Tumgik
#रुपयांच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दिल्लीत हजारो रुपयांच्या वैद्यकीय चाचण्या आता मोफत
दिल्लीत हजारो रुपयांच्या वैद्यकीय चाचण्या आता मोफत
दिल्लीत हजारो रुपयांच्या वैद्यकीय चाचण्या आता मोफत नवी दिल्ली –  या महापालिकेत नुकतेच आम आदमी पक्षाला दणदणीत यश मिळाल्यानंतर आता आगामी वर्षापासून मोहल्ला क्‍लिनिक आणि शासकीय रुग्णालयांमध्ये 450 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंजुरी दिली आहे. दिल्ली सरकारकडून मोफत पुरवल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांची संख्या सध्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
स्वच्छ, निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर
विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी बँकांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत पंधरा लाख कोटी रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात
आणि
बांगलादेशविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
सविस्तर बातम्या
स्वच्छ भारत, तसंच निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं निरीक्षण राष्ट्रपतींनी नोंदवलं. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचं उद्दीष्ट साध्य करायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्याहस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. ��हाराष्ट्र सरकारच्या“आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
****
विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी देशातील बँकिंग क्षेत्राला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या काल पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी सुसज्ज असण्याची आवश्यकता सीतारामन यांनी व्यक्त केली. आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यम वर्ग, महिला आणि युवक अशा सर्व घटकांसाठी पंधरा लाख कोटी रुपये योजनांची सुरुवात केली आहे. सरकारनं देशात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला बळकट करण्यासाठी नवनवीन पावलं उचलली आहेत.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले…
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी काल पुण्यात 'परिवर्तन महाशक्ती'ची घोषणा केली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.
****
स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा काल मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
****
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत काल नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगान युनेस्कोचं पथक  विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात शंकरनगर इथलं एसबीआय बँकेचं एटीएम फोडून वीस लाख ४३ हजार रुपये लंपास केल्याची घटना काल घडली. एटीएम मॅनेजर कैलास कांबळे यांच्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील ग्रामसेवकाला साडे तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं. ग्रामसेवक ईश्वर डफडे याने तक्रारदाराकडे नमुना आठ-असाठी साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली होती. डफडे याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील मातंग समाज आणि तत्सम जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी तीन महिन्यांचं व्यावसायीक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार  आहे. यासाठी प्रमाणपत्राच्या सत्य प्रती जोडून महामंडळाच्या लातूर कार्यालयात अर्ज सादर करावेत, असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहित शर्मा आणि विराट कोहली पत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराजनं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
आमदार संजय शिरसाट यांनी काल नवी मुंबईतल्या सिडको भवन इथं सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच सिडकोची इतर उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं,  शिरसाट यांनी सांगितलं.
****
राज्य महिला आयोगाकडून काल जळगाव इथं महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यात आली. जिल्ह्यात महिला तक्रारींच्या दाखल ९४ प्रकरणांवर तीन पॅनल कडून सुनावणीची कारवाई करण्यात आली. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ काल धाराशिव इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. लातूर इथंही संविधान चौकात काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा काल सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त काल जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीत युवक, पुरुष, लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचं निरीक्षण जिल्हास्तरीय समितीने नोंदवलं आहे. समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे.   
****
0 notes
dyanmevaarutm · 18 days
Text
Tumblr media
0 notes
news-34 · 19 days
Text
0 notes
mazhibatmi · 30 days
Text
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये दरमहा 5,000 रुपये गुंतवून कोणीही करोडपती बनू शकतो, आणि केवळ 100 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरुवात करता येते. गुंतवणूक आणि नफा याचे गणित समजून घेण्यासाठी पूर्ण बातमी पहा..
पैसे वाचवण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक मानले जाते. परंतु, तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला योग्य परतावा मिळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे सर्वात विश्वासार्ह मानले जाते. अशीच एक सरकारी योजना पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Scheme) आहे, जी तुम्हाला करोडपती बनवू शकते. या योजनेत, एक निश्चित मासिक रक्कम जमा करावी लागते, जी मेच्योरिटी वेळ पूर्ण झाल्यावर निश्चित व्याजदरासह भरघोस परताव्याच्या स्वरूपात परत केली जाते. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा एक निश्चित रक्कम जमा करून, तुम्ही 10 वर्षांत 8 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड गोळा करू शकता.
0 notes
punerichalval · 2 months
Text
लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिगंबर चालाक पुणे प्रतिनिधी :- तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय–३६, पद– सहायक पोलीस…
0 notes
darshanpolicetime1 · 6 months
Text
महाराष्ट्र शासनाचे १५, १७,  १८ व २० वर्षे मुदतीचे प्रत्येकी २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
१५ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या 15 वर्षे मुदतीच्या 2 हजार  कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 7 months
Text
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० फेब्रुवारी २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के…
View On WordPress
0 notes
Video
youtube
नाशिक शहरात 13 लाख 35 हजार रुपयांच्या तब्बल चोरलेल्या 17 दुचाकी..
0 notes
gajananjogdand45 · 9 months
Link
https://marmikmaharashtra.com/soybean-stealing-gang-jailed-5-accused-arrested-with-1-lakh-5-thousand-rupees/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन नागपूर  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्याधुनिक सुविधा असलेल्या एम्स रूग्णालयाचे उद्घाटन केले.पंतप्रधानांनी जुलै 2017 मध्ये या रुग्णालयाची पायाभरणी केली होती, हे रूग्णालय प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. एम्स नागपूर हे रूग्णालय 1575 कोटी खर्च करून उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी-काँग्रेस पक्षाचा विरोध
चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या अनुदालाही केंद्राची मान्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात होणार सहभागी
 ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’ कृषी पुरस्कारानं मुख्यमंत्र्यांचा गौरव
आणि
राज्यस्तरीय स्वच्छता ही सेवा पंधरवाड्याला आजपासून आरंभ
सविस्तर बातम्या
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले...
इसका इम्पिमेंटेशन दो फेजेस्‌ में होगा। फर्स्ट फेज मे लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और उसके सेकंड फेज मे लोकल बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना है। जिससे की एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब के सब देश के निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको पुरे देश भर मे डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस्‌ है, उन सब के उपर डिस्कशन्स करें। और एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे लीगल प्रोसेस से इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देशात जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक घ्यावी लागेल, असं खरगे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावाचं स्वागत केलं आहे.
****
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत महत्त्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सुधारित गगनयान मोहिम, तसंच भारतीय अंतराळ स्थानकाच्या स्थापनेलाही काल मान्यता देण्यात आली. २०४० मध्ये चंद्रावर मानव पाठवण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या अंतराळ यानाच्या निर्मितीलाही मंजुरी मिळाली आहे.
****
रबी हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, तसंच ७९ हजार १५६ कोटी रुपयांच्या पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवण्यालाही काल मान्यता  देण्यात आली. याअंतर्गत दाळी, तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह किमान आधारमूल्य आणि बाजार भाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्धा दौऱ्यावर येणार आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते अमरावती इथं पीएम मित्र पार्कची पायाभरणी होणार आहे. तसंच पंतप्रधान महाराष्ट्र शासनाच्या "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" योजनेचा आरंभ करतील. परभणी जिल्ह्यात १४ महाविद्यालयांमध्ये, लातूर जिल्ह्यात १८ महाविद्यालयांमध्ये तर नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना होणार आहे.
****
अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला कालपासून प्रारंभ झाला. शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी ही पेन्शन योजना आहे. शुभारंभाच्या सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातले ५० बालकं ऑनलाईन पधतीनं सहभागी झाले होते. यापैकी १० बालकांना कायम निवृती वेतन -प्राण कार्ड देण्यात आलं. तर काल  पहिल्याच दिवशी ५५ खाती उघडण्यात आली.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने काल सन्मानित करण्यात आलं. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा जागतिक कृषी पुरस्कार राज्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचं सांगून महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रातही पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे अशा शब्दात  राज्यपालांनी प्रशंसा केली.
****
राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झालं. नवी मुंबईत महापे इथं, आरआरपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामार्फत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन टप्यात होणाऱ्या या प्रकल्पात इटली आणि फ्रान्स सरकारचा २७% वाटा आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५३८ कोटी एवढी गुंवतणूक करण्यात येणार असून, दोन्ही टप्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक ३६ हजार ५७३ कोटी एवढी असणार आहे. १२ हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून चार हजार रोजगार निर्मिती होईल.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते अहमदनगर इथं झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. गिरगाव चौपाटी इथून या मोहिमेची सुरुवात होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२४ ही मोहीम ग्रामपंचायत स्‍तरावर राबवण्‍यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत राज्‍यासह नांदेड जिल्ह्यात सर्वत्र एक दिवस माझ्या गावाच्‍या स्‍वच्‍छतेसाठी हा उपक्रम घेण्‍यात येणार आहे.
****
जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा काल दुपारी समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३ तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश मूर्तींचं जालन्यात विसर्जन करण्यात आलं.नांदेड जिल्ह्यात सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं.
मुंबईत मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन काल सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन काल दुपारपर्यंत सुरू होतं. 
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं परवा अनंत चतुदर्शीला ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण २८ हजार ३२ मूर्ती संकलित केल्या, यापैकी २४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर दा�� स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार ७४८ मूर्ती, विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे ३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रीय खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं या उपक्रमात वितरण करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात औसा इथं तक्षशिला बुद्ध विहार विकास कामांचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या बुद्ध विहाराच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे शांतता आणि समानतेचे विचार समाजापर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
****
टीबी मुक्त अभियानात परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायती कौतुकास्पद कार्य करत असल्याचं अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल टिबीमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी  डॉ. काळे बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यात गेल्या ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आज १९ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या ईमेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
निजामाबाद पुणे आणि नांदेड पुणे या गाड्या २१ आणि २२ सप्टेंबर रोजी ��रभणी, परळी, लातूर, कुर्डुवाडी, दौंड या मार्गाने धावणार आहेत. दौंड निजामाबाद आणि पुणे नांदेड या गाड्या २२ आणि २३ सप्टेंबर रोजी दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी या मार्गाने धावतील. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने ही माहिती कळवली आहे.
****
0 notes
dyanmevaarutm · 18 days
Text
Tumblr media
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
Oppo A3x 5G: Oppo ने भारतात आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन अनेक दमदार फीचर्ससह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅटरीसह अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.
Oppo ने गुपचूप आणखी एक स्वस्त 5G फोन भारतात लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन मिलिटरी ग्रेड MIL-STD 810H बॉडी सह येतो, या फोनचा लूक आणि डिझाईन आयफोन सारखा दिसतो. Oppo ने हा फोन भारतीय बाजारात खासकरून बजेट यूजर्ससाठी लॉन्च केला आहे. हा फोन 12,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो. या किमतीच्या श्रेणीत, ते POCO, Redmi, Vivo, Infinix, Motorola सारख्या ब्रँडच्या स्वस्त फोन्सना टक्कर देणार आहे.
0 notes
nashikfast · 10 months
Text
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने "इतक्या" हजार कोटींचे रस्ते प्रस्तावित
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांचा ८ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या बांधकाम विभागाच्या ३ हजार कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. सिंहस्थानिमित्त होत असलेल्या कामांसाठी राज्य व केंद्र सरकारने निधी दिल्यानंतर कामांचे नियोजन करून ती कामे…
View On WordPress
0 notes