Barsu Refinery Dispute : बारसूमध्ये जोरदार राडा; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, लाठीचार्ज, पाहा VIDEO
https://bharatlive.news/?p=94896
Barsu Refinery Dispute : बारसूमध्ये जोरदार राडा; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, ...
0 notes
मराठा आंदोलकांवरील 500 गुन्हे मागे घेणार - मुख्यमंत्री
मराठा आंदोलकांवरील 500 गुन्हे मागे घेणार – मुख्यमंत्री
मराठा आरक्षण मंजुर झाल्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरून मराठा आंदोलकांमध्ये अजूनही नाराजी आहे. त्यावर मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याच्या सदंर्भात ‘जीआर’ मागच्याच महिन्यात निघाला होता. 200 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
300 गुन्ह्यांच्या विषयी निर्णय लवकरच करण्यात येईल. 500…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 8 August 2018 Time 18.00 to 18.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ८ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा. ****
द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्यावर थोड्याच वेळात चेन्नईतल्या मरिना समुद्र किनाऱ्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. करुणानिधी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. देशभरातल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज चेन्नईमध्ये येऊन करुणानिधी यांचं अंत्यदर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, करुणानिधी यांच्यावर मरिना समुद्र किनाऱ्यावर समाधी संस्कार करण्यास परवानगी देणाऱ्या, मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी तामिळनाडू सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं दुपारी फेटाळली.
****
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचा पार्थिव देह आज संध्याकाळी मुंबईत आणण्यात येत असून, उद्या, भाईंदर इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातली सगळी वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्यानं आंदोलकांनी आंदोलन थांबवावं आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं. या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यातल्या परळी इथं गेल्या एकवीस दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन तीस नोव्हेंबरपर्यंत मागे घेण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उद्या पुकारण्यात आलेल्या राज्य बंद आंदोलनाबाबत आंदोलकांमध्ये मतभेद दिसत असून, नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई हे जिल्हे यामध्ये सहभागी होणार नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्णय घेतला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. औरंगाबाद इथं उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शांततापूर्ण पद्धतीनं हा बंद करण्यात येणार असल्याचं समन्वयक विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद इथं सांगितलं. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, या मागणीसाठी येत्या पंधरा ऑगस्टपासून ‘एक वेळ चूल बंद’ आंदोलन करणार असल्याचं, तसंच राज्यभरातली ठिय्या आंदोलनं साखळी पद्धतीनं सुरूच राहणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या उंचेगाव इथल्या संदीप शिंदे या युवकानं मराठा आरक्षणासाठी आज दुपारी विष प्राशन केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या नंदूरबारच्या खासदार डॉ.हिना गावीत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ला प्रकरणी फरार आरोपी म्हणून पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात नावं सादर केल्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चाचे धुळ्याचे मुख्य समन्वयक मनोज मोरे यांच्यासह १७ जणांनी धुळ्याच्या पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर होत अटक करवून घेतली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्याचं प्रस्तावित ‘धुळे बंद आंदोलन’ रद्द करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्याच्या प्रस्तावित बंदच्या पार्श्वभूमीवर आज उस्मानाबाद शहरातून पोलिस पथसंचलन करण्यात आलं. अहमदनगर जिल्हा प्रशासनानं शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपाला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या संपामध्ये जिल्ह्यातल्या महसूल कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला आहे. या संपाला लातूर आणि धुळे जिल्ह्यात संपूर्ण आणि जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. तर, नाशिक इथं समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपात संपूर्ण सहभाग नोंदवल्याचं वृत्त आहे. निवृत्तीचं वय साठ वर्षं करण्याच्या संपकऱ्यांच्या मागणीला आपला तीव्र विरोध असल्याचं महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या संघटनेनं एका पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
ई-लर्निंग आणि ई-स्कूलसारखे प्रकल्प राबवण्यावर शालेय शिक्षण विभागानं अधिकाधिक भर द्यावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक आज मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. शैक्षणिक गुणवत्तेत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं प्रयत्न करणं आवश्यक असून त्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर गरजेचा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
0 notes
Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोकांची निदर्शने पुणे | गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरा समोर आज सकाळी मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय' अशा आशयाच्या घोषणांनी बापट यांच्या निवासस्थानाजवळील परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पुण्यामध्ये आज दिलीप कांबळे यांच्या घरासमोर ही आंदोलक ठिय्या देणार आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या घरासमोर ही आंदोलक ठिय्या देणार आहेत. मराठा आंदोलकांनी कालपासून लोकप्रतिनिधींच्या घरा समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काल लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती.
0 notes
Sri Lanka crisis: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा अखेर राजीनामा ; आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण
Sri Lanka crisis: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा अखेर राजीनामा ; आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण
Sri Lanka crisis: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा अखेर राजीनामा ; आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण
श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात आहे. “नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील,” असे ते म्हणाले. नवीन…
View On WordPress
0 notes
पुणतांब्याच्या आंदोलन हाताळण्यातही महाविकास आघाडीत विसंवाद
पुणतांब्याच्या आंदोलन हाताळण्यातही महाविकास आघाडीत विसंवाद
पुणतांब्याच्या आंदोलन हाताळण्यातही महाविकास आघाडीत विसंवाद
मोहनीराज लहाडे
पुणतांब्यातील (ता. राहाता, नगर) शेतकऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी ‘शेतकऱ्यांचा संप’ अशी अभूतपूर्व संकल्पना मांडून आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त होऊ लागले होते. मात्र, तत्पूर्वीच आंदोलकांमध्ये फाटाफूट झाली. बरेचसे प्रश्न ‘जैसे थे’ राहिले. आता पुन्हा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.…
View On WordPress
0 notes