#रुपयांच्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांना अर्थसहाय्यासाठी वित्तीय संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद • वाढीव मतदार प्रकरणी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी • रिझर्व्ह बँकेकडून रेपोदरात २५ बेसीक पॉईंटची कपात • राज्यशासनाच्या वाङ्ममय पुरस्कारांची घोषणा-ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तर मसापला मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धन पुरस्कार आणि • अजिंठा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिस कोठडी
राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी विविध वित्तीय संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, कोरियन एक्झिम तसंच एएफडी बँकेशी यासंदर्भात बैठक घेतली. मराठवाडा वॉटरग्रीड योजना, नारपार सिंचन प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेसह समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. तापी रिचार्ज योजनेबाबतही मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेऊन तयार होत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं, अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ या औद्योगिक महोत्सवात ते बोलत होते. वर्धन लिथियमच्या ४२ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामु��े विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टीम तयार होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्या ३९ लाखांनी कशी वाढली असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. आपल्याला या मतदार यादीबाबत माहिती देण्याची मागणी गांधी यांनी केली, ते म्हणाले… ‘‘हमने इलेक्शन कमिशन को पांच बार बोला है, की हम आरोप नही लगा रहे है। हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर्स लिस्ट मांग रहे है। लोकसभा की फाईनल वोटर लिस्ट। नेम, ॲड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फायनल वोटर लिस्ट। नेम, ॲड्रेस, फोटोग्राफ। तीनों राजनेतीक पार्टीयां, विपक्ष की पार्टींयां महाराष्ट्र की पब्लिकली आपसे सवाल पूछ रही है। मैने पार्लमेंट मे बोला, हमारे सब नेतोओं ने बोला इलेक्शन कमिशन हमे लिस्ट नही दे रही। उनकी जिम्मेदारी बनती है, की जल्दी से जल्दी लोकसभा, विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एन सी पी, शिवसेना अँड काँग्रेस पार्टी को पकडा दे। क्यों की हम इस इन्वेस्टीगेशन को एंड तक ले जाना चाहते है।’’
गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी पराभवाबद्दल आत्मचिंतन करावं, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी आठ वाजता टपाली मतदानाच्या मोजणीनं या प्रक्रियेला प्रारंभ होईल, दुपारपर्यंत सर्व ७० जागांचे कल हाती येण्याची शक्यता आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर असलेल्या रेपोदरात २५ बेसीक पॉईंटची कपात केली असून, रेपो दर आता सहा पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल मुंबईत ��ॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं काल आर्थिक वृद्धीदरांच्या अंदाजातही कपात केली. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यशासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार काल जाहीर झाले. या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव उर्फ रा रं बोराडे यांना जाहीर झाला आहे. श्री.पु. भागवत पुरस्कार, पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनला, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.रमेश सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेलाही भाषा संवर्धनासाठी मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. इतर पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये रेखा बैजल यांना साने गुरूजी पुरस्कार, सुनीता सावरकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ तारखेला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाला ‘कवितांचे गाव’ म्हणून, रत्नागिरी जिल्ह्यात कवी केशवसूत यांच्या मालगुंड या गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
वीट भट्यासाठी मोकळया हायवामधून होणारी राखेची अवैध वाहतुक प्रदुषण वाढवणारी असून, ती वाहतुक बदं हायवामधून होईल याकडे संबधितांनी लक्ष घालून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. त्या काल बीड इथं एका बैठकीत बोलत होत्या. चिमणीपासूनचं प्रदुषण नियत्रंणात असलं तरी राख उचलणे हे संबधित अधिका-यांचे कर्तव्य आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. राखेचे अनाधिकृत साठे सील करावेत, वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत, राखेची वाहतुक मुख्य रस्त्यांवरून न करता ती बाह्य मार्गाने करावी, असंही मुंडे म्हणाल्या.
छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना न्यायालयानं १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ���ांबड यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं, वर्षभराहून अधिक काळापासून झांबड फरार होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ पन्नालाल पापडीवाल यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तीर्थक्षेत्र समितीच्या अध्यक्षपदासह ��िविध संस्थांवर महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती. आदिवासी समाजासाठी त्यांनी सुमारे दोन दशकं उल्लेखनीय कार्य केलं होतं.
नांदेड इथल्या साध्वी गार्गी देशपांडे यांचं काल हिमालयातल्या उत्तरकाशी इथे निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या गोरठा मधल्या संत दासगणू प्रतिष्ठानमध्ये त्यांनी ४० वर्ष देवा केली. गार्गी देशपांडे यांच्या पार्थिव देहावर आज उत्तरकाशी इथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काल प्रथमच देहदानाची नोंद झाली. शहरातील एका नागरीकाने आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांचा देह महाराष्ट्र ॲनाटोमी ऍक्ट अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला. दानात मिळालेल्या या मृतदेहांचा वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र विभागातल्या विद्यार्थांना शिक्षणासाठी उपयोग होतो. परभणी जिल्ह्यात देहदानासंदर्भात जनजागृती सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या कौडगाव औद्योगिक वसाहतीत होवू घातलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमध्ये उद्योग उभारण्यासाठी इच्छुक उद्योजकांना राज्य सरकारच्या खास धोरणांचा मोठा लाभ होणार आहे, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ते काल धाराशिव इथं बोलत होते. औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून देशातील नामांकित निर्यातदार कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करण्याबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी निर्णायक भूमिका घेतली असून, त्यामुळे दहा हजार रोजगार निर्मितीचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट आता सुकर झाले आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
जालना जिल्ह्यातल्या शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्याचा लाभ कायम रहावा यासाठी ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या पाच लाख ६५ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून, ई केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी गाव निहाय शिबीरं घेण्यात येत आहे. शिधापत्रिका धारकांनी या शिबिराचा लाभ घ्याव, असंही चौधर यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात १० फेब्रुवारीपासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी ही माहिती दिली.
0 notes
Text
भाग्यश्री मल्टीस्टेट आर्थिक अपहार प्रकरणात एक जण ताब्यात , तब्बल इतक्या..
भाग्यश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथील तब्बल २१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील एका आरोपीला एमआयडीसी पोलीस आणि सोनई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार , वैभव बाळासाहेब विधाते ( वय 33 राहणार अहिल्यानगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दुसरा संशयित आरोपी भारत बबन पुंड व त्याच्या साथीदारांवर गुंतवणूकदारांना भाग्यश्री मल्टीस्टेटमध्ये…
0 notes
Text
अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता - महासंवाद
मुंबई, दि. २: कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d3aa9d44de138664596fd35a80de6a5d/4c3f4fc84d99c006-a1/s400x600/a876bf4b27e01414ced16272372f6eb772d60964.jpg)
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये दरमहा 5,000 रुपये गुंतवून कोणीही करोडपती बनू शकतो, आणि केवळ 100 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरुवात करता येते. गुंतवणूक आणि नफा याचे गणित समजून घेण्यासाठी पूर्ण बातमी पहा..
पैसे वाचवण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक मानले जाते. परंतु, तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला योग्य परतावा मिळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे सर्वात विश्वासार्ह मानले जाते. अशीच एक सरकारी योजना पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Scheme) आहे, जी तुम्हाला करोडपती बनवू शकते. या योजनेत, एक निश्चित मासिक रक्कम जमा करावी लागते, जी मेच्योरिटी वेळ पूर्ण झाल्यावर निश्चित व्याजदरासह भरघोस परताव्याच्या स्वरूपात परत केली जाते. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा एक निश्चित ��क्कम जमा करून, तुम्ही 10 वर्षांत 8 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड गोळा करू शकता.
0 notes
Text
लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिगंबर चालाक पुणे प्रतिनिधी :- तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भवि��्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय–३६, पद– सहायक पोलीस…
0 notes
Text
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांच�� विक्री २० फेब्रुवारी २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के…
View On WordPress
0 notes
Video
youtube
नाशिक शहरात 13 लाख 35 हजार रुपयांच्या तब्बल चोरलेल्या 17 दुचाकी..
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/soybean-stealing-gang-jailed-5-accused-arrested-with-1-lakh-5-thousand-rupees/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, आर्थिक सर्वेक्षण अहवाल होणार सादर • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण • बीडसह बहुतांश ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका संपन्न, बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच • छत्रपती संभाजीनगर इथं जी बी एस आजाराचे पाच संशयित रुग्ण, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत २३ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला ३६ विविध पक्षांचे मिळून ५२ खासदार उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं.
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. या विधेयकासंबंधी १४ सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन, आयोगाच्या ��चिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या काल नवी मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी दोन फेब्रुवारीला 'महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४' होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त, पुण्याच्या एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर, खरात यांनी हा खुलासा केला, त्या म्हणाल्या, “या परिक्षेकरता जवळपास दोन लाख ८६ हजार इतके उमेदवार बसलेले आहेत. सगळी व्यवस्था अतिशय चोख आहे, प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत. आणि कोणतीही पश्नपत्रिका लिक झालेली नाही.’’
दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधले विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या शाळेतल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियुक्त न करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला होता. त्याला संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. ज्या परीक्षा केंद्रावर मागच्या पाच वर्षांत गैरप्रकार झाले होते त्या शाळांना मात्र हाच निर्णय लागू असेल, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते काल बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच, असं पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले… ‘‘चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती इथ येऊन गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विलमींगच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई, बीड रेल्वे पण सुरु करता येते का? का तर तुमचा मुंबईशी पण,पुण्याशी पण संपर्क कसा राहील.
दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातल्या ५३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसंच ��ार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात��मक स्पर्धा करण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन, जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या एक हजार ३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या ७०३ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडयास काल जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, असं आश्वासन सावे यांनी दिलं.
लातूर इथंही काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत ४९० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणार असल्याचं, पालकमंत्री यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल सहाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं, मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण मराठा समाज मुंबईत धडकेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदींनी काल जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं. जरांगे यांनी, सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई-हैद्राबाद-सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं, आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत, राज्य सरकारला पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एसचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बुलडाणा तसंच जालना इथल्या रुग्णांचा समावेश आहे. या पाच रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर तीन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या आजाराबाबत ��ागरिकांनी घेण्याच्या खबरदारीबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी माहिती दिली… “जे काही पेशन्ट आपल्याकडे डिटेक्ट झालेले आहेत, त्यापैकी दोन पेशन्ट डिस्चार्ज झालेले आहेत. काही जास्त चिंता करण्याचा विषय नाहीये. यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे, वेळोवेळी हात धुणे, दूषित पाणी पिण्यात येऊ नये, शिळं अन्न खाण्यात येऊ नये, आणि फिवर वगैरे, चार पाच दिवसांपेक्षा जास्त लूज मोशन्स वगैरे असेल, आणि विकनेस जाणवत असला, तरी तत्काळ डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये.’’
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ पुरस्कार, कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना काल प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत २३ पदकांसह महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये चार सुवर्ण, ११ रौप्य आणि आठ कास्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राने सहा पदकांची कमाई केली. महिलांच्या ४०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मेडले प्रकारात राज्याच्या सानवी देशवाल हिने सुवर्णपदक पटकावलं.
बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या दोन फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.
प्रशासनाने पारदर्शिता आणि दायित्व समजून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याच्या पालक सचिव राधिका रस्तोगी यांनी केलं आहे. शंभर दिवसांचा कृती आराखडा, जिल्हा सुशासन निर्देशांक, यासह विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कार्यालयीन स्वच्छता आणि सोयी सुविधा, क्षेत्रीय भेटी, ई - सुविधांमध्ये वाढ, याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देश दिले.
0 notes
Text
नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरण , सीएचा अटकपूर्व जामीन फेटाळला
नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरण , सीएचा अटकपूर्व जामीन फेटाळला
नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम पाहणारा विजय मर्दा याचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम एच शेख यांनी फेटाळला आहे. सुमारे 291 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात गोरगरिब नागरिकांची फसवणूक झालेली आहे. आत्तापर्यंत तीन ठिकाणी वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही माजी संचालकांना यात अटक झालेली असली तरी अद्यापही अनेक जण फरार आहेत. आर्थिक…
0 notes
Text
नगरविकास, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२५ वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर
मुंबई, दि. २० :- नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या ३ हजार ४६२ कोटी १७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये नगर विकास विभागाच्या २ हजार ७७४ कोटी ४३ लाख आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६८७ कोटी ७४ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/59d5c21d35f83a9483a78cb80f87f596/38562d3f865d7ed3-66/s540x810/4bd703772b0a38b2109899c7752c5ba3a647c81b.jpg)
View On WordPress
0 notes
Text
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने "इतक्या" हजार कोटींचे रस्ते प्रस्तावित
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी प्रस्तावित केलेल्या का��ांचा ८ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या बांधकाम विभागाच्या ३ हजार कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. सिंहस्थानिमित्त होत असलेल्या कामांसाठी राज्य व केंद्र सरकारने निधी दिल्यानंतर कामांचे नियोजन करून ती कामे…
View On WordPress
0 notes
Text
Oppo A3x 5G: Oppo ने भारतात आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन अनेक दमदार फीचर्ससह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅटरीसह अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.
Oppo ने गुपचूप आणखी एक स्वस्त 5G फोन भारतात लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन मिलिटरी ग्रेड MIL-STD 810H बॉडी सह येतो, या फोनचा लूक आणि डिझाईन आयफोन सारखा दिसतो. Oppo ने हा फोन भारतीय बाजारात खासकरून बजेट यूजर्ससाठी लॉन्च केला आहे. हा फोन 12,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो. या किमतीच्या श्रेणीत, ते POCO, Redmi, Vivo, Infinix, Motorola सारख्या ब्रँडच्या स्वस्त फोन्सना टक्कर देणार आहे.
0 notes