48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? शरद पवारांवर ही टीका कुणी केली ?
48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? शरद पवारांवर ही टीका कुणी केली ?
48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? शरद पवारांवर ही टीका कुणी केली ?
प्रदीप कापसे, पुणे : बेळगाव प्रश्नावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतांना आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 48 तासांचा अल्टिमेटम देत इशारा दिला आहे, अन्यथा मी कर्नाटकात जाईल असा इशारा दिला आहे. याशिवाय संजय राऊतही कर्नाटक सरकारसह राज्यातील सरकारवर हल्लाबोल करत…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
गृहमंत्री अमित शहा यांनी आज हिंदी दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संविधान सभेनं १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं. हिंदी दिवसाला ७५ वर्षे पूर्ण होत असून राजभाषा म्हणून हिंदी दिन साजरा केला जात असल्याचं त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे.
या वर्षीच्या हिंदी दिनाचे महत्त्व सांगून सर्व भारतीय भाषा या देशाचा अभिमान आणि वारसा आहे तसंच या भाषांना समृद्ध केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये स्पर्धा नाही, हिंदी आणि सर्व स्थानिक भाषांत मित्रत्व आहे. प्रत्येक भाषा हिंदीला बळ देते आणि हिंदी सुद्धा गुजराती, मराठी, तेलगूसह सर्व प्रादेशिक भाषांनाही बळ देत असल्याचं गृहमंत्री म्हणाले. दरम्यान, राजभाषा हीरक जयंती उत्सवानिमित्त चौथी अखिल भारतीय राजभाषा परिषद नवी दिल्लीत होत असून अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं.
****
जम्मू-काश्मीर इथं आज सकाळी उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. क्रिरी भागातील चक-ए-टेप्पर या गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही तीन दहशतवाद्यांच्या मृत्यूसंदर्भात दुजोरा दिला आहे.
****
कांद्यावरील किमान निर्यात शुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं राज्यातल्या हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कांद्यावरील निर्यात बंदी अगोदरच उठविण्यात आली होती, मात्र निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत होतं असं ते म्हणाले. आता कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कांदा निर्यातीवरचे किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानले.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री लातूर विमानतळावर पोहचले असून तिथून हेलिकॉप्टरने ते परांड्याकडे रवाना झाले आहेत.
****
येत्या सोमवारी १६ तारखेला साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणानिमित्त दिली जाणारी सार्वजनिक सुटी १८ तारखेला जाहीर करण्यात आली आहे. ईद निमित्त मुस्लिम बांधव जुलूस मिरवणूक काढतात, या पार्श्वभूमीवर १७ तारखेची अनंत चतुर्थी लक्षात घेता सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राहण्यासाठी सुटीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद आज सुरु झाली आहे, या परिषदेचं उद्घघाटन खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झालं. मराठवाड्याला सातत्यानं निसर्गाच्या असमतोलतेचा अधिक फटका बसला आहे, या परिषदेच्या माध्यमातून निसर्ग आणि पायाभूत सुविधेचा समतोल राखण्यास सहाय्य होईल, अशी अपेक्षा कराड यांनी याप्रसंगी व्यक्त केली. ग्रामीण विकासाला नवा दृष्टीकोन देणारी ही परिषद ठरेल, असा विश्वास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर गजानन सानप यांनी व्यक्त केला. शाश्वत विकास, पर्यावरण आणि समाज कल्याणासंबिधत प्रश्न आणि आव्हान या विषयावरील दोन दिवसीय परिषदेमध्ये ६०हून अधिक संशोधक उपस्थिती लावणार आहेत.
****
स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशात येत्या १७ तारखेपासून २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेत कार्यालयं, आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टिनं विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छता हा एक संस्कार बनावा, यासाठी यामध्ये प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भालाफेकपटू नीरज चोप्रा आज ब्रुसेल्स इथं होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत नीरज गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानावर होता, तर २०२२ साली त्यानं ही स्पर्धा जिंकली होती. सध्या नीरज चोप्रा डायमंड लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
नागपूरच्या काटोल मार्गावरील रामदेव टेकडी इथल्या रामदेवबाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवरचे उद्घघाटन उद्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनी, उद्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा दीक्षांत समारंभ होणार आहे. या २२ व्या दीक्षांत समारंभात एकूण १ हजार २२५ जणांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहे.
****
0 notes
ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का ? #marathinews #indianpolitician
0 notes
मन्या : मॅच लाव!
बायको : नाही लावणार!
मन्या : बघीन!
बायको : काय बघीन?
मन्या : हाच चॅनल! जो तू लावला आहेस!
😀😀😀😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
0 notes
Pradip : मॅच लाव!
बायको : नाही लावणार!
Pradip : बघीन!
बायको : काय बघीन?
Pradip : हाच चॅनल! जो तू लावला आहेस!
😀😀😀😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
0 notes
RBI | कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा! थेट बँकेनेच दिले ‘हे’ अधिकार; आता बँका परतफेडीसाठी लावणार नाहीत तगादा
RBI | अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने किरकोळ असुरक्षित कर्जाशी संबंधित जोखीम हायलाइट करणारी एक चेतावणी नोट जारी केली आहे. RBI च्या चिंतेची पुष्टी करताना, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) अहवाल असेही सूचित करतो की वैयक्तिक कर्जे आणि क्रेडिट कार्ड, जे मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत, डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत सर्वात जलद वाढ झाली. परंतु अधिक चिंतेची बाब म्हणजे, या श्रेणीतील वैयक्तिक कर्जावरील (Loan Rule) डिफॉल्ट प्री-कोविड पातळीच्या तुलनेत वाढले आहेत.
कर्ज भरणा
अशा स्थितीत सर्वात मोठा प्रश्न आहे की तुम्ही डिफॉल्टर असाल तर पुढे काय करणार? कर्ज वसूल करणाऱ्या एजंटांकडून होणारा छळ कसा हाताळायचा हे माहीत नसलेल्या अनेकांसाठी हा खूप तणावपूर्ण अनुभव असू शकतो. डिफॉल्टर असल्यामुळे क्रेडिटच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो आणि व्याजदर जास्त होतात. बँकांनी डीफॉल्ट प्रकरणे सहानुभूतीने हाताळली पाहिजेत आणि वैयक्तिक निराकरणे ऑफर केली पाहिजेत. तर डिफॉल्टरच्या कायदेशीर अधिकारांमध्ये नोटीस प्राप्त करणे, कर्ज वसुलीच्या वाजवी पद्धती, तक्रार निवारण, कायदेशीर मदत मागणे आणि निष्पक्ष क्रेडिट रिपोर्टिंग यांचा समावेश होतो. कर्ज न भरल्यास डिफॉल्टरला कोणते कायदेशीर अधिकार आहेत आणि त्यांनी कोणती पावले पाळली पाहिजे.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनी थकबाकीदारांना काही दिलासा दिला आहे का?
आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांमुळे थकबाकीदारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. ते थकबाकीदारांना त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यास आणि लहान पेमेंट करण्याची परवानगी देतात, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पायावर परत येण्यास मदत होऊ शकते. मार्गदर्शक तत्त्वे दीर्घ परतफेड कालावधीसाठी देखील प्रदान करतात, ज्यामुळे डिफॉल्टर्सना त्यांचे कर्ज व्यवस्थापित करणे सोपे होऊ शकते. समजा तुमच्याकडे 10 लाखांचे कर्ज आहे जे तुम्ही फेडण्यास असमर्थ आहात. RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही कर्जाची पुनर्रचना करू शकता जेणेकरून तुम्हाला आता फक्त 5 लाख भरावे लागतील आणि उर्वरित 5 लाखांची परतफेड दीर्घ कालावधीत केली जाईल. हे तुमच्यासाठी तुमचे कर्ज व्यवस्थापित करणे आणि आर्थिकदृष्ट्या ट्रॅकवर परत येणे सोपे करू शकते.
डिफॉल्टर असण्याचा तुमच्या क्रेडिट आरोग्यावर परिणाम होतो का, कसा?
डिफॉल्टर असल्याने तुमच्या क्रेडिट स्वास्थ्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात कर्ज मंजूर करणे अधिक कठीण होईल. तुम्हाला कर्जावर जास्त व्याजदर देखील द्यावे लागतील. हे असे आहे कारण कर्जदार कर्जदार म्हणून तुमच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर वापरतात. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, सावकार तुम्हाला जास्त जोखीम म्हणून पाहतील आणि तुम्हाला कर्ज देण्याची शक्यता कमी असेल. ��मजा तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० आहे. हा एक चांगला क्रेडिट स्कोअर मानला जातो आणि तुम्ही तुलनेने कमी व्याजदरासह कर्जासाठी मंजूरी मिळवू शकाल. तथापि, जर तुमचा क्रेडिट स्कोअर 600 वर आला, तर तुम्हाला धोकादायक कर्जदार मानले जाईल आणि तुम्हाला कर्जावर जास्त व्याजदर द्यावे लागतील.
डिफॉल्ट प्रकरणे हाताळताना बँकांना काही सल्ला?
जेव्हा डिफॉल्ट प्रकरणे हाताळण्याची वेळ येते तेव्हा बँकांना सहानुभूती आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळण्याचा सल्ला दिला जातो. हे ओळखणे महत्त्वाचे आहे की व्यक्तींना आर्थिक आव्हाने किंवा अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे डिफॉल्ट होऊ शकते. संघर्षाचा दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी, बँका एक खुले आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
डिफॉल्टरने कोणत्या स्टेप्स पाळल्या पाहिजेत?
किरकोळ कर्जावर डिफॉल्टचा सामना करताना डिफॉल्टरने परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी त्वरित कारवाई करणे महत्वाचे आहे. येथे काही पायऱ्या आहेत ज्यांचा डिफॉल्टरने विचार केला पाहिजे:
- परिस्थितीचे मूल्यांकन करा.
- सावकाराशी संवाद साधा.
- आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करा.
- परतफेड योजनेची वाटाघाटी करा.
- व्यावसायिक मदत घ्या.
- पेमेंटला प्राधान्य द्या.
- क्रेडिट स्कोअर संरक्षित करा.
- कर्ज पुनर्रचना किंवा सेटलमेंट एक्सप्लोर करा.
थकबाकीदारांना कायदेशीर अधिकार काय आहेत?
भारतातील डिफॉल्टर्सचे कायदेशीर हक्क कायदे आणि नियामक फ्रेमवर्कद्वारे म��ठ्या प्रमाणावर संरक्षित आहेत. अलीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक आणि वित्त कंपन्यांना जाणूनबुजून डिफॉल्टर किंवा फसवणूक म्हणून वर्गीकृत खात्यांवर कंपाऊंड सेटलमेंट किंवा तांत्रिक राइट-ऑफ करण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ असा होतो की फसवणुकीत गुंतलेली एखादी हेतुपुरस्सर अपराधी किंवा कंपनी यापुढे त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईमुळे सावकारांद्वारे पूर्वग्रहाला सामोरे जाणार नाही. याव्यतिरिक्त, ज्या कर्जदारांनी समझोता करार केला होता त्यांना आता किमान 12 महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन कर्जासाठी अर्ज करण्याची संधी आहे.
Read the full article
0 notes
#मांग...
दिवाळी,दसरा वा इतर कुठलाही सण असला की मांग गावात दिवाळी वा दसरा मांगायला येतो.मांग आपली हलगी प्रतेकांच्या घरासमोर वाजवतो अन प्रत्येक घर त्याला स्वखुशीने पैसा,धान्य भाजीभाकरी देतो.अन तोही ते आनंदाने स्वीकारतो.ही गावाकडली हजारो वर्षांपासून चालत आलेली रीत,प्रथा परंपरा आहे.
मांग समाज हजारो वर्षांपासून हलगी वाजवत आलाय.दारोदारी भिक्षा मागून खात आलाय आपलं घर चालवत आलाय.गावात कोणी मरण पावलं तर मांग हलगी वाजवतो.मेलेल्याची डोली तोच सजवतो.मेलेल्या माणसानंवर फेकलेली चिल्लर वा पैसा मांग आजही उचलतो आणि आपल्या खिशात टाकतो.मेलेल्या माणसाच्या अर्थिवरील गोधडी,तांब्याची भांडी आजही तोच आपल्या घरी घेऊन जातो.अजून अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याने आजही मांग समाज हा मानसिक गुलामीत जगत आहे.मांग समाज आपलं शिक्षण,संविधानिक अधिकार,प्रतिनिधित्व,न्याय,हक्क,यांपासून खूप दूर आहे असंच वाटतं.हा समूह काही अंशी जरी पुढं आला असला तरी त्यांच जागरूक असण्याचं प्रमाण खूप कमी दिसत.हे एक जिवंत सामाजिक विषमतेचे उदाहरण आहे.ही सामाजिक विषमता आणि मानसिक गुलामी हजारो वर्षांपासून 'जैसे थे' आपल्याला दिसते.
गावाकडे सुखाच्या प्रसंगी ब्राम्हण आणि अपशकुन प्रसंगी मांग असंही चित्र आपल्याला पहावयास मिळेल.
मग समाजातील लोकांना प्रश्न केल्यावर त्यांच्याकडन उत्तरं येतात की मग हे काम ही लोकं नाही करणार तर कोण करणार? हजारो वर्षापासून तीच लोक ही काम करताय आणि पुढेही तीच लोकं करतील.
समाजाची ती रीत आहे,परंपरा आहे,प्रथा आहे.अशे अनेक प्रकारचे लोकांची उत्तरं आहेत.
मांगाशी मी आज दोन शब्द बोललो म्हंटल एक विचारतो राग मानू नका,मी तुमच्यापेक्षा लहान आहे.ते म्हटले बोला मला कहीही राग येणार नाही.मी म्हटलं गेली अनेक वर्षांपासून तुम्ही ही असली कामं करीत आलेले आहात कसं वाटतं तुम्हाला? काही बद्दल करावा,थोडं मान सन्मानाने जगावं? आपली मुलं शिकावी,मोठी व्हावी,घर समाज पुढे यावा असलं वाटतं नाही का तुम्हाला? ते म्हंटले म्हणे पार पूर्वजांनपासून आमचं अश्या ह्या प्रथा चालत आलेल्या. मग मीही त्या पुढे चालवल्या.मला काही वेगळं वाटत नाही.आनंदाने मी करतो.माझ्या घरात गरिबी एवढी आहे की मला असली कामे करावी लागतात. त्यांच्या अश्या बोलल्यातुन मला खूप वाईट वाटतं होतं अन अजून किती वैचारिक,शैक्षणिक अज्ञान आणि मागासलेपण समाजात आहे हे मला जाणवत होतं.नन्तर मी अजून एक त्यांना केला.म्हटलं तुमच्या मुलांना ही असली कामं करायला लावणार का?पिढ्यानपिढ्या असली कामे करणार का? त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं अन बोलले की.. नाही? माझी मुले आज शिकत आहेत पण शिकून नोकरीला लागली तर ठीक नाहीतर करतील काही कामं आपलं पोट भरण्यासाठी. मला त्याच बोलणं खूप खुपत होतं.त्यांच्याशी मी कसा बोलू काय शब्द वापरु कळत नव्हतं.ते जरा घाईत होते म्हणून मीही जास्त बोलू शकलो नाही.पण मला अशे अनेक प्रश्न जाताना ते सोडून गेलेत. असले प्रश्न कधी मिटणार?सामाजिक दुरी अन मागासलेपण कधी कमी होणार? याला जबाबदार ते स्वतः आहेत की समाजातील लोकं वा सरकार? असल्या अनेक प्रश्नांनी मनात अस्वस्थता निर्माण झालीय.
महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्नांना पूर्णपणे कधी यश येईल?
महात्मा फुले म्हणायचे की,
विद्येविना मती गेली,मती विना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. – महात्मा फुले.
तुम्हीही यांवर व्यक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे.
लिहायला भरपूर होतं पण थांबलो.
-वैभव वैद्य....
0 notes
“सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावणार…” मनसे नेत्याचा इशारा
“सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावणार…” मनसे नेत्याचा इशारा
“सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावणार…” मनसे नेत्याचा इशारा
उस्मानाबाद – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेद्वारे शिंदे गटासह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करताहेत. त्यासोबतच अंधारे यांनी मागील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र अंधारे यांची धाराशिव येथे होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
राज…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नवव्या दिवशी, भारताचे खेळाडू विविध खेळप्रकारांच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये आपलं कसब पणाला लावणार आहेत. गोल्फ प्रकारात शुभंकर शर्माचा सहभाग असलेला खेळ दुपारी साडेबाराला सुरु झाला. हॉकीच्या संघाची उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनसोबत दुपारी दीडला लढत आहे. तर, याचवेळी ॲथलेटीक्सच्या अडथळ्यांच्या धावण्याच्या प्रकारात पारुल चौधरीचा सहभाग आहे. लांब उडी प्रकारात जेस्वीन आल्ड्रीन अडीच वाजता खेळणार आहे. त्यानंतर मुष्टीयुध्द ७५ किलो वजनी गटात लवलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत तीन वाजता खेळेल. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनचा पुरुष एकेरी उपांत्य फेरीचा सामना साडेतीनला आहे. याचवेळी नौकायन प्रकारात पुरुष गटात विष्णु सर्वनन, तर महिला गटात नेत्रा कुमानन संध्याकाळी सहाला खेळणार आहे.
नेमबाजीत २५ मिटर मीटर रैपिड फायर पिस्टल प्रकारात अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धूचा सहभाग असलेला खेळ थोड्या वेळेपूर्वी सुरु झाला आहे
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्तानं महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार ��हेत. या जनसन्मान यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर इतर आठ जणांचा सहसमन्वयक म्हणून समावेश केला आहे.
****
राज्यस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील राजघाट इंथ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशासाठी शहिद झालेल्या विरांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विजयघाट इंथ माजी पंतप्रधा��� अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल स्मृतिस्थळावर जात त्यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाड्यातील मुक्ती संग्राम स्मारकाची निर्मिती होत असून, ही निर्मिती परिपूर्ण होण्यासाठी सुधारीत नव्या बाबींचा समावेश आराखड्यात करुन हा सुधारीत प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
मुक्तिसंग्राम स्मारकासंदर्भात पालकमंत्री सत्तार यांच्या समोर काल सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील संतांच्या आभासी प्रतिमा, आठही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे स्तंभ, जिल्ह्यांची ओळख दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचं प्रतिबिंब बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा, कला दालन, अजिंठा-वेरूळ लेण्यातील चित्रे, मराठवाड्याचा इतिहास दर्शवणाऱ्या माहितीपटाचं सादरीकरण स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसाठी होणार आहे.
****
पुण्यानजीक खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग आज सकाळी अकरा वाजेनंतर पावसाचं प्रमाण आणि पाण्याची आवक यानुसार बदलून वाढवण्यात येत आहे. पुण्याच्या सिंचन भवनाद्वारे ही महिती देण्यात आली आहे.
खडकवासलासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सुमारे १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात झाला आहे. तरीही आज अखेरपर्यंत या धरण साखळीत सुमारे ७३ पूर्णांक ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. विसर्ग सुरु असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरु असून, त्या परिसरातील धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. ताम्हिणी घाटासह जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर परिसरात वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांसह आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.
****
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
****
वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आजपासून येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत याच्या अंमलबजावणीचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात तोंडापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात उद्या कृषी मार्गदर्शन - प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल पंधरवडा निमित्त आयोजित आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी साडे अकरा वाजता होणाऱ्या या शेतीविषयक कार्यक्रमाला शेतकऱ्यांसह नागरीकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारत-श्रीलंके दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना थोड्याच वेळेत दुपारी अडीच वाजता कोलंबो इथं सुरु होत आहे.
****
1 note
·
View note
जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लावणार- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार - महासंवाद
जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लावणार- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर : मच्छीमार बांधवांच्या न्यायोचित मागण्यांची प्राधान्याने पूर्तता करण्यात येईल, मच्छीमार बांधवांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दिनांक 8 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या बैठकीत मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.…
View On WordPress
0 notes
Bandya :- केकवर मेणबत्यांऐवजी बल्ब का लावलाय?
आजोबा : साठावा वाढदिवस आहे ना. एवढया मेणबत्या कशा लावणार, मग बल्ब लावला.
😀😀😀🤣🤣🤣😂😂😂😁😁😁😅😅😅
0 notes
Pradip :- केकवर मेणबत्यांऐवजी बल्ब का लावलाय?
आजोबा : साठावा वाढदिवस आहे ना. एवढया मेणबत्या कशा लावणार, मग बल्ब लावला.
😀😀😀🤣🤣🤣😂😂😂😁😁😁😅😅😅
0 notes
जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लावणार- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार - महासंवाद
जिल्ह्यातील मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लावणार- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर : मच्छीमार बांधवांच्या न्यायोचित मागण्यांची प्राधान्याने पूर्तता करण्यात येईल, मच्छीमार बांधवांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दिनांक 8 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या बैठकीत मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.…
View On WordPress
0 notes
कुडाळ मध्ये 15 ऑक्टोबर ला धडाडणार शहाजी बापू पाटील यांची तोफ
कुडाळ मध्ये 15 ऑक्टोबर ला धडाडणार शहाजी बापू पाटील यांची तोफ
विशाल परब यांच्या वाढदिवसाला लावणार हजेरी
कुडाळ : भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाला शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ आमदार शहाजी पाटील हे उपस्थित राहणार आहेत शहाजी बापू पाटील हे पहिल्यांदाच कोकणात असून त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळणार आहे शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीत गेल्यानंतर आपल्या डायलॉग ने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ…
View On WordPress
0 notes
ऐ बाबा ! 'मला भीक नको, पण १० रूपयांचं पेन तरी विकत घ्या'... ''हा'' व्हायरल फोटो आत्मचिंतन करायला लावणार ?
ऐ बाबा ! ‘मला भीक नको, पण १० रूपयांचं पेन तरी विकत घ्या’… ”हा” व्हायरल फोटो आत्मचिंतन करायला लावणार ?
पुणे – पुण्यातील एका कष्टाळू आजींची पोस्ट सोशल मीडियावर सध्या राज करतांना दिसत आहे. या मराठमोळ्या आजींच्या फोटोनं (new viral , Viral Photo) नेटकऱ्याना चांगलेच आकर्षित केले आहे.नेहमी आपण बाहेर पडल्यानंतर सिंगल किवा गर्दीच्या ठिकाणी अनेक वयोवृद्ध, निराधार लोकांना भीक मागताना पाहात असाल.तसेच काही लोक आपले नशा पुर्ण करण्यासाठी भिक मागत असतात.
पुण्यातील या आजीसुद्धा पैसे मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. पण…
View On WordPress
0 notes