#“शाळा
Explore tagged Tumblr posts
Text
शिक्षिका ममता बंडाठे यांच्या मार्गदर्शनाला यश | सैनिकी शाळा व नवोदय परीक्षेत 6 विद्यार्थ्यांचे सुयश
तिरोडा : असीम सराफ सेन्ट्रल अकाडेमी तिरोडा येथील शिक्षिका ममता आनंद बंडाठे यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिकी शाळा व नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेबाबत यथायोग्य मार्गदर्शन केले व त्याबाबत शिकविले. त्यामुळे सदर परीक्षांमध्ये 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अर्णव मनोजकुमार बडोले (मेरिटोरिअस पब्लिक स्कूल), पार्श्व गजेंद्र ठोंबरे (असीम सराफ सेन्ट्रल…

View On WordPress
0 notes
Text
नगर शहरात आज अवतरला छत्रपतींचा इतिहास , विविध शाळा तसेच कॉलेजकडून देखावे आणि पथनाट्यांचे नियोजन
नगर शहरात आज अवतरला छत्रपतींचा इतिहास , विविध शाळा तसेच कॉलेजकडून देखावे आणि पथनाट्यांचे नियोजन
नगर शहरात आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगर शहरातील विविध शाळा आणि कॉलेज यांनी माळीवाडा बसस्टँड इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या परिसरात आज सकाळी मोठ्या उत्साहात जमा होऊन छत्रपतींच्या इतिहासाला उजळणा देणारी विविध पथनाट्ये तसेच देखावे सादर केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स कॉलेज, न्यू लॉ…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भारत टेक्स एक्स्पोमध्ये परंपरेसोबत विकसित भारताचं दर्शन होत असल्याचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
राज्यातल्या प्रत���येक शाळेला मराठी विषय शिकवणं सक्तीचं करण्यात आल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना सुरुवात
आणि
नांदेडहून आयोध्येला जात असलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात चार जणांचा मृत्यू
****
भारत टेक्स एक्स्पोमध्ये परंपरेसोबत विकसित भारताचं दर्शन होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारत मंडपम् इथं भारत टेक्स २०२५ या वस्त्रोद्योग मेळाव्यात ते बोलत होते. हे जागतिक वस्त्रोद्योग संमेलन असून, यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि निर्यातीला चालना मिळत आहे, तसंच यामधून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
भारत टेक्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भव्य वस्त्रोद्योग प्रदर्शन असून, ते उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनांपर्यंत विविध उत्पादनं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.
****
नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांचा समावेश आहे. या समितीने स्थानकावरचे सीसीटीव्ही फूटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. फलाट क्रमांक १४ आणि १५ वर उतरण्यासाठी असलेल्या पुलावरुन उतरताना काहीजण घसरले त्यामुळे गर्दीतली माणसं एकमेकांवर कोसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचं, उत्तर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. दुर्घटनेच्या आधी तासाभरात पंधराशेहून अधिक तिकिटं विकली गेली होती, त्यामुळे रेल्वेला गर्दीचा अंदाज यायला हवा होता, असं त्या म्हणाल्या.
****
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेची बातमी दुःखद आणि वेदनादायक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महाकुंभातून आणलेल्या गंगाजलाचा लाभ घेण्यासाठी नागपूरमधे आयोजित कार्यक्रमानंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लव जिहाद वर मत व्यक्त केलं. एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे गैर नाही, मात्र यात फसवणुकीचे प्रकार वाढत असून, त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, जळगाव इथं एका कार्यक्रमासाठी आले असता, मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या प्रत्येक शाळेला मराठी विषय शिकवणं सक्तीचं करण्यात आल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही. यासंदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत. दुसरं शाळा हिंदी असो, इंग्रजी असो, कुठलीही असो, त्यांना मराठी शिकवावी लागेल, याची आपण सक्ती केलेली आहे. ती सक्ती ते योग्य प्रकारे पालन कराताहेत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे. यासंदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो आहोत. त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे.
****
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या आजच्या भागा�� अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठी चांगला आराम करावा, नेहमी स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहावा आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास करा असा सल्ला, विक्रांत मेस्सी यानं दिला. त्यांनी पालकांना मुंलामुलांमध्ये स्पर्धा न करण्याचा, तसंच मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नये, असं आवाहन केलं. तर आपल्याला भविष्यात काय करायचं याबद्दल मुलांनी आपल्या पालकांना विश्वासात घेऊन सांगावं आणि ते पूर्ण करून दाखवावं, असं भूमी पेडणेकर यांनी सांगितलं.
उन पॅरेंटस् को भी कहना चाहुंगा की जो एक्सपेक्टेशन्स आपने अपने बच्चों पे डाली है, वो बर्डन जिस दिन लगने लगती है ना, तो दे आर नॉट एबल टू ग्रो। और प्रधानमंत्री श्री मोदीजी भी ये कहते है की, आपके सपने जो है, वो आपके है, आपके बच्चों के नही।
मेरे मम्मी पापा चाहते थे की, मै एक डिफरंट करीअर पार्ट चुनूं। और तब मैने अपने तरीके से उनको एक पॉझिटीव्ह चीज दिखानी शुरू की एक्टींग की दुनिया पॉझिटीव्ह है। ये इतनी आपको घबराने की जरूरत नही है।
****
केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा ‘मेरा युवा भारत’ उपक्रम जळगाव इथं सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात मुंबईतल्या २७ युवक युवतींचा समावेश आहे. राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज या युवकांशी संवाद साधत जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषि परंपरेची माहिती दिली.
****
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झाली. यात शहरातल्या सर्व पुतळ्यांची साफसफाई जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली, तसंच सायकल रॅलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात युवकांसह नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी सायकल रॅली मधून आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौकात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यानिमित्त शिवकालीन शस्त्र आणि संस्कृती तसंच त्यांनी केलेली युद्धनीती याबद्दल आबालवृद्धांना माहिती होत आहे.
****
नांदेडहून अयोध्येला दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यात लोणीकट��ा इथं अपघात होऊन, चार जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारा�� या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेल्या एका बसला धडक देऊन हा अपघात झाला. मृतांमधले तिघे जण नांदेड इथले, तर एक जण हिंगोली इथले रहिवासी होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरणाच्या कामाचं भुमिपूजन आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. इतर मागासवर्ग कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं उत्तम स्मारक आणि सर्वोपयोगी अद्यावत सभागृह, यासारख्या कामांसाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकविचाराने आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन शिरसाट यांनी यावेळी दिलं.
****
नाशिक महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तीन हजार ५४ कोटी ७० लाख रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीला आज सादर केलं. अत्यल्प करवाढ वगळता गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ५०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असून, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज उचलण्याऐवजी महापालिकेने दोनशे कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यासाठी शासन आराखड्यात मंजूर नसलेली कामं परंतू सिंहस्थाच्या दृष्टीने आवश्यक आणि पूरक असणाऱ्या कामासाठी टोकन म्हणून पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कसाबखेडा इथल्या आयुष्मान आरोग्य मंदिराची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. विविध अधिकाऱ्यांनी पाहणी करून या केंद्राचं उत्कृष्ट कामकाज दिसून आल्यामुळे, ही निवड करण्यात आली.
****
नांदेड इथं रेल्वेमार्ग विस्तारीकरणाच्या कामांमुळे उद्या १७ फेब्रुवारीपासून येत्या तीन मार्च पर्यंतच्या १५ दिवसांच्या कालावधीत काही रेल्वेगाड्या काही दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी-नांदेड एक्स्प्रेस १९, २०, २२, २३, २६, २७ फेब्रुवारी तसंच एक आणि दोन मार्च या दिवशी रद्द करण्यात आली आहे. तर नांदेड - औरंगाबाद एक्स्प्रेस २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन, दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथल्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक महाविद्यालय परिसरात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आ��ोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ४७९ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या खामसवाडी शिवारात अवैध गांजाच्या झाडाची लागवड करुन संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली. संभाजी हिलकुटे असं या शेतकऱ्याचं नाव असून, त्याच्या शेतातून एकूण ३४७ किलो २८० ग्रॅम वजनाची गांजाची झाडं ताब्यात घेण्यात आली.
****
उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी तसंच सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर नगरपालिका आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी उद्या भीमा नदीतून पाणी सोडलं जाणार आहे. सुरुवातीला सोळाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं, त्यानंतर सहा हजार घनफूट प्रति सेकंद वेगानं हे पाणी सोडलं जाणार आहे.
****
0 notes
Text
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
उळे:- ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील कृषीकन्यांनी जि. प. प्रा. केंद्र शाळा उळे येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, आजीवन आपल्या पतीचे सामाजिक कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनावर माहिती…
0 notes
Text
1 रेसिडेन्सेस मगरपट्टा मुंढवा पुणे जवळ बरगंडी मंत्रा प्रॉपर्टीजचे निवासस्थान माहिती आणि भेट द्या +917020787851
1 रेसिडेन्सेस मगरपट्टा मुंढवा पुणे जवळ बरगंडी मंत्रा प्रॉपर्टीजचे निवासस्थान माहिती आणि भेट द्या +917020787851
1 रेसिडेन्सेस मगरपट्टा मुंढवा पुणे जवळ बरगंडी मंत्रा प्रॉपर्टीजचे निवासस्थान माहिती आणि भेट द्या +917020787851
1 रेसिडेन्सेस मगरपट्टा मुंढवा पुणे जवळ बरगंडी मंत्रा प्रॉपर्टीजचे निवासस्थान माहिती आणि भेट द्या +917020787851
३ बीएचके, ३.५ बीएचके, ४ बीएचके आणि ४.५ बीएचके बरगंडी मंत्रा लक्झरी निवासस्थान
मुख्य मगरपट्टा – खराडी येथे नवीन लाँच उबेर लक्झरी प्रकल्पासह मोठ्या आणि प्रशस्त घरे.
37 निवासी मजल्यांसह पुणे शहरातील सर्वात उंच टॉवर
10 एकर - 5 अल्ट्रा लक्झरी टॉवर्स यू पुण्याच्या पुढे प्रकल्प., क्र. मगरपट्टा शहर 40+ प्रीमियम सुविधांसह 70% खुली जागा
प्रकल्पातील हाय स्ट्रीट रिटेल शोरूम्स संपूर्ण अपार्टमेंटमध्ये मार्बल फ्लोअरिंग आणि प्रीमियम फिटिंग्ज.
सर्व अपार्टमेंटमध्ये आयलंड किचन मजल्यापासून छतापर्यंत 11 फूट उंची 4 लिफ्टसह 4 फ्लॅट प्रति मजला
हडपसर आणि खराडी येथील सर्व आयटी पार्कशी चांगले जोडलेले आहे
1 रेसिडेन्सेस मगरपट्टा मुंढवा पुणे जवळ बरगंडी मंत्र प्रॉपर्टीजचे निवासस्थान माहिती आणि भेट द्या +917020787851
३ बीएचके, ३.५ बीएचके, ४ बीएचके आणि ४.५ बीएचके बरगंडी मंत्रा लक्झरी निवासस्थान
प्रमुख अंतर:
खरेदी केंद्र: सीझन मॉल: 0.5 किमी अमनोरा मॉल: 1 किमी 93 मार्ग: 5 किमी न्याती प्लाझा: 5 किमी
शाळा: विबग्योर हायस्कूल: 1 किमी मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूल: 2 किमी मेंटर इंटरनॅशनल स्कूल: १.५ किमी HDFC शाळा: 3 किमी पवार पब्लिक स्कूल : ३ किमी
रुग्णालये: सनशाईन हॉस्पिटल: 1 किमी नोबल हॉस्पिटल: 2.5 किमी शायद्री हॉस्पिटल: ३ किमी पूनावाला हॉस्पिटल: 3 किमी
आयटी पार्क्स: मगरपट्टा आयटी पार्क: 1.5 किमी सायबरसिटी आयटी पार्क: 2 किमी आम्ही काम करतो: 1 किमी पंचशील गोल्डन बेल्स: 3.5 किमी EON IT पार्क: 5 किमी वर्ल्ड ट्��ेड सेंटर: 5 किमी एसपी इन्फोसिटी: 5 किमी
1 रेसिडेन्सेस मगरपट्टा मुंढवा पुणे जवळ बरगंडी मंत्रा प्रॉपर्टीजचे निवासस्थान माहिती आणि भेट द्या +917020787851
३ बीएचके, ३.५ बीएचके, ४ बीएचके आणि ४.५ बीएचके बरगंडी मंत्रा लक्झरी निवासस्थान प्रकल्प कॉन्फिगरेशन:
3 BHK: 1471 - कार्पेट एरिया (2 कव्हर केलेले कार पार्किंग) किंमत: 2.50 + मजला वाढ Crs (सर्व समावेश)
3.5 BHK: 1692 - कार्पेट एरिया (2 कव्हर केलेले कार पार्किंग) किंमत: 2.80 + मजला वाढ Crs (सर्व समावेश)
4 BHK: 1871 - कार्पेट एरिया (2 कव्हर केलेले कार पार्किंग) किंमत: 3.10 + मजले वाढ Crs (सर्व समावेश)
4.5 BHK: 2088 - कार्पेट एरिया (2 कव्हर केलेले कार पार्किंग) किंमत: 3.50+ मजला वाढ Crs (सर्व समावेश)
वन रेसिडेन्सेस मगरपट्टा मुंढवा पुणे जवळ बरगंडी मंत्रा प्रॉपर्टीजचे निवासस्थान माहिती आणि भेट द्या +917020787851
३ बीएचके, ३.५ बीएचके, ४ बीएचके आणि ४.५ बीएचके बरगंडी मंत्रा लक्झरी निवासस्थान
वन रेसिडेन्सेस बरगंडी मंत्रा लक्झरी लाइन पुणे आणि PCMC मधील प्रीमियम निवासी मालमत्ता मंत्रा प्रॉपर्टीजचे
1 रेसिडेन्सेस मगरपट्टा मुंढवा पुणे जवळ बरगंडी मंत्रा प्रॉपर्टीजचे निवासस्थान माहिती आणि भेट द्या +917020787851
0 notes
Text
"शिक्षणाची योग्य दिशा निवडा आणि आपल्या मुलांच्या प्रत्येक क्षणाचं यशात रूपांतर करा!"
Education is continuous process… आजच्या शिक्षण पद्धतीत मुलांचा बौद्धिक विकास हा फार महत्वाचा आहे. मात्र, प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. शाळा किंवा अभ्यासक्रम ही एकसारखी असली तरी प्रत्येक मुलाचे ग्रहणक्षमता, आवडीनिवडी, आणि शिकण्याच्या शैलीत मोठा फरक असतो. विविध शिकण्याच्या पद्धती “प्रत्येक मूल अनोखं आहे. त्यांच्या क्षमता ओळखणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हेच त्यांच्या यशाचं…

View On WordPress
0 notes
Text
Holiday Declared On September 26 For Schools and Colleges In Pune And Pimpri-Chinchwad Due To Heavy Rainfall
भारतीय हवामानशास्त्र विभागानी वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा असून या पा��्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना म्हणून #पुणे आणि #पिंपरीचिंचवड शहरातील सर्व #शाळा व महाविद्यालयांना २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी जाहीर -जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) September 25, 2024 Pune city experienced torrential rain on September 25…
0 notes
Text
मित्र
एकेक लागला गळायलानी पाय माझे वळायला ।काळ लोटला वेळ लोटलीमि��्रांसाठी लागलो हळहळायला । दिवस तेव्हाचे आठवतातभारी वाटायचे याच मित्रात ।शाळा सुटली नोकरी लागलीकाम काम तेच होतं कर्मात । आता थोडी मिळाली उसंतबोलावे भेटावे वाटत मित्रांना ।पण तेही निघालेत दूर आतासांगा थांबवू कसे मी सर्वांना ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
कॉलेजच्या विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे करणारा शाहरुख धरला , नगर जिल्ह्यातील घटना
कॉलेजच्या विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे करणारा शाहरुख धरला , नगर जिल्ह्यातील घटना
नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार संगमनेरमध्ये समोर आलेला आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी जा ये करत असताना रस्त्यावर थांबून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या एका परप्रांतीय विकृत तरुणाला संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार , शाहरुख गुलाबनबी अन्सारी असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गेल्या दीड महिन्यांपासून रस्त्यावर…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार-नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्याची ग्वाही • छत्रपती संभाजीनगर इथं ‘घाटी रुग्णालया’च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं अर्थ मंत्री अजित पवार यांचं आश्वासन • औद्योगिक जमिनीसाठी बिगरशेतीची आवश्यकता नाही, तसंच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय • विघनवाडी ते बीड रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी-बीडवासियांची रेल्वेची इच्छा सुफळ आणि • ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८२ पदकांची कमाई
मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा निर्धार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. पश्चिम वाहिनी नद्यांचं सुमारे ५३ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणाऱ्या नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले… ‘‘महाराष्ट्रातले जे चार नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला, आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडरदेखील काढले. मला हा विश्वास आहे, की आता येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू. आणि हे त्रेपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. आपण हा निर्धार केला, की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपण दुष्काळ पाहू द्यायचा नाही. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल.’’
मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोफत मिळणारी ही वीज राज्य सर���ारला तीन रुपये प्रतियुनीट दराने मिळणार आहे, पुढची पाच वर्ष वीजेचे दर कमी करून, घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना याचा लाभ दिला जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं, ‘‘मागच्या काळामध्ये दरवर्षी आपण नऊ टक्के भाववाढ केली. पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या पाच वर्षाचे आपले वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. आणि सांगताना मला आनंद होतो, पुढचे पाचही वर्ष दरवर्षी वीजेचे भाव आम्ही कमी करत जाणार आहे. घरगुती वीजेचे भाव आणि औद्योगिक वीजेचे भावदेखील.’’
संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही देत, जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवत, बीडची वैभवशाली ओळख जगासमोर आणण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. खो- खो विश्वचषक स्पर्धेतल्या विजेत्या संघातले खेळाडू प्रतिक वाईकर, प्रियांका इंगळे, राम कश्यप, सुयश गरगटे, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड आणि प्रशिक्षक प्राची वाईकर, शिरीन गोडबोले यांचा यावेळी सत्कार झाला. आष्टी तालुक्यात सावरगाव इथं मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतनाा ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, जिल्ह्याचा २०२५-२६ या वर्षाचा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून, प्राप्त निधीचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठी करावा, असे निर्देश पवार यांनी दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मितीसंदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं आणि जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जेसंदर्भात प्रस्तावाचा समावेश करावा, अशी सूचना पवार यांनी यावेळी सगळ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना केली. लातूर शहरातल्या गंजगोलाई या ऐतिहासिक वैभवाच्या ठिकाणाला जोडणारे रस्ते आणि परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अधिकाऱ्यांनी या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीच्या ��ाध्यमातून उपस्थित होते. जिल्ह्यात येऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक पाहता येत्या पाच वर्षात शहराची लोकसंख्या वाढणार असून, त्यादृष्टीनं निर्माण करण्याच्या पायाभूत सुविधा आणि अन्य आवश्यकतांसाठी वाढीव नियोजन करण्यात आलं असल्याचं, तसंच जिल्ह्यातली ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याचं सांगत, पालकमंत्री शिरसाट यांनी नागरी सुविधा विकासासाठी वाढीव निधी मिळावा, अशी मागणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेडमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड इथल्या श्री हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराला देखील शिंदे भेट देणार आहेत.
औद्योगिक जमिनीसाठी बिगरशेती - एनए ची आवश्यकता असणार नाही, तसंच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. याकरता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार असल्याचं, याबाबत जारी पत्रकात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता - इज ऑफ डुईंग बिझनेस या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी "कॅरी ऑन योजना" लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एकसमानता ठेवावी, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कॅरी ऑन योजना सुरू करण्याची सूचना पाटील यांनी केली.
केंद्र सरकारतर्फे कालपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात आली आहे. ‘जल लाये, धनधान्य’ अशी या यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही यात्रा येत्या ६० ते ९० दिवसांत २६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या सहा हजार ६७३ ग्रामपंचायतींना, देशभरातल्या ८०५ प्रकल्पांची माहिती देईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन, चा भाग असलेल्या या यात्रेचा उद्देश, जलसंधारण आणि मातीच्या नापिक होण्याबद्दल जनजागृती करणं, हा आहे.
बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या रेल्वेमार्गाची जलदगती चाचणी काल झाली. अहिल्यानगर ते बीड या २६१ किलोमीटर अंतराच्या रेल्वेसेवेची बीडवासियांची गेल्या तीन दशकापासून मागणी होती, अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं, मात्र आता बीड जिल्ह्याची या रेल्वे सेवेची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर झाले असून, नांदेडच्या टायनी एंजल्स स्कूल या संस्थेच्या ’प्लॉट नं. शून्य’, या नाटकानं पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेडच्याच शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेच्या ‘आभाळ’ या नाटकाचा द्वितीय, परभणीच्या गोपाला फाऊंडेशन या संस्थेच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाचा तृतीय, तर मंठा इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या ‘लपंडाव’ या नाटकाचा चौथा क्रमांक आला आहे. ही चारही नाटकं अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकून कर्नाटक पहिल्या, सेना दल दुसर्या तर महाराष्ट्र तिसर्या स्थानावर आहे.
पुरुष क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
छत्रपती संभाजीनगर इथं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या चैतन्य तुपे या सात वर्षीय मुलाची पोलिसांनी काल सुटका केली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री चैतन्य हा वडील सुनिल तुपे यांच्यासोबत खेळत असताना त्याचं अपहरण झालं होतं.
परभणी जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला वीस ते पंचवीस दिवसांची मुदतवाढ द्यावी, या मागणीचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. ही मुदतवाढ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला आहे.
सर्व माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता, वीरपिता आणि अवलंबित, यांनी सैनिक कल्याण विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन या विभागानं केलं आहे. तसंच याआधी दाखल केलेले अर्ज आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आणून द्याव्यात, असंही कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
0 notes
Text
दत्त प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार
दिनांक 3/01/2025 वार शुक्रवार रोजी नगरपालिका शिक्षण मंडळ ,बार्शी यांच्यावतीने” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “यांच्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत शिक्षक आणि उपक्रमशील शाळा या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. श्री. बाळासाहेब चव्हाण साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीतील विधीज्ञ मा.श्री. प्रशांतजी शेटे साहेब,नगरपालिका…
0 notes
Text
प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. १०: लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपण या तत्वाचे पालन करत असल्यानेच आपली लोकशाही बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांबाबतचे शिक्षण समाविष्ट करून युवकांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे…

View On WordPress
0 notes
Text
सभोवतालच्या परिसरातून घडते विद्यार्थ्यांचे जीवनमान
Author- सौ.ज्योती अजित येनपुरे Asst. Teacher (SSPMS Primary Day School)
मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यावर सभोवतालच्या परिसराचा प्रभाव पडतो. आई-बाबा, आजी-आजोबा हा इतकाच त्याचा परिसर. मूल आपल्या कुटुंबातील लोकांचे निरीक्षण करत असते. जसे, की ते कसे बोलतात, कसे वागतात यावरूनच ते मूल बोलायला, वागायला शिकते.
जसजसे मूल मोठे होत जाते ते त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्ये मिसळू लागते. यातूनच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी ते शिकत जाते. सोबतच इतरांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, छोट्यांना आधार देणे अशा बऱ्याच गोष्टीही ते शिकत असते. परिसर त्याच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणून अनेक नवनव्या गोष्टींची भर घालत असतो.
परिसरात वावरत असताना घरातील लोकांपेक्षा, त्याच्या आई-बाबांपेक्षा वेगळे वागणे, बोलणे मुलाच्या कानावर पडत असते. मग ते कधी चांगले तर कधी वाईट असते. या गोष्टींचा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे त्याच्यावर होत असलेल्या किंवा आई-बाबांकडून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असते. यातूनच त्याची सामाजिक जडणघडणही व्हायला सुरुवात होते.
मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या जीवनात शाळा अत्यंत प्रभावशाली ठरते. शाळेमध्ये साजरे होणारे विविध दिन जसे, की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. शिवजयंती उत्सव साजरी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार त्याच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. तसेच वाचन प्रेरणा दिवस, शिक्षक दिन यामुळे साहजिकच मुलाला वाचनाची, अभ्यासाची गोडी लागते आणि शिक्षकांबद्दलची ओढही निर्माण होते. एखादे ध्येय ठरवून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळावा, यासाठी या गोष्टी मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
शाळेमधूनच मुलांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये गड किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. या भेटींमधून ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळते तसेच निसर्गदर्शन घडते आणि त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे प्रेम वाढीस लागून त्याचे महत्त्व समजते. निसर्गाची काळजी कशी घ्यावी, पशुपक्षांची काळजी कशी घ्यावी हेही लक्षात येते. या सगळ्यांतून मुलांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते.
एकंदरीत, वरील सर्वच गोष्टींचा सारासार विचार करता विद्यार्थ्यांच्या जीवनावर आजूबाजूच्या परिसराचा सकारात्मक प्रभाव पडत असतो.
Source: https://sspmpds.in/sabhotalchya-parisaratun-ghadte-vidhyarthi-jiwanman/
0 notes
Text
Alandi : आळंदी नगरपरिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामास अधिकचा निधी दिला जाईल - अजित पवार
एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi) शाळा क्रमांक चारच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला अधिकचा निधी दिला जाईल, असे सांगून अधिकच्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. शाळा क्रमांक चारच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, अपर…
0 notes