Tumgik
#दक्षिण कॅरोलिना
marathinewslive · 2 years
Text
मुलाने दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रागैतिहासिक शार्कचे मेगा दात शोधले: अहवाल
मुलाने दक्षिण कॅरोलिनामध्ये प्रागैतिहासिक शार्कचे मेगा दात शोधले: अहवाल
विलुप्त झालेल्या मेगाटूथ शार्कचा 4.75-इंच दात असलेला मुलगा दाखवतो. नॉर्थ मर्टल बीच, दक्षिण कॅरोलिना येथे सुट्टीचा आनंद घेत असताना एका मुलाने चुकून एक आश्चर्यकारक प्रागैतिहासिक शोध लावला. त्यानुसार पाल्मेटो जीवाश्म सहल (PFE)मुलाने नामशेष झालेल्या मेगाटूथ शार्कचा 4.75 इंचाचा दात शोधला कार्चरोकल्स अँगुस्टिडन्स समरविले जवळ जीवाश्म-शिकार सहलीत भाग घेत असताना. Palmetto Fossil Excursions ने गुरुवारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीनला अन्न प्रक्रिया उद्योग तर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत आधुनिक कौशल्य विकास संकुल सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा ** औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांतल्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा; एक हजार ६८० कोटी रूपयांच्या औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश ** त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज उस्मानाबाद इथं प्रारंभ; जेष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांच्या हस्ते होणार उदघाटन आणि ** गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकरला जिम्नॅस्टिक स्पर्धेत रौप्य पदक **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या बिडकीन इथं पाचशे एकर क्षेत्रात अन्न प्रक्रिया उद्योग संकुल उभारण्याचा तसंच शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत आधुनिक कौशल्य विकास संकुल सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. औरंगाबाद इथं काल लघु उद्योजकांची संघटना मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर असोसिएशन- मसिआच्या `ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०` या प्रदर्शनाचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. बिडकीन इथं जवळ पास पाचशे एकर क्षेत्रात अन्न प्रक्रिया केंद्र आपण उभारणार आहोत त्यामध्ये जवळ पास एकर शंभर हे महिलांसाठी आरक्षित असेल. हे आपण ठरवतो २०२० च्या जून मध्ये याचे भूमिपुजन करायचं उद्योग आणि कृषी या दोन विभागांच्या समन्वयातून अन्न प्रक्रिया, तेलबिया प्रक्रिया यासारख्या शेतमालाशी निगडीत अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाड्यात उद्योग क्षेत्रात भरीव काम होत असून, उद्योग विकासासाठी सर्व प्रकारचं सहकार्य शासनस्तरावरून उपलब्ध करून दिलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. उस्मानाबाद इथं टेक्निकल टेक्सटाईल हब उभारण्यात येणार असून, त्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली असल्याची माहिती उद्योग मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. मराठवाड्याचा औद्योगिक विकास झपाट्यानं होत असून, नांदेड इथं कृष्णूर, उस्मानाबाद इथं वडगाव सिद्धेश्वर, तसंच औरंगाबादमधल्या अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक वसाहतीचं काम प्रगतीपथावर असल्याचं ते म्हणाले. मंत्री आदित्य ठाकरे, संदीपान भुमरे, राजेश टोपे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संजय बनसोडे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल औरंगाबाद महानगरपालिका, तसंच औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांतल्या विकास कामांची आढावा बैठक घेतली. औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, याकामी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत दिली. ���रंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीची प्रस्तावित एक हजार ६८० कोटी रूपयांची योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून येत्या तीन दिवसात याबाबतचे कार्यारंभ आदेश देण्याबाबतचे निर्देश दिले जातील असं त्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, औरंगाबाद - शिर्डी आणि औरंगाबाद - अजिंठा या रस्त्यांचं मजबुतीकरण त्वरित करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर वेरुळ आणि अजिंठ्याचं पर्यटन केंद्र पुन्हा सुरु करण्याचे निर्देशही दिले. उस्मानाबाद जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, शेतीविषयक विविध योजना, वॉटर ग्रीड प्रकल्प, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती, अतिवृष्टीनं बाधित पिकांची नुकसान भरपाई, उस्मानाबाद - तुळजापूर - सोलापूर रेल्वेमार्ग, आदी कामांचा आढावा घेतला. परभणीत कृषी विभागाचं उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात येईल, तसंच साईबाबांचं जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी परभणी जिल्हा आढावा बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्री आज औरंगाबाद इथं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करणार असून, त्यानंतर लातूर जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज उस्मानाबाद इथं प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची आज सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडीनं सुरूवात होईल. सकाळी अकरा वाजता ध्वजारोहण होईल आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि ब्याण्णवाव्या आखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाला सुरूवात होईल. ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते दुपारी चार वाजता संमेलनाचं उदघाटन होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवत आहेत. **** मुंबई - मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस आजपासून मुंबई - नांदेड अशी धावणार आहे. आज रात्री दहा वाजता ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरुन सुटेल. परतीच्या प्रवासात ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन संध्याकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी सुटेल. या गाडीमुळे नांदेड -मनमाड आणि काचिगुडा - मनमाड या प्रवासी गाड्या आता मनमाडपर्यंत न जाता नगरसोलपर्यंतच करण्यात आल्या आहेत. **** बीड जिल्ह्यातलं शक्तीपीठ असलेल्या नारायण गडाचा विकास आराखडा पूर्ण करण्याची तसंच अधिक चांगली वेगळी कामं करण्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीडच्या दौऱ्यावर आले असता मुंडे यांनी काल श्रीक्षेत्र नारायण गड इथं भेट देऊन दर्शन घेतलं, त्यावेळी ते बोलत होते. मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांचा सत्कार केला. **** नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्याच्या बरबडा इथं होणाऱ्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. नारायण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे संयोजक दिलीप देशमुख बरबडेकर यांनी ही माहिती दिली. येत्या एकवीस जानेवारी रोजी हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, चर्चा सत्रं आयोजित करण्यात आली आहेत. **** निःपक्ष न राहता भुमिका घेणं हे माध्यमांचं काम असल्याचं मत लोकसत्ता दैनिकाचे संपादक गिरिश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं विवेकानंद व्याख्यानमालेत ‘समकालीन प्रसार माध्यमे : मूल्ये, आव्हानं आणि भवितव्य’ या विषयावर व्याख्यान देतांना ते काल बोलत होते. ते म्हणाले, देशाचे गेले १०० वर्ष तुम्ही मोठे निर्णय घेतले त्याच्या मुळे माध्यमांचा खुप मोठा वाटा आहे ,त्यांच्या मुळे राजकीय परिवर्तन घडले, सामाजिक निर्णय घेतले तुम्ही कोणतेही मुद्दे घ्या माध्यमांची महत्वाची भुमिका आहे ती भुमिका समजून घेण्यासाठी माध्यमे स्वत: मध्यली एक प्रघलब वाढवण्याचा प्रयत्न करावा लागतो तो सुध्दा करायला हवा आम्हाला बातम्यासाठी आम्हाला माध्यांमाची गरज राहणार नाही तर बातम्याच आमच्या हातातच येऊन पडते त्याचं अलीकडे आणि पलीकडे सागंण्याची क्षमता पत्रकारांना अंगिकारावी लागेल अंगिकाराची असेल तर ती स्वत: मध्येच अंगिकारावी लागेल साधना करावी लागेल, अभ्यास करावा लागेल **** परभणी जिल्ह्यातल्या सेलू बाजार समितीच्या सभापतीपदी दिनकर वाघ यांची बिनविरोध निवड झाली. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल आला होता. **** क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या दुसऱ्या फेरीत सायनानं दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा २५ - २३, २१ - १२ असा पराभव केला, तर सिंधूनं जपानच्या आया ओहोरीला २१ - १०, २१ - १५ असं हरवलं. यापुढच्या फेरीत सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन विरुद्ध, तर सिंधूचा सामना चीनच्या ताई ज्यू यिंग विरुद्ध होणार आहे. **** आसाममधल्या गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत काल औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकरनं १७ वर्षांखालील मुलींच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. दरम्यान, या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन आज होणार आहे. या स्पर्धेमध्ये काल जिम्नॅस्टिकसह कबड्डीच्या स्पर्धेला सुरुवात झाली. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान तिसरा ��ी ट्वेंटी क्रिकेट सामना आज पुण्यात खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या इसारवाडी इथं अवजड यंत्रसामुग्री घेऊन जाणारा ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधल्या तीन जणांचा मृत्यू झाला. काल दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. **** परभणी इथं राज्यातल्या नऊ जिल्ह्यातल्या सैन्य भरतीची प्रक्रिया सुरु असून, कालपर्यंत अडूसष्ठ हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे. सैन्य भरती प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मेजर जनरल व्ही. के. एच. पिंगळे आणि कर्नल तरुण जमवाल यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना दिली. १३ जानेवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार आहे. **** माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं काल नांदेड इथं हळद, पेरु, केळी उत्पादन आणि विक्री या विषयी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. ईश्वेद बायोटेक या टिश्यु कल्चर आंतरराष्ट्रीय कंपनीचे प्रमुख संजय वायाळ यांनी पेरूवर प्रक्रिया केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय बाजारात चालणार्या फळपिकांसाठी हमीभावाचे करार शेतकऱ्यांसोबत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 OCT. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा नाही, प्रशासनानं देऊ केलेली वेतनवाढ कर्मचारी संघटनांनी फेटाळली ** मांगल्याचं प्रतीक असलेली दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी; अनेक कुटुंबियांनी फटाक्याची आतषबाजी न करता लुटला दिवाळीचा आनंद ** दीर्घ आणि मोठ्या कर्जदारांना कर्ज फेडीसाठी दहा वर्षाची मुदतवाढ देण्याची तसंच व्याज माफ करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मागणी आणि ** डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय रॉय यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; सायना नेहवालची विजयी घोडदौड कायम **** राज्य परीवहन महामंडळ- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये काल कोणताच तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे आज चौथ्या दिवशीही हा संप सुरूच राहील, असं एस.टी. कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केलं आहे. प्रशासन आणि कर्मचारी संघटनामध्ये आतापर्यंत चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्या. यावेळी प्रशासनानं ३५ टक्के वाढ द्यायला मान्यता दिली होती, मात्र संघटनाना ही वाढ मंजूर नसल्यामुळे चर्चा निष्फळ ठरल्या. त्यामुळे आता संप मागं घेतल्यानंतरच चर्चा होईल, अशी भूमिका प्रशासनानं घेतली आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागं घेऊन तात्काळ कामावर हजर व्हावं असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. मात्र कर्मचारी संघटना आपल्या मागणीवर ठाम आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात संप झाल्यानं महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. दिवाळीत उत्पन्नात वाढ होते. **** मांगल्याचं प्रतीक असलेल्या, लक्ष-लक्ष दिव्यांनी सारा आसमंत उजळणाऱ्या आणि जीवनात उत्साह, आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीच्या सणानिमित्त काल घराघरांत आणि कार्यालये, व्यावसायिक तसंच दुकानांतून भक्तिमय वातावरणात विधीवत लक्ष्मी - कुबेर पूजन करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीनं आसमंत उजळून निघाला. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. मात्र तरीदेखील यावर्षी फटाक्यांच्या आतषबाजीचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं. अनेक कुटुंबियांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली. ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी काल काश्मीरमध्ये गुरेझ खोऱ्यात भारतीय सैन्य दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवळपास दोन तास ते तिथं होते. सलग चौथ्या वर्षी पंतप्रधानांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येकालाच आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा आनंद लुटायला आवडतो. आपणही सुरक्षा दलांना आपलं कुटुंब मानत असल्यामुळं त्यांच्या सोबत आहोत असं पंतप्रधान म्हणाले. सीमा सुरक्षा बलाच्या जवानांना बलिदान आणि शौर्याची परपंरा लाभली असल्याचं सांगून. पंतप्रधानांनी या जवानांचं कौतुक केलं. जवानांसोबत काही वेळ घातल्यानंतर आपल्याला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी पंतप्रधानांनी जवानांना मिठाईचं वाटप केलं तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यावेळी उपस्थित होते. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी काल निकोबार इथल्या वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली, तसंच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. **** राज्यात नुकत्याच दोन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकत बहुमत मिळवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र तसंच राज्य सरकारनं राबावलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात सरकार यशस्वी ठरल्यामुळेच हे यश संपादन करता आल्याचं त्यांनी म्हटलं. एसटी महामंडळाच्या संघटनांसोबत मुख्यमंत्री चर्चा करत असून लवकरच याविषयी तोडगा निघणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केल्याप्रकरणी मनेसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. अन्य सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तुर्डे हे मनसेचे मुंबईतले एकमेव नगरसेवक आहेत. शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना पैसे देऊन पक्षात घेतलं असल्याचं, तसंच आपल्यालाही रक्कम देऊ केली होती, असा आरोप त्यांनी केला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** राज्य शासनानं दिलेली कर्जमाफी अल्पभूधारक आणि पीक कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी लाभदायी असली तरी दीर्घ मुदतीच्या कर्जदारांना या कर्जमाफीचा लाभ होणार नाही, त्यासाठी दीर्घ आणि मोठ्या कर्जांना फेडीसाठी पुढे दहा वर्षाची मुदतवाढ द्या आणि त्यावरील व्याज माफ करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. सोलापूर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. जे शेतकरी मोठे आहेत, आणि त्यांनी फळबाग अथवा इतर कारणांसाठी दीड लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेलं आहे, त्यांना या कर्जमाफीमध्ये फायदा होणार नाही, असं पवार म्हणाले. राज्यातला शेतकरी प्रमाणिक आहे. त्यामुळे त्यांना शेतीसाठी लागणारे पाणी, खते, बियाणे आणि वेळेवर कर्ज पुरवठा केला तर शेतकरी कदापी कर्जमाफी मागणार नाही असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. **** डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय रॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा रजत पदक विजेत्या मलेशियाच्या ली चोंग वेइचा २१-१७, ११-२१, २१-१९ असा पराभव केला. किदांबी श्रीकांतनंही दक्षिण कोरियाच्या जीओन ह्योक जीनचा २१-१३, ८-२१, २१-१८ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायना नेहवालनं पहिल्या फेरीत ऑलिम्पिक स्पर्धा विजेत्या कॅरोलिना मरीनचा पराभव केला तर दुसऱ्या फेरीत थायलंडच्या निचॉन जिंदापोलचा २२ - २०, २१ - १३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महिला एकेरीत भारताची एकमेव सायना नेहवाल ही खेळाडू उरली आहे. पी. व्ही सिंधूचा चीनच्या चेन युफीकडून धक्कादायक पराभव झाल्यामुळे तिचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. **** जालना शहरातली बसस्थानक रस्त्यावरची चार दुकानं काल सायंकाळी भीषण आग लागून खाक झाली. आगीच्या या घटनेत कृषी साहित्याच्या तीन आणि वस्तू भंडाराच्या एका दुकानातलं साहित्य जळाल्यानं मोठं नुकसान झालं. जालना नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं सात तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरात काल भेंडोळी उत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला. यानिमित्तानं तुळजाभवानी मंदिरात भेंडोळी विधीवत काढून हा उत्सव साजरा झाला. हा उत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. **** शालेय शिक्षण विभागाच्या सरल या संगणक प्रणालीमध्ये माहिती भरण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबरवरुन आता येत्या सोमवारपर्यंत म्हणजे २३ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली. ही संगणक प्रणाली दहावीच्या संगणक प्रणालीशी जोडली जाणार आहे, त्यामुळेच जर ही माहिती वेळेत भरली गेली नाही तर दहावीच्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या राज्यातल्या जवळपास दोन कोटी २५ लाख विद्यार्थ्यांची माहिती सरल या संगणक प्रणालीमध्ये भरण्याचं काम सुरु आहे. **** नाशिकच्या हिंदुस्थान ॲरोनॉटीक्स लिमिटेड या कारखान्यात पाचव्या टप्प्यात लढाऊ विमानं तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. लढाऊ हेलीकॉप्टर आणि विमानं बनविण्यासाठी खासगी क्षेत्रानं पुढाकार घेतल्यास अशा उद्योगांना पूर्णतः सहकार्य केलं जाईल असं भामरे म्हणाले. संरक्षण क्षेत्रातल्या काही सरकारी उद्योगांशिवाय बहुतांशी साधनांसाठी विदेशांवर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे भारतात अशी साधनं तयार होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. **** कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - ई पी एफ ओनं आपल्या ग्राहकांना आधार क्रमांक त्यांच्या सार्वत्रिक खाते क्रमांकाशी जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पी एफ इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 OCT. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
**** छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमध्ये आज सुमारे दहा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केल्याबद्दल, वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्यसरकारचे आभार मानले आहेत. दिवाळीनंतर महिनाभरात सर्वच पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याच्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचं तिवारी यांनी स्वागत केलं आहे. नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं तिवारी यांनी म्हटलं आहे. **** यावर्षीच्या जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या, महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे धनादेश पालकमंत्री विष्णु सावरा यांच्या हस्ते देण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सात व्यक्तींनाही प्रत्येकी पंचाहत्तर हजार रूपयांचे धनादेश देण्यात आले. **** पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात दहा भारतीय नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जम्मू काश्मीरच्या पूंच्छ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्ताननं आज सकाळपासून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू केला आहे. भारतीय सैन्य या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. **** श्रीलंकेतल्या हिंदू तमिळ नागरिकांनी दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली असून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाला सिरिसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. **** ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. कर्मचारी कामावर परतले नाहीत तर त्यांना निलंबित करण्यात येईल आणि त्यांच्या जागी हंगामी कर्मचारी नेमण्यात येतील, असा इशारा एसटी महामंडळ प्रशासनानं दिला आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून ऐन दिवाळीचे दिवस असल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी १९७२ मध्ये ,१९९६ मध्ये आणि २००७ मध्ये संप केले होते. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे कर्मचारी संपावर गेले असून निधीअभावी ही मागणी पूर्ण करणं शक्य नसल्याचं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. **** नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिध्द अष्टंबा यात्रेला कालपासून सुरुवात झाली. महाभारताशी निगडीत अश्वत्थामाचं स्थान असलेल्या या देवस्थानाला दरवर्षी दिवाळीत महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातले हजारो भाविक भेट देतात. **** नाशिक जिल्ह्यात येत्या तेवीस ते एकोणतीस तारखेदरम्यान कीटकनाशकांच्या वापराबाबत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. कीटकनाशकांची फवारणी प्रतिबंधात्मक उपाययोजना हा सप्ताह साजरा करण्याचे आदेश महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. **** वीज ग्राहकांकडून २० जानेवारी २००५ ते ३० एप्रिल २००७ या कालावधीत सेवा जोडणी आकार आणि मीटर आकारापोटी घेतलेली रक्कम वीज ग्राहकांना परत करण्याची प्रक्रिया महावितरणनं सुरु केली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं ही रक्कम ग्राहकांना व्याजासह परत करण्याचे आदेश जारी केले आहेत. **** ठाणे इथला तहसीलदार किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली. जमीन अकृषक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी भदाणे यानं लाच मागितली होती, वाहन चालक राम उगले याच्यामार्फत ही लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. **** वस्तू आणि सेवा कराचा वात्पुरता प्रतिकूल परिणाम आता संपला असून, ऑगस्ट महिन्यात उत्पादन क्षेत्रात तीन पूर्णांक एक टक्के, इतकी वाढ नोंदली गेली असल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव एस.सी गर्ग यांनी दिली आहे. दोन महिन्यांच्या खालावलेल्या दरानंतर ही वाढ नोंदली गेल्याचं गर्ग यांनी म्हटलं आहे. **** अमेरिकन लेखक जॉर्ज सॉंडर्स यांना यावर्षीचा मॅन बुकर पुरस्कार घोषित झाला आहे.’ लिंकन इन द बारडो’ या कादंबरीसाठी त्या��ना हा पुरस्कार मिळाला आहे. मानाचा बुकर पुरस्कार मिळवणारे ते दुसरे अमेरिकन लेखक आहेत. **** ओडेन्स इथे खेळल्या जाणा-या डेन्मार्क खुल्या सुपरसीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत यांच्यासह चौदा खेळाडूंचे पहिल्या फेरीचे सामने होणार आहेत. द्वितीय मानांकित सिंधूचा सामना चीनच्या चेन युफेयीशी, तर सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मारीनशी होणार आहे. **** बांगलादेशात ढाका इथे खेळल्या जात असलेल्या एशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतल्या पहिल्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणारी आहे. या फेरीतला भारताचा पुढचा सामना उद्या मलेशियाशी तर शनिवारी पाकिस्तानशी होणार आहे. अंतिम फेरीत पोहचणाऱ्या दोन संघांचा सामना येत्या रविवारी होणार आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 April 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा. ***** राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अहमदनगर इथल्या आर्मड् कोअर सेंटर अँड स्कुलला आज मानाचा ध्वज प्रदान केला. आर्मड् कोअर सेंटर अँड स्कुल ही लष्करी प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या कार्यक्रमासाठी अहमदनगर इथं कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.   **** पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नाविक अधिकारी कुलभुषण जाधव यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. भारत पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचं वैर संपवण्याच्या मताचा आहे; मात्र समोरच्या बाजूने हल्ला झाल्यास भारत त्यास तोडीचे उत्तर देण्यास समर्थ असल्याचं सिंह यांनी स्पष्ट केलं.   दरम्यान, लाहोर वकील संघानं कोणत्याही वकिलानं कुलभूषण जाधवची बाजू मांडल्यास त्याच्या वकिलीचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी तिथल्या वकिलांना दिली आहे. **** खाद्यपदार्थ आणि पेयांवर लादण्यात येत असलेल्या सेवा कराबाबत केंद्र सरकार राज्य सरकारांना कारवाई करण्याबाबत सूचित करणार असल्याचं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. याबाबत मंत्रालयानं एक मार्गदर्शिका तयार केली असून मंजूरीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकांच्या परवानगीशिवाय सेवा कर लादणे हे अयोग्य व्यापार पद्धतीमध्ये येत असल्याचं मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. **** बिहारमधल्या सीतामढी जिल्ह्यामध्ये कैदी वाहून नेणारी मोटारगाडी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातामध्ये सात पोलिस आणि एक नक्षलवादी ठार तर पाच पोलिस आणि एक नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत. भागलपूरहून दोन नक्षलवाद्यांना सीतामढीला घेऊन जात असताना हा अपघात झाला. **** दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार आढळून आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव वंदना वाहूळ यांनी ही माहिती दिली. परिक्षेत नक्कल करताना आढळून आलेल्या विद्यार्थ्यांची देखील चौकशी सुरू असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथं आज दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक  साहित्य संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या हस्ते फळ्यावर शुभेच्छा संदेश लिहून करण्यात आलं. मराठवाड्यातले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. वीरा राठोड, रवी कोरडे आणि आसाराम लोमटे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक चुकला तर एका पिढीचं नुकसान होतं त्यामुळे शिक्षकांनी नेहमी दक्ष राहणं गरजेचं असल्याचं, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार  विक्रम काळे यांनी यावेळी म्हटलं. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात प्रकट मुलाखत, कथाकथन, मुक्त कवी संमेलन, परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. **** देशातील विविध सरकारी विभागांमधल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं केंद्रीय दक्षता आयोगानं म्हटले आहे. या यादीत रेल्वे विभाग आघाडीवर आहे. रेल्वेशी संबंधित अकरा हजारहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दक्षता आयोगानं संसदेत नुकताच वार्षिक अहवाल सादर केला. त्यात २०१६ मध्ये एकूण ४९ हजार ८४७, तर २०१५ मध्ये २९ हजार ८३८ तक्रारी प्राप्त झाल्या.   **** मलेशियात होणाऱ्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ या वर्षीही सहभागी होणार नाही. २०१४ मध्ये या स्पर्धेदरम्यान झालेल्या वादाबद्दल पाकिस्तान संघ माफी मागणार नाही, तोपर्यंत पाकिस्तान विरोधात एकही मालिका खेळणार नाही, या भूमिकेवर ठाम असल्याचं, हॉकी संघानं स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षीही भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला नव्हता, २१ वर्षाखालील गटात होणाऱ्या या स्पर्धेत भारतानं २०१५ चं विजेतेपद पटकावलं आहे. **** सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि बी साई प्रणित आज उपान्त्य फेरीतले सामने खेळणार आहेत. श्रीकांतचा सामना इंडोनेशियाच्या अँथनी गिंटींग विरुद्ध आणि प्रणितचा सामना दक्षिण कोरियाच्या ली डोंग क्यून विरुद्ध होणार आहे. महिला एकेरीत काल झालेल्या उपउपान्त्य सामन्यात पी व्ही सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मरिन कडून पराभव पत्करावा लागला. तर मिश्र दुहेरीतही भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. //*******//
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 April 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा. *****
अलाहाबाद उच्च न्यायालय हे ऐतिहासिक निकाल देणारं न्यायालय असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात ते आज बोलत होते. अलाहाबाद उच्च न्यायालयानं १९०१ मध्ये विधवांच्या अधिकारासंदर्भात पहिला निर्णय सुनावला, तसंच अयोध्या प्रकरणातही योग्य निर्णय दिल्याचं ते म्हणाले. या न्यायालयानं स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश जे एस खेहर, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. **** लोकसहभाग हा लोकशाहीचा गाभा असून देशासमोर असणाऱ्या सगळ्या समस्या लोकसहभाग, नवसंशोधन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सोडवता येऊ शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मधील सहभागी व्यक्तींशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ते बोलत होते. भारत हा तरुणांचा देश असून तरुणाईच्या ऊर्जेनं देशासाठी चांगला काळ येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या प्रभावानं अनेक बदल घडत असून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे लोकांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. **** राष्ट्रीय वयोश्री योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी आयुष्य जगणं शक्य होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर इथं या योजनेला प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय साधनं आणि उपकरणं पुरवली जातील. या योजनेमुळे देशातल्या ज्येष्ठ व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचं गेहलोत म्हणाले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सध्या प्रत्येक राज्यातून दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गरजू ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र, कवळी, कुबड्या, चाकाची खुर्ची अशा वस्तू मोफत पुरवण्यात येणार आहेत. **** भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधीकरणाला दिलेल्या निधीचा पूर्ण वापर होत नसल्यासंदर्भात योग्य पावलं उचलण्याचे निर्देश एका संसदीय समितीनं केंद्रीय आरोग्य विभागाला दिले आहेत. अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण हा विषय देशात दुर्लक्षिला गेला असून अन्न पदार्थांच्या चाचण्यांसाठी फिरत्या प्रयोगशाळांची गरज असल्याचं समितीनं म्हटलं आहे. **** केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखडा योजनेला देशातल्या उच्च शिक्षण संस्थांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. या योजनेत देशातल्या सगळ्या उच्च शिक्षण संस्थांची अध्ययन, अध्यापन आणि संसाधनांच्या निकषांवर गुणवत्ता क्रमवारी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सहभागी झालेल्या संस्थांची संख्या आठशेनं घटली आहे. यावर्षीची गुणवत्ता क्रमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उद्या जाहीर करणार आहेत. **** बनावट नोटांना आळा घालण्यासाठी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांमधील सुरक्षा वैशिष्ट्यं दर तीन चार वर्षांनी बदलण्याची सरकारची योजना आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकषांच्या अनुषंगानं हे बदल केले जातील. विमुद्रीकरणानंतर गेल्या चार महिन्यातच नव्या नकली नोटांचे साठे आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश विकसीत देशांप्रमाणे मोठ्या नोटांची सुरक्षा वैशिष्ट्यं ठराविक काळानंतर बदलणं आपल्या देशासाठीही आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी यांनी म्हटलं आहे. **** नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिटंनपटू पी व्ही सिंधू महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात तिनं दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यून चा पराभव केला. सिंधूचा अंतिम सामना आज ऑलिम्पिक विजेती कॅरोलिना मरीन विरुद्ध होणार आहे. **** औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग परवा चार तारखेला राम नवमीनिमित्त बंद राहणार आहे. घाटीच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भारती विद्यापीठाच्या वतीनं डि लिट ही पदवी देण्यात येणार आहे. भारती विद्यापीठाच्या १८व्या दीक्षांत सोहळ्यात परवा चार तारखेला पवार यांना हा पदवी देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम यांनी पुणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ****
0 notes