#राखली;
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
दारिद्र्य निर्मूलन, भूक निर्मूलन आणि तरुणांना समान संधी उपलब्ध करून देण्याची धोरणे राबवून, भारत जगासमोर एक उज्ज्वल उदाहरण म्हणून उभा आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे आयोजित मानवाधिकार दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. मानवी हक्कासाठी अविरत काम करणार्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह न्यायपालिका आणि प्रमुख भागधारकांची त्यांनी प्रशंसा केली. न्याय आणि मानवी प्रतिष्ठा हे समाजाचा पाया असून, अशा जगाच्या उभारणीसाठी योगदान देण्याच्या सामूहिक संकल्पालाही राष्ट्रपतींनी दुजोरा दिला. 
मानवी हक्क दिनानिमित्त मुंबईत राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होत आहे.
****
विरोधक आणि सत्ताधार्यांच्या दगारोळानंतर संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.
लोकसभेत आज कामकाज सुरु झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिरला यांनी कामकाजात सतत व्यत्यय येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रत्येक सदस्याने सभागृहाची प्रतिष्ठ राखली पाहिजे आणि देशातल्या नागरीकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं बिरला यांनी सांगितलं. विरोधकांची वागणूक योग्य नसून, ती सदनाच्या नियमा��विरुद्ध असल्याचं ते म्हणाले. या वक्तव्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी आक्षेप घेत, सत्ताधारी पक्ष देखील कामकाज होऊ देत नसल्याचं नमूद केलं. यावरुन दोन्ही बाजुच्या घोषणाबाजीमुळे सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही हेच चित्र पहायला मिळालं. विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.    
****
माजी परराष्ट्रमंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचं आज पहाटे बंगळुरु इथं प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. एस एम कृष्णा हे कर्नाटकचे दहावे मुख्यमंत्री होते. २००९ ते २०१२ या काळात ते परराष्ट्र मंत्री होते, तर २००४ ते २००८ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्यासह इतर नेत्यांनी एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाचे २०२२-२३ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. यात महाराष्ट्राला सहा पुरस्कार मिळाले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी ग्रामपंचायतीला नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम ग्राम पंचायत पुरस्कार, तसंच ग्राम उर्जा स्वराज विशेष ग्रामपंचायत असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायत गटाला नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम पंचायत गट हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिक जिल्ह्यातली मोडाळे ग्रामपंचायत, भंडारा जिल्ह्यातली बेला ग्रामपंचायत, तसंच पुण्यातल्या यशदा, अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या संस्थेला विविध श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत.
****
मुंबईत कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातातल्या मृतांची संख्या सहावर पोहचली आहे. तर, जखमींची संख्या ४२ झाली आहे. जखमींना उपचारासाठी विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंबेडकर नगर परिसरात काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा मुख्य परिक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार आता मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना हा निकाल पाहता येईल.
****
बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी प्रत्येकावर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार असून, नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केलं आहे.
****
रेल्वेच्या हैदराबाद विभागातल्या रोलिंग ब्लॉक मुळे काही रेल्वे गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. आजपासून ते १६ तारखेपर्यंत मनमाड - धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस नांदेड ते धर्माबाद दरम्यान, तर दौंड - निझामाबाद डेमू गाडी मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
मुंबईसह राज्यात पुन्हा थंडीची लाट आली आहे. आज धुळे शहरात यंदाचं निचांकी चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
****
0 notes
svagrosolutions · 2 months ago
Text
खताचा शेतीला काय फायदा होतो?
खतांचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणावर केला जातो. विविध प्रकारच्या खत्यांचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास, मातीची गुणवत्ता राखण्यास आणि फसलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. खताचा शेतीला अनेक फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊया कि खते शेतीसाठी कसे फायदेशीर ठरतात.
१. पिकांची वाढ आणि उत्पादन वाढवणे खतांचा प्रमुख फायदा म्हणजे ते पिकांना आवश्यक पोषण प्रदान करतात. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखे प्रमुख घटक पिकांच्या वाढीला उत्तेजन देतात. यामुळे पिकांची वाढ जलद होते आणि उत्पादनही वाढते. योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्यास, शेतकऱ्यांना उच्च उत्पादन मिळू शकते.
२. मातीची उपजाऊपणाची गुणवत्ता सुधारना खते मातीतील पोषक तत्वांचा समतोल राखण्यास मदत करतात. मातीतील कमी झालेल्या पोषक घटकांचा पूर्तता करत, ते मातीच्या उपजाऊपणाला उत्तेजन देतात. मातीतील ओलावा आणि pH पातळी देखील संतुलित राखली जाते, ज्यामुळे पिकांचे आरोग्य सुधारते.
३. झाडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे काही खते, विशेषतः जैविक खते, पिकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवतात. हे पिकांना विविध रोग आणि कीडपासून संरक्षण देते. योग्य खतांचा वापर केल्याने पिकांमध्ये विविध रोगांचा धोका कमी होतो आणि ते चांगले उगवतात.
४. मातीतील सूक्ष्मजीवांचे ज���वनसत्त्व वाढवणे सेंद्रिय खते आणि जैविक खत्यांचा वापर केल्याने मातीतील सूक्ष्मजीव सक्रिय होतात. हे सूक्ष्मजीव मातीची आरोग्य सुधारतात आणि पिकांच्या जिवाणूंच्या योग्य संतुलनात मदत करतात. यामुळे मातीची गुणवत्ता टिकवून ठेवली जाते.
५. कृषी व्यवस्थापन सुधारणा खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना एक व्यवस्थीत योजना तयार करता येते. ते पिकांच्या प्रकारानुसार योग्य खतांचा वापर करून उत्पादन वाढवू शकतात. तसेच, खतांचा वापर खूप परिणामकारक असतो, जेव्हा ते योग्य पद्धतीने आणि नियोजित प्रमाणात वापरले जातात.
६. खर्चाची बचत आणि नफा वाढवणे योग्य खतांचा वापर शेतकऱ्यांना खर्च कमी करायला मदत करतो. उदाहरणार्थ, खते वापरून उत्पादनाची गुणवत्ता आणि रेट वाढवता येतो, ज्यामुळे नफा वाढतो. योग्य पद्धतीने खतांचा वापर करणे हे शेतीला फायदेशीर ठरते.
निष्कर्ष शेतीत खतांचा वापर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, पण त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. रासायनिक खते आणि सेंद्रिय खत्यांचा संतुलित वापर, मातीचे आरोग्य आणि उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. योग्य वेळेवर आणि प्रमाणात खते वापरणे हे शेतकऱ्यांना अधिक फायदा आणि उन्नती मिळवून देऊ शकते.
0 notes
mukundhingne · 3 months ago
Text
"Mutual freedom and privacy should be respected…!"
“एकमेकांचे स्वातंत्र्य आणि गोपनीयता राखली जावी…!” What’s something you believe everyone should know. There is a saying in Marathi, “अति परिचयात अवज्ञा” (Familiarity breeds contempt). It means that when we become too familiar or close with someone, we stop valuing that relationship. This happens quite often. We may get along very well with someone—our thoughts and nature align, leading to…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Maval : दीड महिना सुश्रुषा केल्यानंतर सापाच्या पाच पिलांचा जन्म
एमपीसी न्यूज – दीड महिना सापाच्या अंड्याची निगा राखली. त्याला उबदार वातावरण करून योग्य ( Maval) काळजी घेतली. त्यानंतर अंड्यातून पाच गोंडस सापाच्या पिलांनी जन्म घेतला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य निनाद काकडे यांनी यासाठी प्रयत्न केले. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील दीड महिन्यापूर्वी तळेगाव दाभाडे शहरात एक साप आणि त्याची पाच अंडी आढळली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद भास्कर माळी यांना…
0 notes
gitaacharaninmarathi · 7 months ago
Text
30. पाणी, वाळू आणि दगडावर लिहिणे    
श्रीकृष्ण म्हणतात की सांख्ययोग (2.11-2.38) बद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर ते आता योग म्हणजे कर्मयोगाचे स्पष्टीकरण देतील, ज्या��ा अभ्यास माणसाला कर्माच्या बंधनातून मुक्त करेल (2.39).
सांख्य योग सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तो एक नष्ट न करता येणारे चैतन्य आहे (जाणीव) ज्याला मरण नाही. या श्लोकापासून पुढे श्रीकृष्ण कर्मयोगाचा माध्यमातून हेच सांगू इच्छितात. त्यामुळे, या संदर्भात कर्मबंधन आणि योग समजून घेण्याची गरज आहे.
योगाचा शब्दशः अर्थ एकत्र येणे असा होतो आणि गीते मध्ये विविध संदर्भांमध्ये त्याचा वापर केला जातो. श्रीकृष्ण समतेला योग म्हणतात (2.48). हे धनंजय! तू आसक्ती सोडली पाहिजे आणि परिपूर्ण आणि अपूर्ण यांच्यात समानता राखली पाहिजे. समतेला योग म्हणतात. तसेच श्लोक 2.38 मध्ये, कृष्ण अर्जुनाला सुख-दु:ख, विजय-पराजय आणि नफा-तोटा यांची बरोबरी करून युद्धाची तयारी करण्यास प्रोत्साहित करतो.
आपल्या कर्मांमुळे उमटलेले चांगले-वाईट प्रभाव किंवा ओरखडे आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या अंतर्बाह्य प्रतिक्रिया यांचा कर्मबंधनामध्ये समावेश होतो. त्यांना निष्पक्ष पॅटर्न्स म्हटले पाहिजे. हे प्रभाव आपल्या नेणिवेतून आपल्या वर्तनाला दिशा देत असतात आणि म्हणून श्रीकृष्ण आपल्याला कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी योगमार्गाचा अवलंब करावयास सांगतात.
जे प्रभाव सुख आणि लाभ देतात त्या प्रभावांना चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो. त्याच वेळी आपण दु:ख आणि तोटा यांना दूर सारत असतो. हे दोन्ही प्रभाव जितके खोलवर असतील तितके त्यांना चिकटून राहणे किंवा त्यांच्यापासून दूर जाणे यांची तीव्रता अधिक असते.
या प्रभावांची ताकद ही दगड, वाळू आणि पाणी यांच्यावर लिखाण करण्यासारखी असते. जेव्हा दगडावर लिखाण केले जाते तेव्हा ते खोलवर उमटते आणि दीर्घकाळ टिकून राहणारे असते. वाळूवरचे लिखाण कमी काळ टिकते आणि पाण्यावर लिहिलेले तर क्षणात नाहीसे होते.
कर्मयोग आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतो आणि आपल्याला इतके ‘सरल’ करतो की कशाचाच आपल्यावर परिणाम होऊ शकत नाही, कशाचाच ताण येऊ शकत नाही. पाण्यावरील प्रभाव नमूद करताना श्रीकृष्ण हेच सांगत असतात.
0 notes
anuradha002patil · 1 year ago
Text
सेमिफायनल मध्ये भाजपने सत्ता गाठली काँग्रेस एका जागी विजय
17-12-2023
Tumblr media
अनुरा��ा पाटील
भाजपने मारली हॅट्रिक तर काँग्रेस एकाच जागी विजय.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिन्ह�� राज्यांमध्ये काँग्रेसला मागे टाकले जेथे दोघे आमने-सामने लढत होते, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांवर नियंत्रण मिळवले आणि मध्य प्रदेशात सत्ता राखली. तेलंगनातील एक उल्लेखनीय पुणरुजजीवन ज्याने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं . हा काँग्रेस साठी एकमेव दिलासा होता.काँग्रेस ने पाच वर्षांपूर्वी तिन्ही राज्य जिंकली होती, तरीही मध्यप्रदेशशात राजकीयदृष्ट्या संधीसाधू पक्षा मुळे मध्यप्रदेश गमावला होता. बाजप ने राज्यस्थान मध्ये 115 मध्यप्रदेश 163 तर छत्तीसगड मध्ये 54 जागणी हॅट्रिक मारली.लाडली बेहना योजने मुळेच भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला.तर भाजप चा प्रचार देखील नरेंद्र मोदींनी केला.
Tumblr media
छत्तीसगड मध्ये ही मोदींनी 7 रेली काढल्या आणि प्रचार केला. तेलणंगणा मध्ये काँग्रेस ने बऱ्यापैकी जम बसवला.तर राज्यस्थान मध्ये योगीजींनी कमान सांभाळली. आणि बाळाकनाथ आणि दियाकुमारी यांसारखे मोठे चेहरे मुख्यमंत्री पदा साठी उभा केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
Tumblr media
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ७, १७,२३ आणि ३० नोव्हेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोजणी केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला राजस्थानमधील मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
हॉटेलच्या खोलीत असू शकतो Hidden कॅमेरा! तुम्ही या सोप्या पद्धतींनी तपासू शकता, गोपनीयता राखली जाईल.
https://bharatlive.news/?p=106328 हॉटेलच्या खोलीत असू शकतो Hidden कॅमेरा! तुम्ही या सोप्या पद्धतींनी तपासू ...
0 notes
rajeshre · 2 years ago
Text
Watch "दामोदर शेठची कथा: दामोदर शेठची परमेश्वराने कशाप्रकारे लाज राखली? PART-2 Marathi Satsang" on YouTube
youtube
0 notes
jagdamb · 2 years ago
Photo
Tumblr media
कर्तृत्वाने आपल्या देशात प्रस्थापिली एकता, राष्ट्र उभारणीत योगदान देऊन राखली देशाची अखंडता !! #लोहपुरुष #सरदार #वल्लभभाई_पटेल पुण्यतिथी | विनम्र अभिवादन! 🚩🚩🚩🚩🚩 #Jagdamb® #Vyavsaywala™ (CONTENT © COPYRIGHT) (टीप - सदर कंटेंट हे कॉपीराइटेड आहे, न विचारता वापरल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते) ®️ Jagdamb Creative Hub Pvt.Ltd. ©️ डिजिटल युगात, नो टिव टिव, ओन्ली CREATIVE !! #जगदंब #व्यवसायवाला #jagdamb #vyavsaywala #BusinessStrategy #PoliticalStrategy #DigitalMarketing #LovekeshRameshKachi #JagdambCreative #SocialMediaMarketing #sardar #vallabhbhaipatel #vallabhbhai #lohpurush #bharatratna #gujrat #homeminister (at Sardar Vallabhbhai Patel - Statue Of Unity) https://www.instagram.com/p/CmJ9edUvxPP/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रख्यात बायोकेमिस्ट डॉ गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार, १० जणांना विज्ञान श्री पुरस्कार, ११ जणांना युवा विज्ञान पुरस्कार, आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ��ांद्रयान तीन च्या चमुला विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य जयंत भालचंद्र उदगावकर यांना जीवशास्त्रासाठी, बंगळुरू इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधले उमेश वार्ष्णेय यांना जीवशास्त्रासाठी, तर मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या योगदानासाठी विज्ञान श्री पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातले महेश काकडे यांना गणित आणि संगणक विज्ञान क्षेत्रातल्या योगदानबद्दल युवा विज्ञान पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस उद्या २३ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्यावर्षी २३ ऑगस्टला चंद्रयान तीन मिशन अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरल��� आणि हे मिशन यशस्वी झालं. भारतानं मिळवलेल्या या यशानंतर अंतराळ अर्थव्यवस्थेत पुढील दहा वर्षांत पाचपटीनं वाढ अपेक्षित असून, ही उलाढाल सुमारे ४४ अरब डॉलर्स इतकी होण्याचा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
****
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. या घटनेच्या निषेधार्थ संपावर ‌गेलेल्या डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याचं आवाहन न्यायालयानं केलं आहे.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात राज्यात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, मुलींसाठी तक्रार पेटी, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समितीचं प्रस्तावित गठन, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती, यासंदर्भातले निर्देश या शासन निर्णयात देण्यात आले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अ��ुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापनाने २४ तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असून, यासंदर्भात तडजोड केली जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
****
येत्या रविवारी २५ ऑगस्टला होणारी, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे.  आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
विविध देशांमध्ये आढळून येत असलेल्या मंकीपॉक्स या विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीनं प्रतिबंध आणि सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून या आजाराविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्यासह विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांची देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी सगळ्या ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर जल मित्रांची निवड करावी, असं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केलं आहे. स्थानिक कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून दुरुस्ती आणि देखभालीची कामं तातडीनं करता येतील आणि त्यामुळे गावातल्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सातत्य आणि गुणवत्ता राखली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून, राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
0 notes
kokannow · 2 years ago
Text
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात एसआरएम कॉलेज कुडाळचे घवघवीत यश
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात एसआरएम कॉलेज कुडाळचे घवघवीत यश
एकांकिका, समूहगान, एकपात्री अभिनय मध्ये अव्वल कामगिरी निलेश जोशी । कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात सिंधुदुर्ग विभागात कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. या युवा महोत्सवात सादर झालेल्या एकांकिका, भारतीय समूहगान आणि एकपात्री अभिनय या कलाप्रकारात पहिल्या क्रमांकासह एकूण ८ कलाप्रकारात घवघवीत यश संपादन केले.मुंबई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
CWG 2022, महिला क्रिकेट फायनल, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: लाइव्ह टेलिकास्ट, लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे? | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022, महिला क्रिकेट फायनल, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: लाइव्ह टेलिकास्ट, लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे? | राष्ट्रकुल खेळ बातम्या
हरमनप्रीत कौरचा फाइल फोटो© एएफपी भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरताना सुवर्णपदकासाठी झुंज देईल. द हरमनप्रीत कौर-नेतृत्वाची बाजू घेईल मेग लॅनिंगच्या शिखर सामन्यात ऑस्ट्रेलिया. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. भारताने शेवटच्या काही षटकांमध्ये इंग्लंडला मागे टाकण्यासाठी आपली मने राखली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे अभिनंदन - क्रीडामंत्री सुनील केदार
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे अभिनंदन – क्रीडामंत्री सुनील केदार
मुंबई, दि. १३ : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील सहभागी चमूने महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखली. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये ४५ सुवर्ण पदकांसह १२५ पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्राच्या चमूचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी अभिनंदन केले. पंचकुला (हरयाणा) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
HSC Result | अलमिजान ने राखली यावर्षीही १००% निकालाची उज्वल परंपरा
#HSC_Result | अलमिजान ने राखली यावर्षीही १००% निकालाची उज्वल परंपरा #Shrirampur #Ahmednagar
HSC Result | श्रीरामपुर (शौकतभाई शेख) – येथील अलमिजान एजुकेशन ऍन्ड वेल्फेअर सोसायटी संचालित मखदुमियॉं कॉलेज ऑफ सायन्स चा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत यावर्षी देखील 100 टक्के रिजल्ट लागला असून  शाळेने यावर्षीही निकालाची आपली उज्जवल परंपरा राखली असून भविष्यात पुढे देखील विद्यार्थी घडविण्यात व शाळेची कारकिर्दीचा उल्लेख राज्य पातळीवर होईल असे प्रतिपादन अलमिजान एजुकेशन सोसायटीचे चेअरमन शेख मोहम्मद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
APMC Result: एका सोयऱ्याची सोबत, दुसऱ्या सोयऱ्याचा पराभव, कर्डिलेंनी चौथ्यांदा सत्ता राखली
https://bharatlive.news/?p=95552 APMC Result: एका सोयऱ्याची सोबत, दुसऱ्या सोयऱ्याचा पराभव, कर्डिलेंनी चौथ्यांदा ...
0 notes
loksutra · 3 years ago
Text
यूपी निवडणूक निकाल: भाजपने 35 वर्षे बरेली विधानसभा जागा राखली, डॉ. अरुण सक्सेना जनतेच्या विश्वासावर टिकून आहेत
यूपी निवडणूक निकाल: भाजपने 35 वर्षे बरेली विधानसभा जागा राखली, डॉ. अरुण सक्सेना जनतेच्या विश्वासावर टिकून आहेत
भाजपचे अरुण सक्सेना (भाजपने बरेलीची जागा जिंकली) यांना १२४३१५ तर सपाचे राजेश अग्रवाल यांना ३१५९३ मते मिळाली. या जागेसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. या जागेवर सुमारे 54 टक्के मतदान झाले. भाजपचे अरुण सक्सेना यांनी सलग तिसऱ्यांदा बरेली विधानसभेची जागा राखली आहे. (फोटो स्रोत- मनवीर सिंग) उत्तर प्रदेश (उत्तर प्रदेश) बरेली जिल्ह्यातील बरेली विधानसभा जागा (बरेली विधानसभा जागा) पण भाजप गेल्या अनेक…
Tumblr media
View On WordPress
0 notes