छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार भूमिगत गटार योजना, मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार, मंजुरीची प्रतिक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराशी संबंधित तीन विधानसभा मतदारसंघात भूमिगत गटार योजनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी ते सरकारच्या विविध यंत्रणांकडे पाठवण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास महापालिकेला निविदा प्रक्रिया राबवणे शक्य होईल, असे मानले जात…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
निरंतर प्रयत्न करुनच आपण स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण करु शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप आलं असून, करोडो लोकांनी स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षात स्वच्छता अभियानात सहभागी झालेले, पुढाकार घेतलेले नेते, नागरीक, धार्मिक तसंच स्वयंसेवी संस्था, खेळाडू, सिने अभिनेते आणि माध्यमांचेही त्यांनी आभार मानले.
आजपासून एक हजार वर्षांनंतर जेव्हा २१ व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातला सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
आज से एक हजार साल बाद भी जब भी इकसवी सदी के भारत का अध्ययन होगा, तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जायेगा। स्वच्छ भारत इस सदी में दुनिया का सबसे बडा और सबसे सफल जन भागीदारी वाला जन नेतृत्व वाला जन आंदोलन है।
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते नऊ हजार ६०० कोटी रुपये किमतीच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. यामध्ये अमृत योजना, स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन आणि १५ काँप्रेस्ड बायोगॅस संयंत्र योजनांचा समावेश आहे. या योजना स्वच्छ भारत मिशनला नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
देशात आतापर्यंत ८० लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करण्यात आला असून, यामुळे पर्यायाने कचऱ्याची विल्हेवाट लागून स्वच्छता अभियानाला हातभार लागत असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छतेचं महत्व सांगताना गडकरी यांनी नागरिकांना, स्वतः चांगल्या सवयी आत्मसात करण्याचं आवाहन केलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५व्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत महात्मा गांधीजींचं समाधीस्थळ राजघाट इथं प्रार्थना सभा घेण्यात आली.
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री याची देखील आज जयंती. राष्ट्रपती द्रौपदी मूर्म, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन, गांधी चौक इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज गांधी स्मारक निधी, सृजन सांस्कृतिक मंच आणि भारतीय विद्यार्थी महासंघाच्या वतीने, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक जयदेव डोळे यांचं, ‘सत्याशी असत्याचा सामना - अर्थात गांधीजी आणि फेक न्यूज’ या विषयावर व्याख्यान झालं. स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी गांधींनी लोकांना, सत्याग्रह, अहिंसा, खादी, असहकार चळवळ आदी उपक्रम दिले, त्यामुळे जगभरातल्या वृत्तपत्राचं गांधीकडे लक्ष होतं, असं डोळे यांनी सांगितलं.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून व्यसनमुक्त गाव मोहिमेला प्रारंभ होत आहे. हदगाव तालुक्यातल्या शिऊर इथं पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या चारही जिल्ह्यात तंटामुक्त गाव समित्या देखील स्थापन होणार आहेत.
****
पुण्यातल्या बाधवन परिसरात आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यात दोन वैमानिकांसह एका अभियांत्रिकाचा समावेश आहे. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅड वरून या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटातचं ही घटना घडली. दाट धुकं असल्यामुळे हा अपघात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड- मनमाड- नांदेड ही रेल्वे दहा तारखेपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तसंच बल्लारशा-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी ३१ डिसेंबर पर्यंत दादर ते मुंबई सी.एस.एम.टी. दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
Hinjawadi : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 74 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ;पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई
एमपीसी न्यूज – बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे (Hinjawadi)आमिष दाखवले. यातून हिंजवडी येथील एका व्यक्तीची 74 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथील टोळीला बेड्या ठोकल्या.
साजिद शहा कासम शहा (वय 30), अभिजित रामराव श्रीरामे (वय 32, दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.…
0 notes
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता.
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा…
View On WordPress
0 notes
जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय अधांतरी आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी…
View On WordPress
0 notes