#दिलं
Explore tagged Tumblr posts
stargazer3700 · 8 months ago
Text
I would feel as if the sky were collapsing if you weren't here. खरंच, माझं आभाळ कोसळलं असतं आणि गम्मत तर ही आहे की कदाचित मीच त्याला कोसळू दिलं असतं.
15 notes · View notes
alkabirislamic · 11 months ago
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
मांस खाणे पाप आहे!
पवित्र कुराण मध्ये लिखित आहे की "खुदा की इबादत पाक दिलं से करणी चाहिए." परंतु मांस खानाऱ्यांचे हृदय कधीच साफ असू शकत नाही.
Tumblr media
25 notes · View notes
chaitanyakulkarni98 · 6 months ago
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढा��ा तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस ��सल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एक��ा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धा��पळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो ��णि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक स���गपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद��र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार
छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार
मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते - आनंदवनात मित्र मेळा कार्यक्रमाचा समारोप सत्रात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
आणि
दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर ३०५ धावांचं आव्हान
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन प्रशालेचे विज्ञान शिक्षक मयुर साबळे यांनी या कार्यक्रमाचं महत्व या शब्दात विषद केलं.
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या कार्यक्रमाचा प्रभाव मला आता जाणवतोय की पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होतोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी या कार्यक्रमामध्ये जे एक्सपर्ट इनव्हॉल्ह्व केलेले आहेत, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. खरोखरच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचादेखील विचार केलाय. भारतातल्या ज्या प्रमुख परीक्षा आहेत, त्या परीक्षांमधले जे टॉपर आहेत, ते विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहेत. त�� एकंदरीत खरोखरीच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेसाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी हा उ��क्रम खरोखरीच मला महत्वपूर्ण वाटतो.
****
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले, तर दोन जवानांना वीरमरण आलं. चकमक झाली त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला आहे. बिजापूर इथल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातल्या जंगलात सुरक्षा दलानं आज सकाळी शोधमोहीम सुरू केली. ही मोहिम सुरू असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यात ३१ नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.
नक्षलमुक्त भारत बनवण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना बिजापूरमध्ये हे मोठं यश मिळाल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, देशाच्या इतर भागातही अशाच प्रकारे नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दिल्ली विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालात भाजपाने जवळपास तीन दशकांनंतर जोरदार पुनरागमन करत ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं.
****
मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज आनंदवनात मित्र मेळा कार्यक्रमाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाशी जोडून घेण्यात लोकांना आज आत्मिक समाधान मिळतं, ही बाब गेल्या ७५ वर्षांच्या वाटचालीचं फलित असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं, ते म्हणाले –
मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं, समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार, आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षांनंतर याठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश लोकं येतात, आणि या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं. किंबहुना आपण मोठे झालोत, अशा प्रकारची भावना निर्माण होतेय. पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे, ती खरोखर अत्यंत महत्वाची अशी वाटचाल आहे.
बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा को��ींरुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं असून, आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हे साध���य करता येईल, असं ते म्हणाले. कुष्ठरोग्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली असली तरी मोठ्या प्रमाणावर अजून कार्य करायचं बाकी आहे, असं नमूद करत, आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्र, उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णालयाला देण्यात येणारं अनुदान प्रतिरुग्ण २२०० वरुन ६ हजार पर्यंत तर पुनर्वसनासाठीचंही अनुदान दोन हजार पासून ६ हजार पर्यंत वाढवल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्यावहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. त्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असून, अक्षयावत आणि बडे हनुमान मंदीरालाही भेट देणार आहेत. डिजिटल महाकुंभा केंद्रातून त्या कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याशिवाय, अर्जात काही बदल असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची मुदत १९ ते २५ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांत घेतली जाते.
****
ओडिशातल्या कटक इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताला ३०५ धावांचं आव्हान दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडचा संघ एकच चेंडू शिल्लक असताना ३०४ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रविंद्र जडेजानं तीन, तर मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पंड्या, आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बिनबाद तीस धावा झाल्या होत्या.
****
उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत ११५ पदकांची कमाई करत तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. यामध्ये २७ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वाधिक ४२ सुवर्ण पदकं जिंकून सेना दल पहिल्या, तर ३१ सुवर्ण पदकं जिंकून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
****
मुंबई खुल्या बॅ��मिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि एरियन हार्टोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमिना अंशबा आणि एलेना प्रिडांकिना या जोडीशी होणार आहे. प्रार्थना आणि अरियाना या भारत-डच जोडीनं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या माया राजेश्वरनचं आव्हान संपुष्टात आलं.
****
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून, त्यादृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं आज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीनं ते संबोधित करत होते. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाला आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी, साहित्यिक देविदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर साहित्य रसिक उपस्थित होते.
****
लातूर शहराजवळच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या कीर्ती ऑइल मिलला काल मध्यरात्री भीषण आग लागली. बारदाण्याच्या गोडाऊनला ही लागली असून, संपूर्ण बारदाने जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या सहा बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या कृषि विज्ञान केंद्रामध्ये सात दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मधमाशी आणि मध अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. दिवसेंदिवस पिकांमध्ये परागीभवन न होण्याची गंभीर होत असलेली समस्या, परागीभवना अभावी कमी होत असलेली उत्पादकता, रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधुमक्षिका पालनात येणाऱ्या अडचणी, मधुमक्षिकांबाबत असणारे गैरसमज, असे अनेक महत्वाचे विषय यात हाताळण्यात आले. विविध जिल्ह्यांतले २५ शेतकरी, उद्योजक आणि ग्रामीण युवक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
****
बिलाच्या थकबाकीमुळे वीज जोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना महावितरणच्या अभय योजनेत व्याज आणि दंड ��ाफीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ५० दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला योजनेची मुदत संपणार असून, ग्राहकांनी वीजबिल थकबाकी भरून सवलत मिळवावी तसंच कायदेशीर कारवाईची नामुष्की टाळावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडतल्या सहा हजार ५८४ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्याकडून सहा कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. या ग्राहकांना सात कोटी ५२ लाख रुपयांचं व्याज आणि विलंब आकार माफ झाला आहे.
****
0 notes
ganpatidas · 18 days ago
Text
0 notes
starstruckchildbluebird · 18 days ago
Text
0 notes
pandurangkoli · 18 days ago
Text
0 notes
124bha · 18 days ago
Text
1 note · View note
rocky1462 · 18 days ago
Text
#realspiritualknowledgeofsantrampaljimaharajji #FactfulDebatesYouTubeChannel #sanews #सनातन_परम_धाम_कहां_है #Real Spiritual knowledge of sant Rampal ji Maharaj ji 🙏 Supreme God is Kabir Saheb Ji 🙏
0 notes
shobha12sblog · 18 days ago
Text
0 notes
atulgaikwad7038 · 18 days ago
Text
कबीर परमात्मा हे सतलोकातून येतात आणि पुण्य आत्म्यांना भेटून सत्य ज्ञान सांगतात
0 notes
satsahebjis-world · 19 days ago
Text
600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वतः येऊन तत्वज्ञान दिलं | Sant Rampal ...
youtube
0 notes
steadykingchaos · 19 days ago
Text
600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वतः येऊन तत्वज्ञान दिलं | Sant Rampal ...
youtube
0 notes
nagarchaufer · 26 days ago
Text
‘ हक्कसोड ‘ करून दिलं अन छळ सुरु झाला , विवाहितेने त्यानंतर.. 
विवाहित महिलेने जमिनीची हक्कसोड प्रक्रिया केली मात्र त्यानंतर पतीकडून तिला पैशाचा तगादा सुरू झाला आणि त्यानंतर विवाहित महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे 13 तारखेला ही दुर्दैवी घटना घडलेली असून मयत महिलेचा पती याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  उपलब्ध माहितीनुसार , छाया…
0 notes
airnews-arngbad · 5 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार-नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्याची ग्वाही • छत्रपती संभाजीनगर इथं ‘घाटी रुग्णालया’च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं अर्थ मंत्री अजित पवार यांचं आश्वासन • औद्योगिक जमिनीसाठी बिगरशेतीची आवश्यकता नाही, तसंच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय • विघनवाडी ते बीड रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी-बीडवासियांची रेल्वेची इच्छा सुफळ आणि • ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८२ पदकांची कमाई
मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा निर्धार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. पश्चिम वाहिनी नद्यांचं सुमारे ५३ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणाऱ्या नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले… ‘‘महाराष्ट्रातले जे चार नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला, आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडरदेखील काढले. मला हा विश्वास आहे, की आता येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू. आणि हे त्रेपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. आपण हा निर्धार केला, की का��ीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपण दुष्काळ पाहू द्यायचा नाही. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल.’’
मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोफत मिळणारी ही वीज राज्य सरकारला तीन रुपये प्रतियुनीट दराने मिळणार आहे, पुढची पाच वर्ष वीजेचे दर कमी करून, घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना याचा लाभ दिला जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं, ‘‘मागच्या काळामध्ये दरवर्षी आपण नऊ टक्के भाववाढ केली. पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या पाच वर्षाचे आपले वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. आणि सांगताना मला आनंद होतो, पुढचे पाचही वर्ष दरवर्षी वीजेचे भाव आम्ही कमी करत जाणार आहे. घरगुती वीजेचे भाव आणि औद्योगिक वीजेचे भावदेखील.’’
संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही देत, जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवत, बीडची वैभवशाली ओळख जगासमोर आणण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. खो- खो विश्वचषक स्पर्धेतल्या विजेत्या संघातले खेळाडू प्रतिक वाईकर, प्रियांका इंगळे, राम कश्यप, सुयश गरगटे, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड आणि प्रशिक्षक प्राची वाईकर, शिरीन गोडबोले यांचा यावेळी सत्कार झाला. आष्टी तालुक्यात सावरगाव इथं मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतनाा ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, जिल्ह्याचा २०२५-२६ या वर्षाचा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून, प्राप्त निधीचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठी करावा, असे निर्देश पवार यांनी दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मितीसंदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं आणि जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जेसंदर्भात प्रस्तावाचा समावेश करावा, अशी सूचना पवार यांनी यावेळी सगळ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना केली. लातूर शहरातल्या गंजगोलाई या ऐतिहासिक वैभवाच्या ठिकाणाला जोडणार�� रस्ते आणि परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अधिकाऱ्यांनी या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. जिल्ह्यात येऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक पाहता येत्या पाच वर्षात शहराची लोकसंख्या वाढणार असून, त्यादृष्टीनं निर्माण करण्याच्या पायाभूत सुविधा आणि अन्य आवश्यकतांसाठी वाढीव नियोजन करण्यात आलं असल्याचं, तसंच जिल्ह्यातली ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याचं सांगत, पालकमंत्री शिरसाट यांनी नागरी सुविधा विकासासाठी वाढीव निधी मिळावा, अशी मागणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेडमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड इथल्या श्री हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराला देखील शिंदे भेट देणार आहेत.
औद्योगिक जमिनीसाठी बिगरशेती - एनए ची आवश्यकता असणार नाही, तसंच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. याकरता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार असल्याचं, याबाबत जारी पत्रकात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता - इज ऑफ डुईंग बिझनेस या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी "कॅरी ऑन योजना" लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एकसमानता ठेवावी, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कॅरी ऑन योजना सुरू करण्याची सूचना पाटील यांनी केली.
केंद्र सरकारतर्फे कालपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात आली आहे. ‘जल लाये, धनधान्य’ अशी या यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही यात्रा येत्या ६० ते ९० दिवसांत २६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या सहा हजार ६७३ ग्रामपंचायतींना, देशभरातल्या ८०५ प्रकल्पांची माहिती देईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन, चा भाग असलेल्या या यात्रेचा उद्देश, जलसंधारण आणि मातीच्या ��ापिक होण्याबद्दल जनजागृती करणं, हा आहे.
बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या रेल्वेमार्गाची जलदगती चाचणी काल झाली. अहिल्यानगर ते बीड या २६१ किलोमीटर अंतराच्या रेल्वेसेवेची बीडवासियांची गेल्या तीन दशकापासून मागणी होती, अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं, मात्र आता बीड जिल्ह्याची या रेल्वे सेवेची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर झाले असून, नांदेडच्या टायनी एंजल्स स्कूल या संस्थेच्या ’प्लॉट नं. शून्य’, या नाटकानं पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेडच्याच शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेच्या ‘आभाळ’ या नाटकाचा द्वितीय, परभणीच्या गोपाला फाऊंडेशन या संस्थेच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाचा तृतीय, तर मंठा इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या ‘लपंडाव’ या नाटकाचा चौथा क्रमांक आला आहे. ही चारही नाटकं अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकून कर्नाटक पहिल्या, सेना दल दुसर्या तर महाराष्ट्र तिसर्या स्थानावर आहे.
पुरुष क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
छत्रपती संभाजीनगर इथं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या चैतन्य तुपे या सात वर्षीय मुलाची पोलिसांनी काल सुटका केली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री चैतन्य हा वडील सुनिल तुपे यांच्यासोबत खेळत असताना त्याचं अपहरण झालं होतं.
परभणी जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला वीस ते पंचवीस दिवसांची मुदतवाढ द्यावी, या मागणीचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. ही मुदतवाढ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला आहे.
सर्व माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता, वीरपिता आणि अवलंबित, यांनी सैनिक कल्याण विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन या विभागानं केलं आहे. तसंच याआधी दाखल केलेले अर्ज आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आणून द्याव्यात, असंही कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४४
शुभदाने स्वाधीन केलेल्या पिशवीतून सामान बाहेर काढून ठेवीत मनोरमा म्हणाली, "शुभदा, तूं येशील म्हणून मी चहा करायची थांबले होते! घरी पिऊन आली असलीस तरी माझ्याबरोबर पुन: घेशील ना?" "तुला कंपनी देण्यासाठी घेईन अर्धा कप;--पण तोपर्यंत मी एकदां सुहासिनी मॅडमना बघून येऊं कां? ह्यांच्या तोंडून ती भयानक बातमी ऐकल्यापासून जिवाला चैन नाहींये!" शुभदाला बेडरूमचं दार उघडून देऊन मनोरमा कीचनकडे वळली. शुभदाने दारातूनच ड��कावून बेडकडे बघितलं तर अंगावर व्यवस्थित घातलेल्या पांघरुणाखाली सुहासिनीमॅडमचं शरीर दिसतच नव्हतं! दिसत होता तो फक्त त्यांचा निद्रिस्त शांत चेहरा आणि त्याभोंवतीची दाट शुभ्र केसांची महिरप! भूतकाळातील अनेक आठवणी मनांत दाटल्यामुळे शुभदा जागींच खिळल्यागत ऊभी राहून बघत असतांना नकळत तिचे डोळे भरून आले आणि हलक्या हाताने बेडरूमचं दार लावून ती परत फिरली. तिची चाहूल जाणवून मनोरमा म्हणाली, "कीचनमधेच ये, शुभदा!" साश्रू डोळ्यांनी विमनस्कपणे बसलेल्या शुभदापुढे चहाचा कप ठेवीत मनोरमा म्हणाली, "भाऊसाहेब त्यांच्या परीने ह्यांना 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करायला मदत करीत असतात. त्यातूनच माझी सुहासिनीची ओळख झाली! पण तुझी तिच्याशी ओळख कशी?"
"आमची जयू ८ वीत असतांना सुहासिनी मॅडम तिच्या क्लासटीचर होत्या. सायन्स विषयही त्याच शिकवायच्या. शिक्षणाचा प्रात्यक्षिक भाग म्हणून त्या हौसेनं स्टडी टुर काढीत! अशाच एका टुरनंतर त्यांनी 'भेटायला या' म्हणून निरोप पाठवला!" शुभदा भूतकाळाच्या आठवणी जागवीत सांगू लागली, "पण ह्यांना कुठे ऑफिसच्या कामांतून वेळ मिळायला! चार दिवस वाट बघून शेवटी मी एकटीच भेटायला गेले. पहिल्याच भेटीत त्या जयूचं वनस्पतींबद्दलचं कुतूहल आणि निरीक्षण यांबाबत भरभरून बोलल्या! जयूचे इतर छंद आणि आवडींची आस्थेनं चौकशी केली! जयू ९ वीत गेल्यावरही त्यांनी तिच्या प्रगतीमधे रस घेतल्याने आमच्या भेटी होत राहिल्या, ओळख वाढत गेली!" "मीसुद्धां अनेकांकडून तिच्या जीव ओतून शिकवण्याबद्दल ऐकलं आहे!" मनोरमा म्हणाली, "बाहेर पडली तर अजूनही तिचे जुने विद्यार्थी मोठ्या आदराने तिला भेटतात!" "पांच वर्षांपूर्वी जयू आली होती तेव्हां कपड्यांच्या दुकानांत आम्ही खरेदी करीत असतांना तिने अचानक मॅडमना ओझरतं पाहिलं आणि धांवतच जाऊन त्यांना गांठलं! तिथंच त्यांच्या पायां पडली तेव्हां "अग, बबली तूं?" म्हणतांना मॅडमना केवढा आनंद झाला होता! खरेदी राहिली बाजूला आणि त्यांच्या गप्पा संपेनात, तेव्हां 'एकदां आरामांत गप्पा मारायला घरी ये' म्हणाल्या होत्या! पण जेमतेम दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे जयूला नाहींच जमलं! परत जातांना ती 'मॅडमना पुन: भेटतां आलं नाही' म्हणून जाम हळहळली होती!कारण पुढे ज्या वनस्पतींविषयक संशोधनक्षेत्र���ंत जयूने स्कॉलरशिप मिळवून डाॅक्टरेट केली, त्यातली तिची रुची आणि कल ओळखून मॅडमनी तिला प्रोत्साहन दिलं! आपल्या करीअरचा पाया घालण्याचं श्रेय ती नेहमी मॅडमनाच देते!"
"जयूचं टोपण नांव 'बबली' असल्याचं मला आजच समजलं!" मनोरमा कौतुकाने म्हणाली. "जयू लहान असतांना आम्ही भाड्याच्या जागेत रहात होतो तिथे शेजारी शर्मा कुटुंब होतं! त्यांच्या घरांत समवयस्क लहान मुलं असल्याने जयू तिथे रमायची!शर्मा मंडळीनीच तिला 'बबली' म्हणायला सुरुवात केली. तिच्या 'बबली' या टोपणनांवाचं सुहासिनी मॅडमना केवढं अप्रूप!'किती वेगळं आणि गोड आहे' म्हणायच्या आणि कौतुकाने हंसायच्या!" "नांवाप्रमाणे सतत हंसत असायची!" खेदाने मान हलवीत मनोरमा म्हणाली, "पण आज ही काय वेळ आली बघ तिच्यावर!" "विषय निघाला, म्हणून विचारतेय्--" काहीशी चांचरत शुभदा म्हणाली, "मॅडमचा आत्महत्येचा प्रयत्न ऐनवेळी कुणी हाणून पाडला?" "सकाळी भाऊसाहेब नेहमीप्रमाणे शुक्रवारच्पा गप्पांच्या बैठकीला गेल्यावर सुहासिनीने 'जगण्यांत रस न उरल्याने मी स्वतःहून आयुष्य संपवीत आहे. याबाबत इतर कुणालाही दोष देऊं नये!' अशा आशयाची चिठ्ठी लिहून बेडवर ठेवली! त्यानंतर ती जीव देण्यासाठी बेडरूमच्या खिडकीतून उडी मारणार होती. पण आठव्या मजल्यावरून खाली बघितल्यावर तिला बहुधा भोंवळ आली आणि ती आंतल्या बाजूला पडली! तो आवाज ऐकून खालच्या फ्लॅटमधले घाबरून चौकशी करायला धांवत आले. शेजारी कुणाकडे तरी डुप्लिकेट चावी होती ती वापरून फ्लॅटचा दरवाजा उघडला तर सुहासिनी बेडरूममधे, खिडकीखाली बेशुद्ध अवस्थेमधे पडलेली आढळली! तेवढ्यांत शेजारी बेडवर तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी कुणीतरी वाचली आणि एकच हलकल्लोळ उडाला!" सगळी हकीकत नुसती ऐकतांना थरकांप उडालेल्या शुभदाने स्वत:ला सावरण्यासाठी बाजूच्या खुर्चीचा आधार घेतला! "नशीब बलवत्तर म्हणून सुहासिनी वाचली आहे, शुभदा! अगदी सुखरूप आहे!" म्हणत मनोरमाने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला! तेवढ्यांत दरवाजाचं लॅच उघडल्याचा आवाज आला! पोलीस चौकीतील काम निपटून मनोहर भोसले भाऊसाहेबांना सोबत घेऊन परतले होते. शुभदाला उद्देशून भोसले म्हणाले, "अनंतरावांशी माझं वाटेतच बोलणं झालं! ते आणि आणखी कांही मित्र १०-१५ मिनिटांत पोहोचतीलच!"
२२ जून २०२३
0 notes