#पगार
Explore tagged Tumblr posts
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )


सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.


चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झा��ेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्कर�� होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच���या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गा��ात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्या��ा मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही ���समाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आय��ष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
3 notes
·
View notes
Text
जन्या : Pradip ही जी माणसं तुझ्या पाठीमागे बोलतात ना…
Pradip : त्यांचं मुळीच टेंशन नाही. त्यांना मीच ठेवलं आहे. ते पगार घेत नाहीत, काम मस्त करतात.
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
Text
जन्या : Bandya ही जी माणसं तुझ्या पाठीमागे बोलतात ना…
Bandya : त्यांचं मुळीच टेंशन नाही. त्यांना मीच ठेवलं आहे. ते पगार घेत नाहीत, काम मस्त करतात.
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
Text
सरकारी अस्पताल के सफाई कर्मचारियों को नहीं मिला 2 महिने का पगार, बोनस से भी किया वंचित
मुंबई के सरकारी अस्पताल में भ्रष्टाचार का मामला प्रकाश मे आ रहा ह���। यहां कांदीवली के शताब्दी अस्पताल में काम करने वाले सफाई कर्मचारी पिछले 2 महिनों के पगार को लेकर अनशन पर बैठ गए हैं। बताया की सालाना बोनस भत्ते से वंचित रखा गया है। (Cleaning staff of government hospital did not get 2 months salary, deprived of bonus also) इस्माईल शेखमुंबई- कांदीवली पश्चिम के सरकारी अस्पताल में पिछले 4 दिनों से…
0 notes
Text
वेळोवेळी दर्शन देऊन घरातील कलह केला समाप्त. | Nashik | Sant Rampal Ji Ma...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: वेळोवेळी दर्शन देवून घरातील कलह केला समाप्त - अरुणा मधुकर पगार |Nashik| Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३९
"तुम्ही तिघीजणी पुढील १५ मिनिटांत इथून निघाला नाहीत ना, तर मी खरंच खुप रागावेन!" पमाताईच्या शांत स्वरांतला निग्रह शुभदाला चांगलाच जाणवला. तणाव कमी करण्यासाठी ती हंसत हंसत म्हणाली, "उगाच किती चिडचिड कराल, पमाताई! आम्ही निघायचीच तयारी करीत आहोंत हे तुम्हीसुद्धां बघताय् ना!" "हो, बघतेय् ना!-- आणि अर्ध्या तासापासून तेंच ते पालुपदही ऐकतेय्!" पमाताई मनोरमा आणि रजनीकडे कटाक्ष टाकीत म्हणाली. "तसं नाहीं,पमाताई!" मनोरमा समजूत काढीत म्हणाली, "पण आम्ही गेल्यावर रात्रभर तुम्ही एकट्याच इथे असाल;-- त्यामुळे कांही करायचं राहूं नये याची जरा अधिकच खबरदारी घेत आहोंत एवढंच!" "पण राहिलंय् काय? पोटं भरल्यावर सगळी मुलं केव्हांची झोपीं गेली आहेत! भांडी घासून उरल्या-सुरल्याची झाकपाकही तुम्ही केली आहे." आपल्या प्रतिपादनाला चिकटून रहात पमाताईने शांतपणे विचारलं, "मग आतां संध्याकाळपासून इथे खपत असलेल्या तुम्हांला घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यावी असं वाटत नाहीं कां?" "चला ग, आतां निघुयां! उद्यां सकाळी वेळेवर यायचं आहे ना, पमाताईंना मोकळं करायला? नाहींतर, सकाळी उशीर कराल आणि मग पमाताईंना तोंड देणं मुष्कील होईल!" रजनीने सगळ्या विषयावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरात नाईट-लॅम्प लावून ठेवून सगळ्याजणी बाहेर आल्या तेव्हां जणूं त्यांचीच वाट बघत असल्यागत मनोहर भोसले म्हणाले, "तुम्हांला बोलावण्यासाठी आतां मी आंतच येणार होतो! प्रभाकरराव आ��ि पमाताई, तुम्ही रात्रभर इथे थांबणार असल्याने मोठीच काळजी मिटली आहे! सकाळी आमच्यापैकी कुणीतरी येईलच ७\७-३० पर्यंत. मध्यंतरी कांही लागलं तर वाॅचमनला सांगा किंवा आमच्यापैकी कुणालाही फोन करा!"
अनाथाश्रमाच्या इमारतीबाहेर आवारांत उभ्या केलेल्या आपापल्या वाहनांकडे सर्व वळण्यापूर्वी मनोहर भोसले सर्वांना उद्देशून म्हणाले, "आपण सर्व इथे आपुलकीने काम करतो, त्यामुळे कुणीही कुणाला धन्यवाद देण्याची आवश्यकता नाहीं! आज दुपारपासून अचानक अंगावर पडलेली जबाबदारी आपण समर्थपणे निभावून नेली;-- तथापि उद्यांपासून तांतडीने पर्यायी व्यवस्था करण्याबद्दल मी ट्रस्टच्या अध्यक्षांना, संध्याकाळी ते एकुण परिस्थिती पहायला आले होते तेव्हां स्पष्टपणे सांगीतलं आहे. त्यांनी त्यासाठी उद्यां सकाळी सर्व संबंधितांची बैठक तांतडीने बोलावली आहे. त्या बैठकीत पर्यायी व्यवस्थेचा निर्णय होईल!" "पण पर्यायी व्यवस्था म्हणजे काय?" शुभदाने कांहीसं अस्वस्थ होऊन विचारलं, "आतां होत्या तशाच दुसऱ्या आया वा परिचारिका नेमणार?" तिला थांबवायचा अनंतने प्रयत्न केला तेव्हां भोसले म्हणाले, "अनंतराव, वहिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नामधे तथ्य आहे! मी स्वत: गेली १२ वर्षं या 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करीत असलो तरी ट्रस्टच्या अंतर्गत कारभाराशी माझा कांहीच संबंध नव्हता! त्यामुळेच आज जे घडलं ते मलाही खुप धक्कादायक आहे! क्षणभर वाटलं की आपण इतकी वर्षं ट्रस्टच्या एकुण कारभारातही थोडं तरी लक्ष घालायला हवं होतं!" "जे घडलं ते तुमच्याप्रमाणेच, ट्रस्टशी संबधित इतर सर्वांनाही धक्कादायक असेल ना?" अनंतने सावधपणे विचारलं.
"नक्की सांगणं कठीण आहे!" भोसले घुटमळत म्हणाले, "जे काय असेल ते असो;-- पण मी मात्र उद्यां होणाऱ्या बैठकीत याबद्दल अनेक प्रश्न बेधडक विचारणार आहे! ट्रस्टच्या दैनंदिन कारभाराशी संबंधित नसलो, तरी माझ्यावर विश्वास ठेवून देणग्या देणाऱ्यांच्या वतीने रोखठोक प्रश्न विचारण्याचा पुरेपूर अधिकार मला आहे हे समजून अध्यक्षांनी मला उद्यां होणाऱ्या सभेमधे भाग घेण्यासाठी खास आमंत्रित म्हणून बोलावलं आहे!" "ते तुमच्या सभेमधे काय होईल, मला कांही कळत नाहीं! पण आम्ही तिघींनी आज जी अव्यवस्था सगळीकडे बघितली त्यावरून एवढं नक्की वाटतं की यापुढे तरी सुशिक्षित आणि अनुभवी परिचारिकांची नियुक्ती करावी लागेल!" मनोरमाने व्यथित स्वरांत सुचना केली. "ज्या कुणा नवीन परिचारिकांची निवड होईल त्यांना ट्रस्टने पुरेसा पगार दिला पाहिजे, म्हणजे त्यांना अशी चोरी-मारीची दुर्बुद्धी होणार नाहीं!" रजनीने आपलं मत मांडलं. "या अनाथाश्रमांतल्या बऱ्याच अपंग, आजारी मुलांना धड तक्रारही करतां येत नाही!" शुभदा हळहळत म्हणाली, "पण ज्या कांही चार-सहा मुलांशी आमचा संवाद होऊ शकला, त्यावरून असं जाणवलं की इथे काम करणाऱ्या परिचारिका इथल्या मुलांना व्यवस्थित खाऊं-पिऊं घालण्यापेक्षा स्वत:च्या छानछोकीमधेच दंग होत्या!" "तुम्ही तिघींनी जे कांही अनुभवलं त्याचा सविस्तर गोषवारा मनोरमा मला आतां घरी गेल्यावर सांंगेलच! त्या आधारे मी उद्यां होणाऱ्या ट्रस्टींच्या बैठकीत काय मुद्दे उपस्थित करायचे त्याची यादी तयार करीन!" भोसले म्हणाले, "त्याबाबत आपण उद्यां सकाळी बैठकीपूर्वी, एकत्र जमून बोलुयां!"
१८ मे २०२३
0 notes
Text
खुशी हैसियत अनुसार
सौजन्य गूगल हर इंसान की हैसियत के अनुसार खुशी का पैमाना, महीने भर नौकरी करने पर जब पगार आती आम इंसान का खुशी का ना होता है कोई ठिकाना, अपने ही मेहनत की कमाई जब जेब में आती है बुनने लगता है महीने भर का ताना बाना, आम इंसान की खुशी वो धनकुबेरों को नहीं नसीब, वो दौलत के ढेर पर बैठे होते हैं पर तनाव उनके जीवन के हर पल चलता है आम इंसान को जरूरतें सीमित उनको पूरा करके खुशी का पल जीता है…

View On WordPress
0 notes
Text
दिवाळीचे वेध
झाला दसरा आतालागले दिवाळीचे वेध ।खर्चाचा पहाड पुढेखिशाला तर मोठे छेद । चिवडा शेव लाडू गुलाबजामचकलीचेही तोंड वाकडे ।बायकोला पहिजे नवीन साडीमुलांनाही हवेच कपडे । फटाके रांगोळी आकाश दिवाघराला रंगही नवा नवा ।इथे पगार नाही बोनस नाहीगुल झाली माझीच हवा ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नांदुरी ते सप्तश्रृंगी गड रस्ता व बसस्थानकाचे भूमीपूजन संपन्न
नाशिक, दिनांक 2 ऑगस्ट,जि. मा. का. वृत्तसेवा) : तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजना व केंद्रीय मार्ग निधी (CIRF) अंतर्गत २०२३-२४ मध्ये कळवण तालुक्यातील नांदुरी येथील सप्तश्रृंगी गड रस्ता व नांदुरी बसस्थानकाच्या कामांचे भूमीपुजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार,…
0 notes
Text
3 महीने से नहीं मिली पगार, अब सामुहिक हड़ताल की दी चेतावनी !
कोटपूतली में सफाई कर्मी लामबंद, आर्थिक शोषण का लगाया आरोप न्यूज़ चक्र, कोटपूतली। किसी भी शहर की सफाई व्यवस्था के लिए सफाई कर्मियों का योगदान मह��्वपूर्ण होता है। लेकिन अगर सफाई कर्मियों को दो से तीन महीने तक लगातार वेतन ही ना मिले तो फिर बिगड़ती सफाई व्यवस्था के लिए कौन जिम्मेदार! जी हां, कोटपूतली शहर के सफाई कर्मियों ने आज से सामूहिक हड़ताल की घोषणा कर दी है। सफाई कर्मियों ने पिछले 3 महीने का…
0 notes
Text
बायको हळदी कुंकूला जाण्यासाठी तयार झाली होती…
बायको : अहो… कशी दिसतेय मी आज…
Pradip: छान दिसत आहेस…
बायको : असे नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी…
Pradip : ये जो लग रही हो तुम इतनी प्यारी… इस मे पगार लग जाती है मेरी सारी.!!!!
0 notes
Text
बायको हळदी कुंकूला जाण्यासाठी तयार झाली होती…
बायको : अहो… कशी दिसतेय मी आज…
Bandya : छान दिसत आहेस…
बायको : असे नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी…
Bandya : ये जो लग रही हो तुम इतनी प्यारी… इस मे पगार लग जाती है मेरी सारी.!!!!
0 notes
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसला तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा स्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक आणि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागा��ील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आर्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयंरोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभावामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती पैसे मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात तेव्हा पासून ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
Text
गुरूंचा चमत्कार-अभ्यास झालेला नसताना मिळाले 78%गुण | Pune | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: गुरुंचा चमत्कार-अभ्यास झालेला नसताना मिळाले 78 % गुण- परिमल गोरख पगार |Pune | Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes