#छत्रपती संभाजीनगर न्यूज
Explore tagged Tumblr posts
Text
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार भूमिगत गटार योजना, मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार, मंजुरीची प्रतिक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराशी संबंधित तीन विधानसभा मतदारसंघात भूमिगत गटार योजनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी ते सरकारच्या विविध यंत्रणांकडे पाठवण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास महापालिकेला निविदा प्रक्रिया राबवणे शक्य होईल, असे मानले जात…

View On WordPress
#chhatarapati sambhajinagar#chhatrapati sambhajinagar underground sewerage#maharashtra governmnet#Underground sewerage scheme#छत्रपती संभाजीनगर न्यूज#भूमीगत गटारे#महाराष्ट्र सरकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परदेशी भारतीयांना राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान आज प्रदान करण्यात येणार आहे.
****
महाकुंभ २०२५ ला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. महाकुंभ जात, पंथ आणि भेदभावाच्या पलिकडे असून, एकतेचा संदेश देत असल्याचं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कुंभवाणी या वाहिनीवर आजपासून २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्यात होणाऱ्या अमृतस्नानासह सर्व कार्यक्रमांचं थेट प्रसारण केलं जाईल. आकाशवाणीच्या १०३ मेगाहर्टझ लहरींवरून, ‘न्यूज ऑन ए आय आर’ या ॲप वरून, तसंच ‘वेव्ज’ या ओ टी टी मंचावरून कुंभ वाणी चं प्रसारण ऐकता येईल.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी केली. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली. या महिन्याच्या १७ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, २० तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला एकाच टप्प्यात म��दान होणार असून, आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
****
एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटीक इनव्हेस्टमेंट प्लॅन्स अंतर्गत देशांतर्गत गुंतवणुकीनं डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच २६ हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. भारतीय म्युच्यूअल फंड संघटनेनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली. ओपन एडेंड इक्वीटी म्युचलफंड गुंतवणुकीतही वाढ होऊन ती ४१ हजार १५६ कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.
****
बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणाला एक महिना झाला असून, आरोपीला कठोर शिक्षा होईल असं सरकारच्या वतीनं वारंवार सांगण्यात येत आहे, मात्र अजूनही एका आरोपीला पकडण्यात आलं नसल्याचं सांगत सरकारचं याकडे लक्ष नसल्याची टीका दानवे यांनी केली.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं आयोजित कळस कृषी आणि डेअरी प्रदर्शनाचं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरवण्याची गरज आहे, अशा प्रदर्शनांना शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला पाहिजे यावर शासनाचा भर आहे, योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आली पाहिजे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात पदवी घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी येत्या सात फेब्रुवारीपर्यंत परीक्षा विभागात आवेदनपत्र दाखल करण्याचं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं आहे. विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ येत्या २२ फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमांच्या पदविका, पदवी, पदव्यूत्तर पदवी या समारंभात प्रदान करण्यात येतील. १४ जून २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान शोधप्रबंध पूर्ण करून, पीएच.डी प्राप्त करणारे संशोधकही या सोहळ्यात पदवी घेण्यासाठी आवेदन दाखल करू शकतात, असं विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन ��ंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी सांगितलं आहे.
****
एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या महागामी गुरुकुलाच्या वतीनं १७ ते २० जानेवारी दरम्यान शार्ङ्गदेव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात गायन, वादन आणि नृत्याच्या सादरीकरणासह कलांवतांचं विशेष व्याख्यान आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवाचं हे १६ वं वर्ष आहे.
****
नवी दिल्लीमध्ये येत्या १३ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय पुरूष संघात महाराष्ट्रातल्या पाच तर महिला संघात तीन खो-खोपटूंची निवड झाली आहे. पुरूष संघाच्या कर्णधारपदी पुण्याचा प्रतिक वाईकर आणि महिला संघाच्या कर्णधारपदी पुण्याचीच प्रियंका इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजकोट इथं सुरू असून, आयर्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आयर्लंड संघाच्या चार बाद १२४ धावा झाल्या होत्या.
****
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/muhurat-of-social-film-nirdhar-with-song-sound-recording/
0 notes
Text
Hinjawadi : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 74 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ;पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई
एमपीसी न्यूज – बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे (Hinjawadi)आमिष दाखवले. यातून हिंजवडी येथील एका व्यक्तीची 74 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथील टोळीला बेड्या ठोकल्या. साजिद शहा कासम शहा (वय 30), अभिजित रामराव श्रीरामे (वय 32, दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/on-the-occasion-of-tradition-the-struggle-between-life-and-tradition-will-be-reflected-on-the-silver-screen-on-26th-april-to-meet-the-audience/
0 notes
Text
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा…
View On WordPress
#आजची बातमी#आता#आताची बातमी#औरंगाबादचं#छत्रपती?#ठळक बातमी#ताजी बातमी#नाव#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#संभाजीनगर
0 notes
Text
जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय अधांतरी आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी…

View On WordPress
#bombay highcourt#chhatrapati sambhajinagar news#jayakwadi water dam#jayakwadi water distribution#Supreme Court#छत्रपती संभाजीनगर न्यूज#जायकवाडी धरण
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १० जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परदेशी भारतीयांना राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान आज प्रदान करण्यात येणार आहे.
महाकुंभ २०२५ ला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. महाकुंभ जात, पंथ आणि भेदभावाच्या पलिकडे असून, एकतेचा संदेश देत असल्याचं योगी आदित्यनाय यावेळी म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कुंभवाणी या वाहिनीवर आजपासून २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाईल. या वाहिनीवर अमृतस्नानाचं थेट प्रसारण देखील ऐकता येईल. आकाशवाणीच्या १०३ मेगाहर्टझ लहरींवरून, ‘न्यूज ऑन ए आय आर’ ॲप वरून, तसंच ‘वेव्ज’ या ओ टी टी मंचावरून कुंभ वाणी चं प्रसारण ऐकता येईल.
'परीक्षा पे चर्चा'च्या आठव्या आवृत्तीसाठी भारत आणि परदेशातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून दोन कोटी ७० लाखाहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी माय जी ओ व्ही डॉट इन वर सुरु असून, १४ जानेवारी पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे.
शाश्वत भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, २०३० सालापर्यंत ५० टक्के बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. जगभरात हरित ऊर्जेपासून बनवलेल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता, आपल्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा पुरेपूर लाभ घेण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं जोशी यांनी सांगितलं.
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल, विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनचं संयुक्त पथक नक्षली विरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे, असं पणनमंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पणन मंडळाच्या वतीनं आयोजित भरडधान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते. भरडधान्य जनजागृतीसाठी काढलेल्या दुचाकी फेरीलाही रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला. राज्याच्या विविध भागातून भरडधान्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगामध्ये ��ार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत.
राज्यात अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहायानं देखरेख ठेवणारी डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवायला कालपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरमंत्री नितेश राणे यांनी मुंबईतल्या आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. मुंबई शहरात ससून गोदी, मुंबई उपनगरात गोराई, ठाण्यात उत्तन, पालघरमध्ये शिरगाव, रायगड जिल्ह्यात वर्सोली आणि श्रीवर्धन, रत्नागिरीत भाट्ये आणि मिरकरवाडा, तसंच सिंधुदुर्गात देवगड, अशा नऊ ठिकाणी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पाच लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ६८ हजार ८९ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६५ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातल्या एक लाख १२ हजार ६४८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख, बीड जिल्ह्यातल्या ३९ हजार ९३ शेतकऱ्यांना ३० कोटी २२ लाख, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन हजार ६१९ शेतकऱ्यांना ३ कोटी २३ लाख, हिंगोली जिल्ह्यातल्या दोन हजार ४०८ शेतकऱ्यांना एक कोटी ६३ लाख, नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ८८६ शेतकऱ्यांना १ कोटी ५८ लाख, जालना जिल्ह्यातल्या एक हजार ५९० शेतकऱ्यांना १ कोटी ५७ लाख, तर धाराशिव जिल्ह्यातल्या ३४२ शेतकऱ्यांना ३२ लाख ५० हजार १४८ रुपये वि���रीत करण्यात आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात पूर्णा नदीकाठच्या विविध गावांमध्ये नागरिकांच्या डोक्यावरील केस गळतीचं प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आरोग्य विभागानं त्वचारोग तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केलं आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-राहुल गांधी यांची नांदेड इथं प्रचारसभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा सरकारला अधिकार नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय
आणि
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार���श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आज नवी मुंबई आणि मुंबईतही सभा होणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी नंदूरबार इथं आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, आणि अन्य पदाधिकारी आज शहरात दाखल होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी काल राज्यात जळगाव, तसंच दोंडाईचा इथंही सभा घेतल्या. उद्या ते हिंगोलीत प्रचार सभा घेणार आहेत.
****
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पालघर इथे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं प्रचार सभा झाली. यावेळी योगी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतले भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल भोकर इथं सभा घेतली, तर भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल लातूर इथं भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल लातूर इथं प्रचार सभा झाली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर बोलतांना, भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूरचे मविआ उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाट��जी इथे सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ��िंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राहता तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघात वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या.
****
विधानसभेची निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. काल सकाळी प्रसारित झालेल्यामुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
‘‘आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांच्याकडे ई व्ही एम बद्दल च्या चाळीस केसेस आत्तापर्यंत झ���लेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या चाळीसही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही एम टँपर करता येत नाही. त्याचा वापर योग्य आहे. आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. मतदारांनी स्वीकारलेलं आहे. त्याच ई व्ही एम चा वापर आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत.’’
दरम्यान, या सदरात येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं, ते म्हणाले…
‘‘लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासन तयार असून, आपल्याला बाहेरून चार कंपनीज् आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्षपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने, निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.’’
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त पंडित नेहरु यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छायाचित्रं तसंच चित्रफिती न वापरण्याच्या सूचना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कायकर्त्यांना देण्यात याव्यात, असं न्यायालयानं काल सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे.
****
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असं न्यायालयानं म्हटलं असून, या नोटीशीवर आरोपीनं पंधरा दिवसांच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांच्या भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी काल नियमावली जारी केली. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदतवाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिलक वर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं यजमान संघाचा ११ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं, भारतानं निर्धारित षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला. नाबाद १०७ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला चौथा सामना उद्या होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजून २२ मिनिटांनी कुरुंदा, पांगरा, कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वसमत तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यात यावं, पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झालं असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर ग्रामीण मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या गृहमतदानाच्या पहिल्या फेरीत ९४ टक्के मतदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आज गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे तर, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात उद्या, १५ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरू होईल.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधानसभा निवडणुकी��ले उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. येत्या २० तारखेला २८८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नऊ मतदार संघासाठी ४३७ उमेदवारांपैकी ३९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. जालना जिल्ह्यात २९६, बीड जिल्ह्यात ३७७, परभणी जिल्ह्यात दी़डशे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. लातूर जिल्ह्यात १९३, धाराशीव जिल्ह्यात १६४ उमेदरावांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात १८७ तर नांदेड जिल्ह्यात ४६० उमेदवारी अर्ज पात्र ठरले.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे ३६ तर महाविकास आघाडीचे २६ उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणूशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या आठ जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे, उद्या सोमवारी अर्ज मागं घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत अस���न देशाची संरक्षण निर्यात २०२९-३० पर्यंत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पासष्ठाव्या स्थापना दिवस समारंभात काल त्यांनी ही माहिती दिली. विकसित भारत हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं आवाहन संरक्षणमंत्र्यानी भारतीय तरुणांना यावेळी केलं. आयआयटी कानपूरसारख्या संस्था शैक्षणिक इंजिनं असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ती भारताला गतिशीलता प्रदान करू शकतात असं राजनाथ सिंह म्हणाले.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबईत सुरू तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज तिसऱ्या दिवशी अतिशय रंगतदार अवस्थ आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारतानं १४७ धावांचं लक्ष्य असताना सात बाद १२० धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनं यात ६४ धावा केल्या आहेत. झीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या डावात २६३ तर न्यूझीलंडनं २३५ धावा केल्या आहेत. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका न्यूझीलंडनं या पूर्वीच दोन-शून्य अशी जिंकली आहे.
लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप - एनएलएसटी उभारण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पाचं नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स - आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम करत आहेत. सूर्यावरील वैज्ञानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आयआयए नुसार, या दुर्बिणीमध्ये दोन मीटरचे प्रतिक्षेपक बसवलेले असतील. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यावर होत असलेल्या हालचाली समजून घेण्यास आणि संशोधन करण्यास मदत होईल.
दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पूर्वीची डीडी-मेट्रो ही वाहिनी अहोरात्र वृत्त वाहिनीमध्ये रुपांतरित करण्यात आली होती. दूरदर्शनच्या ३१ प्रादेशिक वृत्त वाहिन्या असून समाज माध्यमांवरही डीडी न्यूज अतिशय प्रभावीपणे सक्रिय आहे.
श्रीनगरमधील खानयार भागात सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी काल लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उस्मान याला एका चकमकीत ठार केलं आहे.
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/dimple-pagariya-won-the-post-of-maharashtra-womens-president/
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/dramatic-romantic-action-film-naad-the-hard-love-will-release-on-october-25/
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/the-first-look-motion-poster-of-reelstar-released-on-the-occasion-of-dussehra-reelstar-will-soon-be-seen-by-the-audience/
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/the-story-of-two-lovers-who-fall-in-love-will-unfold-in-the-film-rajarani/
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/atmosphere-of-excitement-in-dombivli-due-to-namo-ramo-navratri-festival/
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/on-the-occasion-of-navratri-festival-samosharan-vidhan-started-with-flag-hoisting/
0 notes