#याला’!
Explore tagged Tumblr posts
Text
41. आंतरिक प्रवासासाठी सुसंगत बुद्धिमत्ता
योग म्हणजे आपल्या आतील आणि बाह्य भागांचे मिलन. कर्म योग’, ‘भक्ती योग’, ‘सांख्य योग’, ‘बुद्धी योग’ अशा अनेक मार्गांनी हे साध्य करता येते. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाच्या आधारे त्याला योग्य मार्गांनी योग साधू शकते.
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे, म्हणून तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होते” (2.49). त्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतो की, “या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात” (2.41).
एकदा बुद्धीला सुसंगतता प्राप्त झाली की (जसे भिंग प्रकाशाला केंद्रीकृत करतो) की मग ती कोणत्याही बौद्धिक प्रवासासाठी तयार होते. अंतरात्म्याकडे होणार्या प्रवासासहित कोणत्याही प्रवासात दिशा आणि हालचाल अंतर्भूत असते. प्रवासाचि दिशा अंतरात्म्याकडे असणे याला श्रीकृष्ण बुद्धीयोगाशी जोडतो. सामान्यत: आपण सुंसगत बुद्धिमत्तेचा वापर बाह्य जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो, मात्र आपण ती आपल्या आतल्या प्रवासासाठी वापरली पाहिजे.
आपण आपल्या खोलवर रुजलेल्या श्रद्धा, भा��ना, गृहितकं, विचार, कृती आणि आपण बोलतो ते शब्द अशा सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उमटवायला लागतो तेव्हा आपण आतल्या प्रवासासाठीच्या सुसंगत बुद्धिमत्तेचा वापर करायला लागतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विज्ञान जसे प्रश्न विचारते, तशाच प्रकारे प्रश्न विचारून आपण अंतिम सत्य उलगडून घेऊ शकतो.
ज्यांचा हेतू हा कर्मफल प्राप्त करण्याचा असतो ते दुर्दैवीअसतात असे श्रीकृष्ण म्हणतो. कर्मफलामुळे सुखप्राप्ती होते म्हणून आपल्यात अशी वृत्ती निर्माण होते. मात्र, द्वंद्वांनी भरलेल्या जगात काळाच्या ओघात प्रत्येक सुख हे दु:खात रुपांतरित होते आणि त्यातून आपले दु:ख आणखी वाढते.
श्रीकृष्ण कुठेही आपल्याला द्वंद्वांपासून वाचविण्याचे आश्वासन देत नाही मात्र आत्मवान होण्यासाठी त्या द्वंद्वांना पार करून जाण्यास आणि त्यासाठी बुद्धी वापरण्यास तो सांगतो. हे ना समजून घेणे आहे ना करणे आहे, हे फक्त ‘असणे’ आहे.
2 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/1538fb9af6662bc76902f5665746b445/92197eebbbfc70f1-e0/s540x810/85cf61203fcd9feb7b971a61fdbca63e3dc0b073.jpg)
शिव जी यांनी कागभुशडं याला एक लाख वर्ष नरकात ठेवण्याचा शाप का दिला पहा आज दुपारी एक वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर उद्या सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes
·
View notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष आपापल्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी एकामागून प्रचारसभा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्र��ान नरेंद्र मोदी आज दुपारी आरके पुरम येथे एका जाहीर ��भेला संबोधित करतील. पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राजेंद्र नगर, चांदणी चौक आणि लक्ष्मी नगर येथील सभांना उपस्थित राहतील. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत एक प्रचारफेरी काढणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह हे दिल्लीतील अनेक भागात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुस्तफाबाद परिसरात एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही राष्ट्रीय राजधानीत सभा घेणार आहेत. दरम्यान, ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून ८ तारखेला मतमोजणी होणार आहे. ****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधील द्वारका इथं यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक खाजगी बस आज डांग जिल्ह्यातल्या सापुतारा घाटातील खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन महिला आणि तीन पुरुषांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डी, त्र्यंबकेश्वर इथं दर्शन घेऊन काल रात्री नाशिक हुन बसने यात्रेकरू निघाले होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस कठडा तोडून खोल दरीत कोसळली. या अपघातातील जखमींवर अहवा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस मधले यात्रेकरू मध्यप्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोकनगर जिल्ह्यातले आहेत, असं याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे. **** कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अधिक पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताची होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं ई-नाम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई-लिलाव पद्धतीनं शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३० हजार शेतकऱ्यांनी ई-नाम प्रणालीवर नोंदणी केली आहे. २०२४ या वर्षाअखेर जवळजवळ ३५ लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे तेराशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव आणि बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीवर नोंदणी करुन जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्याकडे शेतमाल विक्री करावा, असं आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक ना��ासाहेब चव्हाण यांनी केलं आहे. **** मुंबई इथं काल पार पडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ -बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दोन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सचिन यांना सन्मानित केलं. भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला २०२४ मधल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्कार देण्यात आला. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला. बीसीसीआयनं यावेळी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीचं निवृत्ती घेतलेल्या आर. अश्विनचाही सत्कार केला. ****
महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु आहे. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं होत असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकुन दक्षिण अफ्रिका संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण अफ्रिकन संघानं १३ षटकात ५ खेळाडूंच्या बदल्यात ४५ धावा केल्या आहेत. **** भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी मुंबईत खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना पाच फेब्रुवारी, दुसरा नऊ फेब्रुवारी आणि तिसरा बारा फेब्रुवारी रोजी होणार आहे. ****
नेदरलँडमध्ये काल झालेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने सर्बियाच्या अलेक्सी श्र्नाचा पराभव केला तर विश्वविजेत्या डि. गुकेशला नेदरलँडच्या जॉर्डी व्हॅन फॉरेस्टने बरोबरीत रोखले. १२ व्या आणि शेवटच्या फेरीनंतर प्रज्ञानंदाने सलग तिसरा विजय मिळवत ८ पुर्णांक ५ गुण मिळवले. ११ व्या फेरीत गुकेश प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह यांच्यापेक्षा अर्ध्या गुणांनी आघाडीवर होता, पण आता त्याचा सामना अनिर्णित राहील्यानंतर तो प्रज्ञानंदाच्या बरोबरीत आला आहे. दुसरीकडे, अब्दुसत्तारोव्हला भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसीकडून पराभव पत्करावा लागला. ****
0 notes
Text
वाल्मीक कराड याला केलं जिल्हा रुग्णालयात दाखल कारण..
वाल्मीक कराड याला केलं जिल्हा रुग्णालयात दाखल कारण..
बीड जिल्ह्या��ील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग सोबतच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने सध्या सुरु आहेत. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका…
0 notes
Text
अधिक पारदर्शकतेने ग्राहकांना सेवा द्याव्यात – अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे - महासंवाद
मुंबई दि. 26 : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हा विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला विभाग आहे. सेवा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या त्रिसुत्रीचा अवलंब करुन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचेही श्री. मुंडें…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a09fd389dcdd97d7d5903354de3a0510/6844e4736ace1818-d0/s540x810/845f4b38d4d7d0dc394b6b817dfb8647a1bdb9bf.jpg)
View On WordPress
0 notes
Text
श्री दत्तात्रेय आवाहन दुर्मिळ साधना
श्री दत्तात्रेय आवाहन दुर्मिळ साधना
तत्वज्ञान असे सूचित करते की, आकर्षणाचा एक नियम आहे. सकारात्मक विचार सकारात्मक परिणामांकडे नेतात, तर नकारात्मक विचार नकारात्मक परिणामांकडे ���ेत असतात. याला ब्रह्माण्ड प्रकटी नियम असेही म्हणतात. अध्यात्म म्हणजे स्वतःहून मोठ्या गोष्टीशी किंवा दैवी किंवा वैश्विक शक्तीशी जोडण्याची भावना. भौतिक चिंतेऐवजी परमात्म्याचे चिंतन म्हणून देखील त्याचे वर्णन केले जाऊ शकते. भगवान श्रीदत्तात्रेयांची जयंती जवळ आली…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a03cc28c2859a3e8402f2e3a8c4f9683/6ad2ed3b70b12b34-03/s540x810/3ffedca5175e60e44cabf16b12252769465d3de4.jpg)
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/de079771d0bab344e11b5194dea503b2/c8f6da95f10d2387-25/s540x810/52ea3da986323487dc3e695355a42b71a4edeb72.jpg)
. 🍁 *ज्ञान गंगा* 🍁 .
➖ *विवाहातील प्रचलित वर्तमान परंपरांचा त्याग :-* ➖
विवाहात व्यर्थ खर्च बंद करावा लागेल. उदाहरणार्थ मुलीच्या विवाहात मोठी वरात घेऊन येणे, हुंडा देणे, ह्या व्यर्थ परंपरा आहेत. ज्यामुळे मुलगी ही कुटुंबावरील भार समजली जाते आणि तिला गर्भातच खुडण्याचे उद्योग सुरु आहेत. माता-पित्यांसाठी तर हे महापाप आहे. मुलगी देवीचे स्वरूप आहे. आमच्या विकृत परम्परानी मुलीला शत्रू बनविले आहे. श्री देवीपुराणाच्या तीसर्याे स्कंदात याचे प्रमाण आहे कीह्या ब्रह्माण्डाच्या प्रारम्भी तिन्ही देवतांचा (म्हणजेच श्री ब्रह्मदेवजी, श्री विष्णुजी आणि श्री शिवजी) यांचा त्यांची श्री दुर्गादेवीजींनी विवाह केला त्यावेळी कोणी वरात काढली नव्हती किंवा भोजनावळ सुद्धा घातल्या नव्हत्या. ना नाचगाणी होती किंवा बँडबाजा होता. श्री दुर्गादेवीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास श्री ब्रह्मदेवाला म्हटले की हे ब्रह्मा! ही सावित्री नामक मुलगी तुला पत्नीच्या रूपात देत आहोत. हिला घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाट. त्याचप्रमाणे आपल्या मधल्या पुत्राला म्हणजेच श्री विष्णु यांना लक्ष्मीजी आणि कनिष्ठ पुत्र श्री शंकरजींना पार्वतीजी देऊन सांगितले, ह्या तुमच्या पत्नी आहेत. ह्यांना घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाटा. तिघेही आपल्या पत्नी बरोबर घेऊन आपल्या लोकात गेले आणि मग जगाचा विस्तार झाला.
*शंका समाधान* :- काही व्यक्ति असे म्हणतात की पार्वतीजीचा मृत्यु झाला. त्या देवीचा पुनर्जन्म राजा दक्षाच्या घरात झाला होता. यौवनात पदार्पण केल्यावर देवी सतीजींनी (पार्वती) नारदाने सांगितल्यानंतर श्री शंकरांना पति म्हणून स्वीकारण्याचा दृढ़ संकल्प करून आपल्या मातेकरवी आपली इच्छा पिता दक्ष याला सांगितली. तेव्हा राजा दक्ष यांनी म्हटले की हे शंकरजी माझे जावई ��नण्यायोग्य नाहीत कारण ते नागडे राहतात. एकाच मृगजीन बांधून राहतात आणि शरीरावर राख फासून भांगेच्या नशेत असतात. सर्पांना सोबत ठेवतात. अशा व्यक्तिशी माझ्या मुलीचा विवाह करून जगात मी आपले हसू नाही करून घेणार. परंतु देवी पार्वती सुद्धा जिद्दीला पक्कया होत्या. त्यांनी स्वतःची इच्छा श्रीशंकरजींना कळवली आणि त्यांना सांगितले मी आपल्याशी विवाह करू इच्छीत आहे. राजा दक्षाने पार्वतीजीचा विवाह अन्य कोणासोबत ठरविला होता. त्याच दिवशी श्री शंकरजी आपल्या हजारोंच्या सँख्येतील भूत-प्रेत, भैरव आणि आपल्या गणां सह विवाह मंडपात पोहोचले. राजा दक्षाच्या सैनिकांनी विरोध केला. शंकारांची सेना आणि दक्षाच्या सेनेत युद्ध झाले. पार्वतीजींनी शंकरजींना वरमाला घातली. श्री शंकरजी पार्वतीजींना बलपूर्वक कैलाश पर्वतावर आपल्या घरी घेऊन गेले. काही व्यक्ति असे म्हणतात की बघा! श्री शंकरजी सुद्धा भव्य अशी वरात घेऊन पार्वतीशी विवाह करण्यास आले होते. त्यामुळे वरातीची परंपरा पुरातन आहे. त्यामुळे वरातीशिवाय विवाहात शोभा येत नाही. त्याचे उत्तर असे आहे की हा विवाह नव्हता तर प्रेम प्रसंग होता. पार्वतीजींना बलपूर्वक इचलून घेऊन जाण्यासाठी श्री शंकरजी वरात नाही तर सेना घेऊन आले होते. विवाहाची पुरातन परम्परा श्री देवी महापुराणाच्या तीसर्यार स्कंदात आहे व ती वर सांगितली आहे. मुले आणि मुलींनी आपल्या माता-पित्याच्या इच्छेनुसार विवाह केला पाहिजे. प्रेम विवाह हे महाक्लेशाचे कारण होऊ शकते. पुढे भगवान शंकरजी आणि पार्वतीजी यांच्यामध्ये काही गोष्टींवरून तंटा झाला. शंकरजींनी पार्वतीजीशी पत्नीचे नाते समाप्त केले व बोलाचाली सुद्धा बंद केली. पार्वतीजींनी विचार केला आता हे घर माझ्यासाठी एक नरकच बनले आहे.त्यामुळे काही दिवस मी आईकडे जाऊन राहते. पार्वतीजी आपल्या पिता दक्षाच्या घरी माहेरी गेल्या. त्या दिवशी राजा दक्ष यांनी एका हवन यज्ञाचे आयोजन केले होते. राजा दक्षाने आपल्या मुलीला सन्मानाने न वागवता म्हटले की आज काय घ्यायला आली आहेस? बघितलेस त्याचे प्रेम, निघून जा माझ्या घरातून. पार्वतीजींनी आपल्या आईस श्री शंकरजी नाराज झाल्याची गोष्ट सांगितली. मातेने आपल्या पतिला सगळे सांगितले होते. पार्वतीजींना ना माहेरी काही स्थान होते ना सासरी. प्रेमविवाहाने अशी गंभीर परिस्थिति उत्पन्न निर्माण केली की दक्ष पुत्रीला आत्महत्या करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरला नाही आणि राजा दक्षाच्या विशाल हवनकुण्डात जाळून मृत्यू पावल्या. धार्मिक अनुष्ठानाचा नाश केला. आपले अमोल मानवी जीवन गमावून बसल्या. पित्याचाही नाश करवला कारण जेव्हा श्री शंकरजींना हे सर्व माहित�� झाल्यावर ते आपली सेना घेऊन तिथे गेले आणि आपले सासरे दक्षजीचे मुंडके छाटून टाकली. नंतर बकर्याऊचे मुंडके लावून जीवित केले. त्या प्रेम विवाहाने कसे घमासान केले. श्री शंकरांच्या सैन्याला वरात असल्याची बतावणी सांगून ह्या कुप्रथेला जन्म दिला आहे. आणि हा प्रसंग प्रेमविवाह रूपी कुप्रथेचा जनक आहे आणि हे समाजाच्या विनाशाचे कारण बनले आहे.
जे विवाह सुप्रथेनुसार झाले, ते आजपर्यंत सुखी जीवन जगत आहेत. जसे श्री ब्रह्मदेवजी आणि श्री विष्णुजी.
*विवाह करण्याचा उद्देश* :- संततीची उत्पाती हाच विवाहाचा उद्देश आहे. मग पति-पत्नी मिळून परिश्रम करून मुलांचे पालन करतात. त्यांचा विवाह करून देतात. मग ते आपले घर थाटतात. त्याशिवाय प्रेमविवाह हे समाजात अशांतिचे बीज पेरत आहेत. समाज बिघडवणारे हे अस्तनीतले निखारे आहेत.
0 notes
Text
दसऱ्याचे महत्त्व
दसरा हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे. याला विजयादशमी असेही म्हणतात, कारण हा दिवस विजयाचा आणि सत्याच्या अधर्मावर विजयाचा प्रतीक मानला जातो. दसऱ्याचा सण विविध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळवतो, विशेषत: महाराष्ट्रात. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात, ज्याचा अर्थ “विजयाचा दहावा दिवस” आहे. दसऱ्याचे महत्त्व: अधर्मावर धर्माचा विजय: दसऱ्याच्या दिवशी…
View On WordPress
0 notes
Text
52. गुंडाळणे शहाणपण आहे
श्रीकृष्ण म्हणतात, “ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपले अंग काढून घेतो, त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा आपल्या इंद्रियांच्या वस्तूंपासून सर्व बाजूंनी आपली इंद्रिये काढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते” (2.58).
श्रीकृष्ण इंद्रियांवर भर देतात कारण ते आपले अंतरंग आणि बाह्य जग यांच्यातील प्रवेशद्वार आहेत. श्रीकृष्ण सांगतो की जेव्हा आपण स्वतःलाच्या इंद्रियांना उपभोगवस्तूंची आसक्ती व्हायला लागते तेव्हा आपण आपल्या संवेदनावर ताबा मिळविला पाहिजे जसे की कासव धोक्यार्चा जाणीव झाल्यावर आपले अवयव आत ओढून घेते.
इंद्रियांचे दोन भाग असतात. एक म्हणजे नेत्रगोलक आणि दुसरे नियंत्रक, मेंदूचा भाग जो या नेत्रगोलकावर नियंत्रण ठेवतो.
संवेदी परस्परसंवाद दोन स्तरांवर होतो. एक इंद्रिय म्हणजे वस्तूंचे सतत बदलणारे बाह्य जग आणि संवेदना साधन (नेत्रगोलक) जे पूर्णपणे स्वयंचलित आहे. जेव्हा फोटॉन नेत्रगोलकापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्या भौतिक गुणधर्मांनुसार प्रभाव पडतो. दुसरे संभाषण नेत्रगोलक आणि त्याचे नियंत्रक यांच्यात घडते.
पाहण्याची इच्छा हे डोळ्याच्या विकासाचे कारण आहे आणि ती इच्छा इंद्रियांच्या नियंत्रित भागामध्ये अजूनही आहे. याला प्रेरित धारणा म्हणून ओळखले जाते जिथे आपल्याला जे पहायचे आहे ते आपण पाहतो आणि जे ऐकायचे आहे ते आपण ऐकतो. क्रिकेटच्या खेळाप्रमाणेच आपल्याला असे वाटते की विरोधी पक्षाच्या बाजूने अधिक निर्णय घेतले जात आहेत आणि त्यामुळे पंच अन्यायकारक आहे असा निष्कर्ष काढतो.
जेव्हा श्रीकृष्ण इंद्रियांचा उल्लेख करतात, तेव्हा ते इंद्रियांच्या नियंत्रित भागाबद्दल बोलतात ज्यामुळे इच्छा उत्पन्न होते. म्हणून जेव्हा आपण शारीरिकरित्या आपल्या इंद्रियांना बंद करतो तेव्हाही, मन आपल्या इच्छा जिवंत ठेवण्यासाठी आपली कल्पनाशक्ती वापरते कारण मन हे या सर्व नियंत्रकांचे सं��ोजन आहे.
या वैज्ञानिक श्लोकाद्वारे श्रीकृष्ण आपल्याला इंद्रियांच्या भौतिक भागापासून नियंत्रक वेगळे करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत जेणेकरून आपण नेहमी उत्तेजक किंवा निराशाजनक बाह्य परिस्थितीपासून परम स्वातंत्र्य (मोक्ष) प्राप्त करू शकू. कोणत्याही परिस्थितीत केव्हा आत्मसमर्पण करायचे हे जाणून घेण्यातच शहाणपण आहे.
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/b832f9e1c52e5a9da28c8deea5555c88/5add5ce367b8531b-a0/s540x810/e6da5b35e5b38290cd00e898750990571b8347f5.jpg)
काल याला एक लाख जीव खाण्याचा आणि सवा लाख उतपन्न करन्याचा शाप का लागला पाहा आज दुपारी एक वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर उद्या सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes
·
View notes
Text
कबीर परमात्मा म्हणतात की, वेगवेगळे धर्म बनवून काल याने जीवांना आपापसात भांडण करायला लावलं आहे, वेगवेगळे रितीरिवाज बनवून ठेवले आहेत. हिंदू मृताला जाळतो, मुसलमान याला वाईट मानतात, ते जमिनीत गाडतात. मला हे चांगलं वाटत नाही, यांनी तत्त्वज्ञान समजून घ्यावं, अशी माझी इच्छा आहे, एक व्हावेत, सत्य साधना करावी, सत लोकात जावे, सदा सुखी रहावेत.
संत रामपाल जी महाराज
ज्ञान गंगा किंवा जगण्याचा मार्ग | पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि
आध्यात्मिक सत्संग अवश्य पहा 5:55 am ते 6:55 am
LOKशाही
फोन नंबर SMS करू शकता: 7030303951, 52 किंवा Whatsapp करा: 7030303950
संत रामपाल जी महाराज यांच्या कडून नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी संपर्क कराः 7030303951/52
For more info download App: Sant Rampal Ji Maharaj
Sant Rampal Ji Marathi Satsang
X @MarathiSatsang
www.Jagatgururampalji.org
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/40ec49667270aeff937877747567f348/86b46a140ec55887-19/s540x810/a5dd58565cfee7e9309d4c58c741b0ae1aa31ece.jpg)
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
निवडणुकीतल्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार जाहीर
मकोकाअंतर्गत अटकेतील आरोपी वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आणि
बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा दहावा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या मोहिमेअंतर्गत देशात आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या १ लाख ७२ हजार झाली आहे, तर सरकारच्या डायलिसीस मोहिमेचा साडेचार लाख रुग्णांना लाभ झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी दिली. ते म्हणाले –
नॅशनल हेल्थ मिशन के द्वारा जिस प्रकार के ऐतिहासिक टार्गेटस् को मिट करने का काम गत दस वर्ष���ं मे माननीय प्रधानमंत्रीजी के नेतृत्व मे हुआ है, लगबग बारा लाख हेल्थ केअर्स के वर्कर्स 2021 से 22 के बीच मे नॅशनल हेल्थ मिशन के साथ जुडे। दो सौ बीस करोड से अधिक कोविड-19 के वॅक्सिन डोसेज् देशभर मे दिये गये। 2023-24 तक 1,72,000 आयुष्यमान आरोग्य मंदिर सेंटर्स खुल चुके है।
२०२५-२६ च्या पणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल तीनशे पंधरा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे कच्च्या तागाला यावर्षी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल, असा किमान हमी भाव मिळेल. या निर्णयाचा ईशान्य भारतातल्या सुमारे चाळीस लाख शेतकरी कुटुंबांना फायदा होईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं.
****
निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिका देवाण-घेवाण कार्यवाहीसाठी उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार जाहीर झाला असून सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान ���ेले जाणार आहेत.
****
केईएम रुग्णालय हे मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांचा आधारवड असून, रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचा नव्याण्णवावा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या कार्याचा शिंदे यांनी आपल्या भाषणातून गौरव केला.
****
मैत्री कायद्याला अधिक बळकट करण्यासाठी राज्यसरकार एक विशेष पोर्टल तयार करत असल्याच���, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते आज दावोस इथून पत्रकारांशी बोलत होते. या पोर्टलबाबत अधिक माहिती देतांना सामंत म्हणाले –
हे पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीत कमी वेळेमध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे. देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे, की ॲप्लीकेशन कसं करायचं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर ते ॲप्लिकेशन नक्की कुठे आहे हे दाखवणारं पोर्टल पुढच्या आठ दिवसांमध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय. त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे.
अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठेला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागपूर इथे आजच्या या दिनाच्या निमित्तानं जयस्तुते फाउंडेशनतर्फे महाल परिसरात अकरा हजार दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून धनुष्यबाण, शंख, गदा, कलश आणि स्वस्तिक अशी मंगलचिन्हं साकारण्यात आली होती.
****
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं, आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणाऱ्या या लोकप्रिय नेतृत्वाला नमन, अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
नागपूरहून ते गोव्यापर्यंत जाणाऱ्या आणि कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठं जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला आता गती आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं यासाठीच्या पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया सुरू केली असून आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरात राज्य परिवहन महामंडळ-एसटीच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक ��सस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचं मूल्यमापन होणार असून, शहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकास एक कोटी, निमशहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकास ५० लाख तर ग्रामीण गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला २५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार आहे.
****
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका खाली अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला आज बीड जिल्हा सत्र न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आज कराड याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी विशेष सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. दरम्यान, केज इथल्या खंडणी प्रकरणाची सुनावणी उद्या गुरुवारी होणार आहे.
****
जालना इथल्या प्रसिद्ध योग शिक्षक संगीता आलोक लाहोटी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा नोकर भीमराव धाडे याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी लाहोटी यांची राहत्या घरी हत्या झाली होती. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी या खटल्याचं काम पाहिलं.
****
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा दहावा वर्धापनदिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीनं असायला हवा, तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या दशकपूर्तीनिमित्त जिल्हाभरात मानसिक स्वास्थ्य आणि कौशल्य विकास अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी रेखा काळम यांनी यावेळी दिली.
नाशिक तसंच धुळ्यातही आज बेटी बचाव बेटी पढाओ’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात मुलींचं संरक्षण, शिक्षणाला प्रोत्साहन, लिंगभेद निर्मूलन यासाठी जनजागृतीपर उपाय करण्यात येणार आहेत.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. कोलकाता इथल्या ईडन गार्डन मैदानावर संध्या��ाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. तसंच भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून बाहेर येऊन या सामन्याद्वारे पुनरागमन करत आहे.
****
राज्यस्तरीय ग्राफलिंग शालेय कुस्ती स्पर्धेत धाराशिवची महिला मल्ल पौर्णिमा खरमाटे हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. १७ आणि १८ जानेवारी रोजी नाशिक इथं या स्पर्धा पार पडल्या. या विजयामुळे पौर्णिमाची १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे
****
0 notes
Text
वाल्मीक कराड याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावताच समर्थकांनी चक्क न्यायालयाच्या आवारात ..
वाल्मीक कराड याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावताच समर्थकांनी चक्क न्यायालयाच्या आवारात ..
��ीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.…
0 notes
Text
Maharashtra : आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या - राज ठाकरे
एमपीसी न्यूज : ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला (Maharashtra) आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त ��ेंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे…
0 notes