#बसणार
Explore tagged Tumblr posts
Text
31 मार्च 2025 पासून गाडी चालकांना बसणार 20,000 हजार रुपयांचा दंड HSRP Number Plate
HSRP Number Plate महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नवीन नियमानुसार, 31 मार्च 2025 पर्यंत सर्व जुन्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. या निर्णयामागे वाहनांची सुरक्षितता आणि चोरी रोखण्याचा मुख्य उद्देश हा आहे. नवीन नियमांची व्याप्ती राज्य सरकारने…
0 notes
Text
भाजपच्या महिला मोर्चाच्या चिमण्या , जयकुमार गोरे यांच्या ‘ त्या ‘ फोटोंवर संजय राऊत म्हणाले की..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले असून शिवकाळातील सरसेनापती असलेल्या एका कुटुंबातील स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ केला या संदर्भातील माहिती समोर आली आहे. ‘ सदर महिला पुढल्या काही दिवसांमध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असून स्त्रीचा विनयभंग करणारा ��ंत्री मंत्रीमंडळात असून यामुळे…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा अमेरिकेचा दौरा ��टोपून स्वदेशी निघाले. या दौऱ्यात पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांची भेट घेतली. संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमी कंडक्टर आणि अवकाश तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची मोठी क्षमता आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी भारतीय - अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते विवेक रामास्वामी तसंच टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचीही भेट घेतली.
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्ष पूर्ण झाले. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ४० सैनिकांना वीरमरण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातल्या हुतातम्यांना आदरांजली अर्पण केली आहे. या सैनिकांचं बलिदान येणाऱ्या अनेक पिढ्या कायम स्मरणात ठेवतील, असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण हे प्रसार भारतीच्या अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचं प्रतिक असल्याचं, प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी म्हटलं आहे. ते काल प्रयागराज इथं बोलत होते. त्यांनी संगम सेक्टर चार इथं बांधलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांची पाहणी केली.
सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसणार नाही, यासाठी विविध उपाय योजणं सरकार सुरू ठेवेल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या काल बोलत होत्या. आयकरातल्या सवलतींचा फायदा केवळ श्रीमंतांना होईल, हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारतीय डाळी परिषदेत ते काल बोलत होते. महाराष्ट्र सरकार डाळींच्या उत्पादनात पुढाकार घेत अस���न, शाश्वत शेती, संशोधन, सरकारी योजना आणि उद्योग सहभागाद्वारे महाराष्ट्रसह भारत डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं रावल यांनी नमूद केलं.
जगभरातलं तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि संधी भारतात उपलब्ध व्हावी, म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईत १० एकर जागेत, मनोरंजन क्षेत्रातलं जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल आशिष शेलार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावं यासाठी शासन अनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्था उभारणार असून, त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या जागतिक पातळीवरच्या तज्ज्ञांकडून उच्च शिक्षण दिलं जाणार असल्याचं, शेलार यांनी सांगितलं.
विदर्भ विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं काल अकोल्यात शिवनी इथं अपघाती निधन झालं. एका पिकअप गाडीनं बिडकर यांच्या गाडीला धडक दिल्यानं ते अपघातात गंभीर जखमी झाले होते, रुग्णालयात नेत असताना त्यांचं निधन झालं. अकोल्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित डेबू चित्रपटाची निर्मितीही बिडकर यांनी केली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
भारतमाला परियोजनेतल्या सुरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातून सुरुवात झाली. तालुक्यातल्या जवळपास ११ गावातून हा ३३ किलोमीटरचा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी जवळपास तीनशे जमीनीचं संपादन करण्यात येणार असून, ८१ टक्के क्षेत्र संपादित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत जालना शहरात काल रन फॉर लेप्रसी म���रेथान स्पर्धा घेण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली. जिल्हा सामान्य रुग्णालय ते कुष्ठरोग निर्मुलन कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मॅरेथानमध्ये क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता.
लातूर महानगरपालिकेने थकित करवसुलीसाठी धडक मोहिम करत काल दिवसभरात एक शिक्षण संस्था कार्यालय, दोन गोदामं, एक दुकान सील केलं, तर तब्बल १९ नळ जोडणी खंडित केल्या.
0 notes
Text

'पुष्पा 2' च्या फॅन्सना बसणार धक्का, 15 ऑगस्ट नाही तर 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट? कारण आलं समोर... http://dlvr.it/T8D15L
0 notes
Text
माजी राष्ट्राध्यक्ष यांना बसणार 2100 कोटींचा दंड? काय आहे प्रकरण?
0 notes
Text
Bhusawal Breaking News : एसटी महामंडळाची ऐन दिवाळीच्या वेळी १० टक्के भाडेवाढ जाहीर !
एसटी महामंडळाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्याना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. एसटीकडून ही भाडेवाढ ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या…

View On WordPress
0 notes
Text
सरकारला वाकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : जरांगे-पाटील
https://bharatlive.news/?p=184029 सरकारला वाकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : जरांगे-पाटील
अंतरवाली ...
0 notes
Text
आता 40 लाखांच्या आत घर खरेदी करणे आणखी कठीण होणार ; कारण ऐकून बसणार धक्का..!
लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे दीर्घकाळापासून आपले स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहत असतात.मात्र

#breaking news#mhada lottery2023#news#latest news#property#property for sale#property investing#property in gurgaon
0 notes
Text
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण केलं होतं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. मात्र, जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात जरांगेंचं आंदोलन सुरूच आहे. तर सरकारला वेळ दिला असून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत मी घराचा उंबराही चढणार नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. हा वेळ स्वत: सरकारनं मागितला असून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देतो असं त्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे सरकारनं मागितलेला वेळ आम्ही त्यांना दिला आहे, असं मनोज जरांगेंनी माध्यमांशी ��ंवाद साधताना म्हटलं आहे. सरकारचं मत होतं की मराठ्यांना समितीचा अहवाल सादर करून टिकणारं आरक्षण देतो, त्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. तर आम्हीही त्यांना तसा वेळ दिला आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे सरकारनं ठरवायचं आहे. आम्हाला 40 व्या दिवशी आरक्षण पाहिजे असून त्यावर आम्ही ठाम आहोत, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
0 notes
Text
*Mpsc विषयी बोलू काही...*
वास्तविकता आहे ही..
या वर्षभरात बऱ्याच जणांनी MPSC चा अभ्यास सोडून दिला... अनेक मुलांनी कुठेतरी काम करणे वा शेती सांभाळणे सुरु केले, मुलींची लग्न झाली, काही मुलींचा अभ्यास तर सुरु आहे पण ��ता घरचे अभ्यासासाठी पुण्याला वगैरे पाठवायला तयार नाहीयेत... अनेक विद्यार्थी जे मागच्या 5-6 वर्षांपासून अभ्यास करत आहेत, ते द्विधा मनःस्थितीत अडकले आहेत...अभ्यास पुढे सुरु ठेवणं जिकीरीचं बनलं आहे...चार पैसे कमव, आता वय झालय, आम्हाला लग्नाचं पण बघायचय...असा किती दिवस MPSC चा जुगार खेळत बसणार आहे? अशा पद्धतीचे प्रश्न जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना घरुन विचारले जात आहेत आणि त्याला उत्तर देता देता पोरं कंटाळली आहेत...
नातेवाईक आणि समाजातील इतरही अनेक जणांना नेहमी तोंड द्यावं लागतं...खरं म्हणजे आजकाल गावाकडे MPSC म्हणजे हसण्याचा आणि चेष्टेचा विषय झालाय...MPSC करतोय म्हटलं की आधी मागच्या 4 5 वर्षात मान सन्मान मिळायचा पण आता लोक चक्क हसतात .परिस्थिती किती वेगाने फासे ओलांडते आणि आपण कुठपासुन कुठपर्यंत ढकललो जातो, याचा अंदाज लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच पानीपत झालेल आसत. बर किमान लढायची संधी तरी मिळायला हवी ना, ती सुद्धा मिळत नाहीये. पुस्तक समोर घेऊन बसलेल्या मुला मुलींच्या नजरा मात्र शुन्यात हरवलेल्या दिसतायेत . लढण्यासाठी समोर शत्रू असावा लागतो पण तोच नेमका दिसत नाहीये, मग नक्की लढायच कुनासोबत. व्यथा मोठ्या आहेत, एखाद्या चित्रपटात शोभतील इतक्या दर्दभर्या कथा घडतायेत mpsc करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात.
HR मधील 'महिला विकास वाचताना तो किती पुस्तकी व थोतांड आहे, हे त्या मुलीला विचारा जिला या वर्षी सगळं सोडून लग्न करुन सासरी जावं लागलं आणि तिला MPSC कायमची विसरावी लागते .HR मधील 'युवक विकास' वाचता वाचता चार पैशासाठी कशी सगळी स्वप्न सोडून, चांगली शैक्षणिक पात्रता असतानाही कुठतरी
10 - 12 हजारांवर काम कराव लागणाऱ्या पोरांना हा बदल इतक्या झटक्यात घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.सिस्टिम वाईट असते हे मान्य पण किती ? आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असणाऱ्या परीक्षांबाबत कुणीच बोलायला तयार नाही , हि खरं तर राज्यातील सर्व युवा नेत्यांच्या शरमेची गोष्ट आहे. कोरोना आहे मान्य पण म्हणून किमान तारखा तरी द्यायला हव्या होत्या. 2020 च्या परीक्षा 2021 अर्धे संपले तरी होत नसतील तर आय��ग करतय काय? चला मान्य करु की सध्या परीक्षा घेणे शक्य नाही पण किमान तारखा तरी द्या. UPSC ने ज्या दिवशी परिक्षा पुढे ढकलली त्याच दिवशी पुढील तारखा
जाहिर केल्या , मग MPSC च घोड कुठ आडलय ? तुम्हाला सप्टेंबर मध्ये परिक्षा घ्यायच्यात घ्या काही हरकत नाही पण किमान तारखा तरी द्या . पुढच्या वर्षात काय होणार यांच्याबद्दल आयोग चकार शब्द काढायलाही तयार नाही. इतकी चालढकल आयोगासारख्या संस्थेकडून अपेक्षित नाही. हा फक्त परीक्षांचा प्रश्न नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे , आता अभ्यास सोडला तर परत फिरणे अवघड आहे आणि अभ्यास सुरु ठेवायचा तर परीक्षांच्या तारखाच नाही...! बहुतेक विद्यार्थी गावी आहेत आणि गावी राहून अभ्यास करणे किती जिकिरीचं असतं हे ज्याचं त्याला माहीत त्यातच सगळ्यांची आर्थिक स्थिती ठीक नसते . त्यामुळे कधी नव्हे इतके प्रश्न सगळ्यांच्या समोर उभे राहिलेत. हे सगळे प्रश्न घेऊन प्रत्येकाने जमेल त्या माध्यमातून विविध नेत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. दबाव तयार झाला तरच ही कोंडी फुटेल...त्यात विविध कोचिंग क्लासेस ने हि योग्य भूमिका घ्यायला हवी. अगोदर पोस्ट मिळवलेले किंवा सध्या कार्यरत असणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यात दबावगट म्हणून काम केले पाहिजे. हि वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे... हे सगळे झाले तरच पुढे काहीतरी मार्ग निघेल , नाहितर परिक्षांचा घोळ असाच महिनो महिने कायम राहील. आणि मग कधीतरी स्वतःला पुरेशी संधी न देताच mpsc सोडुन द्यावी लागेल .पोटेंशिअल वाया घालवन पोटेंशिअल नसण्यापेक्षा लय वाईट आहे...
कॉपी पेस्ट आहे ..कुनी लिहीलय माहिती नाही पण वास्तविक स्थिती आहे हि 🙏
-वैभव वैद्य....
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.11.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार-मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींसह प्रचार शीगेला-मतदारांच्या थेट गाठीभेटींवर उमेदवारांचा भर
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची निवड
आणि
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत जपानला हरवत भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक
सविस्तर बातम्या
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३६३ महिला उमेदवारांसह एकूण चार हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी मतदार संघातल्या अतिसंवेदशील असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि इतर साहित्यासह हेलिकॉप्टरद्धारे मतदान पथकं काल रवाना करण्यात आली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन रा��्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे.
****
प्रचाराची मुदत संपत असतांनाच, राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होत असल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल नागपूरजवळ उमरेड इथं प्रचारसभा घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं, पण, भारतीय जनता पक्षाने देशात फूट पाडण्याचं काम केलं, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काल गडचिरोली इथं प्रचारसभा घेतली. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर नागपूर इथं काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रोड शोमध्ये प्रियंका गांधी सहभागी झाल्या.
महाविकास आघाडीची ���मारोपाची जाहीर सभा काल मुंबईत झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना, महाविकास आघाडीचं सरकार आल्यास, सोयाबीनला सात हजार रुपये भाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दिली. शेतकरी कर्जमुक्ती यासह जाहीरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते.
****
केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषद घेतली, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांमुळे मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील, असं चौहान म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अकोला इथं, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं, तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं मतदारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथं, तसंच धुळे जिल्ह्यात साक्री मतदारसंघातल्या दहिवेल इथं सभा घेतली. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड-शो केला, त्यानंतर त्यांनी दुपारी ��ांदवड इथं प्रचारसभा घेतली.
****
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काल पुण्यात प्रचार सभा घेतली. स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न आहे, परंतू, योग्य संख्याबळ आलं नाही तर सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असं आश्वासन मायावती यांनी यावेळी दिलं.
****
जाहीर सभा आणि रोड शो सोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्यावर उमेदवारांचा कल दिसून येतो आहे.
जालना जिल्ह्यात भाजप महायुतीचे भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांनी काल वालसा वडाळा, डोनगाव, निवडुंगा, पोखरी बुटखेडा इथं प्रचार सभा घेतलीं. जालना विधानसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ काल जालना शहरातल्या विविध भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. जालना इथं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यासाठी मेळावा घेतला. तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी कॉँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांनी काल मतदार संघातल्या नालेवाडी, शहागड, वाळकेश्वर, अंतरावाली सराटीसह मतदार संघातल्या विविध गावात प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला.
****
येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे.
Byte…
****
सोयाबीनला देशात सर्वाधिक पाच हजार रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी हमीभाव महाराष्ट्रात सत्तेत असतानाच मिळाला असून, ओलाव्याची अट १२ वरुन १५ टक्के केली असल्याचं, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसचे नेते राणदीप सुरजेवाला यांनी सोयाबीनच्या हमीभावाबाबत दिलेली माहिती चुकीची असल्याचं पाशा पटेल म्हणाले.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून, काळानुसार विकसित होणारा सिनेमा पाहण्यासाठी या महोत्सवापेक्षा दुसरी चांगली संधी नाही असं म्हटलं आहे. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे.
****
महिलांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत काल भारताने जपानवर तीन - शून्य अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बिहारमध्ये राजगीर इथं हा सामना झाला. भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवून दिला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी भारताची लढत पुन्हा जपानशी होणार आहे.
****
दूरदर्शन समाचारचे माजी महासंचालक एस एम खान यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेस सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
****
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मतदान जनजागृती विभाग तसंच परभणी जिल्हा सायकल संघटनांच्या वतीनं काल शहरात सायकल फेरी काढण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सर्वांना मतदान करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. समारोपात सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या रॅलीत ८ वर्षापासून ते ६० वर्षांपर्यंत सायकलस्वार सहभागी झाले होते.
धाराशिव इथं राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसरातल्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने काल शहरात मतदान जागृतीपर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
****
विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर मतदानापर्यंतच्या ७२ तासांत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत, काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अखेरच्या ७२ तासांत वाहनांची तपासणी, छुप्या पद्धतीने केले जाणारे प्रचार, मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न, अशा घटनांची तात्काळ दखल घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात देखील सर्वत्र चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्येनं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने एका खासगी बसमधून जवळपास ९० लाख रुपये रक्कम जप्त केली. ही बस मुंबईहून नांदेडकडे जात होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या २३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे, प्रथम संबंधित मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर आता निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात ४०४ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी गृह मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात ९५ टक्के गृह मतदान झालं. तर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात १७६ जणांनी गृह मतदान केलं असून, हे प्रमाण ९६ टक्के इतकं आहे.
धाराशिव जिल्ह्यात परांडा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान सुरु असून, पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आजपर्यंत हे मतदान चालणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात एकूण ३ हजार ८८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येकी नऊ महिला संचलित मतदान केंद्र, दिव्यांग अधिकारी असलेले मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात किनवट मधील पांगरपाड, हदगाव मधील चोरंबा, भोकर मधील पाकी तांडा, देगलूर मधील रामतीर्थ आणि मुखेड मधील कोलेगाव हे पाच संवेदनशील केंद्र असून, या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले आहेत.
****
0 notes
Photo

आता वेळ आलीये.. ✊️ जागा दाखवायची आणि धडा शिकवायची.. 💪 आता महाराष्ट्र शांत बसणार नाही, पेटून उठणार आहे. 🔥 🚩👊जय महाराष्ट्र👊🚩 @उद्धवबाळासाहेब @adityathackeray @shivsena_aditya_thackeray @shivsena (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/ClWSofmv8km/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Text
सावंतवाडी मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांना बसणार चपराक
सावंतवाडी मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांना बसणार चपराक
मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना सावंतवाडी : मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना आखली असून येत्या काही दिवसात अंमलबजावणी होणार आहे.मळगाव घाटित काही दिवसातच सोलार सिसीकॅमेरे बसवण्यात येणार असून चालत्या गाडीवरून कचर्याच्या पिशव्या फेकणार्या वहानांचा नंबर कॅमेरॅत कैद…
View On WordPress
0 notes
Text
Pradip दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,"Pradip परीक्षेची तयारी झाली का ?”
Pradip : "होय काका, काळं पेन, निळं पेन, पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”
0 notes
Text
Badya दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,"Bandya परीक्षेची तयारी झाली का ?”
Bandya : "होय काका, काळं पेन, निळं पेन, पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”
0 notes