अभिषेकचं सत्य बेतणार का अनघाच्या बाळावर? देशमुखांना बसणार धक्का
अभिषेकचं सत्य बेतणार का अनघाच्या बाळावर? देशमुखांना बसणार धक्का
अभिषेकचं सत्य बेतणार का अनघाच्या बाळावर? देशमुखांना बसणार धक्का
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अत्यंत रंजक अशा वळणावर आलं आहे. अभिषेकनं अनघाशी प्रतारणा केल्याचं सत्य अरुंधती स्वतःच्या डोळ्यांनी बघते. नवऱ्यानं प्रतारणा केल्यानं दुखावलेली अरुंधती आता अभिषेकच्या बाबतीत काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अत्यंत रंजक अशा वळणावर आलं आहे. अभिषेकनं अनघाशी…
View On WordPress
0 notes
'पुष्पा 2' च्या फॅन्सना बसणार धक्का, 15 ऑगस्ट नाही तर 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट? कारण आलं समोर... http://dlvr.it/T8D15L
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचालींना वेग, भाजप-संयुक्त जनता दलाची नवी दिल्लीत बैठक
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशात ६५ टक्के तर राज्यात ६१ टक्के मतदान
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी
रायगडासह राज्यात तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस आज महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाच्या सरी
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएकडून नवीन सरकार स्थापनेबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. याच अनुषंगानं भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा, राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. संयुक्त जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. एनडीएच्या नेत्यांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्याच्या एका दिवसानंतर या बैठका झाल्या. दरम्यान, एनडीएत समाविष्ट घटक पक्षाच��� बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत भाजपसह मित्रपक्षांचे नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहतील.
****
देशात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६५ पूर्णांक ७९ टक्के मतदान झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही नवीन आकडेवारी जाहीर केली. या निवडणुकीत ६५ पूर्णांक ८० टक्के पुरुष आणि ६५ पूर्णांक ७८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण ६१ पूर्णांक ३३ टक्के इतकं मतदान झालं असून ६३ पूर्णांक ४५ टक्के पुरुषांनी तर ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एक आणि केरळच्या तीन जागांसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. तर, केरळमधील तीन सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. दोन्ही राज्यातील राज्यसभा सदस्यत्वासाठी १३ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहेत. तर, २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कसलीही चर्चा झाली नसून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर तटकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते. दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त तटकरे यांनी फेटाळून लावलं. पक्षाच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असून सर्व आमदार बोलावलेल्या बैठकीला येणार आहेत, असंही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्यात केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या विरोधात अधिक नाराजी असून येत्या विधानसभेत राज्य सरकारला याचा मोठा फटका बसणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार गटाच्या आमदारांना पक्षात परत घेण्याबाबत योग्यवेळी भाष्य केले जाईल, असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाचा स्थापना दिवस येत्या १० जून रोजी अहमदनगर इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून महागाई, जीएसटी या प्रश्नांवर यापुढे आवाज उठवला जाईल असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन १० जूनऐवजी २७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा आज रायगडावर मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर आले आहेत. संपूर्ण रायगड फुलांनी सजविण्यात आला असून आज सकाळी ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. यावेळी मर्दानी खेळ, शाहिरी नजराणा, पालखी सोहळाही पार पडला. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली.
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही या सोहळ्यानिमित्त विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं असून राज्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात येत आहे. या ठिकाणी आज सायंकाळी मराठा सेवा संघाच्या वतीने शाहीर पोवाडा आणि व्याख्यानही होत आहे. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे.
****
महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात कोणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी यावेळी स्फोटकं, वायर, बॅटरी, पुस्तकं आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे. हे नक्षलवादी तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी आले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
****
५८, ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केलं आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं आहे. मान्सून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच सोलापुरात पोहचला. पुणे इथल्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. हौसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग इथं कालपासून तर रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत लांजा इथं सर्वाधिक १८ पूर्णांक ८० मिलिमीटर पावसाची, तर दापोलीत १६ पूर्णांक ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात आजही पावसाच्या सरी कोसळल्या असून वाशिम जिल्ह्यातही सायंकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात शहादा, प्रकाशा पट्ट्यात मिरची लागवडीची तयारी सुरु असून यासाठी नाशिक आणि इतर ठिकाणांहून मिरचीचे रोपं मागवण्यात आले आहेत. यंदा मान्सून चांगल्या प्रमाणात झाल्यास, भरघोस पिकाची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस परिसरात आज झालेल्या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले आहेत. ताडकळस परिसरात उभ्या असलेल्या बोलोरो जीपला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. हे सर्वजण जिंतूर तालूक्यातल्या कोक इथले रहिवासी आहेत.
****
धुळे जिल्ह्यात आजपासून २१ जूनपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या मोहिमेत अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणं, अतिसाराच्या प्रकरणाच्या व्यवस्थापनासाठी तरतूद करणं, ओआरएस आणि झिंग कॉर्नरची स्थापना करण्यासह मोहिम प्रभावी राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिल्या आहेत.
****
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्त्य साधून बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारुर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार वृक्षारोपण केलं जात आहे.
भारतीय सेनेची बी कंपनी १३६ इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्षआच्छादन आणि वनआच्छादन वाढविण्यासाठी कार्यरत आहे. यंदा आणि पुढील वर्षात इको बटालियनमार्फत धारुर तालुक्यात किल्ले धारुर आणि घागरवडा येथे सव्वा दोन लाख वृक्ष लागवड करणार आहे.
****
महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेला छत्रपती संभाजीनगर इथून सुरुवात झाली आहे. शेतकरी वर्गाला पीक कर्ज नुतनीकरण, व्याज परतावा आणि शासनाच्या प्रोत्साहनपर योजनांचं महत्व पटवून देत यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. बीड जिल्ह्यात ही संवाद यात्रा येत्या नऊ, दहा आणि अकरा तारखेपर्यंत जनजागृती करणार आहे. बँकेची योजना, शेतकरी सन्मान योजना आणि इतर माहिती दिली जाणार आहे. ही संवाद यात्रा मराठवाड्यात ११ दिवस असेल.
****
नांदेड इथं येत्या मंगळवारी ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
****
0 notes
माजी राष्ट्राध्यक्ष यांना बसणार 2100 कोटींचा दंड? काय आहे प्रकरण?
0 notes
Bhusawal Breaking News : एसटी महामंडळाची ऐन दिवाळीच्या वेळी १० टक्के भाडेवाढ जाहीर !
एसटी महामंडळाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्याना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. एसटीकडून ही भाडेवाढ ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे.
एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या…
View On WordPress
0 notes
आता 40 लाखांच्या आत घर खरेदी करणे आणखी कठीण होणार ; कारण ऐकून बसणार धक्का..!
लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे दीर्घकाळापासून आपले स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहत असतात.मात्र
0 notes
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण केलं होतं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. मात्र, जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात जरांगेंचं आंदोलन सुरूच आहे. तर सरकारला वेळ दिला असून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत मी घराचा उंबराही चढणार नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. हा वेळ स्वत: सरकारनं मागितला असून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देतो असं त्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे सरकारनं मागितलेला वेळ आम्ही त्यांना दिला आहे, असं मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
सरकारचं मत होतं की मराठ्यांना समितीचा अहवाल सादर करून टिकणारं आरक्षण देतो, त्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. तर आम्हीही त्यांना तसा वेळ दिला आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे सरकारनं ठरवायचं आहे. आम्हाला 40 व्या दिवशी आरक्षण पाहिजे असून त्यावर आम्ही ठाम आहोत, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
0 notes
*Mpsc विषयी बोलू काही...*
वास्तविकता आहे ही..
या वर्षभरात बऱ्याच जणांनी MPSC चा अभ्यास सोडून दिला... अनेक मुलांनी कुठेतरी काम करणे वा शेती सांभाळणे सुरु केले, मुलींची लग्न झाली, काही मुलींचा अभ्यास तर सुरु आहे पण आता घरचे अभ्यासासाठी पुण्याला वगैरे पाठवायला तयार नाहीयेत... अनेक विद्यार्थी जे मागच्या 5-6 वर्षांपासून अभ्यास करत आहेत, ते द्विधा मनःस्थितीत अडकले आहेत...अभ्यास पुढे सुरु ठेवणं जिकीरीचं बनलं आहे...चार पैसे कमव, आता वय झालय, आम्हाला लग्नाचं पण बघायचय...असा किती दिवस MPSC चा जुगार खेळत बसणार आहे? अशा पद्धतीचे प्रश्न जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना घरुन विचारले जात आहेत आणि त्याला उत्तर देता देता पोरं कंटाळली आहेत...
नातेवाईक आणि समाजातील इतरही अनेक जणांना नेहमी तोंड द्यावं लागतं...खरं म्हणजे आजकाल गावाकडे MPSC म्हणजे हसण्याचा आणि चेष्टेचा विषय झालाय...MPSC करतोय म्हटलं की आधी मागच्या 4 5 वर्षात मान सन्मान मिळायचा पण आता लोक चक्क हसतात .परिस्थिती किती वेगाने फासे ओलांडते आणि आपण कुठपासुन कुठपर्यंत ढकललो जातो, याचा अंदाज लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच पानीपत झालेल आसत. बर किमान लढायची संधी तरी मिळायला हवी ना, ती सुद्धा मिळत नाहीये. पुस्तक समोर घेऊन बसलेल्या मुला मुलींच्या नजरा मात्र शुन्यात हरवलेल्या दिसतायेत . लढण्यासाठी समोर शत्रू असावा लागतो पण तोच नेमका दिसत नाहीये, मग नक्की लढायच कुनासोबत. व्यथा मोठ्या आहेत, एखाद्या चित्रपटात शोभतील इतक्या दर्दभर्या कथा घडतायेत mpsc करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात.
HR मधील 'महिला विकास वाचताना तो किती पुस्तकी व थोतांड आहे, हे त्या मुलीला विचारा जिला या वर्षी सगळं सोडून लग्न करुन सासरी जावं लागलं आणि तिला MPSC कायमची विसरावी लागते .HR मधील 'युवक विकास' वाचता वाचता चार पैशासाठी कशी सगळी स्वप्न सोडून, चांगली शैक्षणिक पात्रता असतानाही कुठतरी
10 - 12 हजारांवर काम कराव लागणाऱ्या पोरांना हा बदल इतक्या झटक्यात घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.सिस्टिम वाईट असते हे मान्य पण किती ? आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असणाऱ्या परीक्षांबाबत कुणीच बोलायला तयार नाही , हि खरं तर राज्यातील सर्व युवा नेत्यांच्या शरमेची गोष्ट आहे. कोरोना आहे मान्य पण म्हणून किमान तारखा तरी द्यायला हव्या होत्या. 2020 च्या परीक्षा 2021 अर्धे संपले तरी होत नसतील तर आयोग करतय काय? चला मान्य करु की सध्या परीक्षा घेणे शक्य नाही पण किमान तारखा तरी द्या. UPSC ने ज्या दिवशी परिक्षा पुढे ढकलली त्याच दिवशी पुढील तारखा
जाहिर केल्या , मग MPSC च घोड कुठ आडलय ? तुम्हाला सप्टेंबर मध्ये परिक्षा घ्यायच्यात घ्या काही हरकत नाही पण किमान तारखा तरी द्या . पुढच्या वर्षात काय होणार यांच्याबद्दल आयोग चकार शब्द काढायलाही तयार नाही. इतकी चालढकल आयोगासारख्या संस्थेकडून अपेक्षित नाही. हा फक्त परीक्षांचा प्रश्न नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे , आता अभ्यास सोडला तर परत फिरणे अवघड आहे आणि अभ्यास सुरु ठेवायचा तर परीक्षांच्या तारखाच नाही...! बहुतेक विद्यार्थी गावी आहेत आणि गावी राहून अभ्यास करणे किती जिकिरीचं असतं हे ज्याचं त्याला माहीत त्यातच सगळ्यांची आर्थिक स्थिती ठीक नसते . त्यामुळे कधी नव्हे इतके प्रश्न सगळ्यांच्या समोर उभे राहिलेत. हे सगळे प्रश्न घेऊन प्रत्येकाने जमेल त्या माध्यमातून विविध नेत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. दबाव तयार झाला तरच ही कोंडी फुटेल...त्यात विविध कोचिंग क्लासेस ने हि योग्य भूमिका घ्यायला हवी. अगोदर पोस्ट मिळवलेले किंवा सध्या कार्यरत असणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यात दबावगट म्हणून काम केले पाहिजे. हि वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे... हे सगळे झाले तरच पुढे काहीतरी मार्ग निघेल , नाहितर परिक्षांचा घोळ असाच महिनो महिने कायम राहील. आणि मग कधीतरी स्वतःला पुरेशी संधी न देताच mpsc सोडुन द्यावी लागेल .पोटेंशिअल वाया घालवन पोटेंशिअल नसण्यापेक्षा लय वाईट आहे...
कॉपी पेस्ट आहे ..कुनी लिहीलय माहिती नाही पण वास्तविक स्थिती आहे हि 🙏
-वैभव वैद्य....
0 notes
आता वेळ आलीये.. ✊️ जागा दाखवायची आणि धडा शिकवायची.. 💪 आता महाराष्ट्र शांत बसणार नाही, पेटून उठणार आहे. 🔥 🚩👊जय महाराष्ट्र👊🚩 @उद्धवबाळासाहेब @adityathackeray @shivsena_aditya_thackeray @shivsena (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/ClWSofmv8km/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Pak vs Eng Test: पाकिस्तानात सापडला लहानपणीचा बुमराह, फोटो पाहा विश्वास बसणार नाही
Pak vs Eng Test: पाकिस्तानात सापडला लहानपणीचा बुमराह, फोटो पाहा विश्वास बसणार नाही
Pak vs Eng Test: पाकिस्तानात सापडला लहानपणीचा बुमराह, फोटो पाहा विश्वास बसणार नाही
Jasprit Bumrah, Pakistan VS England multan test: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मुल्तान कसोटी सामन्यादरम्यान, एका मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील लहान मुलगा हुबेहुब जसप्रीत बुमराहसारखा दिसत आहे.
Jasprit Bumrah, Pakistan VS England multan test: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मुल्तान कसोटी…
View On WordPress
0 notes
सावंतवाडी मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांना बसणार चपराक
सावंतवाडी मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांना बसणार चपराक
मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना
सावंतवाडी : मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना आखली असून येत्या काही दिवसात अंमलबजावणी होणार आहे.मळगाव घाटित काही दिवसातच सोलार सिसीकॅमेरे बसवण्यात येणार असून चालत्या गाडीवरून कचर्याच्या पिशव्या फेकणार्या वहानांचा नंबर कॅमेरॅत कैद…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 06 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात आरोपींना जन्मठेप
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत जुलैअखेरपर्यंत तुळजापुरात पाणी दाखल होणार
६६ व्या ग्रॅमी सोहळ्यात भारतीय संगीतकारांना पाच पुरस्कार
आणि
विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर १०६ धावांनी विजय
****
राज्यातल्या ६५ वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ६५ वर्षांवरच्या नागरिकांना याचा लाभ होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत ज्येष्ठांमधलं अपंगत्व आणि अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणं खरेदी केली जातील. यासाठी आरोग्य विभाग ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण तसंच तपासणी करुन पात्र लाभार्थी निश्चित करेल. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकरकमी तीन हजार रुपये जमा केले जातील. राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे.
बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देऊन पतसंस्थांना बळकट केलं जाणार आहे. याअंतर्गत पतसंस्थांकडच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी संरक्षित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला.
राज्यातल्या दोन लाख युवकांना रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावेही आयोजित करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
शहरी भागातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाअभियान राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी बांबू लागवडीवर तीन वर्षात दोन हेक्टर करता, बाराशे रोपं आणि प्रति रोप १७५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला.
नांदेड इथल्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम २०२४ लागू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. १९५६च्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी नियुक्त न्यायमूर्ती जे. एच. भाटिया अभ्यास शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध केंद्र योजनेचा संपूर्ण राज्यात मधाचे गाव या स्वरुपात विस्तार, पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आंबेगव्हाण इथं बिबट सफारी, शिर्डी विमानतळाची उर्वरित विकास कामं, कृषी विद्यापीठातल्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचं वय ६२ वरुन साठ वर्ष करणं, दुय्यम न्यायालयात कार्यरत आणि सेवा निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते, महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी १६ पदांची निर्मिती, तसंच सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना राबवण्याला राज्य मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली.
****
सुशासन हा आमच्या सरकारचा पाया असून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांकासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनानं विशेष प्रयत्न करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणी, धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं सात आरोपींना, काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात राईनपाडा इथं नाथपंथी समाजातल्या पाच भिक्षुकांचा, मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. एक जुलै २०१८ रोजी ही घटना घडली होती. पाचही मयत हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथले रहिवासी होते.
****
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा, तसंच शिंदे यांनी नियुक्ती केलेला प्रतोद हाच शिवसेनेचा पक्षप्रतोद असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
****
स्पर्धा परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्यासाठीचं स्पर्धा परीक्षा विधेयक २०२४ काल लोकसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी काल हे विधेयक मांडलं. या विधेयकामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहारांना आळा बसणार आहे.
****
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जून - जुलै २०२४ अखेरपर्यंत तुळजापुरात दाखल होणार आहे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी ही माहिती दिली. हे पाणी तुळजापूर जवळील रामदरा तलावात साठवलं जाणार आहे. यामुळे तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यातलं दहा हजार ८६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना शाश्वत आणि आर्थिक पाठबळ मिळेल असा विश्वास आमदार राणा��गजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या योजनेसाठी महापालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा वाटा आता राज्यशासन उचलणार आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं, राज्य शासनाने ही जबाबदारी स्वीकारल्याचं सांगत, सावे यांनी या निर्णयाबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी मोहि���ेत शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक नागरिक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. जालना जिल्ह्यातले कृष्णा बोईणे आणि योगेश ढोणे यांनी आपल्याला झालेल्या लाभांबाबत माहिती दिली...
****
६६व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी पाच पुरस्कार जिंकले आहेत. अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये काल झालेल्या या सोहळ्यात संगीतकार-गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्या शक्ति या बँडला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय झाकिर हुसैन यांनी आणखी दोन, तर प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व कलाकारांचं अभिनंदन केलं आहे.
****
विशाखापट्टणम इथं झालेल्या, दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालची द्विशतकी खेळी, तर दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर, भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ २९२ धावात सर्वबाद झाला. दोन्ही डावात मिळून नऊ बळी घेणारा बुमराह सामनावीर पुरस्कारचा मानकरी ठरला. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेत पुढचा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट इथं सुरू होणार आहे.
****
नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात झालेल्या विशेष ऑलिम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेत, लातूर जिल्ह्याच्या दिव्यांग संघानं तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य, अशा एकूण सहा पदकांची कमाई केली. संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह आणि मतिमंद विद्यालय या शाळेतील एकूण ११ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयुष्यमान कार्ड वितरणासाठी येत्या १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम राबवली जाणार आहे. ८०० ग्राहक सेवा केंद्राद्वारे ही मोहीम राबवली जाईल. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डा ओमप्रकाश शेटे यांनी यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या.
****
परभणी इथं मकर संक्रांतीच्या पारंपारिक उत्सवाला मतदान जागृतीची जोड देऊन "कार्यक्रम हळदी कुंकवाचा-जागर मतदानाचा" हा अनोखा कार्यक्रम काल राबवण्यात आला. या कार्यक्रमात वैशाली पोटेकर यांनी मतदानाचा संदेश देणारे विविध कल्पक भित्तिचित्रं प्रदर्शित केले. एक प्रारूप मतदान केंद्र उभारून मतदानाबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव इथं काल "योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी" या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक संकल्पनेतून आणि खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारानं महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात एकूण ५६७ जणांची विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आता महानगरपालिका मुख्यालयात कर समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांचे आक्षेप तसंच तक्रारी निकाली काढण्यासाठी आणि शंकांचं निरसन होऊन कराचा भरणा सुलभतेने होण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार हे शिबीर भरवण्यात येईल. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथं काल महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणं, माहितीची देवाणघेवाण, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एकत्रित उपाययोजना, आदी बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
जालना इथं वीज महावितरण कंपनीतला कनिष्ठ अभियंता गणेशसिंग बायस याला ५० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अनधिकृत वीज जोडणी नियमित करून देण्यासह कारवाई न करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
****
0 notes
Pradip दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,"Pradip परीक्षेची तयारी झाली का ?”
Pradip : "होय काका, काळं पेन, निळं पेन, पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”
0 notes
Badya दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,"Bandya परीक्षेची तयारी झाली का ?”
Bandya : "होय काका, काळं पेन, निळं पेन, पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”
0 notes
हिंदुंना लक्ष्य केले तर आम्ही गप्प बसणार नाही : नरेंद्र पाटील
हिंदुंना लक्ष्य केले तर आम्ही गप्प बसणार नाही : नरेंद्र पाटील
नवी मुंबई: छत्रपती शिवाजी चौकात हिंदुंवर होणारे अत्याचाराचा विरोधात विरोध प्रदर्शन नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. मुंबई सह उपनगरात, महाराष्ट्रात जिहादी कारवाया वाढता आहेत. अत्तापर्यत या पाच सहा महिन्यातच अपहरण , खनू ,बलात्कार अशा – (घटनांची यादी अमचाकडे आहे) इतक्या घटना झाल्या आहेत. याचा अतिरेक जास्त प्रमाणात होत आहे. अशा घटनांमुळे हिंदू समाज दुखावला जातो आहे. असंतोष…
View On WordPress
0 notes