#घटनेनं
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान-मराठवाड्यात जालना, बीड ,औरंगाबाद लोकसभा मतदार संघासह राज्यातल्या ११ मतदार संघांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथले दोन तरुण पाच पिस्तुलांसह धुळ्यात जेरबंद
अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला छत्रपती संभाजीनगरात अटक
आणि
नांदेड इथं अवकाळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू-लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यातही पावसाची हजेरी
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ९६ मतदारसंघांत, आज मतदान होत आहे. यात मराठवाड्यातल्या जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघासह, राज्यातल्या पुणे, शिरुर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या एकूण ११ मतदारसंघाचा समावेश आहे.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्रासह, छायाचित्र असलेली ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवता येणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र, कामगार आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, मनरेगा रोजगार ओळखपत्र, छायाचित्रासह बचत खातेपुस्तक, आदी पुराव्यांचा समावेश आहे.
मतदारांना मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. त्याशिवाय मोबाइल एसएमएसद्वारे ��तदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये, इंग्रजीत ई सी आय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून, १९५० या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तत्काळ पाठवला जातो.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन हजार ८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला नुकताच प्रारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन केलं...
नमस्कार, औरंगाबाद लोकसभा मतदार संघ व जालना लोकसभा मतदारसंघामधये मतदानाला प्रारंभ झालेला आहे. माझं समस्त मतदार बंधू भगीनींना विनम्र आव्हान आहे जो मतदानाचा अधिकार आपल्याला घटनेनं दिलेला आहे त्या अधिकारांचा वापर करा, आपलं कर्तव्य पार पाडा, आणि मतदान केंद्रावर जावून मतदान आवश्य करा.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात १७ हजार ७४० अधिकारी कर्मचारी जिल्ह्यातल्या तीन हजार ८५ मतदान केंद्रांचं संचालन करत असून, सुमारे तीन हजारावर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा राखीव पथकात समावेश आहे. जिल्ह्यात अकरा पर्यावरणस्नेही मतदान केंद्रं आहेत.
बीड लोकसभा मतदार संघातल्या दोन हजार ३५५ मतदान केंद्रापैकी एक हजार १७७ मतदान केंद्राचं थेट प्रक्षेपण म्हणजेच वेब कास्टिंग होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांसह महिला मतदारांच्या बालकांसाठी पाळणाघरांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या एक हजार ३६ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, मतदान केंद्राध्यक्षांना विविध माहितीची नोंद ठेवण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने अभिनव कल्पना राबवली आहे. या तिन्ही लोकसभा मतदार संघातल्या विशेष व्यवस्थेचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला संक्षिप्त आढावा...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदार संघांपैकी औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम तसंच वैजापूर, गंगापूर आणि कन्नड या सहा विधानसभा मतदार संघातले २० लाख ५९ हजारावर मतदार औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी तर फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड या तीन विधानसभा मतदार संघातले १० लाख पाच हजारावर मतदार जालना लोकसभा मतदार संघात मतदानाचा हक्क बजावत आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात जिल्हा प्रशासनाकडून यंदा प्रथमच, मतदान पथकांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पी एम एस 24 या मोबाईल ॲपचा वापर केला जात आहे.
हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी बातम्यांसाठी छत्रपती संभाजीनगर
***
बीड लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ३५५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये शहरी भागात १७४ तर ग्रामीण भागात १ हजार ३०५ असणार आहे. ग्रामीण भागातल्या २२ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्कची सुविधा नसल्याने तिथल्या मतदान केंद्र अध्यक्षांना जिल्हा प्रशासनाने संपर्कासाठी वॉकी टॉकी ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातल्या ५० टक्के मतदान केंद्रावरून वेब कास्टिंग केलं जाणार असून, जिल्ह्यातली ५५ महिला मतदान केंद्रं, ११ दिव्यांग संचलित मतदान केंद्रं तर २२ युवा अधिकाऱ्यांकडून संचलित मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर २१ लाख ४२ हजार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
आकाशवाणीसाठी बीड हून रवी उबाळे
**
मतदान केंद्राध्यक्षांना मतदान केंद्रावर विविध महत्त्वपूर्ण कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात. यामध्ये मतदान पथकास सर्व साहित्य मिळालं का, मतदान यंत्रांची जोडणी झाली का, अभिरूप मतदान करून पाहिलं का, मतदान प्रक्रिया वेळेवर सुरू झाली का, आवश्यक सर्व अहवाल तयार केले का, अशा विविध माहितीसह सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाची टक्केवारीही लेखी स्वरुपात नोंदवावी लागते. जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या नोंदींसाठी वेगळी संकल्पना राबवली आहे. मतदान पथकाला दिलेल्या पाणी थंड ठेवणाऱ्या बाटल्यांवर या सगळ्या नोंदी मार्करद्वारे करता येणार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेतला कोणताही टप्पा सुटण्याची शक्यता नाही. जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या या नवीन प्रयोगाचं भारत निवडणूक आयोगानेही कौतुक केलं आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के जालना
****
पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. शेवाळे यांनी काल धुळे इथल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण ‘मुंबई वायव्य’ लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही ऐकता येईल.
****
धुळे जिल्ह्यात काल दोन जणांना पाच गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर तालुक्यात कामखेडा फाट्याजवळ सापळा लावला होता, यावेळी मध्यप्रदेशातून दुचाकीवरून येणाऱ्या दोघा संशयितांना थांबवलं असता, त्यांनी दुचाकी सोडून पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं. या दोघांपैकी एक जण छत्रपती संभाजीनगरचा तर दुसरा जालना इथला रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी अवैध गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याचा प्रकात काल उघडकीस आला. साक्षी थोरात असं या तरुणीचं नाव असून काल सापळा रचून त��च्यासह सहा जणांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला. याठिकाणी चाचणीसाठी आलेल्या एका गर्भवतीसह १२ लाख ७८ हजार रुपयांची रोकड, दहा मोबाईल, टॅब, पोर्टेबल मशीन आदी साहित्य जप्त करण्यात आलं.
****
नांदेड शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसात हदगाव तालुक्यात धानोरा इथं शेतात काम करणारे वृद्ध शेतकरी देवराव वानखेडे यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय विविध ठिकाणी वीज कोसळून पाच बैलांसह इतर पशुधनही दगावलं आहे.
लातूर जिल्ह्यात निलंगा, औसा तालुक्यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यांमुळे औसा तालुक्यातल्या किल्लारी-लामजना परिसरात काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने या भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
धाराशिव जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. उमरगा तालुक्यात या पावसामुळे अनेक गावात नदी नाले वाहते झाले, मात्र आंबा कांदा यासह अनेक फळ बागा आणि पिकांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेले दोन दिवस पाऊस झाला. यामुळे ग्रामीण भागात आंबा आणि डाळींब बागांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
येत्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट तर परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. उद्या १४ मे रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून, बीड जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. या का��ात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, तसंच गारांसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
जागतिक परिचारिका दिवस काल सर्वत्र साजरा झाला. आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत हा दिवस साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात या निमित्तानं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. हिंगोलीतही शासकीय नर्सिंग महाविद्यालयात परिचारिका दिवस साजरा झाला. नांदेड जिल्ह्यात वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर ग्रामीण रुग्णालयातही फ्लोरोन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
समाजाच्या उन्नतीसाठी जी माणसं झिजली त्यात गोविंदभाई श्रॉफ यांचं नाव अग्रस्थानी असून, कर्तृत्व भावनेतून साक्षरता अभियानाकडे पाहण्याची व्या��क दृष्टी गोविंद भाईंकडे होती, असं प्रतिपादन, ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं, 'साक्षरता अभियानातून कौशल्याचा ध्यास-पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ', या पुस्तकाचं प्रकाशन कांबळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
0 notes
Text
पोटाची खळगी भरण्यासाठी छ. संभाजीनगरात, तिसऱ्या मजल्यावरच्या घटनेनं तिघांचं आयुष्य बदललं
https://bharatlive.news/?p=97002 पोटाची खळगी भरण्यासाठी छ. संभाजीनगरात, तिसऱ्या मजल्यावरच्या घटनेनं ...
0 notes
Text
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या
परभणी : परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेनं खळबळ उडालीय. (MNS city chief killed in Parbhani) किरकोळ…

View On WordPress
0 notes
Text
Suicide : संतप्त कुटुंबीयांनी सासरच्यांच्या घरासमोरच केल मुलीचा अत्यसंस्कार
#Suicide : संतप्त कुटुंबीयांनी सासरच्यांच्या घरासमोरच केल मुलीचा अत्यसंस्कार #Madha #Solapur #Police #Crime
Suicide : सोलापूर (दि २ मे २०२२) प्रतिनिधी : एका विवाहितेनं आत्महत्या केली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात खळबळजनक घटना घडली. विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली.दरम्यान, तिच्या सासरकडच्यांनी विवाहितेची हत्या केली आणि मग तिचा मृतदेह विहिरीत टाकला, असा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केलाय. माढा तालुक्यातील मिटकलवाडीमध्ये घडलेल्या या घटनेनं सगळ्यांना धक्का बसला आहे. संतप्त मुलीच्या…

View On WordPress
0 notes
Text
डोळ्यात अश्रू पण तरीही ती बिथरली नाही ;
डोळ्यात अश्रू पण तरीही ती बिथरली नाही ;
११ सुवर्णपदकं जिंकून बिपीन रावत यांना वाहिली श्रद्धांजली देशातील पहिले CDS बिपिन रावत हे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. त्यांच्यासोबत पत्नी मधुलिका रावत यांचेही या अपघातात निधन झालं. या घटनेनं संपूर्ण देशभरात शोककळा पसरली.त्याचवेळी रावत यांची भाची व राष्ट्रीय नेमबाज बांधवी सिंह हीनं ११ सुवर्णपदकांची कमाई केली. तिनं ही सर्व सुवर्णपदकं काका बिपिन रावत ��णि इतर शहिदांना समर्पित केली. बांधवी ही…

View On WordPress
0 notes
Text
Auction for the Post of Sarpanch: नाशिक जिल्ह्यातील एका गावात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली - auction for the post of sarpanch in nashik deola
Auction for the Post of Sarpanch: नाशिक जिल्ह्यातील एका गावात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली – auction for the post of sarpanch in nashik deola
नाशिक: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Auction for the post of Sarpanch) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे चक्क सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला आहे. त्यासाठी…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 14 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेलं उपोषण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतलं. उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी शिष्टमंडळासह मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. शासनाची भुमिका स्पष्ट असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं.
सरकारनं यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं परंतु, सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. रद्द झालेलं मराठा आरक्षण पुन्हा मिळावं आणि ते टिकावं हीच सरकारची भुमिका आहे. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी दाखवल्या, त्यावर सरकार काम करीत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाला मुख्यमंत्री न्याय देतील, ही अपेक्षा असून उपोषण सुटलं तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
****
हिंदी भाषा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी भाषा, राष्ट्रीय एकता आणि सदभावनेचा धागा नेहमीच मजबूत करत राहणार असल्याचं पंतप्रधान���ंनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदी भाषेचं महत्त्व लक्षात घेऊन, भारतीय घटनेनं हिंदीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन आज सकाळी हिंदी दिनानिमित्त केलेल्या भाषणात ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांना एकत्र आणण्याचं काम हिंदी भाषेनं केलं. आपल्या भाषा हा आपला सांस्कृतिक ठेवा असून भाषाप्रगत झाल्यास देशाचीही प्रगती होते. हिंदी अधिक सशक्त करण्यसाठी प्रयत्न केले पाहिजेत तसंच सरकारी कार्यालयांनी हिंदी भाषेचा वापर वाढवावा असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं.
****
संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवार पासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा होईल, त्यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण याविषयी सदस्य आपले विचार मांडतील. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचं विधेयक सरकारनं सूचीबद्ध केलं असून त्यावर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसंच विधीज्ञ सुधारणा विधेयक, नियतकालिकांचे प्रेस आणि नोंदणी विधेयक आणि टपाल कार्यालय विधेयकांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे, राज्यसभेनं त्यांना यापूर्वी मंजुरी दिली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाराणसी इथं कालपासून शाश्वत वित्त कार्यगटाची चौथी जी- ट्वेन्टी बैठक सुरू आहे. या बैठकीत २०२३ च्या अहवालाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. आज बैठकीच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी जी - ट्वेन्टी शाश्वत वित्त आलेखावर चर्चा सुरू राहणार आहे. या बैठकीत जी ट्वेन्टी सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या ८० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
दरम्यान, मुंबईत आज आर्थिक समावेशन संबंधित जागतिक भागीदारीसाठीची चौथी जी २० बैठक सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी २० देशांचे, विशेष आमंत्रित देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे ५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहे.
****
मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ म्हाडा मार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद-आजारी गिरण्यांमधील यापूर्वीच्या सोडतीमध्ये अयशस्वी दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती आजपासून वांद्रे इथल्या म्हाडा मुख्यालयात करण्यात येत आहे. राज्यातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे प्रत्यक्ष तसंच म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येणार असल्याचं म्हाडाच्या वतीनं सां��ण्यात आलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोमधल्या आर प्रेमदासा मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्या संघाची रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघासोबत लढत होईल.
****
आय एस एस एफ नेमबाजी आणि रायफल विश्वचषक स्पर्धेला आजपासून ब्राझीलमधील रिओ दि जनेरो इथं सुरूवात होत आहे. या स्पर्धेत सोळा सदस्य असलेल्या भारतीय पथकाचं नेतृत्व ऑलिंपिकपटू सौरभ चौधरी आणि अंजुम मौदगील करणार आहेत. १८ ते २७ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेची अंतिम फेरी दोहा इथं होणार आहे. भारतीय नेमबाजांनी या वर्षात आतापर्यंत झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत सात सुवर्ण, चार रौप्य आणि बारा कांस्य अशी एकूण २३ पदकं जिंकली असून भारत सध्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
Text
अंगावर काटा आणणारा ‘दिल्ली बस’चा ट्रेलर प्रदर्शित....
अंगावर काटा आणणारा ‘दिल्ली बस’चा ट्रेलर प्रदर्शित….
‘निर्भया बलात्कार’ प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवलं होतं. १६ डिसेंबर २०१२ झाली दिल्लीतील चालत्या बसमध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कारनं मानवतेला काळीमा फासला होता. देशाची राजधानी महिलांसाठी सुरक्षित आहे का ? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला होता. या घटनेनं संपूर्ण देश पेटून उठला होता.
आजही ही घटना ऐकताना अंगावर तितकाच काटा येतो. या संपूर्ण घटनेवर आधारित ‘दिल्ली बस’ चित्रपट पुढील वर्षात…
View On WordPress
0 notes
Text
बारचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न, गस्तीवर असलेल्या कॉन्स्टेबलच्या पोटावर वार; मुंबईतल्या घटनेनं खळबळ
https://bharatlive.news/?p=86063 बारचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न, गस्तीवर असलेल्या कॉन्स्टेबलच्या पोटावर ...
0 notes
Text
फक्त स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून कसं चालेल ?
नवीन लेख- देश स्वातंत्र्य होऊन ७१ वर्षे पूर्ण होताहेत. नेहमीप्रामणे याही वर्षी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होईल, राष्ट्रगान होईल, सर्वजन एकमेकांना शुभेच्छा देतील. आपल्या राष्ट्रध्वजाचे स्टीकर आपल्या खिश्याला लावतील. आणि भाषणे देवून तीन रंगाचे फुगे आकाशात सोडले जातील. होय, आनंद आहे! भारताचा प्रत्येक स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण 'चिरायु होवो' म्हणत आपल्या स्वार्थापोटी आपण आपल्या स्वातंत्र्यचा, लोकशाहीचा घात तर करत नाही ना हेसुद्धा तपासण्याची गरज आहे. स्वातंत्र्य मिळाले, राज्यघटना आली त्यानुसार ७१ वर्षे प्रशासनही चालले. तरीही आपल्यासमोर स्वातंत्र्याच्या निगडीत बरीच संकटं आहेत, म्हणजेच आपण राज्यघटना स्वत:हून अर्पण करतो याचाच अर्थ असा असतो की आम्ही एक नागरिक म्हणून घटनात्मक मुल्यांना जोपासण्याचे जबाबदारी घेत आहोत. जी जबाबदारी खूप मोठी असते, जी आम्ही देवावर किंवा कोणा अचिंत्य शक्तीवर सोपवत नाही आहोत. त्यात जे नमूद असेल त्या घटकांनाच धरून आम्ही आपण आपले स्वातंत्र्य आत्मसात करत असतो आणि जगत असतो. आज आपण पाहत आहोत स्वातंत्र्यदिनी फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो आणि एक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा होत असतो. स्वातंत्र्य होवून जी वर्षे सरली आहेत त्याचा आपण स्वतःहून मागोवा घेतो का? आपली घटना आपल्याला समता, बंधुता देते किंबहुना या समतेच्या तत्वाचे सरकारलाही भान असते काय? याचेही उत्तर नकारार्थी येते. भलेही आज आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असलो तरी या स्थितीतल्या शिखविरोधी हिंसक दंगली असोत अथवा गुजरातमधील मुस्लिमांचा संहार असो, कारण काहीही असले तरीही, ते शासकीय प्रेरणांनी केल्या जावेत, हे कोणत्या स्वातंत्र्याचे किंवा प्रजासत्ताकचे लक्षण आहे? दलित गोहत्या करतात म्हणून त्यांना अमानुष मारहाण झाली, मूलं पळवण्याच्या टोळी समजून लोकांचा जीव घेण्यात आला? कोरेगांव-भीमा मध्ये झालेली दगडफेक? हेच आपल्या घटनेनं आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे का? आंबेडकर म्हणाले होते, जातीभेद नष्ट झाल्याशिवाय देशाचा सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य नाही, परंतु आजचे चित्र स्वातंत्र्यपूर्व जसे होते त्यापेक्षाही विचित्र दिसत आहे. जातिभेद नष्ट होण्याऐवजी आणखी घट्ट होताना दिसत आहे. आपण या महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या जेवढ्या नाचत-वाजत साजऱ्या करतो त्याऐवजी ��्यांचे विचार अमलात आणले तर तेच खऱ्या जयंत्या-पुण्यतिथ्याच साजरीकरण ठरेल. आपल्या महापुरुषांना आपण डोक्यावर घेतो परंतु आपण त्यांना कितपत डोक्यात घेतो ? ७१ वर्षानंतरही अनेक जातीसमुहाला आरक्षण, कर्जमाफी मागण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना पिकाच्या हमीभावासाठी भांडावं लागतं, या सगळ्या कारणासाठी वेळोवेळी मूक किंवा हिंसक आंदोलनेही होतात. खरचं आपण महासत्तेच्याच वाटेवर चालत आहोत कि विनाशाच्या असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. "यह आझादी झुठी है, देश कि जनता भुकी है!" १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबईतील मोर्चात आण्णाभाऊ साठे गर्जले होते, हे आपल्याला आजही तितकेच सत्य विधान दिसेल. कारण एकविसावे शतक आणि भारत जे सामतोलात्मक चित्र दिसायला पाहिजे होते, आज ते चित्र दिसत नाही. ७१ वर्षानंतरही आमच्या देशासमोर स्त्री-भ्रुण हत्या, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, स्त्री अत्याचार, जातीवाद, दहशतवाद, प्रांतवाद, भाषावाद असे भले भले प्रश्न तोंड आ असून उभे आहेत. आज हा भारतीय भारतीयत्वाचीच व्याख्या विसरला आहे, यासाठी आज शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर पुन्हा येणार नाहीत, आमच्या खांद्यावरचा भार हलका करायला याचेही भान आम्हा असले पाहिजे. आम्ही क्रिकेट नेहमीच जिंकत असतो खरे, परंतु ओलम्पिकमध्ये भारताचे स्थान काय? काश्मीरचा प्रश्न कसा सुटणार? सैनिक शहीद होण्याचे कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबणार? आपल्या देशाला विज्ञानवादी लोकांनी ग्रासायला हवे होते, तिथे आज धर्मवादी लोकांनी ग्रासले आहे. यातूनच कट्टरता वाढत जात आहे. अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत विज्ञान क्षेत्रातील संशोधनात किती भारतीय आहेत? यावरही विचार करून हे प्रमाण आपण ७१ वर्षात वाढवलं काय? असे अनेक प्रश्न आजही आहेत. देशाचा जितका पैसा भ्रष्टाचाराखाली गुंतला आहे, तितकाच पैसा दैववादाखालीही गुंतला आहे. धार्मिक द्वेष आणि इतर भरकटलेल्या मार्गावरच आपले तरुण मनुष्यबळ आपण आज वाया घालवत आहोत. आम्ही गुलामगिरीतून बाहेर पडलेल्या, भारतासारख्या बलाढ्य आणि स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून प्रतिनिधित्व करत आहोत. खालच्या पातळीपासून ते अगदी अंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपली दखल घेण्याइतपत आपण स्वतः देशासाठी सकारात्मक धडपडत राहिलं पाहि��े, त्यासाठी आपण कायमच झपाटून गेलेलं असलं पाहिजे. जसे कि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू चंद्रशेखर आझाद यांना वेड लागले होते स्वातंत्र्याचे, तसेच आपणही वेडे होवूयात या स्वातंत्र्यला सार्थी करण्यासाठी. यातूनच खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्याचे सार्थक होईल. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत-घेत असता प्रत्येक नागरिकाने स्वत:प्रत अर्पण केलेल्या संविधानाबाबत जागरुक रहायला हवे. आपल्या आचरणात तसेच राष्ट्रीयत्व आणायल हवे! अन्यथा आभासी स्वातंत्र्याचा आरोप आम्हीच सिद्ध करु आणि मग आमच्या राष्ट्रप्रेमालाही केवळ भावनिक सोडला तर वास्तवातही काहीच अर्थ राहणार नाही. स्वतःच्या समाधानास्तव आजून किती दिवस तीच खोटी गाणी रेटून गाणार? कारण सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा!' म्हणण्याऐवजी 'सारे जहाँ से सच्चा हिन्दोस्ताँ हमारा!' असे म्हणणे मला योग्य वाटते! http://feedproxy.google.com/~r/GaneshAtkale/~3/kN3fiw68boY/blog-post_13.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ गणेश अत्कले
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मराठा समाजातर्फे जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या उपोषणस्थळी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी आपल्या शिष्टमंडळासह जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून आरक्षणाच्या मुद्यावर सध्या चर्चा सुरु आहे.
****
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात कोकेरनाग इथं दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत काल तीन उच्च पदस्थ अधिकारी हुतात्मा झाले आहेत. यामध्ये कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौंचक आणि पोलिस उपअधिक्षक हुमायून भट यांचा समावेश आहे.
****
आज हिंदी भाषा दिन. हिंदी भाषेचं हे महत्त्व लक्षात घेऊन, भारतीय घटनेनं हिंदीचा 'राजभाषा' म्हणून स्वीकार केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन आज सकाळी हिंदी दिनानिमित्त केलेल्या भाषणात ते बोलत होते.
****
आर्थिक समावेशन संबंधित चौथी जी-ट्वेंटी जागतिक भागीदारीसाठीची बैठक आज मुंबईत सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी-ट्वेंटी देशांचे, विशेष आमंत्रित देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे ५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
****
वाशिमच्या शिरपूर इथले सैनिक आकाश आढागले यांच्या पार्थिव देहावर काल शिरपूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आढागले हे लेह इथं कर्तव्यावर असतांना हुतात्मा झाले.
****
सातारा महामार्गावरच्या शिरवळजवळ मोटेवस्ती इथं काल रात्री माल ट्रक आणि आयशर टॅम्पो यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. टेम्पोनं उभ्या ट्रकला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. अपघातामुळं पुण्याकडं जाणारी वाहतूक तासभर खोळंबली होती.
****
साताऱ्यातील पुसेसावळी इथं झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तब्बल ७२ तासांनी काल मध्यरात्रीनंतर टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात आली. तणावाच्या स्थितीनंतर इंटरनेट सेवा रविवारी रात्री बंद करण्यात आली होती.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 12 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १२ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
****
ठळक बातम्या
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातकडून वैध
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला, तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध
बहुमत चाचणी संदर्भात राज्यपालांनी घेतलेले निर्णय घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण
सर्वोच्च न्यायालयानं आपल्या सरकारवर शिक्कामोर्तब केल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा तर नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी
नियम आणि घटनात्मक पालन करुन आमदार अपात्रते संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
महिलांच्या पुर्नवसनासाठी राज्यात पन्नास ठिकाणी शक्ती सदन सुरु करणार
आय एल ॲण्ड एफ एस या कंपनीतल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर नऊ गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विश्वासदर्शक ठरावाचा दिलेला आदेश अयोग्य होता, मात्र त्यापूर्वीच तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची दिलेली शपथ सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवली आहे.
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं एकमतानं निकाल देताना, ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्यानं, त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा आदेश देऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत निकाल द्यावा, अशी सूचनाही न्यायालयानं केली. बहुमत चाचणी घेण्यासाठी राज्यपालांकडे कुठलेही ठोस पुरावे नव्हते, विरोधी पक्षांनी कुठलाही अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला नव्हता, त्यामुळे राज्यपालांनी याप्रकरणी घेतलेला निर्णय घटनाबाह्य असल्याचं निरीक्षण, सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. पक्षांतर्गत वादावर निर्णय देण्यासाठी बहुमत चाचणी हा पर्याय ठरु शकत नाही, घटनेनं किंवा कुठल्याही कायद्यानं राज्यपालांना दोन राजकीय पक्ष किंवा पक्षांतर्गंत वादात हस्तक्षेप करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
शिवसेनेच्या काही आमदारांनी कुठंही सरकारचा पाठिंबा काढण्याचं म्हटलं नव्हतं. त्यांनी सुरक्षेच्या बाबतीत निर्माण केलेल्या शंका म्हणजे सरकारचा पाठिंबा काढला असं होत नाही, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. विधीमंडळ पक्षाला नव्हे, तर राजकीय पक्षाला प्रतोद नेमण्याचा अधिकार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं या निकालात स्पष्ट केलं. त्यामुळे शिंदे गटानं भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नेमणूक न्यायालयानं अवैध ठरवली असून, अध्यक्षांनी प्रतोद आणि विधीमंडळ पक्षनेत्याबाबतचा निर्णय शिवसेनेच्या घटनेनुसार चौकशी करुन घ्यावा, असे निर्देश दिले. आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. अपात्रतेची याचि���ा प्रलंबित असलेल्या आमदारांना वेगळा गट स्थापन केल्याचा बचाव करता येणार नाही, असंही न्यायालयानं सांगितलं.
शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात केवळ विधिमंडळातल्या संख्याबळाची कसोटी लावणं अशा प्रकरणात निरुपयोगी आहे, निवडणूक आयोगानं १० व्या सूचीनुसार आणि पक्ष चिन्हासंदर्भातल्या आदेशातल्या पं��राव्या परिच्छेदानुसार निर्णय दिला पाहिजे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. यासाठी निवडणूक आयोगानं त्यांच्यासमोर असलेले मुद्दे आणि परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.
दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेसह राजधानी दिल्ली क्षेत्रातल्या सर्व सेवांवर दिल्ली सरकारचं नियंत्रण असेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. मात्र जमीन, पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित सेवांना यामधून वगळलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं आपल्या सरकारवर शिक्कामोर्तब केलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं काल निकाल दिला. त्यावर प्रतिक्रीया देण्यासाठी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईत पत्रकार परिषद घेतली, ते म्हणाले,
आम्ही सरकार जे स्थापन केलं. ते पूर्णपणे कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता करुन आम्ही सरकार स्थापन केलं. आणि बहुमताचं सरकार स्थापन झालं आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. अनेक लोक यापूर्वी घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार अशा प्रकारे म्हणून मानसिक समाधान आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. परंतू त्यांना आज सुप्रीम कोर्टाने एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चांगली चपराक दिली आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांना घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलेलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले,
मला असं वाटलं की, ज्यांना सगळं देऊन सुद्धा हपापलेली लोकं ही माझ्यावरती अविश्वास ठराव आणणार आणि त्यांच्या हापापल्यापणावर मी पुरेसा पडू शकणार नाही. कारण आणखी काय देणार तर अशा लोकांनी माझ्यावर अविश्वास ठराव दाखवणे हे मला मंजूर नव्हतचं, ते मंजूर नाही मी कदापीही ते मान्य करणार नाही. म्हणून मी राजीनामा दिला. जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. तसं एव्हढं आता सर्वोच्च न्यायालयानं फटके दिल्यानंतर जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा. आणि निवडणुकीला सामोरं जावं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला असून, आपलं सरकार घटनात्मक ठरवलं असल्याचं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खुर्ची करता विचार सोडला, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी विचाराकरता खुर्ची सोडली असं ते म्हणाले. ठाकरे यांनी नैतिकतेपोटी नाही तर भिती आणि लाजेपोटी राजीनामा दिला होता अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
****
नियमांचं पालन करुन घटनात्मक बाबींच��� विचार करत आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. ते लंडन दौऱ्यावर असून तिथून त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना काल ही प्रतिक्रीया दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. घटनात्मक लोकशाहीला बळकट करणारा हा निर्णय आहे, असंही नार्वेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले,
यात त्यांनी स्पष्टपणे इंटरप्रिटेशन दिलंय शेड्युल टेनचं. आणि असं म्हटलंय की पॉलिटीकल पार्टीचं व्हीप ॲप्लीकेबल व्हायला पाहिजे. असं झाल्यानंतर पॉलिटीकल पार्टी नेमकी त्या क्षणी कोणत्या गट म्हणजे कोणती पॉलिटीकल पार्टी याला रीकनाईज करायला पाहिजे, यासंदर्भातला पण निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं या जजमेंटमध्ये नमूद केलं गेलं आहे. येणाऱ्या काळात आपण योग्य ती सुनावणी घेऊन यावरती निर्णय घेऊ.
****
राज्यातलं शिंदे - फडणवीस सरकार हे घटनाबाह्य रित्या स्थापन झाल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं दिलं आहे, त्यामुळे नैतिकता बाळगून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन पदावरून पायउतार व्हावं, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्याच्या इतिहासात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नैतिक भूमिका म्हणून तत्कालीन परिस्थितीत आपल्या मुलीच्या गुणवत्ता वाढीवरून झालेल्या आरोपावरून राजीनामा दिला होता. तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयानं शिंदे -फडणवीस यांनी ज्या प्रकारे सरकार स्थापनेसाठी पद्धत वापरली ती पूर्ण अयोग्य असल्याचा निर्णय दिला आहे, असंही दानवे म्हणाले.
****
राज्यकर्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयानं तीव्र भूमिका मांडली आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालासंदर्भात दिली आहे. नैतिकता आणि भारतीय जनता पक्षाचा काही संबंध आहे, असं वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय अद्याप यायचा असून राज्यपाल या प्रकरणी चुकलेच, असं मत पवार यांनी व्यक्त केलं.
****
शिंदे सरकार वाचलं तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्यानं विधानसभेतल्या शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे, असं ते म्हणाले. हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात केलेली कृती चुकीची होती. यात घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली, हे राज्यातल्या जनतेला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं असल्यचं पाटील म्हणाले.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर, नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरिक्षणानंतर, भारतीय जनता पक्ष स��्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे सिद्ध झालं असल्याचं ते मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी निपक्षपातीपणे घेणं अपेक्षित असल्याचं पटोले यांनी सांगितलं.
****
राज्यातलं शिंदे - फडणवीस सरकार हे घटनात्मकरित्या स्थापन झालं असल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झालं असल्याची प्रतिक्रीया भारतीय जनता पक्षाचे प्���देशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकारांशी बोलत होते.
****
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याकरता ही भेट होती, असं नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादवही या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते.
****
महिलांच्या पुर्नवसनासाठी राज्यात पन्नास ठिकाणी शक्ती सदन सुरु करणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत नेरुळ इथं महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सावली या प्रकल्प इमारतीचं उद्घाटन, निर्भया पथकाचं लोकार्पण काल फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या शक्तीसदनात पिडीत महिलेला तीन वर्ष राहता येणार असून, त्यांना विशेष भत्ता दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात पुढल्या सहा महिन्यांत सर्व पोलीस ठाण्यांत महिला सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचं, पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी यावेळी जाहीर केलं.
****
इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस - आय एल ॲण्ड एफ एस या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालय - ईडीनं नोटीस बजावली आहे. त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.
****
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा काल छत्रपती संभाजीनगर इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात अला. केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, खासदार इम्तियाज जलिल, मंत्री अतुल सावे, उद्योजक राम भोगले यावेळी उपस्थित होते. आपली संस्कृती, मानवी संवेदना, संकटात मदत करण्याची मानसिकता, ही आपली ताकद असून, त्यामुळे आपली लोकशाही यशस्वी होत असल्याचं बिर्ला यावेळी म्हणाले.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं प्रवरा, वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या ११ व्या दीक्षांत समारंभात सहभागी झाले होते.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर नऊ गडी राखून विजय मिळवला. कोलकाताच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १४९ धावा केल्या. राजस्थानच्या संघानं केवळ १३ षटकं आणि एका चेंडूत हे आव्हान पूर्ण केलं.
****
जिगिषा या नाट्यसंस्थेच्या ४०व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं चार दिवसीय नाट्य सहवास महोत्सव��ला काल माजी खासदार जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यानिमित्त दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांची प्रकट मुलाखत झाली. या महोत्सवात आज साहित्य आणि नाटकातील स्त्री या विषयावर अभिवाचन होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीप्रकरणी भरारी पथकांनी, कृषी केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करावा, जिल्ह्यात शेतकऱ्यांना विनाविलंब वीज जोडणी द्यावी आणि पीक कर्ज देतांना शेतकऱ्यांची अडवणूक करु नये अशा सूचना सावंत यांनी यावेळी संबंधित अधिकार्यांना यावेळी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणं आणि खतं वाटप व्हावेत असे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीत ते काल बोलत होते. पालकमंत्री संदीपान भुमरे यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात खतं, बियाणं उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना भूमरे यांनी दिल्या. बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित विभागानं घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातली, प्राध्यापक भरती मान्यता प्रक्रिया ’ऑनलाईन’ करण्याचा निर्णय, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या प्रक्रियेमुळे सर्व कामकाजात पारदर्शकता, गतीमानता आणि सूसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे वेळेची आणि कागदाचीही बचत होणार असून, सर्व प्रकारची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
****
हिंगोली इथं संत नामदेव हळद बाजारात काल नऊ हजार क्विंटल हळदीची आवक झाली. हळदीला पाच हजार २०० ते सहा हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पाच दिवसांपासून बंद असलेल्या बाजारातील खरेदी- विक्री व्यवहार कालपासून पुन्हा सुरु झाले.
****
0 notes
Text
पांढऱ्या रंगाच्या पोत्यात बॉडी, डोक्याला जखम, हातावर 'मंगला'; छ. संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
https://bharatlive.news/?p=85919 पांढऱ्या रंगाच्या पोत्यात बॉडी, डोक्याला जखम, हातावर 'मंगला'; छ. ...
0 notes
Text
Noida Crime News : खंडणीचा प्लॅन फसल्याने चिमुकलीची हत्या; संतापजनक घटनेनं राजधानी हादरली
https://bharatlive.news/?p=85838 Noida Crime News : खंडणीचा प्लॅन फसल्याने चिमुकलीची हत्या; संतापजनक घटनेनं राजधानी ...
0 notes
Text
तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनं पुणे हादरलं दिराकडून वहिनीसह दोन चिमुकल्यांची हत्या
https://bharatlive.news/?p=82021 तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनं पुणे हादरलं दिराकडून वहिनीसह दोन ...
0 notes