#टाळण्यासाठी..
Explore tagged Tumblr posts
news-34 · 2 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 9 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
दरम्यान, ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे.
एक देश एक निवडणूक या अंतर्गत देशपातळीवर एकाचवेळी निवडणूक घेण्यावर भर दिला जात असून, तरुणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकशाहीमध्ये अशी चर्चा होण्याची गरज असून, तरुणांनी यात सहभागी व्हावं, असं ते म्हणाले.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वेमार्गांवर आधुनिक सिग्नलिंग प्रणाली बसवणं, काही धोकादायक ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालणं अशा कामांचाही रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाच्या कामांमध्ये समावेश करण्यात आलं आहे.
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे सात लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेनं सर्वाधिक आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. गरज भासली तर केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदत वाढवून मागीतली जाईल, असं रावल यांनी सांगितलं.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी काल पुण्यात जीबीएस या आजाराबाबत आढावा बैठक घेतली. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण मोठं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या आजारामागची कारणं शोधावीत, पाणीपुरवठा स्रोतांची, टँकरमधल्या पाण्याची तपासणी करावी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं तसंच अन्य सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश आबीटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जीबीएसच्या रुग्णांवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर इथं काल शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते ब���लत होते. संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, मोहन जोशी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर इथं सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. गेले तीन दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात नाट्यदिंडी, विविध नाट्यप्रयोग, नृत्य गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन निमगिरे यांनी केलं.
बुलडाणा इथं अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्रात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं लोकार्पण केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगाना आवश्यक साहित्य जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते ४७ दिव्यांगांना तीन लाख ५१ हजार रुपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे.
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान ‘डिबीटी’ प्रणालीद्वारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई, दि. ३१ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना दिलासा मिळतो. मात्र निराधार व्यक्तींना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
लाचखोरीचा अद्भुत प्रकार , कोपरगाव तहसील कार्यालयात दोन जण जाळ्यात
लाचखोरीचा अद्भुत प्रकार , कोपरगाव तहसील कार्यालयात दोन जण जाळ्यात
लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार नगर जिल्ह्यात समोर आलेला असून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना कोपरगाव तहसील कार्यालयातील दोन जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत.  कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपिक म्हणून काम करणारा चंद्रकांत नानासाहेब चांडे ( वय 39 वर्ष ) आणि अव्वल कारकून म्हणून काम करणारा योगेश दत्तात्रय पालवे ( वय 45 वर्षे ) यांना पंधरा हजाराची लाच घेताना…
0 notes
svagrosolutions · 2 months ago
Text
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खत व्यवस्थापन धोरणे
एक अल्पभूधारक शेतकरी या नात्याने, तुमच्या शेतातील पोषक तत्वांचे व्यवस्थापन करणे ही निरोगी पिके वाढवण्यासाठी आणि चांगली कापणी मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. वनस्पतींना वाढण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांनी माती भरून काढण्यात खते महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, पैसा वाया न घालवता किंवा पर्यावरणाची हानी न करता उत्तम परिणाम मिळविण्यासाठी खतांचा हुशारीने वापर करणे महत्त्वाचे आहे. या ब्लॉगमध्ये, आम्ही सोप्या आणि प्रभावी खत व्यवस्थापन धोरणे सामायिक करू ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कार्यक्षम आणि टिकाऊ असताना त्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत करू शकतात.
तुमच्या मातीच्या पोषक गरजा जाणून घ्या प्रभावी खत व्यवस्थापनाची पहिली पायरी म्हणजे आपली माती समजून घेणे. वेगवेगळ्या मातीत विविध पोषक पातळी असतात आणि तुमच्या जमिनीत कशाची कमतरता आहे हे जाणून घेतल्यास तुम्हाला योग्य खतांची निवड करण्यात मदत होऊ शकते. नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), आणि पोटॅशियम (K), तसेच जस्त आणि लोह यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता तपासण्यासाठी तुम्ही एक साधी माती चाचणी करू शकता.
तुमच्या जमिनीला कोणत्या पोषक तत्वांची गरज आहे हे समजल्यावर तुम्ही त्या अंतरांना दूर करण्यासाठी योग्य खते निवडू शकता. हा दृष्टीकोन तुमच्या झाडांना जमिनीत आधीपासूनच असलेल्या पोषक तत्वांवर खतांचा अपव्यय न करता त्यांना आवश्यक ते मिळेल याची खात्री करेल.
योग्य प्रकारचे खत वापरा अनेक ��्रकारची खते उपलब्ध आहेत आणि योग्य ते निवडणे महत्त्वाचे आहे. खते वेगवेगळ्या स्वरूपात येतात—दाणेदार, द्रव किंवा पर्णासंबंधी स्प्रे—आणि प्रत्येक प्रकाराचे त्याचे फायदे आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, NPK खते (ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते) हा एक चांगला प्रारंभ बिंदू आहे, कारण ते बहुतेक पिकांना आवश्यक असलेले मूलभूत पोषक पुरवतात.
सेंद्रिय खते, जसे की कंपोस्ट किंवा खत, हा दुसरा उत्तम पर्याय आहे. ते केवळ आवश्यक पोषकच पुरवत नाहीत तर सेंद्रिय पदार्थ जोडून कालांतराने मातीचे आरोग्य सुधारतात. अधिक शाश्वत बनू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, सेंद्रिय खते बहुतेकदा अधिक पर्यावरणास अनुकूल पर्याय असतात.
योग्य वेळी खते द्या जेव्हा खत घालण्याची वेळ येते तेव्हा सर्वकाही असते. चुकीच्या वेळी खतांचा वापर केल्याने पोषक तत्वे कमी होतात किंवा परिणामकारकता कमी होते. लागवडीपूर्वी खतांचा वापर करणे चांगले आहे, जेणेकरून तुमच्या पिकांना सुरुवातीपासूनच पोषक घटक मिळतील. काही शेतकरी वाढत्या हंगामात देखील खतांचा वापर करतात, विशेषत: जेव्हा झाडे पोषक तत्वांच्या कमतरतेची चिन्हे दर्शवतात.
उदाहरणार्थ, नायट्रोजन वाढीच्या हंगामात लवकर वापरला जातो, तर फॉस्फरस लागवडीपूर्वी लावल्यास ते अधिक प्रभावी ठरते. तुमच्या विशिष्ट पिकांसाठी सर्वोत्तम वेळेबद्दल थोडेसे संशोधन केल्यास त्यांच्या वाढीत मोठा फरक पडू शकतो.
खते कार्यक्षमतेने वापरा तुमच्या खतांचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी, ते कार्यक्षमतेने वापरा. याचा अर्थ कचरा टाळण्यासाठी योग्य प्रमाणात वापरणे. जास्त प्रमाणात खत दिल्याने झाडांना हानी पोहोचते, पर्यावरण प्रदूषित होते आणि तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च होतात. खतांच्या पॅकेजिंगवरील सूचनांचे पालन करा आणि वाढत्या हंगामात रोपांना आवश्यकतेनुसार पोषक द्रव्ये मिळतील याची खात्री करण्यासाठी तुमचे खत वापरा लहान डोसमध्ये विभाजित करण्याचा विचार करा.
दुसरी टीप म्हणजे स्प्रेडिंग टूल किंवा ऍप्लिकेटर वापरणे जे तुम्हाला खते समान रीतीने लागू करण्यात मदत करू शकतात. हे सुनिश्चित करते की तुमच्या शेताच्या प्रत्येक भागाला योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये मिळतात आणि विशिष्ट भागात जास्त प्रमाणात एकाग्रता टाळली जाते.
पीक रोटेशन आणि आंतरपीक समाविष्ट करा पीक रोटेशन आणि आंतरपीक ही शाश्वत शेती पद्धती आहेत ज्यामुळे रासायनिक खतांची गरज कमी होण्यास मदत होते. प्रत्येक हंगामात वेगवेगळी पिके फिरवून तुम्ही जमिनीतील पोषक तत्वांचा ऱ्हास टाळ��� शकता आणि कीड आणि रोगांचे चक्र खंडित करू शकता. काही पिके, जसे की शेंगा, विशेषतः उपयुक्त आहेत कारण ते नैसर्गिकरित्या जमिनीत नायट्रोजन निश्चित करू शकतात, नायट्रोजन खतांची गरज कमी करतात.
आंतरपीक (दोन किंवा अधिक पिके एकत्र वाढवणे) देखील खतांचा वापर अनुकूल करण्यास मदत करते. उदाहरणार्थ, नायट्रोजन-फिक्सिंग रोपे ज्यांना भरपूर नायट्रोजनची गरज असते अशा पिकांसह जोडल्यास पोषक सायकलिंग सुधारू शकते आणि खतांची आवश्यकता कमी होऊ शकते.
नियमितपणे निरीक्षण करा आणि समायोजित करा खत व्यवस्थापन ही एकवेळची क्रिया नाही. आपल्या पिकांच्या वाढीवर लक्ष ठेवणे आणि आवश्यकतेनुसार खतांचा वापर समायोजित करणे महत्वाचे आहे. वनस्पतींच्या आरोग्यावर लक्ष ठेवा - जर पाने पिवळी पडू लागली किंवा झाडे कमकुवत वाटू लागली तर हे पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
नियमित माती परीक्षण तुम्हाला पोषक पातळीचा मागोवा घेण्यास आणि कालांतराने समायोजन करण्यास मदत करू शकते. तुमची पिके वेगवेगळ्या खतांना कसा प्रतिसाद देतात याचा मागोवा घेतल्याने, तुमच्या शेतीसाठी काय चांगले आहे हे समजून घेण्यास तुम्ही अधिक चांगले व्हाल.
शाश्वत खत वापरण्याचा सराव करा शेवटी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शाश्वत खतांचा सराव करण्याचा विचार करा. खतांच्या अतिवापरामुळे माती आणि जलप्रदूषण होऊ शकते. योग्य प्रमाणात वापरणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि पिके फिरवणे यासारख्या सर्वोत्तम पद्धतींचे अनुसरण करून, भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरण निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमची भूमिका पार पाडाल.
निष्कर्ष खत व्यवस्थापन हा शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे जो तुमच्या पीक उत्पादनात आणि शेतीच्या नफ्यात मोठा फरक करू शकतो. अल्पभूधारक शेतासाठी
Read more article:
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Pune : भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी लवकरच देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडणार - केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील
Pune : भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी लवकरच देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडणार – केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील – MPC…
0 notes
kvksagroli · 6 months ago
Text
Tumblr media Tumblr media
सोयाबिन पिकातील पिवळ्या मोझॅक व्यवस्थापनावर निदान भेट आणि प्रशिक्षण. सध्यपरिस्थितीत सोयाबिन पिकावर पिवळा मोझॅक ही एक गंभीर समस्या आहे आणि बहुतेक शेतात त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उमरी तालुक्यातील काही गावांमध्ये तालुका कृषी अधिकारी उमरी व केव्हीके सगरोळी यांनी संयुक्तपणे प्रक्षेत्र भेट व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उमरी तालुक्यातील बीजेगाव व बोळसा या गावांमध्ये सोयाबेनच्या मोझॅक व्यवस्थापनावर प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले होते. संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र तज्ञ प्रा.कपिल इंगळे यांनी शेतकऱ्यांना त्याचा प्रसार टाळण्यासाठी त्याच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले विशेषत: प्रभावित झाडे उपटून टाकणे, 5% निंबोळी अर्क वापर आणि पिवळे व निळे चिकट सापळे वापर आणि पांढरी माशी आणि मावा व्यवस्थापनासाठी शिफारशीतील कीटकनाशकाचा वापर शिफारस केली .कॅम्पेनमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी किनवट श्री .रणवीर व तालुका कृषी अधिकारी उमरी श्री.मिरसे, कृषी अधिकारी सौ.जाधव व कृषी सहाय्यक पाटील व मनुर कर उपस्थित होते. #सोयाबीन #पिवळामोझॅक #शेतकरी #कृषी #वैज्ञानिक #निदान #प्रशिक्षण #उपाय #सोयाबीनपिक #पिकांचेरोग #कृषीविज्ञान
1 note · View note
gitaacharaninmarathi · 7 months ago
Text
29. संतुलनच सर्वोच्च
श्लोक 2.38 गीतेचे संपूर्ण सार प्रतिबिंबित करतो. श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात की, जर त्याने सुख-दु:ख, नफा-हानी, विजय-पराजय समान मानून युद्ध केले तर त्याच्याकडून कोणतेही पाप होणार नाही. इथे 'समानतेचा' संदर्भ युद्धासह आपल्या सर्व कृतींना लागू पडतो हे विशेष.
हा श्लोक सांगतो ��ी आपली सगळी कर्मे ही प्रेरित असतात आणि ही प्रेरणा आपल्या कर्माला अशुद्ध किंवा पापयुक्त बनवते. परंतु आनंद, लाभ किंवा विजय मिळविण्यासाठी किंवा दुःख, नुकसान किंवा पराजय टाळण्यासाठी प्रेरीत नसलेली कोणतीही कृती आपल्याला क्वचितच माहित असेल किंवा घडत असेल.
सांख्य आणि कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून, कोणतेही कर्म तीन भागांमध्ये विभाजित करता येते, कर्ता (करणारा), चेष्टा (कृती) आणि कर्मफळ (कृतीचा परिणाम). श्रीकृष्णा ने कर्मफळाला सुख/दु:ख,  नफा/तोटा आणि जय/पराजय यांच्यामध्ये विभाजित केले आहे.
या श्लोकात श्रीकृष्ण समता साधण्यासाठी या तिघांना वेगळे करण्याचे संकेत देत आहेत. एक मार्ग आहे कर्तापण सोडून देण्याचा (कर्तेपणाची भावना) आणि केवळ साक्षी बनण्याचा (साक्षीदार). आयुष्य नावाच्या महानाट्यात आपण केवळ क्षुल्लक भूमिका साकारत असतो. दुसरा मार्ग आहे हे समजून घेण्याचा की कर्मफळावर आपला काहीही अधिकार नाही (कृतीचा परिणाम) कारण ते आपल्या प्रयत्नांखेरीज इतर अनेक गोष्टींचे मिश्रण असते. कर्तापण आणि कर्मफळ सोडून देण्याचे मार्ग हे एकमेकांशी जुळलेले आहेत आणि एका मार्गावरील प्रगतीमुळे दुसऱ्या मार्गावरील प्रगतीला सहाय्य होते.
कर्माचा विचार केल्यास हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्यापैकी कुणीही या ग्रहावर येण्यापूर्वी ते अस्तित्वात होते. त्यावर मालकी हक्क सांगता येत नाही किंवा नियंत्रणही राखता येत नाही.
या श्लोकाकडे भक्तियोगाच्या नजरेतूनही बघता येते जेथे भाव (उद्देश) हेच सगळे काही. श्रीकृष्ण तर कर्मापेक्षाही भावाला प्राधान्य देतात. ही अंतर्गत शरणागतता आपोआप समत्व आणते.
प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनानुसार आणि स्वभावानुसार आपापला मार्ग निवडू शकतो. पद्धत कॊणतीही असो, केवळ या श्लोकांवर ध्यान केंद्रित केल्यास व्यक्तीला अहंकारमुक्त अंतरात्मा प्राप्त करता येऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या मनःस्थितीनुसार, तो स्वतःचा मार्ग निवडू शकतो. दृष्टीकोन कोणताही असो, या श्लोकाचे मनन केल्यानेच अहंकारमुक्त विवेक प्राप्त होतो.
0 notes
nashikfast · 10 months ago
Text
चाळीसगाव, लोणी, मालेगाव येथील १६ गुन्हेगारांवर मोका!
नाशिक (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणूक आणि सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर संघटित गुन्हेगारीचा उपद्रव टाळण्यासाठी नाशिक परिक्षेत्रातील तीन टोळ्यांमधील १६ गुन्हेगारांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली. त्यात चाळीसगाव, लोणी आणि मालेगाव येथील टोळ्यांचा समावेश आहे. या कारवाईवर विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली असून, आदर्श…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 11 months ago
Link
सोनं तारण ठेऊन कर्ज घेताना फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या ! Take care of these things to avoid fraud in gold loan
0 notes
news-34 · 6 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक;१८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे
आणि
बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेच्या पाचव्या सामन्यात भारताला १४५ धावा��ची आघाडी
****
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दहा वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडे तीन पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
पी एम किसान सम्मान निधी से किसानों को करीब तीन लाख करोड रूपये की आर्थिक मदत दी गई है। पिछले दस वर्षों में कृषी लोन की राशी साढे तीन गुना हो गई है। अब पशु पालकों और मत्स्य पालकों को भी किसान क्रेडीड कार्ड दिया जा रहा है। देश मे मौजुद नौ हजार से ज्यादा एफ पी ओ, किसान उत्पाद संघ उन्हें भी आर्थिक मदत दी जा रही है।
****
देशाच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. चिदंबरम यांना पद्मश्री तसंच पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर च���दंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते आज नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे, हा निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याना पुण्यातून तर सिध्दार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ.संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती, या सर्व आरोपींना केज न्यायालयात आज हजर करण्यात आलं, न्यायालयानं या सर्वांना १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे –
नऊ डिस���ंबरला संतोष देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण, अमानुष मारहाण आणि हत्या केल्यापासून फरार असलेल्या सुदर्शन घुलेसह सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडी आणि एसआयटी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात चर्चेत असलेले बहुतांश प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत, त्यामुळे आता विशेष तपास पथक तसंच सीआयडीकडून तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, बीड
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले.
****
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी करायच्या कारवाईबाबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना वेगळी वागणूक देत असून याबाबतचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे.
****
लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे शासनाचे निर्देश नाही, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात करण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यीची रक्कम परत घेतल्याचं वृत्त प्रसार माध्यमातून पसरलं होतं, त्यासंदर्भात पापळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ही बाब स्पष्ट केली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामाचा राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज आढावा घेतला, महाजन यांनी पांडूरंगाचं सहकुटूंब दर्शन घेतलं, यावेळी मंदिर समितीच्या वतीने महाजन यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. पुरातत्त्व विभाग आणि संबधित कंत्राटदारानी संबंधित कामास गती देऊन वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना महाजन यांनी दिल्या. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर शहरचे पोलीस आयुक्�� एम राज कुमार यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आता जर्मन भाषेत एबीसीडीचे धडे गिरवत आहेत. महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या वर्षात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आकाशवाणीला सांगितलं. ते म्हणाले –
जर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे स्कोप पाहिजे असेल, तर त्यांना जर्मन भाषा येणं गरजेचं आहे. बेसिक जर्मन भाषा जर आपण मुलांना शिकवली तर मुलांना त्याच्यात आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाल्यानंतर ती मुलं निश्चित उच्च शिक्षण जर्मन भाषेतून घेतील म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी आमच्या शिक्षण विभागाकडून एक लिंक आली होती. जर जर्मन भाषा काही शिक्षकांना शिकायची असेल, तर ऑनलाईन ही शिकता येणार आहे. तर यासाठी जर्मनीमध्ये असलेले मिस्टर दावोस ऑनलाईन ट्रेनिंग घेतात. आमचे शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून ती भाषा शिकत आहेत. तेच शिक्षक आता शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला. तत्पूर्वी पहिल्या डावात भारतीय संघानं १८५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलिया संघ १८१ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात दिवसाअखेर सहा गडी बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत १४५ धावांची आघाडी मिळाली आहे.
****
भोपाळ इथं होत असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे मल्लखांब खेळाडू आज रवाना झाले. या स्पर्धा उद्या ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत. शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने सर आणि नांदेड जिल्हा मल्लखांब संघाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी संघाला शुभेच्छा दिल्या.
****
सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा २०वा दीक्षांत समारंभ येत्या १० जानेवारीला होणार आहे. यावेळी एकूण १५ हजार २९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाहतूक नि��मांचं पालन केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, असं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटलं आहे. ते आज हिंगोली इथं रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. अल्पवयीन तसंच कुणीही विनपरवाना वाहन चालवू नये, असं आवाहन उमाप यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी बोलतांना रस्ता सुरक्षा अभियानाशी निगडीत विविध कार्यशाळा, दुचाकी फेरी, नेत्र तपासणी शिबीरं तसंच, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं.
****
लातूर शहरात एका खाजगी रुग्णालयातले दिवंगत कर्मचारी बाळू डोंगरे यांच्या दोन्ही मुलांचं लातूर इथल्या केशवराज विद्यालयाने शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी याबाबतचं पत्र विद्यालयाला दिलं होतं, त्यानुसार केशवराज विद्यालयाने दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बाळू डोंगरे यांची ते काम करत असलेल्या रुग्णालयातच हत्या झाली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आज जुन्या कपड्यांचा आकर्षक बाजार भरवण्यात आला होता. परिसरातल्या गोरगरीब कुटुंबांसाठी हा बाजार वर्षभर पुरणाऱ्या कपड्यांची खरेदी करण्याचं ठिकाण म्‍हणून प्रसिध्द आहे. दरम्यान, माळेगाव यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धा, तसंच कृषी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज माळेगाव यात्रेत बक्षीस वितरण करण्यात आलं. उद्या कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
****
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष कायदा करण्यासाठी प्रयत्नशील : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे - महासंवाद
नाशिक, दि. 25 डिसेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :  शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सवर्कष स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मंत्री ॲड. कोकाटे यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
बिबट्याचा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी वनविभागाने सुचवलेले उपाय नक्की वाचा
बिबट्याचा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी वनविभागाने सुचवलेले उपाय नक्की वाचा
नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येत असून उसाची शेती हे प्रामुख्याने बिबट्याचे मुख्य अधिवास बनलेले आहे. संगमनेर , अकोले राहुरीसोबत ज्या ठिकाणी प्रामुख्याने उसाची लागवड केली जाते तिथे बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. वनविभागाचे सहाय्यक संरक्षक गणेश मिसाळ यांनी बिबट्यापासून संरक्षणासाठी काही उपाय सुचवले आहेत.  बिबट्यापासून संरक्षणासाठी काही उपाय ऊसतोड सुरू असताना मजुरांनी आणि…
0 notes
mhlivenews · 11 months ago
Text
शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे, वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: अल्पवयीन मुलांनी वाहने चालविणे धोकादायक असून, तो गंभीर गुन्हा आहे. मात्र, गरजेसाठी विद्यार्थांना वाहने चालवायचीच असतील, तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकी हा पर्याय आहे. शून्य अपघात आणि त्यापलीकडे जाऊन अपघात पूर्ण रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पार्किंगच्या जागेवरच पार्क करावीत यांसारख्या सूचना प्रादेशिक परिवहन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Alandi : संकल्प "पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा" ; आळंदी नगरपरिषदेमार्फत दीड दिवसांच्या 150 गणेश मूर्तींचे संकलन
एमपीसी न्यूज –  आळंदी नगरपरिषदेने समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा (Alandi ) व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे.  याचाच एक भाग म्हणून “माझी वसुंधरा अभियान 4.0” अभियाना अंतर्गत जल स्त्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरात एकूण 5 मूर्ती संकलन केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन नदी पात्रात न करता नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन…
0 notes