श्रद्धा वालकरचे वडील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, ‘तो’ खून कोणत्या सरकारच्या काळात? राजकीय भांडवल होणार?
श्रद्धा वालकरचे वडील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, ‘तो’ खून कोणत्या सरकारच्या काळात? राजकीय भांडवल होणार?
श्रद्धा वालकरचे वडील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, ‘तो’ खून कोणत्या सरकारच्या काळात? राजकीय भांडवल होणार?
मुंबईः श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात एकिकडे आरोपी आफताब पुनावाला (Aftab Punawala) याची विविध तपासण्यांद्वारे चौकशी होत आहे. तर दुसरीकडे मुंबईत मोठी नाट्यमय घडामोड घडली. श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट…
३० ऑक्टोबरला पहा ब्लॉकबस्टर ‘दगडी चाळ २’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेला चंद्रमुखी सिनेमा जवळपास १ कोटी २५ लाख प्रेक्षकांनी पाहिला. पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी अश्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर प्रवाह पिक्चर वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला…
The Grand Title Track from the Film Phullwanti Set to Hit the Screens | Bollywood Masala.
Get ready for the exciting launch of the grand title track from the film Phullwanti! Stay tuned for all the latest updates and enjoy the perfect blend of Bollywood masala and Bollywood tadka as this song hits the screens
भोकरदन-जालना मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जवानाचा करून अंत..
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावा गावाजवळील घटना, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त..
भोकरदन-जालना रस्त्यावरील केदारखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडके दिल्याने सैन्य दलातील जवान गजानन वामन नवल (वय ३५ रा.नवडवाडी ता.भोकरदन) हे जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. नवल हे उन्हाळी सुटी घेऊन नातेवाईकांच्या भेटीला गावाकडे आलेले…
वाटत काळ लोटलाआपल्या त्या भेटीला ।आठवणीच उरल्याआहेत बांधून गाठीला ।
नव्हते जेव्हा कोणीहोता तूच पाठीला ।वर्षा मागून वर्ष लोटलेआलोत आता साठीला ।
उठणे बसणे झाले कठीणपाठ लागली खाटेला ।आधार हवा जेव्हा मजहात शोधतात काठीला ।Sanjay R.
नवीन लेख : सुख़न -21 एखाद्या वळणावर आयुष्य इतकं गुंतागुंतीचं होत जातं की पायांना चालायला वाट सापडेनाशी होते. चालण्याची इच्छा, सवय असते आणि मग हे पाऊलवाट न सापडणं फार क्लेशदायक अगतिक ठरत जातं… अश्याच एका वळणावर एक शेर भेटीला आला… देख ज़िंदाँ से परे रंग-ए-चमन जोश-ए-बहाररक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख जिंदॉं म्हणजे तुरूंग… […] https://sahajach.wordpress.com/2023/12/21/%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%bc%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%88-%e0%a4%a4%e0%a5%8b/?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ सहजच
मुन्ना भैय्या-गुड्डू पंडित पुन्हा करणारा राडा ! मिर्झापूर 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुन्ना भैय्या-गुड्डू पंडित पुन्हा करणारा राडा ! मिर्झापूर 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुन्ना भैय्या-गुड्डू पंडित पुन्हा करणारा राडा ! मिर्झापूर 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई – मुन्ना भैय्या आणि गुड्डू पंडित यांच्या हाणामारीला मिस करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. मिर्झापूरचा तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूरच्या नव्या सिजनचे शूटिंग पूर्ण झाले असून नव्या वर्षी अर्थात २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला हा सीजन येणार आहे.
View this…
देवदत्त नागे साकारणार महादेव | स्टार प्रवाहची नवी मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची
स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी पौराणिक मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची
विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या…
Five Latest Marathi Movies: Ultimate Entertainment Mix
Calling all cinephiles! Discover the pulse of Marathi cinema at kalakrutimedia. Our list of five latest Marathi movies guarantees an entertainment mix masala that caters to every taste. Experience the perfect blend of heart-touching narratives and Bollywood masala. Don't miss out on the cinematic extravaganza. Check now!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजितदादा तातडीने दिल्लीला रवाना झाले. ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रपती पदकाचे मानकरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे जसे दिसले तसे.
लातूरला मिशन आयएएसच्या कार्यक्रमासाठी आलो होतो . १५ ऑगस्टला सकाळी सकाळी वर्तमानपत्र हाती आले आणि त्यात अतिशय आनंदाची बातमी वाचली .ती म्हणजे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याची .खरोखरच खूप आनंद झाला. तो यासाठी की जयंत नाईकनवरेसाहेब हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते एक कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महा निरीक्षक आहेत. एक संवेदनशील मनाचा कर्तव्य तत्पर आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा परोपकाराची भावना मनामध्ये बाळगणारा आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे हे विसरून लोकांमध्ये मिसळणारा पोलीस अधिकारी म्हणून मी जयंत नाईक नवरे साहेबांचा उल्लेख करेन.
सर अमरावतीला रुजू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मध्यंतरी श्री संत गाडगेबाबा यांचे वाहन चालक श्री भाऊराव काळे पाटील माझ्याकडे आले .मी साहेबांना सूचना दिली. साहेब म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे .त्याप्रमाणे आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी हृदयापासून त्यांचे स्वागत केले . संत गाडगे महाराज यांच्या आठवणी त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष गाडगे महाराजांना आपण जरी भेटू शकलो नाही तरी त्यांचे चालक म्हणून काम करणारे श्री भाऊराव काळे यांना भेटू शकलो त्याबद्दल श्री नाईकनवरे साहेबांनी खूप आनंद व्यक्त केला .
दरवर्षी आमचे मे जून महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर असते. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून मुले येतात. मी सरांना शिबिराचे निमंत्रण दिले .सरांनी ते स्वीकारले. मी म्हटलं सर मी कोणाला तरी घ्यायला पाठवतो. ते म्हणाले त्याची गरज नाही. मी बरोबर वेळेवर येईल. सरांनी शिबिरासाठी वेळ दिली ती देखील सायंकाळी सहानंतर . म्हणजे आपले कार्यालयीन कामकाज ऑटोपल्यानंतर. साहेब आमच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये आले आणि मुलांमध्ये इतकी मिसळून गेले आणि पोरांनाही त्यांचे भाषण त्यांचे अनुभव इतके जवळचे वाटले की दोन तास कसे निघून गेले ते कळले नाही..
आम्ही अमरावतीच्या शारदा विद्यालयांमध्ये व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिशन आयएएस अंतर्गत अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात अधिकारी त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्या अंतर्गत मी साहेबांना निमंत्रण दिले. साहेबांनी ते हसतमुखाने स्वीकारले. आणि येण्याचे मान्य केले .मी परत सरांना म्हटलं की तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवतो. सरांनी स्पष्टपणे नकार दिला .ते म्हणाले आम्ही शोधून घेऊ .सर त्याप्रमाणे आले .शारदा विद्यालयातील व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मुलांना इतके प्रेरित केले की जवळपास 20 मुलांनी सरांना प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाला सरांनी हसत खेळत उत्तर दिले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलांनी सरांची गाडी पाहिली. सायरन कसा वाजतो ते प्रात्यक्षिक करून पाहिले .पोरांना खूप कुतुहूल असते. पोलिसांबद्दल भीती असते .पण नाईकनवरेसरांनी पोरांमध्ये मिसळून आपल्या गाडीची तोंड ओळख त्यांना करून देऊन पोलिसांचा सायरन कसा वाजते त्याचे प्रॅक्टिकल करून मुलांची मने जिंकली .
अशाच एक वेळ मला सरांचा फोन आला. ते म्हणाले काठोळे सर तुम्ही घरी आहात काय ? ते म्हणाले मला तुम्हाला काही पुस्तके भेट द्यावयाची आहेत. त्यांनी दोन बॉक्स भरून पुस्तके मला सप्रेम भेट दिली. त्यानंतरही परत त्यांचा फोन आला. सर अजून काही पुस्तके शिल्लक आहेत. ती देखील मला तुम्हाला द्यावयाची आहेत. मित्रांनो पुस्तकाचे दान हे सगळ्यात महत्त्वाचे दान असते. आणि जयंत नाईकनवरे सरांनी पुस्तक लिहून नुसतं ते थांबले नाहीत .तर प्रत्यक्षात कृतीतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती व्यक्त केलेली आहे .ही एक परोपकाराची प्रवृत्ती दर्शवून आपली भारतीय संस्कृती आपलीसी केलेली आहे.
सरांचे माझे फोनवर अधून मधून बोलले होते. आमचा दर रविवारचा जो साहित्य परिवाराचा गेट-टु -गेदर कार्यक्रम होतो. त्याबद्दल ही सरांनी आनंद व्यक्त केला आणि त्या कार्यक्रमातही मला यायचे आहे. साहित्यिक लोकांचा परिचय करून घ्यायचा आहे .असाही मनोदय व्यक्त केला. मी सतत प्रवासात असतो. परंतु आमचे अधून मधून सरांशी संपर्क सुरूच असतात. एक चांगला विशेष पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे सरांच्या रूपाने अमरावतीला मिळाला आहे .सरांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून हा महत्त्वाचा पल्ला गाठलेला आहे .आपल्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. लेखनाचा छंद असलेला आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने चालणाऱ्या या माणसाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला .खरोखरच हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे झालेले मूल्यांकन आहे .मी अमरावतीकर नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो .आणि त्यांना शुभेच्छा देतो.