_id=8015&_unique_id=5f451ccc1f9a0
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
असा असेल तुमचा आजचा दिवस; राशिभविष्य १७ ऑगस्ट
असा असेल तुमचा आजचा दिवस; राशिभविष्य १७ ऑगस्ट
बुधवार, १७ ऑगस्ट २०२२. श्रावण कृष्ण षष्ठी. दक्षिणायन, वर्षा ऋतू. शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०आज उत्तम दिवस आहे. सूर्याचा सिंह या स्वतःच्या राशीत प्रवेश. ‘गंड’ योग.चंद्र नक्षत्र – अश्विनी मेष:- व्यसने प्रलोभने टाळा. चुकीचे निर्णय होऊ शकतात. योग्य सल्ला घ्या. वृषभ:- विंचू काट्याचे भय आहे. आरोग्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
yuvonmesh · 5 years ago
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media
विजयी अरुण - अचल स्वामी
लेखक : गणेश फुके
         चित्रपटांसाठी साऊंड रेकॉर्डिंगचं काम करताना शूटिंगच्या निमित्तानं अनेकवेळा देशात परदेशात बरीच भटकंती होत असते. तरीही काही ठिकाणं राहून जातात. त्यातलंच एक ‘अरुणाचल प्रदेश’. नोव्हेंबर २०१९ मध्ये दिग्दर्शिका विनीता अनगळ यांचा फोन आला, ‘अरुणाचलमध्ये एक डॉक्युमेंट्री करायची आहे. साऊंडचं काम आहे.’ नेहमी जशा ध्वनिमुद्रणाच्या सुपार्‍या असतात तशीच हीही होती. वाटलं, असून असून ��ाय असणार, एखादं गाव, गरीबी, आदिवासी. काही क्रिएटिव्हिटी नाही.. एखादी समस्या, प्रश्न आहे तसा रेकॉर्ड करायचा, असंच काहीसं वाटत होतं, फरक इतकाच कि, स्थळ ‘अरुणाचल प्रदेश’.
         १ डिसेंबर २०१९ ला टीमसोबत निघालो. पुण्याहून आसाममधल्या दिब्रूगडला आम्ही विमानाने पोहोचलो. दिब्रूगड ते अरुणाचलमधलं रोइंग हा प्रवास रस्त्याने जीपमधून करायचा होता. साधारण पाच सहा तासांचा हा प्रवास अतिशय आल्हाददायक होता. स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड हवा, रस्ताच्या दोन्हीबाजूला चहाचे मळे, डोंगररांगा बघूनच अरुणाचलच्या सौंदर्याची चाहूल लागत होती. रोइंगच्या जरा अलिकडेच आमची गाडी बंद पडली. अंधारून आलं होतं. थोड्याच वेळात दुसरी गाडी आम्हाला नेण्यासाठी आली. गाडीतून उतरून पंचावन्न - साठीचं एक व्यक्तिमत्व आमच्याकडे आलं आणि “नमस्कार, मी विजय स्वामी” म्हणत आपली ओळख करून दिली. त्यांच्याबरोबरच आम्ही रोइंगमध्ये रिवॉच (RIWATCH) ला पोहोचलो. खूप छान स्वागत, आदरातिथ्य झालं. ‘आठ दहा दिवस राहायचं, ज्या कामासाठी आलोय तेव्हढं करायचं आणि निघायचं’ असा साधारण व्यावसायिक विचार होता. पण जसजसं शूटिंग होऊ लागलं तसं काहीतरी वेगळं असं जाणवू लागलं. हळू हळू रिवॉच आणि विजय स्वामींचा प्रवास उलगडू लागला.
         कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातून ‘जीवनव्रती’ म्हणजे ‘संपूर्ण जीवन स्वामी विवेकानंदांच्या विचाराने जगणे’ स्वीकारल्यानंतर विजयजींची पोस्टिंग १९८६ साली अरुणाचल प्रदेशला झाली. दळणवळणाची साधनं, दैनंदिन सुख-सुविधा यांचा प्रचंड अभाव अशी परिस्थिती असतानाही विजयजींनी अरुणाचलमध्ये राहायचं ठरवलं. पण तिथं काम करणं सोप नव्हतं. तिथलं राहणीमान, खानपान विजयजींना अजिबात मानवणारं नव्हतं. मुळात तिथला मुख्य आहार म्हणजे विविध प्रकारचा मांसाहार व भात, आणि विजयजी पूर्णतः शाकाहारी. संघर्षाला इथूनच सुरुवात झाली. कित्येक वेळा उकडलेले बटाटे खाऊन किंवा कधी उपाशीपोटी फक्त पाणी पिऊन त्यांनी दिवस काढले.  त्याचबरोबर तिथली भाषा वेगळी, वातावरण वेगळं. आदिवासींचे पाडे बर्‍यापैकी अंतरावर होते. ��न वारा पाऊस ह्यांच्याशी सामना करत पायी त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागायचं.
         सुरूवातीला विवेकानंद केंद्राच्या शाळांमध्ये विजयजींनी शिक्षक म्हणून साक्षरतेसाठी काम केलं. नंतर एका स्कॉलरशिपवर ते अमेरिकेला ICCS (International Centre for Cultural Studies) संस्थेत अभ्यासासाठी गेले. परतल्यावर त्यांनी RIWATCH (Research Institute of World Ancient Traditions Cultures and Heritage) ही संस्था २००९ मध्ये रोइंग येथे स्थापन केली. अरुणाचलमध्ये आदिवासींच्या २५ ते ३० मुख्य आणि ७० ते ८० उपजमाती आहेत. सुरूवातीला रोइंगमधल्या प्रमुख ‘इदूमिश्मी’ या आदिवासींसाठी त्यांनी काम करायचं ठरवलं. आदिवासींच्या विकासासाठी उभारलेल्या रिवॉचला स्थानिक लोकांनी भरभरून साथ दिली. कोणी जमीन दिली, कोणी बांधकाम करून दिलं. कोणी गाडी दिली, कोणी गॅस शेगडी, सोलर उपकरणं दिली.
              रिवॉचमधल्या कामात, संशोधनात स्थानिकांना सामील केलं जातं. इथल्या हुशार, लायक लोकांना परदेशातल्या मोठमोठ्या संस्थेत पाठवून तिथल्या लोकांशी ताळमेळ घालून इथं त्याचा उपयोग कसा होईल याचा नियोजनबद्ध विचार असतो. अशा प्रकारे तिथले पंधरा विद्यार्थी जगभरातल्या विविध ठिकाणी जावून आलेत. स्थानिक प्रशासनातल्या लोकांनाही रिवॉचच्या संशोधनांत, कामांमध्ये बरोबर घेवून, त्यांनाही बाहेरच्या देशात नेवून ‘तिथले उपक्रम इथं कसे अंमलात आणता येतील’ या विचारांना चालना देण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून सरकारी स्तरावर राज्यात काही सुधारणा, पॉलिसी आणायच्या असतील तर त्याचा उपयोग होतो. शेतीची प्रगती, सेंद्रिय शेती प्रशिक्षण वगैरे विकासात्मक शिबिरं रिवॉचमध्ये आयोजित केली जातात. आदिवासी तरुण डॉक्टर, इंजीनियर, आय.ए.एस. ऑफिसर असे उच्चशिक्षित व्हावेत, त्यांची प्रगती व्हावी, ते देशाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी विजयजी झटत असतात. रिवॉच आपल्यासाठी काम करतंय हा विश्वास निर्माण झाल्याने लोकही कामात रस घेतात. रिवॉचमधले ९० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यकर्ते स्थानिकच आहेत.
            अरुणाचलची ७५ टक्के सीमा चीन, तिबेट, भुतान, म्यानमार या देशांना आणि २५ टक्के आसामला चिकटून असूनही अरुणाचल आपलं अस्तित्व, वैशिष्ट्य आणि वारसा टिकवून आहे. तिथले लोक वनस्पती आणि प्राण्यांना आपले नातेवाईक मानतात. त्यांची प्राचीन संस्कृत���, परंपरा, वारसा जपला जावा म्हणून विजयजींनी संग्रहालयाची कल्पना मांडली. ही कल्पना तिथल्या लोकांनीही उचलून धरली. आदिवासींनी पुरातन, पारंपारीक ठेवा, वारसा, चित्रं, दागिने, माळा, तलवारी, हत्यारं, इतर वस्तू असा लाखोंच्या किमतीचा खजिना विनामोबदला विजयजींच्या स्वाधीन केला. एक ऑडिओ विजुवल विभागही बनवला. ज्यात तिथल्या प्राचीन संस्कृतीविषयी, परंपरांविषयी माहिती जतन केली जाते. हिमालयन औषधी वनस्पतींचं ज्ञान सर्वांना व्हावं, ते टिकावं म्हणून विजयजींनी एक मोठ्ठं वनस्पती गार्डनही बनवलंय. इथं अॅंथ्रोपोलोजी, आर्किओलोजी इत्यादि अनेक कोर्सेस घेतले जातात. देशभरातून, जगभरातून लोक, विद्यार्थी इथं अभ्यासासाठी, संशोधनासाठी येतात. आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना एम.फील. आणि पी.एच.डी.साठी इथं मार्गदर्शन केलं जातं. विद्यार्थ्यांसाठी कॉटेजेस्, क्लासरूम्स, स्टुडिओजची सोयही रिवॉचमध्ये आहे.
            ‘जीवनव्रती’ असल्यानं रिवॉचचे डायरेक्टर असूनही विजयजींची स्वतःसाठीची अशी वेगळी खोली वगैरे नाहीये. ते कधी कधी ऑफिसमध्येही झोपतात. रिवॉचला एक रीसर्च इंस्टीट्यूट ते विद्यापीठ बनवण्याचं दायित्व विजयजींकडे आहे. संस्कृती आणि जीवनपद्धती यांची सांगड घालून २१ व्या शतकात आपल्याला कसं सुखकर जगता येईल यादृष्टीने विजयजींचं काम चालू आहे.
          रिवॉच आणि विजय स्वामींचं आभाळाएव्हढं काम छोट्याशा कॅमेर्‍यात थोडंफार कोंबून आम्ही निघालो. पण परतीचा प्रवास फार सुखकर नव्हता. देशात CAA, CAB आणि NRC चा मुद्दा नुकताच सुरू झाला होता. अरुणाचलचा तसा संबंध नसला तरी आसाममध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटली. आंदोलनाने हिंस्त्र वळण घेतलं होतं. आमचा विमानप्रवास अरुणाचलमधून व्हाया आसाम असा होता, पण आसामच्या दिब्रूगड विमानतळावर पोहोचणं अशक्य होतं. रस्तोरस्ती आंदोलनं चालू होती. विजयजींनी दिब्रूगडमधले त्यांचे एक सहकारी आणि शुभचिंतक श्री. संजय शर्माजी यांच्या सहाय्याने पुढचे ३ दिवस आमची सोय केली. तीन दिवसांनंतर कर्फ्यू जरा शिथिल झाला. तेंव्हा कसंबसं मुंबईचं विमान मिळालं आणि आम्ही पुण्याला सुखरूप पोहोचलो. प्रवासात राहून राहून वाटत होतं कि, आपणही समाजाचं काही देणं लागतो, निदान रिवॉचसारख्या संस्थांसाठी काहीतरी करायला हवं. माझ्या परीने रिवॉचच्या द���क-श्राव्य स्टुडिओसाठी सहकार्य करायचं मी ठरवलं आहे. अजूनही अरुणाचलच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ मनावरून उतरलेली नाही. ती कालांतराने उतरेलही कदाचित, पण उच्चशिक्षणानंतर सुखासुखी जीवन सोडून समाजकार्याचा विडा उचललेले विजय स्वामी, त्यांची तळमळ, त्यांचं काम, त्यांचे सहकारी, तिथले गरीब पण दिलदार आदिवासी यांचा कमी वेळात आयुष्यावर कोरला गेलेला प्रभाव कधीही कमी होणार नाही.
         ‘अरुणाचल’ म्हणजे अरुण – अचल अर्थात ‘उगवत्या सूर्याचा पर्वत’. विजयजींचा ‘जीवनव्रती’ कार्याचा अचल निश्चय असाच सूर्यासारखा कार्यरत राहो.
0 notes
popularkonkan · 5 years ago
Photo
Tumblr media
सूर्याचा सुंदर क्लिक ❤️ #PopularKonkan https://www.instagram.com/p/B5cfmcLFt0S/?igshid=jp2rnvr7hrfq
0 notes