#येऊन
Explore tagged Tumblr posts
Text
गीतकार मंदार चोळकर म्हणतोय "लंडन मिसळ" खायला "एकदा येऊन तर बघा"
गेल्या 12-15 वर्षात मराठी चित्रपटसृष्टी ने पुन्हा एकदा दर्जा, प्रेक्षकांचं प्रेम आणि व्यावसायिक यश ह्या सर्व पातळ्यांवर सोन्याचे दिवस अनुभवायला सुरुवात केली आहे. आणि त्यातलं सातत्य कायम आहे. आणि त्यांची संख्या ही लक्षणीय आहे. अशा वेळी एका वर्षात 100 हून अधिक चित्रपट प्रदर्शित होणं हे नवीन नाही. त्यामुळे एका दिवशी दोन किंवा अधिक चित्रपट प्रदर्शित होणं यात काही नवीन नाही. जितकं जास्त काम वाढलंय…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/fea9e414a4ab86c8941d00d8c734a13c/72a4a96be4a08755-f4/s540x810/ff013d6d82d1ded403f4f399715ea7f786e7f7e7.jpg)
View On WordPress
#Ekda Yeun Tar Bagha#EYTB Movie#London Misal#Mandar Cholkar#Manndar Cholkar#Manndar Cholkar London Misal and Ekda Yeun Tar Bagha#Namrata Sambherao#Onkar Bhojne#Prasad Khandekar#Ritika Shrotri#Rutuja Bagwe#एकदा येऊन तर बघा#गीतकार मंदार चोळकर म्हणतोय "लंडन मिसळ" खायला "एकदा येऊन तर बघा"#मंदार चोळकर#लंडन मिसळ
1 note
·
View note
Text
कशी ग तू अशी, केसात फुलं आणि डोळ्यात विश्व?
तुझ्यापासून दूर पाहता येत नाही, तुझ्याबद्दल विचार करायचा थांबता येत नाही. तुझे हे सौंदर्य असे की अप्सरा येऊन तुझ्या पाया पडतील आणि विचारतील: अशी कशी ग तू? एवढी भव्य कशी ग तू?
कशी ग तू अशी, केसात फुलं आणि डोळ्यात विश्व?
Translation:
How are you real, you with flowers in your hair and the universe in your eyes?
I cannot look away from you, I cannot stop thinking about you. Your beauty is such that even angels will sit at your feet and ask you: how are you real? How are you so magnificent?
How are you real, you with flowers in your hair and the universe in your eyes?
.
taglist: @musaafir-hun-yaaron @mad-who-ra @girlatreus @budugu @h0bg0blin-meat @yehsahihai @kanha-sakhi @orgasming-caterpillar @urmomw4ntsme
#marathi poetry#amrut's poetry#amrut writes#desiblr#desi aesthetic#desi tumblr#indian aesthetic#desi dark academia#desi academia#indian academia#desi tag#poems and quotes#original lyrics#original poetry#poetry#love poem#love poetry#poets on tumblr#original poem#poems and poetry#marathi#marathi poems#prose#love prose#prose writing#romance#romantic prose
110 notes
·
View notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8bcfc2c1da8ceba06d94f8ce37b79463/bfe60cde92e4ce53-f4/s1280x1920/1344b4c1f6c61bb1279a06ea3378b7ed69ce8945.jpg)
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी का��ाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/bc551a649dff4211349914ffcb31a3de/bfe60cde92e4ce53-5d/s540x810/018d7ec37e2c279051bef3723fdab13baa85e55c.jpg)
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी ��ोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत नि��ाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/18df813d3e96113a4ccffd07c5582b5e/bfe60cde92e4ce53-8a/s540x810/b6330250b5247100aac53a8f12f3cedcf17307e5.jpg)
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; शक्तिपीठ महामार्गाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याची माहिती. • मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, ज��परिषदेत एकमत. • महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताला विजेतेपद, पुरुष संघाचाही इंग्लंडविरुद्ध मालिका विजय.
राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या पाच वर्षांच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत, त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू.
रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचं काम सुरु असून, यापुढेही हे कार्य सुरू राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून विकास कामं केली जातील, चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभं राहील, असं ते म्हणाले. मराठवाडा, विदर्भासह ठिकठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, शक्तिपीठ महामार्गाला सगळ्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.
आदिवासी भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे आपल्यापुढचं सर्वांत मोठं आव्हान असून, सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्समध्ये ‘फिस्ट-२०२५’ या आंतराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते. या परिषदेचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, श���क्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्री पदाची संधी आपल्याकडे आली असून, सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, यावेळी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी विविध वेषभूषा साकारुन सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, अशी शासनाकडे मागणी करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा, अशी मागणी, जलतज्ज्ञांनी यावेळी केली. ���ा एक दिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी निर्माण झालेली ही समस्या भांडण -तंटा न करता देखील सोडवता येऊ शकते, असं मत व्यक्त केलं. कोकणातून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत बंद पाईपने पाणी आणणं सहज शक्य आहे, यातून जलविद्युत प्रकल्प देखील उभारता येईल. सर्व अर्थाने उपयुक्त असा हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स���रक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
अहिल्यानगर इथं झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. गादी गटात त्याने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव केला, तर माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजनं विजय मिळवला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता भरणे, यांच्या उपस्थितीत त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात तीन खेळाडू बाद करणारी गोंगदी त्रिशा हिला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
पुरुष क्रिकेटमध्ये, पाचव्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत, पाच सामन्यांची मालिका चार - एक अशी जिंकली. काल मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २४८ धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ ९७ धावातच सर्वबाद झाला. अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच, तर वरुण चक्रवर्तीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटात काल महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ठाकूर याने सुवर्ण पदक पटकावलं. पदक तालिकेत सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानावर, तर कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०० कोटी रूपयांच्या, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची सुधारित किंमत आता तीन हजार कोटी रुपये इतकी झाली असून, त्यानुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली काल ही माहिती दिली. अद्ययावत सुविधांसह धाराशिवचं रेल्वेस्थानक तिप्पट मोठं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा असून, ही चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं प्रतिपादन सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीनं काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं काल जालना इथं आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या सहकारी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जुना जालन्यातल्या भाग्यनगर भागात वीर विनायक दामोदर सावरकर भवन उभारलं जाणार असून, या भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ काल आमदार खोतकर यांच्या हस्ते झाला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे आजपासून तीन दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी होणार आहे.
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
परमात्मा म्हणाले होते, गरीबदासजी यांच्या पंथात येऊन तत्वज्ञान देईल | San...
youtube
1 note
·
View note
Text
0 notes
Text
परमात्मा म्हणाले होते, गरीबदासजी यांच्या पंथात येऊन तत्वज्ञान देईल | San...
youtube
1 note
·
View note
Text
#SantRampalJiMaharaj #SadNews #Real spiritual knowledge of sant Rampal ji Maharaj ji 🙏 Supreme God is Kabir Saheb Ji 🙏
0 notes
Text
परमात्मा म्हणाले होते, गरीबदासजी यांच्या पंथात येऊन तत्वज्ञान देईल | San...
youtube
अवश्य पहा हा शॉर्ट सत्संग : परमात्मा म्हणाले होते, गरीबदास जी यांच्या पंथात येऊन तत्वज्ञान देईल|Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
कबीर परमात्मा हे सतल��कातून येतात आणि पुण्य आत्म्यांना भेटून सत्य ज्ञान सांगतात
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, आर्थिक सर्वेक्षण अहवाल होणार सादर • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण • बीडसह बहुतांश ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका संपन्न, बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच • छत्रपती संभाजीनगर इथं जी बी एस आजाराचे पाच संशयित रुग्ण, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत २३ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच���या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला ३६ विविध पक्षांचे मिळून ५२ खासदार उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं.
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. या विधेयकासंबंधी १४ सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन, आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या काल नवी मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी दोन फेब्रुवारीला 'महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४' होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त, पुण्याच्या एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर, खरात यांनी हा खुलासा केला, त्या म्हणाल्या, “या परिक्षेकरता जवळपास दोन लाख ८६ हजार इतके उमेदवार बसलेले आहेत. सगळी व्यवस्था अतिशय चोख आहे, प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत. आणि कोणतीही पश्नपत्रिका लिक झालेली नाही.’’
दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधले विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या शाळेतल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियुक्त न करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला होता. त्याला संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. ज्या परीक्षा केंद्रावर मागच्या पाच वर्षां�� गैरप्रकार झाले होते त्या शाळांना मात्र हाच निर्णय लागू असेल, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते काल बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच, असं पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले… ‘‘चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती इथ येऊन गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विलमींगच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई, बीड रेल्वे पण सुरु करता येते का? का तर तुमचा मुंबईशी पण,पुण्याशी पण संपर्क कसा राहील.
दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातल्या ५३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसंच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन, जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या एक हजार ३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या ७०३ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडयास काल जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, असं आश्वासन सावे यांनी दिलं.
लातूर इथंही काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत ४९० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणार असल्याचं, पालकमंत्री यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल ��हाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं, मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण मराठा समाज मुंबईत धडकेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदींनी काल जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं. जरांगे यांनी, सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई-हैद्राबाद-सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं, आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत, राज्य सरकारला पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एसचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बुलडाणा तसंच जालना इथल्या रुग्णांचा समावेश आहे. या पाच रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर तीन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या आजाराबाबत नागरिकांनी घेण्याच्या खबरदारीबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी माहिती दिली… “जे काही पेशन्ट आपल्याकडे डिटेक्ट झालेले आहेत, त्यापैकी दोन पेशन्ट डिस्चार्ज झालेले आहेत. काही जास्त चिंता करण्याचा विषय नाहीये. यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे, वेळोवेळी हात धुणे, दूषित पाणी पिण्यात येऊ नये, शिळं अन्न खाण्यात येऊ नये, आणि फिवर वगैरे, चार पाच दिवसांपेक्षा जास्त लूज मोशन्स वगैरे असेल, आणि विकनेस जाणवत असला, तरी तत्काळ डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये.’’
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ पुरस्कार, कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना काल प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत २३ पदकांसह महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये चार सुवर्ण, ११ रौप्य आणि आठ कास्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धे�� ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राने सहा पदकांची कमाई केली. महिलांच्या ४०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मेडले प्रकारात राज्याच्या सानवी देशवाल हिने सुवर्णपदक पटकावलं.
बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या दोन फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.
प्रशासनाने पारदर्शिता आणि दायित्व समजून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याच्या पालक सचिव राधिका रस्तोगी यांनी केलं आहे. शंभर दिवसांचा कृती आराखडा, जिल्हा सुशासन निर्देशांक, यासह विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कार्यालयीन स्वच्छता आणि सोयी सुविधा, क्षेत्रीय भेटी, ई - सुविधांमध्ये वाढ, याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देश दिले.
0 notes
Text
600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वतः येऊन तत्वज्ञान दिलं | Sant Rampal ...
youtube
0 notes