#केवळ
Explore tagged Tumblr posts
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इ��हार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंग���ू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/43e75c51ad88f50c41974ec386941c9f/595949c2f680a691-02/s540x810/564baee3c7e54d7ad08a9d4ea1cdff11ed289ad5.jpg)
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महा�� लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ad218e13580e96d2dc6c6ffd4ebefeec/595949c2f680a691-88/s540x810/7cd9b5988d8784416668b9587501131615acf653.jpg)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/497f1dc4a43cfd1e131f2da51a648db0/595949c2f680a691-e6/s540x810/3e7c724b379878b4cd8604f5e8e930d6d9124a37.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/0cd7c695216e4371f0bcb4d0c30aa829/595949c2f680a691-e7/s250x250_c1/6c30a4a7f8fb764928ef7650bdda3bcb8f700cca.jpg)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/12742f1a8c9e303265a3cc4fa9bbf745/595949c2f680a691-7b/s540x810/848d0ba9815ec96b6bfd1af030f3e7ac194ad74e.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/62be719c20425e3fbea331a94da032be/595949c2f680a691-15/s500x750/8d741612e091dc599d092fd442356d693bd3ae5f.jpg)
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/064a3a2771c0e7f7db7afb49f7afed7b/595949c2f680a691-33/s250x250_c1/236fa2053778834bde4a2c84047707be3dfb2729.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/2383007deaeb0618f97267b568f12444/595949c2f680a691-e0/s250x250_c1/be8b3dd78dcfe99fda439379e5c722a5041b9658.jpg)
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/76e14bed4fbf166c0a0b94602e013bb4/595949c2f680a691-c5/s400x600/f97d3fcf76e8ab9b0711369e59d5ba6c349363df.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d9119e2e133189cd4fc84637a6eef350/595949c2f680a691-83/s400x600/d11f16c83437d077a7ba0e405357cf5783dda494.jpg)
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं ��र एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाव��न्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
2 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/9846db3911caff959ba99ba50d86b7e6/aba93c15f2b7610f-a7/s540x810/623ecebbfcfcbaeda17eff06efb8f4a9e8044a19.jpg)
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) ��ुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल��या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/c5d7b84d0b275954d6dfcf9d1bffca76/ae1971b2b9730596-19/s540x810/b52ebde5d86a5902afbf80dc5095bbd4c4c5d58f.jpg)
#मुहर्रमपर_अल्लाहकबीर_कासंदेश
पापांची क्षमा होईल का?
मुसलमान कुरआन
अधिक माहितीसाठी वाचा "मुसलमानांना नाही समजले ज्ञान कुराण..!
मुसलमानांना नाही समजलं ज्ञान कुराण पुस्तक मोफत
कुरआन
मागविण्यासाठी तुमच नाव, मोबाईल नं. पत्ता पाठवा +91 9812238507 +91 9992600852
सूचनाः हे पवित्र पुस्तक केवळ हिंदी भाषेत उपलब्ध आहे आणि हे पवित्र पुस्तक केवळ मुसलमान भाऊ आणि बहिणीसाठी आहे.
Baakhabar Sant Rampal Ji
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा अमेरिकेचा दौरा आटोपून स्वदेशी निघाले. या दौऱ्यात पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांची भेट घेतली. संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमी कंडक्टर आणि अवकाश तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची मोठी क्षमता आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी भारतीय - अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते विवेक रामास्वामी तसंच टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचीही भेट घेतली.
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्ष पूर्ण झाले. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ४० सैनिकांना वीरमरण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातल्या हुतातम्यांना आदरांजली अर्पण केली आहे. या सैनिकांचं बलिदान येणाऱ्या अनेक पिढ्या कायम स्मरणात ठेवतील, असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण हे प्रसार भारतीच्या अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचं प्रतिक असल्याचं, प्रसार भारतीच�� अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी म्हटलं आहे. ते काल प्रयागराज इथं बोलत होते. त्यांनी संगम सेक्टर चार इथं बांधलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांची पाहणी केली.
सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसणार नाही, यासाठी विविध उपाय योजणं सरकार सुरू ठेवेल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या काल बोलत होत्या. आयकरातल्या सवलतींचा फायदा केवळ श्रीमंतांना होईल, हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारतीय डाळी परिषदेत ते काल बोलत होते. महाराष्ट्र सरकार डाळींच्या उत्पादनात पुढाकार घेत असून, शाश्वत शेती, संशोधन, सरकारी योजना आणि उद्योग सहभागाद्वारे महाराष्ट्रसह भारत डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं रावल यांनी नमूद केलं.
जगभरातलं तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि संधी भारतात उपलब्ध व्हावी, म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईत १० एकर जागेत, मनोरंजन क्षेत्रातलं जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल आशिष शेलार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावं यासाठी शासन अनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्था उभारणार असून, त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या जागतिक पातळीवरच्या तज्ज्ञांकडून उच्च शिक्षण दिलं जाणार असल्याचं, शेलार यांनी सांगितलं.
विदर्भ विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं काल अकोल्यात शिवनी इथं अपघाती निधन झालं. एका पिकअप गाडीनं बिडकर यांच्या गाडीला धडक दिल्यानं ते अपघातात गंभीर जखमी झाले होते, रुग्णालयात नेत असताना त्यांचं निधन झालं. अकोल्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात त्यांनी ��नेक आंदोलनात भाग घेतला होता. गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित डेबू चित्रपटाची निर्मितीही बिडकर यांनी केली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
भारतमाला परियोजनेतल्या सुरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातून सुरुवात झाली. तालुक्यातल्या जवळपास ११ गावातून हा ३३ किलोमीटरचा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी जवळपास तीनशे जमीनीचं संपादन करण्यात येणार असून, ८१ टक्के क्षेत्र संपादित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत जालना शहरात काल रन फॉर लेप्रसी मॅरेथान स्पर्धा घेण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली. जिल्हा सामान्य रुग्णालय ते कुष्ठरोग निर्मुलन कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मॅरेथानमध्ये क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता.
लातूर महानगरपालिकेने थकित करवसुलीसाठी धडक मोहिम करत काल दिवसभरात एक शिक्षण संस्था कार्यालय, दोन गोदामं, एक दुकान सील केलं, तर तब्बल १९ नळ जोडणी खंडित केल्या.
0 notes
Text
आपल्या पवित्र शास्त्रात दिल्याप्रमाणे भक्ती केल्यावर मोक्ष प्राप्त होतो शास्त्र अनुकूल भक्ती केवळ संत रामपाल जी महाराज सांगतात
0 notes
Text
एका व्यक्तीच्या आरोपांवरून मुस्लिमांना ठरवलं जातंय बांगलादेशी, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाया वादग्रस्त
एका व्यक्तीच्या आरोपांवरून मुस्लिमांना ठरवलं जातंय बांगलादेशी, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाया वादग्रस्त
नगर शहरात सध्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाया वादग्रस्त ठरत असून एका व्यक्तीच्या केवळ आरोपांवरून मुस्लिम बांधवांना बांगलादेशी आणि रोहिंग्या ठरवत शहरात एका व्यक्तीची इमेज बिल्डिंग केली जात आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या म्हटल्यानंतर नागरिकांमध्ये असलेल्या नकारात्मकतेचा फायदा घेत कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता न्यायालयापर्यंत प्रकरण पोहोचण्याच्या आधीच मुस्लिम बांधवांना बांगलादेशी…
0 notes
Text
64. सर्वोत्तम काम करा
श्रीकृष्ण म्हणता, “तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत” (3.8).
मानवी शरीर टिकून राहावे याकरिता अन्नसंग्रह करणे आणि ते ग्रहण करणे आवश्यकच आहे. त्याशिवाय, मानवी शरीरात अनेक अवयव, व्यवस्था आणि रसायने असतात जी नियमितपण अनेक अंतर्गत कामे करीत असतात. त्यापैकी, एखादी कृती जरी चुकली तरी शरीरातील सुसंगततेवर परिणाम होतो आणि शरीराला त्रास होतो किंवा ते नष्टही होऊ शकते. त्या दृष्टीने शरीराची देखभाल निष्क्रियतेतून शक्य होणार नाही.
श्रीकृष्ण विहित कृती करण्याबद्दल बोलतात, जी एक जटिल संकल्पना आहे. पवित्र धर्मग्रंथांमध्ये दिलेले विधी आणि समाजाने आपल्यावर लादलेली कर्तव्ये ही सामान्यतः विहित कार्य म्हणून घेतली जातात. परंतु ते दोघेही श्रीकृष्णाच्या संदेशाची व्याख्या करण्यात अयशस्वी ठरतात.
भौतिक जगात आपली सर्वोच्च क्षमता प्राप्त करणे हे आपले बंधनकारक काम आहे. एखादे ब���ज जसे मोठ्या वृक्षात परिवर्तित होते किंवा आपल्या जीन्समध्ये असलेल्या सूचनांबरहुकुम वागत एका पेशीतून जसे गुंतागुंतीचे मानवी शरीर निर्माण होते तसे. यातून हे स्पष्ट होते आपल्या जीन्समधून पेशींकरता येणार्या सूचनांप्रमाणेच आ���ल्या गुणांनी आपल्यासाठी कर्माची निवड केली आहे. त्यामुळे, उरते ते केवळ सूचना स्वीकारणे किंवा ‘कृती करणे’, ज्यामध्ये वाढणे, बरे होणे आणि संरक्षण करणे यांचा समावेश असतो.
आपला संपूर्ण क्षमतेने आपण सर्वोत्तम काम केले पाहिजे. आपण काय करतो आहे इथपर्यंतच ते मर्यादित नाही तर किती चांगले काम आपण करतो आहे हेदेखील महत्वाचे आहे. अर्थात, आपली क्षमता, अनुभव आणि वेळ यानुसार सर्वोत्तम म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या बदलू शकते. केवळ उपस्थित असणे, शांत राहणे किंवा आस्थेने ऐकणे हे देखील सर्वोत्तम काम असू शकते. हे आपल्याला मोक्षाच्या त्या शाश्वत अवस्थेकडे (गुणांच्या पलीकडे) घेऊन जाईल (2.72). हे करण्याबद्दल आहे, निवडण्याबद्दल नाही कारण आपला जन्म जो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना आहे तो आपल्या आवडीने झालेला नाही.
1 note
·
View note
Text
आजच्या काळात स्त्रिया आणि मुलींसाठी स्वसंरक्षण केवळ गरज नाही, तर शक्ती आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे! आपण कोणावर अवलंबून न राहता स्वतःचं संरक्षण स्वतःच करू शकतो, आणि करायलाच हवं! ⚔️ अडचणीच्या क्षणी हातात काठी घेत, लाठीकाठी प्रशिक्षणाद्वारे स्वतःला सक्षम करणं –
हाच सशक्त स्त्रीत्वाचा खरा मंत्र! 👊🔥 प्रत्येक माता, भगिनी आणि मुलींनी सक्षम आणि स्वावलंबी व्हावं, यासाठीचा हा एक छोटासा उपक्रम!
मुलुंड मधील सौ लक्ष्मीबाई इंग्लिश हायस्कूल मध्ये हा लाठी काठीचा उपक्रमासाठी बोलावले त्यासाठी शाळेचे संस्थापक श्री प्रसाद कुलकर्णी सर अँड प्रज्ञा मॅडम चे धन्यवाद.
@narendramodi @devendra_fadnavis @mieknathshinde @ckbawankule @advocateashishshelar @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @mihirkotecha18 @narendramodi @bjpmanishtiwari @ravindrachavanofficial @chitrakwagh @mipravindarekar_
0 notes
Text
GodMorningTuesday
SacrificedLifeButNoSalvation
#गला_भी_कटाया_मोक्ष_नहीं_पाया
#GodKabirNirvanDiwas
सत्भक्ति च्या शिवाय कोणताहि प्रयास व्यर्थ आहे. मग काशीमध्ये मृत्यू होऊ द्या किंवा करौंत मुळे मान कापली जाऊ द्या, मोक्ष फक्त सत्य साधनेमुळेच मिळत आहे.
विकारी मनाचे समाधान केवळ सत्भक्तिनेच होत असते. चुकीच्या साधनांनी मनाचे दोष आणखी वाढतात, ज्यामुळे मोक्ष आणखी दूर होत असतो.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7d9b84f3865d124e85f44646c5dae103/0cee95ecdfd04ca1-1e/s540x810/a61a6ec26ac47723acc3e4250f021ee688542a58.jpg)
1 note
·
View note
Text
0 notes
Text
0 notes
Text
कबीर साहेब जी केवळ एक संत नसून तेच परमात्मा आहेत | Sant Rampal Ji Marath...
youtube
अवश्य पहा हा शॉर्ट सत्संग : कबीर साहेब जी केवळ एक संत नसून तेच परमात्मा आहेत. |Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
गेल्या दहा वर्षात देशाची सौर ऊर्जा उत्पादन क्षमता ३२ पट वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत ऊर्जा सप्ताह २०२५ चं उद्घाटन आज पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केलं, त्यावेळी ते बोलत होते. जगातला प्रत्येक तज्ञ म्हणत आहे की २१ वं शतक भारताचं आहे, भारत केवळ स्वतःच्या विकासालाच नव्हे तर जगाच्या विकासालाही चालना देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मंत्रीस्तरीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सहभाग, प्रदर्शनाची जागा आणि आयोजित केली जाणारी सत्रे यांची संख्या पाहता हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम आहे. देशातली यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केली जाईल. या सप्ताहात कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि इंग्लंड यांची दालने असतील.
****
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन केलं जात आहे. भाजप��े राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात दीनदयाळ उपाध्याय यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळान��� निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळलेले बोराडे यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह १९६२ साली पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या. ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं. त्यांच्या कथांमधली पात्रं ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत.
पाचोळा या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्गमय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात राज्य शासनाने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ही बोराडे यांना जाहीर केला होता. बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. बोराडे सरांच्या जाण्याने साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळच तुटली आहे, अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज देवगिरी महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
****
प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे १६ गाड्या चालवत असून, या सर्व स्थानकांवरची परिस्थिती सुरळीत आहे. यासंदर्भात कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केलं आहे. राज्यातून दररोज सुमारे २० विशेष आणि नियमित गाड्या प्रयागराज आणि त्या भागासाठी चालवल्या जात आहेत.
पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवायचं आवाहन केलं आहे. भाविकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध रेल्वेस्थानकांवर मदत केंद्रंही स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.
****
छत्तीसगड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईतून तीन बांग्लादेशींना अटक केली. भारतात बेकायदेशीर वास्तव्य करून बनावट कागदपत्रांआधारे इराकला जाण्याचा त्यांचा विचार होता. मोहम्मद इस्माईल, शेख अकबर, शेख साजन अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. मुंबई एटीएसच्या मदतीनं या तिघांनाही मुंबईच्या पायधोनी भागात अटक करण्यात आली आणि त्यांना रायपूरला परत नेण्यात आलं.
****
बुलढाणा जिल्ह्यात या वर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सवाचा प्रारंभ करणार असल्याची घोषणा, राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं हा महोत्सव सुरू केला जाणार आहे.
****
बँकॉक इथं सुरू असलेल्या दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिता हिने महिलांच्या संयुक्त खुल्या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
****
0 notes
Text
पूर्ण परमात्मा हे कबीर साहेब आहेत त्यांची भक्ती केवळ संत रामपाल जी महाराज हे आपल्या सर्व पवित्र शास्त्रात प्रमाणित करून दाखवतात त्याचे सत्संग अवश्य बघा
0 notes
Text
बायको : मला ही एक लाखाची बॅग घेऊन द्या ना.
Bandya : एक काम कर, हा ८० हजाराचा इएमआय भर. आणि लाइट बिल १५ हजाराचं तेसुद्धा भर.
बायको : तुम्हाला माहितेय माझ्य�� बॅगेत केवळ १०० – २०० रुपये असतात.
Bandya : १०० – २०० रुपये ठेवण्याठी तुला एक लाखाची बॅह पाहिजे? चल जा…
😍😍😍😃😃😃🤣🤣🤣😂😂😂😀😀😀
0 notes