#गेले;
Explore tagged Tumblr posts
Text
आभाळंच फाटलं कुठं कुठं शिवणार ? सासू सासरे दिंडीला गेले अन..
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नगर तालुक्यातील आठवड गावच्या शिवारात एका महिलेने मुलासोबत शेतात उडी घेत आत्महत्या केलेली आहे. 23 तारखेला शुक्रवारी दुपारी ही घटना घडलेली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कोमल राजेंद्र नवले ( वय 25 वर्ष ) आणि यश राजेंद्र नवले ( वय आठ दोघेही राहणार आठवड ) अशी त्यांची नावे असून कोमल यांच्या पतीचे���

View On WordPress
#अहमदनगर बातम्या अपडेट#गुन्हेगारीच्या बातम्या#नगर बातमी अपडेट#व्हायरल बातम्या#सासू सासरे दिंडीला गेले
0 notes
Text
मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले...
मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ही सगळी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्याला त्यांच्या गावी निघून गेल्याची आणखी एक वदंता राजकीय वर्तुळात पसरली आहे.…
View On WordPress
#bjp#changing maharashtra cm to replace eknath shinde#cm eknath shinde#maharashtra cm change guard#maharashtra politics#Sanjay Raut#Uday Samant#उदय सामंत#एकनाथ शिंदे गावी निघून गेले#महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली
0 notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे ले��कांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच क��ी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरह��रोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.

तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात��र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)

मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)


तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )


हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.


मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )


अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथ��्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून ��ेखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
मोहम्मदजीं चा मोक्ष नाही झाला!
फरिश्ते जिबराईल मोहम्मदजी ना खेचरा वर बसवून वर घेऊन गेले. जिथे त्यांनी हजरत मुसा, इसा, आणि इब्राहिम जी यांना बघितले. या वरून हे सिद्ध होते की त्यांचा पण मोक्ष नाही झाला आहे, तर मुस्लिम समाजातील लोकांचा मोक्ष कश्याप्रकारे संभव आहे?

23 notes
·
View notes
Text
लोकसंख्या: ६,२००,००० (6,200,000)
भाषा: मराठी (Marathi)
Credit to @oneparticularharbor for the translation. धन्यवाद!
11 notes
·
View notes
Text

परमेश्वर कबीर जी सहशरीर सतलोकात कसे गेले पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
4 notes
·
View notes
Text
49. स्थितप्रज्ञा ही आंतरिक घटना आहे
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञ हा स्वत:बद्दल समाधानी असतो (2.55). यातील गंमतीचा भाग असा की स्थितप्रज्ञ चालतो-बोलतो कसा या अर्जुनाच्या प्रश्नाला मात्र श्रीकृष्ण काहीच उत्तर देत नाही.
‘स्वत:बद्दल समाधानी’ ही पूर्णपणे अंतर्गत प्रक्रिया आहे आणि बाह्य वर्तनावरून तिचे अनुमान किंवा आकलन अजिबात शक्य नाही. एखाद्या परिस्थिती अज्ञानी मनुष्य आणि स्थितप्रज्ञ सारख्याच भाषेत बोलू शकतो, एकसारखाच चालू–वागू शकतो. या परिस्थितीमुळे आपल्या मनात स्थितप्रज्ञतेबद्दल अधिकच गुंतागुंत निर्माण होते.
कृष्णाचे आयुशःय हे स्थितप्रज्ञतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तो जन्मत:च आपल्या पालकांपासून दूर झाला. ‘त्याला ‘माखनचोर’ म्हणून ओळखले गेले. त्याचे प्रेम, नृत्य आणि बासरी या सगळ्यांच्या कथा झाल्या, मात्र जेव्हा त्याने वृंदावन सोडले त्यानंतर तो या प्रेमासाठी कधीही परत आला नाही. गरज होती तेव्हा तो लढला आणि जीवही घेतले, पण विविध वेळी त्याने युद्ध टाळले आणि त्यातून त्याला रणछोडदास असेही नाव मिळाले. त्याने अनेक चमत्कार दाखवले आणि मित्र म्हणूनही तो सर्वोत्तम होता. लग्न करायची वेळ आली तेव्हा त्याने ते केले, कुटुंब सांभाळले, चोरीचा खोटा आळ नष्ट करता यावा म्हणून समंतक मणी त्याने शोधून आणला आणि गीतेचे ज्ञान सांगायची वेळ आली तेव्हा ते ही केले. एका सामान्य माणसासारखा त्याचा मृत्यू झाला.
सर्व प्रथम, त्यांच्या जीवनाची रचना वर्तमानात जगण्याची आहे. दुसरे म्हणजे, कठीण परिस्थितीतही ते आनंदाचे आणि उत्सवाचे जीवन आहे, कारण त्याने अडचणींना अनित्य मानले. तिसरे, श्लोक 2.47 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्यासाठी स्वतःवर समाधानी असणे म्हणजे निष्क्रियता नाही, तर कर्तात्वाची भावना आणि कृतीच्या परिणामाची अपेक्षा सोडून कृती करणे असा होतो.
मूलत:, भूतकाळाचे ओझे मनावर न घेता आणि भविष्याकडून कोणतीही अपेक्षा न करता वर्तमान क्षणात जगायला हवे. या वर्तमान क्षणात शक्ती आहे आणि नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सगळे काही याच वर्तमान क्षणात घडत असते.
2 notes
·
View notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.

या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढ��. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.

देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.

अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
Bandya : अरे यार लाइट गेले.
Pradip : लाइट गेले आहेत, तर पंखा चालू कर.
Bandya : बोललास ना मूर्खासारखं,
पंखा चालू केला तर मेणबत्ती विझणार नाही का?
🤦♂️🤦♂️🤦♂️😩😩😩😎😎😎😉😉😉🤣🤣🤣
2 notes
·
View notes
Video
तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लग्न केले गेले, बलात्कार केला गेला, जबरदस्त...
2 notes
·
View notes
Text
जेष्ठ नागरिकांना मिळणार या सुविधा मोफत पहा नवीन अपडेट Senior citizens new update
Senior citizens new update भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच आदराचे स्थान दिले गेले आहे. आपल्या समाजात वृद्ध लोकांचे अनुभव, ज्ञान आणि मार्गदर्शन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु आधुनिक काळात, अनेक ज्येष्ठ नागरिक विविध समस्यांना सामोरे जात आहेत – आर्��िक अनिश्चितता, आरोग्य समस्या, सामाजिक एकाकीपणा आणि इतर अनेक आव्हाने. या समस्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे…
0 notes
Text



कापूस अवशेष व्यवस्थापन आणि जलदिन कार्यक्रम
दि. २० मार्च २०२५ रोजी केदारवडगाव (ता. नायगाव) येथे कापूस अवशेष व्यवस्थापन आणि जलदिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्कृति संवर्धन मंडळ, WDF प्रोजेक्ट आणि कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. डॉ. प्रियंका खोले Priyanka Khole यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना कापूस अवशेष व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले. अवशेष जाळण्याऐवजी त्याचे जैविक विघटन करून मातीची सुपिकता वाढवण्याचे फायदे सांगण्यात आले. त्यासोबतच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून या उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आणि जलदिनानिमित्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच पाणी बचतीचे, पाणी अडवा पाणी जिरवा व जलसंधारणाचे विविध उपाय सांगितले गेले. कार्यक्रमात गावातील शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना जलसंधारण व अवशेष व्यवस्थापनाबद्दल माहितीपत्रके वाटण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी WDF प्रोजेक्ट केदार वडगाव स्टाफने विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित सर्वांनी पर्यावरण व जलसंपत्तीचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली. #कापूसअवशेषव्यवस्थापन #जलदिनकार्यक्रम #केदारवडगाव #नायगाव #शेतकरी #जलसंधारण #पर्यावरण #कृषीविज्ञानकेंद्र #WDFप्रोजेक्ट #cotton #CottonResidueManagement #WaterDay #Kedarwadgaon #Naigaon #Agriculture #Farmers #Environment #WaterConservation #SoilFertility #SustainableAgriculture #WDFProject #awareness
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे दोन लाख सौर उर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी
येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन
सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव-कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेश
धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा-जालन्यात हत्तीरिसाला परंपरेचा उत्साह तर विड्यातली जावयाची गर्दभस्वारी यंदा स्थगित
आणि
महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना
****
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात १० मार्च २०२५पर्यंत एकूण १० लाख ९ हजार सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच २०२६-२७ पर्यंत १ कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश च���द्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचं सूतोवाच केलं होतं. येत्या पाच वर्षात नवीकरणीय ऊर्जा ��्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचे एकूण वितरणातलं प्रमाण १३ टक्क्यांवरुन ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
यूएफबीयू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या २४ आणि २५ मार्च रोजीच्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे. रिक्त पदांवर भरती, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशन सोबत युएफबीयूची चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्यानं, संप करण्यावर ठाम असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.
****
जागतिक ग्राहक हक्क दिन आज पाळण्यात येत आहे. ग्राहकांचे हक्क आणि त्यांची सुरक्षा अबाधित ठेवणं, ग्राहकांच्या मूलभूत हक्कांना चालना देणं तसंच या हक्कांचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणं, या उद्देशाने हा दिवस पाळण्यात येतो. शाश्वत जीवन शैलीसाठी न्यायोचित परिवर्तन ही या वर्षीच्या ग्राहक हक्क दिनाची संकल्पना आहे.
****
ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. पितांबर सरोदे यांचं काल नंदुरबार इथं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. सरोदे यांची ३० हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. आकाशवाणीच्या जळगाव आणि धुळे केंद्रावरून त्यांनी पन्नासहून अधिक व्याख्यानं आणि चर्चासत्रामध्ये भाग घेतला होता.
****
सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिध्देश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक वर्गीय पक्षी दगावले होते, या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु झालं आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. खोल खड्डा खोदून मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने करण्याचही सूचित करण्यात आलं आहे.
****
भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने काल रात्री एक अंतराळ यान अवकाशात पाठवलं. सुनिता आणि बूच विल्मोर हे दोघं अंतराळवीर गेल्या वर्षी जून महिन्यात आठवडाभरासाठी अंतराळ स्थानकावर गेले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून ते तिथेच अडकून पडले आहेत.
****
जर्मन भाषा मराठीतून शिकता यावी यासाठी बालभारतीने जर्मन कोर्सबुक म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात जर्मन उच्चार देवनागरी लिपीतून देण्यात आले आहेत.
****
धुलिवंदनाचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं, त्यानुसार बहुतांश भागात नागरिकांनी कोरड्या रंगाने धुलिवंदनाचा सण साजरा केल्याचं पहायला मिळालं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील आदिवासींची प्रसिद्ध असलेली राजवाडी काठीची होळी काल पहाटे साडे पाच वाजता प्रज्वलित करण्यात आली. या अनोख्या होलिकोत्सवासह राज्यभरातल्या धुलिवंदन सोहळ्याचा हा संक्षिप्त वृत्तांत.
‘‘ईसवीसन १२४२ मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवाना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी विविध रुपं धारण करून पारंपारिक वेशभुषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरतकांना दिसून आले, पुढचे पंधरा दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो.
**
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथं संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी खेळण्यात आली. या उत्सवात गावकरी दोन चमू तयार करून हुतुतू खेळतात. हरणाऱ्या चमूतल्या खेळाडूंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येते. गावाच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, ही यात्रा मंदिराच्या परिसरात आल्यावर गोटमार म्हणजेच दगड मारण्याचा खेळ सुरू होतो. एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते.
दरम्यान, यवतमाळ मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारीक लेंगी नृत्य सादर झालं.
**
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. या पारंपारिक उत्सवात राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्याचा आनंद घेतला.
**
जालना शहरातील पारंपरिक धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणूक उत्साहात पार पडली. या मिरवणुकीचं हे १३६ वे वर्ष आहे. हत्तीवर बसलेल्या राजा-प्रधानाची मिरवणूक ज्या भागातून गुलालाची उधळण करत जाते, त्या भागातील नागरिक रंग खेळणं थांबवतात, असा प्रघात आहे. खासदार कल्याण काळे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह हत्ती रिसाला समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या मिरवाणुकीत मोठ्या संख्यने सहभाग घेतला.
**
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुळवडीच���या निमित्तानं शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विड्याच्या ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.
**
छत्रपती संभाजीनगर इथं आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत - इस्कॉन संघटनेच्या वतीनं काल गौर पौर्णिमा उत्सव साजरा झाला. अनेक बांधव या सोहळ्यात सहभागी झाले.
दरम्यान, नांदेड इथं शीख बांधवांचा होलामोहल्ला सोहळा आज साजरा होणार आहे.
****
महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.
दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे.
****
ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल, भारताचा लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. तर, महिला दुहेरीत त्रिषा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा गाभारा आणि सभामंडप काल द्राक्षांनी सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. ही द्राक्षं नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली.
****
पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. यापूर्वी वर्ष २०२० मध्येही रासायनिक लेपन करण्यात आलं होतं. अशा पद्धतीने वारंवार लेपन केल्यास, मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक लेपनास तीव्र विरोध असल्याचं महासंघानं म्हटलं आहे.
दरम्यान, मंदिराच्या जतन-संवर्धन-जीर्णोद्वाराचं काम यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी - पाच जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावं अशी मागणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे. याकामाच्या आढाव्यासह टोकन पध्दतीने दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत झालेल्या आढावा बैठ���ीत ते बोलत होते.
****
0 notes
Text

समुद्राने पाच वेळा जगन्नाथपुरी चे मंदिर तोडल्यानंतर कोणाच्या आशीर्वादाने ते मंदिर पुन्हा बांधले गेले पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
3 notes
·
View notes
Text
C.T.Bora Collage : सी टी बोरा कालेज समोरील मैदानातुन काय चोरीला गेले? https://www.satyashodhaknews.com/c-t-bora-collage-moter-cycle-chori/

#news#marathi news#breaking news#maharashtra news#satyashodhaknews#shirurtaluka#crime news#article#ai tools#artificial intelligence
0 notes