Tumgik
#रेल्वेमध्ये
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळेची कांस्यपदकाला गवसणी
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात राज्यांना उपप्रवर्ग पाडता येणार-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान-डॉ. नीलम गोऱ्हे यांचं प्रतिपादन
आणि
लोकमान्य टिळक तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सर्वत्र अभिवादन
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. या ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे. स्वप्नीलने ४५१ पूर्णांक ४ दशांश गुण घेऊन तिसरं स्थान मिळवत कांस्यपदक पटकावलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातला रहिवासी असलेला स्वप्नील, सध्या रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो, नेमबाजी स्पर्धेसाठी त्याने प्रथम पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात आणि ऑलिम्पिक पात्रता गाठल्यानंतर दिल्ली इथं सराव केला.
स्वप्नीलच्या या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा गौरव केला आहे. कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने ही कामगिरी केली, असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांनी केला. त्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचं अभिनंदन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वप्निलचं अभिनंदन करतांना कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्राने महाराष्ट्राचा गौरव वाढवत, क्रीडाक्षेत्राला नवं चैतन्य, नवीन ऊर्जा दिली, अशी भावना व्यक्त केली, तर स्वप्नीलच्या अभेद्य यशाला सलाम, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सामाजिक संपर्क माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनीही स्वप्निल कुसाळेचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.
****
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं २००४ साली ईव्ही चिनैया प्रकरणात पाच न्यायाधीशांच्या पीठानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत, आज हा निर्णय दिला. अनुसूचित जाती आणि जमातींमधेही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमधे प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागास वर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या निकालात म्हटलं आहे. त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण राज्यसरकारांना देता येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 
****
देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी १७१ रेल्वे अपघात होत असत, हे प्रमाण ६८ पर्यंत कमी झाल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेच्या सुरक्षेसाठी ८७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला, हा खर्च मागच्या वर्षी ९७ हजार कोटींपर्यंत गेला. यंदाच्या अर्थसंकल्पात सुरक्षेवरच्या खर्चासाठी एक लाख आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. 
****
रस्ते अपघातातल्या जखमींवर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात विनाखर्च उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत, रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ही योजना सध्या चंदीगड आणि आसाम मधे प्रायोगिक तत्वावर सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटीव बँकेतील खातेदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीताराम यांची दिल्लीत भेट घेतली. या बँकेतील आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध घातले होते, यामुळे या बँकेतील खातेदार, सहकारी पतसंस्था आणि सोसायट्या, नागरी सहकारी बँका यांना स्वतःचाच पैसा बँकेतून काढताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याकडे वायकर यांनी लक्ष वेधलं. या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे उद्भवत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. येत्या १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास संबंधितांच्या निलंबनाच्या कारवाईचा इशाराही पवार यांनी दिला आहे.
****
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ही योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेत त्या आज बोलत होत्या. या योजनेअंतर्गत रक्षाबंधनापर्यंत पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होईल, असं त्यांनी सांगितलं. पैठण तालुक्यात महिला अस्मिता भवन उभारण्याचं नियोजन करावं, या भवनात महिलांसाठी क्रीडा, मनोरंजन, वाचनालय आणि बचत गट बैठका यासाठी सुविधा निर्माण करण्याचा मानस गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
****
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून राज्यभरात महिला मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या या योजनेतून दररोज लाखो अर्ज सादर केले जात ��हेत. जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी सन्मान यात्रेतील मेळाव्यांतून या योजनेची माहिती दिली जाणार असल्याचं कायंदे यांनी सांगितलं.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करणार, असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. आज पुणे इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज समन्वय समितीतर्फे घेतलेल्या अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आठवले यांच्या हस्ते पहिला ‘स्वर्गीय हनुमंतराव साठे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ बाळासाहेब जानराव यांना प्रदान करण्यात आला.
थोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अण्णा भाऊच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आज सकाळपासून सामाजिक, शैक्षणिक संघटनेच्या वतीने पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. अण्णाभाऊंच्या कार्याची महती विशद करणाऱ्या गीतांचं सादरीकरण स्थानिक कलामंचावरून करण्यात आलं.
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शहरात जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निघालेल्या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले होते. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी त्यांच्या अनुयायांनी केली. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. आमदार संदीप क्षीरसागर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
****
पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासावर निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज जालना इथं महापालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी स्वागत केलं. यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या आंतरभारती वतीने दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार २०२४ केरळच्या कन्या सिंधू किणिकर-नवगिरे यांना दिला जाणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे. परंपरेनुसार गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त नरपती कुंजेडा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब आणि आंतरभारती लातूरचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. अन्य राज्यातून येऊन अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
****
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा देवळाई परिसरात निर्माण केलेल्या संकल्प वनराईला जगातील पातळीवरील इन्व्ह्यारोकेअर ग्रीन अवार्ड २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
महाराष्ट्राचे स्वप्न भंगले, सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये उत्तरप्रदेशची बाजी
https://bharatlive.news/?p=175354 महाराष्ट्राचे स्वप्न भंगले, सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये उत्तरप्रदेशची ...
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा न��हीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा झाला यूपीएससी
ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा झाला यूपीएससी
नाशिकमध्ये जगन्नाथ पवार या ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा स्वप्नील पवार याने यूपीएससीच्या अंतिम यादीत स्थान मिळविले. त्याने केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि यूपीएससीमध्ये हा त्याचा दुसरा प्रयत्न होता. त्याच्या पहिल्याच प्रयत्नात, त्याने AIR 632 सह परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय रेल्वेमध्ये नियुक्ती मिळवली. पण यूपीएससीमध्ये चांगली पोस्टिंग मिळवण्यासाठी त्याने पुन्हा परीक्षेची तयारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 13 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन
लातूरचा मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना तसंच जालन्याच्या गतीशक्ती टर्मिनलचं लोकार्पण
सामाजिक न्याय विभागाचे राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान
छत्रपती संभाजीनगर इथं आज स्वनिधी से समृद्धी मेळाव्याचं आयोजन 
आणि
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण विजेतेपद
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन झालं असून, रेल्वेचा विकास हा सरकारच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशभरातल्या सुमारे ८५ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण काल पंतप्रधानांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पांमध्ये लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना तसंच जालन्यातल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'सह, १५० एक स्थानक एक उत्पादन दुकानं, १८ नवीन रेल्वेमार्ग, बडनेरा इथली वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे इथली वंदे भारत बोगी देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, पाच जनऔषधी केंद्रं, आणि चार रेल कोच रेस्टॉरंट आदी ५०६ प्रकल्पांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून दूरदृश्यप्रणालीद्वारे तर जालना इथं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि लातूर इथं खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यात रेल्वे आणि मेट्रो कोचसह वंदेभारत रेल्वे कोचसुद्धा तयार होणार आहेत. जालन्यातल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'मुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विदेशात जाईल, तसंच जालन्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जालना रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या कोच देखभाल सुविधा -पिटलाईनचं आज सकाळी लोकार्पण होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, पीएम सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत. वंचित समाजघटकांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवणारी ही योजना, देशभरातल्या ५२५ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, सोलापूर, अहमदनगर, हिंगोली आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
भारतीय स्टेट बँकेनं निवडणूक रोख्यांसंबंधीची सगळी माहिती काल निवडणूक आयोगाकडे सोपवली. ही माहिती आपल्या संकेतस्थळावर १५ मार्च च्या संध्याकाळपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयानं निवडणूक आयोगालाही दिले आहेत.
****
औषधी उत्पादक कंपन्यांनी औषध वितरणासाठी आचार समिती तसंच एकसमान संहिता निश्चित करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या कंपन्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कोणालाही कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू देऊ नये, औषधांचे मोफत नमुने फक्त डॉक्टरांनाच दिले जावेत, असे निर्देशही सरकारनं दिले आहेत.
****
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण झालं. मागच्या चार वर्षातले ३९४ पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये जालन्याचे शिवाजी गवई, छत्रपती संभाजीनगरचे धोंडिरामसिंह राजपूत, छत्रपती संभाजीनगर इथलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण विकास मंडळ, लातूर जिल्ह्यातली क्रांतिसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि लातूर इथल्याच शिवकृपा समाज सेवा मंडळ या व्यक्ती तसंच संस्थांचा समावेश आहे.
****
आदिवासी हे देशाचे खरे मालक असून, या देशातल्या जल, जंगल आणि जमिनीवर पहिला हक्क आदिवासींचा असल्याचं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते काल नंदुरबार इथं भारत जोडो न्याय यात्रेत बोलत होते.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४३ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यातले १२ उमेदवार आसाममधले, मध्यप्रदेश आणि राजस्थानातले प्रत्येकी १०, गुजरात सात, उत्तराखंडमधले तीन, तर एक उमेदवार दमण आणि दीवमधला आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळच्या राळेगाव इथं पक्षाच्या जनसंवाद मेळाव्याला संबोधित केलं, या वेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज स्वनिधी से समृद्धी मेळावा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात ३३ हजार पथ विक्रेत्यांना दहा हजार रुपयांचं कर्ज आणि परिचय पत्र वितरीत करण्यात येणार आहे.
****
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल ‘खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' अर्थात कीर्ती योजनेची घोषणा केली. विविध क्रीडा प्रकारातल्या प्रतिभावंत तरुण खेळाडूंचा देशाच्या सगळ्या भागांतून शोध घेणं, हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं ठाकूर सांगितलं. शास्त्रीय चाचण्या आणि निकषांच्या आधारावर या खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
****
राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं, उदगीरच्या तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत, कोल्हापूर जिल्हा संघानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे. पुणे आणि सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले. स्पर्धेतल्या सुवर्ण, रौप्य तसंच कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार आणि ३० हजार रुपयांची बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात मानवत इथं ॲग्रीपीव्ही संशोधन प्रकल्पाचं काल उद्घाटन करण्यात आलं. जी आय झेड ही जर्मन संस्था, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ॲग्रीपीव्ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पीक लागवड या दोन्‍ही बाबी शक्‍य होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी यावेळी दिली.
****
बीड जिल्हा उद्योग परिषदेच्यावतीनं काल घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ३५ उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या कराराची एकूण किंमत ६५८ कोटी रुपय��� असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर शहरातल्या मालमत्ताधारकांसाठी कर थकबाकीवरचं व्याज माफ करणारी योजना महापालिकेनं जाहीर केली आहे. नागरिकांनी येत्या ३१ तारखेपूर्वी थकित कर एकरकमी भरून ही सवलत घ्यावी, असं आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.
****
धाराशिव इथं काल चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत करण्यात आला. १३ गुन्ह्यातला ३१ लाखाहून अधिक रुपयांचा हा मुद्देमाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या एकूण ८६ महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपयांपैकी २३७ कोटी रुपयांचं वाटप लाभार्थीच्या खात्यात करण्यात आलं. पात्र शेतकऱ्यांनी आपलं आधारपत्र बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या, नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचं भूमिपूजन, काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झालं. या रस्त्याच्या सुधारणेचं काम काही शेतक-यांनी मोबदल्याच्या कारणावरून विरोध केल्यानं प्रलंबित होतं, आमदार पाटील यांनी त्यातून मार्ग काढत, हा प्रश्न मार्गी लावला.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातला कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख याला तीन हजार रुपये लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. अनुदानावर मंजूर झालेल्या रोटावेटर आणि ट्रॅक्टरच्या केलेल्या कामासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात काल दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाले. रस्त्यावर उभ्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकून हा अपघात झाला.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काल अशाच एका अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मंगल कार्यालयाच्या मालक तसंच चालकांनी लग्नकार्य आणि शुभ प्रसंगांमध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात मतदानाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे, त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिका-यांनी हे आवाहन केलं.
****
0 notes
Text
पाच महिन्यांचे बाळ अचानक रेल्वेमध्ये दगावले
https://bharatlive.news/?p=101450 पाच महिन्यांचे बाळ अचानक रेल्वेमध्ये दगावले
मनमाड : पोटाची खळगी ...
0 notes
mycareer15 · 3 years
Text
East Central Railway : 2206 Posts
Tumblr media
पूर्व मध्य रेल्वेमध्ये ‘अप्रेंटिस’ 2206  पदांची भरती, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा. पूर्व मध्य रेल्वे ‘अप्रेंटिस’ Recruitment 2021 #MyCareer #governmentjob #privatejob #freshersvacancy #Freshersjob #currentaffair #dailyquiz #career #jobin2021 Read the full article
0 notes
sakriynews · 3 years
Text
10 उत्तीर्ण उमेदवारांना नौकरीची मोठी संधी........!
10 उत्तीर्ण उमेदवारांना नौकरीची मोठी संधी……..!
 मुंबई दि.19 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केलीय. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अपरेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Photo
Tumblr media
सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार?; हे असणार सर्वात मोठे आव्हान सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा रुळांवर आणण्यासाठी राज्य सरकार व रेल्वेमध्ये चर्चासत्रांना जोर आला आहे. राज्य सरकारने तीन टप्प्यांमध्ये लोकल सुरू करण्याची मागणी केली होती.
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
भारतीय रेल्वेने रचला इतिहास; १ जुलै रोजी देशातील सर्व गाड्या वेळेवर पोहोचल्या Indian Railway : सध्या भारतीय रेल्वेमध्ये अनेक बदल होत आहेत. मात्र रेल्वे सुरु होऊन आज इतक्या वर्षांनतरही ती वेळेवर येण्याबद्दलच्या तक्रारी | #IndianRailway #NewRecord #FirstTimeOnTime http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/indian-railways-claims-100-per-cent-punctuality-record-for-first-time-in-history/?feed_id=282&_unique_id=5efdc8d362274
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन
लातूरची मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी तसंच जालन्याच्या गतीशक्ती टर्मिनलचं लोकार्पण
देशभरातल्या प्रतिभावंत क्रीडापटूंसाठीच्या कीर्ती योजनेची घोषणा
आणि
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण विजेतेपद
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन झालं असून रेल्वेचा विकास हा सरकारच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचंही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये रेल्वे आणि मेट्रो कोचसह वंदेभारत रेल्वे कोचसुद्धा तयार होणार आहेत. लातूर शहराजवळ चिंचोलीराववाडी इथे नवीन एमआयडीसी परिसरातल्या ३५० एकर जागेवर ही मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी उभारण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला मुंबईतून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
दक्षिणमध्य रेल्वेनं जालन्याजवळ दिनेगाव इथं उभारलेल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'चंही पंतप्रधानांनी आज लोकार्पण केलं. जालना इथं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सुविधेमुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विदेशात जाईल, तसंच जालन्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जालना रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या कोच देखभाल सुविधा -पिटलाईनचं उद्या सकाळी उद्घाटन केलं जाणार आहे.
****
पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये राज्यातल्या एकूण ५०६ प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये १५० एक स्थानक एक उत्पादन दुकानं, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, १३० सौर पॅनेल, १८ नवीन रेल्वेमार्ग आणि रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण किंवा गेज रुपांतरण, १२ गुड्स शेड, सात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, चार गती शक्ती कार्गो टर्मिनल, तीन विद्युतीकरण प्रकल्प, बडनेरा इथली वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे इथली वंदे भारत बोगी देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, पाच जनऔषधी केंद्रं, चार रेल कोच रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.
****
दरम्यान, आज राजस्थानातल्या पोखरण इथे भारत शक्ती या कार्यक्रमाचं पंतप्रधानांनी अवलोकन केलं. या कार्यक्रमात देशाच्या तीनही संरक्षण दलांच्या स्वदेशी शस्त्र प्रणालींची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. पोखरण आज पुन्हा एकदा भारताच्या स्वयंपूर्णतेचा साक्षीदार बनलं आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी सेनादलांचा गौरव केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, पीएम सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत. पी एम सूरज ही एक सामाजिक सशक्तीकरण योजना असून, यातून, देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वंचित समाजघटकांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ५२५ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असून याच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, सोलापूर, अहमदनगर, हिंगोली आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
देशात नागरिकत्व सुधारणा कायदा - सीएए लागू करण्यात आला असून, पात्र व्यक्तींना नागरिकत्वासाठी अर्ज करण्याकरता केंद्रीय गृहमंत्रालयानं इंडियनसिटिझनशिपऑनलाईन डॉट एनआयसी डॉट इन, पोर्टल सुरू केलं आहे. इच्छुक व्यक्तींना ॲपवरूनही अर्ज करता यावा, यासाठी सीएए-२०१९ हे मोबाईल ॲपही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचं गृहमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, या कायद्याला आव्हान देणारी याचिका इंडियन युनियन मुस्लीम लीगनं सर्वोच्च न्यायलयात दाखल केली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीला तातडीनं स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
****
भाजपचे नायब सिंह सैनी यांनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मनोहरलाल खट्टर यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे त्यांचा जननायक जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातली साडेचार वर्षांची युती संपुष्टात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे या पक्षातून बाहेर पडले आहेत. समाज माध्यमावर एक संदेश देत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
****
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मागच्या चार वर्षातले ३९४ पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आज त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपआपल्या निवासस्थानी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. विधान भवनातही महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉक्टर विलास आठवले यांनी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज ‘खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' अर्थात कीर्ती योजनेची घोषणा केली. विविध क्रीडा प्रकारातल्या प्रतिभावान युवा खेळाडूंचा देशाच्या सगळ्या भागांतून शोध घेणं, हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. प्रतिभावान खेळाडूंच्या निवडीसाठी शास्त्रीय चाचण्या आणि निकष ठरवले जाणार असून, देशात केवळ महिला खेळाडूंना प्रशिक्षण देणारी दोन केंद्रं सुरू करणार असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.
****
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं उदगीरच्या तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं. पुणे आणि सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य तसंच कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार आणि ३० हजार रुपयांची बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या एकूण ८६ महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपयांपैकी २३७ कोटी रुपयांचं वाटप लाभार्थीच्या खात्यात करण्यात आलं आहे. यातल्या सुमारे साडेतीन हजार लाभार्थींची बँक खाती आधारशी जोडलेली नसल्यामुळे सुमारे पावणेतीन कोटी रुपये लाभार्थींच्या खात्यात वर्ग होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन विमा अग्रिम मिळाला नसेल त्यांनी संबंधितांशी संपर्क साधावा आणि आपलं आधारपत्र बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मंगल कार्यालयाच्या मालक तसंच चालकांनी लग्नकार्य आणि शुभ प्रसंगांमध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात मतदानाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे, त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
मुंबईत पश्चिम बोरिवली इथे एका पंचवीस मजली निर्माणाधीन इमारतीच्या सोळाव्या मजल्यालगतच्या लोखंडी सांगाड्यावरून पडल्यामुळे तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला. आज दुपारी एकच्या सुमाराला हा अपघात झाला.
****
0 notes