#शकतात
Explore tagged Tumblr posts
Text
0 notes
Text
0 notes
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला ��हे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पा��िंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे ��ाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल ��िचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे ��घायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes
·
View notes
Text
काय ब्रम्हा विष्णु महेश प्रारब्धातील कर्म संपवु शकतात
पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर उद्या सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवर काल रात्री झालेल्या संयुक्त अभियानात १४ नक्षलवादी मारले गेले. कुल्हाडीघाट आरक्षित वन क्षेत्रात मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगढ आणि ओडिशा पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान राबवलं. घटनास्थळावरुन काल रात्री दोन आणि आज सकाळी १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
या कारवाईमुळे नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यम��वरच्या संदेशात त्यांनी, नक्षलवादाला हा आणखी एक मोठा धक्का असल्याचं नमूद केलं.
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत भारतीय पॅवेलियनचं उद्घाटन आज झालं. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी संयुक्तपणे या दालनाचं उद्घाटन केलं. त्यानंतर पासवान यांनी कोका कोला चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक ब्रॉन यांची भेट घेऊन, अन्न प्रक्रिया उद्योगाला अधिक सक्षम करण्यासह यामध्ये उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यावर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी उपस्थित होते.
****
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घ��णार आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष दोन चित्ररथ सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी होणार आहे.
****
महसूल विभागात राबवण्यात येत असलेला शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलद गतीनं उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. महसूल विभागाअंतर्गत शंभर दिवसांत घेण्यात येत असलेले कार्यक्रम, योजनांचा आढावा बावनकुळे यांनी घेतला. नागरिकांना महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा, यामध्ये जमीन पोर्टल, महाखनिज पोर्टल, आपली चावडी, ई चावडी यासारख्या प्रणालींचा वापर करावा असंही त्यांनी सांगितलं. महसूल विभागाचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात, नोंदणी आणि मुद्रांक विभागातल्या कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात, क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजना, उपक्रमांचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.
****
स्वामित्व योजन���अंतर्गत देण्यात आलेल्या मालमत्ता कार्डावर बॅंकांना संबंधित मालकास अर्थसहाय्य देता येते, त्यातून ग्रामिण भागातले लोक आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात, याबाबत बॅंकांनी अंमलबजावणी करावी, मालमत्ता कार्ड हे वैध दस्ताऐवज आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हा सल्लागार आणि समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पिक कर्ज योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, जीवनोन्नती अभियान, कृषी अर्थसहाय्य, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय अर्थ सहाय्य, प्रधानमंत्री विश्वकर्मा अशा विविध योजनांतर्गत अर्थसहाय्याबाबत आढावा या बैठकीत घेण्यात आला.
****
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने बीड जिल्ह्यातले १३ सरपंच आणि ४१८ ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले. २०२० पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
****
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येत्या २५ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन मतदार जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मतदारांना शपथ, मतदार ओळख पत्रांचं वाटप, तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचं आयोजन करावं, असे निर्देशही स्वामी यांनी दिले.
****
0 notes
Text
डिसफेजीया किंवा गिळण्यात अडचण यांमुळे तोंडातून पोटात अन्न किंवा काही द्रव गिळण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. डिसफॅगियाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे वेदना. क्वचित प्रसंगी गिळणेही अशक्य होऊ शकते. अधूनमधून गिळण्यात अडचण येऊ शकते जेव्हा तुम्ही झपाट्याने खाता आणि तुमचे अन्न नीट चघळत नाही, परंतु ही प्राथमिक चिंता नाही. तथापि, सतत डिसफॅगिया हे काही गंभीर वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. डिसफेजीयाच्या संशयास्पद कारणावर अवलंबून, अन्ननलिकेच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ऍसिड रिफ्लक्स समस्या ओळखण्यासाठी एसोफेजियल मॅनोमेट्री किंवा पीएच मॉनिटरिंगसारख्या अतिरिक्त चाचण्या केल्या जाऊ शकतात. या व्हिडिओ मध्ये डॉ सम्राट जानकर आपल्याला डिसफॅगिया चे निदान कसे केले जाते याविषयी माहिती देत आहे.https://www.youtube.com/shorts/bYfuauATpzk
0 notes
Text
59. भौतिक जागेपण, आध्यात्मिक निद्रा
श्रीकृष्ण म्हणतात, “सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, ��शा नित्य ज्ञानस्वरुप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्व जाणणार्या मुनीला रात्रीसारखी असते” (2.69). हे रुपक मांडून या श्लोकात शारीरिकदृष्ट्या जागे पण आध्यात्मिकदृष्ट्या झोपलेले आणि उलट अशी अवस्था सांगण्यात आली आहे. याचे शब्दश: अर्थही लावले जाऊ शकतात.
जगण्याच्या दोन शक्यता असतात. एक, ज्यामध्ये आपण आपल्या ��ुखांसाठी इंद्रियांवर अवलंबून असतो आणि दुसरी अशी की आपले इंद्रियांवर अवलंबित्व नसते आणि ते आपल्या नियंत्रणात असतात. पहिल्या शक्यतेच्या गटात असणार्यांसाठी जगण्यची दुसरी पद्धत ही एक अनभिज्ञ, अज्ञात जग असते आणि अंधार/रात्र हे या अज्ञानाचे रुपक आहे.
दुसरे म्हणजे, जेव्हा आपण एका इंद्रिय वापरतो तेव्हा आपले लक्ष इतरत्र असते याचा अर्थ ते यांत्रिकपणे वापरले जाते परंतु जागरूकतेने नाही. उदाहरणार्थ, जेवताना आपण अनेकदा अन्नावर लक्ष केंद्रित करत नाही. हे फोन संभाषण, वर्तमानपत्र किंवा टीव्ही असू शकते कारण आम्ही मल्टीटास्किंगवर विश्वास ठेवतो. आणि म्हणून असे म्हणतात की जेवण्याच्या वेळी जेवण आणि प्रार्थनेच्या वेळी प्रार्थना करणे हे जसे सोपे आहे तशीच आध्यात्मिकताही सोपी आणि साधी आहे. जो वर्तमान क्षणात जगतो त्याच्यासाठी हा दिवस आहे आणि इतरांसाठी मात्र अंधार, हे हा श्लोक सांगतो.
तिसरे स्पष्टीकरण शाब्दिक आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्यातील एक भाग नेहमी जागृत असतो ज्याप्रमाणे झोपलेल्या आईचा एक भाग तिच्या शेजारी झोपलेल्या मुलासाठी नेहमी जागृत असतो; जसे अनेक लोक शयनगृहात झोपलेले असतात आणि त्या व्यक्तीचे नाव म्हटल्याबरोबर तो जागा होतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यातील एक भाग सदैव जागृत ठेवण्याच्या क्षमतेमध्ये आपण सर्व समान धन्य आहोत.
हा श्लोक सूचित करतो की आपण आपल्यातील तो भाग वाढवला पाहिजे जो आपल्या सर्व कृतींबद्दल जागरूक आहे, जेणेकरून एखाद्याची झोप देखील पाहू शकेल.
0 notes
Text
मातीच्या आरोग्याचे महत्त्व आणि ते महत्त्वाचे का आहे
माती हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. हे वाढत्या अन्नासाठी आधार प्रदान करते, परिसंस्थांना समर्थन देते आणि ग्रहाचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जमिनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. निरोगी माती का आवश्यक आहे हे समजून घेणे आम्हाला तिचे संरक्षण करण्यात आणि प्रत्येकासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकते.
मातीचे आरोग्य म्हणजे काय? मातीचे आरोग्य म्हणजे मातीची स्थिती आणि ती वनस्पती, प्राणी आणि लोकांना किती चांगल्या प्रकारे आधार देऊ शकते याचा संदर्भ देते. निरोगी माती पोषक तत्वांनी समृद्ध आहे, फायदेशीर जीवांनी परिपूर्ण आहे आणि जास्त कार्यक्षमतेने निचरा करताना पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे.
मातीचे आरोग्य महत्त्वाचे का आहे?
अन्न उत्पादनास समर्थन देते निरोगी माती झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. हे सुनिश्चित करते की पिके चांगली वाढतात, आपल्याला खाण्यासाठी निरोगी आणि पौष्टिक अन्न देतात. खराब माती आरोग्यामुळे पीक उत्पादन कमी आणि पौष्टिक अन्न कमी होऊ शकते.
पाण्याची गुणवत्ता आणि पुरवठा राखतो निरोगी माती स्पंजप्रमाणे काम करते, पावसाचे पाणी शोषून घेते आणि साठवते. हे पाणी वाहून जाण्यापासून आणि त्यास���बत मौल्यवान माती आणि पोषक द्रव्ये घेण्यास प्रतिबंध करते. हे भूजल पुनर्भरण करण्यास मदत करते आणि नद्या आणि तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो माती कार्बन साठवते, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. माती व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धती अधिक कार्बन मिळवून आणि हवेत कमी सोडून हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकतात.
जैवविविधतेला प्रोत्साहन देते निरोगी माती जीवाणू, गांडुळे आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करणाऱ्या कीटकांसह जीवनाने भरलेली असते. हे जीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, पोषक घटकांचा पुनर्वापर करतात आणि माती सुपीक ठेवतात.
मातीची धूप रोखते जोरदार पाऊस किंवा वारा असतानाही मजबूत, निरोगी माती जागीच राहते. हे शेतजमिनी, जंगले आणि नैसर्गिक परिसंस्थांचे ऱ्हास होण्यापासून संरक्षण करते. आपण मातीच्या आरोग्याचे रक्षण कसे करू शकतो? रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करा. जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी पीक रोटेशनचा सराव करा आणि कव्हर पिके वाढवा. कीटकनाशके आणि तणनाशकांचा अतिवापर टाळा. नो-टिल शेतीचा अवलंब करून मातीचा त्रास कमी करा. मातीची धूप रोखण्यासाठी झाडे आणि वनस्पती लावा. निष्कर्ष मातीचे आरोग्य ही शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आहे. हे अन्न उत्पादनास समर्थन देते, जलस्रोतांचे संरक्षण करते आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करते. आमच्या मातीची काळजी घेऊन, आम्ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही - आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करत आहोत. आपली माती निरोगी आणि समृद्ध ठेवण्यासाठी एकत्र काम करूया!
#soil#soilhealth#soil erosion#agriculture#micronutrients#organic fertilizer equipment#biostimulants market trends#organic fertilizer production line#farming#farms#environment
0 notes
Text
कबावत ब्रश: मुलांच्या कलात्मक जगासाठी परिपूर्ण साथीदार!
कला ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असते. त्यांना त्यांच्या कल्पना रंगांतून व्यक्त करता याव्यात, यासाठी योग्य साधनांची गरज असते. याचसाठी कबावत ब्रश कंपनी घेऊन येते उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वुडन फ्लॅट पेंट ब्रश, जे खास मुलांच्या कलात्मक गरजांसाठी डिझाईन करण्यात आले आहेत.
मुलांच्या कला प्रकल्पांसाठी का निवडावा कबावत ब्रश?
हलका आणि सोपा वापरासाठी डिझाईनमुलांच्या छोट्या हातांना सहज वापरता येईल, असा हा ब्रश हलका व सुलभ आहे.
अचूक फिनिशप्रत्येक स्ट्रोक दमदार व पेशेवर होतो, मग तो शाळेचा प्रोजेक्ट असो वा घरी केलेला एखादा कला प्रयोग.
उत्कृष्ट गुणवत्ताकबावत ब्रश मुलांच्या चित्रांना फक्त रंगच नाही तर गुणवत्ता व टिकाऊपणाही प्रदान करतो.
कला सुलभतेची नवीन व्याख्या
कबावतचे वुडन फ्लॅट पेंट ब्रश मुलांसाठी परिपूर्ण आहेत. हे ब्रश हलके, वापरण्यास सोपे, आणि सुस्पष्ट आहेत. त्यामुळे मुलं सहजपणे आपल्या कल्पना कागदावर उतरवू शकतात. शाळेच्या प्रोजेक्ट्स असोत किंवा घरी कलात्मक सराव, कबावत ब्रशने प्रत्येक स्ट्रोक दमदार आणि व्यावसायिक वाटतो.
मुलांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन द्या
आजच्या डिजिटल युगात मुलांना त्यांच्या कल्पनांना वाट मोकळी करून देणे खूप महत्त्वाचे आहे. कबावत ब्रश हे मुलांना त्यांच्या स्वप्नांना रंग देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उत्तम साधन ठरते.
संपर्क साधा
मुलांच्या कला प्रकल्पांना अधिक खास बनवा! 📞 संपर्क क्रमांक: 82096 17061 | 98218 25663 📧 ई-मेल: [email protected] 🌐 वेबसाइट: Kabawat Brush Company 📷 इंस्टाग्राम: Kabawat Brush Instagram
मुलांच्या रंगीत स्वप्नांना फुलवण्यासाठी आजच कबावत ब्रश निवडा!
🛒 Shop Online: Kabawat Brush Company on IndiaMART
For more information or to request a consultation, visit their website: Kabawat Brushes Company
To stay updated with the latest posts, follow us on social media:
📸 Instagram - https://www.instagram.com/kabawatbrush/
📘 Facebook - https://www.facebook.com/kabawatbrushcompany/
📌 Pinterest - https://in.pinterest.com/kabawatb/
🧵 Thread - https://www.threads.net/@kabawatbrush
🥁 Tumblr - https://www.tumblr.com/kabawatbrush
▶️ YouTube - https://www.youtube.com/@KabawatBrushCompany
Contact: Kabawat Brush Company +91- 82096 17061 / +91- 98218 25663 https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
Digital Partner:
TVM INFOSOLUTIONS PVT LTD
Contact: TVM Info Solutions Pvt. Ltd.
+91-9004590039
Follow us on Social Media
🌐 Website - https://tvminfo.com/
📸 Instagram - https://www.instagram.com/tvm_infosolution/
📘 Facebook - https://www.facebook.com/people/Tvm-Info-Solutions-Pvt-Ltd/61555896761755/
🔗 Linkedin - https://in.linkedin.com/company/tvminfo
▶️ Youtube - https://www.youtube.com/@tvminfosolutions
#KabawatBrush#KidsArt#CreativeKids#PaintingFun#SchoolProjects#ColorYourWorld#ArtWithKabawat#WoodenFlatBrush#Bhiwandi#Thane#Mumbai
0 notes
Text
परमात्मा मृत्यू सुद्धा छोट्या कष्टात परिवर्तित करु शकतात. | Sant Rampal...
youtube
अवश्य ऐका सत्संग: परमात्मा मृत्यु सुद्धा छोट्या काष्टात परावर्तित करू शकतात?|Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
0 notes
Text
पूर्ण परमात्मा हे कबीर साहेब आहेत हे सर्व सृष्टीचे रचना हार आणि तेच पापनाशक पण आहे आणि तेच आपले आयुष्य पण वाढू शकतात पूर्ण परमात्म्याची भक्ती फक्त संत रामपाल जी महाराज हे सांगतात
0 notes
Text
परमात्मा मृत्यू सुद्धा छोट्या कष्टात परिवर्तित करु शकतात. | Sant Rampal...
youtube
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २० जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन • स्वित्झर्लंडमधील दाओसमध्ये आजपासून होणार विविध क्षेत्रासंबंधी सामंजस्य करार • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा वर्षभरात उपलब्ध करुन देणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन • पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाला अजिंक्यपद आणि • दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप
संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रम मालिकेच्या ११८ व्या भागात नागरिकांशी संवाद साधत होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने, संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण पंतप्रधानांनी श्रोत्यांना ऐकवलं… ‘‘जब संविधान सभा ने अपना काम शुरू किया, तो बाबासाहब आंबेडकर ने परस्पर सहयोग को लेकर एक बहुत महत्वपूर्ण बात कही थी | “Our difficulty as I said is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mass that we have today, take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity.” ये audio डॉ. राजेंद्र प्रसाद जी का है - “हमारी जिंदगी और संस्कृति में कुछ ऐसा है जिसने हमें समय के थपेड़ों के बावजूद जिंदा रहने की शक्ति दी है| अगर हम अपने आदर्शों को सामने रखे रहेंगे तो हम संसार की बड़ी सेवा कर पाएंगे |” अब मै आपको डॉ. श्याम प्रसाद मुखरजी की आवाज सुनाता हूं| ’’
येत्या २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी साजरा होणारा पराक्रम दिवस, २५ जानेवारीला साजरा होणारा राष्ट्रीय मतदार दिन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचा अंतराळात दोन उपग्रह परस्परांशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग, भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्ट-अप कंपनीकडून देशातल्या पहिला खाजगी उपग्रहाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण, स्टार्टअप उपक्रमाची यशस्वी वाटचाल, वन्यजीव संवर्धन, आदी विषयांवर पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. महिला बचत गटांच्या प्रेरणादायी यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांना ऐकवल्या. यंदाच्या कुंभमेळ्यात युवा वर्गाचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करुन, ह��� कुंभमेळा डिजीटल माध्यमांतून जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत असल्याचा, प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.
स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंच २०२५ ला प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सहभागी होणार असून, ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस इथं दाखल झाले आहेत. या दौऱ्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ केली आहे. ज्या सदस्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार कार्डच्या माध्यमातून वैध झाले आहेत, असे सदस��य त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्यांचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिल अथवा आईचं नाव, रुजू झाल्याचा दिनांक, समाप्ती दिनांक आदी तपशील कुठल्याही कागदपत्रांशिवाय अपलोड करू शकतात. या सुविधेचा लाभ तीन लाख ९० हजार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी धारकांना होणार असल्याची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे.
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधांसह सर्व सुविधा येत्या वर्षभरात उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेषोपचार रुग्णालयाचं उद्घाटन आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी विविध सुविधांचं भूमिपूजन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ‘‘या हॉस्पिटलमध्ये गरीब लोकं येतात. जवळजवळ मराठवाड्यातील आणि मराठवाडा लगतच्या जिल्ह्यांतील गरीब माणसं इथं येतात. त्यांना बाहेरच्या दवाखान्यात, खाजगी दवाखान्यात पैसा देणं परवडत नाही. त्यांचीसुद्धा अतिशय चांगली व्यवस्था होणं अतिशय आवश्यक आहे. खाजगी दवाखान्यामध्ये तिकडे लोकांचा कल जास्त असतो पैसे भरायचा. पण मी म्हणतो आपण शासकीय रूग्णालयांमध्ये किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, लिवर ट्रान्सप्लांट अशा सुविधा इथे का निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून माझं हे स्वप्न आहे की अशा शासकीय महाविद्यालयांमध्ये या सुविधा वर्षभरामध्ये सुरू केल्याशिवाय मी राहणार नाही.’’
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. मुश्रीफ यांनी सांगितलेल्या सर्व सुविधांचा विकास करणं ही जबाबदारी असून पालकमंत्री म्हणून सर्व कामांसाठी एकत्रित निधी देणार, अशी घोषणा शिरसाट यांनी केली.
नांदेड जिल्ह्यातल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजाराम माने आणि डॉक्टर झोयेक शेख यांच्या गटानं केलेल्या संशोधनाला, अमेरिकेचं पेटंट प्राप्त झालं आहे. या संशोधनाद्वारे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थांची निर्मिती करुन त्याचा वापर हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी करता येत असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली. या यशाबद्दल डॉ. माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी अभिनंदन केलं आहे.
पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य ठरले. दिल्लीत इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८ विरुद्ध ४० असा, तर भारतीय पुरुष संघानेही नेपाळचाच ५४ विरुद्ध ३६ असा पराभव केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यावेळी उपस्थित होते. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिनेदिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. ऑस्कर विजेते साउंड डिझायनर पद्मश्री रसुल पुकुट्टी, राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालकधनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कांगो यांना काल प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा स्वरुपाचा हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी के देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना डॉ कांगो म्हणाले.. ‘‘माझा सत्कार हा माझा व्यक्तीश: सत्कार नसून, माझं सतत म्हणणं आहे की माझ्याबरोबर जे कार्यकर्ते होऊन गेले, त्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली, अनेक कार्यकर्ते आहेत जे अजुनही माझ्याबरोबर काम करत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळेच मी काहीतरी करु शकलो. आणि म्हणून त्यांचाही हा सत्कार आहे.’’
बीड तालुक्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ काल सकाळी एसटी बसच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याचे निर्दे�� एसटी प्रशासनाला दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारे युवक दिसले नाहीत, असं चालकाचं म्हणणं आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसंच परभणी इथं कोठडीत निधन झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी काल छत्रपती संभाजीनगर इथं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर काल शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा तसंच अंमलबजावणी महाशिबीर घेण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात आलं.
हिंगोली इथल्या बौद्ध संस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं उद्घाटन काल प्रसिद्ध व्याख्याते डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते झालं. चळवळीच्या पुनर्मांडणीची गरज-अर्थात चळवळी बांधारे, या विषयावर बोलताना कांबळे यांनी, समाजातील ज्वलंत प्रश्न घेऊन लढे उभे केल्यास चळवळ उभी राहील, असं मत व्यक्त केलं.
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं दगावलेले कावळे 'एव्हीयन इन्फल्युएन्झा एच 5 एन 1' विषाणुजन्य रोगामुळं मृत झाल्याचं, तपासणीत आढळलं आहे. यामुळं उदगीर शहरातला संबंधित परिसर हा अलर्ट झोन - सावधानता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातल्या कोंबड्यांच्या सर्वेक्षणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत.
0 notes
Text
1 note
·
View note
Text
परमात्मा मृत्यू सुद्धा छोट्या कष्टात परिवर्तित करु शकतात. | Sant Rampal...
youtube
0 notes