Tumgik
#सनत
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समज���न येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही ���समाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
sharpbharat · 1 month
Text
jamshedpur rural-विश्व आदिवासी दिवस पर काल्टू चक्रवर्ती ने घाटशिला में किया सम्मान समारोह
घाटशिला: विश्व आदिवासी दिवस के अवसर पर झारखंड कांग्रेस प्रदेश सचिव सनत काल्टू चक्रवर्ती के नेतृत्व में शुक्रवार को कांग्रेस पार्टी ने घाटशिला के बागुला ग्राम में कार्यक्रम आयोजित किया. इसमें ग्राम प्रधान सहित आदिवासी समुदाय के लोगों को अंगवस्त्र देकर सम्मानित किया गया और ग्रामीणों एवं बच्चों के बीच खाद्य सामग्री वितरित की गई. इस अवसर पर श्री चक्रवर्ती ने आदिवासी समुदाय को शुभकामनाएं दीं और कहा कि…
0 notes
prakhar-pravakta · 1 year
Text
दुर्गा प्रसाद गौतम की पुण्यतिथि पर हनुमान मंदिर में किया गया प्रसाद वितरण
सतना। शहर के धवारी गली नंबर निवासी मनीष गौतम एवम रजनीश गौतम के पिता श्री दुर्गा प्रसाद गौतम की पुण्यतिथि मे एसएससी सीएमएचओ कार्यालय के सामने हनुमान मंदिर में प्रसाद वितरण कार्यक्रम को आयोजित किया गया है जिसमें प्रमुख रूप से आलोक त्रिपाठी जी शिक्षक राजेश चतुर्वेदी पालन नगर निगम स्पीकर सुकृति त्रिपाठी सनत त्रिपाठी रजनीश गौतम आकाश गौतम अमन तिवारी विक्रम कुशवाहा विद्याधर द्विवेदी अरविंद यादव
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhinews1 · 1 year
Text
सास की पुण्यतिथि में बहु का रक्तदान 14 सौ लोगो का किया गया उपचार।
Tumblr media
सास की पुण्यतिथि में बहु का रक्तदान 14 सौ लोगो का किया गया उपचार।
बालाघाट… सामाजिक रीतियों के नाम पर तेरहवीं जैसे अन्य आडंबर को दूर करते हुए आडम्बर के पैसे समाज में शिक्षा,स्वास्थ्य और बेहतर कार्यो के लिए कैसे उपयोग किया जाए यह संदेश देता ग्राम पंचायत कुम्हारी में आयोजित स्वास्थ शिविर और रक्तदान के आयोजन ने मिशाल के रूप में उदाहरण पेश किया है।जंहा जी एस टी एडिशनल कमिश्नर भोपाल लोकेश लिल्हारे ने एक वर्ष पूर्व दिवंगत अपनी माता शांती बाई लिल्हारे के मंशानुरूप प्रथम पुण्यतिथि के अवसर पर नगर से 5 किलोमीटर दूर ग्राम कुम्हारी में स्वास्थ शिविर और रक्तदान का आयोजन किया गया,यंहा श्रीमती साक्षी लोकेश लिल्हारे ने भी अपनी सास की पुण्यतिथि के अवसर पर रक्तदान कर खुद को सौभाग्यशाली बताया इनके अलावा ग्राम के सरपंच सावन पिछोडे,शिव नगपुरे, धर्मेंद्र नगपुरे, लक्ष्मी पिछोडे सहित बड़ी संख्या में युवाओं ने रक्तदान किया। समाज मे आडम्बर को दूर कर शिक्षा,स्वास्थ्य जैसे अन्य सकारात्मक बदलाव लाने के उद्देश्य से कुम्हारी ग्राम पंचायत भवन चौक पर आयोजित स्वास्थ शिविर में मुख्य रूप से क्षेत्र के विधायक आयोग अध्यक्ष गौरीशंकर बिसेन,भाजपा नेत्री श्रीमती लता एलकर,मुख्य चिकित्सा अधिकारी मनोज पांडे सहित अन्य मौजूद रहे इनके द्वारा आयोजन की सराहना की गई.यंहा मुख्य रूप से उपस्थित गौरीशंकर बिसेन ने कहा कि दिवंगत शांती लिल्हारे की प्रथम पुण्यतिथि के अवसर पर स्वास्थ्य शिविर से बेहतर कुछ नही हो सकता मां का कर्ज तो उतारा नही जा सकता लेकिन शिविर और रक्तदान के प्रयास से सच्ची श्रद्धांजलि दी गई है यंहा श्री बिसेन ने आजकह की नर सेवा ही नारायण सेवा है यंहा लोगो का स्वास्थ्य परीक्षण और निःशुल्क दवा वितरण नारायण सेवा के समान है उन्होंने लोगो से शिक्षा और स्वास्थ्य के प्रति जागरूक रहने का संदेश भी दिये। इस अवसर एडिशनल कमिश्नर लोकेश लिल्हारे ने कहा कि तेरहवीं,अहेर,दहेज प्रथा जैसी अन्य सामाजिक रीतियों के नाम पर चल रहे आडम्बर को दूर करके दिवंगत मां के मंशानुरूप ही मृत्युभोज न कराते हुए पैसों का उपयोग शिक्षा क्रांति लाने और स्वास्थ्य शिविर समाज के कल्याण में करने की बात कही थी उन्ही के मार्गदर्शन में यह स्वास्थ्य शिविर और रक्तदान का कार्यक्रम रखा गया है ताकि मानव सेवा का अच्छा उदाहरण रख सके इस अवसर पर श्री लिल्हारे ने मां की पुण्यतिथि के अवसर पर पुस्तकालय और शिक्षा उन्नति के लिए लोधेश्वर जनचेतना संगठन को 51 हजार की राशि का चेक द्वारा दान किया गया,यंहा उन्होंने लोधी अधिकारी कर्मचारी संघ,छू लो आसमान किस��े रोका है,रक्तदान करने वालो,चिकित्सको डॉ अजित गनवीर , डॉ दिनेश मेश्राम,डॉ वेदप्रकाश लिल्हारे ,डॉ प्रदीप मेश्राम ,डॉ आशीष गिरी, डॉ सुभम लिल्हारे ,डॉ स्वेतल माहुले ,डॉ नीलिमा लिल्हारे , डॉ संजय माहुले , डॉ अमित बिसेन ,डॉ उन्नति पिछोडे ,डॉ भारती दशिरिये,डॉ पायल लिल्हारे , डॉ लालचंद दशिरिये,डॉ फागुलाल मोहारे,डॉ रश्मि लिल्हारे ,डॉ अनिल लिल्हारे ,डॉ यशवंत लिल्हारे , एवं निःशुल्क दवाईयों का वितरण आशीष कांकरिया के द्वारा किया गया ग्रेसियस कॉलेज की छात्राएं और पंचायत समिति,सहित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से सहयोग करने वालो का आभार व्यक्त किए।यंहा रक्तदान मोबाइल वैन में साक्षी लिल्हारे ने भी अपनी सास की प्रथम पुण्यतिथि के अवसर पर अपना खासा योगदान दिए साथ ही पहली बार रक्तदान करके माता स्वरूपा सास को नम आंखों से श्रद्धांजलि अर्पित की और कहा कि उनकी सासु मां एक समाज कल्याण की सोच रखने वाली और पूरे परिवार रिश्तेदारों को लेकर चलने वाली साहसी मां थी जिनसे उन्होंने काफी कुछ सीखा है उनकी कमी हमेशा खलेगी लेकिन उनकी सिख और संस्कार आशीर्वाद के रूप में हमारे साथ है,उनके ही मानव कल्याण वाले संस्कार के अनुरूप स्वास्थ्य शिविर का आयोजन रखा गया है। इस अवसर पर डॉ वेदप्रकाश लिल्हारे ने जानकारी देते हुए बताया कि शासकीय और अशासकीय चिकित्सको की टीम ने मुख्य चिकित्सा अधिकारी के मार्गदर्शन में 14 सौ से अधिक लोगो का स्वास्थ्य परीक्षण कर उनका उपचार किया गया साथ ही उन्हें दवाई भी दी गई इसके जंहा हड्डी रोग,शुगर,ब्लडप्रेशर,सहित अन्य बीमारी के मरीजों की संख्या खासी बनी रही जिन्हें सावधानी के साथ बेहतर खान-पान,व्यायाम के टिप्स भी दिए गए शिविर में ग्राम कुम्हारी,पाथर वाड़ा, टवेझरी, मझारा,जागपुर, भटेरा, खैरी,आगरवाड़ा, जरेरा सहित कई गांव के सैकड़ो ग्रामीणों ने इलाज कराए इसके अलावा यंहा दर्जनों युवाओं ने रक्तदान किये। इस अवसर पर सरपंच सावन पिछोडे, दुर्गा सौलखे,भुवन लिल्हारे,सी डी नगपुरे,सोहन उरोडे, धनेश पटेल नगपुरे जी,सनत उपवंशी,धर्मपाल माहुले,श्री बलोने जी,सुभाष नगपुरे,रामसिंह लिल्हारे,अनोज बसेने, सुनीता जंघेले, हेमंत नगपुरे,हेमराज नगपुरे, राजेश लिल्हारे निशा नगपुरे,प्रज्ञा जंघेले,अक्कू बघेले, विजय बसेने,राहुल सिंह राजपूत,सौरभ लिल्हारे,कुणाल नगपुरे,मुकुल नगपुरे,संदेश लांजेवार सहित अन्य लोग बड़ी संख्या में ग्रामीण मौजूद रहे।
Tumblr media
Read the full article
0 notes
nidarchhattisgarh · 1 year
Text
मासूम भाई-बहन की नदी में डूबने से मौत, शादी की खुशियों में छाया मातम
NCG NEWS DESK कोरबा। जिले में दो मासूम भाई-बहनों की हसदेव नदी में डूबने से मौत हो गई है। दोनों भाई शादी कार्यक्रम में शामिल होने आए थे। सूचना पर पुलिस मौके पर पहुंचकर जांच में जुट गई है। घटना के बाद पूरे परिवार में मातम पसर गया है। यह मामला उरगा थाना क्षेत्र का है। जानकारी के अनुसार, उरगा थाना क्षेत्र अंतर्गत देवरमाल गांव में शादी कार्यक्रम चल रहा था। बच्चों के बड़े पिता सनत पटेल सुबह नदी के घाट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanat-kumar-singh · 2 years
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
🙏आप एवं आपके परिवार को गणतंत्र दिवस एवं बसन्त पंचमी की हार्दिक शुभकामनाएं💐💐💐💐💐
सनत कुमार सिंह जिला वरिष्ठ उपाध्यक्ष/ अध्यक्ष ,
उत्तर प्रदेशीय प्राथमिक शिक्षक संघ ,
काशी विद्यापीठ ,वाराणसी।
0 notes
ramchandra4747 · 2 years
Text
सत साहेब
देखाे दुनियाँ बालाे कल तक हाम कहते थे अाज देस बिदेस के पत्र पत्रिका पुस्तक भविस्य बकता साइनस बिज्ञ मुला काजि
धर्म के परबरतक सब के मुख मे सिरफ ऐक हि नाम कि सनत जगतगुरु रामपाल जी महाराज हि भगबान है ।
नै मन सुत उलझ या रिऋी रहे झख मार ।
सत गुरु अइसे सुलझा दे उलझे ना दुजिबार।।
समझा ताे सिरधर पाअाे
बहुर ना लगता अइसा दाउ।।
सत गुरु सरन अाइ टले बाला ।
अगर नसिब मे सुलि हाे काटाे मे टल जाय ।
सत साहेब।।
Tumblr media
0 notes
Text
प्रदूषण जांच प्रमाणपत्र फर्जीवाड़े में कार्रवाई शुरू
प्रदूषण जांच प्रमाणपत्र फर्जीवाड़े में कार्रवाई शुरू
देहरादून : उत्तराखंड में काफी लंबे समय से चल रही   प्रदूषण जांच प्रमाणपत्र फर्जीवाड़े में कार्रवाई शुरू हो गई है। प्रदेश के सभी आरटीओ को जांच केंद्रों की जांच शुरू करने के आदेश दिए गए हैं। साथ ही अब तक फर्जी तरीके से प्रमाणपत्र बना रहे नौ सेंटरों के खिलाफ कार्रवाई के आदेश दे दिए गए हैं। संयुक्त परिवहन आयुक्त सनत कुमार सिंह ने बताया देहरादून में मालाजी पर्यावरण समिति, चौहान सोल्यूशन चेक प्वाइंट,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
टेरर फंडिंग मामला: ईडी ने जम्मू-कश्मीर के अलगाववादी शब्बीर अहमद शाह के श्रीनगर स्थित घर को कुर्क किया
टेरर फंडिंग मामला: ईडी ने जम्मू-कश्मीर के अलगाववादी शब्बीर अहमद शाह के श्रीनगर स्थित घर को कुर्क किया
द्वारा पीटीआई नई दिल्ली: प्रवर्तन निदेशालय ने शुक्रवार को कहा कि उसने केंद्र शासित प्रदेश में आतंकवादी गतिविधियों को बढ़ावा देने के एक मामले से जुड़ी मनी लॉन्ड्रिंग जांच के तहत जम्मू-कश्मीर के अलगाववादी नेता शब्बीर अहमद शाह के श्रीनगर स्थित घर को कुर्क किया है। अधिकारियों ने कहा कि 21.80 लाख रुपये का यह घर श्रीनगर के बरजुल्ला थाना क्षेत्र के सनत नगर के बोत्शाह कॉलोनी में स्थित है। शाह के खिलाफ…
View On WordPress
0 notes
sharpbharat · 2 months
Text
Saraikela sadar hospital irregularities : सरायकेला सदर अस्पताल की अनिमितताओं पर बिफरे विधायक प्रतिनिधि व प्रखंड 20 सूत्री अध्यक्ष, दोनों ने सिविल सर्जन से किया जवाब तलब, स्वास्थ्य मंत्री व स्थानीय विधायक से करेंगे शिकायत
सरायकेला : मंगलवार को सदर अस्पताल में व्याप्त अनियमित को लेकर सरायकेला विधायक प्रतिनिधि सनत कुमार आचार्य एवं गम्हरिया प्रखंड 20 सूत्री अध्यक्ष सह झारखंड मुक्ति मोर्चा बुद्धिजीवी मंच के जिला अध्यक्ष छायाकांत गोराई ने सिविल सर्जन की जमकर क्लास लगाई. बता दें कि लगातार मिल रही शिकायत के बाद मंगलवार को विधायक प्रतिनिधि सनत कुमार आचार्य ने सदर अस्पताल का औचक निरीक्षण किया. इस दौरान वहां कई खामियां पाई…
0 notes
prakhar-pravakta · 1 year
Text
श्रीकांत चतुर्वेदी के नेतृत्व में कैबिनेट मंत्री का हुआ भव्य स्वागत
सतना। नवनियुक्त कैबिनेट मंत्री राजेंद्र शुक्ला के मां शारदा की नगरी मैहर में प्रथम नगर आगमन पर प्रदेश कार्य समिति सदस्य श्रीकांत चतुर्वेदी के नेतृत्व में मैहर रेलवे स्टेशन पर जोरदार स्वागत किया गया जिसमें उपस्थित रहे मैहर नगर मंडल अध्यक्ष विकास तिवारी प्रदेश कार्य समिति सदस्य कैलाश गौतम देवेंद्र पांडे सनत गौतम जगदीश जी अंबुज तिवारी राजा पांडे विनोद खटीक प्रकाश तिवारी आलोक अग्रवाल रोहित ओंकार पंकज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sonita0526 · 5 years
Photo
Tumblr media
भारत की महिला टीम की हॉकी टीम के डिफेंडर सुनीता लाकड़ा ने चोट के टूटने के कारण सेवानिवृत्ति की घोषणा की 28 वर्षीय ने कहा कि इस साल भारत के टोक्यो ओलंपिक अभियान का हिस्सा बनने के लिए उनके सपने में चोट लगी है। । Source link
0 notes
news4me · 5 years
Text
Kartik Aaryan: ड्राइविंग के साथ अपनी फिल्मों के गाने सुनते नजर आए कार्तिक आर्यन - kartik aaryan ride on empty roads and enjoy his films songs
Kartik Aaryan: ड्राइविंग के साथ अपनी फिल्मों के गाने सुनते नजर आए कार्तिक आर्यन – kartik aaryan ride on empty roads and enjoy his films songs
[ad_1] टाइम्स न्यूज नेटवर्क | Updated: 24 Nov 2019, 11:36:41 AM IST
Tumblr media
कार्तिक आर्यन
ऐक्टर कार्तिक आर्यन ने जब से बॉलिवुड इंडस्ट्री में एंट्री ली है, तब से पीछे मुड़कर नहीं देखा है। उनके फिल्मी करियर का ग्राफ लगातार ऊपर जा रहा है। कार्तिक आर्यन रविवार की सुबह सड़कों पर अपनी कार में सवार होकर निकले। इस दौरान उन्होंने अपनी फिल्मों को गानों पर इंजॉय किया। इसके फोटो सोशल मीडिया पर सामने आए हैं। सुबह…
View On WordPress
0 notes
mrdevsu · 3 years
Text
Sri Lanka's COVID-19 Fundraiser Cricket Match Hit By Coronavirus | Cricket News
Sri Lanka’s COVID-19 Fundraiser Cricket Match Hit By Coronavirus | Cricket News
मैच श्रीलंका ग्रेट इलेवन और टीम श्रीलंका के बीच होना था।© एएफपी में एक चैरिटी क्रिकेट मैच श्रीलंका खेल के लिए देश के शासी निकाय ने कहा कि पूर्व टेस्ट कप्तान के सकारात्मक परीक्षण के बाद कोरोनोवायरस महामारी से लड़ने में मदद करने के लिए धन जुटाने के उद्देश्य से रविवार को रद्द कर दिया गया। श्रीलंका और बांग्लादेश के बीच खेले जा रहे दूसरे टेस्ट के अंतिम दिन के एक दिन बाद पल्लेकेले में मंगलवार को टी 20…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 3 years
Text
श्रीलंका का COVID-19 फंडराइजर क्रिकेट मैच हिट कोरोनोवायरस | क्रिकेट खबर
श्रीलंका का COVID-19 फंडराइजर क्रिकेट मैच हिट कोरोनोवायरस | क्रिकेट खबर
मैच श्रीलंका ग्रेट इलेवन और टीम श्रीलंका के बीच होना था।© एएफपी में एक चैरिटी क्रिकेट मैच श्रीलंका खेल के लिए देश के शासी निकाय ने कहा कि पूर्व टेस्ट कप्तान के सकारात्मक परीक्षण के बाद कोरोनोवायरस महामारी से लड़ने में मदद के लिए धन जुटाने के उद्देश्य से रविवार को रद्द कर दिया गया। श्रीलंका और बांग्लादेश के बीच खेले जा रहे दूसरे टेस्ट मैच के अंतिम दिन के एक दिन बाद पल्लेकेले में मंगलवार को टी 20…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sharpbharat · 3 months
Text
Jamshedpur rural mml union : मुसाबनी माइंस लेबर यूनियन के दल ने एचसीएल/आइसीसी के ईडी से की मुलाकात, कंपनी व कर्मचारियों की समस्याओं से कराया अवगत
घाटशिला : मुसाबनी माइंस लेबर यूनियन का एक प्रतिनिधिमंडल अध्यक्ष अखिलेश्वर सिंह तथा महामंत्री सनत कालटू चक्रवर्ती के नेतृत्व में एचसीएल/आइसीसी के कार्यकारी निदेशक श्यामसुंदर सेठी से मिला. इस  दौरान मुख्‍य रूप से मुसाबनी माइंस वेलफेयर फंड के बक़ाये के मजदूरों को होने वाले भुगतान में हो रहे विलंब को दुरूस्त करने, मजदूरों तथा क्षेत्र के भविष्य के लिए माइंस एंव मऊभंडार कॉपर प्लांट का संचालन सुचारू रूप…
0 notes