#पाठवणारे
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“चाळीस आमदारांचे पार्सल खोके सुरतला पाठवणारे शिंदे सरकार २ मंत्री बेळगावात पाठवू शकले नाही ?”
“चाळीस आमदारांचे पार्सल खोके सुरतला पाठवणारे शिंदे सरकार २ मंत्री बेळगावात पाठवू शकले नाही ?”
“चाळीस आमदारांचे पार्सल खोके सुरतला पाठवणारे शिंदे सरकार २ मंत्री बेळगावात पाठवू शकले नाही ?” मुंबई – “छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणारे हे सरकार सीमा प्रश्नाला, मराठी बांधवांना न्याय देईल असे वाटत नाही. आता महाराष्ट्रालाच उठाव करावा लागेल. 20 लाख मराठी बांधव कानडी जोखडात गेल्या 50-60 वर्षांपासून अडकून तडफडत आहेत. त्यांची बाजू मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकू, मुस्कटदाबी करू, अशा धमक्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी भारत विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामन्यासाठी सरकारने बीसीसीआयला विनंती केली: अहवाल | क्रिकेट बातम्या
स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी भारत विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामन्यासाठी सरकारने बीसीसीआयला विनंती केली: अहवाल | क्रिकेट बातम्या
भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या उत्सवाचा भाग म्हणून भारत आणि उर्वरित जगामध्ये २२ ऑगस्ट रोजी क्रिकेट सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाठवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी सूचित केले की हा प्रस्ताव पाठवणारे सांस्कृतिक मंत्रालय, आझादी का अमृत महोत्सव मोहिमेचा एक भाग म्हणून हा सामना खेळण्यासाठी सर्वोच्च भारतीय खेळाडू तसेच…
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years ago
Text
‘नमो अ‍ॅप’वरही बंदी घाला - माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
‘नमो अ‍ॅप’वरही बंदी घाला – माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
मुंबई :१३० कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात असल्याचं सांगत सरकारने ५९ चायनीज अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे ‘नमो अ‍ॅप’ही बंद केले पाहिजे, असं सांगत ‘नमो अ‍ॅप’वरही बंदी घाला, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच चव्हाण…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 May  2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ मे २०१९ दुपारी १.०० वा. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून आज सकाळी डेहराडून इथल्या जॉली ग्रांट विमानतळावर त्यांच आगमन झालं. तिथून ते थेट केदारनाथला पोहचले असून केदारनाथ मंदिरात जाऊन त्यांनी तिथं पूजा अर्चा केली. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता झाल्यावर पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झालेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या ते बद्रीनाथ इथं पोहचणार असून तिथंही ते बद्रीनाथाचे दर्शन घेणार आहेत. **** अफगाणिस्तानमधे शांतता प्रस्थापित करणे, आर्थिक विकास आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी भारत प्रतिबद्ध असून यासाठी पूर्ण सहकार्य करेल, असं भारतानं म्हटलं आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांचे विशेष दूत आणि उच्च शांती परिषद सचिव उमर दाऊदझाई यांनी नवी दिल्लीत हे आश्वासन दिलं. नुकत्याच अफगाणिस्तानमधे झालेल्या लोया जिग्रा नंतरच्या वाटचालीबाबत दाऊदझाई यांनी स्वराज यांना माहिती दिली. तसंच यावेळी प्रादेशिक शांत���ा सहमतीमधे भारताच्या भूमिकेबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. दाऊदझाई यांनी ��ावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी देखील चर्चा केली. **** लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या एका केंद्रशासित प्रदेशासह सात राज्यांतल्या ५९ मतदारसंघांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश आणि पंजाबमधे प्रत्येकी १३, पश्चिम बंगाल नऊ, बिहार आणि मध्यप्रदेश प्रत्येकी आठ, हिमाचल प्रदेशातल्या सर्वच म्हणजे चार, झारखंडमधल्या तीन आणि चंदीगडमधल्या एका मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, रविशंकर प्रसाद, हरसिम्रत कौर बादल आणि हरदीप सिंह पुरी हे मातब्बर उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. देशभरात येत्या २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. **** आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागानं लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अधिकृत कल तसंच निकालाचे सलग ४० तास प्रसारण करणार आहे. हे सहक्षेपण २३ मे रोजी सकाळी सात वाजेपासून २४ मे ला रात्री ११ वाजेपर्यंत हिंदी आणि इंग्रजी असा द्विभाषिक भाषेत करण्यात येणार आहे. ‘विशेष जनादेश २०१९’ या नावानं हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. तर स्टूडिओमधून राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड आणि इतर वाहिन्यांवर देखील प्रसारित केला जाईल. आकाशवाणीच्या अधिकृत यू ट्युब वृत्तवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल. याबरोबरच, देशभरात आकाशवाणीच्या ४६ प्रादेशिक वृत्त विभागाकडून आपापल्या राज्यातील प्रादेशिक भाषेतून विशेष कार्यक्रम आणि न्यूज बुलेटिन प्रसारित केले जातील. **** संयुक्त राष्ट्र संघ अर्थात युनोकडून भारताला देणे असलेल्या ३८ दशलक्ष डॉलर मिळण्यासाठी होत असलेल्या उशिराबाबत भारतानं चिंता व्यक्त करण्यात आली आहे. युनोनं भारताला जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता मोहिमेसाठी पाठवलेल्या तुकड्यांच्या बदल्यात ही रक्कम देणं बाकी आहे. ही रक्कम मिळण्यात होत असलेल्या उशिरामुळं शांती मोहिमेसाठी तुकड्या पाठवणारे देशच शांती मोहिमेचे आर्थिक पाठीराखे झाले असल्याचं भारतानं म्हटलं आहे. युनोच्या पाचव्या समितीच्या प्रशासकिय आणि अर्थसंकल्पीय सत्रात भारताचे युनोमधले कायमस्वरुपी सत्राचे प्रतिनिधी महेश कुमार यांनी ही माहिती दिली. **** केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकानं काल परभणी जिल्ह्यात ��ेलू तालुक्यातील नागठाणा व देवगाव येथील शेतात व गावात प्रत्यक्ष पाहणी केली. केंद्रीय पथकातील पालक साचिव विनिता सिंघल यांचेसह जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांचेसह इतर अधिकारी या पाहणीत सहभागी झाले होते. यावेळी नागठाणा गावाला मागील तब्बल २५ वर्षांपासून पाणी टंचाई भासत असून तेथील गावकऱ्यांना दर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते, असं नागरिकांनी यावेळी पथकाला सांगितलं. यावेळी पथकातल्या अधिकाऱ्यांनी गावातल्या अंगणवाडीतील पोषण आहाराबाबतही चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधे तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले असल्यानं हवामान खात्यानं या जिल्ह्यांमधे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल ४५ अंश आठ सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली तर नागपूरमधे ४५ अंश चार सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. येत्या काळात या भागात तापमान ४६ ते ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते, असं नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं म्हटलं आहे. ***** ***
0 notes