आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद पडणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
सातारा जिल्ह्यात राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
१८८ हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाटप
आणि
राज्य शासनाचे मराठी चित्रपट पुरस्कार येत्या २१ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार
सविस्तर बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही थांबणार नाही, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला हा माहेरचा आहेर असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल सातारा जिल्ह्यात पाटण इथं महिला सशक्तीकरण अभियानात बोलत होते. सरकारला महिलांना फक्त दीड हजार रुपये देऊन थांबायचं नाही, तर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करायचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…
आम्हाला तुम्हाला फक्त दीड हजार देऊन थांबायचं नाही. महिला बचतगट असेल, यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल, महिला बालकल्याणच्या योजना असतील, स्कील डेव्हलपमेंटच्या योजना असतील, इतर ज्या काही योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभं आम्हाला करायचं आहे. आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे. आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे. आणि हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे.
महाराष्ट्रातल्या बहिणींना आता कुणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही, कारण त्यांच्या तीन भावांनी त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही जण या योजनेला विरोध करत न्यायालयात गेले आहेत, त्यांना उत्तर द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी महिलांना यावेळी केलं.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई भाजपनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. विविध जिल्ह्यातल्या महिला लाभार्थ्यांशी दूरदश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून फडणवीस यांनी संवाद साधला. विकसित भारतासाठी महिला सक्षम झाल्या पाहिजे, या हेतुनेच लाडकी बहीण योजना आणल्याचं ते म्हणाले.
****
सातारा जिल्हयात पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी या राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या गावात महावितरणच्या वतीने शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर कृषीपंप योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा काल जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं पोहोचली. राज्यातल्या सामान्य माणसांच्या महत्त्वाच्या प्रश्नांविषयी जागरुकता निर्माण करण्याचं आणि भविष्यकाळासाठी लोकांच्या मध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही या शिवस्वराज्य यात्रेतून करू इच्छितो, असं पक्षाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
****
शेजारी देशांमधून भारताच्या आश्रयाला आलेल्या हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या तीन-तीन पिढ्या न्यायासाठी तिष्ठत राहिल्या, त्यांना न्याय देण्याचं काम मोदी सरकारनं केल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. शाह यांनी काल अहमदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात, भारतात आलेल्या १८८ शरणार्थींना, नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत, नागरिकत्व प्रमाणपत्रं प्रदान केली, त्यावेळी ते बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायदा हा कुणाचं नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा कायदा आहे, असं शाह यांनी सांगितलं.
****
देशातल्या पाळीव जनावरांचं २०३० पर्यंत लसीकरण करून त्यांना तोंड तसंच खुरांना होणाऱ्या ‘लाळ्या खुरकुत’ आजारापासून मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मत्सपालन, पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री राजीव रंजन सिंह यांनी बैठक घेतली. या योजनेअंतर्गंत केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, पंजाब, या राज्यांना एफएमडी मुक्त करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.
****
२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्याची परवानगी अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिली आहे. भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारताच्या ताब्यात देणं शक्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. भारतात पाठवण्याच्या हालचालींच्या विरोधात राणानं न्यायालयात धाव घेतली होती. सध्या तो याच प्रकरणात लॉस अँजेलिसच्या कारागृहात आहे. लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंधित असल्याचा आरोपही तहव्वुर राणावर आहे.
****
बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ आणि बहिणींच्या अनोख्या नात्याचा हा सण असून यामुळे प्रेम आणि विश्वासाचं नातं बळकट होतं, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून विविधतेत एकतेचं दर्शन घडवणारा हा सण असून, महिलांच्या अधिकारांचं रक्षण करण्याच्या आपल्या प्रतिबद्धतेला बळकटी देणारादेखील हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं आहे.
यानिमित्त पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत.
****
राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ���ाल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
****
राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा मुंबईत येत्या २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या कार्यक्रमात ५८ आणि ५९ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर २०२३ चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येतील.
****
ज्येष्ठ साहित्यिक गोविंदा तुकाराम तथा गो. तु. पाटील यांचं रविवारी नाशिक इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी स्तंभलेखन, संपादन, बालकांसाठी लेखन, संतचरित्र या क्षेत्रात योगदान दिलं आहे. अनुष्टुभ या नियतकालिकाचे ते संपादक होते. वि. वा. शिरवाडकर यांच्या ’नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचं संपादन पाटील यांनी केलं आहे.त्यांचंओल अंतरीची या आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
****
जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत दोन लाख ९० हजार ८७१ बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल ही माहिती दिली. प्रलंबित अर्जांबाबत राहिलेल्या त्रुटी किंवा अर्ज भरण्यात काही चुका झाल्या असल्यास त्यांच्याकडून त्याची पूर्तता करून त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, लाडकी बहिण योजनेनंतर उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या हिंगोली शाखेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना ५० हजार राख्या पाठवल्या आहेत. या राख्या घेऊन या बहिणी काल मुंबईला रवाना झाल्या.
****
मराठ्यांनी राज्यात सुरू केलेली आरक्षणाची लढाई ही वर्चस्ववादाची असल्याची टीका, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं काल ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात ते बोलत होते. २००४ साली बांटिया आयोगाने राज्यात ओबीसींची संख्या कमी झाल्याचा अहवाल दिला आहे. तो अहवाल कोणत्या आधारे दिला याचा शोध घेणे गरजेचं आहे, त्यामुळे आता ओबीसींना आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढावं लागणार असल्याचं ते म्हणाले. या मेळाव्यापूर्वी उमरी चौक येथून पारंपारिक वेशात भव्य रॅली काढण्यात आलीहोती.
****
लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काल शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या.
****
नाशिक जिल्ह्यात सिन्नरहून मुंबईकडे निघालेला दुधाचा टँकर कसारा घाटातल्या दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तर चौघे जखमी झाले. काल दुपारच्या सुमारास घाट उतरत असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं टँकर दरीत कोसळला. जखमींवर इगतपुरी इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कलर्स ऑफ छत्रपती संभाजीनगर या हौशी फोटोग्राफर समूहातर्फे आज शहरातल्या सिद्धार्थ उद्यानात छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सकाळी सात ते दहा या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे.
****
0 notes
पंजाब सरकार ने पुरानी पेंशन स्कीम को लेकर नोटिफिकेशन जारी होने पर कर्मचारियों में खुशी की लहर, कर्मचारियों ने मुख्यमंत्री भगवंत मान को दिया धन्यवाद
पंजाब सरकार ने पुरानी पेंशन स्कीम को लेकर नोटिफिकेशन जारी होने पर कर्मचारियों में खुशी की लहर, कर्मचारियों ने मुख्यमंत्री भगवंत मान को दिया धन्यवाद
निखिल दुबे की रिपोर्ट /पंजाब सरकार ने पुरानी पेंशन स्कीम को लेकर नोटिफिकेशन जारी होने पर कर्मचारियों में खुशी की लहर, कर्मचारियों ने मुख्यमंत्री भगवंत मान को दिया धन्यवाद.पंजाब सरकार ने शुक्रवार को सरकारी कर्मचारियों के लिए एक बडा फैसला लिया था .पंजाब सरकार ने पुरानी पेंशन स्कीम को लेकर नोटिफिकेशन जारी कर दिया है. इससे प्रदेश के कर्मचारियों को फायदा होगा. चंडीगढ मे हुई कैबिनेट की बैठक मे इस फैसले…
View On WordPress
0 notes
LIVE: माता-पिता का आशीर्वाद लेकर तिहाड़ जेल के लिए निकले अरविंद केजरीवाल
नई दिल्ली: दिल्ली के मुख्यमंत्री आज तिहाड़ जेल में सरेंडर करेंगे। सुप्रीम कोर्ट ने उन्हें चुनाव प्रचार करने के लिए 21 दिनों की अंतरिम जमानत दी थी। जेल में सरेंडर करने से पहले केजरीवाल राजघाट पर राष्ट्रपिता महात्मा गांधी की समाधि और कनॉट प्लेस स्थित हनुमान मंदिर गए। इसके बाद वह पार्टी दफ्तर पहुंच गए हैं। इसके बाद सीएम तिहाड़ जेल में सरेंडर करेंगे। इससे पहले उन्होंने एक्स (ट्विटर) पर पोस्ट करके बताया था कि वह दोपहर बाद करीब तीन बजे तिहाड़ जेल में आत्मसमर्पण करेंगे। मुख्यमंत्री ने पोस्ट में कहा कि सुप्रीम कोर्ट के आदेश पर वह 21 दिन चुनाव प्रचार के लिए बाहर आये थे। इसके लिए उन्होंने देश की शीर्ष अदालत का आभार जताया है।
'मैं देश के लिए फांसी पर चढ़ने के लिए भी तैयार हूं'
पार्टी दफ्तर पहुंचे केजरीवाल ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा, 'मैं आज इसलिए जेल नहीं जा रहा कि मैंने कोई भ्रष्टाचार किया है। मैं इसलिए जेल रहा हूं क्योंकि मैंने तानाशाही के खिलाफ आवाज़ उठाने की हिम्मत की है। मैंने इन 21 दिनों में एक मिनट भी ज़ाया नहीं किया। मुझे नहीं पता कि अब मैं कब वापस आऊंगा, लेकिन मुझे कोई परवाह नहीं है। मेरे खून की एक एक बूंद इस देश के लिए है। मैं देश के लिए फांसी पर चढ़ने के लिए भी तैयार हूं।' उन्होंने आगे कहा, '4 तारीख को मंगलवार है। भली करेंगे बजरंगबली। तानाशाहों का नाश करेंगे। अपनी किसी व्यक्ति विशेष से कोई दुश्मनी नहीं है। अपनी दुश्मनी तानाशाही से है। सारे एग्जिट पोल फर्जी हैं। आप मुझसे लिखवा कर रख लो। अगर आपका कैंडिडेट हार रहा है, तब भी आपको आखिर तक वहीं टिके रहना है। काउंटिंग एजेंटों को वीवीपेट की पर्चियों का मिलान होने तक वापस नहीं आना है। सतर्क और चौकन्ना रहना है। ये इनका माइंड गेम है आपको डिस्करेज और डिप्रेस करने के लिए। मेरा मानना है कि ये लोग नहीं जीत रहे।' राजघाट पहुंचे केजरीवालदिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सीएम आवास से निकलने के बाद पहले राजघाट पहुंचे थे। केजरीवाल ने यहां महात्मा गांधी की समाधि पर श्रृद्धांजलि अर्पित की। अब वह पार्टी दफ्तर में पार्टी नेताओं और कार्यकर्ताओं से मुलाकात करेंगे।'जेल में मुझे आप सबकी चिंता रहेगी'सीएम केजरीवाल ने ट्वीट में कहा, "आज तिहाड़ जाकर सरेंडर करूंगा। दोपहर तीन बजे घर से निकलूंगा। पहले राजघाट जाकर महात्मा गांधी जी को श्रद्धांजलि दूंगा। वहां से हनुमान जी का आशीर्वाद लेने कनॉट प्लेस स्थित हनुमान मंदिर जाऊंगा। और वहां से पार्टी दफ्तर जाकर सभी कार्यकर्ताओं और पार्टी के नेताओं से मिलूंगा। वहां से फिर तिहाड़ के लिए रवाना होऊंगा।" सीएम केजरीवाल को ईडी ने कथित शराब घोटाले में गिरफ्तार किया था। उन्होंने कहा कि जेल में "मुझे आप सबकी चिंता रहेगी। आप खुश रहेंगे तो जेल में आपका केजरीवाल भी खुश रहेगा"।जमानत याचिका पर कोर्ट में फैसला सुरक्षितइससे पहले दिल्ली की एक अदालत ने मुख्यमंत्री केजरीवाल की सात दिन की अंतरिम जमानत की याचिका पर शनिवार को फैसला सुरक्षित रख लिया था। याचिका में स्वास्थ्य संबंधी कारणों का हवाला देते हुए जमानत मांगी गई थी। राउज एवेन्यू कोर्ट की विशेष जज कावेरी बावेजा ने याचिका पर सुनवाई के बाद फैसला सुरक्षित रख लिया। फैसला 5 जून को सुनाया जाएगा।पंजाब के सीएम भगवंत मान पहुंचे केजरीवाल के आवासपंजाब के सीएम भगवंत मान दिल्ली में सीएम अरविंद केजरीवाल के आवास पर पहुंचे। सीएम केजरीवाल आज राजघाट पर महात्मा गांधी की समाधि और कनॉट प्लेस में हनुमान मंदिर में मत्था टेकने के बाद तिहाड़ जेल में सरेंडर करेंगे। उन्हें 10 मई को लोकसभा चुनाव के लिए प्रचार करने के लि��� सुप्रीम कोर्ट ने अंतरिम जमानत दी थी और उन्हें सरेंडर करने के लिए कहा गया था। http://dlvr.it/T7kGgZ
0 notes