Tumgik
#पाण्यातील
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'तुझ्यात जीव रंगला' फेम वहिनीसाहेबांचं पाण्यातील हॉट फोटोशूट; आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम वहिनीसाहेबांचं पाण्यातील हॉट फोटोशूट; आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम वहिनीसाहेबांचं पाण्यातील हॉट फोटोशूट; आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो Go to Source
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
गोडय़ा पाण्यातील मत्स्योत्पादन वाढीची अपेक्षा
गोडय़ा पाण्यातील मत्स्योत्पादन वाढीची अपेक्षा
मोहन अटाळकर राज्यात सुमारे ४.१८ लाख हेक्टर क्षेत्र गोडय़ा पाण्यातील मासेमारीसाठी योग्य आहे. राज्यात तीन लाख शेततळी असून तीन लाख हेक्टर क्षेत्र धरणाखाली आहे. एवढे पूरक वातावरण असतानाही गोडय़ा पाण्यातील मत्स्योत्पादनात आजवर अपेक्षित वाढ झालेली नाही. या साऱ्यांमागच्या परिस्थितीचा हा ऊहापोह.. राज्यात तीन लाख शेततळी असून तीन लाख हेक्टर क्षेत्र धरणाखाली आहे. तरीही उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही, हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
कर्करोगाशी लढताना समग्र दृष्टिकोनाची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून व्यक्त
कोयना धरणाच्या शिव सागर जलाशयात जल पर्यटन केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर जिल्ह्यात औसा इथं भरधाव कार उपाहारगृहात घुसल्याने दोन जण ठार
आणि
धरमशाला कसोटीत भारताचा एक डाव आणि ६४ धावांनी विजय
****
कर्करोगाशी लढताना समग्र दृष्टिकोनाची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत 'पहिले माझे कर्तव्य' फाउंडेशनच्या आय इन्स्पायर पुरस्कार प्रदान सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. कर्करुग्ण तसंच त्यांच्या कुटुंबांना मदत करणाऱ्या वैद्यकीय तसंच बिगर वैद्यकीय क्षेत्रातल्या सेवाभावी व्यक्तींना राज्यपाल बैस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तीन जणांना जीवन गौरव सन्मान तर कॅन्सरवर मात करणाऱ्या महिला तसंच विविध क्षेत्रातल्या २० कर्करोग योद्ध्यांना 'आय इन्स्पायर पुरस्कार' देण्यात आले. कर्करोगाचं निदान वेळेवर झाल्यास उत्तम उपचार करता येतात, असं सांगत, कर्कग्णांच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक, भावनिक आणि आर्थिक समस्यांचा विचार झाला पाहिजे, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं.
****
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या साकी नाका इथं बहुउद्देशीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्राची पायाभरणी आणि पुणे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि सुविधा कार्यालयाचं आज उद्घाटन केलं. मंत्री राणे यांनी बहुउद्देशीय प्रदर्शनाला भेट देऊन उद्योगाविषयी चर्चा केली. तसंच त्यांच्या हस्ते उद्योजकांचा सत्कारही करण्यात आला. प्रधानमंत्री विश्वकर्मा, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सी.ओ.आय.आर. बोर्डाच्या उत्पादनांची १०० पेक्षा जास्त दालनं आहेत. कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
सातारा जिल्ह्यातील मौजे दरे इथल्या बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार आणि वनसंवर्धन प्रकल्पाचं लोकार्पण तसंच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बांबू लागवडीस आणि रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. यातून शेतकरी, तसंच महिला आणि युवकांना कृषी आणि वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. जंगल भागातील शेतकरी महिला आणि युवकांना टसर रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. सह्याद्रीपर्वत रांगांमधील शेतकऱ्यांसाठी वन्य रेशीम शेती एक वरदान ठरणार आहे असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र असून, यातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या मुनावळे इथं कोयना धरणाच्या शिव सागर जलाशयात पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मासेमारी, बोटिंग, जल पर्यटन यासाठी या बाबींचा फायदा होणार आहे. मात्र विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण पूरक असला पाहिजे, अशा सूचना पर्यटन विभागाला त्यांनी यावेळी केल्या.
****
देशातील सर्वात सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त असा दिव्यांग पार्क नागपूर शहरात होत असून याचा फायदा दिव्यांगांना होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं दिव्यांगाकरिता अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्कचा लोकार्पण सोहळा आज मंत्री गडकरींच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मध्य प्रदेशातल्या उज्जैन इथल्या दिव्यांग पार्कच्या धर्तीवर उभारल्या गेलेल्या या पार्कमध्ये फिजिओथेरपी इमारत, हायड्रोथेरपी रूम, वॉटर इक्विटी झोन, किचन कॅन्टीन, दृष्टीहीन लोकांसाठी स्पर्शिकामार्ग, श्रवणदोष असलेल्यांसाठी सांकेतिक भाषा निर्देशक आणि ब्रेल लिपी मधील नामांकन आणि चिन्ह यांचा समावेश आहे. दिव्यांगासाठी नागपुरात सर्वात मोठं क्रीडांगण उभारलं जाणार असल्याचंही गडकरींनी यावेळी जाहीर केलं.
****
लोकसभेच्या जागावाटपाचं भाजपचं ऐंशी टक्के काम झालं असून चर्चा करून लवकरच सर्व जागावाटप जाहीर करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कंत्राटी कामगारांबद्दल सरकार संवेदनशील असून त्यांना आर्थिक विमा, आरोग्य विमा मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कंत्राटी कर्मचारी यांना नियमित भरतीत उद्भवणाऱ्या समस्या, वयाची अट आणि निकालातील गुणदान यावर सुद्धा सखोल चर्चा झाली असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
****
धुळे जिल्ह्यात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचे जल्लोषात स्वागत करणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी आज धुळ्यात यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. येत्या १२ मार्च रोजी या यात्रेचं धुळे जिल्ह्यात तर येत्या १३ मार्च रोजी धुळे शहरात आगमन होणार आहे.
****
मतदान जनजागृती अभियान आज धुळे तालुक्यातल्या निमगुळ गावात राबवण्यात आलं. शालेय विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीच्या घोषणा देत गावातून रॅली काढली. तसंच ग्रामपंचायत समोर गावातल्या नागरिकांना एकत्र करुन मतदान प्रतिज्ञा ही घेण्यात आली.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागा��, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
जालना मुंबईत जनशताब्दी एक्सप्रेस आता उद्यापासून हिंगोली वरून सुटणार आहे. आज दुपारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिंगोली रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून या गाडीचा शुभारंभ केला. याप्रसंगी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्या १० मार्चपासून ही एक्स्प्रेस हिंगोली इथून पहाटे चार वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. जालन्याला ही गाडी सकाळी नऊ वाजता, छत्रपती संभाजीनगरला नऊ वाजून ५० मिनिटांनी तर मुंबईला दुपारी चार वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. मुंबईहून ही गाडी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी सुटणार असून, छत्रपती संभाजीनगरला संध्याकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी, जालना इथं संध्याकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी, तर हिंगोली इथं रात्री साडे बारा वाजता पोहोचेल.
****
लातूर जिल्ह्यात औसा इथं भरधाव कार एका उपाहारगृहात घुसल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. लातूर-औसा महामार्गावर औसा शहराजवळील सीएनजी पंपाजवळ आज सकाळी हा अपघात झाला. वाजिद खान चांद खान पठाण आणि शेख सोहेल गफार अशी मृतांची नावं असून ओंकार कांबळे हा १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. औशाहून लातूरकडं भरधाव जाणारी चारचाकी रस्ता सोडून एका उपाहारगृहाच्या दर्शनी भागात आदळल्यानं हा अपघात झाला. याप्रकरणी औसा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
****
धरमशाला इथं झालेला पाचवा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना एक डाव आणि ६४ धावांनी जिंकत भारताने ५ कसोटी सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. भारताने आज आपला पहिला डाव कालच्या आठ बाद ४७३ धावांवरून पुढे सुरू केला. मात्र अवघ्या चार धावांत भारताचे दोन फलंदाज बाद झाले. आणि भारताने एकूण २५९ धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडचा दुसरा डाव ४९ व्या षटकांत १९५ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रूटनं सर्वाधिक ८४ धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विननं सर्वाधिक पाच, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन तर रविंद्र जडेजानं एक बळी घेतला. कुलदीप यादव सामनावीर तर यशस्वी जयस्वाल मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुदर्शन रापतवार यांची निवड करण्यात आली आहे. शाखेचे सचिव गोरख शेंद्रे यांनी ही माहिती दिली
****
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या १२ आणि १३ मार्च रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा बांधवांसोबत ते संवाद बैठक घेणार आहे. मराठा आरक्षणासाठीची पुढील दिशा ठरविण्यासाठी संवाद साधणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
****
0 notes
breakingnewsmarathi · 5 months
Link
0 notes
vaibhavvaidya5233 · 1 year
Text
समस्या प्रदुषणाची " प्रदुषण हा शब्द पंधरा - वीस वर्षापूर्वी आजच्याइतका प्रचलित नव्हता . आज तो सर्वतोमुखी झाला आहे . त्याविषयीची | जागरूकताही निर्माण झाली आहे . विद्यालयांमध्ये व महाविद्यालयामध्ये त्याविषयीचं प्रधान केल जातं आ अभ्यासक्रमही तयार केले जातात . " प्रदुषणा बरोबरच " पर्यावछ । ' हा शब्दाही प्रचलित होत आहे . त्याचाही अभ्यासक्रमात प्राथमिक स्तरापासून समावेश केले जात आहे . ही स्वागतार्ह बाब आहे . " पर्यावरण विज्ञान ' ही आधुनिक विज्ञावशाखाही आज् महाविद्यालयाच्या वयुत्तर अभ्यासक्रमात समाविष्ठ झाली आहे . ' पर्यावरण ' आणि ' प्रदुषण ' यांचा परस्परसंबंध आहे ; त्यामुळ याविषयी समाजजागरण होणं ही काळाची गरज आहे . पूर्वी ' आरोग्यशास्त्र हा विषय अभ्यासक्रमात असे व त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नसे . खर तर त्यात वैयक्तिक व सार्वजनिक आयग्याविषयीचा किती तरी महत्वाचा विचार मांडला जात होता ; पण त्यावेळी जीवनाच्या समस्या इतक्या जटिल व बिक्रत झाल्या नव्हत्या औद्योगिकीकरण , नागरीकरण वैज्ञानिक शोध व त्यांचा मानव जीवनाशी येणारा घनिष्ठ संबंध नकळत वा हेतुत : होत गेलेली वृक्षतोड व त्यामुळे जंगलांचा व वृक्षांचा होणारा विनाश रासायनिक प्रक्रियांमुळे व वायुनिर्मिती वा वायुगळतीमुळं निर्माण झालेले धोके , ध्वनिपर्धकांमुलं एका बाजुला झालेला फायदा व दुसख्या बाजुला होणारी हानी अशा कितीतरी नवनवीन समस्यांना आपल्या जीवनाशी इतका घनिष्ठ संबंध असेल आणि त्याचे दुगामी परिणाम होतील , याची कल्पना तरी पाचपंचवीस वर्षापूर्वी आपण केली का ? पण आज या सर्व गोष्टींचा आपल्याला लागतो व बारकाईनं विचार करावाच उपाययोजनाही तातडीने करावीच तर आपल्याही वैयक्तिक व सामाजिक जीवनात भयानक उलथापालथ होण्याची शक्यता असते , त्याविषयीची लागते . तो केली नाही
 जलप्रदूषण एक समस्या .. जलप्रदुषण म्हणजे पाण्याच्या स्त्रीतांचे प्रदुषण जलप्रदुषण ही एक मानव निर्मित समस्या आहे . हवा पाणी | अन्न या मानसाच्या तीन गरजांपैकी पानी हिं 51 दुसऱ्या क्रमांकांची गरज आहे . आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध 1 मिळणे हे आरोग्याच्या दृष्टिने खूपय महत्वाचे आहे . प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि बरेचसे रोग होतात पाणी प्रदुषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबादार आहोत ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे . जल प्रदुषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधमयि पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवतरीत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठसते . जल प्रदुषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुधारणाम होतात किंवा पाण्याची चप बिघडते ते घाठीरडे दिसते . वा दुर्गंधीयुक्त होते . मानवी कृती आणि अन्य कारणामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्त प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते . या पाण्यालाच प्रदुषित जल म्हणतात . * बदलल्याने मानव परिणाम करणारी जल पाण्याचे प्राकृतिक , रासायनिक आणि जैविक गुणधर्म जलीय सजीवांवर उपायकारक प्रदूषण ही प्रक्रिया आहे नैसगिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उठाता यांची भर पडल्यास तो पाणी प्रदुषित होऊन त्याचा मानव , इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो . जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर आहे . कॅनडा , चीन , भारत इ . देशांत ही समस्या तीव्रतेने समस्या बनली रशिया , अमेरीका जपान , जाणवते .
जल प्रदुषणावरील आययोजना : याची कार माहिती करून योग्य ती उपाययोजना योजली जल प्रदूषण रोखण्यासाठी पाहीजे व या संबची कडक कायदे तयार करावे लागतील १ ९ ७४ मधील Watee Act या कायद्याची अंमलबजावणी होगे आवश्यक आहे . जगामरांतील साधारण २५ टक्के | पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लीरीनचा वापर सर्वाधिक ● लोकसंखेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही . केला जातो . पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतु मरत नाहीत त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठीओ शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते 1 ) सांडपाणी व मैल पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे . ( 2 ) पिण्याच्या पाण्याचे नियमित परिक्षण करणे 3 ) पि ०० पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही , यावर नियंत्रण ठेवणे . 4 ) कवकनाशके , किटकनाशके व किडनाश के यांचा वापर मर्यादीत करने अथवा टाळणे ( 5 ) किरणोत्सारी अपशिष्ट्ये विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याचा पद्धतीचा अवलंब करणे 6 ) ओकि जल प्रदुषणामुळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान 2 ° से पेक्षा अधिक वाढणार नाही , याची खबरदारी घेगे . 7 ) खनिज तेलामुळे होणाऱ्या जल प्रदुषण समस्येवर उपाययोजना आखगे 8 ) कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वावी : 4 ) पिण्याच्या पाण्यातील रासायनांच्या प्रमाणाची विशिवत " मयादा असते या सहज मर्यादिपेक्षा अधिक प्रमाणाय रसायनांची वाढ होऊ नये , यासाठी ती दक्षता घेणे
-वैभव वैद्य....
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
‘स्पाईस व्हीलेज’ मधून कृषी पर्यटन; मत्स्यपालनातून रोजगार निर्मिती करा - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर - महासंवाद
‘स्पाईस व्हीलेज’ मधून कृषी पर्यटन; मत्स्यपालनातून रोजगार निर्मिती करा – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर – महासंवाद
सिंधुदुर्ग, दि. 4 (जि.मा.का.) : स्पाईस व्हीलेजच्या माध्यमातून कृषी पर्यटन वाढवावे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाने महिलांना रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिल्या . जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात आज सिंधुरत्न समृध्द योजनेबाबत आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
‘स्पाईस व्हीलेज’ मधून कृषी पर्यटन; मत्स्यपालनातून रोजगार निर्मिती करा - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर - महासंवाद
‘स्पाईस व्हीलेज’ मधून कृषी पर्यटन; मत्स्यपालनातून रोजगार निर्मिती करा – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर – महासंवाद
सिंधुदुर्ग, दि. 4 (जि.मा.का.) : स्पाईस व्हीलेजच्या माध्यमातून कृषी पर्यटन वाढवावे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाने महिलांना रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिल्या . जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात आज सिंधुरत्न समृध्द योजनेबाबत आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित…
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
या पोस्टच्या मागे भीती दाखवणे हा उद्देश नाही. ही वस्तुस्थिती आहे. ७० टक्के आजार हे अस्वच्छ पाणी पिल्याने होतात. आजकाल गावागावात water atm आहेत. परंतु मोलमजुरी करून जगणाऱ्या कामगारांना कोणी वाली नाही. ना शासन ना प्रशासन. एमआयडीसीतील गरीब कामगार मेले काय आणि जगले काय कोणाला काहीच फरक पडत नाही. खालील फोटोमध्ये आपणास किती अस्वच्छ पाणी आहे हे पाहायला मिळेल. उघड्या डोळ्यांनी पाण्यातील घाण आपणास दिसत नाही. पण फोटोमध्ये आपण फिल्टर मध्ये एकत्र झालेली घाण पाहू शकता. शरीरातला सगळ्यात महत्वाच्या पाणी या द्रव्याकडे आणि 70 टक्के शरीराचे कंट्रोल असणाऱ्या पाण्याकडे आपण जाऊदे काय होतंय असे बोलून दुर्लक्ष करतो. आणि स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतो. या पोस्ट मागचा उद्देश कोणाला दोष देणे अथवा कोणत्या यंत्रणेकडे, विभागाकडे बोट दाखवणे असा नसून वस्तुस्थिती मांडने व जागृती करणे असा आहे. स्वछ पाणी प्या आणि निरोगी जीवन जगा हा कानमंत्र घेऊन आम्ही कडेगांव एमआयडीसी मध्ये सामाजिक भावनेतून प्लॉट नंबर पीएपी 18 वर water atm उभे केले आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. #WaterATM @papfarmersunion (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/shivshaktisocialfoundation/p/CYjG-djFnbh/?utm_medium=tumblr
0 notes
amhikastkar · 3 years
Text
मिश्र माशांच्या प्रजातींची लागवड करुन मोठा नफा कमवा, दर वर्षी लाखो लोकांची कमाई होईल
मिश्र माशांच्या प्रजातींची लागवड करुन मोठा नफा कमवा, दर वर्षी लाखो लोकांची कमाई होईल
मासे पालन भारतात गेल्या काही वर्षांत गोड्या पाण्यातील मासे पाळण्याच्या प्रवृत्ती वेगाने वाढली आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे या व्यवसायात शेतक to्यांना लागणारा खर्च कमी, तर नफा जास्त आहे. तसेच आजकाल बाजारात फिश मीटलाही मागणी जास्त आहे. अशा परिस्थितीत खेडे, शहरे आणि शहरांमध्ये हा व्यवसाय तेजीत आहे. गोड्या पाण्यातील मासेमारीचा व्यवसाय करुन आपल्याला चांगला नफा कमवायचा असेल तर मिश्र प्रजाती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 9 months
Text
देवगडमध्ये 'खाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती' विषयावर २७ ऑक्टोबरला एकदिवसीय परिषद
https://bharatlive.news/?p=171486 देवगडमध्ये 'खाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती' विषयावर २७ ऑक्टोबरला एकदिवसीय ...
0 notes
marathinewslive · 2 years
Text
व्हायरल व्हिडीओ : नेत्याने उद्घाटनाची फीत कापता नवाकोरा पूल पत्त्याइकला! | उद्घाटनानंतर अचानक पूल कोसळला काही सेकंदात अपघाताचा व्हिडिओ पहा prp 93
व्हायरल व्हिडीओ : नेत्याने उद्घाटनाची फीत कापता नवाकोरा पूल पत्त्याइकला! | उद्घाटनानंतर अचानक पूल कोसळला काही सेकंदात अपघाताचा व्हिडिओ पहा prp 93
पाण्यातील लोकांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. ६ सप्टेंबर रोजी या तलावाचे उद्घाटन करण्यासाठी मंडळे आले. प्रधाननी उद्घाटनाची फीत कापता हा नवाकोरा पूल अक्षरशः पत्त्यानिक त्यांच्या क्विकदेखत पुढीलला. सुरक्षा कर्मचार्यांनी कसंतरी या महिला अधिकचे प्राण वाचवले. पुलाच्या उद्घाटनासाठी महिला अधिकला अधिक वाचून उडी घेऊन जीव घेतला. अन्यथा अपघात घडू शकली असती. या बदलाचा व्हिडीओ सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 10 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १० सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जी-ट्वेंटी शिखर परिषदेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी एक भविष्य विषयावरील तिसऱ्या सत्रात सर्व देशांचे प्रमुख सहभागी झाले आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात राजघाट इथं राष्ट्रपीता महात्मा गांधींच्या स्मृतीस्‍थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राष्ट्रप्रमुखांनी पुष्पांजली अर्पण करून झाली. या परिदेषदेच्या शेवटी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृतपणे ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला डी सिल्‍वा यांच्याकडे जी-ट्वेंटी च्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करणार आहेत. ही सूत्रं मागील वर्षी भारताकडं आली होती. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सकाळी अक्षरधाम मंदिराला पत्नी अक्षता मूर्ति यांच्यासमवेत भेट देऊन दर्शन घेतले.
****
भारताच्या पहिल्या सौर मोहीमे अंतर्गत पाठवलेल्या आदित्य एलवननं आज पहाटे आणखी पुढची गती गाठून तिसरा टप्पा यशस्वीपणे पार केला. मॉरिशिअस, बेंगळुरू, आणि पोर्ट ब्लेअर इथल्या इस्रोच्या स्थानकांनी या मोहिमेदरम्यान या उपग्रहाचा मागोवा घेतला. पुढील टप्पा १५ सप्टेंबर ला दुपारी दोन वाजता गाठला जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे. आदित्य-एलवन हा सूर्याच्या सर्वसमावेशक अभ्यासासाठी समर्पित उपग्रह आहे.
****
राज्याला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने येरवडा कारागृहात आज पहाटे गळफास लाऊन आत्महत्या केली. शिंदे याने गळफास घेतल्यानंतर काही वेळातच ही माहिती तुरुंग प्रशासनाला कळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेल्याचं सूत्रांनी सांगितलं. गेल्या पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना नगर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ ला दोषी ठरविलं होतं.
****
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या संबंधीत उपोषणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य शासनानं उद्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाविषयी सर्व पक्षांची मत जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी वार्ताहारांशी बोलताना दिली.
****
देशातलं पहिलं फीश थीम पार्क-मत्स्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या केसरी-फणसवडे इथं उभारण्यात आलं असून उद्या या पार्कचं उद्गाटन होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. या मत्स्यालयामध्ये गोड्या पाण्यातले तसंच खाऱ्या पाण्यातील मासे, रंगीबेरंगी मासे असे सुमारे साडेतीन हजार विविध प्रजातीचे  मासे हे पर्यटकांना पाहायला मिळतील अशी माहिती त्यांनी दिली. मोदी सरकारतर्फे  राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेपासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या रायगड जिल्ह्यातल्या मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरण ९४ टक्क्यांहून अधिक भरलं आहे. धरण परिसरातल्या पाणलोट क्षेत्रात  गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरु असल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र इंग्लिश स्‍कूल असोशिएशन संघटनेच्यावतीनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० यावर १५ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वार्ताहार परिषदेत बोलताना आज दिली. या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणामुळं होणाऱ्या बदलांवर चर्चा करण्यात येणार आहे.
****
दौंड निझामाबाद एक्सप्रेस उद्या ११ ते १६ तारखेदरम्यान मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. निझामाबाद - पंढरपूर एक्सप्रेसही ११ ते १७ तारखेदरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. २० तसंच २७ तारखेला धावणारी जालना छपरा विशेष साप्ताहिक गाडी गाझीपूरपर्यंतच धावणार असून, परतीच्या प्रवासात ही गाडी १५, २२ आणि २९ सप्टेंबरला गाझीपूरहूनच सुटणार आहे.
जालना - तिरुपती विशेष रेल्वे आज जालना इथून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांऐवजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
0 notes
wbkincnews · 3 years
Photo
Tumblr media
महामारीतील धक्कादायक स्टडी:हैदराबादच्या हुसेन सागर तलावामध्ये आढळले कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल; परंतु संसर्गाचा धोका नाही दुसर्‍या देशातही स्टडी, परंतु पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा नाही देशात कोरोना महामारीमुळे नवीन रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच हैदराबाद येथील हुसेन सागर तलावामध्ये कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल आढळले आहे. हे एका अभ्यासातून समोर आले आहे. परंतु, त्या स्टडीमधून कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल पाण्यामधून संक्रमित होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय हे जेनेटिक मटेरियल हैदराबादमधील हुसेन सागर तलावासह नाचाराम पेड्डा चेरुवा आणि निजाम तलावामध्येदेखील आढळले आहे. ��ाची सुरुवात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत झाली असून पाण्यामध्ये मिसळण्याचे प्रमाण फेब्रुवारी महिन्यात वाढले असल्याचे स्टडीमधून समोर आले आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था, सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र केंद्र, वैज्ञानिक आणि अभिनव संशोधन अकादमी यांनी मिळून हा स्टडी केला आहे. 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ झालेल्या या स्टडीमध्ये पहिल्यांदा कोरोनाची पहिल्या आणि दुसर्‍या लाटेला कव्हर करण्यात आले आहे. पाण्यात सापडलेल्या मटेरियलवरुन पुढील लाटेचा अंदाज बांधणे शक्य या स्टडीनुसार, लोकांच्या वस्तीतून जे अनट्रीटेड आणि घाणरडे पाणी आले, त्याव्दारे जेनेटिक मटेरियल तलावांमध्ये मिसळले आहे. अशावेळी सध्यातरी कोरोना व्हायरसचा प्रसार होत नसल्याचे समोर येत आहे. परंतु, यामुळे सध्याच्या लाटेच्या परिणामाचा आणि येणार्‍या लहरीचा अंदाज बांधता येऊ शकतो. दुसर्‍या देशातही स्टडी, परंतु पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा नाही यावर जगातील दुसर्‍या देशातही स्टडी होत असल्याचे सीसीएमबीच्या संचालकाने एका वेबसाइटला बातमी देताना सांगितले. परंतु, पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा अद्याप नसल्याचे ते म्हणाले. अशावेळी पाण्याद्वारे चेहरा किंवा तोंडातून संसर्ग पसरण्याची शक्यता कमी आहे. #haidrabad #telangananews https://www.instagram.com/p/CO3IQo9pfpf/?igshid=p75qkxyuzqj5
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
मत्स्यव्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी आयुक्त स्तरावर समिती - मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मत्स्यव्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी आयुक्त स्तरावर समिती – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 2 : मत्स्य व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी, विकासात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्त स्तरावरील समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यातील गोड्या पाण्यातील मच्छिमार सहकारी संस्थांच्या समस्या सोडविण्याबाबत बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मत्स्यव्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी आयुक्त स्तरावर समिती - मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मत्स्यव्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी आयुक्त स्तरावर समिती – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 2 : मत्स्य व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी, विकासात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्त स्तरावरील समिती स्थ��पन करण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यातील गोड्या पाण्यातील मच्छिमार सहकारी संस्थांच्या समस्या सोडविण्याबाबत बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…
View On WordPress
0 notes
webnewswala · 4 years
Photo
Tumblr media
*प्रदूषण नियंत्रण मंडळ, बोईसर एमआयडीसी यांच्या हलगर्जी पाणा मुळे लॉक डाऊन काळात तयार झालेले लाख मोलाचे मत्स्यबीज एका तासात मरून गेले आहे.* लॉक डाऊन काळात दांडी आणि नवापूर येथे खूप मोठ्या प्रमाणात लहान-लहान माशांची पैदास झाली होती, अगदी चार दिवस पूर्वी मी येथील खाडीच्या पाण्याचे नमुने तपासले असता खाडी मधे प्राणवायूचे प्रमाण 4.5 mg प्रती लिटर असे होते. सातपाटी मूर्बे खाडी, वडराई येथील महीकवती - पानेरी खाडी, याच्याही पाण्याचे नमुने मी तपासले होते, त्या वेळी सर्वाधिक प्राणवायूचे प्रमाण सातपाटी येथे मिळाले जेथे त्या वेळी पाण्यात 7.2 mg प्रति लिटर प्राणवायूचे प्रमाण होते पाठोपाठ पानेरी येथेसुद्धा पाण्यात 6.081 mg प्रतिलिटर प्राणवायू आढळला होता तसेच वडराई येथील पारनेरी येथे खूप मोठ्या प्रमाणात बोय माशांची पैदास झालेली मला आढळून आली, पाठोपाठ सातपाटी येथेदेखील तसेच चित्र होते. चार दिवसापूर्वी जेव्हा दांडी येथे पाण्याचे नमुने घेण्यासाठी मी गेलो तेव्हा देखील तेथे मोठ्या प्रमाणावर लहान-लहान माशांची पिल्ले अगदी किनाऱ्याला पोहताना आढळून आली होती. या तिन्ही ठिकाणच्या तुलनेत नवापुर दांडी खाडी मध्ये प्राणवायूचे प्रमाण सरासरी दीड पटीने कमी होते. येथील कंपन्या आज सुरू झाल्या आणि त्यातून सोडलेल्या केमिकल युक्त पाण्याने आधीच पाण्यात कमी असलेल्या प्राणवायू सोबत अभिक्रिया होऊन पाण्यातील सगळा प्राणवायू संपवून टाकला. ही घटना घडली तेव्हा समुद्राला ओहोटी सुरू होती. ज्या मुळे समुद्रातून येणारे प्राणवायू युक्त पाणी देखील खाडीत नसल्याने त्याचा परिणाम आणखीन घातक झाला आणि खूप मासे मेले. ओहोटी वेळेला ही घातक रसायने चिखलात साठून राहतात. त्या मुळे त्याचा परिणाम चिरकाल टिकून राहू शकतो. ह्या वेळी फक्त लहान मासे मेले कारण मोठे बोय मासे भरती सोबत समुद्रात निघून जातात तर त्यांची पिल्ले खाडीच्या निमखाऱ्या आणि उथळ पाण्यात राहतात त्या मुळे केवळ लहान मासे मेले आहेत. टाळे बंदीच्या काळात प्रदूषण पूर्णतः बंद असल्यामुळे या खाडीमध्ये प्राणवायूचे प्रमाण चांगल्या रीतीने वाढल्याने गेल्या दोन महिन्यात जी माशांची पैदास झाली होती ती सर्वच्या सर्व पैदास एका दिवसाच्या केमिकलयुक्त प्रदूषणाने मरून गेली आहे. हे दिसणारे मासे आहेत, डोळ्यांनी सहजासहजी न दिसणारे मत्स्यबीज किती मोठ्या प्रमाणावर मेले असेल ह्याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाहीत. (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CAhdKliAfQ1/?igshid=1bujfesdq3wag
0 notes