#कोविड से निधन
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० मे  २०२३ सकाळी ७.१० मि.
ठळक बातम्या
गेल्या नऊ वर्षात महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि आदिवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा दावा
केंद्र सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं आजपासून विशेष संपर्क अभियान
ग्रामीण भागातल्या पाणंद रस्त्यांचं ग्रामीण मार्गात रुपांतर करण्याचा राज्य सरकारचा विचार
चंद्रपूरचे काँग्रेस पक्षाचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे निधन 
राज्यात प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
महाराष्ट्रात निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करण्याचं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन 
वीजबील आणि इतर देयकांपोटी दोन हजार रुपयांचं चलन ३० सप्टेंबर पर्यंत स्वीकारण्याचा महावितरणचा निर्णय
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर चौकार मारत चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद
सविस्तर बातम्या
गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारनं महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि आदिवासींसाठी आणलेल्या विविध योजनांमुळे, या सर्वांच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, त्या काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामांची माहिती दिली. आज देशातल्या साडेतीन कोटी लोकांना पक्की घरं मिळाल्यामुळे त्यांना अभिमानानं जीवन जगता येत आहे, ११ कोटी ७२ लाख शौचालयांच्या बांधकामांमुळे माता भगिनिंना प्रतिष्ठा मिळाली, १२ कोटी लोकांना नळ पाणी योजनेचा लाभ मिळाल्यामुळे, पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये लक्षणीयरित्या घट झाली, कोविड काळात ८० कोटी लोकांना मोफत शिधा मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
या नऊ वर्षातले तीन वर्ष कोविड -19, युक्रेन युद्ध अशा घटनांमुळे मोठी आव्हानंही उभी राहिली होती, असंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या...
Byte…
नौ साल उसमे तीन साल एकदम कोविड की वजह से सेकंड वेव्ह की वजह से और रशिया युक्रेन वॉर की वजह से अनसर्टनिटीज बहुत बढा। और स्ट्रीक्टली टू बी फेअर नौ साल मे ये तीन साल गिनना भी नही है। उतना चॅलेंजेस सिर्फ भारत के लिये नही पुरी दनिया मे हुआ।
आयुष्यमान भारत योजनेचा अनेक गरजुंनी लाभ घेतल्याचं सीतारामन म्हणाल्या. यावेळी उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले, मात्र मोदी सरकारवर एकही डाग नसल्याचं सांगितलं.
****
दरम्यान, केंद्र सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून ३० जून पर्यंत भारतीय जनता पक्षाचं विशेष संपर्क अभियान होणार आहे. या आभियानात जिल्हा मंडळ, शक्ती केंद्र, बूथ स्तरावर विशेष कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेरमध्ये उद्या यानिमित्त होणाऱ्या रॅलीला संबोधित करून या अभियानाची सुरुवात करतील. सरकारची धोरणं आणि उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. या दरम्यान भाजपा नेते वेगवेगळ्या राज्यांचे दौरे करून रॅली तसंच पत्रकार परिषदा घेणार आहेत.
****
एन व्ही एस वन, या दिशादर्शक उपग्रहाचं, काल सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण करण्यात आलं. जीएसएलव्ही एफ 12 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे, हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हा उपग्रह  भारतीय नक्षत्र दिशादर्शक मा��िकेचा एक भाग असून, निरीक्षण आणि दिशादर्शक क्षमता प्रदान करणं हे याचं उद्दिष्ट आहे. दोन हजार २३२ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह भारतीय नक्षत्र मालिकेमधला दुसऱ्या पिढीतला पहिला दिशादर्शक उपग्रह आहे. या उपग्रहाला येत्या दोन दिवसांत निर्धारित पातळीपर्यंत नेण्यासाठी कक्षा वाढवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या माहितीचा वैयक्तिक आणि धोरणात्मक कामासाठी वापर केला जाईल. या मोहिमेमुळे केवळ नक्षत्र मालिकाच नव्हे तर स्वदेशी बनावटीचं रुबिडियम घड्याळ कार्यान्वित करणाऱ्या इतर तीन देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे.
****
येत्या तीन वर्षात औष्णिक कोळश्याची आयात शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल भारतीय तंत्रज्ञान संस्था- आयआयटी मुंबईत खाण उद्योगातल्या स्टार्टअपच्या पहिल्या शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. खाण उद्योगामधून मिळणाऱ्या महसूलातून केंद्र सरकार समाजातल्या दुर्बल घटकांना मदत करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. स्टार्टअपनं तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी काही ठरावीक निधी राखून ठेवावा, असं आवाहन त्यांनी केलं. गेल्या नऊ वर्षांत देशात चाळीस टक्क्याहून अधिक कोळशाचं  उत्खनन झाल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या खनिज क्षेत्रात अमर्यादित संधी उपलब्ध असल्याचं खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी यावेळी सांगितलं. या परिषदेत ८२ स्टार्ट अप आणि १४० प्रतिनिधी सहभागी झाले होते.
****
देशातल्या काही बॅंकांमधल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते काल भारतीय रिझर्व्ह बँकेनं मुंबईत आयोजित केलेल्या बँकांच्या संचालकांच्या परिषदेत बोलत होते. भारतीय रिझर्व्ह बँकेला काही बँकांच्या प्रशासनामध्ये तफावत आढळून आली असून, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात अस्थिरता निर्माण होऊ शकते, असं ते यावेळी म्हणाले. बँकेच��या संचालक मंडळानं आणि व्यवस्थापकांनी ही तफावत निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणं आवश्यक असल्याचं दास म्हणाले.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी पाणंद रस्ते गरजेचे असल्यानं, या रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतरित करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करत असल्याचं, ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मुंबईत राज्यातल्या पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सार्वजनिक ��ांधकाम विभागातले अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात रस्त्याच्या अभावा��ुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते, त्यामुळे येत्या काळात पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे दिल्ली इथं निधन झालं, ते ४७ वर्षांचे होते. धानोरकर यांची प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना काल विशेष विमानानं दिल्लीच्या वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यावेळी तेही रुग्णालयात होते. वडिलांच्या अंतीम संस्कारासाठी ते भद्रावती येथे जाऊ शकले नाहीत. शुक्रवारी नागपूरमध्ये त्यांच्यावर मूतखड्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्यानं त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
धानोरकर हे राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्यापूर्वी ते २०१४ मध्ये वरोरा - भद्रावती विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. धानोरकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी वरोरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.
****
विविध नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढत असून, प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावं, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची काल मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या महापालिकांनीसुद्धा त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथकं तयार करावीत, असं सांगत, राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधी प्रभावीपणे खर्च करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले..
Byte..
मोठ्या प्रमाणावर पाऊस असेल, सगळ्या नियोजनाच्या दृष्टीने त्याच्यावरही चर्चा झाली. आणि शेतकऱ्यांना देखील वेळेवर सगळे संदेश, त्यांना अलर्ट आणि माहिती गेली पाहिजे यासाठी सगळ्यांनी अलर्ट राहीलं पाहिजे. आणि कुठेही सकल भागात पाणी साचलं तर ताबडतोब त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे. एखाद्या गावाचा पुरामुळे जर संपर्क तुटला तर त्या ठिकाणी अन्नधान्य, औषधं सगळी जी काही अत्यावश्यक व्यवस्था आहे ती करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत.
****
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स या संस्थेच्या जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. काल मुंबईत संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त पदाची निवडणूक घेण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. संस्थेच्या नव्यान�� तयार करण्यात आलेल्या नियमावलीला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं मान्यता दिली असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं. ही नियमावली नवी दिल्लीच्या भारत स्काऊट्स आणि गाइडच्या राष्ट्रीय कार्यालयाला पाठवण्यात आल्याचं महाजन म्हणाले.
****
नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून येतात, मग महाराष्ट्रात का नाही, याचा विचार करून कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी काम करावं, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते शिर्डी इथं आयोजित रिपाइंच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. रिपाइं फक्त सत्तेबरोबर जाणारा पक्ष नसून, सत्ता हस्तगत करणारा पक्ष आहे. आम्ही ज्यांच्यासोबत उभे राहिलो तो पक्ष सत्तेत येतोच, मग तो काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, ही किमया फक्त आणि फक्त रिपाइं पक्षातच आहे, असं ते म्हणाले. सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्येही रिपाइंची भुमिका मसत्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यकर्त्यांनी आपले आमदार निवडून येण्यासाठी शिस्तबद्ध काम करावं, असं आवाहन आठवले यांनी केलं. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे किंवा इतर ठिकाणी न जाता माझ्या सोबत भाजप कडे यावं, आम्ही दोघांनीही भाजपाशी युती केली तर समाजाला सत्तेचा मोठा लाभ मिळवून देता येईल, असं ते म्हणाले.
****
मुंबई मेट्रो मार्ग दोन अ आणि सात ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासी विमा कवच लागू करण्याचा निर्णय, महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळानं घेतला आहे. यानुसार मुंबई मेट्रो, या दोन मार्गांवरच्या सर्व प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा पॉलिसी देणार आहे. महा मुंबई मेट्रोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली. प्रवासादरम्यानच्या संभाव्य जोखमीचा तपशीलवार आढावा घेऊन ही योजना राबवली जाणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. या विमा योजनेनुसार प्रवासा दरम्यानच्या अनपेक्षित दुर्घटनेमुळे बाधित प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यावर जास्तीत जास्त एक लाख रुपये, तर बाह्यरुग्णांसाठी १० हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळेल.
****
औरंगाबाद जिल्ह्यात येत्या खरिप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे आणि खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, त्याचं वितरण आणि विक्री सुयोग्य पद्धतीनं व्हावी  यासाठी कृषि विभाग, वितरक आणि संबंधित यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावं, अशी सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. कृषि विभागाच्या निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी, खाजगी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत २७ जूनला होणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी काल ही माहिती दिली. यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ आणि मार्च-एप्रिल २०२२ या वर्षातल्या पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. तसंच १९ नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत पीएच.डी प्राप्त करणाऱ्या संशोधकांना दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात येईल.
****
वीजबील आणि इतर देयकांपोटी दोन हजार रुपयांचं चलन ३० सप्टेंबर पर्यंत स्वीकारणार असल्याचं, महावितरणनं काल जाहीर केलं. ग्राहकाचं वीजबिल जेवढ्या रक्कमेचं राहिल तेवढ्या रक्कमेच्या दोन हजार रूपयांच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. या दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी कोणतंही बंधन राहणार नसल्याचं महावितरण कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
****
चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करत पाचव्यांदा इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत दहा धावांची गरज होती, रवींद्र जडेजानं षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत चार गडी गमावून २१४ धावा केल्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचं लक्ष्य मिळालं. रवींद्र जडेजानं शेवटच्या चेंडूत रोमहर्षक विजय मिळवला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज परिसर तसंच वैजापूरसह ग्रामीण भागात काल सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. औरंगाबाद शहरातही काल संध्याकाळी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येडशी इथं वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, येत्या ४८ तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या योजनांची अंमलबजावणी परस्पर समन्‍वयानं करावी, असं आवाहन, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या समन्‍वय सभेत काल त्या बोलत होत्या. गावस्‍तरावर शासकीय योजनांची प्रचार-प्रसिद्धी करण्‍यासाठी, स्‍वयंसेवी संस्‍थेसह किर्तनकार, महाराज, मौलवी तसंच भंते आदींचा सहभाग घेतल्‍यास कामाला गती मिळेल असं त्या म्हणाल्या.
****
0 notes
loktantraudghosh · 2 years ago
Text
नही रहे कॉमेडी के बादशाह अभिनेता-निर्देशक सतीश कौशिक..
सी. एल. जैन – – जाने-माने अभिनेता और निर्देशक सतीश कौशिक का गुरुवार तड़के निधन हो गया। उन्होंने 66 साल की उम्र में इस दुनिया को अलविदा कहा। सतीश कौशिक महामारी के दौरान कोविड से संक्रमित भी हुए थे। अनुपम खेर ने ट्वीट किया, जानता हूं ‘मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!’ पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त सतीश कौशिक के बारे में लिखूंगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था। 45 साल की दोस्ती पर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
krazyshoppy · 3 years ago
Text
कोरोना काल में हुए अनाथ, नहीं मिला मुआवज़ा, अब बहन ने भाई की जिम्मेदारी के लिए छोड़ दी पढ़ाई
कोरोना काल में हुए अनाथ, नहीं मिला मुआवज़ा, अब बहन ने भाई की जिम्मेदारी के लिए छोड़ दी पढ़ाई
Gujarat News: अहमदाबाद जिले के ढोलका के पास चालौदा की रहने वाली 18 वर्षीय ध्रुवी पटेल को 2021 में 11वीं कक्षा से बाहर कर दिया, क्योंकि उसकी मां का कोविड से निधन ह�� गया था जिसके बाद उसने अपने भाई तुषार को पढ़ाने की ज़िम्मेदारी ली. लेकिन अब इस साल अपनी कक्षा 12 की बोर्ड परीक्षा में शामिल हो सकती हैं. कोरोना ने केवल इस परिवार को ही नहीं प्रभावित किया है बल्कि ऐसे कई परिवार हैं. मां की कोविड से मौत के…
View On WordPress
0 notes
lok-shakti · 4 years ago
Text
अपने मानवीय स्पर्श के लिए पूर्वी दिल्ली में घरेलू नाम डॉ तारा, कोविड की मृत्यु हो जाती है
अपने मानवीय स्पर्श के लिए पूर्वी दिल्ली में घरेलू नाम डॉ तारा, कोविड की मृत्यु हो जाती है
कोविड के खिलाफ दो महीने की लड़ाई के बाद, पूर्वी दिल्ली के मयूर विहार में एक घरेलू नाम डॉ प्रदीप तारा का शुक्रवार को निधन हो गया। एक सामान्य चिकित्सक और छाती विशेषज्ञ, डॉ तारा ने 1980 के दशक में मयूर विहार में अपना अभ्यास स्थापित किया, और इस क्षेत्र के सबसे प्रसिद्ध डॉक्टरों में से एक बन गए। उन्हें मई में कोविड से संबंधित जटिलताओं के साथ इंडियन स्पाइनल इंजरी सेंटर में भर्ती कराया गया था और…
View On WordPress
0 notes
praveenpradhan254121 · 4 years ago
Text
"शो मस्ट गो ऑन," डॉ केके अग्रवाल, जो कोविड से मर गए, अपने अंतिम वीडियो में से एक में
“शो मस्ट गो ऑन,” डॉ केके अग्रवाल, जो कोविड से मर गए, अपने अंतिम वीडियो में से एक में
इंडियन मेडिकल एसोसिएशन के पूर्व अध्यक्ष डॉ केके अग्रवाल का कोविड से निधन हो गया। इंडियन मेडिकल एसोसिएशन के पूर्व अध्यक्ष और पद्म श्री से सम्मानित डॉक्टर केके अग्रवाल का कल रात कोविड-19 से निधन हो गया। लगभग दो हफ्ते पहले, डॉ अग्रवाल ने एक फेसबुक वीडियो साझा करते हुए घोषणा की थी कि जब वह कोविड और निमोनिया से जूझते हुए भी कैमरे पर दिखाई दिए तो उन्होंने चिकित्सा पेशे की सामूहिक चेतना का प्रतिनिधित्व…
View On WordPress
0 notes
asr24news · 4 years ago
Text
पर्यावरणविद सुंदरलाल बहुगुणा का कोरोना संक्रमण से निधन
पर्यावरणविद सुंदरलाल बहुगुणा का कोरोना संक्रमण से निधन
70 के दशक में गौरा देवी तथा कई अन्य लोगों के साथ मिलकर जंगल बचाने के लिए चिपको आंदोलन की शुरूआत की थी देहरादून। प्रसिद्ध पर्यावरणविद और चिपको आंदोलन नेता सुंदरलाल बहुगुणा का शुक्रवार 21 मई 2021 को एम्स, ऋषिकेश में कोविड-19 से निधन हो गया। वह 94 वर्ष के थे । उनके परिवार में पत्नी विमला, दो पुत्र और एक पुत्री है । नौ जनवरी, 1927 को टिहरी जिले में जन्मे बहुगुणा को चिपको आंदोलन का प्रणेता कहा जाता…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
bhaskarhindinews · 4 years ago
Text
सिंगर अरिजीत सिंह की मां का निधन, कोरोना संक्रमित होने के बाद चल रहा था इलाज
Tumblr media
देशभर में कोरोना की दूसरी लहर ने तबाही मचा रखी है। मौत का सिलसिला रुकने का नाम ही नहीं ले रहा। आम लोगों के अलावा सेलिब्रिटी भी इससे अछूते नहीं है। कई सितारों ने कोविड की वजह से अपनी जान गवा दी। अब बॉलीवुड के फेमस सिंगर अरिजीत सिंह की मां का भी निधन हो गया है। कुछ समय पहले व�� कोरोना संक्रमित हुई थी, जिसके बाद कोलकाता के अस्पताल में उनका इलाज चल रहा था। लेकिन 20 मई को उन्होंने अस्पताल में अंतिम सांसे ली और इस दुनिया को हमेशा के लिए अलविदा कह दिया।
1 note · View note
abhay121996-blog · 4 years ago
Text
इस हॉस्पिटल में मरीजों को खुद अपने हाथों से खाना खिलाती हैं नर्सें, बढ़ाती रहती हैं हौसला Divya Sandesh
#Divyasandesh
इस हॉस्पिटल में मरीजों को खुद अपने हाथों से खाना खिलाती हैं नर्सें, बढ़ाती रहती हैं हौसला
चाहे शाहीन हों, शबनम या कोई और, सब के सब फ्लोरेंस नाइ��ेंगल का रूप नजर आती हैं। मरीज को अपने हाथ से खाना खिलाती हैं। अस्पताल सच में बेमिसाल है…। आरएसएस के एक पदाधिकारी जब लखनऊ के एरा अस्पताल से ठीक होकर गए तो उन्होंने ये बातें लोगों को बताई। ट्विटर पर भी इसका खूब जिक्र हो रहा है। बाकी अस्पतालों से इतर एरा मेडिकल कॉलेज ने कोरोना मैनेजमेंट का अपना अलग ही निजाम बनाया है। पर्सनल केयर से लेकर डाइट मैनेजमेंट तक पर खूब रिसर्च कर प्रोटोकॉल तैयार किए गए हैं। हर मरीज की कैमरे से निगरानी हो रही है। एरा के इसी कोविड मैनेजमेंट पर एक रिपोर्ट :पॉजिटिव सोच के सहारे कोई भी जंग जीतना मुश्किल नहीं है। एनबीटी ने लोगों के कोरोना से जुड़ी कहानियों और इससे लड़ने का तरीका शेयर करने के लिए कहा था। यहां लोगों ने खुलकर बताया कि कैसे उन्होंने डबल मास्क लगाकर, दूरी बनाकर, लगातार काम कर इस अनदेखे दुश्मन से जंग जीती। देखें ऐसी ही हौसले वालीं कुछ कहानियां।चाहे शाहीन हों, शबनम या कोई और, सब के सब फ्लोरे���स नाइटेंगल का रूप नजर आती हैं। मरीज को अपने हाथ से खाना खिलाती हैं। अस्पताल सच में बेमिसाल है…। आरएसएस के एक पदाधिकारी जब लखनऊ के एरा अस्पताल से ठीक होकर गए तो उन्होंने ये बातें लोगों को बताई। ट्विटर पर भी इसका खूब जिक्र हो रहा है। बाकी अस्पतालों से इतर एरा मेडिकल कॉलेज ने कोरोना मैनेजमेंट का अपना अलग ही निजाम बनाया है। पर्सनल केयर से लेकर डाइट मैनेजमेंट तक पर खूब रिसर्च कर प्रोटोकॉल तैयार किए गए हैं। हर मरीज की कैमरे से निगरानी हो रही है। एरा के इसी कोविड मैनेजमेंट पर एक रिपोर्ट :नर्सों को दी गई खास ट्रेनिंगएरा में पर्सनल केयर को खास तरजीह दी गई है। इसी के चलते नर्सों के लिए विशेष ट्रेनिंग प्रोग्राम तैयार किया गया है। इसके तहत क्रिटिकल मरीज जो ढंग से खाना-पीना नहीं करते या निराशा के कारण खाना छोड़ देते हैं, उन्हें ये नर्स खुद खाना खिलाती हैं। साथ ही, उनका मनोबल बढ़ाने के लिए उनकी काउंसलिंग भी की जाती है। उन्हें बताया जाता है कि खाना पेट भरने के लिए नहीं दिया जाता, बल्कि आपकी दवा का एक हिस्सा है। इस पर्सनल केयर को पुख्ता करने के लिए हर वॉर्ड में एचडी कैमरे भी लगाए गए हैं। इससे मरीज अगर सो भी रहा है तो भी कंट्रोल रूम में टीम निगरानी करती है। अगर सोते हुए किसी मरीज का ऑक्सिजन मास्क हट जाता है तो तुरंत कैमरे में देखकर उस वॉर्ड की टीम को इसकी जानकारी दी जाती है और मरीज तक पर पहुंचकर मास्क ठीक किया जाता है। इससे काफी हद तक लापरवाही से होने वाली मौतों को बचा लिया जा रहा है।​150 तरह की डाइट की गई तैयारयहां के अडिशनल डायरेक्टर जॉ अली खान ने बताया कि हमारी एक रिसर्च टीम है जो हर दिन कोविड से जुड़े दुनियाभर के शोध पत्रों को पढ़ती है। उसके आधार पर हम डाइट और मेडिसिन में बदलाव करते हैं। शोध के आधार पर हमने 150 तरह की डाइट तैयार की है। यानी कोविड के साथ बीपी है तो उसकी अलग डाइट होगी, अगर शुगर है तो अलग, किडनी की दिक्कत है तो अलग डाइट दी जाएगी। इसी तरह एक सप्लिमेंट चार्ट भी त���यार किया गया है। ये सप्लिमेंट वह है जो आयुर्वेद और अन्य शोधों के माध्यम से पुष्ट किए जा चुके हैं। जैसे हल्दी में करक्यूमिन, ग्रीन टी में ईजीसीजी, अदरक में जिंजरॉल और कलौंजी में थाईमोक्विनोन होता है। ये सभी आईएलसिक्स कंपाउंड को नियंत्रित करते हैं। इससे इम्यून सिस्टम बेहतर होता है। ऐसे ही कंपाउंड का हमने पूरा सप्लिमेंट चार्ट कोविड मरीजों के लिए बनाया है कि कब कितना और क्या लेना है। अस्पताल के लिंक https://erauniversity.in/covid19 पर जाकर इसे सामान्य लोग भी अपना सकते हैं।डैशबोर्ड पर दिखती है मरीजों की हालतजॉ अली खान ने बताया कि कोविड मैनेजमेंट के लिए हमने अस्पताल में हमने एक डैशबोर्ड तैयार किया है। इस डैशबोर्ड पर सारे मरीजों की लिस्ट है, रंगों के माध्यम से इस पर हम दर्शाते हैं कि किसे क्या बीमारी है, और उसका डायग्नोसिस भी इसी डैशबोर्ड पर रहता है। इसे सभी डॉक्टर देखते हैं। डायटीशियन इसी को देखकर उस मरीज का डाइट प्लान तैयार करता है। उसके बाद एक पूरा मैकेनिज्म है जिससे मरीज तक सारी दवाएं और प्रस्तावित डाइट उस तक पहुंचती हैं, जिसकी मॉनिटरिंग के लिए अलग-अलग लोग तैनात किए गए हैं। (रिपोर्टः जीशान रायिनी)ड्यूटी के दौरान पॉजिटिव हुए पति, पत्नी ने रोजा रखते हुए की सेवाड्यूटी के दौरान पति कोरोना पॉजिटिव हो गए, तो वह पत्नी सेवा में लग गईं जो खुद रमजान के पवित्र महीने में रोजा रखती थीं। उनपर अहम जिम्मेदारियां भी थीं, क्योंकि खुद को भी सुरक्षित रखना था और जॉइंट फैमिली के बाकी मेंबर्स को भी। हालांकि उन्होंने यह भूमिका बखूबी निभाई और तब तक पति की सेवा की जब तब वह ठीक नहीं हो गए। हम बात कर रहे हैं ईस्ट दिल्ली के त्रिलोकपुरी इलाके में रहने वाले मोहम्मद अकरम की, जो ईस्ट दिल्ली डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट ऑफिस की डिजास्टर मैनेजमेंट टीम का हिस्सा हैं। वह कहते हैं कि ड्यूटी के दौरान ही उन्हें कोरोना पॉजिटिव होने की बात पता चली, मगर अधिकारियों की सलाह और सहकर्मियों से मिली मदद ने उन्हें कमजोर नहीं पड़ने दिया। डॉक्टरों की सलाह लेकर घर पर ही इलाज किया और अब ठीक होकर फिर से ड्यूटी पर तैनात होने के तैयार हैं। वह कहते हैं कि एक बार उन्हें जरूर डर लगा कि घर में बुजुर्ग माता-पिता हैं और भाई के छोटे-छोटे बच्चे भी। मगर उन्होंने खुद को आइसोलेट कर लिया।34 वर्षीय अकरम बताते हैं कि वह डिजास्टर मैनेजमेंट की क्विक रिस्पॉन्स टीम का हिस्सा हैं। 18 अप्रैल को जिस दिन उन्हें कोरोना के सिमटम फील हुए, तब भी वह ड्यूटी पर थे। दो इमरजेंसी कॉल अटेंड करने के ��ाद मौके पर टीम के साथ पहुंचे थे। इसमें एक कोंडली नहर में किसी के डूबने की कॉल थी और दूसरी खिचड़ीपुर गांव में आगजनी की घटना। उन्हें पता नहीं चला कि कब किसके संपर्क में आए मगर बुखार, शरीर में जकड़न और चक्कर आने जैसे सिमटम थे, तो जांच कराई और रिपोर्ट पॉजिटिव आ गई। मगर वह कहते हैं कि ऑफिस से पूरा सपोर्ट मिला, जिसके बाद वह छुट्टी लेकर घर गए और आइसोलेट हो गए। पत्नी साबरा ने उनकी पूरी केयर की जिम्मेदारी संभाल ली। वह कहते हैं कि रमजान का महीना था, तो इसे ऊपरवाले की कृपा ही मानेंगे कि वह पूरी तरह से ठीक हो चुके हैं। उन्होंने फेसबुक पर भी पोस्ट शेयर करते हुए साथियों से अपने लिए दुआ करने की अपील की। जिस तरह से लोगों का सपोर्ट मिला, उन्हें बहुत हिम्मत मिली। डिस्पेंसरी से दवाएं और सलाह ली। साथी विनोद कुमार, जो पहले पॉजिटिव रह चुके थे, उन्होंने डॉक्टर से दवाएं लिखाकर ट्रीटमेंट दिलाया। एक फोन कॉल पर सहकर्मी सैनिटाइजर, दवाएं और फल आदि पहुंचा रहे थे। कभी उन्होंने नेगेटिव बात नहीं की, हमेशा मनोबल बढ़ाया। उनकी सीनियर डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिसर अंजलि दिवाकर और प्रोजेक्ट ऑफिसर श्रीवृद्धि शर्मा ने पूरा सपोर्ट किया। (रिपोर्टः सचिन त्रिवेदी)खुद हुए संक्रमित, पर युवाओं की टीम ने नहीं खींचे मदद के हाथआउटर दिल्ली के घोघा गांव के रहने वाले युवाओं की एक टोली पिछले कई दिनों से जरूरतमंद लोगों तक मदद पहुंचाने में दिन-रात जुटी है। होम आइसोलेशन के मरीजों के लिए ऑक्सिजन की सप्लाई हो या फिर दवाइयां और खाने की व्यवस्था। ये लोग फौरन उन तक पहुंचकर मदद मुहैया कराते हैं। घोघा गांव के रवीश भारद्वाज अपने भाई लोकेश भारद्वाज और दोस्त रवि स्वामी, नवीन भारद्वाज के साथ आउटर दिल्ली के जिन गांवों से मदद की कॉल आती है, फौरन उन तक पहुंच जाते हैं। चाहे किसी को ऑक्सिजन सिलिंडर की जरूरत हो या अस्पताल में एडमिट कराने की। रवीश बताते हैं कि उन्होंने इसकी शुरुआत अपने आसपास के एक-दो गांव के लिए की थी, क्योंकि अस्पतालों की भारी कमी है। वायरस की चपेट में आए ज्यादातर लोग होम आइसोलेट ही हैं। उन्हें ऑक्सिजन मुहैया नहीं हो पाता। रवीश ने अपने करीब 50 दोस्तों का एक वॉट्सऐप ग्रुप तैयार किया हुआ है, जिसका नाम उन्होंने ‘रैपिड एक्शन भाईचारा’ रखा है। इसमें 20 सदस्य हमेशा एक्टिव रहते हैं। कुछ लोग सरकारी नौकरियों में हैं, ऐसे में वे खुलकर तो लोगों की मदद नहीं करते, लेकिन वे हमें ऑक्सिजन मुहैया करवाने से लेकर अस्पतालों में एडमिट करवाने तक में मदद करते हैं। उनकी मदद से हम क्रिटिकल मरीजों को फौरन अस्पताल में एडमिट करवाते हैं।उन्होंने बताया कि वह सं�� गंगाराम कॉन्वेंट नाम से एक स्कूल चलाते हैं। नरेला के सत्यवादी राजा हरिश्चंद्र अस्पताल में उन्हें एंबुलेंस की कमी महसूस हुई, लोग एंबुलेंस के लिए इधर-उधर भटकते थे। इसे देखते हुए उन्होंने अपने स्कूल वैन को ही एंबुलेंस में कन्वर्ट करके हॉस्पिटल प्रशासन को दान कर दिया है। रवीश पिछले साल भी जरूरतमंद लोगों की मदद के लिए आ��े बढ़कर आए थे। इस दौरान वह और उनके बड़े भाई लोकेश कोरोना संक्रमित हो गए थे। लेकिन उन्होंने लोगों की मदद नहीं छोड़ी। प्रतिदिन उनकी टीम आउटर दिल्ली के इलाकों में रहने वाले मरीजों के लिए 50 से अधिक ऑक्सिजन सिलिंडर व जरूरतमंद मरीजों को प्लाज्मा मुहैया कराते हैं। वे कहते हैं कि अगर अस्पतालों में एंबुलेंस की कमी है तो मैं स्कूल चला रहे लोगों से अपील करता हूं कि वे अपनी स्कूल वैन को एंबुलेंस में कन्वर्ट कर दें तो दिल्ली के अस्पतालों से एंबुलेंस की किल्लत भी खत्म हो जाएगी। हम सबको इस महामारी में साथ मिलकर लड़ाई लड़नी होगी। (रिपोर्टः राजेश पोद्दार)’ऐसा लगता है कोरोना मरीज को मेरी मां ने ऑक्सिजन देकर जिंदगी दी है’ऐसे लगता है, जैसे यह ऑक्सिजन सिलिंडर नहीं बल्कि ‘मेरी मां है’। मेरी मां ही उखड़ती सांसों को ऑक्सिजन दे रही हैं। यह शब्द हैं जयवीर कसाना के। मूलरूप से गाजियाबाद के सकलपुरा के रहने वाले जयवीर दिल्ली के संगम विहार में पिछले 15 साल से परिवार के साथ रह रहे हैं। उनका बिल्डिंग मटीरियल का कारोबार है। गांव में तीन भाई रहते हैं। खेती बाड़ी संभालते हैं। जयवीर के मुताबिक, मेरी मां रोशनी देवी को अस्थमा की बीमारी थी। काफी समय इधर उधर इलाज कराया। चूंकि मौसम जब भी खराब होता तो मां को ऑक्सिनज की जरूरत पड़ती थी। मां उन दिनों गांव में ही रहती थीं। तबीयत खराब होने पर आसपास के अस्पताल में भर्ती कराना पड़ता था। उस दिक्कत की वजह से जयवीर ने 2012 में सबसे बड़ा ऑक्सिजन सिलिंडर खरीद लिया। उस सिलिंडर को तुगलकाबाद एक्सटेंशन से भरवा लिया करते थे। इस ऑक्सिजन सिलिंडर के दम पर मां 2014 तक सांस लेती रहीं। उसी साल उनका निधन हो गया। मां के जाने के बाद सिलिंडर घर के एक कोने में कई साल तक रखा रहा। कमरे में रखा सिलिंडर अक्सर मां के होने का अहसास कराता था।जयवीर के मुताबिक, कभी सोचा ही नहीं था कि यह जो सिलिंडर रखा है, आने वाले वक्त में न जाने कितनों की उखड़ती सांसों को ऑक्सिजन देगा। इसके बाद वह ऑक्सिजन चाचा के काम आया। उन्हें कैंसर की बीमारी थी। अब आकर कोरोना महामारी ने जैसे हर तरफ हाहाकार मचाया। ऑक्सिजन के लिए लोगों को तड़पते देखा। जयवीर ने सोशल मीडिया और जानकारों को बताया कि अगर किसी को अर्जेंट जरूरत है तो फुल साइज का सबसे बड़ा सिलेंडर उनके पास उपलब्ध है। इसके बाद कई लोगों ने उनसे संपर्क किया। इधर एक पेशेंट ��ा ऑक्सिजन लेवल 65 पर चला गया। जयवीर को पता चला। वह तुरंत अपनी कार से गांव गए और जगह जगह चेकिंग के बावजूद उस सिलिंडर को दिल्ली लाकर भरवाया फिर पेशेंट को दिया। एक बार में भरा हुआ सिलेंडर तीन चार दिन तक पेशेंट को राहत देता है। अनजान फरिश्ता बनकर जयवीर उसी सिलिंडर को जरूरतमंदों तक पहुंचाने लगे। जयवीर कहते हैं, दिल को सुकून है। यह ऑक्सिजन सिलिंडर से आज भी अपनी मां के होने का अहसास बना रहता है। ऐसा लगता है कि उस पेशेंट को मेरी मां ने ऑक्सिजन देकर जिंदगी दी है। अभी तक हमने अनजान लोगों को ही मदद की है। अब भी जारी है। (रिपोर्टः विशाल शर्मा)कोविड टेस्ट में मददगार बनी वकीलों की संस्था, फ्री में कर रहे सेवाकोविड-19 की टेस्ट रिपोर्ट के लिए इन दिनों लंबी वेटिंग है। लोगों को 10-12 दिन तक इंतजार करना पड़ रहा है। इस दिक्कत को वकीलों की एक कानूनी संस्था ‘न्याय शासनम’ ने आसान बनाने की कोशिश की है। यह संस्था रैपिड एंटीजन रिपोर्ट महज 60 मिनट में उपलब्ध करा रही है, जबकि आरटीपीसीआर रिपोर्ट 48-72 घंटे के भीतर उपलब्ध करा रही है। यह सुविधा बिल्कुल फ्री है। जांच रिपोर्ट का पूरा खर्च संस्था उठा रही है। दर्जनों लोग इसका लाभ उठा चुके हैं। न्याय शासनम की टीम के ईशा जैन, शैंकी जैन, अजय गौड़, विकास गोयल, मनीष जैन और विकास वर्मा सहित अन्य सदस्य संकट की इस स्थिति में लोगों को जितनी जल्दी हो सके, जांच रिपोर्ट उपलब्ध कराने में जुटे हुए हैं। इसके लिए संस्था ने लोनी रोड एमआईजी फ्लैट नंबर बी-753 को कोविड टेस्ट और सैंपल कलेक्शन सेंटर के रूप में तब्दील कर दिया है। अभी तक इस ऑफिस में लोगों को कानूनी सलाह देने का काम किया जा रहा था।संस्था के सदस्य एडवोकेट शैंकी जैन ने बताया कि हर दिन वे देख रहे थे कि लोगों को जांच रिपोर्ट के लिए कितना लंबा इतजार करना पड़ रहा है। इसलिए उन्होंने लोगों को जल्द से जल्द टेस्ट रिपोर्ट उपलब्ध कराने की दिशा में काम करना शुरू किया। इस काम में उन्हें टीम के बाकी साथियों की भी भरपूर मदद मिल रही है। इसके लिए ऑफिस को ही कोरोना सैंपल और टेस्ट रिपोर्ट सेंटर में तब्दील किया गया। उन्होंने कहा कि कोई भी व्यक्ति हमारी सेवाएं ले सकता है। एंटीजन रिपोर्ट एक घंटे में और आरटीपीसीआर रिपोर्ट 48-72 घंटे में बिल्कुल फ्री उपलब्ध कराई जा रही है। आर्थिक रूप से कमजोर व्यक्ति के पास अगर उनके ऑफिस आने का किराया नहीं है तो उनकी संस्था ऐसे जरूरतमंद लोगों को आने-जाने का किराया भी देती है। साथ ही, जिन लोगों के पास ऑक्सिजन सिलिंडर रखा हुआ है, उनसे भी सहयोग लिया जा रहा है। उन्होंने कहा कोई भी जरूरतमंद व्यक्ति उन्हें 9312869696 पर कॉल भी कर सकता है। (रिपोर्टः राजेश सरोहा)
1 note · View note
ashutentaran · 4 years ago
Link
असम के पूर्व मुख्यमंत्री तरुण गोगोई का कल निधन हो गया। गोगोई काफी समय से कोविड कॉम्पलिकेशन से जूझ रहे थे। ये 3 बार असम के मुख्यमंत्री रहे थे।
हिमाचल प्रदेश में कोरोना वायरस के बढ़ते मामलों को देखते हुए आज से शिमला,कांगड़ा, मंडी, कुल्लू में नाइट कर्फ्यू लगाया गया है। 24 नवंबर से 15 दिसंबर 2020 तक रात 8 बजे से सुबह 6 बजे तक नाइट कर्फ्यू लागू रहेगा।
1 note · View note
prabudhajanata · 2 years ago
Text
छातापुर।सुपौल।सोनू कुमार भगत : छातापुर प्रखंड सह अंचल कार्यालय परिसर स्थित ललित नारायण सभागार में सोमवार को प्रखंड प्रमुख आशिया देवी की अध्यक्षता में बैठक हुई, जिसमें आगामी गणतंत्र दिवस (Republic Day) समारोह मनाने को लेकर विचार विमर्श किया गया। बैठक के दौरान सुझावों के आदान प्रदान के बाद कई प्रस्ताव लिये गये। वहीं मुख्य समारोह के बाद झंडोत्तोलन हेतू रूट चार्ट नये सिरे से तैयार किया गया। जबकि झंडोत्तोलन की समय सारिणी पर फिलहाल कोई निर्णय नहीं लिया गया। बैठक के दौरान मुख्यालय बाजार निवासी शिशुपाल सिंह बच्छावत के निधन पर मौजूद लोगों ने शोक जताया और मृतक के आत्मा की शांति हेतू दो मिनट का मौन धारण किया। बैठक का संचालन कर रहे बीडीओ रीतेश कुमार सिंह ने बताया कि झंडोत्तोलन के रूट चार्ट एवं टाइमिंग की विसंगतियों को दूर कर लिया गया है। कोविड 19 काल से पूर्व गणतंत्र दिवस के दिन जिस प्रकार से खेलकूद प्रतियोगिता एवं सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन हुआ करता था। उसे आगामी स्वतंत्रता दिवस से पुनः जिवीत व जागृत करने का प्रस्ताव लिया गया है। बैठक में उपप्रमुख संजय कुमार यादव, प्रमुख प्रतिनिधि अजय कुमार सरदार, सीडीपीओ कुमारी पुजा, पशु चिकित्सा पदाधिकारी डा. शशिभूषण प्रसाद, भाजपा नेता शालीग्राम पांडेय, जदयू नेता फेकनारायण मंडल, मंडल अध्यक्ष सुशील प्रसाद कर्ण, सुकदेव भगत,अमरेंद्र नारायण उर्फ मुन्ना सिंह, मुख्यालय पंचायत की मुखिया बीवी साजदा खातुन, मुखिया पति मकशुद मसन, पंसस शेख नुरूद्दीन, पूर्व प्रमुख महेंद्र नारायण दास, केआरपी पूनम पाठक, एचएम उषा देवी, हरेंद्र कर्ण, पियूष कुमार पिंकु मुख्य रूप से शामिल हुए।
0 notes
studycarewithgsbrar · 2 years ago
Text
वयोवृद्ध अभिनेता और पूर्व केंद्रीय मंत्री कृष्णम राजू का 83 वर्ष की आयु में निधन हो गया है।
वयोवृद्ध अभिनेता और पूर्व केंद्रीय मंत्री कृष्णम राजू का 83 वर्ष की आयु में निधन हो गया है।
पीटीआई हैदराबाद, 11 सितंबर अस्पताल सूत्रों ने बताया कि पूर्व केंद्रीय मंत्री और प्रख्यात अभिनेता उप्पलपति कृष्णम राजू का यहां एक निजी अस्पताल में इलाज के दौरान रविवार तड़के निधन हो गया. वह 83 वर्ष के थे और उनके परिवार में पत्नी और तीन बेटियां हैं। राजू ‘बाहुबली’ स्टार प्रभास के चाचा थे। अस्पताल के सूत्रों ने कहा कि वह कोविड -19 बीमारियों से पीड़ित थे। उन्हें 5 अगस्त को अस्पताल में भर्ती कराया…
View On WordPress
0 notes
globe24 · 2 years ago
Text
At The Age Of 96 Queen Died 96 साल की उम्र में महारानी एलिजाबेथ द्वितीय का निधन, स्‍कॉटलैंड के बाल्‍मोरल कैसल में ली अंतिम सांस
96 साल की उम्र में महारानी एलिजाबेथ द्वितीय का निधन
लंदन: ब्रिटेन की महारानी क्‍वीन एलिजाबेथ का 96 साल की उम्र में निधन हो गया है। गुरुवार को खबर आई थी कि डॉक्टर उनके स्वास्थ्य पर नजर बनाए हुए हैं। महारानी कुछ दिनों से स्‍कॉटलैंड स्थित अपने बाल्‍मोरल कैसल में थी। वह हर साल गर्मियों में यहां आती थीं। महारानी के स्‍वास्‍थ्‍य पर पिछले कुछ दिनों से खासी नजर रखी जा रही थी। पिछले कुछ वर्षों में उनकी हालत बिगड़ी थी और इस बार फरवरी में उन्‍हें कोविड-19 भी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
filmythunderofficial · 2 years ago
Text
RIP: बंगाली अभिनेता प्रदीप मुखर्जी ने दुनिया को कहा अलविदा, 76 साल की उम्र में ली अंतिम सांस
RIP: बंगाली अभिनेता प्रदीप मुखर्जी ने दुनिया को कहा अलविदा, 76 साल की उम्र में ली अंतिम सांस
प्रदीप मुखर्जी मृत्यु: बंगाली फिल्मों से पहचाने जाने वाले दिग्गज अभिनेता प्रदीप मुखर्जी ने सोमवार को इस दुनिया को अलविदा कह दिया। अभिनेता का 76 वर्ष की आयु में कोलकाता के एक अस्पताल में निधन हो गया। अभिनेता को बॉलीवुड अभिनेत्री विद्या बालन और अभिनेता अर्जुन रामपाल अभिनीत फिल्म ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ में डॉ. मैती की भूमिका के लिए भी आलोचकों की प्रशंसा मिली। प्रदीप मुखर्जी दो बार कोविड-19 से…
View On WordPress
0 notes
ashokgehlotofficial · 2 years ago
Text
मुख्यमंत्री निवास पर रामदेवरा मेले में भाग लेने के लिए आ रहे पैदलयात्रियों की सुरक्षा व्यवस्था के संबंध में महत्वपूर्ण बैठक ली। पाली में रोहट के पास हुए सड़क हादसे में श्रद्धालुओं के निधन पर मेरी गहरी संवेदनाएं, पैदलयात्रियों की सुरक्षा हेतु प्रशासन सभी आवश्यक कदम उठाए ताकि इस तरह की दुखद घटनाओं की रोकथाम हो सके। रामदेवरा मेले में आ रहे पैदल यात्रियों के लिए जहां संभव हो कॉरिडोर बनाकर उनकी पालना सुनिश्चित कराई जाए। जिन जिलों से पैदलयात्री गुजर रहे हैं वहां जिला कलक्टर उच्च अधिकारियों के साथ नियमित बैठक कर सभी तरह की पुख्ता व्यवस्थाएं सुनिश्चित करें।
श्रद्धालुओं को किसी प्रकार की असुविधा ना हो इसके लिए प्रशासन पूरी तरह से चाक-चौबंद रहे। अधिक आवाजाही वाले जिलों में प्रशासन द्वारा विशेष अभियान चलाकर शराब पीकर गाड़ी चलाने वाले तथा ओवरस्पीडिंग करने वाले वाहन चालकों पर कार्रवाई की जाए। इसके लिए आवश्यकतानुसार मोबाइल यूनिट व नाकों की स्थापना की जाए। पैदलयात्रियों को अधिक से अधिक रेडियम टेप व रिबन का वितरण किया जाए, जिन्हें बैग पर चिपकाकर या हाथ में पहनकर रात में चलते समय हादसों से बचा जा सके।
जहां आवश्यक हो ओवरस्पीडिंग पर काबू पाने के लिए सड़कों पर अस्थाई स्पीड ब्रेकर बनाए जाएं तथा स्पीड-लिमिट के साइनबोर्ड भी लगाए जाएं। यात्रा के दौरान किसी भी आपात स्थिति में त्वरित कार्रवाई के लिए महत्वपूर्ण बिंदुओं पर एम्बुलेंस की पुख्ता व्यवस्था हो। थोड़ी-थोड़ी दूरी पर सहायता कैम्प्स के माध्यम से प्रशासन द्वारा सुरक्षित पैदल यात्रा हेतु श्रद्धालुओं के लिए लाउड स्पीकर पर आवश्यक सावधानियों का प्रचार किया जाए। अधिकारी यह सुनिश्चित करें कि पैदलयात्रियों के शिविर सड़क के किनारे से पर्याप्त दूरी पर बनाए जाएं। अधिकारियों को पैदलयात्रा के मार्गों पर ओवरलोड वाहनों पर भी निगरानी रखने के निर्देश दिए।
प्रशासन द्वारा हाल ही में कावड़ यात्राओं का शानदार प्रबंधन किया गया है, जिससे बिना किसी अप्रिय घटना के कावड़ यात्राओं का आयोजन संपन्न हुआ। अधिकारियों से कहा कि यह त्यौहारों और मेलों का समय है। रामदेवरा मेले में प्रदेशभर तथा पड़ोसी राज्यों से बड़ी संख्या में श्रद्धालु आते हैं। पिछले दो साल क��विड महामारी की वजह से मेले का आयोजन स्थगित रहने के कारण इस वर्ष श्रद्धालु सामान्य से अधिक संख्या में आ रहे हैं। अतः प्रशासन का कर्तव्य है कि कावड़ यात्राओं के समान ही रामदेवरा मेले का भी सुरक्षित एवं व्यवस्थापूर्वक आयोजन करवाया जाए।
बैठक में सार्वजनिक निर्माण मंत्री श्री भजनलाल जाटव, परिवहन राज्य मंत्री श्री बृजेन्द्र ओला, मुख्य सचिव श्रीमती उषा शर्मा, महानिदेशक पुलिस श्री मोहन लाल लाठर, अतिरिक्त मुख्य सचिव गृह श्री अभय कुमार, महानिदेशक पुलिस इंटेलिजेंस श्री उमेश मिश्रा, एडीजी ट्रैफिक श्री विजय कुमार, एडीजी लॉ एंड ऑडर श्री हवा सिंह घुमरिया, एडीजी सिक्योरिटी श्री एस सेंगथिर सहित अन्य उच्चाधिकारी उपस्थित रहे।
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही
·      केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रशासनानं परस्पर समन्वय ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·      मुंबई आणि मराठी माणसांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची क्षमायाचना
·      देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल, राजकीय पक्षांसोबतच जनतेनेही विचार करण्याची गरज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
·      शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
·      गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातल्या स्पर्धा परीक्षेसाठी एकच ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ घेण्याचा राज्य लोकसेवा आयोगाचा निर्णय
·      जेष्ठ पत्रकार राज्याचे माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचं निधन  
अणि
·      राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्य पदक
****
जागतिक पातळीवरच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर सरकार आपली अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. लोकसभेत काल महागाईच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कोविड काळातही भारत ही सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था ठरली असून, जगाच्या तुलनेत भारताला मंदीचा फटका तीव्र स्वरूपात बसला नाही. असं सीतारामन यांनी सांगितलं. महागाईवर बोलताना काँग्रेस सरकारच्या काळात महागाईचं प्रमाण किती होतं, याची तुलना केल्याशिवाय मोदी सरकारच्या काळात महागाई नियंत्रणात ठेवली गेली की नाही, हे समजणार नाही, असं त्या म्हणाल्या़,  खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी पाम तेल, तसंच सोयाबीन, सूर्यफूल तेलावरील आयातकर कमी करण्यात आला, खाद्यतेलांच्या आयातीवरील नियंत्रणही काढून टाकलं आहे, आता खाद्यतेल कितीही प्रमाणात आयात करता येतं, त्यामुळे खाद्यतेलांचे दर कमी होऊ लागले आहेत, असं त्यांनी नमूद केलं. महागाई आटोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचं, सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी या विषयावर चर्चेला सुरुवात करताना, नोटबंदी आणि वस्तू आणि सेवाकर अंमलात आणल्याबद्दल सरकारला खडे बोल सुनावले. या चर्चेत द्रमुकच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसकडून काकोली घोष दस्तीदार, बसपाच्या संगीता आझाद, बिजू जनता दलाकडून पिनाकी मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर खासदारांनी भाग घेतला.
****
केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रशासनानं कार्यक्षमता वाढवावी, तसंच परस्पर समन्वय ठेवावा, अशी सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह योजना अंमलबजावणीसंदर्भात काल मुंबईत प्रशासकीय आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना त्यांनी केली. राज्यातल्या सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांचं पत्र पाठवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. मराठवाडा ग्रीडविषयी एक संपूर्ण सादरीकरण करावं, जलजीवन मिशनला वेग द्यावा, तसंच ‘हर ��र नल से जल’ची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे, याकडे लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
मुंबई आणि मराठी माणसाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी क्षमा मागितली आहे. सदर भाषणात आपल्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल, तर महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून, राज्यातील जनता, या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन, आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगत���, असं राज्यपालांनी याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असून, आता राजकीय पक्षांसोबतच जनतेनेही विचार करण्याची गरज असल्याचं मत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेना पक्षप्रवक्ते खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रादेशिक पक्ष संपवण्याचं भाजपचं धोरण असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पाठोपाठ भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचं विधानही भाजपच्या याच धोरणाचं सुतोवाच करत असल्याचं, उद्धव ठाकरे म्हणाले.
****
दरम्यान, संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत महसूल संचालनालय- ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर मध्यरात्री राऊतांना ईडीनं अटक होती. त्यानंतर काल, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात राज्यात शिवसेनेच्या वतीनं काल ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं.
****
राज्य लोकसेवा आयोगानं राज्यसेवेसह गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती होणाऱ्या सर्व पदांसाठी, ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ या नावानं, एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करतानाच, उमेदवारांकडून विविध पदांसाठीचे पर्याय मागवले जातील. त्यानुसार भरती करायच्या पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची संख्या निश्चित केली जाईल, आणि प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल. राजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची विविध पदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाईल.
अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गासाठीही ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा होईल. पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू होणार आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८३० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ४८ हजार २८५ झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १०५ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल एक हजार २४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ८७ हजार ३७२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल औरंगाबाद जिल्ह्यात आठ, तर नांदेड जिल्ह्यात सहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
****
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' उपक्��मात, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
औरंगाबाद तालुक्यातल्या तीसगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते काल राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तीसगावचे उपसरपंच नागेश कोठारे यांनी आनंद व्यक्त करत सर्वांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
‘‘खूप आनंदाची बाब आहे आमच्या गावासाठी. पूर्ण जिल्हाभरामधून आमच्या गावामध्ये पहिल्यांदा माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आम्हाला वितरीत करण्यात आले. यासाठी आम्ही तीन हजार झंड्यांची खरेदी केलेली असून आम्ही आमच्या गावामध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणात व्यापक जनजागृती करून प्रत्येकाने आपल्या घरावर हा राष्ट्रध्वज फडकवावा असं आम्ही सर्वांना आवाहन करणार आहोत.’’
                                  ****
जालना जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात उमेद स्वयं सहायता गटानं स्थापन केलेल्या ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ, काल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी होत आपल्या घरावर तिरंगा फडकावा, असं आवाहन जिंदल यांनी केलं.
****
तिरुपतीला दर्शनासाठी गेलेल्या हिंगोली इथल्या भाविकांच्या वाहनाला कर्नाटकात अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. बंगळुरू महामार्गावर चित्रदुर्ग इथं रविवारी ही दुर्घटना घडली. गंभीर जखमींना चित्रदुर्ग इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे भाविक डोंगरकडा इथले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जेष्ठ पत्रकार आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेले धारुरकर यांनी, तरूण भारत वृत्तपत्राचे संपादक म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं प्रताप नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धारूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत काल चौथ्या दिवशी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्य पदक मिळाली.
जुदो मध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सुशीला देवीनं रौप्य पदक पटकावलं, तर पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात विजय कुमार यादवनं तर भारोत्तोलनात महिलांच्या ७१ किलो वजनी गटात हरजिंदर कौरनं कांस्य पदक जिंकलं.
बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू, लक्ष्य ��ेन, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र सांघिक प्रकारात भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
हॉकी मध्ये भारतीय पुरुष संघाचा इंग्लंडसोबतचा सामना बरोबरीत सुटला.
लॉन बॉल या खेळात भारतीय महिलांचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोचला आहे. लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रुपा राणी यांच्या संघानं आज उपांत्य फेरीतल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला १६-१३ ने पराभूत केलं.
पुरुष बॉक्सिंगमध्ये अमित पंघल आणि हुसाम उद्दिन मोहम्मद यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
जलतरणमध्ये ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात भा��ताचा श्रीहरि नटराजन अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
या स्पर्धेत भारत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदक जिंकून पदक तालिकेत सहाव्या स्थानवर आहे.  
****
दुसऱ्या टी - टे्वेन्टी क्रिकेट सामन्यात काल वेस्ट इंडीजनं भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं विसाव्या षटकात सर्वबाद १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघानं विसाव्या षटकात पाच गडी गमावत १४१ धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानं एक - एक अशी बरोबरी साधली आहे.  
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी केली. यावेळी अनेक शेतात पाणी साचलेलं असून पिकांचं पूर्णपणे नुकसान झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे याचे पंचनामे करुन या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवण्याच्या सूचना, आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
****
0 notes
dailyhantnews · 3 years ago
Text
बाली के कोविड पर्यटन दुर्घटना के बचे - वैश्विक मुद्दे
बाली के कोविड पर्यटन दुर्घटना के बचे – वैश्विक मुद्दे
“जब मेरे माता-पिता का निधन हो गया, तो मैंने सुदाजी गांव में अपने परिवार की देखभाल करने की उनकी इच्छा पूरी की। उस समय, गाँव पहले से ही अपनी सांस्कृतिक परंपराओं और दृश्यों के कारण एक पर्यटन स्थल के रूप में जाना जाता था, और 2014 में मैंने अपने गाँव में एक होमस्टे विकसित करने के अपने सपने को साकार करना शुरू किया, जहाँ पर्यटक स्थानीय परिवारों के साथ रहते हैं। अपने पर्यटन और होटल पृष्ठभूमि के आधार पर,…
Tumblr media
View On WordPress
0 notes