#संधी!
Explore tagged Tumblr posts
kvksagroli · 6 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
हंगामी फळांवर प्रक्रिया केल्यास नासाडी थांबेल तसेच उद्योग व्यवसायास चालना मिळेल.. फळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते. यामुळे फळांची नासाडी तर थांबतेच सोबतच प्रक्रियाउद्योग देखील सुरू होतात. यामुळे नवयुवक व महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील. सध्याच्या हंगामामध्ये लिंबू व लिंबूवर्गीय फळांचे दर कमी असतात व उत्पादन जास्त असते. यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे आणि विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. याच उद्देशाने संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, उद्यामिता लार्निंग सेंटर येथे women first कार्यक्रमांतर्गत लिंबू प्रक्रिया या विषयावर दि. 29 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान लिंबापासून विविध प्रकारची लोणची , स्क्वॉश व इतर पदार्थ प्रात्यक्षिक स्वरूपात शिकवण्यात आले. तसेच प्रक्रिया उद्योग उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थाची पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व कायदेशीर इतर बाबी या सर्वांची सविस्तर माहिती डॉ माधुरी रेवणवार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला व युवक यांनी सहभाग नोंदवला. #agriculture #skills #valueaddition #womensupportingwomen #womeninbusiness #KrishiVigyanKendra #sagroli #nanded #FoodProcessingIndustries
2 notes · View notes
kamlakar-das · 8 months ago
Text
Tumblr media
कबीर परमात्मा ने बोलले आहे की माणूस जन्म हा खूप कष्टाने प्राप्त होतो या जन्माला संसारामध्ये गुंतून संसाराच्या साऱ्या कृती करून नष्ट करायचे नसून सतभक्ती सद्गुरु आणि सतलोक प्राप्तीसाठी मिळालेला वापर करायचा असतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेली ही एक अनमोल संधी असते
3 notes · View notes
news-34 · 5 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 5 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राष्ट्र प्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल - पंतप्रधानांचं प्रतिपादन • संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांची माहिती,संरक्षण क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करार • राज्य सरकारच्या कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड इथल्या सभेत ग्वाही • शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश आणि • पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय
राष्ट्र प्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल असून, ते तुष्टिकरण नाही, तर संतुष्टिकरणावर केंद्रीत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या विकासाच्या मॉडेलला देशातल्या जनतेनं समर्थन दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं, ते म्हणाले: ‘‘2014 के बाद देश ने हमें सेवा करने का अवसर दिया। देश दुसरी बार, तिसरी बार हमे सेवा करने का ��ुहुरत बनाती है इसका कारण देश की जनता ने हमारे विकास के मॉडेल को परखा है। समझा है। और समर्थन दिया है।’’
राष्ट्रपतींचं अभिभाषण भविष्यासाठी मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारने कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि औद्योगिकीकरणावर लक्ष केंद्रित केल्याचं सांगून त्यांनी, मुद्रा योजना, गरीबांना आरक्षण, शिक्षण, रोजगार अशा अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यानंतर राज्यसभेत धन्यवाद प्रस्ताव संमत करुन कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात चाकण इथं काल निबे लिमिटेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचं उद्घाटन तसंच शिर्डी इथल्या सुविधेचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र शासनानं संरक्षण क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करार केले. केंद्र सरकारने देशातल्या नवोन्मेषकांना संधी, व्यासपीठ मिळवून दिल्याने आज आपला देश संरक्षण क्षेत्रात श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करत असल्याचं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उद्योगांना त्रास होईल अशी वर्तवणूक करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेड इथं आयोजित जाहिर सभेत ते काल बोलत होते. मराठवाड्याची दुष्काळवाडा अशी असलेली ओळख दूर करण्यासाठी बंद पडलेल्या योजना महायुती सरकार पुन्हा सुरू करत असल्याचं शिंदे म्हणाले. मराठवाड्यासाठी ११ जलसिंचन योजनांना मंजुरी दिल्याचं सांगून, मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली, ‘‘अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत रखडेलेले प्रकल्प आम्ही पुढे नेले. एकीकडे प्रकल्प उभे केले. दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना. शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं. शेतकरी सन्मान योजना काढली. युवकांना प्रशिक्षण भत्ता दिला. वयस्करांना वयश्री योजना केली. अडीच वर्षात ए��ढे निर्णय घेतले, आतापर्यंतच्या इतिहासात कधीच एवढे निर्णय घेतले नाहीत.’’
दरम्यान, या सभेनंतर वार्ताहरांशी बोलताना शिंदे यांनी, समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ मार्गाचाही विरोध मावळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शक्तिपीठ महामार्ग जनतेवर लादणार नाही, असं सांगतानाच त्यांनी, जिथे विरोध आहे तिथे काम केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शिव पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, त्या अनुषंगाने काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामं दर्जेदाररीत्या पूर्ण करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी दिली.
राज्यात अतिवृष्टी, गारपीट, पूर, दुष्काळ, या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि अन्य घटकांना राज्य शासनाने ५९२ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांची मदत दिली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. पाच लाख ३९ हजार ६०५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात चार लाख ८३ हजार ८८३ लाभार्थींना ५१४ कोटी ८५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेलं २४९ धावांचं लक्ष्य, भारताने ३९ व्या षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. शुभमन गील ने ८७, श्रेयस अय्यरने ५९ धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा नऊ तारखेला ओडिशात कटक इथं होणार आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये तीरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात काल महाराष्ट्राच्या शुकमणी बाबरेकर आणि गाथा खडके यांनी मिश्र गटातलं विजेतेपद पटकावलं. तर महाराष्ट्राच्या महिला तिरंदाजांच्या पथकाने सामूहिक रिकर्व्ह प्रकारात बाजी मारली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र १९ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांसह एकूण ८८ पदकं जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे.
ज्येष्ठ क्रीडा आणि चित्रपट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर आज दादर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संझगिरी यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संझगिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
धाराशिव इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं, असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाबद्दल माहिती देताना ते म्हणाले: ‘‘आमच्याकडे याठिकाणी आज दीडशे स्टॉल्स उपलब्ध आहेत. आणि फक्त धाराशिव जिल्ह्यातलं नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातील पण जवळजवळ पंधरा स्टॉल्स येऊन याठिकाणी सहभागी झालेले आहेत. आमचं टार्गेट जवळपास वीस लाख आहे. पण आमची एक्सपेक्टेशन आहे की वीस लाखाच्या पलिकडे जाऊन जवळपास यावेळेस पंचवीस लाख या वेळेस आम्ही रीच करू.’’
यावेळी उमेद अभियानाच्या उपक्रमांना इलेक्ट्रॉनिक्स मीडियातून व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दलचा २०२०-२१ चा राजमाता जिजाऊ स्वावलंबन इलेक्ट्रॉनिक्स मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आकाशवाणी, दूरदर्शनचे वार्ताहर देविदास पाठक यांना प्रदान करण्यात आला. तसंच उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांना देखील राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर शहरात दहा ते २३ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने काल भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात झालेल्या डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी कर्मचार्यांच्या प्रशिक्षण सत्रात वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. या मोहिमेअंतर्गत डी.ई.सी आणि अल्बेडाँझॉल गोळया देण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत पूर्वलिंग निदान प्रतिबंध - पीसीपीएनडीटी आणि वैद्यकीय गर्भपात - एमटीपी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. लिंग समानता आणि जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबवले जात असून, नागरिकांनी यासाठी पुढाकार घेऊन लिंग समानता आणि स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधासाठी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या धार्मापुरी इथल्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम याबाबत काल कार्यशाळा घेण्यात आली. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जुने कावसान इथल्या गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या दरम्यान याठिकाणी छापा मारुन हायवा, यारी मशीन, लोडर जप्त केलं.
0 notes
madhuvan-homes · 5 days ago
Text
Tumblr media
मगरपट्टा सिटीच्या भव्य आणि यशस्वी निर्मितीनंतर मधुवन या गृहप्रकल्पाचा शुभारंभ झाला. मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि. यांनी साबळे कन्स्ट्रक्शन्सच्या सहकार्याने साकारलेला हा दिमाखदार प्रकल्प, स्वप्नातलं घर बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी पुणेकरांसाठी घेऊन आला आहे.
हडपसरच्या जवळ आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सुविधासंपन्न मधुवन वसलेलं आहे. आवाक्यातल्या किंमतीतली इथली १ बीएचके घरं राहायला आनंददायक आणि गुंतवणुकीला लाभदायक अशी आहेत. खेळण्यासाठी मोकळ्या जागा, भरपूर हिरवाई व सुखकर जीवनशैलीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा 'मधुवन' मध्ये आहेत. त्यामुळे सुरक्षित परिसरातील सर्वसमावेशक जीवनशैलीचा आनंद आणि फायदे सामान्यांच्याही आवाक्यात आले आहेत.
ससाणे नगर, SRPF, मगरपट्टा सिटी व इतर प्रमुख लोकेशन्सशी उत्तमरीत्या जोडलेला हा प्रकल्प आहे. तेव्हा आता क्षणभरही उशीर करू नका. मधुवन मधलं दर्जेदार, मनपसंत घर बुक करून, पुण्यात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा.
0 notes
mayurabanavali · 6 days ago
Text
जसे सैनिक सीमांचे रक्षण करतात, तसेच आपल्या शहराची सुरक्षा राखण्याचे महत्त्वपूर्ण दायित्व महाराष्ट्र पोलीस पार पाडतात! घर आणि कर्तव्य याचा समतोल साधत, महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ज्या ताकदीने कायदा-सुव्यवस्था राखतात, ती खरोखरच वंदनीय आहे. त्यांच्या त्यागाचा सन्मान म्हणून हळदी-कुंकवाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा आज मला संधी मिळाली. संस्कारांनी घडलेल्या, कर्तव्याने सजलेल्या… या वर्दीतल्या श��्तीस्रुपाला माझा सलाम!
@narendramodi @devendra_fadnavis @mieknathshinde @ckbawankule @advocateashishshelar @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @mihirkotecha18 @narendramodi @bjpmanishtiwari @ravindrachavanofficial @chitrakwagh @mipravindarekar_
#महाराष्ट्रपोलीस #वर्दीतलाशक्ती #कर्तव्यपहिले #शूरवीरांनासलाम #महिलाशक्ती #कायदा-सुव्यवस्था #गौरवमोहिम #समर्पण #संस्कारआणिकर्तव्य #अभिमान
0 notes
khabar24 · 15 days ago
Text
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची महाकुंभ प्रयागराज ये��े भेट
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना आज तीर्थक्षेत्र प्रयाग येथे सनातन परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या महाकुंभ मेळावा मध्ये भेट देऊन द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वाद घेण्याची व सेवा करण्याची संधी लाभली.महाकुंभाची अद्वितीयता आणि भाविकांचा उत्साह अत्यंत प्रेरणादायी व ऊर्जादायी असून आपण सर्वांनी या सनातन संस्कृतीच्या भव्य सोहळ्यात सहभागी व्हावे असे यावेळी…
0 notes
batminews · 21 days ago
Text
10th Class Pass Job
0 notes
nagarchaufer · 23 days ago
Text
नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील , समर्थकांमध्ये उत्साह
नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील , समर्थकांमध्ये उत्साह
नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियुक्तीनंतर भाजपला आता स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्ह्यात वर्चस्व दाखवण्याची संधी चालून आलेली आहे.  विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील बारा जागांपैकी तब्बल दहा…
0 notes
waterplant24 · 26 days ago
Text
फायदेशीर पाणी बॉटलचा व्यवसाय कसा सुरू करावा
youtube
तुमचा स्वतःचा मिनरल वॉटर व्यवसाय सुरू करायचा आहे? 💧 या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला एक फायदेशीर खनिज पाण्याचा व्यवसाय टप्प्याटप्प्याने कसा सेट करायचा ते दाखवू! पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची मागणी दररोज वाढत असल्याने, या किफायतशीर उद्योगात उतरण्याची ही योग्य संधी आहे. मिनरल वॉटर प्लांट्स, सॉफ्ट ड्रिंक प्लांट्स आणि ज्यूस प्लांट्सचे भारतातील आघाडीचे उत्पादक म्हणून आम्ही असंख्य उद्योजकांना यश मिळवून दिले आहे आणि आता आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत! आम्ही मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज��यूस प्लांटसाठी टर्नकी सोल्यूशनमध्ये माहिर आहोत. प्रीमियम-गुणवत्तेची मशिनरी पुरवण्यापासून ते तज्ज्ञांचा सल्ला देण्यापर्यंत, यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही तुमचे विश्वासू भागीदार आहोत या व्हिडिओमध्ये, आपण खालील विषयांवर तज्ञ अंतर्दृष्टी प्राप्त करण्यास सक्षम असाल
आहे. डीटीपीपीएलकडे मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस प्लांटमध्ये अनेक ��र्षांचा मोठा अनुभव आहे. DTPPL हे उच्च दर्��ाचे, hiqh तंत्रज्ञान आणि मिनरल वॉटर प्लांट, सॉफ्ट ड्रिंक प्लांट आणि ज्यूस प्लांटसाठी जागतिक दर्जाच्या मशीन्सच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य आणि प्रसिद्ध ब्रँड नाव आहे. व्यवसाय कल्पना, यंत्रसामग्री अंतर्दृष्टी आणि उद्योग टिपांवरील अधिक व्हिडिओंसाठी LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका. आमच्या नवीनतम सामग्रीसह अद्यतनित राहण्यासाठी 🔔 दाबा! मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस बनवणाऱ्या प्लांट्ससाठी आमच्या टर्नकी सोल्यूशन्सच्या संपूर्ण श्रेणीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी, येथे भेट द्या : https://dtppl.com/
0 notes
imdnews1 · 1 month ago
Text
Crop Insurance Scheme : पीक विमा योजनांची मुदतवाढ | शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजना आणि सुधारित हवामान आधारित पीकविमा योजना या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनांची मुदत २०२५-२६ पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनांना २०२५२६ पर्यंत मुदतवाढ दिली असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे आर्थिक संरक्षण मिळणार आहे. या लेखात आपण या योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा - महासंवाद
मुंबई, दि. ३१ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२५ नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४१
मजेत कुल्फी खात असलेल्या शुभदाचा चेहरा अनंतच्या त्या प्रश्नाने कांहीसा झाकोळला. काहीही उत्तर न देतां ती गप्प बसून राहिली. त्यामुळे अस्वस्थ होऊन अनंत घाईघाईने म्हणाला, "शुभदा, मी कालपासून बघतो आहे की वरकरणी सर्व कांही सुरळीत चालूं असलं तरी मधुनच अचानक तूं आतां हरवल्यागत बसून होतीस तशी हरवून जातेस! नकोशा वाटणाऱ्या आठवणींमधे असं गुंतून पडून कसं चालेल? त्यांतून तुला प्रयत्नपूर्वक बाहेर पडायलाच हवं!" "मलाही ते कळतंय पण वळत नाहीं, त्याला काय करूं?" शुभदाचा केविलवाण्या स्वरांतला तो प्रश्न ऐकून अनंतला तिच्या मनांत चाललेल्या प्रचंड घालमेलीची कल्पना आली. त्याने आपली खुर्ची शुुभदाच्या अधिक जवळ ओढून घेतली आणि तिचे डबडबलेले डोळे हलक्या हाताने पुसत तो मृदु स्वरांत म्हणाला, "शुभदा, तुला ठाऊक आहे की कालपासून अनाथाश्रमांतल्या त्या अश्राप मुलांसाठी आपण दोघांनीच नव्हे, तर आपल्या मित्रपरिवारानेही जे शक्य होतं ते सगळं केलं आहे;-- आणि यापुढेही जमेल तसं करीत राहणार आहोंत! पण झाल्या घटनांपासून आपण थोडं अलिप्त नाहीं झालो, तर ��ाधक-बाधक विचार करून पुढे काय करायला हवं ते कोण आणि कसं ठरवणार?" "तुमचं म्हणणं खरं आहे;-- पण काल बघितलेले अनाथाश्रमांतल्या त्या मुलांचे भुकेले चेहरे डोळ्यांसमोरून जातच नाहीत! राहून राहून मनांत येतं की तिथे काम करणाऱ्या त्या तिन्ही परिचारिकांना त्या कोवळ्या, अनाथ मुलांबद्दल कांहीच माया वा ममता कशी वाटली नाही? त्या पगारी नोकर असल्या तरी त्यांनाही घरी मुलं-बाळं असतील ना?" "त्या तिघी ज्या प्रकारे वागल्या ते समर्थनीय नाहीच;-- पण त्या कशा परिस्थितीत तिथे काम करीत होत्या ते आपल्याला ठाऊक नाही! कदाचित रोजच तेच ते बघून त्यांची मनं निर्ढावली असतील! बघूंया पोलिस चौकशीत आणि वैद्यसाहेब स्वत: करीत असलेल्या तपासांत काय निष्पन्न होतं ते!"
तेवढ्यांत अनंतचा मोबाईल वाजला. त्यानं पाहिलं तर मनोहर भोसलेंचा काॅल होता. त्याने तो घेतल्यावर भोसले म्हणाले, "वहिनी जवळच असतील तर फोन स्पीकरवर ठेवा, म्हणजे त्यांनाही आपलं बोलणं ऐकतां येईल!" "हो, ती इथेच आहे!" शुभदाला खुणेनं जवळ बोलावून घेत अनंतने स्पीकर ऑन केला आणि म्हणाला,"बोला आतां, मनोहरपंत!" "अनंतराव, मनोरमाशी झालेल्या सविस्तर बोलण्यानुसार मी आज सकाळच्या मिटींगपूर्वी एक मेल वैद्यसाहेबांना पाठवली होती! ती वाचल्यावर आत्तां थोड्या वेळापूर्वी त्यांचा फोन आला होता की त्यांना मनोरमा, शुभदा आणि रजनी या तिघींनाही प्रत्यक्ष भेंटायचं आहे! मी मेलमधे मांडलेल्या अनेक मुद्यांचे तपशील या तिघींशी बोलल्याशिवाय नीट समजणार नाहींत असं त्यांना वाटतं! तर त्यांची भेंट कधी होऊं शकेल?" "मनोहरपंत, मी सबनीस पति-पत्नींशी बोलून तुम्हांला १० \ १५ मिनिटांत फोन करतो. प्रमिला व प्रभाकररावांनाही कळवायचं आहे कां?" "आपली वेळ ठरली की मी स्वतः फोन करुन त्यांना मिटिंगमधे सहभागी होण्याची विनंती करीन!" मनोहर भोसलेंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतांना शुभदाच्या चेहर्‍यावरील झाकोळ कमी होत असल्याचं लक्षांत येऊन अनंतला हायसं वाटलं! 'बहुधा खुद्द वैद्यसाहेबांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळणार या विचाराने शुभदाच्या मनांत साचलेलं नैराश्य ओसरलं असावं' असा कयास बांधीत त्याने शुभदाला विचारलं, "तर मग कधी भेटायचं वैद्यसाहेबांना?" "आधी सबनीसांशी बोलून त्या दोघांना कुठली वेळ सोयीची आहे ते बघा!" शुभदा उत्साहाने म्हणाली, "भोसले स्वत: पमाताई आणि प्रभाकररावांना फोन करणार असले तरी आपण त्यांना आधीच फोन करून त्यांचीही सोय बघायला हवी! तुम्ही सबनीसांशी बोलताहांत तोपर्यंत मी पमाताईंना फोन करूं कां?"
सर्वानुमते दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास वैद्यसाहेबांना भेंटायचं ठरल्यावर अनंतने फोन करून तसं भोसलेंना कळवलं! तोपर्यंत शुभदाने रात्रीच्या जेवणाची तयारी केली. जेवायला सुरुवात केल्यावर शुभदा कांहीशी घुटमळत म्हणाली, "आता तसा उशीर झालाय् खरा;--पण एक सुचवूं कां?" तिच्या मनांत जे कांही घोळत आहे, ते लौकर बाहेर यावं यासाठी तिला उत्तेजन देत अनंत म्हणाला, "कुठल्याही चांगल्या गोष्टीला वेळकाळाची मर्यादा नसते! तेव्हां तुझ्या मनांत काय आहे ते मोकळेपणाने सांग! त्यातून कांहीतरी चांगलंच निष्पन्न होईल अशी माझी खात्री आहे!" "वैद्यसाहेबांना भोसलेंनी पाठवलेली मेल तुमच्या काॅम्प्युटरवर मागवून घ्याल कां? ती वाचून मला, रजनीला व मनोरमाला अनाथाश्रमांत खटकलेल्या सर्व बाबींचा समावेश त्यामधे झाला आहे की नाहीं ते तपासतां येईल!" "अगदी योग्य सुचना केलीस, शुभदा!" मनापासून कौतुक करीत अनंत म्हणाला, "मी मनोहरपंतांना लगेचच कळवतो! म्हणजे बहुधा झोपण्यापूर्वी तुला ती मेेल तपासून बघतां येईल!"
१ जून २०२३
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र यांनी आज प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याला भेट देऊन त्रिवेणी संगम घाटावर पवित्र स्नान केलं. त्रिवेणी संगमावर पोचण्यासा��ी पंतप्रधानांनी यमुना नदीतून बोटीने प्रवास केला, त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधानांनी गंगा, यमुना आणि सरस्वाती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पूजा केली. महाकुंभातल्या साधुसंतांच्या ते भेटी घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही आज महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं.
भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालनं, त्रिवेणी संगमावरच्या या भव्य सोहळ्यात उपस्थित राहता येणं ही भाग्याची गोष्ट असून, अशा प्रकारचा आध्यात्मिक सोहळा जगात भारताशिवाय इतरत्र कोठेही होत नाही, असं मत व्यक्त केलं आहे.
****
आकाशवाणीचे वयोवृद्ध वृत्तनिवेदक वेंकटरामन यांच काल रात्री चेन्नई इथं निधन झालं, ते एकशे दोन वर्षांचे होते. वेंकटरामन यांनी पंधरा ऑगस्ट १९४७ च्या सकाळी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्याचं वृत्त प्रसारित केलं होतं. वेंकटरामन चौसष्ट वर्ष आकाशवाणीशी जोडलेले राहिले.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे एकोणीस पूर्णांक पंचाण्णव टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शु��्रवारी ते नवीन पतधोरण जाहीर करतील.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन, तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा सत्कारही फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या रेल्वेमार्गाची जलदगती चाचणी आज होणार आहे. आज सकाळी विघनवाडी ते नवगण राजुरी रेल्वे चाचणीची खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पालवण इथं पाहणी केली. अहिल्यानगर ते बीड या २६१ किलोमीटर अंतराच्या रेल्वेसाठी बीडवासियांचा गेल्या तीन दशकापासून संघर्ष सुरू असून, अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं, मात्र आता बीड जिल्ह्याची या रेल्वेमार्गाची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या ११ तारखेपासून, तर दहावीची परिक्षा २१ तारखेपासून सुरु होत आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे.
नांदेड जिल्ह्यात दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तसंच तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
****
तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ, येत्या तेरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती, महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ‘शो मॅन-राज कपूर’ ही यंदाच्या या महोत्सवाची संकल्पना आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे तसंच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पिफ डिस्टींग्विशिंग अवॉर्ड या लक्षवेधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. महोत्सवात विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा होणार असून जगभरातले नावाजलेले चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
****
समाज कल्याण विभाग आणि नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचं उद्घाटन काल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यातल्या एकूण ५५ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून, पारंपारिक लोककला, नृत्य, गायन यासह विविध कलाप्रकार सादर केले.
****
0 notes
svagrosolutions · 2 months ago
Text
सेंद्रिय शेतीचे फायदे
अलि��डच्या वर्षांत, सेंद्रिय शेतीला पारंपारिक कृषी पद्धतींचा एक शाश्वत पर्याय म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. पर्यावरण, आरोग्य आणि अन्नसुरक्षेबाबत जग अधिक जागरूक होत असताना, सेंद्रिय शेती हा एक उपाय म्हणून उभा राहतो ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होतो. पण सेंद्रिय शेतीचे नक्की फायदे काय? चला त्यांचा तपशीलवार शोध घेऊया.
पर्यावरण संरक्षण सेंद्रिय शेतीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम. पारंपारिक शेतीच्या विपरीत, जी कृत्रिम कीटकनाशके, तणनाशके आणि रासायनिक खतांवर जास्त अवलंबून असते, सेंद्रिय शेती या हानिकारक पदार्थांचा वापर टाळते. हे माती आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्यास, जैवविविधता टिकवून ठेवण्यास आणि जमिनीचा ऱ्हास रोखण्यास मदत करते.
सेंद्रिय शेती पद्धती जसे की पीक रोटेशन, हिरवळीचे खत आणि कंपोस्टचा वापर यामुळे माती निरोगी, चांगले पाणी टिकवून ठेवणे आणि मातीची धूप कमी होते. या पद्धती इकोसिस्टमची अखंडता टिकवून ठेवण्यास आणि अधिक शाश्वत कृषी प्रणालीला प्रोत्साहन देण्यास मदत करतात.
आरोग्यदायी अन्न उत्पादन सेंद्रिय शेती कृत्रिम रसायने, कीटकनाशके आणि जनुकीय सुधारित जीव (GMOs) पासून मुक्त अन्न तयार करते. याचा अर्थ असा की तुम्ही वापरत असलेल्या अन्नामध्ये हानिकारक अवशेष असण्याची शक्यता कमी असते ज्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सेंद्रिय अन्न देखील अँटिऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांमध्ये समृद्ध आहे, जे हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी महत्वाचे आहे.
सेंद्रिय शेती नैसर्गिक कीटक नियंत्रण आणि माती व्यवस्थापन तंत्रांवर अवलंबून असल्याने, उत्पादित केलेले अन्न बहुतेक वेळा अधिक चवदार आणि पौष्टिक असते. बरेच ग्राहक सेंद्रिय उत्पादन निवडतात कारण त्यांना विश्वास आहे की ते त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.
मातीचे आरोग्य सुधारले सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीच्या आरोग्याला प्राधान्य असते. सेंद्रिय शेतकरी जमिनीची सुपीकता आणि रचना सुधारण्यासाठी कंपोस्टिंग, मल्चिंग आणि पीक रोटेशन यासारख्या तंत्रांचा वापर करतात. या पद्धती जमिनीतील सूक्ष्मजीवांचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे पोषक सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळते आणि कृत्रिम खतांची गरज कमी होते.
मजबूत, उत्साही पिके वाढवण्यासाठी निरोगी मा��ी महत्त्वाची आहे आणि कालांतराने सेंद्रिय शेतीमुळे मातीची उत्पादकता वाढते. हे पारंपारिक शेतीच्या विरुद्ध आहे, ज्यामुळे मातीची झीज होऊ शकते आणि रासायनिक खतांचा अतिवापर आणि मोनोपीक पद्धतींमुळे सुपीकता कमी होते.
जैवविविधता संवर्धन सेंद्रिय शेती अधिक संतुलित आणि वैविध्यपूर्ण परिसंस्था निर्माण करून जैवविविधतेला प्रोत्साहन देते. जे शेतकरी सेंद्रिय शेतीचा सराव करतात ते सहसा कीटक नियंत्रणाच्या नैसर्गिक पद्धती वापरतात, जसे की लेडीबग आणि भक्षक बीटल सारख्या फायदेशीर कीटकांच्या उपस्थितीला प्रोत्साहन देणे. ते विविध प्रकारची पिके देखील वाढवतात, जी वनस्पती, कीटक आणि प्राण्यांच्या विस्तृत श्रेणीस समर्थन देतात.
हानिकारक रसायने टाळून, सेंद्रिय शेती पिकांच्या परागीकरणासाठी आवश्यक असलेल्या मधमाश्या आणि फुलपाखरांसारखे स्थानिक वन्यजीव आणि परागकणांचे संरक्षण करण्यास मदत करते. सेंद्रिय शेतीद्वारे समर्थित मोठ्या जैवविविधतेमुळे इकोसिस्टम रोग, कीटक आणि बदलत्या हवामान परिस्थितीसाठी अधिक लवचिक बनते.
कार्बन फूटप्रिंट कमी करणे सेंद्रिय शेती पद्धती हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी योगदान देतात आणि हवामान बदल कमी करण्यास मदत करतात. सेंद्रिय शेती ही कृत्रिम खतांवर अवलंबून नसल्यामुळे, जे उत्पादनासाठी ऊर्जा-केंद्रित आहेत, त्यात सामान्यतः कमी कार्बन फूटप्रिंट असते. याव्यतिरिक्त, सेंद्रिय शेती पद्धती जसे की कृषी वनीकरण, मल्चिंग आणि कंपोस्टिंग जमिनीतील कार्बन वेगळे करण्यास मदत करतात.
शाश्वत शेती पद्धतींना चालना देऊन, सेंद्रिय शेती केवळ कार्बन कमी करण्यास हातभार लावत नाही तर हवामान बदलाच्या हानिकारक प्रभावांचा सामना करण्यास देखील मदत करते. हे पर्यावरणाच्या ऱ्हास विरुद्धच्या जागतिक लढ्यात एक महत्त्वाचे साधन बनते.
स्थानिक अर्थव्यवस्थेचे समर्थन करते सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्याची संधी देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार देऊ शकते. सेंद्रिय शेततळे अनेकदा त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना शेतकरी बाजार, अन्न सहकारी संस्था आणि समुदाय-समर्थित कृषी (CSA) कार्यक्रमांद्वारे विकतात. यामुळे ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संबंध निर्माण होतो, स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची योग्य मोबदला मिळण्याची खात्री होते.
सेंद्रिय शेतीमुळे शेतीपासून वितरण, पॅकेजिंग आणि किरकोळ विक्रीपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्माण होतात. हे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, लहान शेतात आणि समुदायांना टिकवून ठेवण्यास मदत करते.
वर्धित प्राणी कल्याण सेंद्रिय शेती केवळ वनस्पती-आधारित शेतीवर लक्ष केंद्रित करत नाही तर प्राण्यांच्या नैतिक उपचारांवर देखील भर देते. सेंद्रिय शेती प्रणालीमध्ये, पशुधनांना फिरण्यासाठी अधिक जागा दिली जाते आणि ते लहान पिंजरे किंवा गर्दीच्या कोठारांमध्ये मर्यादित नाहीत. त्यांना सेंद्रिय खाद���य दिले जाते आणि प्रतिजैविक किंवा ग्रोथ हार्मोन्सऐवजी नैसर्गिक उपायांनी उपचार केले जातात.
सेंद्रिय शेतीला पाठिंबा देऊन, ग्राहक हे सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात की प्राणी मानवीय आणि नैसर्गिक वातावरणात वाढले आहेत, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण आरोग्याला प्रोत्साहन मिळते.
0 notes
mayurabanavali · 9 days ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
ि 2 फेब्रुवारी ला मुलुंड पूर्वेमधील आर्यावर्त इंद्रप्रस्थ या स्वयंपूर्ण पुनर्विकास या कार्यक्रमाला राज्याचे कॅबिनेट तथा माहिती व तंत्रद्यान, सांस्कृतिक कार्य मंत्री सन्माननीय ॲड आशिषजी शेलार , माजी खासदार श्री डॉ विकास महात्मे, मुंबई बँकेचे अध्यक्ष श्री प्रवीण दरेकर जी, आमचे नगरसेवक श्री प्रभाकर शिंदे, प्रकाश जी गंगाधरे ह्यांच्या उपस्थितीत चावी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन तसेच स्वागत करण्याची संधी मिळाली त्यावेळची काही क्षणाचित्रे.
@narendramodi @devendra_fadnavis @mieknathshinde @ckbawankule @advocateashishshelar @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @mihirkotecha18 @narendramodi @bjpmanishtiwari @ravindrachavanofficial @chitrakwagh @mipravindarekar_
#पुनर्विकास #नवेघर #समृद्धभविष्य #आर्यावर्तइंद्रप्रस्थ #स्वप्नपूर्ती #घरतेथेसुख #विकासाचीनवीसंधी #नव्यासुरुवात #चावीवाटप #आनंदसोहळा
0 notes