Tumgik
#असलेल्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
BCCI Title Sponsership: BCCI ला मिळाला नवा स्पॉन्सर, धोनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीशी डील
BCCI Title Sponsership: BCCI ला मिळाला नवा स्पॉन्सर, धोनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीशी डील
BCCI Title Sponsership: BCCI ला मिळाला नवा स्पॉन्सर, धोनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीशी डील Title Sponsorship Rights For BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देशांतर्गत सामन्यांसाठी मास्टरकार्डला टायटल स्पॉन्सर्स म्हणून नियुक्त केले आहे. यासाठी बोर्डाने मास्टरकार्डशी करार केला आहे. यापूर्वी पेटीएमकडे हे अधिकार होते. Title Sponsorship Rights For BCCI: भारतीय…
View On WordPress
1 note · View note
lokwadalnews · 1 year
Text
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
ठाणे : हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ReadMore
1 note · View note
marathipeople111 · 2 years
Text
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ' माझी तब्येत बरोबर नाही ' अन ..
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ‘ माझी तब्येत बरोबर नाही ‘ अन ..
एक खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवून एका फार्मासिस्ट असलेल्या तरुणीवर दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या चंद्रपूर येथील एका तरुणाच्या विरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. संकेत संजय चन्ने ( वय 31 राहणार बालाजी वॉर्ड चंद्रपूर ) असे आरोपीचे नाव असून प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, संकेत याची पीडित तरुणीसोबत कॉलेजच्या काळापासून मैत्री होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prashantmmodi · 2 years
Text
Tumblr media
सातारी कंदी पेढा
मिथक आणि वास्तव
भारतामध्ये पेढा बऱ्याच ठिकाणी उत्पादित होतो, प्रत्येक ठिकाणची पेढा बनविण्याची पद्धत आणि खासियत वेगळी आहे. त्यामुळेच पेढ्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात.
मथुरेचे पेढे, सातारी कंदी पेढे, राजस्थानमधील चिवाला येथील पेंडा, धारवाडी पेढा, कुंथलगिरी येथील पेढा, गुजरात भुज येथील पेढा, नरसोबाची वाडी येथील पेढा, जेजुरी येथील पेढा अशी काही खास ठिकाणे आहेत.
सातारी कंदी पेढा आणि मथुरा, कुंथलगिरी, नरसोबाची वाडी येथील पेढ्यांमध्ये साम्य आढळते. तरीही भाजणीची उत्कृष्ट पद्धत आणि फिक्केपणा तसेच मर्यादित गोडवा यामुळे सातारी कंदी पेढाच भारतामध्ये वरचढ आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
सातारी कंदी पेढा हा खमंग भाजणीचा, खरपूस भाजलेला, मर्यादित गोडव्याबरोबरच वेलचीचा निसटता स्वाद देतो.
कंदी भाजणीमुळे तोंडात पटकन विरघणारा पेढा हे सातारी कंदी पेढ्याचे वैशिष्ट्य.
कंदी पेढा नाव कसे पडले याला काही आख्यायिका आहेत, कोण म्हणते ब्रिटिशांनी दिले, कोण म्हणते करंडीत मिळायचा त्यामुळे , कोण म्हणते कंदमुळे असलेल्या ��ानातून भागातून खवा यायचा त्यामुळे ..वगैरे वगैरे...
या सर्व आध्यायिका धांदात चुकीच्या आहेत.
पेढ्याच्या खरपूस भाजणी लाच कंदी भाजणी म्हणतात ..
पेढा तयार होताना जी खरपूस भाजणी असते तिलाच कंदी नावाने ओळखलं जातं.
'कंदी भाजणीचा पेढा' अशी तुळजाराम मोदी यांची पूर्वी एअर इंडियाच्या विमानांमध्ये जाहिरात असायची.
भाजणीमुळे जो मंद सुगंध पसरतो त्यावरून कंदी भाजणीची चाचणी लक्षात येते.
कंदी भाजणी हे एक कौशल्य आहे, प्रतिभा आहे. हे कौशल्य, ही प्रतिभा संपादन करणं प्रत्येकाला जमणे केवळ अशक्य. म्हणूनतर प्रत्येक दुकानातील पेढ्याच्या चवीमध्ये फरक आहे.
खवा भाजणे, प्रमाणात साखर घालणे, ती विरघळली कि इलायची पेरणे हे कोणीही करू शकते, त्याला फार काही ज्ञान लागत नाही.. पण हीच कंदी भाजणी असा गैरसमज करून घेत अर्धवट ज्ञान घेऊन असंख्य कंदी पेढ्याचे व्यापारी तयार झालेत.
मात्र अस्सल कंदी भाजणी घेणे मोजक्याच पारंपरिक आणि खानदानी घराण्यांना जमते..
पुर्वी तुळजाराम मोदी, नारायणराव लाटकर, बी. एम. लाटकर, बाळप्रसाद मोदी, राजाराम मोदी हे स्वतः भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन, देवपूजा करून सोवळ्यातच दूध घोटवायचे .. त्याचा खवा बनवायचे, तदनंतर लगेच तो खवा मुस्त्याने घोटवत अस्सल कंदी पद्धतीने भाजत कुंदा मारायचे..
यानंतरच गडी लोकांना म्हणजेच कामगारांना कारखान्यात प्रवेश असायचा, त्यांचे काम फक्त पेढे हातावर वळत गोलाकार बनवून ताटात लावून दुकानामध्ये विक्रीला पाठवायचे असे.
असाच आणि असाच नियम होता.
नंतरच्या पिढीने उदार धोरण स्वीकारत मोजक्या विश्वासहार्य लोकांना ही भाजणी कशी असते याचे ज्ञान दिले...आणि कंदी भाजणीचे रहस्य हळहळू जगजाहीर झाले.
कोणत्याही पदार्थाला भौगोलिक परिस्थिती सुद्धा तितकीच महत्वाची आणि आवश्यक असते.. तशीच कंदी पेढ्याला सातारचे आल्हाददायक वातावरण पण लाभले..
आणि म्हणूनच कंदी पेढ्याला सातारी कंदी पेढा हे नाव मिळाले आणि सातारी कंदी पेढा जगातल्या खवैयांच्या जिभेवर रुळला.
पुर्वी कंदी पेढा बनविताना उत्पादक स्वतःच खवा बनवायचे, त्यासाठी सुरवातीला साताऱ्याच्या डोंगराळ भागातून दूध यायचे, नंतर कोल्हापूर बॉर्डर वरून यायचे .. आजही सातारा आणि कोल्हापूर येथे दुधाचा दर्जा तुलनेने सर्वोत्कृष्ट आहे.
काळ बदलला, कंदी पेढा बनवायचे अर्धवट टेक्निक जगजाहीर झाल्याने बरेचजण या व्यवसायात उतरले .. तयार खवा घेऊन पेढा बनवू लागले तिथेच चव बदलायला सुरवात झाली.
अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनविणे सोपे असते तर साताऱ्यात आजपर्यंत एकच कै. तुळजाराम मोदी यांना मिठाई शास्त्रज्ञ म्हणून त्या काळच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले गेले नसते. असो..
(मोदी-लाटकर याबद्दल परत कधीतरी माझ्या शब्दात मांडेन)
कच्या मालाचा दर्जा घसरला आणि साहजिकच फिनिश गुड्स वरती परिणाम झाला.
परराज्यातील लोकांनी सुद्धा या व्यवसायामध्ये उदरनिर्वाहासाठी प्रवेश केला. मात्र त्याचा दर्जा टिकविण्यात त्यांना रस नसल्याने केवळ आर्थिक उन्नत्तीसाठी पेढ्यांमध्ये साखरी पेढा, दोन नंबर अशा क्वालिटी आल्या. त्यामुळे चवीचा दर्जा अजून खालावत गेला. आतातर मैदा पण मिसळतात काही जण.. असो..
कंदी पेढ्यांचे उत्पादक ते कंदी पेढ्यांचे व्यापारी हा साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा प्रवास कडू आहे. दुर्दैवी आहे.
ग्राहक पण याला काही प्रमाणात जबाबदार आहेत.. वाटायचे तर आहेत म्हणून दोन नंबरची क्वालिटी डिमांड ग्राहकांनीच निर्माण केली.. दोन नंबर पेढा निर्माण झाला अन वाटणारे आणि खाणारेपण मूळ चव विसरले 🤦🏻
फारच अति झालंय म्हणून आता साताऱ्याचा कंदी पेढा जीआय मानांकनाखाली आणणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी कंदी पेढ्याचा धंदा मांडलाय ते याला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे.
असो.. इतर कोणाबद्दल मी सध्या तरी बोलणार नाही .. माझ्याबद्दल इतकंच सांगेन कि माझ्याकडे अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनतो, अजूनही लाकडाच्या, कोळशाच्या ताव्यावर भाजला जातो, चाचणी पारंपरिक पद्धतीने होते, खवा स्वतःचा आहे (बाहेरचा बिलकुल नाही), हायजिन मेंटेन असते, कंदी भाजणीची मूळ चव जपणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे.
ही कंदी पेढ्याची चव अनुभवायला जरूर या.
येणे शक्य नसल्यास मला 91455-00012 ला मेसेज करा मी तुम्हाला पोच करेन. (अर्थातच विनामूल्य).
ही पोस्ट लिहण्यास सातारकरांनी मला टॅग केले, मेसेज केले, हक्काने सांगितले, समक्ष भेटून सांगितले .. (पाठपुरावाचं केला जणू.. 😀)..
या बहुमानाबद्दल आभार न मानता ऋणी राहणे मी पसंत करेन.
फेसबुक सातारा या व्यासपीठाचे अत्यंत प्रामाणिकपणे आभार.
टीप:- जीआय मानांकनासाठी छत्रपती उदयनराजे यांनी पुढाकार घेतला असून युवानेते संग्राम बर्गे त्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना आपल्याच साताऱ्याचे श्रीधर पारुंडेकर, महेश निकम टेक्निकल करस्पॉन्डन्स पूर्ण करण्यासाठी साथ देत आहेत. आई जगदंबा हे कार्य पूर्णत्वाला नेवो 🙏🏻🕉.
कंदी पेढ्याच्या विक्रेत्यांना मी एवढच विनंती करेन कि दर्जा ठेवा .. ग्राहकांनी पण दर्जा बघावा .. 🙏🏻
याआधी आपल्या साताऱ्याचे राजेंद्र पाटील आणि पुणेस्थित आंतरराष्ट्रीय फूड एक्सपर्ट डॉ. उदय पोतदार यांनी कंदी पेढ्याविषयक अभ्यासपूर्ण पोस्ट केल्या आहेत .. त्याची लिंक कमेंट मध्ये देईन.
वरील पोस्ट माझ्या वैयक्तिक प्रत्यक्ष अनुभव, घेतलेली मेहनत, तिचा कस आणि आपल्या सर्वांनी दिलेली प्रेरणा यातून निर्माण झालेली आहे.
गोडवा वाढवूया..
प्रशांत मोदी (लाटकर)
जगप्रसिद्ध सातारी कंदी पेढ्याचे उत्पादक :-
मोदी'ज् नारायण पेढेवाले
विसावा नाका मारुती मंदिराशेजारी,
विसावा नाका, सातारा
91455-00012
वरील फोटो श्री नरेंद्र जाधव यांनी माझ्या कारखान्यात काढला आहे.
हाच फोटो कित्येक व्यापारी वापरतात. 🤦🏻😀
कृपया शेअर करा .. कॉपी पेस्ट करा
2 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Bihar Hooch Tragedy : दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने २० जणांचा मृत्यू
Bihar Hooch Tragedy : दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने २० जणांचा मृत्यू
Bihar Hooch Tragedy : दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने २० जणांचा मृत्यू बिहारमध्ये विषारी दारूमुळे २० लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर असल्याची माहिती आहे. यावरून विरोधकांना नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये विषारी दारूमुळे २० लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर असल्याची माहिती आहे. यावरून विरोधकांना नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. Go to…
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 2 years
Text
हमीद...
      १९६९-७० साल असावे. बैठकीत एक किडकिडीत मुलगा रोज आलेला दिसायचा. डोक्यावर गांधी टोपी, विजार अन सदरा घातलेला तो मुलगा ओसरीवर उखळाशेजारी बसून जेवण करायचा. आई ताट वाढून त्याच्या समोर ठेवायची. दोन पायावर उकड बसून खाली मान घालून शांतपणे झटपट जेवण उरकायचा. मांडी घालून बसलेलं त्याला आम्ही कधी पाहिले नाही. जेवण झाले की ताट अंगणात मोरीवर धुऊन उखळाशेजारी खांबाला टेकवून ठेवायचा अन झर्रकन बैठकीत निघून जायचा. काहीच बोलायचा नाही. बैठकीत आम्ही जायचो तेव्हा तो कपाटातल्या फाईली काढून काहीतरी खरडत बसलेला दिसायचा. रात्री बैठकीतच झोपायचा.
      तो कोण होता हे कळायचे आमचे वय नव्हते पण लवकरच तो आम्हाला आवडू लागला. कारण  हात धरून तो आम्हाला बाजारात घेऊन जायचा. दोन पैशाची लिमलेटची गोळी घेऊन द्यायचा. आम्ही त्याच्यावर प्रचंड खुश होतो. त्याच्याशी बोलायला आम्हाला आवडू लागले. सर्वांचे ऐकून आम्हीही त्याला हमीद या नावाने हाक मारू लागलो. तोही आता बराच खुलला होता. पण  फक्त आमच्यापुढेच. दादा, आई आणि तात्यांसमोर तो खाली मान घालूनच उभा असायचा. तोंडातून शब्द फुटायचा नाही. संध्याकाळी बैठकीत आम्ही त्याला बोलत बसायचो. बैठकीच्या खिडकीत तो आम्हाला उचलून बसवायचा अन गमती जमती सांगायचा.
हमीद आमच्या घरी आला तेव्हा पंधरा वर्षाचा होता. आमच्या घरीच रहायचा. सांगेल ती कामे करायचा. बैठक साफ करणे, फाईली तयार करणे, कोर्टाची डायरी लिहिणे, पक्षकारांना तारखा देणे, सकाळी बैठकीतले काम आटोपले की फायलींचा गठ्ठा घेऊन कोर्टात जाणे हे त्याचे नित्याचे काम. हे काम करणार्‍याला मोहरीर म्हणतात असे मोठेपणी समजले. याव्यतिरिक्त आईने सांगितलेले सामान बाजारातून आणून देणे, कधी बबर्‍या आला नसेल तर जनावरांना चारा टाकणे, पाणी भरणे, ओसरी झाडून देणे, रासणीला शेतात जाणे ही कामेही तो आनंदाने करायचा. सणासुदीला बुंदीचे लाडू खायला त्याला फार आवडायचे. हक्काने म्हणायचा ‘पोली नको, और लाडू वाडो’.  
      वाड्यासमोर असलेली ओमीताईंची बालवाडी संपून मी आणि बाळूने भारत विद्यालयात प्रवेश घेतला. आमच्या प्रवेशाचे काम हमीदनेच केले. त्यावेळी माझी जन्म तारीख गुरूजींनी विचारली. मी तोंडातल्या तोंडात एकोणीस जानेवारी सांगितली. लगेच हमीद गुरूजींना म्हणाला ‘उन्नीस बिन्नीस कुछ नही जी, छब्बीस जनवरी लिखो. अपना प्रजासत्ताक दिन है इतना अच्छा.’ गुरूजींनीही त्याचे ऐकले अन माझा नवीन वाढदिवस साजरा केला. नशीब वर्ष बदलले नाही. बाळूची मात्र तारीख बरोबर ठेवली पण वर्ष माझेच टाकले. हमीद कृपेने आम्हा दोघा भावांच्या वयाचे अंतर फक्त तीन महिनेच राहिले!  
      आम्हाला शाळेत सोडवायलाही सुरूवातीला हमीद यायचा. उमरगा त्यावेळी लहान गाव होते. पण शाळा हायवेच्या पलिकडे असल्यामुळे आई हमीद��ा पाठवायची. पुढे काही दिवसातच आम्ही आमचे जायला लागलो.
      आम्ही कधी कधी त्याच्यासोबत शेताला जायचो. झाडाखाली बसून तो मुकेशची गाणी म्हणायचा. ‘आ लौट के आजा मेरे मीत...’ हे त्याच्या आवडीचे गाणे. खूपदा तो तेच गाणे ऐकवायचा. त्याकाळी रेडीओ ऐकणे अन राजश्री थिएटरमध्ये सिनेमा पाहणे हीच करमणुकीची साधने होती. त्यात हमीदच्या गाण्याची भर पडली.
      दिवाळी आली की आम्ही हमीद बरोबर जनता किराणा भांडारमध्ये जायचो. दोन पोते भरून सामान आणले जायचे. सामान लिस्टप्रमाणे तपासणे, बील चेक करणे आणि ते पोते घरी पोहोचवणे ही कामे हमीद करायचा. त्याकाळी आजच्यासारखे कोणतेही सामान कधीही मिळत नसे. दिवाळीतच सुवासिक तेल, उटणे, मोती साबण, विशिष्ट आगरबत्त्या, धुपबत्त्या मिळायच्या. दुकानात हे साहित्य पहायलाच आम्हाला मजा यायची. सामान आणणे झाले की आमचा तगादा सुरू व्हायचा फटाक्यासाठी. हमीदच आम्हाला भारत विद्यालयाच्या ग्राऊंडवर असलेल्या दळगडेच्या एकमेव स्टॉलवर घेऊन जायचा. काय काय घ्यायचे हे तोच ठरवायचा. त्याप्रमाणे सर्व फटाके घेऊन उड्या मारतच आम्ही घरी यायचो. घरी आल्याबरोबर प्रवीण, मी व बाळूचे वाटे व्हायचे. मग धुमधडाका!
      दिवाळीचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे नवीन कपडे. ही जवाबदारीही हमीदचीच असायची. तो आम्हाला घेऊन अनिल ड्रेसेसमध्ये जायचा. त्याकाळी आतासारखी भरपूर व्हरायटी नसायची. सणासुदीला फक्त नवीन स्टॉक यायचा त्यातून आम्ही कपडे निवडायचो. त्यातही ‘ये तुमको अच्छा दिखताय जी’ म्हणत हमीद त्याच्या मनाचे घ्यायला लावायचा. नव्या कपड्याचा गठ्ठा घेऊन तो घरी येईपर्यंत आम्ही नाचतच घरी पोहोचायचो.
      शेतात डवारा असला की हमीद आणि आम्ही शेतात झोपायला जायचो. रासणीच्या आदल्या दिवशी शेतातच अन्न शिजवले जायचे. गडी माणसे, आजुबाजूचे शेतकरी आणि आम्ही एकत्र जेवायचो. आई शिधा बांधून द्यायची. गार वार्‍यात बसून गड्यांनी बनवलेली भाकरी अन पिठलं खायला खूप मजा यायची. त्यात हमीदच्या गाण्याची आणि विनोदी किस्से सांगायची भर असायची.
      हळूहळू हमीद घरचा महत्वाचा व्यक्ती झाला होता. आजारपण असो, दवाखाने असो, बाजार असो, पेरणी रासणी असो, लग्न कार्य असो, सणवार असो, त्याच्याशिवाय पान हलायचे नाही. सोलापूरहुन दादांनी गॅस कनेक्शन घेतले होते. तिथूनच सिलेंडर भरून आणावे लागायचे. हे कामही हमीदच करायचा. कधी कधी आम्ही त्याच्यासोबत सोलापूरला जायचो ते केवळ ऑटोरिक्षात बसायला मिळावे म्हणून!   
      आमच्याकडे निळ्या रंगाची हिल्मन कार होती. हमीद अर्धा मेकॅनिकच झाला होता. गाडीला हँडल मारणे, रेडिएटरमध्ये पाणी घालणे, कधी रस्त्यात पेट्रोल संपले तर एखाद्या ट्रकमध्ये जाऊन कॅनमध्ये पेट्रोल भरून आणणे अशा कामासाठी दूरच्या प्रवासात हमीदला सोबत घेतल्याशिवाय जमायचेच नाही.
      हमीदचे लग्न गुलबर्ग्याला झाले तेव्हा प्रवीण त्या लग्नासाठी गेला होता. मोठा भाऊ दिलीप तिथेच इंजिनिअरिंगला होता. ते दोघे मिळून लग्नाला उपस्थित होते. लग्न झाल्यावर त्याने एक खोली भाड्याने घेऊन स्वतंत्र संसार सुरू केला. तोपर्यंत आमच्या घरीच रहायचा. दर ईदला आम्ही त्याच्या घरी जायचो. तिथेच आम्ही पहिल्यांदा शिरखुरमाचा आस्वाद घेतला. तसा शिरखुरमा परत कधी प्यायला मिळाला नाही.  
      आमच्या सर्वांचे बालपण, शैक्षणिक प्रवास अन लग्न हे सर्व हमीदच्या साक्षीने झाले. पुढे आम्हा सर्��ांची मुलेही त्याच्या अंगाखांद्यावर खेळली. आमच्या सहवासात राहून त्याला आमची आवड निवड समजली होती. लग्नासाठी आलेल्या स्थळासोबत नाते जमेल की नाही हे ती आलेली पाहुणे मंडळी पाहुनच तो ओळखायचा. माझ्यावेळेस मुलगी आणि तिचे आईवडील पाहुनच तो म्हणाला ‘यहां पे जमताय देखो, तुम लिख के लो’. अन खरेच जमले! 
      असा हा हमीद. दादानंतर प्रवीणसोबतही मोहरीर म्हणून काम करत होता. कोर्टाचे काम करत करतच त्याने आपला प्रपंच सांभाळला. अंगात सदैव एकच ड्रेस. चप्पल कधी असायची कधी नाही. स्वत:वर खर्च न करता त्याने मुलांना वाढवले. खूप कष्ट केले. अन एक दिवस अचानक वयाच्या साठाव्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकने जग सोडून निघून गेला! आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटले. जवळपास पंचेचाळीस वर्ष अगदी प्रामाणिक सेवा देणारा अन सर्वांशी जीव लावणारा हमीद, अनेक आठवणी मागे ठेऊन काळाच्या पडद्याआड निघून गेला...      
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.    
5 notes · View notes
rahulmarathiblog · 2 years
Text
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ' माझी तब्येत बरोबर नाही ' अन ..
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ‘ माझी तब्येत बरोबर नाही ‘ अन ..
एक खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवून एका फार्मासिस्ट असलेल्या तरुणीवर दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या चंद्रपूर येथील एका तरुणाच्या विरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. संकेत संजय चन्ने ( वय 31 राहणार बालाजी वॉर्ड चंद्रपूर ) असे आरोपीचे नाव असून प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, संकेत याची पीडित तरुणीसोबत कॉलेजच्या काळापासून मैत्री होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ' माझी तब्येत बरोबर नाही ' अन ..
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ‘ माझी तब्येत बरोबर नाही ‘ अन ..
एक खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवून एका फार्मासिस्ट असलेल्या तरुणीवर दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या चंद्रपूर येथील एका तरुणाच्या विरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. संकेत संजय चन्ने ( वय 31 राहणार बालाजी वॉर्ड चंद्रपूर ) असे आरोपीचे नाव असून प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, संकेत याची पीडित तरुणीसोबत कॉलेजच्या काळापासून मैत्री होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ' माझी तब्येत बरोबर नाही ' अन ..
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ‘ माझी तब्येत बरोबर नाही ‘ अन ..
एक खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवून एका फार्मासिस्ट असलेल्या तरुणीवर दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या चंद्रपूर येथील एका तरुणाच्या विरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. संकेत संजय चन्ने ( वय 31 राहणार बालाजी वॉर्ड चंद्रपूर ) असे आरोपीचे नाव असून प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, संकेत याची पीडित तरुणीसोबत कॉलेजच्या काळापासून मैत्री होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ' माझी तब्येत बरोबर नाही ' अन ..
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ‘ माझी तब्येत बरोबर नाही ‘ अन ..
एक खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवून एका फार्मासिस्ट असलेल्या तरुणीवर दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या चंद्रपूर येथील एका तरुणाच्या विरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. संकेत संजय चन्ने ( वय 31 राहणार बालाजी वॉर्ड चंद्रपूर ) असे आरोपीचे नाव असून प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, संकेत याची पीडित तरुणीसोबत कॉलेजच्या काळापासून मैत्री होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ' माझी तब्येत बरोबर नाही ' अन ..
फार्मासिस्ट असलेल्या तरुणीला म्हणाला , ‘ माझी तब्येत बरोबर नाही ‘ अन ..
एक खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवून एका फार्मासिस्ट असलेल्या तरुणीवर दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या चंद्रपूर येथील एका तरुणाच्या विरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. संकेत संजय चन्ने ( वय 31 राहणार बालाजी वॉर्ड चंद्रपूर ) असे आरोपीचे नाव असून प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, संकेत याची पीडित तरुणीसोबत कॉलेजच्या काळापासून मैत्री होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khabarbharat · 1 day
Text
Beed News: बीडमध्ये गोळीबाराची थरारक घटना; परळी शहरात झालेल्या गोळीबारात सरपंच ठार, अन्य एक जण जखमी - sarpanch was killed and another injured in firing at parli town in beed
बीड: बीडमधील परळी शहरात शनिवारी थरारक घडना घडली. शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबार झाला आणि या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधले हे जागीच ठार झाले. या घटनेत ग्यानबा गिते हे जखमी झाले आहे. जखमी असलेल्या गिते यांना परळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याबाबत पोलिस तपास करत आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
28. परमात्म्याशी एकरूपता 
श्रीकृष्ण स्वधर्म (2.31-2.37) आणि परधर्म (3.35) याबद्दल बोलतात आणि शेवटी सर्व धर्मांचा त्याग करून परमेश्वराशी एक होण्याचा सल्ला देतात (18.66).
युद्ध करून आपल्या भावांना मारले तर आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल या भीतीने अर्जुनाच्या मनात दुःख निर्माण झाले. श्रीकृष्ण त्याला सांगतात की तो युद्धातून पळून गेला तरी तो त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवेल कारण युद्ध हा त्याचा स्वधर्म आहे (2.34-2.36). अर्जुनाला युद्धात सामील होण्यास घाबरला असे समाजाला वाटेल आणि युद्धाला घाबरणे हे क्षत्रियासाठी मृत्यूपेक्षाही भयंकर आहे असे प्रत्येकाला वाटेल.
श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की, “स्वधर्म जरी सदोष किंवा सद्गुण नसलेला असला तरी तो परधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे आणि स्वधर्माच्या मार्गात मरण हे श्रेष्ठ आहे, कारण परधर्म भयावह आहे” (3.35).
बाह्यदृष्टी असलेल्या इंद्रियांमुळे, परधर्म सोपे आणि चांगले दिसतात, विशेषतः जेव्हा आपण यशस्वी लोक पाहतो. पण आंतरिक स्वधर्मासाठी शिस्त आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत आणि ते आपल्यामध्ये हळूहळू प्रकट झाले पाहिजेत.
आपली स्वत: ची मूल्याची कल्पना सहसा इतरांकडून केलेल्या सकारात्मक तुलनेतून येते. या तुलनेमध्ये, इतर गोष्टींबरोबरच, आपले प्रतिष्ठित कुटुंब जिथे आपण जन्मलो आहोत, शाळेतील ग्रेड, नोकरी किंवा व्यवसायात चांगली कमाई आणि आपल्या मार्गावर येणारी शक्ती/प्रसिद्धी यांचा समावेश होतो. अशा तुलनेतून आपण स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करतो. परंतु श्रीकृष्णासाठी प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि त्याच्या स्वधर्मानुसार अद्वितीयपणे बहरेल. तो म्हणतो की अव्यक्त सर्वांमध्ये सारखेच असले तरी प्रत्येक प्रकट झालेले अस्तित्व वेगळे असते.
अंतिमत:, श्रीकृष्ण आपल्याला सर्वच धर्मांचा त्याग करण्यास सांगतात आणि त्याला शरण जाण्यास सांगतात जेणेकरून तो आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती देईल (18.66). भक्तीयोगात सांगितल्याप्रमाणे हे शरण जाणे आहे आणि आध्यात्मिकतेची ही प्रथम पायरी आहे.
सागरात मिसळल्याने नदीचा स्वधर्म जसा नष्ट होतो तसेच आपणही परमात्म्याशी एकरुप झाल्याने आपला अहंकार आणि स्वधर्म यांचा अंत होतो.
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ६५ कोटी मतदारांनी मतदान केलं असून ही  जगातील सर्वात मोठी निवडणूक असल्याचं प���तप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. हा या कार्यक्रम मालिकेचा एकशे अकरावा भाग होता. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'एक पेड माँ के नाम' ही विशेष मोहिम सुरु करण्यात आली असून आपल्या भाषणात पंतप्रधानांनी पर्यावरणाचं महत्व विशद केलं.आपल्या आईच्या नावानं स्वतः वृक्षारोपण केल्याचं सांगत पंतप्रधानांनी देशवासियांना आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावानं एक झाड लावण्याचं आवाहन केलं आहे. या मोहिमेमुळं आपल्या आईच्या सन्मानासोबतच पृथ्वीचंही रक्षण होईल, असंही ते म्हणाले. आकाशवाणीच्या संस्कृत बातम्यांचं प्रसारण सुरु होऊन ५० वर्ष पूर्ण झाली असून या वार्तापत्रानं असंख्य लोकांना संस्कृतीशी जोडून ठेवल्याचं सांगत पंतप्रधानांनी आकाशवाणीचं अभिनंदनही केलं. जगन्नाथ पुरी इथली रथयात्रा, अमरनाथ यात्रा तसंच पंढपूरची वारी सुरु झाली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना त्��ांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय भाषा, कला, साहित्य आणि वारसा याद्वारे संस्कृतीचा जगभरात झालेल्या गौरवाचाही त्यांनी मन की बात मधून उल्लेख केला. जगातल्या कानाकोपऱ्यात योग दिवस साजरा झाल्याचं सांगत आयुष्यात सकारात्मक बदलांसाठी नियमित योगासनं करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वषचक स्पर्धेत भारतानं दक्षिण अफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत विश्वविजेतेपद पटकावलं. त्यामुळं देशभरात ठिकठिकाणी विजयोत्सवही साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन खेळाडूंशी संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलं. अंतिम सामन्यातल्या विराट कोहलीच्या फलंदाजीचं, जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीचं, सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या अप्रतिम झेलासह, हार्दीक पांड्या आणि कर्णधार रोहित शर्मा यांचंही पंतप्रधानांनी कौतूक केलं.
****
अमरनाथ यात्रेचा काल शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी १३ हजारांहून जास्त भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. जम्मू इथल्या भगवतीनगर यात्रेकरू निवासस्थानातून सुमारे ६ हजार, ६१९ भाविक नव्यानं यात्रेसाठी आज रवाना झाले असून येत्या १९ ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरु राहणार आहे.
****
आषाढी वारीत वारकऱ्यांच्या प्रबोधनासह शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे दोन चित्ररथ वारीत सहभागी होत आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ मुंबई इथं सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. आस्था- अस्मितेचं प्रतिक असलेल्या पंढरपूर वारीला वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मिक वारी म्हणून जागतिक नामांकन मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
****
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणात फक्त १७ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. यामुळं नजीकच्या कश्यपी प्रकल्पातून गंगापूर धरणात कालपासून पुन्हा विसर्गाला सुरूवात झाली. तत्पूर्वी कश्यपी इथल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी पाणी सोडण्यास विरोध केला होता. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मां यांच्यासोबत ग्रामस्थांची बैठक झाली, त्यानंतर धरणात पाणी सोडण्यात आलं.
****
सोयाबीनच्या बियाणांची उगवणक्षमता तपासूनच शेतकऱ्यांनी ते पेरणीसाठी वापरावं असं आवाहन पुणे जिल्हा कृषी पर्यवेक्षक रोहन शेटे यांनी केलं आहे. सर्वसाधारण ७५ ते शंभर मिलिमिटर पाऊस झाल्यावरच सोयाबीन पेरावं तसंच कीडरोग प्रतिबंध आणि उत्पादन वाढीसाठी बीजप्रक्रियाही करावी, असंही ते म्हणाले.
                                    **** कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
दरम्यान, आठवड्याच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, वाशीम, रिसोड, मालेगांव तालुक्यातील काही गावांत पावसाचं आगमन झालं. येत्या बुधवारपर्यंत कोकणास गोवा आणि मध्य  महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची तिव्रता वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
पुणे एक्सप्रेस आणि निजामाबाद डेमू रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल  करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील विकासकामांसाठी लाईन ब्लॉक घेतल्यानं हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, निजामाबाद -पुणे  डेमू रेल्वे आज आणि उद्या एक जुलै रोजी परभणी, परळी, लातूर, कुर्डुवाडी मार्गे धावेल तर  दौंड-निजामाबाद डेमू रेल्वे उद्या कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल. तसंच, पुणे - नांदेड एक्सप्रेस आज आणि उद्या दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल. तर, नांदेड - पुणे एक्सप्रेस याच दोन्ही दिवशी परभणी, परळी, लातूर, कुर्डुवाडी, दौंड मार्गे धावणार आहे.
****
इंडोनेशियात आयोजित बॅटमिंटन अशियाई कनिष्ठ गट विजेतेपद स्पर्धेत भारतीय संघानं मिश्र सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
****
0 notes
Text
प्रत्येक गावात पर्जन्यमापक का बसवायला हवा ?
जिरायती गावे, कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये याची खूप आवश्यकता आहे. एकूण पावसाचे दिवस, दोन पावसांतील अंतर, पावसाची तीव्रता, दिवसवार, आठवडावार आणि महिनावार पावसाचे मोजमाप हे काही वर्षे केले, की या नोंदीचा संदर्भ घेऊन गावच्या पावसाचा पॅटर्न काही प्रमाणात का होईना निश्चित करता येतो. त्यावर आधारित वार्षिक नियोजन अधिक अचूकतेकडे जाईल. सतीश खाडे, पुणे(9823030218) आजही देशातील ६३ टक्के लोकांचे (९०…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
या एका कारणामुळे IAS टीना दाबीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडेशी केले लग्न
या एका कारणामुळे IAS टीना दाबीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडेशी केले लग्न
या एका कारणामुळे IAS टीना दाबीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडेशी केले लग्न UPSC परीक्षेत 22 वर्षांच्या टीनाच्या घवघवीत यशानंतर तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टीना दाबी हिचे वैयक्तिक आयुष्य देखील तेवढेच चर्चेत असते. 2016 साली ती पहिल्यांदा प्रेमात पडली. नंतर 2018 मध्ये लग्न केलं. 2020 मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि आता 2022 मध्ये ती पुन्हा एकदा लग्न केलं. टीनाने आयुष्याला…
View On WordPress
0 notes